Thursday 4 May 2017

पुरुषही मुक्तीच्या प्रतीक्षेत

*पुरुषही मुक्तीच्या प्रतीक्षेत*

इन्ट्रो......
"स्त्रीमुक्तीची चळवळ ही महिलांमध्ये आत्मसन्मानाची आणि भ्रातृभावाची भावना जागृत करण्यासाठी समाजात स्रीबद्धल सन्मानाची भावना जागृत व्हावी, यासाठी आहे आणि स्त्रीमध्ये तेवढी किंवा जेवढी हवी तेवढी नाही असं समजणं कितपत योग्य आहे? स्त्रीमुक्तीची चळवळ करणाऱ्या महिलांना या देशातील पुरुष खरोखरच मुक्त आहेत असं वाटतं? भारतीय पुरुष हा भारतीय स्त्रीपेक्षा अधिक गुलामी वृत्ती जोपासणारा आहे. त्याच्यामध्ये पुरुषत्वाची वानवाच आहे, नव्हे गुलामीमध्येच आपण सुरक्षित आहोत असं मानण्याइतपत त्याचं मानसिक अधःपतन झालं आहे."
[5/4, 1:10 PM] Harish Kenchi: स्थानिक स्वराज्य संस्थेत महिला मोठ्याप्रमाणात निवडून आल्या आहेत. विधिमंडळात आणि संसदेत महिलांना आरक्षण ठेवण्याबाबतचा विषय गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी राखीव जागा उपलब्ध करून दिल्याने राजकारणात महिलांचे प्रमाण वाढले आहे. हे आपण सगळेच जाणतो. त्यापूर्वी त्याचे प्रमाण अत्यंत अल्प असेच होते. स्त्रिया राजकारणात वा समाजकारणात दिसल्या म्हणजे त्या स्त्री मुक्ती चळवळीतल्या कार्यकर्त्या आहेत. असंच मानलं जात होतं. किंबहुना राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच काहीसा नकारात्मक होता. स्त्रीमुक्ती चळवळीतल्या महिला कार्यकर्त्यांबाबत आक्षेप घेतला जायचा. स्त्रीमुक्ती चळवळ ही संसार मोडण्यासाठी आहे, कुटुंबसंस्था उदध्वस्त करणारी आहे, या समजुती कशा पसरल्या कुणास ठाऊक? पण पसरल्या होत्या हे मात्र निश्चित! स्त्रीमुक्ती चळवळ ही महिलांमध्ये आत्मसन्मानाची आणि भ्रातृभावाची भावना जागृत करण्यासाठी, समाजात स्रीबद्धल सन्मानाची भावना जागृत व्हावी, यासाठी आहे.
आत्मसन्मानाची भावना पुरुषांमध्ये आहे आणि स्त्रीमध्ये तेवढी किंवा जेवढी हवी तेवढी नाही असं समजणं कितपत योग्य आहे? स्त्रीमुक्तीची चळवळ करणाऱ्या महिलांना या देशातले पुरुष खरोखरच मुक्त आहेत असं वाटतं? भारतीय पुरुष हा भारतीय स्त्रीपेक्षा अधिक गुलामी वृत्ती जोपासणारा आहे. त्याच्यामध्ये पुरुषत्वाची वानवाच आहे. भारतीय पुरुषाला गुलामी प्रिय आहे, नव्हे गुलामीमध्येच आपण सुरक्षित आहोत, असं मानण्याइतपत त्यांचं मानसिक अध:पतन झाले आहे.

मध्यन्तरी एका महिलेने झाशीच्या राणीच्या नवऱ्याबद्धल गोडसे भटजींच्या 'माझा प्रवास' मध्ये असलेल्या काही गोष्टी एका लेखात मांडल्या होत्या. झाशीच्या राणीचा नवरा गंगाधरपंत हा स्त्रीवेष करीत असे. या पुस्तकातच आपण असे का वागतो, याची गंगाधरपंतांना वाटणारी जीवघेणी खंतही व्यक्त केली आहे. आपण अशाप्रकारे स्त्रीवेष करून स्त्रीसारखे वावरता हे खरे का? असा प्रश्न या गंगाधरपंतांना करण्यात आला. ते फार महत्वाचे आहे. 'मी तर लहानसा मांडलिक आहे. परंतु इंग्रज बहाद्दरांपुढे पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर देशात जितके राजे रजवाडे आहेत, तितक्यांनी तुम्हापुढे बांगड्याच भरल्या आहेत. कोणी शूर तुम्हापुढे नाही. बांगड्या भरल्याच नाहीत असा पुरुष पृथ्वीवर नाही. तुम्ही दिपांतरीचे असता आपल्या पराक्रमाने आमच्या द्वीपात येऊन आम्हास कैद केले.' म्हणजे इंग्रजांच्या पराक्रमापुढे सगळ्याच मोठमोठ्या पुरुषांनी बांगड्या भरून हार खाल्ली. तर माझ्यासारख्या छोट्याशा राजाने स्त्री वेष करून वावरायचे ठरविले , तर त्यात गैर काय? असा प्रश्न गंगाधरपंतांनी उपस्थित केला. आत्मसन्मान विसरून लाचारीचे, अवहेलनेचे जीवन जगणारे, अन्याय सहन करीत जगणारे हजारो पुरुषसिंह आपल्या अवतीभोवती असताना इथे फक्त स्त्रीमुक्तीचाच विचार व्हावा हे कितपत योग्य आहे?

विभावरी शिरूरकर यांच्या साहित्यावर पुण्या-मुंबईत साठ सत्तर वर्षांपूर्वी मोठ्या जोरदार चर्चा, वादविवाद होत, असं माझ्या वाचनात आलं आहे. त्या काळात एका स्त्रीने आपल्या सर्वगुणसंपन्न नवऱ्याचं नाक कापण्यासाठी काय केले होते, हे ऐकलं, तर आजच्या कैक पुरोगामी पुंगवांनाही फेफरे येईल. ही गोष्ट कुण्या ऐऱ्या गैऱ्याने सांगितलेली नाही. 'निस्पृह' या टोपण नावाने तेव्हा लिखाण करणाऱ्या दत्तो अप्पाजी उर्फ दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी ही पुणे संस्कृती सादर केली होती.  दाजीसाहेबांनी लिहले होते, 'आपला नवरा व्यभिचारी आहे, बाहेरच्या बायांस आपल्या घरी आणून आपल्या देखत तो त्यांच्याशी हैदोसधुल्ला घालीत असतो, या रागावर पुण्याच्या एका सुखवस्तू, श्रीमंत गृहस्थाच्या पत्नीने घरासमोरच त्यांच्या नाकावर टिच्चून वेश्या व्यवसायाचे दुकान उघडले होते!'  स्त्री मुक्तीची ही एवढी जबरदस्त धडक सत्तर वर्षांपूर्वी पुण्यातल्या एका स्त्रीने दिली होती हे कुणाला खरे तरी वाटेल का? उनाडपणे वागणार्या पुरुषांना ताळ्यावर आणण्यासाठी काय करावे, हा प्रश्न स्त्रियांना नेहमीच सतावत आला आहे.

विभावरी शिरूरकरांनी आपल्या साहित्यातून हा प्रश्न उभा केला आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रात सुशिक्षित पांढरपेशा वर्गात वादळच निर्माण केले होते. पतीने टाकून दिलेल्या स्त्रीने काय करावं , याबद्धल त्या काळातल्या विद्वानांनी जे काही विचार व्यक्त केले आहेत,  ते आज वाचताना मोठी मौज वाटते. आता घटस्फोटाचा कायदा झालाय. स्त्रीला नवऱ्याच्या जाचाला कंटाळून स्वतःला मुक्त करून घेण्याची इच्छा असेल, तर घटस्फोट घेऊ शकते अथवा घटस्फोट घेण्याचे नाकारून नवऱ्याला धडाही शिकवू शकते. पण सत्तर वर्षांपूर्वी हे शक्य कोटीतले नव्हते. पुरुष त्याला हवं तसं वागत होता. पण स्त्रीला मात्र असे वागणे शक्य होत नव्हते.
सुप्रसिद्ध समाजसुधारक विद्वान श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी या परिस्थितीवर लिहिताना उनाड स्त्रियांशी संबंध तोडून टाकण्याचे तोडगे पुरुषांनी काढलेले आहेत. त्याच पद्धतीचा अवलंब स्त्रियांनी करावा असे स्पष्टपणे सुचविले होते. केतकरांनी ह्या तोडग्याची त्यांच्या कानावर आलेली कथा आपल्या लेखात दिलीय, ती अशी- ' वऱ्हाड मध्ये एके ठिकाणी जेव्हा एका ब्राह्मणाची  बायको मुसलमानाबरोबर पळून गेली, तेव्हा तिचा कायमचा संबंध तोडून टाकण्यासाठी पालाश विधी केल्याचं मला ठाऊक आहे. सुमारे १९०२-०३ साली मुक्काम येथे एका भिक्षुकाच्या घरी या प्रकारचा विधी झालेला होता. तो मला पाहायला मिळाला नाही; पण पालाश विधीचे वर्णन ब्रह्मकर्माच्या पोथ्यातून आढळते. यावरून पळसाचा एक कृत्रिम पुरुष करून त्याचे दहन करण्याचा हा विधी आहे असे दिसते. या 'पालाश प्रतिकृती दाहविधी' मध्ये कृत्रिम पुरुषांच्या ठायी मंत्रयुक्त पद्धतीनं अस्थीमांसयुक्त शरीराची भावना कशी स्थापित करावी हे दिले आहे. 'यस्य अस्थिनी न लभ्यते तस्य पर्णशरदाह:' असे विधीवाक्य सांगितले आहे. मृत मनुष्य नसता त्यास मृत कल्पून त्याचा अंत्यविधी करणे ही गोष्ट समाजात पूर्वीपासून चालू होती असे दिसते. घटस्फोटाचा विधी मी पाहिला नाही पण काशीला झालेला मी ऐकला आहे.

खुद्द बिथोर येथे पेशव्यांच्या घराण्यामध्ये एक उनाड स्त्री निघाली आणि नवऱ्यास टाकून अन्य पुरुषासोबत राहू लागली . तेव्हा त्या स्त्रीशी संबंध नाहीसा करण्यासाठी घटस्फोटाचा विधी केला होता, असे ऐकतो. या विधीची एकंदर योजना मला परिचित नाही. त्या विधीचे वर्णन मिळाले ते संस्कारज्ञ ब्राह्मणांकडून न मिळता सामान्य मनुष्याकडून मिळाले. 'नदीच्या काठी हा विधी झाला. स्त्रीच्या डोक्यासारखे रूप मडक्याला दिले होते आणि नदीच्या काठी जाऊन दगडावर ते मडके आपटले. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी शिमग्यातल्याप्रमाणे शंखनाद केला आणि नवऱ्याने काही दिवस सुतक धरलं' या सगळ्यापासून आपण खूप पुढे आलो आहोत. पण नव्या काळात नवे प्रश्न , नवी बंधने, नवे जाच निर्माण झालेच आहेत. स्त्रीमुक्तीसुद्धा बुरसटलेली वाटू लागलीय कित्येक जणींना!

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...