Saturday 25 March 2023

उत्तिष्ठ कौंतेय, युद्धाय कृतनिश्चाय...!

"राहुल गांधी यांना संसदेतून बाहेर काढलं गेलंय. यामागचं राजकारण समजून घ्यायला हवंय. क्रोनोलॉजी समजून घेतली तर त्यामागचं राजकारण, निवडणूक विद्या, त्यांचं गणितही समजेल. त्यामागची मानसिकता समजेल. मोदींच्या विरोधात राहुल यावेत हा भाजपनं टाकलेला डाव त्यांनीच उधळून लावलाय. मोदींसमोर कुणीच नाही हे गृहितक मांडायला ते सज्ज आहेत. पण काँग्रेसनं मल्लिकार्जुन खर्गे यांना प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केलं, तर महात्मा गांधींच्या स्वप्नातला दलित-हरिजन प्रधानमंत्री करण्याची संधी मिळणार आहे. देशातले मागासवर्गीय मतं वळविण्यात यश मिळेल. राहुल नको म्हणणाऱ्या विरोधकांनाही एक ज्येष्ठ मोठा संसदीय अनुभवी नेता मिळेल. त्यात भाजपचीही गोची होईल! कायद्याच्या दृष्टीनं खटला 'मोदी' आडनावाचा होता, पण मूळ प्रश्न 'गांधी' आडनावाचा आहे! प्रत्येक खोटारडा, विद्वेषी, लुटेरा, तानाशहा गांधींना घाबरतो. एक गांधी लढला होता गोऱ्यांशी, एक गांधी लढतोय चोरांशी! विचार करत असाल की, अभिमन्यू कौरवांच्या चक्रव्यूहात अडकलाय, पण नाही तो अभिमन्यू नाही त्याचा बाप आहे, म्हणजे अर्जुन आहे! चक्रव्यूह भेदण्याचं तो जाणतो. संपूर्ण भगवतगीता सांगितल्यावर कृष्ण अर्जुनाला म्हणतो, 'तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, युद्धाय कृतनिश्चाय! म्हणून उठ अर्जुना, युद्धाचा निश्चय कर! तुम्हीही उठा, निश्चय करा! हे देशातली लोकशाही, प्रजासत्ताक, संविधान वाचविण्यासाठी शांतीमय, लोकतांत्रिक, संवैधानिक पध्दतीचं युद्ध आहे!"
----------------------------------------------

*सर, बोल वो रहा है, लेकिन शब्द हमारे हैl*
'थ्री इडियट्स' या चित्रपटातला चमत्कारचा झालेला बलात्कार या शब्द बदलाचा सीन आठवला! राहुल गांधींना ठोठावलेली सजा आणि रद्द केलेलं सदस्यत्व ही घडामोड पाहता हे कायद्यानं आपलं काम केलंय त्यात आमचा काय संबंध? आम्हाला का खेचताहात? असा साळसूद अभिनय भाजपचे सारेच नेते करताहेत. पण याचे कर्तेकरविते कोण आहेत हे सारेच जाणतात. 'राहुल यांचं सदस्यत्व रद्द करायचंच' असं डिझाईन तयार करून मग सारं काही घडवलं गेलंय. राहुल यांच्यावर मानहानीच्या चार केसेस आहेत आणि त्या सर्व भाजपच्या राज्यातल्या आहेत. त्यापैकी सुरतमधली ही एक केस ज्याचा निकाल नुकताच लागलाय. भाजप नेते निरागसपणे सांगत असले तरी त्यामागं काय दडलंय, त्याची क्रॉंओलॉजी पाहून लोकतंत्र आणि गणतंत्र यांची काळजी ज्यांना आहे त्यांनी समजून घेतलं पाहीजे. यात नेमकं काय घडलंय ते पाहू. हे प्रकरण सुरू झालं होतं निवडणुकीच्या काळात १३ एप्रिल २०१९ ला राहुल गांधींनी कर्नाटकात कोलारला भाषण दिलं होतं. तिथं त्यांनी 'मोदी' या आडनावावरून टीका करत श्रोत्यांना प्रश्न विचारला होता. आर्थिक गुन्हे करणारे सारे मोदी कसे काय असतात? टीका राजकीय होती मात्र इशारा नरेंद्र मोदींच्या दिशेनं होता. त्यानंतर १६ एप्रिलला सुरतचे आमदार पूर्णेश मोदी यांनी एक तक्रार केली की, ही मानहानी-डीफामेशन आहे. हा आमच्या समाजाचा अपमान आहे. भाजप आज म्हणतेय की, हा ओबीसी समाजाचा अपमान आहे. मात्र असं काही नाही. पूर्णेश यांनी स्वतः पिटीशनमध्ये आपण ओबीसी नसल्याचं म्हटलंय. २ मे रोजी मॅजिस्ट्रेटच्या सांगण्यावरून एफआयआर दाखल केली. त्यानंतर न्यायालयीन कारवाई सुरू झाली. त्यावेळी पूर्णेश मोदींनी मागणी केली की, न्यायालयाच्या प्रत्येक तारखेला राहुल यांनी हजर राहावं. त्यावेळी न्यायाधीशांनी याची काही गरज नसल्याचं सांगत ती मागणी फेटाळली. त्यानंतर पूर्णेश यांनी ७ मे रोजी उच्च न्यायालयात धाव घेऊन जी सुनावणी सुरू झालीय त्यात पुरेसे पुरावे नाहीत, आणखी पुरावे गोळा करण्यासाठी त्याला स्थगिती मिळावी यासाठी अर्ज केला. पूर्णेश यांनी स्वतःच दावा दाखल केला आणि स्वतःच त्याला स्थगिती मिळावी म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतलीय. त्याला स्थगिती दिल्यानंतर ह्या दाव्याची सुनावणी थांबली. मग अचानक हा खटला वेगानं धावू लागला. लक्षांत घ्या ७ फेब्रुवारीला राहुल लोकसभेत भाषण देतात त्यात अदानीवर घणाघाती टीका करतात. यात अदानी आणि मोदी यांचा परस्पर संबंध काय आहे अशी विचारणा संसदेत उघडपणे करतात. इथंच हे सारं प्रकरण उलटवलं जातं. त्यानंतर मानहानीचा दावा दाखल करणारे पूर्णेश १६ फेब्रुवारीला उच्च न्यायालयात जातात आणि स्थगितीची आता गरज नाही ती मागे घ्यावी अशी विनंती करतात, मग स्थगिती उठवली जाते. २७ फेब्रुवारीला १० दिवसाच्या आत याची पुन्हा सुनावणी सुरू केली जाते. यावेळी इथं जज बदलून आले. पूर्वी दवे होते आता एच.एच. वर्मा आले. त्यांची लगेचच बढतीची घोषणा होते. हे सामान्यरित्या झालं असेल. मी म्हणत नाही की, या खटल्याचा आणि बढतीचा काही संबंध असेल. २७ फेब्रुवारीला सुनावणी सुरू होते आणि २३ मार्चला त्याचा निकाल येतो. एका महिन्याच्या आत सुनावणी होते, त्यात राहुलना दोषी मानलं जातं. केवळ दोषीच नाही तर या कायद्यानुसार जो जास्तीतजास्त सजा आहे, तो दोन वर्षांची सजा सुनावतात. हा निकाल येताच २४ तासात लोकसभेचे सचिवालय याची दखल घेऊन राहुल यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करतात. दोन वर्षे किंवा त्याहून अधिक सजा मिळाली तर खासदार, आमदार याचं सदस्यत्व रद्द होतं अशी कायद्यात तरतूद आहे. ही क्रॉंओलॉजी पाहता चार प्रश्न उपस्थित होतात. जो दावा एका बाजूला पडला होता तो अचानक कसा पटलावर आला? वर्षाहून अधिक काळ दावा पडून होता, कुणाला त्याची काळजी नव्हती. मग अचानक स्थगिती उठवून सुनावणी त्वरित करण्याची गरज का पडली? जज बदलले गेल्यावर जाग आली का? जजनं सुनावणी करण्यात एवढी तत्परता का दाखवली? खरंतर अशी तक्रार करू नये, कारण अशा जलद न्यायाचीच आज देशाला गरज आहे. यात वैशिष्ट्य असं की, राहुलना अभूतपूर्व सजा सुनावली गेलीय. अनेक कायदेतज्ज्ञाशी चर्चा केल्यावर असं आढळून आलं की, यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. एवढी मोठी सजा कधीच दिली गेली नव्हती. केवळ मानहानीचा हा गुन्हा एवढा जघन्य आहे की, जास्तीतजास्त सजा द्यायला हवीय. कायद्यात जी जास्तीतजास्त सजेची तरतूद आहे ती कमीतकमी पनिशमेन्ट आहे. त्यामुळं सदस्यत्व रद्द होतं. इथं २ वर्षाहून कमी सजा अगदी १ वर्ष ११ महिन्याची सजा सुनावली असती तर त्यांची सदस्यता राहिली असती.  मानहानी प्रकरणी जास्तीतजास्त दोन वर्षाची सजा असावी लागते तर सदस्यता रद्द करण्यासाठी कमीतकमी दोन वर्षांची असावी लागते. त्यामुळं सदस्यता रद्द करण्यासाठीच दोन वर्षांची सजा दिली गेलीय. हा केवळ योगायोग नाही. संविधानाच्या कलम १०३ अन्वये एखाद्याची सदस्यता रद्द करायची असेल तर त्याची सूचना राष्ट्रपतींना द्यावी लागेल. त्यापूर्वी निवडणूक आयोगाला याची कल्पना द्यावी लागेल. अशाप्रकारची नोटीस इश्यू होण्यासाठी जो कालावधी लागतो तोही इथं दिलेला नाही. राहुल यांच्या भाषणानं भाजप व्यथित झालं अन राहुलना धडा शिकवण्याचा निर्धार झाला. त्यानंतरचा योगायोग बघा अचानक कशी स्थगिती उठवली जाते. अचानक सुनावणी जलदगतीनं सुरू होते, नवे जज येतात. राहुलना संसदेत बोलायचं होतं. त्यांनी तशी मागणी केली होती. पण भाजप सदस्यांनी संसद बंद पाडलं. संसदेचं कामकाज पुन्हा सुरू होण्यापूर्वीच राहुल यांची सदस्यता रद्द होते. हा विचित्र योगायोग आहे. एकापाठोपाठ एक निर्णय होतात. जणू निकाल काय लागतो याची माहिती असल्यानेच साऱ्या यंत्रणा सदस्यत्व रद्द करण्यासाठी सज्ज असतात. आता यातली क्रोनोलॉजी समजेल. आपण म्हणाल की, या मागे निवडणुकीचं राजकारण तर नाही! २०२४ च्या निवडणुकीत ते प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार होते. इथं लक्षांत घ्यायला हवं की, केवळ २ वर्षांची ही सजा नाही तर त्यानंतर ६ वर्षे त्यांना निवडणूक लढवीता येणार नाही. राहुल निवडणूक लढवू शकणार नाहीत, म्हणजे प्रधानमंत्रीपदाचे दावेदार असणार नाहीत, मग मोदींच्यासमोर कुणी उमेदवारच नाही असं गृहितक मांडलं जाईल. असं हे राजकारण आपल्याला समजलं असेल. आता मानसिकता पहा 'काय फरक पडतो, माझ्या विरोधात जो उभा ठाकेल त्याला असा धडा शिकवीन! कोर्ट, दावे होतील, दोनचार दिवस प्रसिद्धीमाध्यमातून बातम्या येतील, आंदोलनं होतील, काही फरक पडत नाही! हा सत्तेचा अहंकार आहे. ज्याला धडा शिकवायचा होता त्याला मी धडा शिकवलाय! या सत्तेच्या अहंकाराला रोखणारा कुणी उरलेला नाही? कुणी विचारणारा राहिला नाही? का कुणाची विचारण्याची हिंमत नाही? राहुल आता संसदेत असणार नाहीत. तसं पाहिलं तर गेली आठ वर्षं ते रस्त्यावरच आहेत. विरोधीपक्ष संसदेत राहिलाय कुठं? तो रस्त्यावरच राहिलाय. राहुल लोकांचे प्रश्न, लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरत असतील तर त्यांचं स्वागत व्हायला हवंय. कायद्याच्या भाषेत खटला 'मोदी' आडनावाचा होता, पण मूळ प्रश्न 'गांधी' आडनावाचा आहे! प्रत्येक खोटारडा, विद्वेषी, लुटेरा, तानाशहा गांधींना घाबरतो. एक गांधी लढला होता गोऱ्यांशी, एक गांधी लढतोय चोरांशी! विचार करत असाल की, अभिमन्यू कौरवांच्या चक्रव्यूहात अडकलाय, पण नाही तो अभिमन्यू नाही त्याचा बाप आहे, म्हणजे अर्जुन आहे! चक्रव्यूह भेदण्याचं तो जाणतो. संपूर्ण भगवतगीता सांगितल्यावर कृष्ण अर्जुनाला म्हणतो, 'तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, युद्धाय कृतनिश्चाय! म्हणून उठ अर्जुना, युद्धाचा निश्चय कर! तुम्हीही उठा, निश्चय करा! देशातली लोकशाही, प्रजासत्ताक, संविधान वाचविण्यासाठी शांतीमय, लोकतांत्रिक, संवैधानिक पध्दतीचं युद्ध आहे!

खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधी अधिकच आक्रमक बनलेत. त्यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी, अदानी आणि भाजप यांच्यावर कडाडून हल्ला चढवलाय. हे लोकशाहीवरचं आक्रमण आहे अशी सुरुवात करून त्यांनी, आपण आता पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा करणार असल्याचे निर्धार जाहीर केला. आपण आता मुक्त आहोत. अधिक जोमानं काम करू असं सांगतानाच त्यांनी म्हटलं की, मी माझ्या संसदेतल्या भाषणात अदानीच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. त्यात अदानी-मोदी यांचे संबंध काय आहेत याची विचारणा केली होती. त्या प्रश्नांनी त्यांच्यातल्या संबंधातली पोल खोलली गेली होती. त्यावर कुणीच उत्तर दिलं नाही. त्यामुळं मला संसदेत बोलायचं आहे यासाठी मी दोन पत्रे लोकसभा अध्यक्षांना लिहिली, प्रत्यक्ष भेटलो, बोलण्याबाबत विनंती केली. पण त्यांनी असमर्थता व्यक्त केली. मला बोलण्याची संधी दिली असती तर अदानीच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी रुपये जे गुंतवले गेले ते कुणाचे आहेत? संरक्षण खात्याची कंपन्यात हा पैसा गुंतवला आहे. हे सारं उघड केलं असतं म्हणूनच मला बोलण्यापासून रोखलं गेलंय. असा घणाघात त्यांनी केला. मी बोलू नये म्हणून माझी सदस्यता रद्द केलीय. पण मी मागे हटणार नाही. माझ्यावर कायमची बंदी घातली, मला तुरुंगात डांबलं तरी मी लढत राहणार. भारतीयांच्या हक्कांसाठी, लोकशाही, संसद, संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करीन. मी कुणालाही, कशालाही घाबरत नाही. प्राप्त परिस्थितीत या निमित्तानं विरोधकांना एकत्र येण्याचं कोलीत मिळालेलं आहे. मी ओबीसीचंच नव्हे कुणाचीच मानहानी केलेली नाही .भारत जोडो यात्रेत सर्वांना एकत्र येण्याचं, वैर, द्वेषभावना सोडण्याचं आवाहन केलेलं आहे. माझ्याबद्धल संसदेत मंत्र्यांनी खोटं सांगितलं की, मी लोकशाही रक्षणासाठी परकीयांची मदत मागितली. हे तद्दन खोटं आहे. मला संसदेत बोलायची संधी दिली असती तर सारं काही स्पष्ट झालं असतं. विदेशातले अदानी-मोदी यांच्या प्रवासातले फोटोज मी दाखवले असते. म्हणूनच मला रोखलं गेलंय. पण मी आता मागे हटणार नाही. संघर्ष करणार...! पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी तेवढ्याच तडफेनं, परिपक्वतेनं आणि रोखठोक उत्तरं दिली. न्यायालयानं ठोठावलेल्या सजेचा, खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचा त्यांच्यावर कोणताच परिणाम दिसत नव्हता. 'अदानींच्या कंपन्यांमध्ये वीस हजार कोटी रुपये कोणाचे आहेत?' या मूळ प्रश्नापासून मी कोणालाही भरकटू देणार नाही, असं राहुल पत्रकार परिषदेत पुन्हा पुन्हा सांगत होते. एकानं विचारलेल्या  प्रश्नावर ते ताडकन म्हणाले की, तुम्हाला पत्रकारिता न करता भाजपचे काम करायचं असेल, तर तसा बिल्लाच लावा! गोदी मीडियाला राहुल यांनी दिलेली ही थेट चपराक... 'डरो मत'वाल्या निर्भय राहुलचे पुनश्च दर्शन घडलं!

आजची अशी स्थिती आहे की, विरोधकांना सर्वच बाजूनं कमकुवत करणं हा सत्ताधाऱ्यांचा खेळ सुरू झालाय. जे भ्रष्टाचारी आहेत, बदनाम आहेत त्यांना पुन्हा एकदा अधिक बदनाम करून त्यांना मतदारांच्या मनातून उतरवण्याचा प्रयत्न होतोय. राजकीय नेते, ओपिनियन मेकर, समाजसेवक, एनजीओ चालवणारे समाजसेवक एवढंच नाही तर मीडियादेखील भाजपच्या या अशा भूमिकेला घाबरतेय. त्यामुळं सारे गप्प आहेत. कारण कुणालाही, कोणत्याही कारणावरून चौकशीला सामोरं जावं लागेल अन चौकशीच्या नावाखाली त्यांना आठ आठ तास पोलीस चौकीत बसायला लागेल. ते निरपराध असले तरी ते लोकांच्या नजरेत ते आरोपीच कसे राहतील यासाठीचा हा सारा डाव आहे. त्यामुळं प्रत्येकजण भीतीच्या वातावरणात वावरतोय. यातून एक नेरेटिव्ह तयार होतंय की, मोदींच्या राज्यात सर्वांनाच खबरदारी घेऊन स्वच्छ राहावं लागेल. इतकं की, 'दुधसे सफेद' राहावं लागेल. तेव्हाच तुम्ही त्यांच्याशी लढू शकाल नाहीतर थोडंसं जरी काही घडलं तरी पकडले जाल. प्रसंगी कारवाईला सामोरं जावं लागेल. आज राजकारणात क्लीन आणि क्रेडीबिलिटी असलेले नेते कमी आहेत हे माहीत असल्यानंच सर्वच विरोधकांची अशी कोंडी केली जातेय. ईडीच्या कारवाईसाठी रांगेत असलेल्या १२९ राजकीय पुढाऱ्यांपैकी १२५ जण हे विरोधी पक्षातले आहेत. जी मंडळी भाजपच्या छत्र छायेखाली गेली आहेत त्यांना अभय दिलं गेलंय. मात्र चौकशीची टांगती तलवार आहेच. ती प्रलंबित ठेवलीय, एवढंच! जर काही विरोधी वागलात तर पुन्हा डोक्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. त्यामुळं त्यांना भाजपसोबत राहून गप्पच बसावं लागणार आणि झिंदाबादच्या घोषणा द्याव्या लागणार आहेत. देशातल्या काही विरोधीपक्षाच्या नेत्यांनी तपासयंत्रणांच्या कारवाईबाबत प्रधानमंत्र्यांना पत्र लिहून कशाप्रकारे तपासयंत्रणाचा गैरवापर होतोय हे दाखवत नाराजी व्यक्त केली होती. त्यावर मात्र प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलंय, त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. उलट जुन्या, बंद झालेल्या फायलीतली प्रकरणं उकरून काढत शक्तिशाली विरोधकांची गचांडी धरली आहे. अशा कारणानं विरोधकांचा आवाज मंदावला आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभं राहण्याचं त्राण उरलेलं नाही. त्यामुळं रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारला जात नाहीये. सत्तेपुढे सारेच गलितगात्र बनले आहेत.

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधीपक्षांची एकजूट व्हायला हवीय अशी लोकांमध्येच चर्चा आहे. ते झालं नाही तर विरोधकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जर विरोधक एक झाले नाहीत तर, देशातला विरोधीपक्ष संपेल. मग सत्तेला जाब विचारणारा कुणी शिल्लक राहणारच नाही. विरोधकातल्या प्रत्येकाची विचारधारा वेगळी आहे. पण लोकशाही, संविधान आणि संसदीय कारभार  याबाबत एकमत असायला हरकत नाही . ही सारी आयुधं जिवंत राहायला हवीत त्यासाठी लोकजागृती व्हायला हवीय. ती विरोधकांशिवाय करणार कोण? आज भाजपनं भ्रष्टाचार आणि परिवारवादचा मुद्दा उचललेलाय, त्याच्या विरोधात एखादा चांगला विश्वसनीय मुद्दा हाती घेऊन पर्याय उभा करावा लागेल. काँग्रेससह सर्वच पक्षांना हे स्पष्ट करावं लागेल की 'आमच्याकडं प्रधानमंत्रीपदाचा कोणत्याही उमेदवार नाही, तो निवडणुकीनंतर ठरवता येईल!' आजवर राहुल गांधींनी कोणत्याचं पक्षाशी एकत्र येण्याबाबत चर्चा केलेली नाही. काँग्रेसनं सर्व विरोधकांना सामावून घेण्याची वडीलकीची भूमिका अदा केलेली नाही. त्यामुळं त्यांच्या सभोवताली असलेले नेते हे फुकाच्या स्वबळाची बडबड करत असतात, ते थांबवलं पाहिजे. काँग्रेसनं पुढाकार घ्यायला हवाय, विरोधकांना एकत्र करण्याचं नेतृत्व करायला हवंय. तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, हा विश्वास इतरांना द्यायला हवाय. कारण काँग्रेसच्या मागे जायला लोक आता तयार नाहीत, कारण निवडणूक जिंकणारा, मतं खेचणारा पक्ष तो आता राहिलेला नाही. प्रादेशिक पक्षांची ताकद त्याहून अधिक आहे. राहुल यांच्यावर कारवाई झाल्यानं आता खर्गे यांच्यावर जबाबदारी आली आहे. आज राहुल जात्यात आहेत, आपण सुपात आहोत, आपल्याला कधीही जात्यात टाकून दळले जाईल. त्यामुळं सर्व विरोधकांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. लोकसभेच्या निवडणुकांसाठी भाजपनं सारं लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. भाजपनं एक वेगळीच खेळी खेळण्याचं ठरवलेलं दिसत होतं. त्यांना येनकेनप्रकारेण राहुल गांधींना चर्चेत ठेवायचं होतं. इतर कोणत्याही प्रादेशिक नेत्यापेक्षा राहुल वरचढ आहेत असं गृहितक भाजपला तयार करून २०२४ च्या निवडणुकीत मोदींसमोर राहुल गांधी हेच प्रधानमंत्रीपदाचे दावेदार म्हणून येतील. त्यावेळी राहुल मोदींसमोर टिकणार नाही आणि मतदार राहुल ऐवजी मोदींना स्वीकारतील! ही भाजपची खेळी होती. आजवर काँग्रेसच्या राजवटीत एखाद्या मुद्द्यावरून संसदेत हंगामा झाल्याचं दिसून आलंय मात्र एखाद्या व्यक्तीच्या विरोधात असं पहिल्यांदाच घडतंय. सहा केंद्रीयमंत्री एका राहुल गांधींवर तुटून पडलेत. लोकसभेच्या थेट प्रक्षेपणाचा आवाज बंद केला गेला. संसदीय कामकाजात अशाप्रकारे यापूर्वी घडलं नव्हतं. ज्यावेळी संसदेचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी याची नोंद होईल. पण सुरतच्या या निकालानं भाजपच्या मनसुब्यावर पाणी पडलंय. आता जवळपास २+६ अशी आठवर्षें राहुल संसदेत येऊ शकणार नाहीत. त्यामुळं प्रधानमंत्रीपदाचे दावेदार ते असणार नाहीत. त्यांच्याकडं कोणतीही संवैधानिक जबाबदारी नसल्यानं ते मुक्तपणे विरोधकांना एकत्र करू शकतील आणि स्वच्छंदपणे प्रचार करतील, कोणतीही बंधनं त्यांच्यावर असणार नाहीत. अशावेळी काँग्रेसनं प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड करायला हवीय. महात्मा गांधींच्या स्वप्नातला दलित-हरिजन प्रधानमंत्री करण्याची या निमित्तानं काँग्रेसला संधी मिळणार आहे. देशातले मागासवर्गीय मतं वळविण्यात यश मिळेल. हे लक्षांत आल्यानेच भाजपनं ओबीसींचा वापर चालवलाय. राहुलनं ओबीसींची मानहानी केलीय असा प्रचार चालवलाय आणि आंदोलन आरंभलंय! यातच सारंकाही आलंय.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

बहुमताची हुकूमशाही....!

"राहुल गांधी यांना संसदेतून बाहेर काढलं गेलंय. यामागचं राजकारण समजून घ्यायला हवंय. क्रोनोलॉजी समजून घेतली तर त्यामागचं राजकारण, निवडणूक विद्या, त्यांचं गणितही समजेल. त्यामागची मानसिकता समजेल. मोदींच्या विरोधात राहुल यावेत हा भाजपनं टाकलेला डाव त्यांनीच उधळून लावलाय. मोदींसमोर कुणीच नाही हे गृहितक मांडायला ते सज्ज आहेत. पण काँग्रेसनं मल्लिकार्जुन खर्गे यांना प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केलं, तर महात्मा गांधींच्या स्वप्नातला दलित-हरिजन प्रधानमंत्री करण्याची संधी मिळणार आहे. देशातले मागासवर्गीय मतं वळविण्यात यश मिळेल. राहुल नको म्हणणाऱ्या विरोधकांनाही एक ज्येष्ठ मोठा संसदीय अनुभवी नेता मिळेल. त्यात भाजपचीही गोची होईल! कायद्याच्या दृष्टीनं खटला 'मोदी' आडनावाचा होता, पण मूळ प्रश्न 'गांधी' आडनावाचा आहे! प्रत्येक खोटारडा, विद्वेषी, लुटेरा, तानाशहा गांधींना घाबरतो. एक गांधी लढला होता गोऱ्यांशी, एक गांधी लढतोय चोरांशी!  देशातली लोकशाही, प्रजासत्ताक, संविधान वाचविण्यासाठी शांतीमय, लोकतांत्रिक, संवैधानिक पध्दतीचं युद्ध आहे!"
----------------------------------------------

*सर, बोल वो रहा है, लेकिन शब्द हमारे हैl*
'थ्री इडियट्स' या चित्रपटातला चमत्कारचा झालेला बलात्कार या शब्द बदलाचा संवाद आठवला! राहुल गांधींना ठोठावलेली सजा आणि रद्द केलेलं सदस्यत्व ही घडामोड पाहता हे कायद्यानं केलंय त्यात आमचा काय संबंध? असा साळसूद अभिनय भाजपचे सारेच नेते करताहेत. पण याचे कर्तेकरविते कोण आहेत हे सारेच जाणतात. 'राहुल यांचं सदस्यत्व रद्द करायचंच' असं डिझाईन तयार करून मग सारं काही घडवलं गेलंय. राहुल यांच्यावर मानहानीच्या चार केसेस आहेत आणि त्या सर्व भाजपच्या राज्यातल्या आहेत. त्यापैकी सुरतमधली ही एक केस ज्याचा निकाल नुकताच लागलाय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं संसदेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलंय. २०१९ मध्ये कर्नाटकाच्या कोलार इथल्या सभेत केलेल्या वक्तव्यावरून दाखल झालेल्या दाव्यात सुरत इथल्या कोर्टानं राहुलना दोषी ठरवत २ वर्षाची सजा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दरम्यान लोकसभा अध्यक्षांनी राहुल यांचं सदस्यत्व रद्द करून टाकलं. साहजिकच राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. सुरतच्या त्या न्यायाधीशांचं कौतुक करायला हवंय. सध्या राजकारणात जे व्यक्तिगत चारित्र्यहनन होतंय. प्रतिमाखंडन केलं जातंय. अत्यंत गलिच्छ, अश्लाघ्य, पातळीहीन आरोप-प्रत्यारोप केले जाताहेत. त्याला रोखण्यासाठी न्यायालयानं जो काही निर्णय दिलाय त्याचं स्वागत करायला हवंय! न्यायाधीशांनी म्हटल्याप्रमाणे, 'कायद्यातल्या तरतुदीनुसार जास्तीत जास्त सजा दिलीय, पण ती कमी सजा दिली असती तर, लोकांसमोर वेगळा संदेश गेला असता; आणि मानहानीच्या खटल्याचा जो हेतू संविधानानं सांगितलाय तो साध्य झाला नसता...!' न्यायाधीशांचा हेतू चांगला असला तरी त्याचे परिणाम काय होतील हे पाहणं महत्वाचं आहे. यापूर्वी अशाप्रकारे इंदिरा गांधी, लालूप्रसाद यादव, लक्षद्वीपचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल, समाजवादी पार्टीचे आझम खान, मुझफ्फरपूरचे भाजप आमदार विक्रम सैनी यांचंही सदस्यत्व रद्द झालेलं आहे. जनता पक्षाच्या राजवटीत इंदिरा गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलं पण त्यानंतर त्या मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्या. आणि सत्ताही आली. हे सारं सांगण्याचं कारण, राहुल यांची सदस्यत्व रद्द झाल्यानं विस्कळीत विरोधीपक्षांना, गलितगात्र बनलेल्या काँग्रेसला संजीवनी मिळणार आहे. भाजपनं जो काही डाव टाकलेला होता तो कदाचित त्यांच्यावरच उलटला जाण्याची शक्यता आहे.

चार वर्षांपूर्वी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातल्या कोलार इथल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'मोढ वणिक' समाजाबाबत अवमानकारक उदगार काढले होते, त्यात त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देशातले आर्थिक गुन्हेगार नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांच्याशी तुलना केली होती. लोकांना संबोधित करताना त्यांनी 'सर्वच चोरांचं सरनेम मोदी कसं काय असतं? असा सवाल केला होता. त्या वक्तव्याने व्यथित झालेल्या मोढ वणिक समाजाचे पुढारी आणि सुरत पश्चिम शहराचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात भादंवि ५००, ४९९ कलमाखाली मानहानीचा दावा दाखल केला. इथं हे लक्षांत घेतलं पाहिजे की, मोदी हे कुठलं जातीवाचक उल्लेख नाही. मोदी म्हणजे किरकोळ किराणा माल विकणारे. त्यामुळं अशांच्या दुकानांच्या समूह आढळतो त्याला मोदिखाना म्हटलं जातं. जस पुण्यात जुना आणि नवा मोदिखाना लष्कर परिसरात आहे. राहुल यांनी उच्चारलेलं ललित मोदी हे मारवाडी राजस्थानातले आहेत. भाजपचे बिहारमधले सुशील मोदी हे ब्राह्मण आहेत. भारतीय राजकारणातले जुन्या काळातले नेते पिलू मोदी, प्रसिद्ध चित्रपट निर्माते सोहराब मोदी हे पारशी होते. बॅडमिंटनपटू सईद मोदी हे मुस्लिम होते. त्यामुळं मोदी आडनाव जे राहुल यांनी घेतलं ते जातीवाचक मुळीच नाही. तरीही कोर्टानं मोदी ही जात मानून निकाल दिलाय! पण वस्तुस्थिती वेगळी आढळते. भाषणाचा कालखंड लक्षांत घेता त्या काळात आर्थिक गुन्हेगार कोट्यवधी रुपये घेऊन देशाबाहेर पळून गेले होते. त्याच काळात राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची चर्चा होती, त्यात नरेंद्र मोदींवर आरोप करण्यात येत होता. अशा वातावरणात निवडणूक प्रचारादरम्यान हे वक्तव्य राहुल यांनी केलं होतं. त्यात कोणत्याही समाजाचा उल्लेख नव्हता. पण  याचिकाकर्त्यांनी दाव्यात समाजाची नोंद करून समाजाची मानहानी झाल्याचं म्हटलं. त्यावरच हा निकाल दिला गेला. त्यासाठी भाषणाचा व्हिडीओ व्यतिरिक्त कोणताही पुरावा दिला गेला नाही. पोलीस वा निवडणूक आयोग यांनी कसलीही दखल या भाषणाची घेतलेली नव्हती. दावा दाखल झाल्यानंतरही कोणताही तपास याबाबत झालेला नाही. त्यामुळं आलेल्या निकालाबाबत काँग्रेसनं आश्चर्य व्यक्त केलं आहे. भादंवि ४९९ कलमाअंतर्गत जे तीन मुद्दे आहेत त्यानुसार हा खटलाच उभा राहू शकत नाही. असं कायदेतज्ज्ञाचं मत आहे. तर राजकीय विश्लेषकांच्या मतांनुसार, या सर्व प्रकरणाची क्रोनोलॉजी समजून घेतली तर चित्र स्पष्ट होईल. राहुल गांधी यांनी अदानी आणि मोदी यांच्या संदर्भात संसदेत विचारलेले प्रश्न, त्यावर कोणतेही उत्तर सत्ताधाऱ्यांनी दिले नाही. प्रधानमंत्र्यांनी अदानीतला अ देखील उच्चारला नाही. त्यानंतर लंडनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतल्या मुलाखतीत बोलताना राहुल यांनी भारतातली लोकशाही धोक्यात आलीय ब्रिटन, अमेरिकेनं लक्ष घालावं असं म्हटलं. त्याविरोधात भाजपनं संसदेत राहुल यांनी या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी मागणी केली. मात्र विरोधकांनी अदानी यांच्या घोटाळ्याबाबत जेपीसी नेमावी असा आग्रह धरला. या साऱ्या गदारोळात संसदेचं कामकाम तब्बल १० दिवस बंद पडलं. दरम्यान संसदेच्या विशेषाधिकार समितीनं राहुल यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं यासाठी हालचाली सुरू केल्या. अशाप्रकारे सदस्यत्व रद्द केलं तर त्याचा राजकीय फायदा काँग्रेसला होईल आणि भाजपला नुकसान सोसावं लागेल. हे लक्षांत आल्यानंतर या सुरतेतल्या खटल्याचा आधार घेतला गेला. निकाल लावून घेतला. कायद्याच्या तरतुदीनुसार जास्तीतजास्त २ वर्षाची सजा सुनावली गेली. कारण २ वर्षे वा त्याहून अधिकची सजा झाली तर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्याचं सदस्यत्व आपोआप रद्द होतं. याचा फायदा इथं घेतला गेलाय.

आजची अशी स्थिती आहे की, विरोधकांना सर्वच बाजूनं कमकुवत करणं हा सत्ताधाऱ्यांचा खेळ सुरू झालाय. जे भ्रष्टाचारी आहेत, बदनाम आहेत त्यांना पुन्हा एकदा अधिक बदनाम करून त्यांना मतदारांच्या मनातून उतरवण्याचा प्रयत्न होतोय. राजकीय नेते, ओपिनियन मेकर, समाजसेवक, एनजीओ चालवणारे समाजसेवक एवढंच नाही तर मीडियादेखील भाजपच्या या अशा भूमिकेला घाबरतेय. त्यामुळं सारे गप्प आहेत. कारण कुणालाही, कोणत्याही कारणावरून चौकशीला सामोरं जावं लागेल अन चौकशीच्या नावाखाली त्यांना आठ आठ तास पोलीस चौकीत बसायला लागेल. ते निरपराध असले तरी ते लोकांच्या नजरेत ते आरोपीच कसे राहतील यासाठीचा हा सारा डाव आहे. त्यामुळं प्रत्येकजण भीतीच्या वातावरणात वावरतोय. यातून एक नेरेटिव्ह तयार होतंय की, मोदींच्या राज्यात सर्वांनाच खबरदारी घेऊन स्वच्छ राहावं लागेल. इतकं की, 'दुधसे सफेद' राहावं लागेल. तेव्हाच तुम्ही त्यांच्याशी लढू शकाल नाहीतर थोडंसं जरी काही घडलं तरी पकडले जाल. प्रसंगी कारवाईला सामोरं जावं लागेल. आज राजकारणात क्लीन आणि क्रेडीबिलिटी असलेले नेते कमी आहेत हे माहीत असल्यानंच सर्वच विरोधकांची अशी कोंडी केली जातेय. ईडीच्या कारवाईसाठी रांगेत असलेल्या १२९ राजकीय पुढाऱ्यांपैकी १२५ जण हे विरोधी पक्षातले आहेत. जी मंडळी भाजपच्या छत्र छायेखाली गेली आहेत त्यांना अभय दिलं गेलंय. मात्र चौकशीची टांगती तलवार आहेच. ती प्रलंबित ठेवलीय, एवढंच! जर काही विरोधी वागलात तर पुन्हा डोक्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. त्यामुळं त्यांना भाजपसोबत राहून गप्पच बसावं लागणार आणि झिंदाबादच्या घोषणा द्याव्या लागणार आहेत. देशातल्या काही विरोधीपक्षाच्या नेत्यांनी तपासयंत्रणांच्या कारवाईबाबत प्रधानमंत्र्यांना पत्र लिहून कशाप्रकारे तपासयंत्रणाचा गैरवापर होतोय हे दाखवत नाराजी व्यक्त केली होती. त्यावर मात्र प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलंय, त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. उलट जुन्या, बंद झालेल्या फायलीतली प्रकरणं उकरून काढत शक्तिशाली विरोधकांची गचांडी धरली आहे. अशा कारणानं विरोधकांचा आवाज मंदावला आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभं राहण्याचं त्राण उरलेलं नाही. त्यामुळं रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारला जात नाहीये. सत्तेपुढे सारेच गलितगात्र बनले आहेत.

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधीपक्षांची एकजूट व्हायला हवीय अशी लोकांमध्येच चर्चा आहे. ते झालं नाही तर विरोधकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जर विरोधक एक झाले नाहीत तर, देशातला विरोधीपक्ष संपेल. मग सत्तेला जाब विचारणारा कुणी शिल्लक राहणारच नाही. विरोधकातल्या प्रत्येकाची विचारधारा वेगळी आहे. पण लोकशाही, संविधान आणि संसदीय कारभार  याबाबत एकमत असायला हरकत नाही . ही सारी आयुधं जिवंत राहायला हवीत त्यासाठी लोकजागृती व्हायला हवीय. ती विरोधकांशिवाय करणार कोण? आज भाजपनं भ्रष्टाचार आणि परिवारवादचा मुद्दा उचललेलाय, त्याच्या विरोधात एखादा चांगला विश्वसनीय मुद्दा हाती घेऊन पर्याय उभा करावा लागेल. उघडपणे आणि गुप्तरीतीनं त्याबाबत विरोधकांमध्ये बोलणी सुरू झाल्या आहेत. मोदींसमोर प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल हे जरी ठरवलं नाही तरी लोकशाहीच्या रक्षणासाठी तरी विरोधक एकत्र येतील असं आजचं चित्र आहे. पण काँग्रेससह सर्वच पक्षांना हे स्पष्ट करावं लागेल की 'आमच्याकडं प्रधानमंत्रीपदाचा कोणत्याही उमेदवार नाही, तो निवडणुकीनंतर ठरवता येईल!' आजवर राहुल गांधींनी कोणत्याचं पक्षाशी एकत्र येण्याबाबत चर्चा केलेली नाही. काँग्रेसनं सर्व विरोधकांना सामावून घेण्याची वडीलकीची भूमिका अदा केलेली नाही. त्यामुळं त्यांच्या सभोवताली असलेले नेते हे फुकाच्या स्वबळाची बडबड करत असतात, ते थांबवलं पाहिजे. काँग्रेसनं पुढाकार घ्यायला हवाय, विरोधकांना एकत्र करण्याचं नेतृत्व करायला हवंय. तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, हा विश्वास इतरांना द्यायला हवाय. कारण काँग्रेसच्या मागे जायला लोक आता तयार नाहीत, कारण निवडणूक जिंकणारा, मतं खेचणारा पक्ष तो आता राहिलेला नाही. प्रादेशिक पक्षांची ताकद त्याहून अधिक आहे. काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी असा प्रयत्न काही प्रमाणात केलेला दिसतो. राहुल यांच्यावर कारवाई झाल्यानं आता खर्गे यांच्यावर जबाबदारी आली आहे. राहुल यांच्याबरोबर जायला तयार नसलेले अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, आणि इतरांनी राहुल यांच्यावरील कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना माहिती आहे की, आज राहुल जात्यात आहेत, आपण सुपात आहोत, आपल्याला कधीही जात्यात टाकून दळले जाईल. त्यामुळं सर्व विरोधकांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. आज काँग्रेस नको अन भाजप नको म्हणत वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करणारे वेळ येताच भाजपच्या वळचणीला जातील अशी शक्यता नाकारता येत नाही.

अदानींच्या कंपन्यांमध्ये वीस हजार कोटी रुपये कोणाचे आहेत?' या मूळ प्रश्नापासून मी कोणालाही भरकटू देणार नाही, असं राहुल पत्रकार परिषदेत पुन्हा पुन्हा सांगत होते. एकानं विचारलेल्या  प्रश्नावर ते ताडकन म्हणाले की, तुम्हाला पत्रकारिता न करता भाजपचे काम करायचं असेल, तर तसा बिल्लाच लावा! गोदी मीडियाला राहुल यांनी दिलेली ही थेट चपराक... 'डरो मत'वाल्या निर्भय राहुलचे पुनश्च दर्शन घडलं!

गेल्या काही दिवसांपासून संसदेत राहुल गांधींच्या लंडनमधल्या वक्तव्यावरून हंगामा सुरू आहे. त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जातेय. दुसरीकडं देशातले सारे विरोधी पक्षाचे नेते एकवटताहेत, असं चित्र निर्माण झालंय. अखिलेश आणि ममता बॅनर्जी यांची भेट झालीय. केसीआर आपला पक्ष विस्तारताहेत. केजरीवाल ठाकरेंची भेट घेताहेत. नितीशकुमार, तेजस्वी यादव हे एक झाल्याचं दिसतंय. शरद पवार, सीताराम येचुरी यांनी हिंदी पट्ट्यातल्या विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करताहेत, राहुल गांधी यांनी 'भारत जोडो: च्या माध्यमातून देश पिंजून काढलाय. वाढत्या पाठींब्यामुळं काँग्रेसला आपलं बळ वाढल्याचा साक्षात्कार झालाय. तरीही मल्लिकार्जुन खर्गे विरोधकांना एकत्र येण्याचं आवाहन करताहेत. भाजप मात्र हे सारं निरीक्षण करतेय. आगामी काळात पांच राज्याच्या निवडणुका आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकांसाठी भाजपनं सारं लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. भाजपनं एक वेगळीच खेळी खेळण्याचं ठरवलेलं दिसत होतं. त्यांना येनकेनप्रकारेण राहुल गांधींना चर्चेत ठेवायचं होतं. इतर कोणत्याही प्रादेशिक नेत्यापेक्षा राहुल वरचढ आहेत असं गृहितक भाजपला तयार करायचं होतं. जेणेकरून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींसमोर राहुल गांधी हेच प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून मतदारांपुढे येतील. त्यावेळी त्यांचं व्यक्तिमत्त्व हे मोदींसमोर टिकणार नाही आणि मतदार राहुल ऐवजी मोदींना स्वीकारतील! ही भाजपची खेळी होती. असं चित्र निर्माण झालं तर मोदींना पर्यायाने भाजपचा फायदा होईल. आजवर काँग्रेसच्या राजवटीत एखाद्या मुद्द्यावरून संसदेत हंगामा झाल्याचं दिसून आलंय मात्र एखाद्या व्यक्तीच्या विरोधात असं पहिल्यांदाच घडतंय. सहा केंद्रीयमंत्री एका राहुल गांधींवर तुटून पडलेत. लोकसभेच्या थेट प्रक्षेपणाचा आवाज बंद केला गेला. संसदीय कामकाजात अशाप्रकारे यापूर्वी घडलं नव्हतं. ज्यावेळी संसदेचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी याची नोंद होईल. पण सुरतच्या या निकालानं भाजपच्या मनसुब्यावर पाणी पडलंय. या निकालानं विरोधकांना संजीवनी मिळालीय. त्यांना एकत्र येण्याची संधी मिळालीय. आता जवळपास २+६ अशी आठवर्षें राहुल संसदेत येऊ शकणार नाहीत. त्यामुळं प्रधानमंत्रीपदाचे दावेदार ते असणार नाहीत. त्यांच्याकडं कोणतीही संवैधानिक जबाबदारी नसल्यानं ते मुक्तपणे विरोधकांना एकत्र करू शकतील आणि स्वच्छंदपणे प्रचार करतील, कोणतीही बंधनं त्यांच्यावर असणार नाहीत. अशावेळी काँग्रेसनं प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड करायला हवीय. महात्मा गांधींच्या स्वप्नातला दलित-हरिजन प्रधानमंत्री करण्याची या निमित्तानं काँग्रेसला संधी मिळणार आहे. देशातले मागासवर्गीय मतं वळविण्यात यश मिळेल. हे लक्षांत आल्यानेच भाजपनं ओबीसींचा वापर चालवलाय. राहुलनं ओबीसींची मानहानी केलीय असा प्रचार चालवलाय आणि आंदोलन आरंभलंय! यातच सारंकाही आलंय.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Saturday 18 March 2023

कर्नाटकातला रणसंग्राम...!

"पाच राज्याच्या निवडणुका होताहेत. पण त्यातल्या कर्नाटकातली निवडणूक भाजपच्या दृष्टीनं महत्वाची आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीसाठी ती दिशादर्शक ठरणारी आहे! कर्नाटकात भाजपची सत्ता आहेच, शिवाय लोकसभेच्या २५ जागा जिंकलेल्या आहेत. मागच्यावेळी काँग्रेस-जेडीएस फोडून सत्ता हस्तगत केलीय. इथं मतांची टक्केवारी काँग्रेसची अधिक आहे. भारत जोडो यात्रेनंतर मागासवर्गीय मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस पक्षाध्यक्ष बनलेत. मुख्यमंत्री बोम्मई यांचं '४० टक्के कमिशनचं सरकार' असं बदनाम झालंय. एडीयुरप्पा उदासीन आणि नाराज आहेत. हिजाब, टिपू सुलतान हे मुद्दे कामाला आलेले नाहीत. काँग्रेसकडं सिद्धरामय्या, शिवकुमार आणि खर्गे असे जनाधार असलेले दिग्गज नेते आहेत तर बोम्मई यांना फारसा जनाधार नाही म्हणून दिल्लीतल्या नेत्यांना सारी सूत्रं हाती घ्यावी लागताहेत. केवळ बोम्मई यांचीच नव्हे भाजपचीही कसोटी या निवडणुकीत लागणार आहे!"
----------------------------------------------

देशातल्या पांच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पूर्वोत्तर राज्यातल्या तीन राज्याच्या निवडणुका झाल्यात. राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी होताहेत. मात्र या इतर राज्यांहून कर्नाटकातली निवडणूक वेगळी ठरणार आहे. कर्नाटकातली निवडणूक ही २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिशादर्शक ठरणारी आहे. कर्नाटकातल्या ३१ जिल्ह्यातून विधानसभेच्या २२४ जागा आहेत. २०१८ मध्ये झालेल्या निवडणूकीत भाजप १०४ आमदार निवडून आले. मतं मिळाली ३६.३ टक्के. तर काँग्रेसचे ८० आमदार निवडून आले. त्यांना ३८.४ टक्के मतं मिळाली. अर्थात भाजपपेक्षा ती अधिक होती. जेडीएसचे ३७ आमदार निवडून आले. त्यांना १८.३ टक्के मिळाली. भाजपपेक्षा निम्मी मतं मिळाली तरी आमदारांची संख्या खूप कमी होती. त्यानंतर काँग्रेस-जेडीएसनं युती करून सरकार स्थापन केलं पण भाजपनं काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडले, त्यांना राजीनामा द्यायला लावले आणि सत्ता हस्तगत केली.  हा इतिहास झाला. इथं घडलेल्या दोन गोष्टी आगामी निवडणुकीत महत्वाचं ठरणारं आहे. एक भाजपकडून एडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवणं आणि दुसरं मल्लिकार्जुन खर्गे यांची अखिल भारतीय काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदावर झालेली निवड! एडीयुरप्पा हे भाजपसाठी टिकाऊ, लढाऊ आणि जिताऊ मुख्यमंत्री होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबत मतभेद, आक्षेप असू शकतील.  दुसरीकडं खर्गे काँग्रेसचे पक्षाध्यक्ष बनले आहेत. त्यामुळं केवळ त्यांच्यातच नाही तर इथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आणि जोश संचारलाय. मागच्यावेळी निवडणूक आयोगानं २७ मार्च २०१८ ला विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. १२ मे २०१८ ला मतदान आणि १५ मे २०१८ ला मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले होते. आता त्याची पुनरावृत्ती झाली तर येत्या २०-२५ दिवसात निवडणुका घोषित होतील. पण निवडणूक आयोगानं एक वेगळाच फंदा यंदा राबवलेला दिसतो. हिमाचल प्रदेशाला निवडणुकीचा कालावधी दीर्घ दिला होता पण गुजरातमध्ये ३५-३८ दिवसाचा दिला होता. त्यामुळं इथंही कमीतकमी कालावधी दिला जाईल. कारण त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होतो. कर्नाटकात डबल इंजिन सरकार आहे. निवडणूक घोषित होण्यापूर्वीच राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार हे 'ऍक्टिव्ह मोड'वर आलंय. केंद्रीय नेते, प्रधानमंत्री यांचे इथं दौरे सुरू झालेत, आश्वासन, घोषणा दिल्या जाताहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील महाराष्ट्राच्या सीमेवर राहणाऱ्या महाराष्ट्रीय मतदारांना प्रलोभनं दाखवायला सुरुवात केलीय. कर्नाटकात केवळ भाजपच नाही तर काँग्रेस, जेडीएस आणि इतर पक्ष देखील असेच काही फंडे अवलंबताना दिसताहेत. कोणी प्रेशर कुकर देण्याचं आश्वासन देतोय, कुणी भांडी देणार असल्याचं सांगतोय, कुणी एलआयसीचा प्रीमियम देईन म्हणतोय, कुणी तीर्थयात्रेला तिरूपती, शिर्डी वा इतर ठिकाणी नेण्यासाठी सरसावलाय! काँग्रेसनं इथल्या महिला कुटुंबप्रमुखाला महिना २ हजार रुपये देण्याची घोषणा केलीय. लगेचच मुख्यमंत्री बोम्मई यांनी भाजपच्यावतीनं महिलांना महिना ३ हजार रुपये देऊ असं जाहीर केलंय. या अशा गोष्टींना प्रधानमंत्री मोदी हे 'रेवडी' म्हणत असले तरी भाजपला तसं वाटत नाही. पण दुसऱ्या कुणी ते दिलं तर ती मात्र रेवडी ठरते. मोदी प्रत्येक गोष्टींची व्याख्या आपल्या सोयीनुसार करतात. ते अशा जरा कमी लेखतात. मात्र शिक्षण आणि आरोग्याच्या घोषणा या चांगल्यासाठी असतात. विद्यार्थिनींना सायकल ही घोषणा देखील चांगली म्हणावी लागेल. कारण शाळा-कॉलेज जाण्यासाठी ती तिची गरज असते त्यामुळं ते सहाय्यभूत ठरतं. उत्तरप्रदेशात अखिलेश यादव यांनी सुरुवातीला मुलींना लॅपटॉप वाटले पण वरिष्ठांच्या विरोधानंतर ते त्यांनी बंद केलं. प्रधानमंत्री वारंवार असं फुकट वाटणं योग्य नसल्याचं सांगत विरोधकांवर टीकास्त्र सोडतात. इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, कोविडच्या काळात आणि त्यानंतर कुटुंबाचं उत्पन्न घटलंय. त्यांच्या उत्पन्नात अद्याप वाढ झालेली नाही हे प्रधानमंत्रीही मान्य करतात म्हणूनच ते देशातल्या ८० कोटी जनतेला फुकट धान्य वाटताहेत. त्याची गरजही आहे हे मान्यच करावं लागेल!
गेली ५०-५५ वर्षाहून अधिक काळ मी या निवडणुकांच्या राजकारणाशी सक्रिय आहे. आज मात्र एक नवं वळण लागलेलं दिसतं. घोषणा, आश्वासनं एवढंच नाही तर 'रेवडी'च्या ऐवजी मतदार आता थेट पैसे मागताहेत. रोख पैसे द्या! या मागण्यांची पूर्तता करण्यात काँग्रेस वा जेडीएसच्या तुलनेत भाजप सक्षम आहे. कारण भाजपकडं तुम्ही मागाल ती किंमत द्यायला ते तयार आहेत. आमदार, खासदार खरेदीत त्यांचा कुणी हात धरणारा नाही. त्यासाठी कोट्यवधी खर्चायला ते तयार असतात आणि ते देण्यासाठी त्यांचे खास उद्योगपतीही सज्ज असतात. त्यामुळं इथं पैशाचा वापर मोठ्याप्रमाणात होण्याची शक्यता आहे. पण इथं भाजपची अँटीइनकंबन्सी दिसून येतेय. याशिवाय इथल्या भाजप सरकारवर एक ठप्पा लागलाय की, हे सरकार '४० टक्क्याचं सरकार' आहे. म्हणजे कोणत्याही कामासाठी ४० टक्के कमिशन द्यावं लागतं, असा आरोप होतोय. एक भाजपचे आमदार आहेत विरुपाक्षप्पा, त्यांच्या मुलाला ४० लाख रुपये लाच घेताना लोकायुक्तांनी पकडलंय. वडिलांच्या घरी धाड टाकली तर तिथं ८ कोटी रुपयांची रोकड मिळालीय असो.

कर्नाटकात विधानसभेच्या २२४ जागा आहेत. इथल्या ३१ जिल्ह्यांपैकी १४ जिल्ह्यात ११० तर १७ जिल्ह्यात ११४ जागा आहेत. त्यापैकी बंगळुरू अर्बन, बेळगावी, टूमकुर आणि म्हैसूर या चार जिल्ह्यातच ६८ जागा आहेत. मागच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांची टक्केवारी थोडी जास्त होती. त्यांच्या २८ जागा या १० हजाराहून कमी मतांनी पडल्यात. आळंदसारख्या मतदार संघातून बी.आर.पाटील केवळ ६९७ मतांनी पराभूत झाले होते. भाजपनं ३० जागा या १० हजाराहून कमी मतांनी गमावल्या होत्या. या ५८ जागा जिथं मतांमध्ये १ टक्का मतांचा जरी फरक पडला तरी सदस्य संख्येत मोठा बदल होऊ शकतो. उडुपी, हसन, कोडगू आणि मांड्या या चार जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. भाजपनला चिक्कबल्लापुर, कोलार, बंगळुरू रुरल, मांड्या आणि रामनगर इथं एकही जागा जिंकता आलेली नव्हती. दोन जिल्ह्यात जेडीएसन मांड्यात सातपैकी सात, हसनमध्ये सहाच्या सहा म्हणजे सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. भाजपनं उडुपीतल्या पाचच्या पाच जागा जिंकल्या होत्या. इथं आता महत्वाचं आहे की, जेडीएस प्रामुख्यानं विरोधीपक्षाची भूमिका वठवीत असतो. त्यांची मतं कमी झाल्यास ती कुणाकडं वळतील काँग्रेस की, भाजप हे पाहणं महत्वाचं आहे. इथं शेड्युल कास्टच्या ३३ जागा आहेत आणि शेड्युल ट्राईबच्या १४ आहेत. काँग्रेस पक्षाध्यक्ष बनलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडं केवळ कर्नाटकातलेच नव्हे तर देशभरातले मागासवर्गीय आपलेपणानं पाहताहेत. शेड्युल कास्टच्या ३३ पैकी १६ जागा भाजपकडं होत्या. काँग्रेसकडं १०, जेडीएसकडं ६ तर बीएसपीकडं १ जागा होती. या ३३ पैकी १६ जागा पुन्हा भाजप राखू शकेल का? शेड्युल ट्राईबच्या ५ जागा भाजपकडं तर काँग्रेसकडं ८ जागा होत्या. त्या ते राखतील का हेही महत्वाचं आहे.

काँग्रेसकडं राज्याचं नेतृत्व करू शकणारे तीन प्रभावी नेते आहेत. सिद्धरामय्या हे त्यापैकी एक आहेत. म्हैसूरमधून ते निवडून येतात. ते पेशानं वकील आहेत, पूर्वी शिक्षक म्हणूनही कायद्याचे विषय ते शिकवीत असत. १९८३ मध्ये म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी ते पहिल्यांदा आमदार बनले. एवढा मोठा अनुभव त्यांच्याजवळ आहे. २००५ मध्ये जेडीएसमधून त्यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आठ निवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत तर तीनदा त्यांचा पराभव झालाय. त्यांचं प्रदीर्घ राजकीय जीवन राहिलंय! दुसरे डी. के. शिवकुमार, हे बंगळुरू रुरलमधून निवडून येतात. ते वक्कलिंग समाजाचे आहेत. १९८९ पासून सातवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांना ३४ वर्षाचा विधिमंडळ कामकाजाचा अनुभव आहे. एकाही निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला नाही. मल्लिकार्जुन खर्गे यांना ५० वर्षाहून अधिक काळ निवडणुकीच्या राजकारणाचा अनुभव आहे. भाजपकडं प्रधानमंत्री मोदी लिंगायत समाजाची व्हॉटबँक आपल्याकडं खेचण्याचा प्रयत्न करताहेत! विद्यमान मुख्यमंत्री बोम्मई हे लिंगायत आहेत. हे बोम्मई पूर्वाश्रमीचे जनता दलाचे, आज ते भाजपत आहेत. १९९८ ते २००८ सतत १० वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य होते. विधानसभेत ते प्रथम २००८ मध्ये निवडून आले. मात्र काँग्रेसच्या या प्रदीर्घ अनुभवी दिग्गजांसमोर बोम्मई हे खुजे ठरतात. विधानसभेच्या निवडणुकांचा त्यांचा अनुभवही तोकडा ठरतो. एडीयुरप्पा हे वरिष्ठ लोकप्रिय लिंगायत नेते
त्यांना हटवून बोम्मई यांना मुख्यमंत्रीपदावर बसवल्यानंतर लिंगायत समाजातला एक वर्ग नाराज झालाय. त्यामुळं इथं असं वातावरण आहे की उदासीन बनलेले एडीयुरप्पा पूर्वी इतक्या जोमानं प्रचार करणार नाहीत. पण भाजप नेते असं बिंबवताहेत की, सारे लिंगायत आमच्या सोबत आहेत. काँग्रेसकडं तीन लिंगायत नेते आहेत, एम.बी.पाटील तरुण आणि मंत्रिपद भूषवलेले, मोठा राजकीय वारसा त्यांना आहे. दुसरे इशब खांदवे हे जुने जाणते नेते आहेत. तिसरे ९२ वर्षाचे शामानुरा हे विद्यमान आमदार आहेत. येणारी निवडणूक ते पुन्हा लढवणार आहेत. ऑल इंडिया वीरशैव महासभा ही लिंगायतांची संघटना आहे त्यांचे ते अध्यक्ष आहेत. जरी म्हटलं जातं असलं तरी, संपूर्ण लिंगायत समाजावर मोदींची, भाजपची पकड आहे. मात्र तशी वस्तुस्थिती नाही.
भाजपचा 'दक्षिणायना'ला  कशी संधी मिळाली या मागचा इतिहास अत्यंत रंजक आहे. १९९०-९१ मध्ये समाजवादी जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर हे प्रधानमंत्री होते. त्यांच्या सरकारला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा होता. या दोन्ही पक्षांची काही राज्यात सरकारं होती. समाजवादी जनता पार्टीचं सरकार उत्तरप्रदेशात मुलायमसिंग यांच्या नेतृत्वाखाली होतं. हरियाणात ओमप्रकाश चौटाला आणि गुजरातेत चिमणभाई पटेल अशी तीन राज्यात त्यांची सरकारं होती. काँग्रेसची आंध्रप्रदेशात चन्ना रेड्डी, कर्नाटकात वीरेंद्र पाटील आणि महाराष्ट्रात शरद पवार अशी तीन सरकारं होती. गुजरातच्या समाजवादी जनता पार्टीच्या चिमणभाई पटेलांना फोडण्याचा प्रयत्न राजीव गांधी करत होते. काँग्रेसचे शरद पवार, वीरेंद्र पाटील आणि चन्ना रेड्डी यांचे प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्याशी घनिष्ठ मित्रत्वाचे संबंध होते. या तीनही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून काँग्रेसला फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. अशी चर्चा त्यावेळी होती. या तीनही मुख्यमंत्र्यांचा कधी मुलायमसिंग यांच्या माध्यमातून तर कधी थेट चंद्रशेखर यांच्याशी संपर्क होत असे. म्हणजे दोन्हीही बाजूनं तेव्हा एकमेकाबाबत अविश्वासाचं वातावरण होतं. अशाच अविश्वासामुळं राजीव गांधींनी आंध्रप्रदेशच्या चन्ना रेड्डी आणि कर्नाटकाच्या वीरेंद्र पाटील यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवलं. तिसरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांना हटवण्याचा प्रयत्न झाला पण त्यांचा तो डाव उलटला. कर्नाटकाच्या वीरेंद्र पाटलांना राजीव गांधींनी तर विमानतळावरूनच मुख्यमंत्रीपदावरून हटविण्याचं फर्मान जारी केलं होतं. त्यावेळी वीरेंद्र पाटील हे कर्नाटकातले अत्यंत प्रभावशाली लिंगायत समाजाचे नेते होते. केवळ लिंगायतच नाही तर इतर समाजावरही त्यांची पकड होती. कर्नाटकात लिंगायत समाज हा १७ टक्के इतका आहे. त्यांच्यावर इथल्या मठांचा मोठा प्रभाव आहे. राज्यात लिंगायत समाजाचे पाचशेहून अधिक मठ आहेत. जसं वीरेंद्र पाटलांना हटवलं गेलं तसं भाजपच्या लालकृष्ण अडवाणी, गोविंदाचार्य यांनी संधी साधली. त्यांनी या मठांचं राजकारण करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बी.एस.एडीयुरप्पा यांना पुढं केलं. एडीयुरप्पा हे मठांशी संबंधित असल्यानं त्यांचं समाजातही वर्चस्व होतं. त्यापाठोपाठ राममंदिर आंदोलनाच्या माध्यमातून आणखी काही लोक भाजपशी जोडले गेले. हुबळीत इदगाह मैदानावर उमा भारती यांच्या राष्ट्रध्वज फडकविण्याच्या प्रकारानंतर इथं हिंसक दंगली उसळल्या. यामुळं भाजपचा जनाधार वाढला. तरी देखील भाजपला १९९४ च्या विधानसभा निवडणुकीत अपयश आलं, मात्र प्रमुख विरोधीपक्ष म्हणून भाजप पुढे आला. त्यांना कर्नाटकात विधानसभा का जिंकता आली नाही ते पाहू या. १९९४ च्या नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या. भाजपनं प्रचारात आघाडी घेतलेली होती. दरम्यान जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस.आर.बोम्मई, ज्यांचे चिरंजीव जे आज कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आणि रामकृष्ण हेगडे यांनी एक मोठा डाव टाकला. एस.आर. बोम्मई हे लिंगायत समाजाचे होते पण ते त्यातल्या कनिष्ठ स्तराचे नेते होते. लिंगायत हा एक पंथ आहे त्यातही उच्च आणि कनिष्ठ असे प्रकार आहेत. बोम्मई तसे लिंगायत समाजाच्या फारसे जवळ नव्हते पण त्याचं राजकारण हे जमिनीवरचं राजकारण होतं. सर्व थरातल्या लोकांशी त्यांचे संबंध होते. ते विद्वान, इंटलेक्च्युअल होते. रामकृष्ण हेगडे राज्यात खूप लोकप्रिय होते. पण ते ब्राह्मण समाजाचे होते. भारतात जे संगणक युग आणलं ते राजीव गांधींच्याही आधी हेगडेंनी आणलं होतं. कॉम्प्युटर क्रांतीची सुरुवात १९८३ मध्ये हेगडेंनी केली म्हणूनच आज बंगळुरूला 'सिलिकॉन व्हॅली' म्हटलं जातं. या नेत्यांनी प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या समाजवादी जनता पक्षाचे खासदार, कर्नाटकातले अत्यंत प्रभावशाली वक्कलिंग समाजाचे एच.डी. देवेगौडा यांना फोडून जनता दलात आणलं. त्यानंतर देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली आणि बोम्मई-हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनता दलानं विधानसभेच्या निवडणूका लढवल्या आणि स्पष्ट बहुमत मिळवलं. वक्कलिंग समाजाचे देवेगौडा मुख्यमंत्री तर लिंगायत समाजाचे नेते जे.एच. पटेल उपमुख्यमंत्री बनले. दीडवर्षानंतर देवेगौडा प्रधानमंत्री बनले तेव्हा जे.एच. पटेल मुख्यमंत्री बनले. इथूनच भाजप आणि एडीयुरप्पा यांचा सत्तेत येण्याचा मार्ग अवरुद्ध झाला. दरम्यान जनता दलाचं विभाजन झालं मुख्यमंत्री जे.एच.पटेल हे जॉर्ज फर्नांडिस यांच्या जनता दल युनायटेड पक्षात सामील झाले. वाजपेयींच्या सत्ताकाळात जॉर्ज फर्नांडिस हे एनडीएचे सर्वेसर्वा होते. संपूर्ण भाजप त्यांच्यासमोर नतमस्तक होत असे. तेव्हा लोक त्यांना 'सुपर पीएम' म्हणत. १९९९ साली लोकसभा निवडणुकांबरोबर कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात भाजप जनता दल युनायटेड पक्षाची युती झाली, पण त्यांच्यात एकवाक्यता नव्हती. लिंगायत समाजाचे जे.एच.पटेल मुख्यमंत्री बनल्याने एडीयुरप्पा यांचा प्रगतीचा आणि मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग रोखला गेला होता! त्यांचा अंतर्गत विरोध पटेलांना झाला. दरम्यान सोनिया गांधी यांनी बेल्लारी मधून लोकसभेची निवडणूक लढविण्याचं जाहीर केल्यानं वातावरण बदललं काँग्रेसचं मनोबल वाढलं. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आली, त्यानंतर तब्बल नऊ वर्षे भाजपला सत्तेसाठी प्रतीक्षा करायला लागली. पण भाजपचा रस्ता खुला झाला तो २००८ मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रर्रचनेनंतर-परिसीमनानंतर! या परिसीमनानंतर शहरी मतदारसंघ वाढले. ग्रामीण मतदारसंघ कमी झाले. बंगळुरू शहरात १४ च्या जागी २८ मतदारसंघ बनले. १९७४ नंतर तब्बल ३४ वर्षानं देशातल्या मतदारसंघाची पुनर्रर्रचना-परिसीमन झालं होतं. गावं ओस पडली, शहरं विस्तारली. ६० च्या दशकात पुण्याहून छोटं असलेलं बंगळुरू शहर आज पुण्याहून तिप्पट मोठं झालंय. या शहरीकरणामुळं शहरी पक्ष असलेल्या भाजपला २००८ च्या निवडणुकीत कर्नाटकात स्पष्ट बहुमत मिळालं, आणि त्यांचं सरकार अस्तित्वात आलं. दक्षिणेकडे त्यांनी कूच केली, असो.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Monday 6 March 2023

स्वबळाची उबळ परिवर्तनासाठी घातक...

कसब्यातल्या विजयामुळं काँग्रेसपक्षात चैतन्य निर्माण झालंय. राहुल गांधींची 'भारत जोडो' पदयात्रा, मल्लिकार्जुन खरगे यांची निवड, संसदेतला आक्रमकपणा,जनमानसात वाढलेली प्रतिमा या साऱ्या घडामोडीनं काँग्रेसचं अस्तित्व जाणवू लागलंय. पूर्वेकडंच्या तीन राज्यात शून्यातून आठ जागा मिळवल्या आहेत. तीन पोटनिवडणुकीतल्या कसबा आणि एरोड या दोन जागी यश मिळवलंय. हे सारे शुभसंकेत आहेत. पण या यशानं काही नेत्यांना स्वबळाची उबळ आलीय. ती रोखायला हवीय. संविधान वाचविण्यासाठी जी मंडळी उभी ठाकलीत. त्यांना गोंजारून आपलंसं करायला हवंय. प्रसंगी नमतं घेऊन इतरांना जवळ करायला हवंय. आज लोकसभेत काँग्रेसचं अस्तित्व नाममात्र आहे. हे बदलायचं असेल तर  २०२४ ला सर्व विरोधक भक्कमपणे एकवटायला हवेत. तरच देशात परिवर्तन होईल अन्यथा नाही! विरोधकानी एकत्र येत ईडी, सीबीआयबाबत प्रधानमंत्र्यांना पत्र दिलंय पण काँग्रेस, नितीशकुमार, स्टॅलिन यांच्या सह्या नाहीत. याचा अर्थ तिसरी आघाडी तर उभी राहत नाही ना! तसं झालं तर भाजपला सत्तेचा मार्ग सोपा जाईल!"
------------------------------------------------------
*इं*दिरा गांधींची सत्ता गेली, ती त्यांनी लादलेल्या आणीबाणीमुळं. राजीव गांधींची खुर्ची गेली ती बोफोर्स खरेदीत घोटाळा झाल्यानं. वाजपेयींची खुर्ची गेली ती कॅफिनपासून तहलकापर्यंतच्या घोटाळ्यानं, त्यानंतर त्यांची शायनिंग इंडियाची घोषणा देखील कुचकामी ठरली. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात टूजी स्पेक्ट्रम, कोळसा, कॉमनवेल्थ, आदर्श असे अनेक घोटाळे झाले; त्यामुळं सत्ता गेली. म्हणजे सत्तेच्या विरोधात एखादा घोटाळा उघड झाला तर जनता त्याला सत्तेपासून हटवते. असा इतिहास आहे. पण सध्याच्या सत्ताकाळात एकापाठोपाठ एक मुद्दे समोर येताहेत. अदानीचा घोटाळा समोर आला असताना अघोषित आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय अशी टीका काँग्रेसनं केलीय. त्यातच बीबीसींवर आयकर खात्याचा छापा पडलाय अशावेळी सत्तेची खुर्ची गदगदा हललीय का? अशी कोणती स्थिती निर्माण झालीय की, जिथं सारे विरोधीपक्ष दिसेनासे झालेत. म्हणजे यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधीपक्षानं आंदोलन केलं तेव्हा जनता त्यांच्यामागे उभी राहिलीय. विरोधक जेव्हा मुद्दे घेऊन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले तेव्हा जनता त्यांच्यासोबत आली. पण आज तशी स्थिती दिसत नाही. मोदीसत्तेची कमाल ही आहे की, प्रत्येक निवडणूक जिंकण्याची किमया त्यांच्यात आहे. खुद्द प्रधानमंत्री मोदी छोट्यातल्या छोट्या निवडणुकीतही प्रचारासाठी जातात आणि जनतेला हे समजावून सांगतात की, सध्याच्या स्थितीत त्यांच्याहून कार्यक्षम आणि सक्षम असा नेता विरोधकांकडं नाही. तुम्ही विरोधकांना हात दिला तर, तो हात दूर सारण्यासाठी त्यांच्याकडं संवैधानिक वेगवेगळी हत्यारं आहेत, तपास यंत्रणा आहेत, मनभावन अशा घोषणा आहेत. कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लोकांच्या खात्यात थेट जमा होणारी रोख रक्कम हे एक मोठं शस्त्र आज भाजपकडं आहे! अदानीच्या घोटाळ्यातून शेअरबाजारात दाणादाण उडाली असली तरी सत्तेला त्यातून धक्का लागलेला नाही. संसदेत विरोधकांनी गोंधळ घातला पण संसदेचं कामकाज थांबलं तसा विरोधकांचा गोंधळही थांबला. मग बीबीसीच्या डाक्युमेंटरीवरून गोंधळ उडाला. त्यात गुजरातच्या दंगलीवरून मोदींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं. त्या डाक्युमेंटरीवर बंदी घालण्यापासून आयकर खात्याचे छापे बीबीसी कार्यालयांवर घातले गेले. त्यासाठी 'सर्व्हेक्षण' हा गोंडस शब्द वापरला गेला. सतत दोन दिवस हे सारं चाललं होतं. देश आणि विदेश पातळीवर याच्या बातम्या आल्या पण सरकारच्या कपाळावर एकही रेषा उमटली नाही, प्रश्न असा पडतो की देशातली लोकशाही केवळ निवडणुका जिंकण्यासाठीच आणि त्या जिंकल्यानंतर आपल्या राजकीय मतांनुसार धोरणं आखून ती राबवणं एवढंच आहे का? मग विचार करा २०२४ च्या निवडणुकीनंतर काय काय होईल! येणारं सरकार कोणते निर्णय घेईल याचा विचार करा. एक चित्र आपल्यासमोर आणू इच्छितो की, विरोधीपक्ष त्यातही काँग्रेस अशी टीका करत असते की, सध्याचं मोदी सरकार हिंदू-मुस्लिम असा वाद निर्माण करतेय. पण इथं हे नमूद करायला हवं की, मुस्लिमबहुल हिंदी भाषेच्या पट्ट्यातून काँग्रेस गायब झालीय! केवळ गायब झाली नाही तर त्यांचा सुपडासाफ झालाय. या हिंदीपट्ट्यातल्या लोकसभेच्या ३१६ जागांपैकी फक्त १० जागी काँग्रेसचं अस्तित्व आहे. देशातल्या सर्वांत मोठ्या विरोधीपक्षाची ही अवस्था आहे. तर मग आगामी निवडणुकीत भाजपच्या विरोधात कोण, कसा, उभा राहू शकतो? निवडणुकीत तो टिकणार आहे की नाही?

पूर्वेकडील त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यात निवडणूका झाल्या. या तीनही राज्यात भाजप आणि मित्रपक्ष संगमा यांच्या पक्षाची सत्ता आलीय. प्रधानमंत्री मोदी थेट संसदेतून प्रचारासाठी, मतं मागण्यांसाठी तिकडं गेले. त्यांना माहीत आहे की, देशात अदानी घोटाळ्यानं वातावरण बिघडलेलं आहे, बीबीसींवर छापा टाकून देशातल्या प्रसिद्धीमाध्यमांवर आसूड ओढला गेलाय. त्यावर मात्र ते कधी व्यक्तच झाले नाहीत. आपण आधी भाजपची व्युहरचना, रणनीती समजावून घेऊ, मग काँग्रेसच्या धोरणाकडं वळू! २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत विरोधीपक्षाचं अस्तित्व दिसलं नाही. विरोधकांना आव्हान देताना इतर कुणी नाही तर भाजप ठामपणे उभी आहे. अदानी प्रकरणात गृहमंत्र्यांनी आपल्या मुलाखतीत 'आम्ही कुठे काय लपवतोय, आम्ही सांगणार तरी काय? हे प्रकरण आता न्यायालयात गेलंय!' किंवा बीबीसीबाबत भाजपचे प्रवक्ते खुलेआमपणे 'ती एक सर्वांत भ्रष्ट संस्था आहे!' असं म्हणतात, तेव्हा विरोधीपक्ष त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत. मघाशी म्हटलं त्या हिंदी भाषिक पट्ट्यात भाजप आपल्या स्वतःच्या ताकदीवर उभा आहे. इथल्या जवळपास १९९ म्हणजे दोनशे जागी भाजप स्वतंत्रपणे लढतेय. तिथं काँग्रेसदेखील आपल्या ताकदीवर लढतेय. याशिवाय इथं काही प्रादेशिक पक्षही आहेत. उत्तरप्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत, झारखंडमध्ये १४ जागा, मध्यप्रदेशातल्या २९, हरियाणात १०, दिल्लीत ७, उत्तराखंड ५, हिमाचल प्रदेशात ४, राजस्थानात २५, आसाम १४, छत्तीसगड ११ अशा एकूण १९९ लोकसभेच्या जागा आहेत. २०१९ मध्ये भाजपनं यापैकी १६९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळं इथं विरोधकांचं अस्तित्व कितपत आहे हे आपल्याला दिसून येईल. ज्या तीन राज्यात भाजपनं युती केली होती ती युती आज मोडीत निघालीय. बिहारमध्ये नितीशकुमार यांची जेयुडी, पंजाबमध्ये अकाली दल, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना हे भाजपसोबत नाहीत! महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या ४८ जागा, बिहारच्या ४० आणि पंजाबच्या १३ अशा एकूण १११ यापैकी ४२ जागा भाजपनं जिंकल्या आहेत. आज युती अस्तित्वात नसल्यानं या ४२ जागा पुन्हा भाजप जिंकेल का असा प्रश्न उपस्थित होतो. जिथं प्रादेशिक पक्षाची सत्ता आहे अशा पश्चिम बंगाल, ओरिसा आणि तेलंगणा, यापैकी तेलंगणात १७, ओरिसात २१ आणि पश्चिम बंगालमध्ये ४२ जागा आहेत. या एकूण ८० जागांपैकी तिथं सत्ताधारी प्रादेशिक पक्षांशी लढत देत भाजपनं ३० जागा जिंकल्यात. तिथं तृणमुलच्या ममता बॅनर्जी, बिजू जनता दलाचे नवीन पटनायक आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव यांची सत्ता आहे! हे सारे भाजपसमोर यापूर्वीही उभे ठाकलेले होते; तसे ते आजही आहेत. त्यामुळं इथं फारसा फरक पडेल अशी शक्यता नाही. याशिवाय तीन राज्ये अशी आहेत जिथं भाजपला एकही जागा मिळालेली नाही. केरळ, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश! या तीन राज्यात ८३ जागा आहेत. आंध्रप्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसनं इथल्या सर्वच्या सर्व २५ जागा जिंकल्यात. तामिळनाडूतल्या डीएमकेनं ३० जागा जिंकल्या तर केरळात २५ जागा काँग्रेसनं जिंकल्यात. दक्षिणेतल्या चारपैकी एका राज्यात म्हणजे कर्नाटकात भाजपनं २८ पैकी २५ जागा भाजपनं जिंकल्यात. तिथं भाजपनं प्रचाराला आतापासूनच सुरुवात केलीय. काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे हे कर्नाटकातले आहेत. त्यामुळं तिथं त्यांच्या प्रतिष्ठेला आव्हान आहे.

राहुल गांधी यांनी केरळातून 'भारत जोडो' यात्रा सुरू केली आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता काँग्रेसच्या काही नेतेमंडळीना स्वबळाची उबळ आलीय. लोकसभेच्या निवडणुका या कुणालाही साथीला न घेता लढणार असल्याचा वलग्ना ते करताहेत. उत्तरेकडं ३३६ जागा येतात, उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, ओरिसा हा सारा हिदीभाषकांचा भाग समजला जातो. इथं काही प्रादेशिक पक्षाचं प्राबल्यदेखील आहे. पण आपण विचार करतो आहोत ते काँग्रेसचा इथं एकूण ३३६ जागा येतात. या हिंदी पट्ट्यातून आजवर सारे प्रधानमंत्री इथूनच निवडून आलेले आहेत. त्या काँग्रेसला इथं केवळ १० जागा मिळालेल्या आहेत. उत्तरप्रदेश १, बिहार १, मध्यप्रदेश १, झारखंड १, महाराष्ट्र १ ओरिसा १, पश्चिम बंगाल २, छत्तीसगड २, तर दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड या चार राज्यात एकही जागा काँग्रेसला जिंकता आलेली नाही. मग यातून काय संदेश जातोय. ज्या भागातून हिंदू-मुस्लिम वादाची चर्चा आहे त्या हिंदी भाषकाच्या पट्ट्यात काँग्रेसचं अस्तित्वच दिसत नाही. काँग्रेस मुस्लिमांची बाजू घेऊन लढते असं म्हटलं जातं, त्यामुळं तिथं भाजपला यश मिळतं. अन काँग्रेस पराभूत होते. त्यामुळं आता काँग्रेसनं हिंदीपट्ट्यातल्या प्रादेशिक पक्षांना सोबत घ्यायला हवंय. मात्र काँग्रेसचे नेते त्यांना दूर सारताहेत. देशातलं राजकीय वातावरण लक्षांत घेऊन काँग्रेसनं प्रसंगी नमतं घेऊन साऱ्यांना जवळ करायला हवंय, पण तसं होत नाही. नेत्यांचा इगो इथं आडवा येतो. सरकारनं निवडणुकीची तयारी चालवलीय. जिथं निवडणूक होणार आहेत तिथले राज्यपाल बदललेत. निवृत्त न्यायाधीशांना राज्यपाल केलंय. याशिवाय देशातले जे प्रमुख मुद्दे आहेत, जसे की बेरोजगारी, महागाई, मूलभूत सुविधा, शिवाय सरकारच्या मालकीच्या संस्था विकताना सत्ताधाऱ्यांना त्याचं काहीही वाटत नाही. वैषम्य तर सोडाच पण साधं वाईटही वाटत नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी, नेहरूंच्या काळातला मुंद्रा घोटाळा, बिगबुल हर्षद मेहताचा घोटाळा अशा घोटाळ्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पण या स्थितीचा फायदा घ्यायला विरोधीपक्ष सक्षम दिसत नाही. त्यांना वातानुकूलित कार्यालयात बसणं श्रेयस्कर वाटतंय. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची, जनतेला बरोबर घेण्याची त्यांची मानसिकताच दिसत नाही. पक्ष संघटनेच्या गाव, पंचायत, शहर, बूथ पातळीवर अशीच सगळीकडे नैराश्येची स्थिती कायम आहे. भाजपच्या सुनियोजित संघटन शक्तीला आव्हान देऊ शकेल असा आवाज शिल्लकच राहिलेला दिसत नाही; जो काही होता तोही आताशी क्षीण झालाय. सीबीआय, ईडी, आयटी, सीएजी, ह्या साऱ्या सरकारी तपास यंत्रणा, साऱ्या संवैधानिक संस्था, राज्यपाल एवढंच नाही तर निवडणूक आयोग यांचा सत्ताधाऱ्यांनी एखाद्या हत्यारासारखा वापर विरोधकांवर सुरू केलाय. आतातर न्यायाधीशांच्या नेमणुकातही हस्तक्षेप केला जातोय. देशाचे कायदामंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशामध्ये वाद निर्माण झालाय. उपराष्ट्रपतींनी देखील न्यायाधीशांशी पंगा घेतलाय. या साऱ्या वातावरणात देशातलं राजकारण कुंद बनलंय. विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभं राहण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत. राहुल गांधी जोवर पदयात्रेत चालत होते तोवर काँग्रेसचं अस्तित्व जाणवत होतं. त्यांची पावलं थांबली, पाठोपाठ काँग्रेसची सक्रियताही थांबली. विरोधीपक्षाचं आणि जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन उभं राहू शकत नसेल, तर मग मोदींचा पराभव कोण कसा करणार? भाजपनं आपल्या ८-९ वर्षाच्या कार्यकाळात सगळ्या स्वायत्त संस्था, संवैधानिक संस्था यांना सरकारच्या तालावर नाचावं लागेल, हे दाखवून दिलंय. सरकारच्या या एकाधिकारशाहीला मग अघोषित आणीबाणी म्हणोत नाहीतर तानाशाही म्हणोत! सत्ताधाऱ्यांना त्याची फिकीर नाही. त्यांना जो काही संदेश सरकारच्या अधिपत्याखालील संस्थांना द्यायचा आहे तो व्यवस्थितरीत्या संबंधितांकडे पोहोचवला आहे. शिवाय सत्ताधारी भाजप आणि मोदींनी आपल्या कार्यकाळात जे काही मुद्दे हाताळले, किंबहुना ज्याची चुणूक देशवासियांनी अनुभवली होती, ते जनतेपुढं मांडले गेले, पण त्याची अंमलबजावणी केली नाही असे सारे मुद्दे, त्याचा अंमल आगामी काळात होण्याची शक्यता आहे. पण राजकीय पातळीवर भाजपचा पराभव करण्याची ताकदच गायब झाली असेल तर मग हिंदूमुस्लिमचा मुद्दा असो, साधुसंतांचा गोंधळ असो वा प्रधानमंत्र्यांचा मंदिर मंदिर प्रदक्षिणा घालत फिरणं असो, मंदिरातली पूजाअर्चा, अभिषेक, ध्यानसाधना त्याचे फोटो, त्याचं दूरचित्रवाणीवर थेट प्रक्षेपण असो. या साऱ्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षाची भूमिका कुंद बनलेली आहे. त्याला याच्या विरोधात काय आणि कसं राजकारण करायचं हेच विरोधकांना समजू शकलेलं नाही. देशातल्या या स्थितीच्या विरोधात उभं राहण्यासाठी, आंदोलन करण्याची कल्पकता, हिंमत आणि हुन्नर विरोधकांमध्ये नसेल तर दोनच गोष्टी जाणवतात. विरोधीपक्षातल्या नेत्यांकडं नैतिक बळ दिसून येत नाही, कारण जिथं आज भाजप आहे तिथं पूर्वी काँग्रेस राहिलेली आहे. त्यामुळं ते त्या पिंजऱ्यात भाजपला उभं करू शकत नाहीत. सत्ता राबविण्याच्या पद्धती मग त्या ममता बॅनर्जी, केजरीवाल वा चंद्रशेखर राव असो ती हुकूमशाही, एकाधिकारशाहीची आहे जशी की नरेंद्र मोदी यांची आहे. ज्यांचा ते विरोध करतात. अशावेळी भाजपच्या विरोधात जिथं जिथं प्रादेशिक पक्षाचं प्राबल्य आहे, तिथं अशा नेत्यांना आपला मानापमान दूर ठेऊन एकत्र आणायला हवंय. पण या साऱ्या संघशक्तीतून आपण कसे मजबूत होऊ हे प्रत्येकाकडून पाहिलं जातेय, तेच विरोधकांना घातक ठरणारं आहे. मग प्रत्येकजण हा एकटा पडणार आहे. अशावेळी सत्ताधारी भाजप जनतेला बरोबर घेतेय. जिथं लोकार्षक, मनभावन घोषणा आहेत. प्रचार, प्रसिद्धीसाठी आजवर सात हजार कोटी खर्ची पडलेत, आता त्याहून अधिक खर्ची टाकले जातील. साथसंगतीला प्रसिद्धीमाध्यमं आहेतच. स्वायत्त, संवैधानिक संस्था सोबत आहेत. मग बीबीसींवरचे छापे असोत, अदानीमुळं शेअरबाजार कोलमडला असो, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था अडचणीत आल्या तरी सरकार ढिम्म आहे. विरोधकही गप्पगार पडलाय. २०२४ च्या निवडणुक काळात अशीच स्थिती राहिली तर संघाचे, भाजपचे राहिलेले मुद्दे ऐरणीवर आणले जातील ज्याची चुणूक आज जाणवतेय. विरोधकांचा हुंकार नाहीसा झालाय, जे लोक आपापल्या पातळीवर मुद्दे उचलताहेत त्यात पत्रकार आहेत, वकील आहेत, विचारवंत आहेत, समाजसेवक आहेत, जागरूक नागरिकही आहेत ते अगदी टोकदारपणे प्रश्न उपस्थित करताहेत पण विरोधीपक्षाची मंडळी याबाबत मौन बाळगताहेत. कारण त्यांना हे माहीत आहे की, राजकारण हा एक हमामखाना बनलाय उद्या तिथं आपल्याला आज ना उद्या जावं लागणार आहे अन नागडं व्हावं लागणार आहे. अशावेळी २०२४ च्या निवडणूक काळात विरोधकांची स्थिती पाहता आज भाजपनं मिळवलेल्या ३०० जागा ह्या कमी तर वाटणार नाहीत ना? असो!
- हरीश केंची
९४२२३१०६०९
चौकट
*पूर्वीकडील १७९ पैकी केवळ ४६ जागा भाजपला*
देशातलं राजकीय वातावरण बदलाच्या दिशेनं वाटचाल करतेय. पूर्वीकडंची तीन राज्ये ही आजवर नेहमीच दिल्लीत ज्यांची सत्ता असेल त्यांच्या बाजूनं उभी असतात. २०१८ मध्ये या तीन राज्यात काँग्रेस कुठंच नव्हती. आज आठ ठिकाणी काँग्रेसला यश मिळालंय. मेघालयातल्या ५९ जागापैकी भाजप २ ठिकाणी, त्रिपुरात ६० जागापैकी भाजप ३२, नागालॅंडमध्ये ६० जागापैकी भाजप १२ अशा १७९ जागांपैकी केवळ ४६ जागांवर भाजपनं यश मिळवलंय तर १३३ जागांवर भाजपला पराभव स्वीकारावा लागलाय! या तीन राज्यात लोकसभेच्या केवळ ५ जागा आहेत तरीही तीन राज्यात मोदींची जादू चालली असं महिमामंडन केलं जातंय. जिथं काँग्रेसचा मागच्या विधानसभा निवडणुकीत सुपडासाफ झाला होता तिथं आता कॉंग्रेसला निदान ८ जागा मिळाल्यात, तसंच झालेल्या तीन पोटनिवडणुकांपैकी दोन जागा काँग्रेसनं जिंकल्यात एक आपल्या कसब्याची तर दुसरी तमिळनाडूतल्या एरोडची! त्यामुळं २०२४ चा खेळ नक्की आव्हानात्मक असेल! ईशान्येतल्या राज्यांत २०१४ मध्ये केंद्रातली सत्ता हाती आल्यानंतर भाजपनं तिथं बस्तान बसवलं. ते बस्तान पसरलंय की तेवढंच आहे हे आकडे सांगू शकतात. २०१८ आणि २०२३ ला या ३ राज्यात मेघालयात २०१८ ला २ जागा मिळाल्या होत्या, २०२३ ला त्या तितक्याच म्हणजे २ च जागा मिळाल्यात. नागालँडमध्ये २०१८ ला १२ जागा मिळाल्या होत्या. त्या २०२३ ला १२ च राहिल्यात. त्रिपुरात २०१८ ला ३६ जागी यश मिळालं होतं ते आता २०२३ ला ३२ वर आल्यात. म्हणजे ४ जागा कमी झाल्यात. असं जरी असलं तरी या तीनही राज्यात भाजप सत्तेवर आहे!

Saturday 4 March 2023

गैरो पे करम, अपनो पे सितम...!

"अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या पुण्यातल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झालाय. हा शहरातला मध्यभाग जिथं भाजपचं वर्चस्व आहे. गेली ३० वर्षे इथं भाजपचा झेंडा फडकतोय. 'दीपक' पासून 'कमळा' पर्यंत सतत पाठीशी राहीलेला मतदार 'हाता'शी जोडला गेलाय. ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. 'लिटमस टेस्ट' होती. त्यासाठी जीव तोडून प्रयत्न झाला. पण निष्ठावंताना दूर सारून सत्तेचा मलिदा लाटणाऱ्यांच्या हाती प्रचाराची सारी सूत्रं सोपविल्यावर दुसरं काय होणार? केंद्रीय गृहमंत्र्यांपासून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी तळ ठोकून गल्लीबोळातून रोडशो केला. अख्ख मंत्रिमंडळ सारी यंत्रणा इथं राबवत होती. श्रीमंतीची सारी लक्षणं होती पण पक्षाचा जिवंत आत्मा असलेला निष्ठावंत कार्यकर्ता हरवला होता. सत्तेची फळं चाखणाऱ्या लोकांच्या हाती पक्षाची सूत्रं गेल्यावर मग असंच होणार! आता तरी शहाणं व्हायला हवंय. बाजारबुणग्यांना दूर सारून निष्ठावंताना पोटाशी धरा. अन्यथा कसब्याच्या पुनरावृत्ती सर्वत्र झाल्याशिवाय राहणार नाही. या निकालामुळं एक झालं आता महापालिकेच्या निवडणुका लवकर होणार नाहीत...!"
--------------------------------------------------

३४, बुधवार पेठ, पुणे २
हा पत्ता संस्कारी, शिस्तबद्ध जनसंघ-भाजपचा होता. पत्ता बदलला तशी इथली संस्कृती बदलली. जुन्या पुण्याच्या खुणा स्पष्ट करणारं ते कार्यालय बदललं. हा इथल्या राजकारणातल्या सात्विक, सतशील, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा पत्ता होता. लोकांनाही तो आपलासा वाटत होतं. इथं स्वच्छ, चारित्र्यवान, सेवाभावी, सद्गुणी, सदवर्तनी कार्यकर्त्यांची उठबस असायची. इथून मूल्याधिष्ठित राजकारण केलं जायचं. वैचारिक बैठक असलेल्या कार्यकर्त्यांना हे मंदिर वाटायचं. त्यामुळं अर्थातच त्याचं पावित्र्य राखलं जायचं. मात्र जेव्हा सत्ताचाटण लाभलं, तेव्हा बाजारू रूप आलं. ज्यांना आवर्जून टाळलं जायचं, त्यांचीच गळाभेट होऊ लागली. पत्ता बदलला आणि त्यातली सात्त्विकता संपली. रंगसफेदी झाली, लाली-लिपस्टिक लावली गेली. सगळ्या अत्याधुनिक सुविधा आल्या. भल्या मोठ्या सतरंजीवर बसून भेळभत्ता खात पक्षकार्य, राजकारण याची चर्चा व्हायची. सत्ता आल्यावर मग या वरलिया रंगा भुलून हौशे-गौशे-नवशे गोळा झाले. 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणत साधनसुचिता जपणाऱ्या पक्षाचं स्वरूप 'भगवी काँग्रेस' बनलं. मग त्याचे सारे गुण अवगुण अंगी भिनले. सच्च्या कार्यकर्त्यांची कुचंबणा होऊ लागली आणि व्यवहारी, बाजारू कार्यकर्त्यांचा जमावडा तयार झाला. मूळ निष्ठावंत कार्यकत्यांची घुसमट सुरू झाली. बाहेरून येणाऱ्या उपऱ्यांचं रेड कार्पेटवर स्वागत केलं जाऊ लागलं. सन्मानाची पदं त्यांना दिली जाऊ लागली. निष्ठावंतांची अवहेलना सुरू झाली. कोणत्याही शहरातल्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विचारा ही अशीच स्थिती सर्वत्र आहे, अगदी आपल्या सोलापुरातही! ज्यांनी पक्षाची धुरा अपमान, अवमान, टिंगलटवाळी, चेष्टा सारं काही भोगून वाहिली ते आज कुठे आहेत. ते आजही सतरंजी उचलतच राहिलेत. एवढंच नाही तर 'असुनी खास मालक घरचा म्हणती.....!' अशी त्याची अवस्था झालीय. पण सांगणार कुणाला? नेते सत्ता उपभोगण्यातच गर्क आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांना विचारतो कोण?
गैरो पे करम, अपनो पे सितम l
ए जाने वफा, ये जुल्म ना कर ll
१९६८ मध्ये आलेला 'आंखे' चित्रपट नक्कीच पाहिला असेल. साहिर लुधियानवी यांनी लिहिलेलं हे गीत आज नक्कीच आठवणार. 'ही मॅन' धर्मेंद्रकडं आशाळभूत नजरेनं पाहणारी माला सिन्हा आणि त्याच्या जोडीला लतादीदींचा अजरामर आवाज या गाण्यातून एका प्रेमिकेचं दुःख व्यक्त होतं. भारतीय जनता पक्षाचे पारंपरिक मतदार, निष्ठावंत कार्यकर्ते देवेंद्रजींना हेच म्हणत आहेत. आमच्याकडं दुर्लक्ष करू नका. आम्हाला अंतर देऊ नका. ते त्यांनी ऐकलं नाही आणि त्याचा परिणाम जो व्हायचा तो झालाय. आज हक्काच्या, तब्बल ३० वर्षे जिथं एक छत्री अंमल होता त्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलंय. आपल्या माणसांना दुखावून जगात कोणीही सुखी होत नाही. पैशानं हवा तसा निकाल आपल्या पदरात पडून घेता येत नसतो. या पोटनिवडणुकीचा निकाल अजिबात धक्कादायक नाही. या निवडणुकीत काय होणार, याचा साधारण अंदाज सुरुवातीलाच आला होता. फक्त 'पोपट मेलाय' हे सांगायला कोणी तयार नव्हतं. इथं रासनेंचा पराभव झालेला नाही तर आपणच पुण्याचे सर्वेसर्वा असं समजून वागणाऱ्या, कोल्हापूरहून आयात केलेल्या चंद्रकांत पाटील यांचा हा पराभव आहे. ते मुंबईचे, तिथं त्यांना काही करता आलं नाही, मग गिरणी संपानंतर मूळ गावी कोल्हापुरात आलेल्या पाटलांना तिथंही काही जमलं नाही. असं असतानाही सत्ता आणि मंत्रिपद उपभोगलेल्या पाटलांना स्वतःचा मतदारसंघ नाही. मग त्यांनी मेधा कुलकर्णी आणि इतर निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या हक्काचा कोथरूडचा मतदारसंघ बळकावला. तिथून निष्ठावंत भाजप मतदारांच्या साथीनं सत्ता मिळवली. अभाविपचे कार्यकर्ते आणि अमित शहांशी जवळीक एवढ्याच भांडवलावर त्यांनी आपलं बस्तान बसवलं. त्यानंतर सत्तेचा खेळ सुरू झाला. पक्ष संघटना आणि त्याचे पदाधिकारी यांना पूर्वी मान होता. निर्णय घेण्याचा अधिकार होता. पण आपण पक्षापेक्षा मोठे आहोत, असं समजत त्यांनी स्थानिक, पक्षासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून आपल्याभोवती जमणाऱ्या पिलावळीला जमवून निष्ठावंत कार्यकर्त्यांना दूर लोटलं. अशानांच पक्षातली आणि सत्तेची सारी पदं बहाल करून आपला गट मजबूत केला. निर्णयप्रक्रियेतून जुन्यांना हद्दपार करून टाकलं. अशीच स्थिती प्रत्येक जिल्ह्यात आहे. भाजपच्या ज्या संस्था आहेत तिथं याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.
कसब्याच्या बालेकिल्ल्यात झालेला पराभव भाजपच्या असंख्य  कार्यकर्त्यांच्या मनात अनेक दिवस सलत राहील. भाजपनं त्यांच्या नेत्यांनी, ज्यांना या निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी होती अशांनी आत्मचिंतन करायला हवं ते याच गोष्टींचं. वर्षानुवर्ष जोपासलेला हा प्रतिष्ठित असा मतदारसंघ. ज्या भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय-मोतीबाग आहे, संघाशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण, ग्राहकपेठ यांची मुख्य कार्यालयं आहेत, ज्याभागाला रामभाऊ म्हाळगी, अण्णा जोशी, अरविंद लेले, गिरीश बापट, मुक्ता टिळक अशी नेतृत्वाची उज्ज्वल परंपरा आहे, ज्या भागातून तरुण भारत, एकता यासारखी संघविचारांची नियतकालिकं वर्षानुवर्ष प्रसिध्द होत होती, ज्या भागात संघाच्या अनेक शाखा, त्यांच्याच अधिपत्याखालील नामवंत शाळा, महाविद्यालये, सहकारी बॅंका आहेत. त्याच भागातल्या सुजाण नागरिकांनी  प्रतिस्पर्धी उमेदवाराला असा सहजसोपा विजय मिळू द्यावा हे निष्ठावंत कार्यकर्त्याला आवडलेलं नाही. प्रत्यक्षात भाजप कार्यकर्त्यांनी दिलेला लढा हा रोडशोत गर्दी करणं, वरिष्ठ नेत्यांच्या मागेपुढं मिरवणं हाच राहिलाय. स्थानिक नेत्यांनी मतदारांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचणं यात मोठा फरक आहे. भाजपचे स्थानिक नेते, कार्यकर्ते असं घराघरात गेलेच नाहीत. 'पन्नाप्रमुख' आढळलाच नाही. कसबा हा आपला बालेकिल्ला आहे अशा भ्रमात तो वावरत होता. रोड शोच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर दाटीवाटीनं उभं राहण्यात धन्यता मानणारे नेते गल्लीबोळात फिरताना दिसले नाहीत. केंद्रीय मंत्रीपद उपभोगलेले, पक्षाच्या थिंकटॅंकचा सदस्य असलेले, चिंतन बैठकीत शब्दांचा कीस पाडणारे किती नेते कसब्यात जीवाचं रान करत होते? या भागातल्या घराघराशी ज्याचं नातं जुळलेलं आहे, असे कितीतरी जुन्या पिढीतील नेते भाजपकडं उरले आहेत. खरंतर देवेंद्र फडणवीस, बावनकुळे किंवा गिरीश महाजन यांना इथं तळ ठोकून बसावं लागावं हीच स्थानिक नेत्यांसाठी शरमेची बाब आहे. त्यांना विनाकारणच प्रचंड कष्ट करूनही अपयशाचं धनी व्हावं लागलं. अनेकांची मुलं, मुली, सुना, जावई परराज्यात किंवा परदेशात आहेत हे मान्य आहे. पण प्रतिस्पर्धी मृतात्म्यांना थडग्यातून बाहेर येऊन मतदान करण्याची भाषा बोलत असतांना या आपल्या सग्यासोयऱ्यांचं पोस्टल मतदान घडवून आणणं यांना अशक्य नव्हतं. पण ते नियोजनपूर्वक झालं नाही. अशी स्थिती येईल हे लक्षात घेऊन पक्षाच्या नेत्यांनी तसं नियोजन का केलं नाही? पक्षाचे पहिल्या फळीतले नव्हे तर दुसऱ्या फळीतले नेते पत्रकारांचे टोमणे ऐकून घेत शांतपणे आणि निर्धारानं किल्ला लढवत होते. यावेळी भाजपचा एकही बडा नेता फील्डवर नव्हता.फक्त मुरलीधर मोहोळ दिसले. पराभवातही आमचं मनोधैर्य कायम आहे आणि आम्ही कार्यकर्त्यांच्या बरोबर आहोत हे दाखवून देण्याची  हिंमत त्यांनी दाखवली नाही. पूर्वी योगेश गोगावले, विजय काळे, नंदू कुलकर्णी यासारख्या नेत्यांच्या हाती कसब्यातल्या घराघरांचा तपशील असायचा आणि तिथली नावं त्यांच्या तोंडावर असायची. असे कार्यकर्ते आता कुठं गेले? साधेपणा आणि  मॅन टू मॅन अप्रोच ही संघाची नीती भाजपनं अवलंबायला हवी होती. ही केवळ कसब्यातलीच स्थिती आहे असं नाही तर ती सार्वत्रिक आहे. सोलापुरातही अशीच स्थिती आहे. मतदारांना गृहीत धरून नेते मनमानी करताहेत.
ज्यांनी यापूर्वी कसब्यातून निवडणुका लढवल्या, त्या रामभाऊ म्हाळगी, अरविंद लेले, अण्णा जोशी, गिरीश बापट यांच्यापासून मुक्ता टिळक यांच्यापर्यंत साऱ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवलं त्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या नेत्यांनी प्रचारापासून दूर ठेवलं. ज्याचा कसब्याशी काहीही संबंध नाही अशा मतदारसंघा बाहेरच्यांच्या हातात प्रचाराची सूत्रं दिली गेली. त्यामुळं स्थानिक कार्यकर्त्यांनी दूरच राहणं पसंत केलं. ही निवडणूक आपल्या हातातून निसटतेय असं लक्षांत आल्यावर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी 'हू इज धंगेकर?' असा सवाल विचारत निवडणूक घालवली त्या चंद्रकांत पाटील यांना हटवून प्रचाराची सूत्रं आपल्या हाती घेतली. तोपर्यंत वेळ गेली होती. फडणवीस यांनी जळगावच्या महाजनांच्या हजारएक कार्यकर्त्यांना त्यासाठी जुंपलं. पण वेळ निघून गेली होती. हा खरंतर चंद्रकांत पाटलांनी हा पराभव झाल्यावर पुण्याचे पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता. कसब्यातल्या निकालातून पुण्यातल्या मतदारांनी चंद्रकांत पाटील यांचं नेतृत्व नाकारलंय. पुण्यातल्या कोणत्याही भाजप नेत्याशी बोलल्यावर किंवा महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांशी बोलल्यावर त्याला चंद्रकांत पाटील यांच्याकडून कशाप्रकारे ट्रिटमेंट दिली जातेय, हे ऐकल्यावर येत्या काळातल्या सगळ्याच निवडणुका पुण्यात भाजपसाठी अवघड जातील असं वाटतं. कसब्याच्या या निवडणुकीचा चंद्रकांत पाटलांनी सर्व्हे केला होता. या सर्व्हेच्या आधारावरच हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. असं सांगितलं गेलं पण तो सर्व्हे कोणी केला, हे पक्षानं जाहीर करावं आणि त्यातले निष्कर्ष कसब्यातल्या मतदारांसमोर मांडावेत. कारण अशाप्रकारचा सर्व्हे ही पाटलांसाठी आणि भाजपसाठी पळवाट झालीय. तशी ती सार्वत्रिक तक्रार आहे. सर्व्हेची ढाल करून पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर कायमच अन्याय करायचा आणि आपल्या पिलावळींना सत्तेची पदं, उमेदवाऱ्या द्यायच्या असा प्रकार गेली काही वर्षे होतोय. शहराचे खासदार असलेल्या गिरीश बापटांना जाणीवपूर्वक निर्णयप्रक्रियेतून दूर ठेवायचं. शहराध्यक्षपद भूषवलेल्या आणि कसब्याचीच नव्हे तर शहराची रेष न रेष माहीत असलेल्या योगेश गोगावले, विजय काळे व इतर यांना बाजूला ठेवायचं त्याचा हा परिणाम आहे  हे सांगण्यासाठी राजकीय तज्ज्ञाची गरज नाही. सलग चार वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद देऊनही स्वतःच्या प्रभागात ज्याला निर्णायक आघाडी घेता येत नाही. तो जर एखाद्या सर्व्हेच्या आधारावर निवडणुकीत जिंकेल, असं वाटणं अजब म्हणावं लागेल!
सत्ता चाखल्यापासून भाजपची एक वेगळीच शैली तयार झालीय. उपद्रव मूल्य नसलेल्या, जनतेत काहीच स्थान नसलेल्या व्यक्तीला मोठं करायचं. एखादं पद मिळालं की, तेच या अशा लोकांसाठी घबाड मिळाल्यासारखं असतं. कसब्यात उमेदवार देताना यापेक्षा काही वेगळी स्थिती नव्हती. तुलनेत स्वतःची 'लोकसेवक' अशी प्रतिमा निर्मिती करण्यात यशस्वी ठरलेले रविंद्र धंगेकर पहिल्यापासून प्रचारात आघाडीवर होते आणि निकालाच्या फेऱ्यांमध्येही आघाडीवरच राहिले. त्यांचा पक्षबदल लोकांना जाचला नाही. आधी शिवसेना मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आणि नंतर काँग्रेस अशी त्यांची वाटचाल झालीय. भाजप येण्याचा त्यांचा प्रयत्न हाणून पाडला गेला होता. पुण्यातला भाजप म्हणजे मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, गणेश बीडकर आणि हेमंत रासने हेच, हे काही योग्य नाही. धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले आणि इतर असे सक्षम कार्यकर्ते पुण्यातल्या भाजपचं नेतृत्व करायला आणि विविध पदांवर चांगलं काम करायला सक्षम नेते आहेत. पण त्यांचा विचार का होत नाही, त्यांना दरवेळी का नाकारण्यात येतं हे शोधलं पाहिजे. हवं तर भाजपनं त्यासाठी एक सर्व्हे करावा. ज्याला आपल्या प्रभागात मतदान घेता येत नाही त्याला आपण सलग चार टर्म स्थायी समिती अध्यक्षपद देऊन चूक केली हे सुद्धा मनातल्या मनात का होईना पक्ष नेतृत्त्वानं मान्य करावं. कसब्यातल्या निवडणुकीतून बोध घेऊन शहरात सतत वेगवेगळ्या पोस्टरवर दिसणाऱ्या या चार-पाच स्थानिक नेत्यांना तूर्त विश्रांती द्यायला हवीय. नाहीतर आज कसबा गेला उद्या पुणं हातातून जाईल! चुका शोधल्या पाहिजेत आणि त्या सुधारल्या पाहिजेत. पण भाजपच्या नेतृत्त्वाला 'आम्ही सर्वगुणसंपन्न आहोत; आम्ही चुकूच शकत नाही!' असा जो भ्रम झालाय तो दूर केला पाहिजे. आता असं सांगितलं जातंय की, बापट यांच्या जागी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणूक पुण्यातून लढणार आहेत मात्र कसब्याच्या या निवडणुकीतून बोध घेऊन ते तसं धाडस करणार नाहीत. चंद्रकांत पाटील यांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी द्यायला नकोय नाहीतर त्यांचाही पराभव होऊ शकतो. यापुढेही महाराष्ट्र विकास आघाडी एकत्र राहील असं वातावरण आहे. असं झालं  तर भाजपाला जड जाईल.
हरीश केंची.
९४२२३१०६०९

'इंडिया शायनिंग' ते 'मोदी की गॅरंटी...!'

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...