Sunday 29 December 2019

केंद्रात मजबूत पण राज्ये निसटू लागलीत

"भाजपची अवस्था अतिआत्मविश्वास आणि स्वत:च्या क्षमतेचा गर्व झालेल्या गोष्टीतल्या सशासारखी झालीय. महाराष्ट्र आणि हरियाणानंतर आलेला हा निकाल देशातील राजकारणाच्या बदलणाऱ्या वाऱ्याचा संकेत देणारा आहे. केंद्राच्या सत्तेत मजबुतपणे असलेल्या भाजपला बसलेला हा आणखी एक झटका आहे. हरियाणात सत्ता काबीज करताना मोठी कसरत करावी लागली, तर महाराष्ट्रात तर सर्वाधिक जागा मिळूनही सत्तेपासून वंचित राहावं लागलं. आपल्याला हवी ती धोरणं आखण्यापासून ती सक्तीनं राबवण्यापर्यंत, राष्ट्रीय आणि राजकीय वर्तणुकीतील अहंमन्यतेला वारंवार धक्का बसतोय. झारखंडमधील प्रचार सभांत अमित शहा आवर्जून सांगायचे, की वाजपेयींनी निर्माण केलेल्या या राज्याचा विकास मोदींनीच केलाय. काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चाच्या काळात केवळ गरिबी आणि नक्षलवाद वाढला. पण, २०१४ पासून केंद्रात आणि राज्यातही भाजपचंच सरकार होतं. तरीही तिथं मतदारांनी नाकारलं, याचा अर्थ लोकांना पर्याय हवा होता. काँग्रेसनं झारखंड मुक्ती मोर्चाला सोबत घेऊन तो दिला आणि त्यात त्यांना यशही आलं. भाजपच्या विरोधात काँग्रेसनं बदललेली नीती, हा या निकालातील महत्वाचा पैलू आहे. हा सत्ताबदल केवळ राजकीय नाही, तर मानसिक आणि भावनिकही आहे------------------------------------------------

*स* हकारी पक्षांशी भाजपेयींचं वागणं हे अविश्वासाचं, बेभरवशाचं तसंच अवमानकारक ठरलंय. मित्रपक्षांशी बिघडलेले संबंध त्यांना अडचणीचं ठरतंय. भाजपेयींना मित्रांच्या सहकार्यानं झारखंडमध्ये यश मिळवणं सहजशक्य होतं पण त्यांच्याशी फटकून वागण्याची भाजपेयींची राजनीती त्यांच्या अपयशाला कारणीभूत ठरलीय. झारखंडमध्ये विधानसभेच्या ६५ हून अधिक जागा मिळवू अशी वलग्ना करणाऱ्या भाजपेयींना अखेर तिथं अरण्यरुदन करावं लागलंय! अशाचप्रकारे महाराष्ट्रातही सर्वाधिक जागा मिळवितानाही मित्रपक्षांशी म्हणजेच शिवसेनेशी फटकून वागणं त्यांच्या अंगाशी आलंय. सहज सत्ता हाती येईल अशी अवस्था असताना केवळ सत्तालोभापोटी अहंकारामुळं त्यांना सत्ता गमवावी लागलीय. झारखंडातही अशाचप्रकारे मित्रांशी अहंकारानं वागून दूर केल्यानं झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल गठबंधनकडे जनतेनं सत्ता सोपवलीय. २०१४ मध्ये भाजपेयींच्या हाती संसदेत एकहाती सत्ता आली. तेंव्हापासूनच आपल्या मित्रपक्षांशी फटकून वागणं, त्यांची अवहेलना करणं, त्यांचा अवमान करणं सुरू झालंय असा आरोप केला जात होता. झारखंडमध्येही अशीच भाजपेयींची ही भूमिका त्यांच्या अंगलट आलीय. गेल्या विधानसभा निवडणुकांच्यावेळी भाजपेयींनी ऑल झारखंड स्टुडंट युनियन - एजेएसयु या पक्षाशी आघाडी केली होती. ज्यामुळं भाजपेयींना ३७ आणि एजेयूएसला ५ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळं सत्ता त्यांच्या हाती आली होती. यावेळी मात्र आपल्या सहकाऱ्याला सोडून देऊन स्वतंत्ररित्या निवडणूक लढवली.

*मित्रपक्षांमुळं मतविभागणीचा फटका बसला*
सन २००० मध्ये झारखंड हे नवं राज्य अस्तित्वात आलं, तेव्हापासून एजेयूएस हा भाजपेयींचा सहयोगी पक्ष म्हणून ते एकत्रितपणे काम करत होते. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शिवसेनेला दूर सारलं त्याप्रमाणेच झारखंडमध्ये भाजपेयींनी एजेयूएसला दूर राखलं, तेच त्यांना भारी पडलं, सत्तेपासून दूर जावं लागलं. एजेयूएसनं गेल्यावेळी आठ जागा लढवून पाच जागा मिळवल्या होत्या. या निवडणुकीत त्यांनी भाजपकडे सतरा जागा मागितल्या त्या भाजपनं द्यायला नकार दिला. लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या १४ पैकी १२ जागा त्यांनी जिंकल्या होत्या; जवळपास ५६ टक्के मतं मिळविली होती. लोकसभेच्या जिंकलेल्या जागा पाहता भाजपेयींना ६३ जागा मिळणं सहजशक्य होतं. महाराष्ट्रातला अनुभव लक्षांत घेऊन भाजपेयींनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्धार केला. केंद्रात एनडीएत सहभागी असलेल्या रामविलास पासवान यांच्या एलजेपीनंही भाजपेयींबरोबर निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण तीही भाजपेयींनी फेटाळून लावली. याशिवाय नितीशकुमार यांच्या जेडीयूनं देखील स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. तिथं मित्रपक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्यानं त्याचा थेट परिणाम भाजपेयींवर झाला. मतविभागणी झाल्यानं भाजपेयींना अपयशाला सामोरं जावं लागलं.

*नरेंद्र मोदींचा चेहराही लाभकारक ठरला नाही*
भाजपेयींनी निवडणूक प्रचारात ८१ पैकी ६५ जागा मिळवून भाजप स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता स्थापन करील असा दावा केला होता. भाजपेयींना असं वाटत होतं की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा चेहरा दाखवून सफलता मिळेल. त्यामुळं प्रचाराच्या रणनीती अंतर्गत झारखंडमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या अनेक प्रचाराच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. इतकंच नाही तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही प्रचारात उतरवलं होतं. पण प्रचाराचे फासे उलटे पडले आणि भाजपेयींना सत्ता गमवावी लागली. एकाबाजूला भाजपेयींनी आपल्या मित्रपक्षांशिवाय निवडणूक लढवली तर, विरोधकांनी एकत्रितरीत्या सामोरं जाऊन भाजपेयींच्या एकहाती सत्ता मिळविण्याचं स्वप्न उध्वस्त केलं. गेल्यावेळी आज सत्तेवर आलेल्या तीनही पक्षांनी अलगपणे निवडणूक लढवली होती. यावेळी नंतर महाराष्ट्र आणि हरियाणातला अनुभव लक्षात घेऊन काँग्रेसनं इथं झारखंड मुक्ती मोर्चा आणि आरजेडीशी आघाडी करण्याचा शहाणपणा दाखवला. भाजपेयींनी महाराष्ट्राप्रमाणे इथंही त्याच मुख्यमंत्र्यांकडे भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून रघुबर दास यांना मतदारांसमोर सादर केलं. इथं मोठ्याप्रमाणात असलेल्या आदिवासींच्या समाजानं भाजपच्या रघुबर दास यांचा चेहरा स्वीकारला नाही. झारखंडमध्ये २६.३ टक्के आदिवासी आहेत. शिवाय राज्यात २८ जागा या आदिवासींसाठी आरक्षित आहेत. झारखंड मुक्ती मोर्चानं आदिवासींचा नेता हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून समोर आणलं. तर भाजपेयींनी आदिवासी नसलेल्या रघुबर दास यांना पुढं केलं होतं. त्यामुळं साहजिकच त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं!

*रघुबर दास यांना न बदलणं घातक ठरलं*
झारखंडच्या आदिवासींमध्ये रघुबर दास यांच्या अनेक धोरणांनी, निर्णयामुळे खूप नाराजी होती, रोष होता. आदिवासींना असं वाटत होतं की, रघुबर दास यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय हे त्यांचे हक्क काढून घेणारे आहेत. त्यांच्यावर अन्याय करणारे आहेत. याशिवाय भाजपेयीं नेत्यांकडे आदिवासी नेते अर्जुन मुंडा यांना मुख्यमंत्री करावं अशी मागणी करण्यात आली होती पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी रघुबर दास याचंच नाव लावून धरलं होतं. त्याचाही परिणाम निवडणूक निकालावर झाला. भाजपतील असंतुष्ट नेत्यांची समजूत काढण्यात अपयश आलं तेही अडचणीचं ठरलं. भाजपचे एक मोठे नेते राधाकृष्ण किशोर यांनी पक्षत्याग करून एजेएसयुला साथसंगत केली. याचप्रमाणे दुसरे एक प्रभावी नेते सरयु राय यांनाही उमेदवारी न दिल्यानं त्यांनी थेट मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याविरोधातचं शड्डू ठोकला! भाजपनं खरं म्हणजे मोदी आणि शहा या जोडगोळीनं झारखंड निकालानंतर चिंतन करायला हवंय. ज्या सरयु राय या भाजपनेत्यानं लालुप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा यांचा चारा घोटाळा, मधु कोडा यांचा चार हजार कोटी रुपयांचा खाण घोटाळा उघडकीस आणला. या दिग्गज तीन मुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला. त्यांना तुरुंगवारी घडविली; त्याच नेत्यानं भाजपचीच सत्ता असणार्‍या झारखंडमध्ये मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीबाबत वारंवार आवाज उठवल्यानंतर मात्र सरयु राय यांची दखलच न घेणं, जाणीवपुर्वक दुर्लक्ष करणं, उमेदवारी नाकारणं हे सगळंच भाजपला महागात पडलंय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करुन सरयु राय निवडुन देखील आले. भाजपच्या ताब्यातुन हे राज्यसुद्धा गेलं. राज्याच्या निवडणुकांमध्ये स्थानिक प्रश्न महत्वाचे असतात, हे लक्षात न घेता राष्ट्रीय प्रश्नांवर, मुद्द्यांवर मोदी - शहा फोकस का करतात, हे समजत नाही.

* २०१४ पासून यश तर २०१८ पासून अपयश*
२०१४ मध्ये केंद्रात भाजपची सत्ता येताच भाजपेयींनी आपल्या संस्कारानुसार 'एकचालुकानुवर्तीत सत्ता' देशात असावी असा प्रयत्न सुरू केला. केंद्राप्रमाणेच भारतातील सर्व राज्यातून भाजपचीच सत्ता असावी यासाठीचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी सत्तेचा, साम, दाम, दंड, भेद या सर्व आयुधांचा वापर सुरू केला. भाजपेयीं त्यांच्या या प्रयत्नाला 'डबल इंजिन' असं संबोधतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि भाजपचे वरिष्ठ नेते देशभरातील सर्व भाजपेयींना बैठकांतून या फार्म्युलाबाबत सतत उल्लेख करीत, विकासासाठी याची गरज असल्याचं सांगत. हे एकाबाजूला सुरू असतानाच दुसरीकडे भाजपची सत्ता नसलेली राज्ये भाजपसमोर विकासकामांत अडचणी उभ्या करताहेत. केंद्रातल्या भाजपच्या योजना राबविताना जाणूनबुजून दुर्लक्ष, दिरंगाई करतात असा कांगावा केला गेला. प्रारंभी भारतातल्या जनतेनं भाजपेयींची 'डबल इंजिन' फार्म्युला काही प्रमाणात स्वीकारला. छुपा एकचालुकानुवर्तीत अजेंडा २०१४ नंतर भाजपनं आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या साथीनं २०१८ पर्यंत २१ राज्यात सत्ता संपादित केली. पण आता तो फार्म्युला निष्फळ ठरताना दिसतोय. २०१४ मध्ये त्यावेळी केवळ सात राज्यात भाजपेयींची सत्ता होती, त्यातही दोन राज्यात मित्रपक्षांशी गठबंधन सरकारं होती. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गोवा इथं भाजपची सरकारं होती. पंजाब आणि महाराष्ट्रात गठबंधन सरकारं होती. दुसरीकडे १३ राज्यात काँग्रेसची सरकारं होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणा, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, झारखंड, आणि जम्मू काश्मीर मध्ये एकहाती वा मित्रांच्या साहाय्याने सरकारं बनवली होती. २०१६ मध्ये भाजपेयींनी आसाममध्ये इतिहास रचला. तिथलं १५ वर्षे सत्तेवर असलेलं काँग्रेसचं सरकार संपवलं. त्यानंतर २०१७ मध्ये सात राज्यात विधानसभा निवडणुका लावल्या गेल्या. त्यावेळी भाजपेयींनी उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, हिमाचल प्रदेश, आणि गुजरातमध्ये सरकारं बनवली पण पंजाबमध्ये अकाली दलाची सोबत असतानाही दगाफटका झाल्यानं सत्ता गमवावी लागली. पूर्वोत्तर राज्यातूनही भाजपनं आपल्या मित्रपक्षांशी युती करून सरकारं बनवली. २०१८ हे वर्ष भाजपेयींसाठी लाभकारक ठरलं आणि त्रिपुरातंही सरकार बनवलं!

*मित्रांची साथ सोडणं भाजपसाठी आत्मघाती*
त्यानंतर मात्र भाजपसाठीचा कठीण काळ सुरू झाला. २०१८ मध्ये कर्नाटकात सर्वाधिक जागा जिंकूनही त्यांना सत्तेपासून वंचित राहावं लागलं. तिथं काँग्रेस-जेडीयू यांनी सरकार बनवलं. नंतर यावर्षी ती युती फोडून भाजप तिथं सत्ता संपादन करण्यात यशस्वी ठरला. २०१८ च्या अखेरीस भाजपेयींना खूप मोठा फटका बसला. जिथं भाजपेयींचं प्राबल्य होतं अशा तीन महत्वाच्या हिंदी भाषिक राज्यात मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मधील त्यांची सत्ता निसटून काँग्रेसच्या खात्यात गेली. तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांच्यासमोर भाजपचं काही चाललं नाही. यावर्षी आंध्रप्रदेश, ओडीसा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हरियाणा, महाराष्ट्र, आणि झारखंड या सात राज्यात निवडणुका झाल्या. ज्यात आंध्रप्रदेशात वायएसआर काँग्रेस, ओडीसात बीजेडी यांची सरकारं आली. अरुणाचल, सिक्कीम आणि हरियाणात भाजप वा त्यांच्या मित्रपक्षांच्या साथीनं सरकार स्थापन करण्यात यश आलं. महाराष्ट्रात मात्र त्यांना मोठा फटका बसला. सर्वाधिक जागा मिळाल्या असतानाही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येत तिथं सरकार बनवलं. आता झारखंड भाजपच्या हातून निसटलंय! लोकसभेत तर विरोधकांना भाजपेयींच्या विरोधात मजबूत पर्याय उभा करण्यात यश मिळालेलं नाही. उलटपक्षी तिथं भाजप एकटाच मजबुतपणे उभा राहिलाय. २०१४ नंतर २०१९ मध्येही पुन्हा एकदा तिथं स्पष्ट बहुमत मिळवलंय पण राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांचा बोलबाला आणि दबदबा कायम राहिलाय. ज्यामुळं भाजपेयींची पीछेहाट झालीय. एकेकाळी यशाच्या सर्वोच्च शिखरावर भाजपेयीं होते, ज्या राज्यांतून त्यांची सत्ता होती हे पाहता ते देशातील ५८ टक्के लोकांवर ते राज्य करीत होते. परंतु या पिछेहाटीनंतर त्यांचा प्रभाव केवळ ४३ टक्क्यांच्यापर्यंत सीमित राहिलाय. सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या भाजपेयींनी आपल्याच मित्रांची साथसंगत सोडून एकटं जाण्याचा निर्णय घेतला तो त्यांच्यासाठी आत्मघाती ठरलाय...!

-हरीश केंची
९४२२३१०६०९

Thursday 19 December 2019

नागरिकता विधेयक : समज, गैरसमज

"भारतानं संसदेच्या दोन्ही सभागृहात नागरिकता दुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर केलंय. आरोप-प्रत्यारोप झाले, इतिहासाचे दाखले, पुरावे देत आव्हान-प्रतिआव्हान दिलं गेलं. तरीही विरोध होत असतानाही हे दुरुस्ती विधेयक मंजूर झालंय. आता त्या विधेयकाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्यांची आहे. पूर्वेकडील राज्यांमध्ये याविरोधात आगडोंब उसळलाय. इतर सहा राज्यांनी त्याची अंमलबजावणी नाकारलीय. यात महाराष्ट्रही आहे. सतत मुंबईतल्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध आवाज उठविणाऱ्या शिवसेनेच्या सरकारनं विरोध केलाय!"
-------------------------------------------------------------

*दे* शाच्या पूर्वेकडील राज्यात नागरिकता दुरुस्ती विधेयकामुळे दंगली उसळल्यात. जाळपोळ, बंद करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक भागात कर्फ्यु लावला गेला आहे. प्रसिद्धीमाध्यमातून याबाबत फारसं काही येत नसलं तरी तिथली परिस्थिती फार गंभीर आहे. दुरुस्ती विधेयकामुळे आमच्या सार्वभौम अधिकारांवर गदा येतेय असं त्यांचं म्हणणं आहे. पण घुसखोर परकीयांना थोपवण्याच्या देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं जितकं महत्वाचं आहे. तितकंच इथल्या भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून नागरिकत्व नाकारणं हे योग्य वाटत नसलं तरी देशाच्या दृष्टीनं ते आवश्यक बनलं आहे. त्यासाठी सरकारनं ही दुरुस्ती केलीय. पण त्यातील तरतुदी आणि निर्माण झालेले गैरसमज दूर करावं लागणार आहे. त्यातच देशाचं सार्वभौमत्व सुरक्षित राहणार आहे.

*आश्रित, शरणार्थींना न्याय मिळेल*
ह्या दुरुस्ती विधेयकामुळे ज्या संकल्पनेवर स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांनी आपल्या देशाचा पाया रचला, त्या तत्वांशी नुकतेच संसदेत संमत झालेलं हे :नागरिकत्व दुरुस्ती विधेयक' संपूर्णपणे विसंगत आहे, हे म्हणणं पूर्णपणे असत्य आहे. वस्तुस्थितीला धरून नाही. असं म्हणावं लागेल. लोकसभेनं आणि राज्यसभेनं ज्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिलेली आहे, आणि राष्ट्रपतींनी त्यावर सही करून तो बदल कायद्यात समाविष्ट केला. ते कलम १९५५ च्या नागरिकत्व कायद्यात बदल करण्यासाठीचं आहे. देशाची फाळणी आणि त्यानंतर लोक भारतातून पाकिस्तानात जात असताना आणि पाकिस्तानातून भारतात येत असतानाच्या काळात हा नागरिकत्वचा कायदा १९५५ मध्ये तयार करण्यात आला होता. त्यावेळी नव्यानेच निर्मिती झालेल्या या दोन देशांमधली लोकसंख्या पूर्णपणे एका देशातून दुसरीकडं जाऊ शकली नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतानं धर्मनिरपेक्ष लोकशाही होण्याचा निर्णय घेतला होता. पण धार्मिकतेच्या आधारावर निर्माण झालेल्या पाकिस्ताननं १९५६ मध्ये स्वतःला इस्लामिक लोकतंत्र असलेलं राष्ट्र म्हणून जाहीर केलं होतं. स्वतःला इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित करणारा पाकिस्तान हा कदाचित जगातला पहिला देश म्हणावा लागेल. १९४८ मध्ये पाकिस्तानचे निर्माते आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अली जिना यांचं निधन झालं होतं आणि पाकिस्ताननं स्वतःला 'इस्लामिक राष्ट्र' म्हणून जाहीर करत जिना यांच्या सगळ्या विचारांना दूर केलं. हळूहळू पाकिस्तानचं एका धार्मिक देशात रूपांतर झालं. परिणामी पाकिस्तानात राहणारे बिगर मुस्लिम समाज, विशेषतः हिंदू आणि ख्रिश्चन लोकांच्या अडचणीत सतत वाढ होऊ लागली. जसं बिगर मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्यायात वाढ होऊ लागली, तसं हे लोक पाकिस्तानातून पळ काढायला लागले. अर्थातच या लोकांनी आपला देश म्हणून भारतात आश्रय घ्यायला सुरुवात केली. परिणामी पाकिस्तानातली बिगर मुस्लिम समाजाच्या एकूण लोकसंख्येत घट होऊन आता ही लोकसंख्या केवळ २ टक्क्यांहूनही कमी आहे. १९४७-४८ मध्ये देशाच्या फाळणीनंतर तब्बल ४७ लाख हिंदू आणि शीख पाकिस्तानातून पळ काढून भारतात आले, असं सांगितलं जातं. भारताच्या १९५५ च्या नागरिकत्व कायद्यामध्ये बदल करण्याची गरज दीर्घ कालावधीपासून जाणवत होती. ज्या लोकांनी आपलं घर सोडून भारतात येणं पसंत केलं, त्यांच्या मागण्या या आता विधेयकामुळं पूर्ण होऊ शकतील. हे असे लोक आहेत की, ज्यांचा आता स्वतःचा कोणताही देश नाही. त्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना इथे शरणार्थीप्रमाणे रहावं लागतंय. कोणत्याही सुविधा, हक्क मिळत नाहीत.

*हे विधेयक- धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाशी सुसंगत*
आपल्या देशाची'आयडिया ऑफ इंडिया' ही अशा एका देशाची संकल्पना आहे जो धर्मनिरपेक्षतेची संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारातही समाविष्ट करतो आणि प्रत्येक धर्माच्या लोकांना जिथे कोणत्याही भेदभावाशिवाय स्वीकारलं जातं. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यातून ही गरज आताशी पूर्ण होईल. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आश्रय घेणाऱ्या हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन धर्माचे अनुयायी, ख्रिश्चन आणि पारशी धर्माच्या लोकांना नागरिकत्व मिळवण्याची संधी यामुळे मिळते. भारताच्या मूळ नागरिकत्व कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला नागरिकत्वासाठी सलग ११ वर्षं भारतात राहण्याची अट पूर्ण करावी लागते. शिवाय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यासाठी आधीचे १२ महिने सलग भारतात राहण्याची अट पूर्ण करावी लागते. पण नागरिकत्व दुरुस्ती विधेयकानुसार या तीन देशांतून आलेल्या कोणालाही भारतीय नागरिक होण्यासाठी आणि नागरिकत्वाची भारतात ११ वर्षं राहण्याऐवजी ६ वर्षांचा कालावधी पूर्ण करावा लागेल. आणि शेवटची गोष्ट म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानात धर्मावरून अत्याचार होणाऱ्या लोकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल. जगभरात धर्मावरून लोकांवर होणारा अत्याचार ही एक सत्य परिस्थिती आहे. शिवाय धर्माखेरीज इतर कारणांमुळेही लोक देशोधडीला लागल्याच्या घटना घडलेल्या आपण वाचतो. म्हणूनच नवीन नागरिकता विधेयकामध्ये रोहिंग्या मुसलमानांना भारताचं नागरिकत्व देण्याचा पर्याय असायला हवा, हा युक्तिवाद स्वीकारला जाऊ शकत नाही. सभोवताली राष्ट्रे ही मुस्लिम राष्ट्रे म्हणून ओळखले जातात. तिथं बहुसंख्यांकानं मुस्लिम लोकवस्ती आहे, तर बिगर मुस्लिम हे अल्पसंख्यांक आहेत.

*रोहिंग्या मुसलमानांसंबंधी भूमिका स्पष्ट केलीय*
रोहिंग्या मुसलमानांची तक्रार म्यानमारमधील सध्याच्या सरकारबाबत आहे. याचमुळे अनेकदा त्यांनी आपल्या सरकारच्या विरुद्ध तिथं बंडही केलेलं आहे. सरकारशी संघर्ष केल्याचा परिणाम म्हणून अनेकदा रोहिंग्या मुसलमानांना तिथून पळ काढून शेजारच्या बांगलादेशात आसरा घ्यावा लागतो. बांगलादेश आणि म्यानमार दरम्यानच्या या वादात आता भारताला ओढलं जातंय. या गोष्टीवर चर्चेनं तोडगा काढला जाऊ शकतो. म्यानमारमधून पळून आलेल्या रोहिंग्या मुसलमानांचं तिथंच पुनर्वसन करण्यात यावं जिथले ते मूळ निवासी आहेत. एकूणच धर्माच्या आधारावर होणाऱ्या जाचापासून करण्यात आलेलं पलायन आणि राजकीय अस्थिरतेमुळे देश सोडावा लागलेल्या लोकांमध्ये हा नागरिकत्व सुधारणा कायदा फरक करत असल्याचं स्पष्ट उघड आहे. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम म्हणजेच LTTE च्या दहशतीमुळे श्रीलंका सोडून भारतातल्या तामिळनाडूतल्या छावण्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे मदत मिळणार नसल्याच्या आरोपातही तथ्य नाही. या श्रीलंकन तमिळींनी २००८-०९ च्या अनेक दशकं आधीच भारतात आसरा घेतला होता. पण तरीही सरकारनं नागरिकत्व दुरुस्ती विधेयकातील याविषयीच्या बारकाव्यांविषयी तपशीलवार बाजू मांडणं योग्य ठरेल. हे विधेयक मुस्लिम विरोधी असल्याचा अपप्रचार संसदेत झाला आणि असता संसदेबाहेरही करण्यात येतोय. या गैरसमजुती दूर करण्यासाठी सरकारनं मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये जागरूकता मोहीम राबवणं गरजेचं आहे. या विधेयकात त्या कोट्यवधी मुसलमानांचा कोणताच उल्लेख नाही, जे भारताचे नागरिक म्हणून देशातल्या इतर नागरिकांप्रमाणेच आपले हक्क इतरांच्याच बरोबरीनं वापरतात. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरुद्धचा हा राजकीय अपप्रचार 'व्होट बँक' साठी केला जातोय. देशातलं वातावरण बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे. सरकारनं याचं तातडीनं उत्तर देण्याची आवश्यकता आहे. नाहीतर याची परिणती जातीय तणावात होऊ शकते. हिंदू-मुस्लिम तणावात होऊ शकते. हे विधेयक घटनेच्या कलम १४ चं उल्लंघन करत असल्याचाही कांगावा संसदेत आणि बाहेरही केला जातोय. घटनेचं हे कलम भारताच्या सर्व नागरिकांना समानेचा अधिकार देतं. खरी परिस्थिती म्हणजे या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मदतीनं भारताचे नागरीक होणाऱ्या सर्व लोकांना भारतातील इतर नागरिकांप्रमाणेच सर्व अधिकार मिळतील. असे अधिकार जे त्यांना आजवर मिळू शकत नव्हते. या विधेयकानुसार 'ओव्हरसीज सिटीझन्स ऑफ इंडिया' म्हणजेच ओसीआय कार्डधारकांसाठीच्या नियमांमध्येही आता बदल होईल. १९५५ च्या नागरिकत्व कायद्यानुसार परदेशात राहणारी एखादी व्यक्ती भारतीय वंशाची असल्यास उदाहरणार्थ- आधी भारताचा नागरिक असल्यास वा त्याचे पूर्वज भारताचे नागरिक असल्यास वा त्याचा जोडीदार भारताचा रहिवासी असल्यास तो ओसीआयखाली स्वतःची नोंद करू शकतो. यामुळेच या व्यक्तीला भारतात येण्या-जाण्याची, काम करण्याची आणि शिकण्याची परवानगी मिळेल. या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या तरतुदी अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि नागालँडसाठी लागू होणार नाहीत. कारण या राज्यांमध्ये 'इनर लाईन परमिट' - आयएलपी आवश्यक आहे. सोबतच नागरिकत्व दुरुस्ती कायदा आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुराच्या आदिवासी बहुल भागांमध्ये ज्यांना घटनेच्या अनुसूची क्रमांक ६ द्वारे नमूद करण्यात आलं आहे, अशांना लागू होणार नाही. या 'इनर लाईन परमिट'मुळे भारताच्या नागरिकांना काही विशेष भागांमध्ये जमीन किंवा संपत्ती विकत घेता येत नाही. यामुळेच त्या भागात त्यांना नोकरीही करता येत नाही. म्हणूनच 'इनर लाईन परमिट'च्या या तरतुदी भारतीय नागरिकत्व मिळवणाऱ्या नवीन लोकांनाही लागू होतील हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणूनच स्थानिक पद्धतींवर या लोकांचा प्रभाव पडणार नाही. 'इनर लाईन परमिट' ही ब्रिटीशकालीन कायदा आहे. याचा पुनर्विचार होणं गरजेचं असून यामध्ये आजच्या काळातील आर्थिक गरजा आणि विकासाच्या संधी मिळण्यासाठी बदल होणं गरजेचं आहे, असाही युक्तिवाद केला जातो. पण कलम ३७१ नुसार त्यांना विशेष दर्जा देण्यात आला. त्यांची भाषा, संस्कृती, आचार-विचार यावर परिणाम होणार नाही, याबाबत काळजी घेण्यात आलीय.

*आसाममधील लोकांमध्ये विधेयकामुळे धास्ती*
आसामच्या बिगर आदिवासी बहुल भागांमध्ये या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या तरतुदी यापुढील काळात लागू होतील. पण या कायद्यामुळे आपल्या भागांत अवैधरित्या राहणाऱ्या घुसखोरांना त्याचा फायदा होईल, ही धास्ती आसामच्या बिगर आदिवासी भागांतल्या लोकांना आहे. यातले बहुतेक घुसखोर हे बांगलादेशी आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मदतीनं या घुसखोरांना आपल्या भागामध्ये अधिकृतरित्या स्थायिक होण्याची संधी मिळेल या दुरुस्ती विधेयकामुळे मिळेल अशी भीती इथल्या स्थानिकांना आहे. आसाममधल्या या लोकांची जी भीतीआहे ती गैरलागू कशी आहे. हे सरकारनं पटवून दिलं पाहिजे. त्यांच्या मनातली भीती त्वरीत दूर करून त्यांच्या समस्या सोडवण्याची आवश्यकता आहे. आसाममधल्या मोठ्या भूभागामध्ये विशेषः शेतीवर अवलंबून असणाऱ्या भागांत आणि चहाच्या मळ्यांमधून विधेयकाला मोठा विरोध का होतोय, हे या गोष्टींवरून लक्षात येईल. या भागांमध्ये बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांचा मोठा प्रभाव आहे. त्यांची मोठी संख्या आहे. त्यांच्या अस्तित्वावर परिणाम होणार आहे. १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी बांगलादेशची निर्मिती होण्याआधी पूर्व बंगलमधल्या तिथल्या हिंदूनी मोठ्या प्रमाणात भारतात आश्रय घेतला होता. त्यावेळी पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हे लोक भारतात आले होते. पाकिस्तानी सेना, पूर्व पाकिस्तानातल्या या हिंदूंना लक्ष्य करत होती. त्यावेळी भारतात आश्रयासाठी आलेल्या लोकांपैकी हिंदुंचं शरणार्थी आणि मुस्लिमांचं घुसखोर असं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न झाला होता. भारतातल्या राजकीय नेत्यांनी देशातील झपाट्यानं बदलणारं सामाजिक चित्र आणि देशातील बदलती समीकरणं लक्षात घेण्याची गरज आहे. यानंतरच ते नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाकडे राष्ट्रीय सुरक्षेसोबतच मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून पाहू शकतील. ज्यांना देशाच्या फाळणीनंतर निर्माण झालेल्या आपल्या देशात राहणं कठीण झाल्यानं पलायन करून भारतात आश्रय घ्यावा लागला होता, ज्यांना धार्मिक दहशतवाद आणि सामाजिक भेदभावामुळे भारतात यावं लागलं असे लोक नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे 'आश्रित' वा शरणार्थी न म्हणवले जाता भारतात इतरांच्या बरोबरीने राहू शकतील. सर्व राजकीय पक्षांनी आपल्या संकुचित राजकारणाच्या पलिकडे जाऊन विचार करत नागरिकतेवर व्यापक दृष्टीकोनातून चर्चा करण्याची गरज आहे. म्हणजे समाजात नवीन फूट न पडता उलट फाळणीमुळे झालेल्या जखमा भरून काढल्या जातील. काश्मीरमध्ये १९४८ नंतर आलेल्या हिंदूंना आजवर कोणतेच हक्क मिळाले नाहीत आजही ते आश्रितच समजले जातात. आता इतर भारतीयांप्रमाणे त्यांनाही सर्व हक्क प्राप्त होतील.

*भारताची बदनामी थांबवावी लागेल*
पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळेस महंमद अली जिन्हांनी भाषणात पाकिस्तानमध्ये सर्व धर्मीयांना समान संधी असतील असं म्हटलं होतं. पण, त्यांचं स्वप्न त्यांच्यासोबतच विरलं. पाकिस्तान घटनेनं ते एक ‘इस्लामिक राष्ट्र’ झालं. १९५० साली झालेल्या नेहरु - लियाकत अली खान कराराचं भारतानं पालन केलं, पाकिस्ताननं नाही. इस्लामनिंदेच्या कायद्याच्या नावावर तिथं आजही राजरोसपणे धार्मिक अल्पसंख्याकांवर अन्याय-अत्याचार होत आहेत. तीच गोष्ट कालांतरानं बांगलादेशच्या बाबतीतही झाली. १९७१ साली स्वतंत्र झालेल्या बांगलादेशनं स्वतःला ‘सेक्युलर’ घोषित केलं. पण, कालांतरानं घटनाबदल करुन ‘इस्लाम’ हा ‘राजधर्म’ म्हणून त्यांनी स्वीकारला. वंगबंधू मुजिबूर रेहमान यांच्या काळात आणि सध्या त्यांच्या कन्या शेख हसिना यांच्या काळात गैरमुस्लीम अल्पसंख्याकांना बरे दिवस असले तरी, मधल्या काळात तिथेही अल्पसंख्याकांचे पद्धतशीरपणे शोषण करण्यात आलं. आजही ते होत आहे. त्याला कंटाळून त्यांना वैध-अवैध मार्गानं भारतात यावं लागलंय. पण, आजवर आपण या विषयांची गांभीर्यानं खुली चर्चादेखील केलेली नाही. कारण, भारताची फाळणी धार्मिक आधारावर आणि तीही काँग्रेसनं मान्य केल्यामुळे झाली, हे वास्तवच आपण स्वीकारले नाही. तेव्हा त्यांना त्यावेळी इतर कोणताही पर्याय नव्हता. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश होता आणि त्याचा एक तुकडा वेगळा झाला असं आपल्याला आजवर शिकवलं जातं. त्यामुळे फाळणीपूर्वीचा भारत आणि फाळणीनंतरचा भारत एकच आहे, हे दाखवण्याच्या नादात आपण आपल्याच रक्ताच्या आणि वंशाच्या लोकांच्या छळ आणि उपेक्षेकडं दुर्लक्ष केलं. हे घडत असताना वेळोवेळी आपण अन्य देशांतून आलेल्या शरणार्थ्यांना, उदा. केनियातून इदी अमीनच्या जाचामुळे आलेल्या बांधवांना, श्रीलंकेतून आलेल्या तामिळ बांधवांना, नागरिकत्त्व दिले. पण, गेल्या काही दशकांत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून धार्मिक छळामुळे आलेल्यांना दिलेलं नाही. ९ डिसेंबर रोजी लोकसभेत मंजूर झालेले नागरिकत्व सुधारणा विधेयक जरी गृहविभागाच्या अखत्यारितील म्हणजेच देशनीतीच्या संबंधित विषय असला तरी विदेशनीतीच्या दृष्टीनेही त्याचं महत्त्व आहे. शेजारच्या तीन इस्लामिक देशांतून ‘शरणार्थी’ म्हणून आलेल्या आणि अनेक वर्षांपासून भारतात राहणार्‍या, त्या देशातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची प्रक्रिया या विधेयकामुळे सोपी झाल्यानं उरलेल्यांच्यात, म्हणजे मुस्लीम धर्मीय स्थलांतरितांमध्ये ‘घुसखोर’ कोण आहे आणि ‘शरणार्थी’ कोण हे शोधणे सोपं होणार आहे. या विधेयकाचा ‘एनआरसी’ म्हणजेच राष्ट्रीय नागरिक नोंदणीशी थेट संबंध नसला तरी नागरिकत्वाचा प्रश्न सुटल्यानंतर नोंदणीची क्लिष्ट प्रक्रियाही सुकर होणार आहे. दुर्दैवानं स्वतःला उदारमतवादी वर्गानं या विधेयकाविरोधात आकाश पाताळ एक करायला सुरुवात केली असून त्यासाठी परकीय शक्तींशीही संधान बांधलंय. पाश्चिमात्य देशांतील विद्यापीठांत तसेच वर्तमानपत्रांतूनही याबाबत गैरसमज पसरवण्याचे काम ही टोळी करू लागेल. त्यांचा तार्किक आधारावर प्रतिवाद करुन, त्यांना जगातील अन्य लोकशाही देशांची आणि त्यांनी समानतेचे तत्व शब्दशः न वापरता अन्य निकषांवर शरणार्थ्यांना नागरिकत्व दिल्याचे दाखले द्यावे लागतील. जगापुढं यातली वस्तुस्थिती दाखवून द्यावी लागणार आहे. तरच जगभरात या विधेयकामुळे होणारी भारताची बदनामी थांबणार आहे.

हरीश केंची,
९४२२३१०६०९

सावरकर : एक शापित राजहंस

"निवडणुकीच्या आश्वासनात भाजपेयींनी महात्मा फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देणार असल्याचं जाहीर केलंय. महात्मा फुले हे वादातीत आहेत. मात्र सावरकर यांच्याबद्धल आक्षेप आहेत. काँग्रेस आणि डाव्यांनी विरोध दर्शविलाय. भाजपेयींना सावरकरांचा सन्मान करायचा आहे की बदनामी हेच कळत नाही. भारतरत्न पुरस्काराच्या निमित्तानं सावरकर स्वातंत्र्यवीर नव्हे, तर माफीवीर होते. असं त्यांचं म्हणणं आहे. भाजपेयींची याबाबतची भूमिका, सावरकर जीवनाचे अभ्यासक शेषराव मोरे व इतर शिवाय 'द वीक' या साप्ताहिकाच्या निरंजन टकले यांनी आणि श्रीकांत शेट्ये यांनी लिहिलेल्या पुस्तकातून सावरकरांबाबत घेतलेला धांडोळा. सावरकरांना भारतरत्न कशासाठी द्यायचं आहे. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्याबाबत, त्यांच्या साहित्यसेवेबाबत की, सामाजिक सेवेबाबत? हे स्पष्ट झालेलं नाही. पण आपल्या राजकीय सोयीसाठी भाजपेयींकडून सावरकरांचा वापर केला जातोय का? त्यांना अधिकच विरोध झाला तर त्यांच्यासोबत महात्मा फुले यांचाही प्रस्ताव रद्द करण्याचा मानस तर नसावा! ह्या सगळ्या बाबींचा केलेला हा पंचनामा!"
--------------------------------------------------------

*निवडणूक काळात भारतरत्नची मागणी गैरच*
निवडणुकांच्या हंगामात मतांसाठी म्हणून भारतरत्नचा मुद्दा आणणं योग्य नव्हे. केवळ राजकीय हेतूंसाठी यापूर्वीच्या काळात तामिळ नट एम.जी.रामचंद्रन यांच्यासारख्या तद्दन फिल्मी गृहस्थाला भारतरत्न देऊन तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी त्या पुरस्काराची इभ्रत कधीच मातीत मिळवली. याच काँग्रेसनं मराठी मतांकडे आशाळभूतपणे पाहात निवडणुकीच्या तोंडावर सचिन तेंडुलकर याला भारतरत्न जाहीर केलं होतं. या सर्वापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा फुले हे कर्तृत्व आणि समाजोपयोग या दोहोंत कितीतरी श्रेष्ठ. त्यांना भारतरत्न देण्याचा मुद्दा हा निवडणुकीच्या तोंडावर काढण्याची भाजपेयींना काही गरज नव्हती. त्यामुळं याबाबतच्या उद्देशाला राजकीय हेतू चिकटतो. हे भान केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षानं दाखविलं नाही. अलीकडं हिंदुत्वाच्या नावानं आणाभाका घेणाऱ्या कोणीही उठावं आणि सावरकरांवर मालकी सांगावी असं सुरू असताना भारतरत्नसाठी नक्की कोणते सावरकर अभिप्रेत आहेत, हे आता विचारायला हवंय! ‘‘हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक रेणू कुमुहूर्तावर जरी एकत्र आलं तरी पाणी तयार होतं. मुहूर्त वगैरे पाहणं म्हणजे निव्वळ अंधश्रद्धाच!’’ असं मानणारे सावरकर या मंडळींना पचतील काय? बहुधा नसावेत. कारण विज्ञानातील उच्च संकल्पनांवर आधारित विमानाचं स्वागत करताना मीठमिरची, लिंबू आदी ओवाळण्याची गरज ज्यांना वाटते त्यांचा आणि सावरकरांचा संबंध काय? ‘‘सध्याचं युग हे यंत्रांचं आहे आणि त्या आघाडीवर भारत हा युरोपपेक्षा तब्बल २०० वर्षे मागं आहे,’’ असं मानणारे आणि तसं ठामपणे लिहिणारे सावरकर पुराणातल्या वानग्यांवर उदरनिर्वाह करणाऱ्यांना माहीत आहेत काय? नवसपूर्तीसाठी पोटावर सरपटत जाणाऱ्याची सावरकरांनी केलेली संभावना आजच्या धर्ममार्तंडांना झेपेल काय? नाशिक इथल्या कुणा लहरीमहाराज या इसमानं रामनाम लिहिलेल्या ११ लाख चिठ्ठ्या सुगंधी पिठाच्या गोळ्यांत घालून गंगार्पण करण्याचं व्रत अंगीकारलं. ते पूर्णत्वासाठी जाईपर्यंत मौन धारण करण्याची घोषणा केली. हे सर्व कशासाठी? तर मानवजातीच्या भल्यासाठी, असं त्याचं उत्तर होतं. त्याचा समाचार घेताना सावरकर त्यांच्या ‘क्ष किरणे’ यांत लिहितात ‘‘या लहरीमहाराजाच्या व्रतानं मानवजातीचा कोणताही लाभ होणार नसून झालाच तर तो पाण्यातील मासे आणि बेडकांचा होईल.’’ अशावेळी आज कोणत्याही सोम्यागोम्या बाबा, बापू वा तत्समांसमोर माथे टेकणाऱ्या, त्यांना शपथविधीच्या वेळी व्यासपीठावरच बसविणाऱ्या आपल्या राज्यकर्त्यांस हे सावरकर आदरणीय वाटतात काय?

*सावरकरांना भिडण्याची वैचारिक क्षमता आपल्यात आहे का?
सावरकरांच्या मते, ‘‘वृषपूजा ही लिंगपूजेचीच एक आनुषंगिक पद्धती आहे,’’ हे पुराणकाळात ठीक होतं. पण ज्ञानविज्ञानाचे शोध जसजसे लागत गेले तसतसे यात बदल होणं गरजेचं होतं, असं सावरकर नमूद करतात. कारण ‘‘मनुष्यानं देव म्हणून ज्याची पूजा करावयाची ते तत्त्व, प्रतीक हे गुणांत मानवाहून श्रेष्ठ हवं. मनुष्याचा देव हा मनुष्याहूनही हीन असेल तर त्या देवानंच भक्ताची पूजा करणं उचित ठरेल,’’ असं सावरकर गाईला माता म्हणणाऱ्यांना बजावतात. इतकंच नाही तर पशुपूजेला सावरकर ‘हिणकस वेड’ ठरवतात. ‘‘ब्रह्मसृष्टीत गाय आणि गाढव समानच आहेत,’’ असे सावरकर मानतात. आणि गाईचं ‘मूत नि गोमय ओंजळ ओंजळ पितात वा शिंपडतात’ पण ‘‘डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या एखाद्या शुद्ध नि त्यांच्याहूनही सुप्रज्ञ पूर्वास्पृश्याच्या हातचं स्वच्छ गंगोदकही विटाळ मानतात,’’ अशा हिंदूंची सावरकर यथेच्छ निर्भर्त्सना करतात. ‘‘गाईत देव आहेत असं पोथ्या सांगतात आणि वराहावतारी देव डुक्कर झाले होते असेही पोथ्या सांगतात. मग गोरक्षणच का करावं? ’’ या सावरकरांच्या प्रश्नास भिडण्याची वैचारिक क्षमता आपल्यात आहे का? या प्रश्नाचं उत्तर भारतरत्नाआधी मिळायला हवं. सावरकर म्हणजे हिंदुत्ववाद इतकंच नाही. त्यांना अनेक विषयांत रुची होती आणि त्यासंबंधानं त्यांनी विस्तृत मतप्रदर्शन करून ठेवलंय. असे अनेक मुद्दे सांगता येतील. पण याबाबत अत्यंत अप्रचलित विषय म्हणजे चित्रपट. ‘‘चित्रपट ही २०व्या शतकानं मानवाला दिलेली सर्वात सुंदर भेट आहे,’’ असं ते मानत. पण त्याचबरोबर या माध्यमाच्या अभिव्यक्तीवर येणारे निर्बंध सावरकरांना अमान्य होते, हे त्यांना भारतरत्न देऊ  पाहणाऱ्यांना माहीत आहे का? ‘‘आधुनिक संस्कृती आणि आधुनिक विचार हा शोधांतून, नावीन्याच्या हव्यासातून विकसित झालेला आहे. या सर्वाचे प्रतिबिंब चित्रपटांत पडते,’’ असं मानणाऱ्या सावरकरांनी इंग्लंडमधल्या आपल्या वास्तव्यात आपण कसा विविध विषयांवरील सिनेमाचा मुक्तपणे आस्वाद घेतला हेदेखील नमूद करून ठेवलंय. तेव्हा आपल्या विचारांच्या नसलेल्या चित्रपटांवर बंदी घालण्याची सर्रास मागणी करणाऱ्यांच्या गळी हे सावरकर उतरतील काय?

*मुसलमानांनी आधुनिकतेची कास धरायला हवी*
या सावरकरांनी १९३९ साली केलेल्या एका भाषणात हिंदू आणि मुसलमान कसे सुखासमाधानाने राहू शकतील यावर विवेचन केलंय. ‘सर्व नागरिकांना समान अधिकार असायला हवेत’, ‘मुक्त विचारस्वातंत्र्य, पूजाअर्चेचं स्वातंत्र्य सर्वांनाच असायला हवं’, ‘अल्पसंख्यांना त्यांच्या शैक्षणिक संस्था आदींचं स्वातंत्र्य असायला हवं’, ‘त्यांच्यासाठी सरकार स्वतंत्र काही खर्च करू शकते परंतु त्या रकमेचं प्रमाण त्या समाजाकडून दिल्या जाणाऱ्या कर रकमेशी निगडित ठेवावं’, अशी सावरकरांची सूचना होती. ती ‘हिंदूंनाही लागू करावी’ असं त्यांचं म्हणणं होतं हे समान नागरी कायद्याची एकतर्फी आणि अज्ञानी भुणभुण लावणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवं. याचं कारण आजही ‘हिंदू अविभक्त कुटुंब’ असं कारण पुढं करीत कर कमी करण्याची मुभा हिंदूंनाच आहे. ती अर्थातच अहिंदूंना नाही. याचा अर्थ समान नागरी कायदा झालाच तर हिंदूंना अन्य धर्मियांच्याप्रमाणे कर भरावे लागतील. समान नागरी कायद्याचा सोयीस्कर वापर करणाऱ्यांना ही बाब ठाऊक आहे काय? इतकंच नव्हे तर हिंदूंप्रमाणे मुसलमानांनीही आधुनिकतेची कास धरायला हवी, असा सावरकरांचा आग्रह होता. त्यासाठी मुसलमानांनी तुर्कस्थानच्या केमाल पाशा याचा आदर्श ठेवावा, अशी त्यांची मसलत होती. हे सर्व मुसलमानांनी त्यांच्या भल्यासाठी करायला हवं, हे त्यांचं म्हणणं आज इस्लामी विश्वातच केमाल पाशा नकोसा झालेला असताना किती महत्त्वाचं आहे ते कळतं. या दोघांनीही.. म्हणजे हिंदू आणि मुसलमान यांनी.. प्रगतीशील युरोपचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवायला हवं, हा त्यांचा आग्रह होता. का? तर ‘आमच्या यज्ञ, याग, वेद, धर्मग्रंथ, त्यातील शाप उ:शाप यामुळं युरोपचं काहीही वाकडं झालं नाही त्याप्रमाणे तुमच्या तावीज, नमाज, कुर्बानी.. हेही त्यांना रोखू शकत नाहीत,’ हे सावरकरांचं मत भारताला विश्वगुरू वगैरे करू पाहणाऱ्यांना आजही पेलणारं नाही.स्वातंत्र्यपूर्वकाळात बिहारमध्ये झालेला भूकंप हा जातीप्रथा न पाळल्यामुळं निसर्गाचा झालेला कोप आहे, असं विधान महात्मा गांधी यांनी केलं होतं. त्याचा सुयोग्य समाचार घेणारे सावरकर, केवळ गांधींवर टीका केली म्हणून हिंदुत्ववाद्यांना प्रिय असतील तर या मंडळींनी केरळातील पूर हा महिलांवरील शबरीमला मंदिर प्रवेशबंदी उठवल्यामुळं आला असं म्हणणाऱ्यांची वासलात सावरकरांनी कशी लावली असती, याचाही विचार भाजपेयींनी करावा. तेव्हा सद्य:स्थितीत आजच्या नवहिंदुत्ववाद्यांना सावरकरांना भारतरत्न दिलं जावं या मागणीनं आनंद वाटेल, ते सुखावतीलही. पण हे सुख अज्ञानातलं आहे. या अज्ञानाचाच धिक्कार सावरकरांनी आयुष्यभर केला. म्हणून नक्की कोणते सावरकर आपल्याला हवेत याचा विचार ज्ञानेच्छूंनी करावा. या ज्ञानापेक्षा भारतरत्न मोठे नाही.

*सावरकरांबाबत सुरस व चमत्कारिक कहाण्या* 
आयुष्यभर हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढा दिला पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांना महात्मा गांधींच्या हत्येत सहभाग असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर खटला चालविण्यात आला. तेव्हापासून आजतागायत अनेक जण सावरकरांचं नाव अनेकप्रकारे गांधीहत्येशी कायम जोडत आले आहेत. त्यानं सावरकरांचं कार्यकर्तृत्व डागाळत आलं. त्याच्या विराधात सावरकरांच्या जीवनाचे अभ्यासक शेषराव मोरे यांनी डिसेंबर २०१५ मध्ये अंदमान इथं झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात आवाज उठवला होता. संमेलनाध्यक्ष म्हणून शेषरावांनी केलेलं संपूर्ण भाषण हे सावरकरांविषयीचं होतं. त्यात त्यांनी सावरकरांचे विचार, त्यांचं लेखन, साहित्य, अभ्यास करण्यासाठी मिळालेली प्रेरणा यावर ते प्रामुख्यानं बोलले. "सावरकरांच्या पश्चात म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधी हत्येची चौकशी करण्यासाठी 'कपूर समिती' तेव्हाच्या काँग्रेस सरकारनं नेमली होती. या समितीनं सावरकरांना अकारण गोवून बदनाम केलं. आता केंद्रात आणि राज्यात सावरकरांना मानणारं सरकार असल्यानं त्यांनी सावरकरांवरील हा कलंक पुसला गेला पाहिजे." अशी अपेक्षा तेव्हा शेषरावांनी व्यक्त केली होती मात्र ते झालं नाही. सावरकरांचा विचार आणि त्यांचा कार्यकर्तृत्वभाव याचा अनेकांनी आपल्या लेखनातून आजवर मांडला आहे. सावरकरांच्या विचारांबद्धल कुणाचं कितीही मतभेद असलं, तरी त्यांच्या विचारातली स्पष्टता दखलपात्र ठरली. हिंदुधर्मातल्या जातिभेदांचा उच्छेद व्हावा यासाठी सावरकर आग्रही होते. देव-धर्माच्या खुळचट कल्पनांना-विधी-रूढींना त्यांनी कठोर शब्दात झिडकारलं होतं. आपले विचार व्यक्त करण्यासाठी त्यांनी लेखनाचे विविधप्रकार प्रभावीपणे वापरले होते. लेखणीप्रमाणेच त्यांच्या वाणीतही सौष्ठव होतं. तथापि सावरकर भक्त त्यांना 'फ्रान्सच्या मार्सेलीस खाडीत बोटीतून मारलेल्या उडीत'च बुडवत राहिले. रा.म.आठवले, भा.कृ.केळकर, मो.शि.गोखले, सदाशिव रानडे, रघुनाथ भोपे, गोविंदस्वामी आफळे, शि.ल. करंदीकर अशा अनेकांनी सावरकरांच्या हयातीत त्यांच्यावर लेखन केलं. पण ते सुरस आणि चमत्कारिक कहाण्यांच्या पलीकडे गेलं नाही. सावरकरांच्या पश्चात द.न.गोखले यांनी अत्यंत प्रभावीपणे सावरकरांच्या जीवनाचं आणि विचारांचं रहस्य उलगडलं. हे सारं आजवरचं लेखन हे सोवळी पाशात अडकलेलं होतं. ते सोडविण्याचं काम शेषराव मोरे यांनी केलं. 'सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद', 'सावरकरांचे समाजकारण', 'सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग', 'विचारकलह', या त्यांच्या ग्रंथातून शेषरावांच्या सावरकर यांच्या विषयीच्या अभ्यासाची साक्ष मिळते. त्यातून ते सावरकरभक्त नाहीत हे स्पष्टपणे, ठळकपणेे दिसतं. त्यांचं 'अप्रिय पण...!' या नावाचं सदर दैनिक सामनामधून बरीच वर्षे प्रकाशित होत होतं. त्याचं पुढं ग्रंथात रुपांतरही झालं. त्यातही त्यांच्या तटस्थतेचं दर्शन घडतं.

*खरे 'सावरकर' मांडण्याचं काम अनुयायांनी केलंच नाही!*
सावरकरांबाबत वस्तुनिष्ठ लेखन करणारे शेषराव हे जांब- नांदेडसारख्या भागात राहून त्यांनी सावरकरवादाचा अभ्यास केला. या अभ्यासाची प्रेरणा त्यांना त्यांचे शिक्षक उप्पे गुरुजी या लिंगायत समाजातील व्यक्तीनं दिली. तथापि, मूळचे रा.स्व.संघाचे पण मतभेदांमुळे 'सावरकरवादी' झालेल्या धों.वि.देशपांडे, दि.वि.गोखले, स.ह.देशपांडे, ग.वा.बेहेरे यांनी शेषरावांना वेळीच समीक्षकी प्रशस्ती, प्रसिद्धी देऊन 'सावरकरवादी' करून टाकलं. परंतु शेषरावांनी आपला बुद्धिवाद आणि तार्किकता केवळ सावरकरांना शुद्ध करून घेण्यासाठीच वापरलेली नाही. त्यांच्या 'विचारकलह' या ग्रंथातील खरा 'सावरकर' मांडण्याचं काम अनुयायांनी केलंच नाही! 'शाहू महाराज : ब्राह्मणशाहीला शह देणारा हिंदू सुधारक : मराठा समाजाची स्थिती व भवितव्य' हे लेख आवर्जून वाचावं असे आहेत. इतिहास, समाजशास्त्र, राजकारण, आणि विचारपद्धती याचा सुरेख संगम त्यांच्या लेखनातून दिसतो. त्यांना वैचारिक तटस्थतेचे फटके नक्कीच बसले असतील. दावा-उजवा-मध्यम, हिंदू-हिंदुत्ववादी, समाजवादी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी, फुलेवादी, सावरकरवादी, अशा नाना प्रकारचे वैचारिकवाद, समीक्षापद्धती देशात आहेत. त्या माध्यमातून साहित्य, विचार आणि समीक्षा क्षेत्रात राजकारण खेळणारेही आहेत. या खेळापासून शेषराव तसे दूर आहेत. पुरोगामी-प्रतिगामी, उजवा-डावा असे शिक्के मारून वर्गवारी करण्याची पद्धत महाराष्ट्रात पुरोगाम्यांनीच आणली. 'सावरकर यांच्याविषयी मी लिहिल्यानं मला प्रतिगामी ठरवलं गेलं!' अशी खंत शेषराव मोरे व्यक्त करतात. त्यात तथ्यच नाही, तर वस्तुस्थती आहे

*फुकाच्या फुसक्या युक्तिवादानं सावरकरांची अधिक बदनामी*
शेषरावांनी संमेलनाध्यक्ष म्हणून केलेल्या भाषणात पुरोगाम्यांच्या या व्यवहाराला 'दहशतवाद' म्हणणं तितकंसं खरं नाही, तो अतिरेक झाला. दहशतवाद हा माणसाच्या बुद्धीला गुलाम करणारा असतो. तसा जीवघेणाही असतो. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतचा आग्रह सावरकरांनी अत्यंत कठोरपणे धरला होता. देव-धर्माच्या खुळांची त्यांनी चिरफाड केली आहे. 'एकवेळ गायीची थोडी हत्या झाली, तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राच्या बुद्धीची हत्या होऊ नये.' असं सावरकर म्हणत. संघवाद्यांनी विचार साम्य असूनही सावरकरवाद्यांपासून आपलं वेगळंपण जपलं आहे. सावरकरांवरचा गांधी हत्येचा कटाचा कलंक पुसणं, हे आता सहजसोपं आहे, असं शेषरावांना वाटलं असेल; तर ते सावरकर अभ्यासकाचं लक्षण नाही. अशाप्रकारे उचापती सावरकरभक्त करतात. भक्त मंडळी नेहमी सत्याला बगल देण्याचा प्रयत्न करतात. 'गांधीहत्या कटाचा साथीदार' या सावरकरांच्या कलंकाची चर्चा कुणी करत नाही. १८५७ मध्ये ब्रिटिश सरकार विरोधात हिंदुस्थानात उठाव झाला होता. त्यावर सावरकरांनी 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ लिहिला. त्यावर १८५७ च्या शताब्दी निमित्तानं इतिहास संशोधक न.र.फाटक यांनी 'हे स्वातंत्र्यसमर नव्हतं तर ते शिपायांचं बंड होतं.' हे स्पष्ट करणारा  ग्रंथ लिहिला होता. अशीच समीक्षा करणारं प्रबोधनकार ठाकरे यांचं भाषणही आहे. सावरकरांनी लिहिलेला हा ग्रंथ प्रकाशित केला म्हणून ब्रिटिश सरकारनं सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायली याला गोळ्या घालून मारलं. तर नाशकात कलेक्टर जॅक्सनला अनंत कान्हेरेनं पिस्तूलानं उडवलं. १९१० मध्ये नाशिकच्या प्रकरणातील ही पिस्तुलं सावरकरांनी पाठवली म्हणून त्यांना अटक झाली. तिथून सावरकरांना आणतानाच त्यांनी मार्सेलीस खाडीत उडी मारली. पण सावरकरांना तिथून पळ काढता आला नाही. ब्रिटिश सोल्जरांनी त्यांना पकडलं. भारतात आणलं. त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून ब्रिटिश सरकारनं त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानच्या काळ कोठडीत डांबलं. तिथं त्यांना मणामणाच्या बेड्यांत अडकवलं होतं. तेलाच्या घाण्याला कसं जुंपलं होतं; याच्या दर्दभऱ्या कहाण्या आहेत. तथापि सावरकरांनी शिक्षेची ११ वर्षे झाल्यानंतर 'ब्रिटिश सरकार विरोधात कोणतंही काम करणार नाही,' असा माफीनामा देऊन स्वतःची काळकोठडीतून सुटका करून घेतली. अर्थात, अंदमानातली ११ वर्षे ही शिक्षा काही कमी नाही. हा इतिहास आहे. त्याचं समर्थन सावरकरांनी कधी केलं नाही. किंबहुना सावरकरभक्तांच्या फुकाच्या फुसक्या युक्तिवादानं सावरकरांची अधिक बदनामी झाली. सावरकर कठोर बुद्धिनिष्ठ होते, पण ते विज्ञाननिष्ठ होते. हा शुद्ध भ्रम आहे. ते विज्ञाननिष्ठ असते, तर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा निर्णय जाहीर करताच, आंबेडकरांची उडी हिंदुधर्मातच! 'बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार आहे' अशी शेंडीला गाठ मारणारी भाषा सावरकरांनी वापरली नसती. अवतार ही कल्पना विज्ञाननिष्ठेतेत बसत नाही. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत तर सावरकरांची कठोर बुद्धिनिष्ठताही पातळ झाली. म्हणूनच त्यांनी पत्थरी देवदेवतांच्या आरत्या लिहितात तशी शिवरायांवर आरती लिहिली.... 'जय देव जय देव जय श्री शिवराया....'. दलित-दलितेतर एकत्र यावेत, यासाठी सावरकरांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत तिथं 'पतित पावन मंदिर' स्थापन केलं. म्हणजे सोवळ्याची; दलित-मागासांना प्रवेश नसलेली मंदिरं तशीच ठेवली; आणि पतितपावन हे तिसरंच मंदिर निर्माण केलं.  तथापि कुणाला पतित म्हणणं हे चूक; त्याच्यापेक्षा पतितपावन करून घेणं , महाचुकच! असो!

'द वीक'नं सावरकरांच्या माफीनाम्याचे पुरावे दिले*
विनायक दामोदर सावरकर यांना 'वीर' हे विशेषण १९२० मध्ये भालाकार भोपटकर यांनी पहिल्यांदा वापरलं आणि ते रूढ झालं. पुढं 'वीर सावरकर' यांचं त्यांच्या भक्तांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' असं केलं. परंतू सावरकरांच्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे सावरकर हे स्वातंत्र्यवीर नव्हे तर माफीवीर असल्याचं 'द वीक' या इंग्रजी साप्ताहिकाच्या कव्हर स्टोरीत २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अंकात हे मांडण्यात आलं होतं. सावरकरांना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च सन्मानानं गौरवण्यात यावं अशी मागणी होत असताना त्यावेळी ही माहिती पुढं आल्यानं सावरकर भक्तांची पंचाईत झाली ही माहिती जर राजकीय स्वरूपाची वा डाव्यांनी अथवा काँग्रेसजनांनी केलेल्या आरोपाची असती, तर ती उडवून लावता आले असती. पण 'द वीक' सारख्या देशातील एका जबाबदार नियतकालिकेनं ती पुढं आणली होती. ते ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे मांडल्यानं ती खोडून काढता येणार आजवर शक्य झालेले नाही. सावरकर भक्त त्यामागच्या कारणांचा विश्लेषण करताना त्यातूनही ही सावरकरांचं उदात्तीकरण करू शकतील. मात्र त्यानं वस्तुस्थिती काही लपणार नाही केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार असताना २००३ मध्ये संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सावरकरांचं पहिलं तैलचित्र महात्मा गांधीच्या तसबिरीच्या अगदी समोर लावण्यात आलं. त्यावेळी झालेल्या समारंभावर काँग्रेस आणि इतर विरोधकांनी बहिष्कार घातला होता. असा प्रकार संसदेच्या इतिहासात तो एकमेव असा आहे त्यावेळचा हा विरोध केवळ राजकीय स्वरूपाचा नव्हता तर स्वातंत्र्य चळवळीला विरोध करणाऱ्या सावरकरांना विरोध करण्याची भूमिका त्यामागं होती हे स्पष्ट झालं.

*संघ परिवार हरप्रकारे सावरकरांना चर्चेत आणून बदनाम करतो*
काही वर्षांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या वेबसाईटचे अनावरण केलं होतं. तेव्हा त्यांनी आपला पहिला ब्लॉग सावरकर यांना अर्पण केला होता. यावरून आजच्या भाजपेयीं राज्यकर्त्यांना सावरकर किती प्रिय आहेत हे लक्षात येतं. भाजपला सावरकर हिंदूवादी म्हणून प्रिय आहेतच. परंतु कोणत्याही प्रकारच्या अभ्यासाचं आणि अभ्यासावर आधारित वस्तुनिष्ठ माहितीचं वावडं असलेल्या त्यांच्या परिवारातल्या इतरांनाही तेवढेच प्रिय आहेत. त्यामुळं शिवसेनेनेही मोदी सरकार आल्यापासून सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी नव्वदच्या दशकात लाखो सह्यांची मोहीम चालविली होती. ज्येष्ठ साहित्यिक आणि शिवसेना खासदार स्व. नारायण आठवले यांनी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडं महात्मा फुले यांना भारतरत्न द्यावं अशी मागणी केली होती. सावरकरांच्या अनुषंगानं अलीकडच्या काळात घडलेल्या या काही महत्त्वाच्या घटना घडामोडी आहेत या सगळ्या गोष्टी सावरकरांचा गौरव व्हावा यासाठी केल्या जातात की त्यांच्या बदनामीत वाढ व्हावी, यासाठी केलं जातं, असा प्रश्न काही सावरकर भक्तांनाही पडतो. हिंदुत्वाच्या राजकारणाचे जनक म्हणून सावरकरांची ओळख आहे. त्यांचे हिंदुत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपपेक्षा वेगळा आहे. सावरकर आणि त्यांच्या हिंदू माणसाला संपवण्यासाठी संघाची स्थापना झाली आणि संघ परिवार हरप्रकारे सावरकरांना चर्चेत आणून बदनाम करतो असं लिहिणारे बोलणारे सावरकरवादी देखील आहेत. या पार्श्वभूमीवर 'द वीक'नं मात्र अस्सल कागदपत्रांच्या आधारे सावरकरांच्या 'वीर' विशेषणाचा पंचनामा केला. या साप्ताहिकाचे प्रतिनिधी निरंजन टकले यांनी हा स्पेशल रिपोर्ट लिहिलाय. त्यातील महत्त्वाचं तसंच काही सांगण्यापूर्वी टकले यांची पार्श्वभूमी ही विचार घेतली पाहिजे. निरंजन टकले हे मूळचे नाशिकचे. नाशिक जिल्ह्यातील भगूर हे सावरकर यांचे जन्मगाव. स्वाभाविकपणे निरंजन टकले यांना सावरकरांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी होती. त्यापोटीच ते सावरकरांच्या संदर्भात माहिती घेत कागदपत्र तपासत राहिले. म्हणजे एका स्वातंत्र्यवीराच्या भूतकाळातील आयुष्याचा प्रेमापोटी शोध घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न होता. मात्र त्या प्रयत्नांमध्ये त्यांना जी माहिती मिळत गेली ती पाहिल्यावर त्यांचा या स्वातंत्र्यवीरांच्या कथित पराक्रमाच्या गोष्टींबद्दल पुरता भ्रमनिरास झाला आणि त्यातूनच त्यांच्या 'द वीक' मधील स्पेशल रिपोर्टचं शीर्षक 'शेळीचं सिंह म्हणून उदात्तीकरण' असं होतं. म्हणजे सावरकरांना सिंह वगैरे जे म्हटलं जातं ते खरं नाही. उलट ते अतिशय घाबरट होते. ब्रिटिशसत्तेविरूद्ध त्यांनी संघर्ष केला नाही, तर शिक्षेतून माफी मिळण्यासाठी वारंवार केलेल्या दया याचिकेबाबत सावरकरांच्या संदर्भातील शोधातून हे असत्य आढळलं. त्यावरूनच लेखाचं शीर्षक दिलं असल्याचं टकले यांचं म्हणणं होतं.

* सन्मान देणं ही मोदींची प्रतीकात्मक कृती होती*
'द आरएसएस-आयकॉन्स ऑफ द इंडियन राइट' या पुस्तकाचे लेखक नीलंजन मुखोपाध्याय यांनी सांगितलं, की २६ मे २०१४ ला नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर दोनच दिवसांनी सावरकरांचा १३१ वा जन्मदिवस होता. त्याचं औचित्य साधून मोदींनी संसद भवनातील सावरकरांच्या फोटोला अभिवादन केलं होतं. असं असलं तरी सावरकर हे विवादास्पद व्यक्तिमत्त्व होतं हेही आपल्याला मान्य करायलाच हवं. "गांधी हत्येप्रकरणी सावरकरांवर खटला दाखल करण्यात आला होता. ते सुटले असले तरी त्यांच्या हयातीतच त्यांच्या चौकशीसाठी कपूर आयोग नेमण्यात आला होता आणि या आयोगाच्या अहवालात सावकरांवर कायमच संशयाची सुई होती. अशा नेत्याला सार्वजनिक आयुष्यात इतका सन्मान देणं ही मोदींची प्रतीकात्मक कृती होती," असंही मुखोपाध्याय यांनी म्हटलं. नाशकात कलेक्टर जॅक्सनला अनंत कान्हेरेनं पिस्तूलानं उडवलं. १९१० मध्ये नाशिकच्या प्रकरणातील ही पिस्तुलं सावरकरांनी पाठवली म्हणून त्यांना अटक झाली. तिथून सावरकरांना आणतानाच त्यांनी मार्सेलीस खाडीत उडी मारली. पण सावरकरांना तिथून पळ काढता आला नाही. ब्रिटिश सोल्जरांनी त्यांना पकडलं. भारतात आणलं. त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून ब्रिटिश सरकारनं त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानच्या काळ कोठडीत डांबलं.

*त्या 'प्रसिद्ध' उडीनंतर…
*यापुढची गोष्ट 'ब्रेव्हहार्ट' नावानं सावरकरांचं चरित्र लिहिणारे आशुतोष देशमुख सांगतात. "सावरकरांनी जाणूनबुजून आपला नाइट गाउनचा घातला होता. शौचालयाच्या दरवाजाला काच होती, जेणेकरून कैद्यांवर नजर ठेवता येईल. सावरकरांनी आपला गाउन काढून दरवाजावरील काचेवर टाकला." "त्यांनी आधीच शौचालयाच्या पोर्ट होलचं माप घेतलं होतं आणि त्यांना अंदाज होता, की आपण यातून बाहेर जाऊ शकतो. आपल्या काटकुळ्या शरीराला त्यांनी पोर्ट होलमधून समुद्रात झोकून दिलं." सुभाषचंद्र आणि सावरकर या वैचारिक विरोधकांमध्ये समान दुवा होता का? अलीगढ विद्यापीठ वाद : 'जिन्नांच्या फोटोला विरोध मग सावरकरांचा फोटो कसा चालतो' "नाशिकमध्ये घेतलेलं पोहोण्याचं प्रशिक्षण त्यांच्या कामी आलं आणि ते वेगानं किनाऱ्याच्या दिशेनं जायला लागले. सुरक्षारक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, मात्र ते बचावले," असं आशुतोष देशमुख यांनी सांगितलं. देशमुख पुढे लिहितात, की सावरकरांच्या पाठोपाठ सुरक्षारक्षकांनीही समुद्रात उडी मारली आणि त्यांचा पाठलाग करायला लागले. "सावरकर जवळपास १५ मिनिटं पोहून किनाऱ्यावर पोहोचले. वेगानं धावत त्यांनी किमान अर्धा किलोमीटरचं अंतर पार केलं. त्यांच्या अंगावर पुरेसे कपडेही नव्हते. तेव्हा त्यांना एक पोलीस अधिकारी दिसला. त्याच्याजवळ जाऊन सावरकरांनी विनंती केली, की त्यांना राजकीय आश्रयासाठी मॅजिस्ट्रेटकडे नेलं जावं. मात्र त्यांच्या मागावर असलेले सुरक्षारक्षकही तोवर किनाऱ्यावर पोहोचले होते आणि 'चोर, चोर' असं ओरडत होते. सावरकरांनी खूप विरोध केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यांना पकडण्यात आलं.

*अंदमानच्या सेल्युलर जेलमधले दिवस*
पकडले गेल्यानंतर सावरकरांना भारतात पाठवलं गेलं आणि पुढची २५ वर्षें ते इंग्रजांचे कैदी बनून राहिले. त्यांना २५-२५ वर्षांच्या कारवासाच्या दोन शिक्षा सुनावण्यात आल्या आणि शिक्षा भोगण्यासाठी भारतातील अंदमान इथं पाठविण्यात आलं. या शिक्षेला 'काळ्या पाण्या'ची शिक्षाही म्हणायचे. त्यांना ६९८ खोल्यांमधील सेल्युलर जेलमध्ये १३.५ बाय ७.५ आकाराच्या खोली क्रमांक ५२ मध्ये ठेवण्यात आलं होतं. जेलमधील जीवनक्रमाबद्दल आशुतोष देशमुख यांनी लिहिलं आहे, की अंदमानमध्ये सरकारी अधिकारी बग्गीमधून जायचे आणि राजकीय कैद्यांना या बग्ग्या ओढाव्या लागायच्या. "तिथले रस्तेही धड नव्हते आणि बराचसा भाग हा डोंगराळ होता. जेव्हा कैदी बग्गी ओढू शकायचे नाहीत, तेव्हा त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली जायची. त्रास देणाऱ्या कैद्यांना जेवण्यासाठी केवळ पाणचट सूप दिलं जायचं." अनेकदा कैद्यांना हातकड्या आणि बेड्या घालून उभं रहायची शिक्षाही दिली जायची. या सेल्युलर जेलमध्येच सावरकरांच्या आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू झाला होता. या तुरूंगात त्यांनी घालविलेल्या ९ वर्षें आणि १० महिन्यांनी त्यांचा इंग्रजांना असलेला विरोध पूर्णपणे मावळला. निरंजन टकले सांगतात, "मी सावरकरांच्या आयुष्याकडे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पाहतो. त्यांच्या आयुष्याचा पहिला टप्पा हा रोमँटिक क्रांतिकारी विचारांनी भारलेला होता. याच काळात त्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामावर पुस्तकही लिहिलं होतं. त्यात त्यांनी धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला होता." "अटक झाल्यानंतर सावरकरांना वास्तवाची जाणीव झाली. ११ जुलै १९११ ला सावरकर अंदमानमध्ये दाखल झाले आणि २९ ऑगस्टला त्यांनी आपला पहिला माफीनामा लिहिला. म्हणजेच तिथे पोहोचल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात. त्यानंतर ९ वर्षांच्या काळात त्यांनी सहा वेळा इंग्रजांना माफीनामा लिहून दिला. "जेलमधील नोंदींनुसार तिथं तीन-चार महिन्यांमध्ये कैद्यांना फाशी दिली जायची. फाशी देण्याचं ठिकाण हे सावरकरांच्या खोलीच्या बरोबर खाली होतं. कदाचित या गोष्टीचाही सावरकरांवर परिणाम झाला असावा. जेलर बॅरीनं सावरकरांना काही सवलती दिल्याचीही कुजबूज होती," असं निरंजन टकले सांगतात.

*टकले यांचा लेख आणि श्रीकांत*
मोदी सरकार गेल्या काही वर्षात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील कागदपत्रांवरून राजकारण करीत असल्याचं जाणवतं. यामागं नेताजींबद्धल प्रेम कमी आणि नेहरुंचा द्वेष अधिक! हे सूत्र लपून राहिलेलं नाही. नेताजींच्या मृत्यूचं गूढ असो किंवा त्यांच्यावर तत्कालीन भारत सरकारनं केलेला कथित अन्याय असो त्याला जवाहरलाल नेहरू जबाबदार असल्याचे चित्र निर्माण करण्यात येत आहे. नेहरु विरुद्ध बोस असा संघर्ष उभा करून नेहरूंना भारताच्या राजकारणातील खलनायक बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नेताजींच्या संदर्भातील महत्त्वाची कागदपत्र खुली करण्यामागं तेच राजकारण आहे; शिवाय नजीकच्या काळात पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यात फायदा मिळवण्याच्या उद्देशही आहे. सरकारच्या या राजकीय प्रयत्नांना नेताजींचे नातू चंद्र बोस त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून प्रतिसादही दिला आहे. तर हे सगळं एक नेताजींच्या कागदपत्रांचे प्रकरण सुरू असतानाच सावरकरांबद्धलच्या आकर्षणातून टकले यांनी सावरकरांच्या पत्राचा धांडोळा घेतला. आणि त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत गेल्या. अर्थात सावरकरांच्या माफी संदर्भातील काही गोष्टी यापूर्वी श्रीकांत शेट्ये यांनी 'माफीवीर सावरकर' या पुस्तकातून प्रसिद्ध केले आहेत. त्यात त्यांनी सावरकरांचे माफीनामे दिले आहेत ते असे आहेत.... ते म्हणतात, "मी घराबाहेर पडून बिघडलेला, उधळ्या, खर्चिक मुलगा आहे. मायबाप ब्रिटिश सरकारच्या पंखाखाली सुरक्षित राहण्यासाठी माझी अंदमानच्या तुरूंगातून सुटका करावी. मी १९११ मध्ये दयेचा अर्ज केला होता. त्याचाही सहानुभूतीपूर्वक विचार करून दयाळू आणि परोपकारी विचार करणे माझी सुटका केली तर, इंग्रज सरकारचा मी जन्मभर पुरस्कर्ता राहीन. जोपर्यंत आम्ही तुरुंगात आहोत, तोपर्यंत इंग्लंडच्या राजसाहेबांच्या भारतातील रयतेच्या लाखो घरकुलात आनंद आणि समाधान कसे लागेल? कारण ते आणि आम्ही एकाच रक्ताचे आहोत पण आमची सुटका झाली तर सारी रयत हर्षाने आरोळ्या ठोकील आणि शिक्षा सूडबुद्धी न ठेवता माफी आणि पुनर्वसनावर भर देणाऱ्या सरकारचा जयजयकार करील." "एकदा मी स्वतः सरकारच्या बाजून झालो, की मला गुरुस्थानी मानून रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न बघणारे, भारतातील आणि परदेशातील हजारो तरुण पुन्हा ब्रिटिश सरकारच्या बाजून येतील. माझी भविष्यातील वागणूक सरकारला अनुकूल राहील. इंग्रज सरकारला ज्या पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्यावीशी वाटेल. त्या पद्धतीने काम करण्यास मी तयार आहे. मला तुरुंगात ठेवून सरकारला काय मिळेल? यापेक्षा मला सोडाल तर त्याहीपेक्षा जास्त फायदा सरकारचा होईलं. माझ्यासारखा वाट चुकलेला पुत्र आपल्या पिता रुपी ही सरकारच्या दरबारातच नाही येणार तर कुठे जाणार? अशा प्रकारच्या माफीनामा सावरकरांनी ब्रिटिश सरकारला गुंगारा देण्यासाठी लिहिला होता, असं सावरकरवादी म्हणतात. अशांनी सावरकर यांचा १४ नोव्हेंबर १९१३ चा हा माफीनामा भारत सरकारच्या पुरातत्व विभागात पहावा असं श्रीकांत शेट्ये यांनी पुस्तकात नमूद केले आहे. श्रीकांत शेट्ये यांनी सावरकरांचे दोनच माफीनामे पुढे आणले. पण निरंजन टकले यांच्या शोधानुसार सावरकरांनी इंग्रज सरकारकडं एखाद-दुसरं माफीपत्र दिलं नाही, तर एकूण सात माफीपत्रं दिली आहेत. सावरकरांचा अतोनात छळ झाला म्हणून त्यांनी माफी मागितली, हेही खोटं असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यासाठी त्यांनी काही तारखांचे पुरावे दिले आहेत. सावरकर ४ जुलै १९११ रोजी तुरुंगात दाखल झाले आणि माफी मागणारे पहिले पत्र ३० जुलै १९११ रोजी लिहिलेलं आहे. पहिले सहा महिने सावरकरांना एकट्याला एका सेलमध्ये ठेवले होतं. त्या काळात त्यांना कोणतेही काम सोपवलं नव्हतं. म्हणजे त्यांचा छळ वगैरे काही होत नव्हता. फक्त त्यांना कुणालाच भेटता येत नव्हतं. सावरकरांना पन्नास वर्षे तुरुंगात राहण्याची शिक्षा झाली होती. पण प्रत्यक्षात ते ९ वर्षे १० महिने तुरुंगात होते. या काळात त्यांनी स्वतः ७ माफीपत्र लिहिली आणि त्यांच्या पत्नीनं त्यांच्यातर्फे मुंबई सरकारकडून तीन माफीपत्र दिली. सावरकर यांच्या पत्रांची भाषा पाहिली तर, ते किती आर्जवी आणि ब्रिटिश सरकारची भलामण करणारी आहे हे लक्षात येते. आणि ती वाचून आश्‍चर्यही वाटतं. यातील महत्त्वाची बाब म्हणजे टकले यांच्या या लेखनात कुठेही मुद्दामहून सावरकरांना अनादर दाखवण्यासाठी प्रयत्न केलेला नाही की आरोपांचे टक्के नाहीत. इतिहासाच्या पानांमध्ये दडलेले असते त्यांनी पुरावे आणि कागदपत्रांच्या आधारे पुढे आणलं होतं. यातील काही गोष्टी जुनी असल्या तरी, काही नव्याने पुढे आले आहेत. त्यासाठी २१ हजार कागदपत्रांचा अभ्यास त्यांनी अनेक महिने केला, असे टकले यांनी म्हटले आहे. या शोधातील काही दर्शन सावरकर यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.येणाऱ्या काळात ब्रिटिश साम्राज्याला हिंदूंच्या मदतीनेच समान ध्येय ठरवावे लागेल. हिंदुमहासभा आणि ब्रिटिशांनी समान उद्देश ठेवून काम केले पाहिजे. सावरकरांच्या या पत्रातून काय स्पष्ट होतं ते पहा, काँग्रेस ही त्या काळात राष्ट्रीय चळवळ करणारी होती. रोडवर उतरणारा तो राजकीय पक्ष होता. म्हणजे काँग्रेस आणि मुस्लिमांना विरोध करणे हा समान उद्देश सावरकरांनी ब्रिटिश सरकारला सूचित केला होता. 

*टकले यांचा लेख आणि श्रीकांत शेट्ये यांचं पुस्तक*
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये १९४२ च्या चलेजाव चळवळ याला विशेष महत्त्व आहे. या चळवळीला सावरकर यांनी जाहीरपणे पत्रक काढून विरोध केला होता. एवढेच नाही तर त्या काळात सावरकरांचे कार्यकर्ते राष्ट्रीय चळवळीच्या विरोधात पोलिसांना म्हणजे ब्रिटिश सरकारला माहिती पुरवत होते. म्हणजे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात ब्रिटिशांचे खबरे म्हणून सावरकरांचे अनुयायी काम करत होते. स्वातंत्र्य चळवळीशी गद्दारी करत होते. रिस्पॉन्स को-ऑपरेशन अंतर्गत सरकारला मदत करायची, असं त्यांचं धोरण होतं. असं धरून असलेल्या सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हटलं जातं हे एक आश्चर्यच म्हणायला हवं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांना पाठिंबा व साथ देणाऱ्या सैन्यात लष्कर भरतीसाठी हिंदू महासभेने रिक्रुटमेंट बोर्ड तयार केली होती. त्यासाठी जपान भारतावर आक्रमण करणार असा प्रचार केला जात होता. विशेष म्हणजे जपान त्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मदत करत होता. आणि नेताजी जपानच्या मदतीने ब्रिटिश सरकार उलथून टाकण्यासाठी भारतात आझाद हिंद फौज घेऊन घुसणार होते. म्हणजे तिथे पुन्हा एक गोष्ट लक्षात येते की, आज केंद्रातील मोदी सरकार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यू संबंधित पासाची कागदपत्र खुली करून त्याच्या प्रदर्शनाचा प्रत्येक कार्यक्रम करते. त्याच नेताजींच्या विरोधात सावरकर उभे ठाकले होते; म्हणून प्रश्‍न निर्माण होतो. मोदी सरकार नेमकं कोणाच्या बाजूला आहे? नेताजींच्या की सावरकरांच्या? सगळ्या परिस्थितीचे अवलोकन केलं तर सरकार केवळ राजकारण करीत असल्याचे स्पष्ट होते. तुरुंगातून सुटल्यानंतर कोणत्याही राजकीय आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे आम्ही सावरकर यांनी दिली असली तरी सामाजिक सुधारणेच्या नावाखाली तर राजकीय कार्य कार्य सुरू होतं. हिंदू महासभा अनेक राजकीय कार्यक्रम होत होते आणि ब्रिटिशांना सोयीचा असतील अशा कार्यक्रमांना परवानगी मिळत होती. हिंदू महासभेच्या धर्मांतराच्या किंवा शुद्धीकरणाच्या कार्यक्रमांना परवानगी मिळत असे. सावरकरांच्या अटकेसंदर्भातही विविध प्रवाद आहेत. या नव्या माहितीनुसार, त्यांना १३ मार्च १९१० रोजी लंडनमध्ये अटक झाली. नाशिकचे तत्कालीन कलेक्टर जॅक्सन यांच्या हत्येसाठी मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. हत्या करणाऱ्या अनंत कान्हेरेने ज्या पिस्तुलाने जॅक्सनची हत्या केली, ते पिस्तूल सावरकरांनी लंडनहून पाठवलं होतं. म्हणूनच सावरकरांवर दोन आरोप होते, खून आणि खुनाचा कट करणे त्यासाठी प्रत्येकी पंचवीस वर्षाच्या अशा दोन जन्मठेपेच्या म्हणजे पन्नास वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. टकले यांना जेल डायरीत एक तपशील सापडला. तो आता काळ्यापाण्याची शिक्षा झालेल्या प्रत्येक कायद्याचं जेल हिस्टरी की टाकायचं. त्यामध्ये त्यांचा गुन्हा शिक्षा आणि त्याला दिलेल्या कामाचा उल्लेख असायचा. सावरकरांच्या या तिकिटावर कैदी नंबर ३२७७८ सेल ५२ तीन असा उल्लेख होता. त्यांचा भाऊ गणेश आणि बाबाराव हेसुद्धा त्यांच्यासोबत तुरुंगात होते. स्वातंत्र्यसैनिक राहिलो कचेना चक्रवर्ती यांनी लिहिला आहे की जेलमधील राजकीय कैदी दोन गटांमध्ये विभागले होते. नेमस्त म्हणजे मॉडरेट आणि जहाल किंवा अतिरेकी एक्स्ट्रीमीस्ट. सावरकर बंधू ,बंगाली क्रांतिकारक रवींद्र घोष आणि इतर काही कैदी हे आधी आले होते. ते स्थळ चुकीने त्रासले होते ते आमच्या संभाव्य चळवळीत सहभागी झाले नाहीत. सावरकर बंधू आम्हाला खासगीत प्रोत्साहन देत होते, परंतु उघडपणे आमच्या सोबत येण्यास तयार नव्हते. अंदमानमध्ये आलेल्या राजकीय कैदी आणि पैकी फक्त सावरकर बंधू आणि बरेंद्र घोष यांनी इंग्रजांकडे देयेचीयाचना केली. वि. दा. सावरकर यांनी केलेला दया च्या पत्राच्या सहा तारीख उपलब्ध आहेत. त्याच्या ३० ऑगस्ट १९११, १४ नोव्हेंबर १०१३, १४ सप्टेंबर १९१४, २ ऑक्टोबर १९१७ च्या २० जानेवारी १९२० आणि ३० मार्च १९२० याशिवाय सावरकरांच्या पत्नीनेही जुलै १९१५ ऑक्टोबर १९१५ आणि जानेवारी १९१९ मध्ये मुंबई सरकारकडे तीन माफीपत्र सादर केली होती. हे एवढे पुरावे कागदोपत्री उपलब्ध झाल्यानंतर सावरकरांना भारतरत्न द्यायचं की नाही याचा निर्णय सरकारने घेतला आहे. द्यायचं झालं तर ते त्यांना स्वातंत्र्य मिळते योगदानासाठी द्यायचं, भाषाशुद्धीच्या चळवळीसाठी द्यायचं की काव्य लेखनासाठी द्यायचं हे निश्चित ठरवावे लागेल

-हरीश केंची९४२२३१०६०९


Saturday 7 December 2019

सत्तेचं शिवधनुष्य...!

"राज्यात 'तीन पक्षाचं सरकार' अस्तित्वात आलंय! तब्बल वीस वर्षाच्या कालखंडानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री तेही ठाकरे घराण्यातील! साहजिकच मराठी माणसाला याचा अभिमान वाटलाय. त्यामुळं इतर दोन राजकीय पक्षाचं काही नाही तर शिवसेनेची सत्वपरिक्षा आहे. अटलजींच्या आदेशानं प्रशासनाचा अनुभव नसलेल्या नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले होते. आज शरद पवारांच्या आदेशानं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनलेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या मागे प्रबोधनकार आणि शिवसेनाप्रमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. ही मोठी जबाबदारी उद्धव कशी पाडतात, सत्तेचं हे शिवधनुष्य कसं पेलतात हे आगामी काळच ठरवील! जनतेच्या त्यांच्याकडून कशा आणि काय अपेक्षा आहेत, त्याचा घेतलेला हा आढावा!
-------------------------------------------------------------------

*रा* ज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महिनाभरानं महाराष्ट्रात तीन पक्षाचं नवं सरकार अस्तित्वात आलं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या सरकारनं आपलं बहुमत विधानसभेच्या खास अधिवेशनात सिद्ध केलंय. त्यामुळं एका अर्थानं आता नव्या सरकारचं काम राज्यात सुरू झालं असंच म्हणावं लागेल. खरंतर कोणतंही आघाडीचं सरकार चालवणं ही एक कसरतच असते, त्यात अचानक स्थापन झालेल्या आणि एकमेकांशी पुरेसं वैचारिक साधर्म्य नसलेल्या आघाडीचं सरकार तर अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर सततच हिंदकळत राहणार हे स्पष्ट आहे. त्यात सध्याचं वातावरण असं आहे, की भाजपेयींनी काही केलं तरी चालून जातं; पण तेच इतरांनी आणि खास करून काँग्रेसनं केलं मात्र अनेक तात्विक मुद्दे मांडले जातात. जसं की, शिवसेनेचं हिंदुत्व, मराठी माणसाचा आग्रह! मागच्या विधासनसभेत विरोधीपक्ष एकसंघ आणि मजबूत नव्हता पण तीन पायाच्या या सरकारच्या विरोधात एक मजबूत, एकसंघ आणि सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष उभा ठाकलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या नव्या सरकारकडं सगळ्यांचीच फार बारीक नजर असणार आहे. जरा जरी चूक झाली तर त्याला लक्ष्य बनवलं जाईल. सत्तेत सहभागी असलेल्यांना सत्तेतली पद न मिळाल्यानं तीन पक्षातले आतले आणि बाहेरचे, जवळचे आणि लांबचे, असे सगळेच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे या सरकारच्या चुका काढण्यात आणि त्यांच्यातल्या भांडणावर लक्ष ठेवून असणार आहेत! संधी मिळताच सरकारची कोंडी करण्यासाठीही ते पुढं सरसावतील. त्यामुळं इतर कोणत्याही सरकारपेक्षा या सरकारला जरा जास्त काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक पावलं उचलायला लागतील. दक्ष राहावं लागेल. हे सत्तेचं शिवधनुष्य मोठ्या हिकमतीनं पेलावं लागेल!

*तीनही पक्षाना संयम आणि आत्मपरिक्षणाची गरज*
राज्यातल्या या 'महाविकास आघाडीच्या' या सरकारबद्धल पहिला प्रश्न सतत विचारला जाईल तो त्याच्या स्थिरतेबद्धलचा! महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष आजवर सातत्यानं नेहमीच शिवसेनेच्या विरोधात लढलेले आहेत; किंबहुना १९९५ मध्ये काँग्रेस पक्षाचा राज्यात पराभव होण्यात शिवसेनेचाच मोठा वाटा होता. अशा पार्श्वभूमीवर, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर टीका करत निवडणूक लढवली आहे. त्यामुळं वैचारिक मतभेद असताना आता हे तीन पक्ष किती काळ एकत्र नांदतील अशी शंका सर्वच थरातून व्यक्त होणं साहजिक आहे. इथं एक लक्षांत घेतलं पाहिजे की, सत्तेतल्या या तीनही पक्षांच्या आमदारांची संख्या जवळपास एकसारखीच आहे. त्यामुळं तीन तुल्यबळ पक्षांमध्ये आपसात सत्तावाटपावरून सतत कुरबुरी होतील हे स्पष्ट आहे. शिवाय त्यांच्यातली अंतर्गत विसंगती आणि तणाव यांच्या ओझ्याखाली हे सरकार दबलं जाईल की, काय? याबाबत प्रसिद्धीमाध्यमात आणि राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा एव्हाना सुरू झालीय. सत्तास्थापनेपासूनच येणार्‍या अंतर्गत कुरघोडीच्या बातम्या पहिल्या तर या तीनही पक्षांच्या अनेक नेत्यांना आपण किती नाजूक टप्प्यावर आहोत आणि नेमकं काय करतो आहोत याची जाणीव असेल असंच दिसत नाही. जेव्हा एखादं नवं आणि मोठं राजकारण आकाराला येत असतं तेव्हा त्यात भाग घेणार्‍या पक्षांना मोठ्या संयमाबरोबर आत्मनियंत्रणही राखावं लागतं. इथं एक लक्षांत घेतलं पाहिजे की, आपण केवळ वैयक्तिक वा पक्षीय महत्त्वाकांक्षांचं कायमस्वरूपी ओझं वाहणारे आहोत अशा भ्रमात या तीनहीपक्षाचे नेते राहता कामा नये. नाहीतर देशातल्या यापूर्वीची आघाडी सरकारं चटकन कोसळलेली आहेत हे लोकांनी पाहिलेलं आहे.

*तीनही पक्षाच्या विश्वासार्हतेवर यक्षप्रश्न!*
हे सारं सरकारच्या दृष्टीला आणून द्यायचं कारण असं की, आघाडी साकारण्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी आपल्या आततायीपणाची, सत्तालोलुपतेची झलक सर्वच पक्षांना दाखवलेली आहे. मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पाहणार्‍या माणसाला स्वतःच्या सत्ताकांक्षेच्या पलीकडचं काहीच दिसत नाही. हे यापूर्वीही स्पष्ट झालेलं आहे. अजित पवारांसारख्या नेत्याची हे अवस्था असेल तर मग छोट्या छोट्या कार्यकर्त्यांची भावना आणि इच्छा के असू शकेल! एकदा शिवसेना आणि भाजपेयी यांचं जमत नाही हे दिसल्यावर इतर पक्षांना नव्या राजकीय रचनेचं वेध न लागता फक्त आपल्याच स्वार्थाची स्वप्नं पडायला लागणं हे देखील राजकारणाकडं निव्वळ लूटमार म्हणून पाहण्याचं लक्षण ठरू शकतं. आता त्याच अजित पवारांना या नव्या व्यवस्थेत उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे की नाही एवढीच काय ती चिंता शिल्लक आहे. नेताच असं लुबाडण्याचं राजकारण करत असेल तर त्याचे कार्यकर्तेदेखील या अस्तित्वात नव्या सरकारकडे आणि जडणघडणीकडे चार दिवसांची मौज करण्याची संधी एवढ्याच उथळ अर्थानं पाहतील. आपण काय वेगळं करतो आहोत याचे भान ठेवून या तीनही पक्षांच्या नेत्यांना सरकार स्थापनेची किंमत म्हणून स्वतःला तडजोड करायची तयारी ठेवल्याशिवाय पक्षाच्या दुसर्‍या-तिसर्‍या फळीच्या नेत्या-कार्यकर्त्यांपर्यंत राजकीय लाभाच्या तडजोडीचा संदेश जाणार नाही. सत्ता स्थापन होऊन दहा-बारा दिवस उलटले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि त्यांचं खातेवाटप झालेलं नाही. हे जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी याची चुणूक दिसून येईल!. त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार किती टिकणार आणि किती स्थिर राहणार हाच त्यांच्या अस्तित्वाचा सर्वात कळीचा मुद्दा असणार आहे. जर हे सरकार व्यवस्थित कारभार करून देशासमोर भाजपेयींचा पराभव होऊ शकतो, वैचारिक भिन्नता असतानाही सरकार टिकू शकतं हा इतिहास घडेल अन्यथा जर ते वर्ष-दीड वर्षात कोसळलं तर मात्र असं समीकरण अस्तित्वात येऊ शकत नाही असा दृढविश्वास लोकांत निर्माण होईल. एवढंच नाही तर सरकारातल्या या तीनही पक्षांची विश्वासार्हता संपेल आणि नव्यानं होणाऱ्या निवडणुकीला जाताना अडचणी निर्माण होतील.

*शरद पवारांचीही प्रतिष्ठा, विश्वासार्हता पणाला *
महा आघाडी सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्मृती जागवीत काही दिवस काढता येईल, नव्याची नवलाई संपल्यानंतर वास्तवाची जाणीव होईल, तेव्हा आपल्याकडं पुरेसं संख्याबळ नसताना सरकारची सूत्रे आपल्या हाती आली आहेत हे शिवसेनेला लक्षांत ठेवावं लागेल. खरंतर १९९५च्या सत्तारोहणानंतर राज्यात स्वतःच्या बळावर एक मोठा पक्ष बनायची संधी शिवसेनेला मिळालेली आहे. त्याचा फायदा शिवसेनेनं उचलला नाही तर नुसती फसवणूक होणार आहे असं नाही, तर पक्ष आणखी मागे रेटला जाईल असा धोकाही आहे. दुसरीकडं खूप आढेवेढे घेत आपण या आघाडी सरकारमध्ये का सामील झालो आहोत हे काँग्रेसपक्षाला जाणीव ठेवावी लागेल. राज्यात आणि देशात भाजपेयींना एकटं पाडण्याच्या व्यूहरचनेचा अचानकपणे घडून आलेला हा एक भाग आहे आणि या प्रयोगातून उद्याचं राजकारण करायचं आहे हे काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांना सतत कार्यकर्त्यांना सांगावं लागेल. आणि तीनही पक्ष कितीही समन्वयानं वागले तरी प्रत्येक पक्षाला आपला विस्तार आणि वाढ करायचाच असतो, त्यामुळं सत्तावाटप असो वा त्यानंतर स्थानिक पातळीवरच्या नेत्या-कार्यकर्त्यांमधील परस्परसंबंध असोत, या तीनही पक्षांमध्ये स्पर्धा सुरू राहणं ही त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे. त्यामुळं सरकार सतत एका त्रिशंकू अवस्थेत उभं असल्यासारखं दिसून येईल. अशाप्रकारे आघाडी सरकारचा कारभार झाला तर तो तीन पैशाचा तमाशा असेल, वा ती तीन पायांची शर्यत ठरू शकेल! अजित पवारांच्या एकलकोंड्या बंडापासून आजवरचा ताळेबंद मांडला तर एक दिसून येरळा की, हे तीनही पक्ष अडखडत, धडपडत का होईना काही अंतर सामंजस्यानं धावतील असं सध्या तरी दिसतंय. कारण त्यामागे शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

*लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत*
म्हणूनच मग या सरकारची धोरणं, कार्यक्रम आणि त्यांची अंमलबाजवणी यांचा प्रश्न मध्यवर्ती ठरतो. भांडणं तर होतीलच ती अपरिहार्यही आहेत, पण तरीही ह्या सरकारला आपसातील भांडणांसाठी, बखेड्यांसाठी ओळखलं जायचं नसेल तर त्याला धोरणं आणि अंमलबाजवणी यांच्यावर भर द्यावा लागेल. सत्तेत टिकून राहण्याच्या धडपडीत नवं सरकार अगदीच छोट्या कालावधीत जर पास झालं असं मानलं तर किमान समान कार्यक्रम आणि त्याच्या घोषणा यांच्या आघाडीवर सरकारनं कारभार हा आपल्या सवंग, घोषणाबाज आणि कल्पनाशून्य कार्यपद्धतीची आहे हे लोकांना दिसता कामा नये. दहा-बारा दिवसाच्या कारभातून त्याचं मूल्यमापन करता येणार नाही. पण येत्या काळात जास्त गांभीर्याने, जबाबदारीनं विचारपूर्वक सत्ता राबविण्याचा,त्याबाबतची काही दिशा ठरविण्याची गरज आहे. पण सुरुवात फारशी समाधानकारक झालीय असं म्हणता येणार नाही. या सरकारसाठी पहिला टप्पा २८ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या किमान समान कार्यक्रमाचा होता. तो अर्थातच काहीसा घाईनं, गडबडीनं तयार केला गेला होता आणि तेव्हा या कार्यक्रमापेक्षा सत्तावाटपाची बोलणी महत्त्वाची ठरलेली होती. त्यामुळं त्याच्यात घाईघाईनं जे सुचलं आणि जे आवडलं ते मुद्दे टाकून वेळ मारून नेली. नवं सरकार नवीन दृष्टी घेऊन येईल असा विश्वास वाटण्यासारखं परिस्थिती असताना; शेतीप्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्याची अर्थव्यवस्था, उध्वस्त होणारे उद्योगधंदे, वाढलेली बेकारी, सरकारी प्रशासन डबघाईला आलेलं असताना डागडुजीचे मुद्दे या समान कार्यक्रमात येत नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे अर्थात, तातडीचे उपाय करण्याचा निश्चय व्यक्त करण्यात काहीच गैर नाही; पण आपण पाच वर्षे सरकार टिकवण्याची जिद्द बाळगून सत्तेवर येतो आहोत तर जास्त दूरगामी धोरणं आखण्याची गरज आहे. आधीचं भाजपेयीं सरकार ज्या धोरणात्मक बाबींविषयी संवेदनशील नव्हतं त्यांच्याच दिशेनं वाटचाल करण्याऐवजी कोणती मोठी पावलं टाकायची याचा काही तरी निर्देश असायला हवा. केवळ सवलती, कर्जमाफी, पुनरावलोकन, आढावा घेणे एवढ्यापुरतच ते असायला नको. लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यासाठी काम करायला हवं.

*किमान समान कार्यक्रम हा दिशादर्शक हवा*
अशा किमान समान कार्यक्रमात आणि निवडणूकपूर्व घोषित केल्या जाणाऱ्या जाहीरनाम्यात मोठा फरक असतो. पक्षांचा जाहीरनामा हा लोकांनी मतं द्यावीत यासाठी सोप्या आणि ठळक मुद्द्यांच्या भोवती तयार केलेला असतो, तो प्रत्यक्षात आणला जातो असं काही नाही. सर्व पक्षांना आपली ध्येयधोरणं गुंडाळून ठेवावी लागतात हे आजवर दिसून आलंय. आता सरकार स्थापन होणार म्हटल्यावर दिसायला हवी ती सरकारच्या धोरणाची दिशा! शेती-शेतकरी विषयक धोरण असो नाहीतर महिलांसाठीचं धोरण असो, आरोग्य वा शिक्षण असो, याबद्दल या समान कार्यक्रमात लोकांना नेमकं काय हाती लागतंय तो किमान समान कार्यक्रम ठरवणार्‍याला एक चौकट ठरवून द्यावी लागेल आणि त्यानं सर्वसंमतीनं त्या चौकटीत जबाबदारीनं लिहून मोकळं व्हावं तसं हा समान कार्यक्रम तयार करताना लक्षात घ्यायला हवंय. सत्ता राबविताना समान कार्यक्रमाचा मुद्दा महत्त्वाचा आहे कारण हे तीनही पक्ष कधी नव्हे ते प्रथमच एकत्र येताहेत आणि त्यांच्या येत्या काळातल्या कारभारासाठी तो किमान समान कार्यक्रम हा दिशादर्शक ठरणाराआहे. पण अशी कोणतीच दिशा या सत्तास्थापनेपूर्वी केलेल्या छोट्याशा निवेदनातून स्पष्ट होत नाही; त्यामुळं पुढं एकमेकांशी कशावरही भांडणासाठी निमित्त शोधता येईल. असं होऊ न देणं हे त्या पक्षांतल्या नेत्यांची जबाबदारी आहे. समंजसपणे आणि पूर्ण विचारांती निर्णय घ्यायला हवेत. उथळ आणि लोकांना आवडतील व सरकारला परवडणार नाही असे निर्णय घेताना लाखदा विचार करायला हवा!

*नव्या वाटा शोधाव्या लागतील*
आता सरकार अस्तित्वात तर आलंय आणि त्यानं धडाडीनं निर्णय जाहीर करायला सुरुवात केलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत परिपक्वता दिसून आलीय. राज्यपालांच्या अभिभाषणातून सरकारची जी काही झलक दिसते ती नव्य सरकारची सवंगतेकडं होणार्‍या वाटचालीची दिसून येते. किमान समान कार्यक्रमात आणि नंतरच्या घोषणांमध्ये तरुणांच्या रोजगाराबद्धल तीन मुद्दे ठळकपणे आलेले दिसतात. त्यातले एक म्हणजे शिक्षित बेरोजगार युवकांना 'फेलोशिप' देणं, दुसरं म्हणजे सरकारी पदभरती आणि तिसरा राज्यातील खाजगी नोकर्‍यांमध्ये ८० टक्के जागा 'भूमिपुत्रांना' राखून ठेवणं. हे कार्यक्रम लोकप्रिय तर ठरतील, पण ते नेमकं काय आहेत, कसं अंमलात येणार हे स्पष्ट होत नाही. भाजपेयीं सरकारनं मेगा भरतीची मोठ्या जाहिराती केल्या पण त्या कधीच प्रत्यक्षात आलेल्या नाहीत. त्यामुळं तरुणांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांच्यामते या केवळ घोषणाच राहता कामा नये, त्या प्रत्यक्षात यायला हव्यात. हे प्रश्न इथं गांभीर्यानं विचारणं आवश्यक ठरत आहे. ताबडतोबीच्या लोकप्रियतेवर डोळा ठेवून या घोषणा झालेल्या असणार हे नाकारता येणार नाही. शिवसेनेनं मुंबईत पाय रोवताना मराठी तरुणांसाठी नोकऱ्या मिळवून दिल्या. स्थानीय लोकाधिकार समितीनं त्यासाठी पुढाकार घेतला होता. पण आता उद्योगधंदे बंद पडताहेत. नोकऱ्या जात असल्यानं कामगार वैफल्यग्रस्त बनलाय. त्यामुळं लोकांवर लगेचच छाप पाडण्यासाठी राजकीय चातुर्य हवं असतं ते इथं दिसून येतंय, पण नव्या सरकारला आणि त्याचं नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आगामी काळात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटावायचा असेल तर हंगामी लोकप्रियतेच्या पलीकडं जाऊन नवी कल्पनाशक्ती दाखवावी लागेल नव्या वाटा शोधाव्या लागतील. मळलेल्या वाटेवरून केली जाणारी वाटचाल फारशी समाधान देणार नाही. नव्याचा ध्यास घ्यावा लागेल.

*बेकारी, बेरोजगारी ही जटील समस्या*
बेकारी, तरुणांसाठी रोजगार ही शेतीच्या प्रश्नांइतकीच जटिल समस्या आहे हे खरे; पण त्यासाठीचे उपाय वरवरचं करून चालणार नाहीत. उदाहरणार्थ, हे फेलोशिप प्रकरण आधीच्या सरकारच्या मुख्यमंत्री फेलो योजेनेप्रमाणेंच असेल तर ते अधिक धोकादायक आहे. कारण ती योजना म्हणजे आपले राजकीय कार्यकर्ते आणि त्यांचे पाठीराखे यांची एकप्रकारे रोजगार हमी योजना होती. त्याऐवजी, उपलब्ध असलेली पण दुर्लक्षित अशी प्रधानमंत्री कौशल्य योजना लहान लहान शहरांत राबवून खाजगी क्षेत्राच्या मदतीनं त्या योजनांना जोडून शिकाऊ उमेदवार किंवा अॅप्रेंटीस योजना तयार करता येऊ शकेल. न होऊ शकणाऱ्या मेगा भरती सारख्या सरकारी नोकरीवरचा तरुणांचा भर कमी करून स्वयंरोजगारला प्रोत्साहन देणं आज गरजेचं आहे. हा खरा आव्हानात्मक कार्यक्रम असेल, पण त्याच्या ऐवजी सोपा सरकारी नोकरभारतीचा मार्ग हा शॉर्टकट झाला, त्याला सरकारी धोरण म्हणता येणार नाही. आणि या सर्वांवर कडी म्हणजे भूमिपुत्रांच्या ८० टक्के जागा. गमतीचा भाग म्हणजे आजवर शिवसेनेच्या या धोरणाला विरोध करणाऱ्या काँग्रेसपक्षाला या उपायाचा उमाळा आलाय. त्याच्या व्यावहारिकतेत किमान समान कार्यक्रमातला सामाजिक बहुविधता टिकवण्याच्या विरोधात जाणारा त्याचा आशयही अशा विचाराची त्रुटी असणार आहे. पण ही झाली फक्त काही उदाहरणे. खरा मुद्दा दिसतो तो असा की आपण पाच वर्षे राहणार आहोत अशा विश्वासानं धोरणं आखण्याच्या ऐवजी आपण थोडेच दिवस आहोत तर लगेचच सरकारबाबत अनुकूल लोकमत तयार व्हावं एवढाच विचार सध्या तरी दिसतोय. लंबे रेसका घोडा व्हायचा असेल तर समाजावर दूरगामी परिणाम होतील असे धोरण आणि निर्णय घ्यायला हवेत!

*हे श्रींचे राज्य व्हावे ही लोकांची इच्छा*
हे सरकार जसं स्थिरस्थावर होईल तशी त्याला आणि त्यातील धुरिणांना सवड मिळेल आणि सरकार चालविताना काही कळीच्या मुद्द्यांवर आपली छाप पडेल अशा प्रकारचे निर्णय ते घेऊ शकतील. असं आपल्याला मानायला हरकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ, शेतीच्या मध्यवर्ती प्रश्नाखेरीज वर म्हटल्याप्रमाणे तरुणासाठीचे रोजगार आणि छोटी छोटी शहरं यांची सांगड घालणं गरजेचं आहे. राज्य वित्त आयोगाच्या शिफारशी स्वीकारून ग्रामीण भागातील लोकांना दिलासा देण्यासाठी नगरपालिका आणि जिल्हा परिषदा यांना पुरेसा निधी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. राज्याच्या विभिन्न विभागांचा संतुलित विकास व्हावा यासाठी, वैधानिक विकास मंडळांच्या निरर्थक खिरापतीच्या पलीकडं जाऊन काही योजना आखायला हव्यात, मोठ्या शहरांच्या वाढत्या आणि भयावह विस्ताराचं नियोजन करणं क्रमप्राप्त आहे. राज्य नियोजन मंडळ अधिक मजबूत करून विकासाच्या नियोजनाला दिशा मिळवून द्यायला हवं, अशा काही तीनचार धोरणात्मक मुद्द्यांवर सरकारनं तातडीनं काही हालचाल केल्या तर या सरकारला स्वतःची वेगळी अशी छाप पाडता येईल. जर सरकारला अशी छाप पाडता आली नाही तर हे सरकार नुसतं इतर कोणत्याही सरकारसारखंच सर्वसामान्य जनतेपासून तुटलेलं तर राहीलच, शिवाय त्याचं अस्तित्व जितकं सामान्य असेल तितकी त्याच्या निर्मितीमागची अधिमान्यता क्षीण आहे हे स्पष्ट होईल. हे सारं राज्याच्या हितासाठी तर आहेच, पण त्या सरकारच्या स्वतःच्या हितासाठी म्हणून या तीन पक्षांना जास्त धोरणीपणा आणि कल्पनाशक्ती राबवावी लागेल. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री आहेत. शिवाय कधीही सक्रिय राजकारणात न येणाऱ्या ठाकरे घराण्याचे ते पहिले राजकारणी आहेत. तेव्हा शिवरायांच्या लोकहितकारी, हे श्रींचं राज्य आहे असं वाटायला हवं. कारण अशी आघाडी सरकारं ही केवळ लोकांना लुबाडण्यासाठी आकारली आहेत. त्याची पुनरावृत्ती व्हायला नकोय. खऱ्या अर्थानं हे प्रबोधनकारांच्या, बाळासाहेबांच्या स्वनातील महाराष्ट्र घडविण्याचा कल्पनेला साकारता येईल, त्यादृष्टीनं उद्धव ठाकरे यांची परीक्षा आहे. सत्तेचं हे शिवधनुष्य समर्थपणे पेललं आहे हे सिद्ध होईल.

हरीश केंची
९४२२३१०६०९

Sunday 1 December 2019

गेम वाजवला गेलाय!

"महाराष्ट्रात भाजपेयीं सरकार आधी येत नव्हतं, जे अस्तित्वात आलं आणि ८० तासात कोसळलं. यामागची कारणमीमांसा काय असावी हे शोधलं तर एक लक्षात येतं की, फडणवीस यांच्यासारखा स्वच्छ, प्रशासनावर पकड असलेला, सक्षम, असलेल्या नेत्याकडं संशयानं पाहीलं गेलं. दिल्लीतील नेतृत्वाला फडणवीसांची वाटचाल ही आव्हानात्मक वाटली त्यामुळंच त्यांनी फडणवीस यांना बदनाम करायचं ठरवलं. प्रधानमंत्र्याचं मन त्यांच्याबाबत कलुषित करण्यात आलं. फडणवीसांची वाटचाल रोखण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी महाराष्ट्रातल्या भाजपला वेठीला धरण्यात आलं. आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठीआपल्या मार्गात येणाऱ्या फडणवीसांना दूर करण्याचा प्रयत्न दिल्लीतून सुरू झाला. केंद्रातल्या नेतृत्वानं दिल्लीतील राजनीती ठाऊक नसलेल्या फडणवीसांचा सत्तास्थापनेच्या निमित्तानं गेम केला गेलाय!"
--------------------------------------------------------------


*सो* शलमीडियावर सध्या 'हॅशटॅग देवेंद्र फडणवीस एज पीएम...' या नावानं एक मोहीम कुणीतरी उघडलीय. ती त्यांच्या समर्थकांनी उघडलीय की पक्षातील विरोधकांनी की इतर कुणी. हे समजायला मार्ग नाही. पण त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय. तासाभरातच तीन हजाराहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना प्रधानमंत्री बनविण्यासाठीचा हा प्रयत्न आहे की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नजरेतून उतरविण्याचीही शक्कल असू शकते. पण धूर निघतोय याचा अर्थ कुठेतरी आग दिसते आहे. एबीपी न्यूज या हिंदी वाहिनीवर महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभ दरम्यान चर्चेसाठी दिल्लीला गेलो होतो, तिथं याबाबत जे काही कळलं ते धक्कादायक होतं.

*शब्द फिरवला अन सरकार नाट्याला प्रारंभ*
महाराष्ट्रात बरोबरच हरियाणाच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल लागले. तिथं भाजपेयींना बहुमत नव्हतं, पण लगेचच दोन दिवसात हरियाणात सरकार स्थापन करण्यासाठी दिल्लीतील वरिष्ठ भाजपेयी नेत्यांनी म्हणजेच पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी तातडीनं हालचाली केल्या; जननायक जनता दलाचे दुष्यंत चौताला यांच्याशी समझौता करून मनोहरलाल खट्टर यांचं सरकार स्थापन झालं. इकडं महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत प्राप्त झालं होतं. त्यांना सहजपणे सरकार स्थापन करता येणं शक्य होतं; पण १५-२० दिवस सरकार अस्तित्वात आलं नाही. कुणी म्हणतं याला शिवसेना जबाबदार आहे तर कुणी म्हणतं भाजप. स्पष्ट बहुमत मिळालं असतानाही सरकार स्थापन झालं नाही हा युतीला मतदान करणाऱ्या मतदारांचा अपमान आहे असं म्हटलं गेलं. तरी देखील महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याकडं अमित शहांनी ढुंकूनही पाहिलं नाही. अमित शहा यांच्या साक्षीनं लोकसभा निवडणुकीपूर्वी १८ फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी पदांचं आणि जबाबदारीचं समसमान वाटप केलं जाईल आसनी त्यात काही प्रश्न निर्माण झाल्यास अमित शहा आणि उद्धव ठाकरे हे दोघे बसून तो सोडवतील असं स्पष्ट केलं होतं. निवडणूक निकालानंतर पत्रकारांशी अनौपचारिकरित्या बोलताना 'असं आपण शब्द दिला नव्हता...!' असं म्हणत शिवसेनेचं म्हणणं फेटाळून लावलं. त्यानंतरच्या घडामोडी आपल्याला ज्ञात आहेत. तब्बल दहा-बारा दिवस उलटल्यानंतरही अमित शहा व इतर कुणी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी ही कोंडी फोडण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. फडणवीसांनी शब्द दिला आहे तो त्यांनीच निस्तरायला हवा अशी दिल्लीतील भाजपेयींनी भूमिका घेतली. सरकार आधी आलं नाही. नंतर ते लपून छपून आलं आणि लगेचच पडलं देखील! या सगळ्या भाजपेयीं सरकार नाट्याचा प्रारंभ दिल्ली पासूनच झालाय!

*मोदींशी जवळीक फडणवीसांना नडली*
ही घटना केवळ महाराष्ट्रातली सत्ता स्थापन करण्यापूरतीच मर्यादित नव्हती. तर भाजपतल्या काही नेत्यांच्या वर्चस्वाच्या, आशाआकांक्षा, महत्वाकांक्षा यांच्याशी निगडित आहे. आपल्या राजकीय वाटचालीत कुणाचा अडथळा नको म्हणून, आपला मार्ग साफ असावा, बिनधोक असावा म्हणून चाललेली ही खेळी आहे. ही गोष्ट आहे गृहमंत्री अमित शहा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या दोघांच्या पसंतीची! प्रधानमंत्री मोदी यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विशेष लोभ आणि प्रेम आहे. ते फडणवीस यांना सर्वात चांगला आणि कार्यक्षम मुख्यमंत्री मानतात. त्यांना आपला लाडका वंडरबॉय समजतात. या त्यांच्या संबंधामुळे फडणवीस यांची फसगत झालीय, इथंच त्यांची मोठी चूक झालीय. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतील राजकारणाची कदाचित फारशी माहिती नसावी. फडणवीसांनी मोदींशी जवळीक वाढवली. अमित शहांना टाळून ते थेट मोदींच्या गाठीभेटी घेत असत. हे अमित शहांच्या लक्षांत आलं की, कुठंतरी फडणवीसांची महत्वाकांक्षा वाढलेली दिसतेय. अमित शहा हे पक्षाचे अध्यक्ष आहेत, पक्षावर त्यांची पक्की मांड आहे. फडणवीसांचं वागणं अमित शहा यांना खुपलं असावं. दोघांत फरक हा आहे की, पडद्यावर मोदी हे सध्याच्या राजकारणात सर्वेसर्वा दिसत असले तरी त्यासाठीची सारी व्यूहरचना ही अमित शहा यांचीच असते. अमित शहांनी हे पाहिलं की, महाराष्ट्रात आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यात इतर कुणाचा हस्तक्षेप नको म्हणून त्यांनी मग लगेचच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना बदलून यांच्याजागी चंद्रकांतदादा पाटील यांची वर्णी लावली. राजीनामा दिल्यानंतर दानवे त्यावेळी म्हणाले होते की, 'मला केंद्रात मंत्रिपदाची जबाबदारी दिली असल्यानं अध्यक्षपद सोडावं लागतंय.' त्यांनी मग आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण आपल्या सगळ्यांनाच माहीती आहे की, दिल्लीत राज्यमंत्र्याना काय आणि किती काम असतं ते! अध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडं सोपविताना चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडं राज्यातलं महत्वाचं महसूल खातं होतं. मंत्रिमंडळात ते वरिष्ठ नेते होते. अशा दुहेरी जबाबदारी असलेल्या चंद्रकांतदादांकडं ही जबाबदारी देताना दानवेंना राजीनामा का द्यायला लावला हे इथं स्पष्ट होतं.

*अमित शहांना देखील जुमानले नाही*
चंद्रकांतदादा आणि अमित शहा यांचे जुने ऋणानुबंध आहेत. ते दोघे एकाचवेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी होते. त्यामुळे दोघांमध्ये मैत्रीचे संबंध आहेत. चंद्रकांतदादा हे कोल्हापूरचे; अमित शहा यांची सासुरवाडीही कोल्हापूरची, त्यामुळं त्या दोघांचे कौटुंबिक सदस्यांसारखे संबंधही आहेत. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर कोल्हापूरात झालेल्या पत्रकार परिषदेत आपण राज्याचे मुख्यमंत्री व्हाल का? असा प्रश्न त्यांना विचारला गेला तेव्हा त्यांनी 'जर पक्षानं मला जबाबदारी दिली तर मी मुख्यमंत्री होईन' असं उत्तर दिलं होतं. हे ऐकताच देवेंद्र फडणवीसांनी लगेचच स्पष्ट केलं की, 'त्यांच्याकडं अध्यक्षपद सोपवलं आहे त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी. मुख्यमंत्री मी आहे, मीच राहीन आणि मीच मुख्यमंत्री म्हणून येणार आहे!' असा विसंवाद सुरू झाला. विधानसभा निवडणुकीतील उमेदवार निश्चित करायचं काम स्वतः फडणवीस यांनी आपल्याकडं घेतलं. आपल्याला योग्य वाटेल अशा लोकांनाच उमेदवारी दिली. यात ना नितीन गडकरी यांचं चाललं ना अध्यक्ष बनलेल्या चंद्रकांतदादा पाटलांचं! काही प्रमाणात अमित शहा यांचंही चाललं नाही. अमित शहांना असं वाटत होतं की, निवडणुकीच्या काळात चंद्रकांतदादा मोकळे असावेत, त्यांनी कुठंच निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करू नये. चंद्रकांतदादा हे कोल्हापूरचे आहेत. लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी त्यावेळी चांगलं यश मिळवलं होतं. त्यांचं तिथं चांगलं वजन आहे. ओल्या दुष्काळात तिथल्या लोकांशी संबंध असलेला नेता तिथं असायला शहांना हवा होता. त्यांच्या दुःखात मलमपट्टी करण्यासाठी पाटील हे उपयोगी होतील. ते विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांना निवडणूक लढविण्याची काहीएक गरज नाही. असं शहांना वाटत होतं. पण फडणवीस यांना हे माहिती होतं की, पाटील हे आपल्या मार्गातील एक बोचरा काटा आहे. यासाठी त्यांचं प्रभाव करून हटविण्याचा प्रयत्न सुरू झाला. पाटलांनी निवडणूक लढवू नये म्हणून शहांनी खूप प्रयत्न केले पण प्रधानमंत्र्यासमोर त्यांचं काही चाललं नाही. फडणवीसांनी प्रधानमंत्र्याचं मन वळवलेलं होतं. अमित शहांचं तिथं काही चाललं नाही. पाटलांची रवानगी थेट कोथरूड मतदारसंघात केली, पाठोपाठ त्यांच्या पराभवाचीही व्यवस्था केली. पण तिथं पाटलांनी, शहांनी आणि खासदार बापटांनी जोर लावला, लोकसभेत लाखाचं मताधिक्क्य मिळालं होतं, तिथं ते २५ हजारावर आलं. त्यांचा झालेला विजय आणि निवडून आलेल्या भाजप आमदारांची संख्या १०५ वर अडकली यात कुठंतरी परस्पर संबंध जाणवला.

*'ऑपरेशन अजित पवार' भाजपला महागात पडलं*
फडणवीस यांना पर्याय ठरू शकणाऱ्या एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, यांना कधीच दूर केलं होतंच. मोदींना फडणवीसांनी स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास दिला होता. आमदारांची कमी झालेली संख्या यानं मोदी व्यथित झाले. ते फडणवीस यांच्यापासून दूर गेले, हीच संधी अमित शहांनी साधली. मग त्यांनी महाराष्ट्रातून आपलं लक्ष काढून घेतलं. फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्या त्या विसंवादात कोणत्याच वरिष्ठ भाजपेयीं नेत्यांनी लक्ष घातलं नाही. फडणवीस आपल्याच तंत्रानं चालत होते. नितीन गडकरी हे एक असे नेते आहेत की, त्यांचे सगळ्याच पक्षातील लोकांशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत, पण त्यांना कुणीच इथं विचारलं नाही. त्यामुळं गडकरींनी इथं लक्षच घातलं नाही. सतत प्रयत्न केल्यानंतरही शिवसेनेची समजूत काढण्यात फडणवीस अपयशी ठरले. दरम्यान ईडीची नोटीस ही राष्ट्रवादीसाठीची
संजीवनी ठरली. १५-२० जागा मिळतील की, नाही अशी अवस्था असताना राष्ट्रवादीला तब्बल ५४ जागा मिळाल्या. काँग्रेसलाही शरद पवारांच्या पाठीवर बसून ४४ जागा मिळवत्या आल्या. शिवसेना भाजपसोबत सरकार बनू शकत होती पण फडणवीसांच्या अहंकाराने ते घडू शकलं नाही. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत येऊन सत्ता स्थापन करू शकत होती. शरद पवारांनी शिवसेनेच्या आशा पल्लवित केल्या. त्यांच्यातली महत्वाकांक्षा वाढवून ठेवली. या सगळ्या बातम्या प्रसिद्धीमाध्यमातून येत असतानाही शिर्षस्थ भाजपेयीं नेते शांत होते कुणीच लक्ष घालत नव्हतं. तिथं कुणी जात नव्हतं, एकाकी सोडलं होतं. दरम्यान 'ऑपरेशन अजित पवार' घडलं. फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. हे सरकार चालेल असा विश्वास फडणवीस यांनी दिल्लीतील वरिष्ठांना आणि प्रधानमंत्र्यांना दिला. अमित शहा या प्रकरणी शांत राहिले त्यांनी मनांत आणलं असतं तर हे सरकार टिकलंही असतं. हे अल्पजीवी सरकार स्थापन करताना राज्यपाल यांचं कार्यालय, प्रधानमंत्र्याचं कार्यालय आणि राष्ट्रपती भवन यांचा वापर झाला. दुरुपयोग झाला असं मी म्हणणार नाही कारण ते सारं घडलं वा घडवलं गेलं ते संविधानाच्या चौकटीत बसून! ते कायदेशीर स्तरावर योग्य असलं तरी नैतिकतेच्या दृष्टीनं योग्य नव्हतं हे मात्र निश्चित. सरकार अस्तित्वात आलं, ते ८० तास चाललं.

*फडणवीसांचं केंद्रतल्या नेतृत्वाला आव्हान ठरलं*
शरद पवारांनी मग आपल्या व्यूहरचना आखायला सुरुवात केली. पुतण्या अजित पवारांनी राजीनामा दिला आणि ते सरकार कोसळलं! या अवमानजनक परिस्थितीमुळं फडणवीस हे 'लूजर' बनले. ते एक हास्यास्पद व्यक्ती ठरले. जे फडणवीस एक स्वच्छ मुख्यमंत्री म्हणून ओळखले जात होते. ज्यांना लोक भारताचे भावी प्रधानमंत्री म्हणून पहात होते. अशा फडणवीस यांच्या कारकिर्दीवर एक मोठा डाग लागलाय. त्याच्यासाठी आगामी काळ हा कठीण असणार आहे. पक्षांतर कुरघोडी वाढतील. आज जरी भाजप विधिमंडळ नेतेपदी त्यांची निवड झालेली असली तरी भविष्यात ते पद त्यांच्याकडं राहील अशी खात्री देता येत नाही. ते चंद्रकांतदादा यांच्याकडंही जाऊ शकतं. फडणवीस आणि भाजप हा एक आक्रमक शैली असलेला विरोधीपक्ष राहिलेला आहे. आगामी काळात तसा तो राहिलही. शिवाय फडणवीस यांचं ब्राह्मण असणं देखील या काळात अडचणीचं ठरलेलं आहे. आता पक्षातलं वातावरण बदलेल सत्तेवर आलेलं सरकार हे मराठा बहुल सरकार आहे. त्यामुळं भाजपमधूनही मराठा नेता हवा अशी मागणी होऊ शकते. त्यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांचं नाव पुढं आल्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकारच्या मदतीनं या नव्या सरकारला भाजप त्राहीमाम केल्याशिवाय राहणार नाही. सत्तेवर आलेल्या तीन पक्षाच्या ठाकरे सरकारात भ्रष्टाचारात लडबडलेले अनेकजण आहेत. सरकार अस्तित्वात आल्याबरोबर अशोक चव्हाण यांच्या आदर्श घोटाळ्यात ईडीची चौकशी होण्याच्या बातम्या आल्या. केंद्र सरकार आपल्या हाती असलेल्या विविध संस्थाच्या माध्यमातून अनेक मंत्र्यांमागे शुक्लकाष्ठ लावलं जाईल. त्यामुळं सरकारच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिल. ते जर का अपयशी ठरलं तर मग नवं नेतृत्व उदयाला येऊ शकतं. ही बाब अमित शहा देखील जाणतात. अमित शहा आणि त्यांच्या सभोवताली असलेल्या लोकांनाही असं वाटतंय की, फडणवीस जर दोन-तीन वेळा मुख्यमंत्री बनले तर ते प्रधानमंत्रीपदाचे दावेदार होतील! फडणवीसांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अत्यंत चांगले संबंध आहेत. ते एक स्वच्छ चारित्र्यवान मुख्यमंत्री आहेत. त्यांचं मराठी बरोबरच हिंदी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. प्रशासनावर उत्तम पकड आहे. प्रधानमंत्र्यासाठीचे जे काही निकष लागतात ते त्यांच्याकडं पुरेपूर आहेत. दोन-तीन वेळा मुख्यमंत्री बनल्यावर त्यांच्याकडं पैशाचीही कमतरता असणार नाही. यामुळं अमित शहांना वाटतं की, आगामी काळात आपल्याला फडणवीस यांचंच आव्हान राहणार आहे. सर्वच जाणतात की, नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहा यांचंच वर्चस्व राहिलेलं आहे. त्यामुळं मोदींच्या जागेवर फडणवीस यांची वर्णी लागू शकते. हे जाणूनच दिल्लीतलं नेतृत्व महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेत सहभागी झालं नाही. फडणवीसांना एकटं सोडलं गेलं. या घडामोडींना कोणताच पुरावा नाही पण यातील घटनाक्रम पाहिला तर आपल्याला हे सारं कळून चुकेल. महाराष्ट्रातला भाजप सत्तेसाठी झगडत असताना दिल्लीतील नेते शांत का होते? त्यांनी हस्तक्षेप का नाही केला? यातच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील!
- हरीश केंची
९४२२३१०६०९

'इंडिया शायनिंग' ते 'मोदी की गॅरंटी...!'

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...