Friday 28 June 2019

आंध्रात इतिहासाची पुनरावृत्ती!

"इतिहासात घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होत असते याची अनुभूती सध्या आंध्रप्रदेशात येतेय. तेलुगु देशमचे नेते आणि आंध्रप्रदेशचे लाडके नटसम्राट एन.टी. रामाराव यांची १९९५ मध्ये त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता हस्तगत करून जी अवस्था चंद्राबाबू नायडू यांनी त्यांची केली होती; तीच आणि तशीच अवस्था आज चंद्राबाबू नायडूंची झालीय. एनटीआर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नी लक्ष्मीपार्वती यांच्याशी चंद्राबाबूंनी ज्याप्रकारे व्यवहार केला तोच व्यवहार नव्यानं मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर जगन मोहन रेड्डी यांनी आरंभलीय. त्यांची सुरक्षा कमी करून टाकलीय. त्यांनी पक्षाच्या बैठकीसाठी, जनता दरबार भरविण्यासाठी म्हणून बांधण्यात असलेली 'प्रजावेदिका' नामक इमारत पाडून टाकलीय. आता त्यांच्या निवासस्थानावावर हातोडा पडणार आहे. याशिवाय इतर १७ बांधकामे पाडली जाणार आहेत. त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता देखील बंद केला जातो आहे. ही सुरुवात आहे. पुढील काळात तिथलं नवं सरकार कोणती पावलं उचलणार आहे याची चुणूक दिसून येतंय."
-----------------------------------------------

*आं* ध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानुसार 'प्रजा वेदिका' ही इमारत पाडण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. प्रजा वेदिका ही इमारत माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष एन. चंद्रबाबू नायडूंच्या अंदावल्ली स्थित घराचा विस्तारित कॉन्फरन्स हॉलचा भाग आहे. जगनमोहन रेड्डींनी याच इमारतीत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या निर्णयाची घोषणा केली. जगनमोहन रेड्डी म्हणाले, “प्रजा वेदिका ही इमारत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नियमांचे उल्लंघन करुन बांधली होती. त्यामुळे या अवैध इमारतीविरोधात कारवाई करुन अवैध बांधकामांविरोधातील अभियान राबवले जाईल. रेड्डी सरकारने नायडू राहत असलेली ही इमारत ताब्यात घेतली. नायडू सध्या आंध्र प्रदेशचे विरोधी पक्षनेते आहेत. विशेष म्हणजे या इमारतीवरील कारवाई ते कुटुंबासोबत विदेशात सुट्टीसाठी गेले आहे. रेड्डींच्या या निर्णयाला टीडीपीने राजकीय द्वेषातून सूडबुद्धीने केलेली कारवाई म्हटले आहे. तसेच रेड्डी यांनी माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करायला हवा, असंही नमूद केलंय. टीडीपीचे विधानपरिषदेतील आमदार अशोक बाबू यांच्या मते, “सरकारी कर्मचाऱ्यांनी चंद्राबाबूंचं खासगी साहित्य बाहेर फेकलं. शिवाय सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती पक्षाला दिलेलीच नाही” दुसरीकडे नगरविकास मंत्री बोत्सा सत्यनारायण यांनी टीडीपीवर हल्ला चढवला. “चंद्राबाबूंवर तशीच कारवाई होईल, जशी कारवाई जगनमोहन रेड्डींवर विरोधी पक्षनेते असताना झाली होती”, असं त्या म्हणाल्या. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चंद्रबाबू नायडू यांनी जगनमोहन रेड्डी यांना ‘प्रजा वेदिका’ ही इमारत सरकारी इमारत म्हणून घोषित करण्याची आणि विरोधी पक्षनेत्याचे निवासस्थान करण्याची मागणी केली होती.

*चंद्राबाबू यांची प्रजावेदीकाची मागणी फेटाळली*
आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य वेगळे झाल्यानंतर, चंद्राबाबूंनी आंध्रप्रदेश प्रशासनाचा कारभार हैदराबादवरुन अमरावतीला हलवला होता. तेव्हापासूनच चंद्राबाबू अमरावतीत राहात होते. त्यांनी या ठिकाणी ८ कोटी रुपये खर्चून ‘प्रजा वेदिका’ हे निवासस्थान उभारले होते. नायडू या ठिकाणी राहत होतेच, सोबत पक्षाच्या बैठकाही याच ठिकाणी होत असत.
आंध्रात सत्तापालट झाल्यानंतर जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून चंद्राबाबूंची विशेष सुरक्षा काढण्यात आली. या महिन्याच्या सुरुवातीलाच चंद्राबाबूंनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना पत्र लिहून, या इमारतीचा बैठकांसाठी उपयोग करु द्यावा, अशी मागणी केली होती. तसेच हे घर विरोधी पक्षनेत्याचे घोषित करा, अशी मागणी केली होती. मात्र, सरकारने प्रजा वेदिका ही इमारत ताब्यात घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.

*चंद्राबाबुंनी पाठीत खंजिर खुपसला*
एन टी रामा राव यांनी आपल्या अखेरच्या काळात दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं ही माझी दशा हि मोगल बादशहाच्या शहाजहान यांच्यासारखी झालीय. सतराव्या शतकात शहाजहांन त्याचा मुलगा यांनं त्यांना जेलमध्ये बंद केलं होतं आणि म्हटलं होतं, माझ्या पाठीवर खंजिर खूपसलाय. त्याच न्यायानं मी सजा भोगतोय; मला पण माझ्या जावयानं म्हणजे चंद्रबाबू नायडू यांनी उलथून  टाकलं आहे आणि नजर कैदेत ठेवले आहे.

नुकतच राज्यसभेतल्या चार सदस्यांनी तेलगू देशम पार्टीचा त्याग करून भारतीय जनता पक्षाची सोयरीक केली, म्हणजेच निसर्गानं आपला हिशोब चुकता केला आहे. नुकतंच मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी चंद्रबाबूंच्याच्या घराशेजारी असलेल्या प्रजावेदिका ही प्रशासकीय इमारत ला नेस्तनाबूत करतानाच चंद्राबाबूंच्या घरातील सामान बाहेर काढून फेकून दिलेलं आहे आणि प्रजा वेदिका ताब्यात घेऊन तोडून मोडून टाकली आहे. अशाच प्रकारे त्यांनी आपली सासू म्हणजेच एन टी रामा राव यांची दुसरी पत्नी लक्ष्मी पार्वती यांच्याशी असाच गैरव्यवहार केला होता. खरंतर चंद्राबाबू यांना पंतप्रधान व्हायचं होतं. प्रधानमंत्रीपदाचे स्वप्न ते पाहत होते. आणि हे स्वप्न त्यांना दाखवलं ते बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी! काँग्रेसला बाजूला ठेवून तिसरा मोर्चा उभा करायचा आणि त्याच्या वतीने पंतप्रधानपदासाठी चंद्राबाबू नायडू यांना उभा करायचं; यासाठी ममता यांनी स्वतः बाजूला जायची इच्छा व्यक्त केली होती. पाहायला हे सगळे बरोबर होतं, तसं पाहिलं तर त्यांनी एनडीएचा साथ सोडलेली होती त्याच वेळी प्रधानमंत्रीपदाचे स्वप्न त्यांना पडत होती. त्यांनी आंध्रप्रदेश सरकारच्या विशेष दर्जा आणि स्वायत्ततेचा प्रश्न उभा करू एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. चंद्रबाबू नायडू यांनीही उचललेले पाऊल खरतर स्वार्थापोटी घेतलेलं होतं हे लक्षात आल्यामुळेच आंध्रप्रदेशातील मतदारांनी त्यांना नाकारलं आणि जगन मोहन यांच्या हाती आंध्रची सत्ता सोपवली. नायडूंचा पराभव आणि जगन मोहन यांचा विजय यामागे भारतीय जनता पक्षानं पडद्यामागून सूत्र हलवलेलं आहे. भाजपची मदत घेऊन जगन मोहन यांनी नायडू यांचा  पत्ता कापून टाकला. असे आंध्रमधील राजकीय निरीक्षक म्हणतात, तर दुसरीकडे तिसऱ्या मोर्चाचा नाव ऐकून काँग्रेस व्यथित झाली होती. कारण या मोर्चाच्या प्रधानमंत्रीपदी उमेदवार म्हणून राहुल गांधी यांचे नाव जवळपास नक्की झाला होतं. तिसऱ्या मोर्च्याप्रमाणे प्रधानमंत्रीपदाचे सूत्र मात्र ममता बॅनर्जी मायावती यांच्यानंतर चंद्राबाबू यांच्याकडे आलं होतं आणि त्यांनी आपलं नाव पुढे सरकवलं होत. मतदारांच्या संपर्कात राहण्याऐवजी ते ममता आणि मायावती यांच्या संपर्कातच मोठ्या प्रमाणात होते. जेव्हा जगन रेड्डी पदयात्रा करून राज्यातल्या प्रत्येक गावामध्ये फिरत होते. त्यावेळी नायडू हे दिल्लीच्या वाऱ्या मारत होते. स्वतःचा मतदारसंघ व स्वतःचे राज्य गढ याचं रक्षण करण्याऐवजी ते तिसरा मोर्चा, तिसरा मोर्चा करत आपलं काम मजबूत करण्याच्या प्रयत्न करत होती. नायडू काय शकतात हे भाजपाला बरोबर माहिती होतं. कारण चंद्रबाबु कसे आहेत हे भाजपालाही चांगलंच माहिती होतं. कारण ते त्यांच्यासोबत अनेक वर्ष होते. भाजपनं नायडूंना शत्रु नंबर एक असं समजलं होतं. खरा मित्रांना सोडून खोट्या मित्रांना जवळ केलं तर काय स्थिती होते, हे चंद्राबाबू नायडू या प्रकरणामधून लक्षात आलं असेल. राजकारणातील प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकायला हवंय. पंतप्रधानपदाच्या मोहापायी आंधळे झालेले चंद्रबाबू नायडू स्वतःची राजकीय पत आणि सत्ता घालवून बसले आहेत. खरंतर त्यांची राजकीय गाथा खूप मोठी आहे. पण जेव्हा त्यांनी बंडखोरी करून तेलगू देशमच सरकार पाडलं आणि अशाच चंद्राबाबूंना जगन रेड्डी यांनी पराभूत केले आहे. तिथे महत्त्वाची नोंद करायला हवी ती ही की, विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या पंतप्रधान बनण्याच्या स्वप्न पाहणाऱ्या सगळ्यांच नेत्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. यात राजीव गांधी पासून नायडू यांच्या पर्यंत सर्वांचा समावेश होतो. निवडणुकीदरम्यान काँग्रेसपेक्षा मोठा दणका त्यांना झालेला आहे त्यांनी राज्य कमावलं. गेल्या आठवड्यात पाच पैकी चार राज्यसभेचे सदस्य गमावले. आंध्र प्रदेश चे सीईओ बनवून नायडू आता रस्त्यावर फिरत आहेत. चंद्राबाबूंची ही अवस्था पाहून त्यांची कर्मगती यातून दिसून येते!

हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...