Thursday 2 May 2019

भाजपेयींवर प्रियंकास्त्र चालणार काय?

"काँग्रेस पक्षाला संजीवनी देण्यासाठी प्रियांका गांधी या राजकारणात सक्रिय बनल्या. त्यानंतर प्रियांका गांधी या वाराणसीतून निवडणूक लढवणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. प्रियांका गांधी तर थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी सरसावल्या आहेत. पण काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी मात्र प्रियंकाच्या या निर्णयाबद्धल फारसे खुश नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे की, विरोधी पक्षात असलो तरी देशातल्या मोठ्या राजकीय नेत्यांची सशक्त आणि सक्षम लोकशाहीसाठी गरज आहे. त्यांना जबरदस्तीनं निवडणुकीत पराभूत करण्याचा प्रयत्न होऊ नये. लोकशाही मजबूत आणि संसदीय कारभारासाठी अशा मोठया नेत्यांनी निवडणुका जिंकून संसदेत येणं अत्यंत गरजेचं आहे! पण असं दिसून येतंय की, राहुल अमेठी आणि वायनाड अशा दोन ठिकाणाहून निवडणूक लढवताहेत. अमेठी त्यांचा पारंपारिक मतदारसंघ आहे. दोन्ही ठिकाणी राहुल विजयी झाले तर त्यांना एका मतदारसंघातून राजीनामा द्यावा लागेल. असं झालं तर ते अमेठीचा राजीनामा देतील आणि तिथून प्रियांकाने पोटनिवडणूक लढवावी असा विचार राहुल गांधी असल्याचं दिसून येतंय. त्यामुळं वाराणसीतून प्रियांका लढतील असं वाटत नाही."
---------------------------------------------------

*दे* शातल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तीन टप्पे पार पडले आहे अद्यापि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वड्रा या वाराणसीच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उतरतात की नाही याबाबत चर्चा सुरू आहे प्रियंका गांधींच्या गंगा यात्रेत सहभागी होणाऱ्या शालिनी यादव यांनी समाजवादी पक्षाच्या वतीने आपण लोकसभेची निवडणूक वाराणसी तुन लढविणार आहोत असे जाहीर करून टाकले आहे मात्र प्रियांका गांधींनी अद्यापि याबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे कदाचित असं वाटतंय की काँग्रेस पक्ष अशा प्रकारची उत्सुकता  ताणून धरण्यात धन्यता मानते आहे.  शालिनी यादव ह्या  काँग्रेसच्या वतीने वाराणसीच्या महापौर पदाची निवडणूक लढविलेल्या आहे आहे त्यात त्यांचा पराभव झाला आहे राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्यरत राहिले श्यामलाल यादव यांच्या त्या स्नुषा आहेत. त्यांनी आता समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पार्टी यांच्या आघाडीच्या वतीने वाराणसीच्या जागेवरून निवडणूक लढविण्याचे जाहीर केलेला आहे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी असे जाहीर केले आहे की प्रियांका गांधी वाराणसीच्या जागेवरून निवडणूक लढवीत असतील तरीदेखील शालिनी यादव या आपल्या उमेदवारी मागे घेणार नाहीत

लोकसभेची निवडणूक लढवायची की नाही याबाबतचा सर्वस्वी निर्णय प्रियांका वाद्रा यांच्यावर सोडून देण्यात आलेला आहे राहुल गांधीनी असं म्हटलं आहे की प्रियांका निवडणूक लढविण्याचा निर्णय स्वतः घ्यायचा आहे पण वाराणसी च्या निवडणुकीत रंग भरण्यासाठी प्रियंका वाडकर यांचे नाव घेतले जात आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात थेट प्रियांका वाद्रा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून प्रियांका याच पुढच्या प्रधानमंत्री असतील असं चित्र निर्माण करण्यात काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते दाखवून देत आहेत प्रश्न असा आहे की प्रियंका या निवडणुकीच्या राजकारणामध्ये हे उतरतील का कारण राजकारणामध्ये येण्यासाठीच त्यांना अनेक मिनतवाऱ्या केल्यानंतर अखेर राहुल गांधी अडचणीत आल्यानंतर त्या राजा काढण्यात आले आहेत सोनिया गांधी यांनीही सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय घेतला होता पण कालांतराने या सक्रिय राजकारणातच नव्हे तर निवडणुकीच्या राजकारणातही ही उचल्या अशाच प्रकारे प्रियंका यांनीही सक्रिय राजकारणात न येण्याचा निर्णय घेतलेला होता 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राहुल गांधींचा प्रचार केला होता पण सक्रिय राजकारणात वाढ निवडणुकीच्या राजकारणात येण्यापासून त्यांनी स्वतःला रोखले होते पण आता त्या सक्रिय राजकारणात आल्या आहेत शिवाय काँग्रेस पक्षाच्या महासचिव म्हणून त्या कार्यालयात झाल्या आहेत सोनिया गांधीं प्रमाणेच निवडणूक राजकारण निवडणुकीच्या राजकारणापासून ते पक्षी राजकारण्यांमध्ये ही सक्रिय बनले आहेत त्यामुळेच कार्यकर्त्यांना असं वाटत आहे की प्रियांका या वाराणसी तुं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आव्हान देतील

सोनिया गांधी या राजकारणात आल्या त्यावेळी काँग्रेस पक्षाला पुनरुज्जीवन देण्याची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे होती काँग्रेस पुन्हा उभी राहील अशी काही शक्यता त्यावेळेला वाटत नव्हती अशावेळी 1999 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा त्या विरोधी पक्ष नेते आपल्या राजकारणाच्या मैदानात त्या नवख्या असल्या तरी त्यांनी संसदीय राजकारणात आणि रस्त्यावरही ही भारतीय जनता पक्षाला घेरलं होतं यूपीएचा अध्यक्षपद सांभाळून त्यांनी ज्या प्रकारचे राजकारण केलं त्याने सारेच आश्चर्यचकित झाले होते भारतीय जनता पक्षाच्या इंडिया शायनिंग या या घोषणेच्या विरोधात लढा देऊन त्यांनी युपी याची दोनदा सत्ता प्रस्थापित केली होती त्यानंतर 2004 मध्ये राज राहुल गांधी हे देखील राजकारणात सक्रिय झाले आणि त्यांनी काँग्रेसचा गड किंवा गांधी परिवाराचा पारंपरिक मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या अमेठीतून निवडणूक लढवली आणि जिंकली 2007 मध्ये राहुल गांधींना काँग्रेसचे महासचिव बनविण्यात आले तर 2013 मध्ये त्यांना काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष बनविण्यात आला आणि गेल्या वर्षी मार्च महिन्यात काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपविण्यात आला राहुल गांधीच्या अध्यक्ष पदा खाली नेतृत्वाखाली पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा कस लागतो आहे

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...