Saturday 8 May 2021

मोदीजी, जरा हे ही लक्षांत घ्या...!

"बंगालच्या विधानसभा निवडणुकादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर भाजपेयीं नेत्यांनी गेल्या सत्तर वर्षाच्या काळात काँग्रेसनं केवळ सत्ता उपभोगली, देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी काहीही केलं नाही. अशी भाषणं करताहेत. बंगालवासीयांना हे कदाचित नवीन वाटलं असावं; पण प्रधानमंत्री नरेंद्र दामोदरदास मोदी आणि मंडळी केवळ आत्ताच बोलताहेत असं नाही तर, ती मंडळी गेली सात वर्षे, सातत्यानं सभा-सेमिनार मधून, 'सत्तर वर्षात या देशात काहीच झालं नाही, काहीच घडलं नाही!' असा बकवास करत या खंडप्राय देशाचा सतत अपमान करत आलेत...! मी मोदींची ती चूक सुधारत, मोदींच्या वतीनं या देशाची माफी मागत, मोदींना आज देशात गेल्या सत्तर वर्षात काय घडलं, काय साकारलं याच्या काही गोष्टी सांगाव्यात म्हणतो...! भक्तांनीही हे जरूर वाचावं आणि आपली मतं बनवावीत...!"
---------------------------------------------------------


*प्रि* य मोदीजी, तुम्ही जन्माला आलात १७ सप्टेंबर १९५० रोजी, या दरम्यान देश स्वतंत्र होऊन या देशात एका सक्षम आणि अद्वितीय संविधानाची निर्मिती झाली होती आणि २६ जानेवारी १९५० रोजी हे अद्वितीय संविधान या देशात रुजू झालं होतं, अर्थातच, तुमचा तेव्हा जन्म ही झाला नव्हता...! तुम्ही जेव्हा पाळण्यात असाल बहुधा, कदाचित सहा महिन्यांचे, तेव्हा या देशांकडून, पहिल्या एशियन गेम्सचं अत्यंत देखणं आयोजन करुन झालं होतं, ते साल होतं १९५०...! तुम्ही असाल जेव्हा केवळ चार वर्षांचे, तेव्हा देशात भाभा अणुशक्ती केंद्र नावाचं एक सेंटर स्थापन होऊन ते कामाला सुद्धा लागलं होतं...ते १९५४ मध्ये...! तुम्ही ११ वर्षांचे झालात, पाचवीत वगैरे असाल तेव्हा, या देशात, डझनभर आयआयटी, आयआयएम केंद्र उघडली गेली होती, शेकडो विद्यापीठं उघडली गेली होती आणि याच संस्थांमधून जे टाॅप क्लास विद्यार्थी घडले, त्यातल्या काहींनी परदेशाचा रस्ता धरला, आता तुम्ही परदेशी गेल्यावर तुम्हाला जो "मोदी मोदी" जल्लोष ऐकायला येतो ना, तो याच नतद्रष्टांचा....! तर, या देशात पहिली आयआयटी सुरू झाली खरगपूरला १९५० साली आणि पहिली आयआयएम सुरु झाली १९६१ साली कलकत्त्यात...! याच वर्षी, १९६१ साली या देशानं, पोर्तुगीजांना गोव्यातून हाकलून गोवा या खंडप्राय देशात विलीन केला, तुम्ही तेव्हा केवळ अकरा वर्षांचे होता...! तुम्ही जेव्हा १३ वर्षांचे होता, तेव्हा या देशातलं भाक्रा नानगल नावाचं महाप्रचंड धरण पंजाबात बांधून झालं होतं ...!

१९६२-६३...! तुम्ही तेरा-चौदा वर्षांचे असताना, या देशात विमानांचं असेंब्लिंग आणि हेलीकाॅप्टर्सची निर्मिती सुरू झाली...१९६४...! तुम्ही पंधरा वर्षांचे होतात, तेव्हा या देशाच्या फौजांनी लाहोरपर्यंत धडक दिली होती...! लाहोर पाकिस्तान नावाच्या देशात आहे आणि आपले उपोषणसम्राट अण्णा हजारे तेव्हा भारतीय सैन्यात ड्राइव्हर होते...! तुम्ही १९ वर्षांचे असाल तेव्हा या देशात तारापूर न्युक्लिअर पाॅवर प्लांट सुरू झाला होता, इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन याच वर्षी या देशात अस्तित्वात आलं होतं...१९६९ मध्ये...! तुम्ही २१ वर्षाचे झालात, या देशाचे कायदेशीर मतदार झालात, तेव्हा इंदिरा गांधी नावाच्या, या देशाच्या एका बुलंद प्रधानमंत्र्यानी पाकिस्तान नावाच्या देशाचे दोन तुकडे करून, बांगलादेश नावाचा एक नवा देश या भूतलावर जन्माला घातला...! धर्माधिष्ठित संकल्पनेच्या आधारावर निर्माण झालेला पाकिस्तान, त्याचे दोन तुकडे होत असताना धर्म बिलकुल आडवा आला नाही बरं का...! तुम्ही २४ वर्षांचे झालात तेव्हा या देशानं पहिलं परमाणू परिक्षण केलं बरं का...१९७४ मध्ये...! तुम्ही ३७ वर्षांचे झालात, म्हणजे साधारण १९८७ ला, या देशात राजीव गांधी नावाच्या प्रधानमंत्र्यानी, सुपर कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नावाची नभूतो अशी क्रांती आणली आणि या देशानं प्रगतिच्या क्षितीजावर एक बुलंद भरारी घेतली ...!

राजीवजींचा खून झाला, नरसिंहराव नावाचे गंभीर आणि विद्वान गृहस्थ या देशाचे पंतप्रधान झाले, देश एका महाभयंकर आर्थिक संकटात सापडला होता, या देशाचं सोनं जागतिक बँकेकडं गहाण ठेवावं लागलं होतं पण, डॉ. मनमोहनसिंग नावाचे एक जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्री, नरसिंहरावांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री होते, या अर्थमंत्र्यांनं आपल्या पंतप्रधानांच्या सहाय्यानं या देशात आर्थिक उदारीकरणाची सुरुवात करून देशाला त्या संकटातून अलगद बाहेर काढलं ...! हेच मनमोहनसिंग पुढे या देशाचे दहा वर्षे पंतप्रधान होते बरं का ...! याच दरम्यान या देशात, चंद्रयान, मंगळयान, जीएसएलव्ही, मेट्रो, मोनोरेल, इंटरनॅशनल एअरपोर्ट्स, पोर्ट्स, जहाजे, सबमरिन्स, पृथ्वी, अग्नी, पिनाक नावाची मिसाईलस्, तेजस, चेतक, धनुष, नावाची हेलिकॉप्टर्स, सुखोई, मिग नावाची फायटर विमानांची निर्मिती, काय आणि किती सांगू....! बरं असो मोदीजी आता थांबतो, थकलो... पण शेवटचा एक प्रश्न विचारतो...! मोदीजी देशात झालेली ही प्रगती खरच तुम्हाला ठाऊक नाही?
आणि असेल ठाऊक तर मग तोंड उचकटून, कशाला हो या देशाचा वारंवार अपमान करीत असता?

मित्र हो, २०१४ च्या मध्यावर खुद्द नरेंद्र दामोदरदास मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाले आणि पुढचं सारं तुम्हाला ठाऊक आहे...! ७०वर्षात काय केलं? जे केलं तेच विकून विकून सुध्दा देश चालवता येईना, स्वतःची थापांशिवाय कोणतीच बोंब पडली नाही...! स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पायाभूत क्षेत्र व अवजड उद्योगासाठी प्रगती साधण्यासाठी पंतप्रधान नेहरूंच्या सरकारनं मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली अन या क्षेत्रासाठी सरकारी कंपन्या स्थापन झाल्या. एकेकाळी या सरकारी कंपन्यांची संख्या ३८० पर्यंत पोहोचली होती. भारताच्या अर्थव्यवस्थेला आज मंदीची झळ लागलीय. नोकऱ्यांचं आश्वासन पाळता आलेलं नाही उलट लोक बेरोजगार होताहेत, बॅंकांना टाळे लागतायत, अनेक कंपन्या बंद पडतायत. सरकारकडं देश चालवायला पैसा पुरत नाही. पैसे नसले की ते मिळवण्याचे तीन मार्ग सरकार वापरतं. बेग, बॉरो आणि स्टील. म्हणजे मागायचं, उधार घ्यायचं किंवा चोरी करायची. अलिकडेच टॅक्स भरा अशी विनंती सरकार वारंवार करतंय म्हणजे लोकांकडून मागून पैसे जमवतंय. बॉरो म्हणजे उधार घेणं. जागतिक बाजारातून, वर्ल्ड बॅंकेतून सरकार पैशांची उचल करतंय. मध्यंतरी सरकारनं रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेतलं होते. सरकार चोरी तर करू शकत नाही. मग काय करणार? तर सरकारनं चक्क घरातली भांडी विकायला काढलीयत. आता ही भांडी कोणती? तर सरकारच्या मालकीची जमीनी आणि पूर्वीच्या काँग्रेसी सरकारनं निर्माण केलेल्या १०० हून अधिक सरकारी कंपन्यांचं खासगीकरण किंवा निर्गुंतवणूक करायचं असं सरकारनं ठरवलंय. सरकारी मालकीच्या बँका विकायला काढल्यात. विकासाची कामं करण्यासाठी पैसा लागतो. रस्त्यांची कामं करायला, सरकारी दवाखाने, शाळा चालवायला पैशांची गरज असते. देशातल्या श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय नागरिकांकडून आणि भरपूर नफा कमवणाऱ्या कंपन्यांकडून सरकार कर घेतं. तसंच नागरिकही वेगवेगळ्या वस्तुंवर अप्रत्यक्ष कर देतात. त्यातून ही विकास कामं होतात. यासाठी आर्थिक नियोजन व्यवस्थित करायला हवंय पण नियोजनाअभावी ह्या टॅक्समधून मिळणार पैसा कमी पडू लागलाय. त्यामुळं सध्या अशी परिस्थिती सरकारवर ओढवलीय. पण त्याची जाणीव सरकारला नाही. सरकार दिवाळखोरीत निघणार तर नाही ना? अशी भीती वाटतेय. आर्थिक, औद्योगिक बाबीत लक्ष घालण्याऐवजी भावनात्मक गोष्टींचं अवडंबर माजवलं जातंय.
जबसे अमित शाह गृहमंत्री बने हैं तबसे -

◾CAA प्रदर्शन-हिंसा
◾दिल्ली दंगे
◾जामिया-JNU में छात्रों पर हमला
◾निजामुद्दीन मरकज को टारगेट किया गया
◾लालकिले पर हमला
◾किसानों का प्रदर्शन
◾जवानों पर नक्सली हमला

1 comment:

  1. छान . मोदीजी आता तरी विचार करून बोला.

    ReplyDelete

बदसूरत ’पॅटर्न'

‘ ‘अब की बार चारसौ पार’ ची घोषणा देऊन तिसऱ्यांदा सत्ताप्राप्तीसाठी लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेल्या भाजपची जोडी मोदी-शहा य...