Monday 22 June 2020

डॉ. कोटणीस यांची अमर कथा


कोरोनाव्हायरसच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी भारत चीनला मदत करत आहे. भारताच्या मदतीबद्दल चीनी राजदूत सून वेडूंग यांनी भारताचे आभार मानले आहेत. त्यांनी आभार मानताना एका मराठी माणसाचं नाव घेतलं. हा मराठी माणूस म्हणजे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस. त्या म्हणाल्या की मला द्वारकानाथ कोटणीस यांच्या कार्याची आठवण आली.
हे डॉ. द्वारकानाथ  कोटणीस नक्की कोण असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. भारतात डॉ. कोटणीस हे नाव फारसे  परिचित नसले तरी चीन त्यांना कधीही विसरू शकत नाही. आजही चीनी नागरिक कोटणीस यांचे आभार मानतात. यानिमित्ताने डॉ. द्वारकानाथ कोटणीस हे कोण होते हे प्रत्येक मराठी माणसाला सांगणं गरजेचं आहे, त्यासाठीच हा लेखप्रपंच.

डॉ. कोटणीस १० ऑक्टोबर १९१० साली सोलापूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. ते ८ अपत्यांपैकी एक होते. त्यांनी मुंबईच्या सेठ जी एस मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरीचं शिक्षण घेतलं.  डॉ. कोटणीस यांच्या कार्याला सुरुवात झाली ती १९३८ सालच्या दुसऱ्या चीन-जपान युद्धाच्यावेळी. युद्धाचं पारडं जपानच्या बाजूना झुकलेलं होतं. जपानने चीनवर पूर्ण नियंत्रण मिळवलं होतं. चीनचा लढा सुरूच होता, पण चीनी सैनिकांना वाचवण्यासाठी वैद्यकीय मदत कमी पडत होती. म्हणून त्यावेळचे कम्युनिस्ट जनरल झु दे यांनी जवाहरलाल नेहरू यांना विनंती करून डॉक्टरांची एक टीम तातडीने चीनला रवाना करण्याची विनंती केली. त्यावेळी सुभाषचंद्र बोस हे कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी ३० जून १९३८ रोजी लोकांना आवाहन करून ५ सदस्य असलेली डॉक्टरांची टीम तयार केली. या टीमसोबत एक रुग्णवाहिका आणि एकूण २२,००० रुपये देण्यात आले.

चीनला वैद्यकीय मदतीची गरज आहे ही बातमी समजल्यानंतर डॉ. कोटणीस यांनी आईवडिलांना चीनला जाण्याची परवानगी मागितली. त्यांना सुरुवातीपासूनच जगातील वेगवेगळ्या भागात जाऊन डॉक्टरीचं काम करायचं होतं. त्यांना पहिलीच संधी मिळाली ती चीनमध्ये जाण्याची. त्याकाळी सामान्य माणसाला चीनी रेशीम कापड यापलीकडे चीनबद्दल फारशी माहिती नव्हती. तरी डॉ. कोटणीस यांच्या वडिलांनी तशी परवानगी दिली. मुलगा युद्धक्षेत्रात एवढ्या लांबवर जाणार म्हणून आई मात्र दुःखी होती.

चीनला वैद्यकीय मदत करणारा भारत हा पहिला आशियाई देश होता. या टीमचं स्वागत करायला स्वतः माओ झेडाँग उपस्थित होते. पुढे डॉ. कोटणीस हे माओ झेडाँग यांच्या नेतृत्वाखालील तुकडीत सामील झाले.  डॉ. कोटणीस यांच्यावर ऐन युद्धभूमीवर वैद्यकीय मदत पुरवायची जबाबदारी होती. हे काम अत्यंत कठीण होतं. माओ झेडोंग यांच्या सैन्य तुकडीसोबत ते चीनच्या उत्तरेला वूताई पर्वत क्षेत्रात गेले. युद्धाच्यावेळी सैनिकांवर उपचार करताना नेहमीच औषधे कमी पडत. १९४० साली जपानसोबतच्या दीर्घकाळ चाललेल्या युद्धानंतर तर डॉ. कोटणीस यांनी विश्रांती न घेता तब्बल ७२ तास शस्त्रक्रिया केली. या दरम्यान त्यांनी ८०० जखमी सैनिकांवर उपचार केले.

यानंतर डॉ. कोटणीस यांना बेथूने इंटरनॅशनल पीस हॉस्पिटलचं डायरेक्टरपद देण्यात आलं. १९४० साली त्यांची भेट गुओ किंगलान या नर्ससोबत झाली. तोवर डॉ. कोटणीस यांना चीनी(मँडरीन) लिहिता आणि वाचता येत होती. एवढ्या कमी वेळात चीनी शिकलेला माणूस बघून गुओ किंगलान या प्रभावित झाल्या. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी १९४१ साली लग्न केलं. त्यांनी आपल्या मुलाचं नाव यीनहुआ ठेवलं. यीन म्हणजे भारत आणि हुआ म्हणजे चीन.
दुर्दैवाने त्यांचं लग्न आणि मुलाचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. १९४२ साली डॉ. कोटणीस यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूला त्यांचच खडतर काम कारणीभूत ठरलं होतं. यीनहुआच्या जन्मानंतर अवघ्या ३ महिन्यांनी त्यांचा फेफरे आल्याने मृत्यू झाला. ते हयात असताना अनेक चीनी लोक त्यांचे आभार मानायला यायचे. ते गेल्यानंतरही  लोक त्यांना विसरले नाहीत. २००५ चं उदाहरण घ्या. चीनमध्ये पूर्वजांची आठवण काढण्यासाठी किंगमिंग महोत्सव साजरा केला जातो.

२००५ च्या किंगमिंग महोत्सवाचावेळी सामान्य चीनी जनतेने डॉ. कोटणीस यांचं थडगं संपूर्णपणे फुलांनी झाकलं होतं. २०१४ साली शी जिनपिंग यांनी भारत भेटीत डॉ. कोटणीस यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.
यानिमित्ताने व्ही शांताराम यांच्या ‘डॉ. कोटणीस की अमर  कहानी’ चित्रपटाचा उल्लेख केलाच पाहिजे. हा चित्रपट डॉ. कोटणीस यांच्या आयुष्यावर आधारित होता. डॉ. कोटणीस यांच्या भूमिकेत स्वतः व्ही.  शांताराम होते. हा चित्रपट तुम्ही युट्युबवर पाहू शकता.
तर, या अज्ञात हिरोला जसे चीनी नागरिक विसरलेले नाहीत तसेच आपणही विसरू नये एवढंच वाटतं.

कोरोनाव्हायरसच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी भारत चीनला मदत करत आहे. भारताच्या मदतीबद्दल चीनी राजदूत सून वेडूंग यांनी भारताचे आभार मानले आहेत. त्यांनी आभार मानताना एका मराठी माणसाचं नाव घेतलं. हा मराठी माणूस म्हणजे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस. त्या म्हणाल्या की मला द्वारकानाथ कोटणीस यांच्या कार्याची आठवण आली.

भारत-चिनी मैत्रीचे प्रतीक डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांची आज जयंती. त्यांचा जन्म १० ऑक्‍टोबर १९१० रोजी मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय परिवारात सोलापूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण सोलापूर येथेच झाले. नंतर सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज, मुंबईमधून पदवी घेतली होती आणि पदव्युत्तर पदवीची तयारी करत होते त्याच वेळी वर्ष १९३८ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले. या चिमुकल्या राष्ट्राने त्यावेळी चीनला अक्षरशः जेरीला आणले होते.

युद्धात जखमी झालेल्या सैनिकांवर उपचार करण्याची खूपच अडचण होती. यावेळी कम्युनिस्ट जनरल झु दे यांनी जवाहरलाल नेहरूंना काही डॉक्‍टर चीनकडे पाठवण्याची विनंती केली. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ३० जून १९३८ रोजी एका पत्रकार परिषदेतून लोकांना आवाहन केले आणि २२ हजार रुपयांचा निधी जमा करून स्वयंसेवक डॉक्‍टरांची टीम आणि एक रुग्णवाहिका पाठविण्याची व्यवस्था केली. डॉ. कोटणिसांनी तेथे जाण्यासाठी आपल्या कुटुंबाची परवानगी मागितली.

त्यावेळी कुटुंबातील बहुतेक सदस्यांना चीनबद्दल फारशी माहिती नव्हती. चीन म्हणजे फक्‍त रेशीम कपड्यासाठी प्रसिद्ध होता. वडील शांताराम यांनी आपल्या तरुण मुलाला परदेशी जाण्यासाठी परवानगी दिली. त्यांची आई मात्र दुःखी झाली होती. ते सप्टेंबर १९३९ रोजी त्यांच्या पथकाबरोबर चीनला गेले. त्यांचे पथक प्रथम वानवानच्या हॅनकॉकोऊ बंदरात चीनमध्ये आले. त्यानंतर त्यांना क्रांतिकारक तळ “यानान’ येथे पाठवण्यात आले. जिथे माओ झेडोंग, झू दे आणि कम्युनिस्ट पक्षाच्या इतर प्रमुख नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. कारण ते आशियाई देशातून येणारे पहिले वैद्यकीय पथक होते.

अलाहाबाद येथील डॉ. एम. अटल यांच्या नेतृत्वाखाली भारतातून चीनला जाणाऱ्या डॉक्‍टरांच्या पथकात, नागपूरचे एम. चोलकर, सोलापूरचे डॉ. कोटणीस, कलकत्ता येथील देवेश मुखर्जी आणि डॉ. बी. के. बसू यांचा समावेश होता. कॅनेडियन डॉ. नॉर्मन बेथून यांच्याबरोबरच या पथकाने काम केले होते. ते चीनमध्ये ५ वर्षे राहिले. डॉ. कोटणीस भारतात आपल्या कुटुंबास वरचेवर पत्र लिहून खुशाली कळवीत असत. लढाईतील डॉक्‍टर म्हणून त्यांचे काम तणावपूर्ण असायचे. तिथे नेहमीच औषधाची तीव्र कमतरता होती. तीन तीन दिवस न झोपता ते शस्त्रक्रिया करीत असत. युद्धादरम्यान ८०० पेक्षा जास्त जखमी सैनिकांवर त्यांनी उपचार केले. अखेरीस त्यांची चीनमधील डॉ. बेथून आंतरराष्ट्रीय पीस रुग्णालयाचे संचालक म्हणून नियुक्‍ती केली गेली.
यावेळी परिचारिका गुओ किंगलन त्यांच्या बरोबरच असायची. त्यांच्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले व डिसेंबर १९४१ मध्ये त्यांनी विवाह केला. त्यांना यिनुहा (चिनी भाषेत भारत) नावाचा मुलगाही झाला. मात्र, सततच्या परिश्रमाने ते आजारी पडले व ९ डिसेंबर रोजी त्यांचे चीनमध्येच निधन झाले.

No comments:

Post a Comment

बदसूरत ’पॅटर्न'

‘ ‘अब की बार चारसौ पार’ ची घोषणा देऊन तिसऱ्यांदा सत्ताप्राप्तीसाठी लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेल्या भाजपची जोडी मोदी-शहा य...