Monday 24 August 2020

फेसबुकचा असली चेहरा!

भारतातल्या निवडणुकांमध्ये केंब्रिज एनालिटीका ने फेसबुककडून व्यक्तिगत माहिती चोरली होती. या साऱ्या प्रकरणात जितकी केंब्रिज एनालिटीका जबाबदार आहे तेवढंच फेसबुक देखील आहे! मार्च २०१८ मध्ये फेसबुकला मोठा झटका बसला, जेव्हा ही बाब समोर आली की, 'केंब्रिज एनालिटीका' नामक एका संस्थेनं बेकायदेशीररित्या ८.७ कोटी फेसबुक वापरणाऱ्यांची व्यक्तिगत-खासगी माहिती मिळवली होती. या संस्थेची मालकी ब्रिटनची एक कंपनी 'स्ट्रॅटेजीक कम्युनिकेशन लॅबोरेटरीज' यांच्याकडं आहे. ज्याचं नेतृत्व अलेक्झांडर निक्स नामक व्यक्ती करते. २४ नोव्हेंबर २०१८ च्या ब्रिटनमधील वृत्तपत्र 'गार्डियन'नं ही बातमी प्रसिध्द करताच ब्रिटनच्या संसदेनं आपल्या विशेषाधिकाराचा वापर करीत फेसबुकचे काही दस्तऐवज जप्त केले. ब्रिटन संसदेला असं यासाठी करावं लागलं होतं की, मार्क जुकरबर्ग सतत संसदेनं विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं टाळत होते. 'गार्डियन'नं यात असा दावा केला होता की, या दस्तऐवजांमध्ये फेसबुकच्या 'व्यक्तिगत माहिती' संदर्भातील आपल्या धोरणांबाबत काही महत्वाची कागदपत्रे आहेत.


‘न्यूजक्लिक’चे प्रमुख प्रबीर पुरकायस्थ हे 'डिजिटल एकाधिकार'ला विरोध करत आले आहेत.. ते म्हणतात की, ‘फेसबुककडून मिळालेल्या माहितीचा दुरुपयोग राजनीतिक निर्णयांना प्रभावित करण्यासाठी किंवा कैंब्रिज एनालिटिका करु शकते तर, हेच काम फेसबुक स्वतः अत्यंत चांगल्या पद्धतीनं करु शकेल. यातील सारी माहिती आणि पेजेस चांगल्याप्रकारे पोहचवू शकते. खरंतर केंब्रिज एनालिटिकानं प्रभावित झालेल्या भारतीय फेसबुकधारकांची संख्या तशी कमी आहे. तरीही भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताहेत. दोघांनीही एकमेकांवर केंब्रिज एनालिटिकाची सहयोगी कंपनी स्ट्रॅटेजीक कम्युनिकेशन लॅबरोटारीज प्रायव्हेट लिमिटेड यांची सेवा घेतल्याचा आरोप केलाय. या कंपनीच्या चार संचालकांपैकी दोन ब्रिटनचे तर दोन भारतीय होते. यापैकी अमरीशकुमार त्यागी आसनी अवनिशकुमार राय हे भारतीय संचालक आहेत. यांचीच एक सहयोगी कंपनी आहे, 'ओवलेनो बिझनेस इंटेलिजन्स' यांचे मुख्यसंचालक त्यागी आहेत. हे त्यागी जनता दल युनायटेडचे नेते के.सी.त्यागी यांचे चिरंजीव आहेत. जनता दल युनायटेड केंद्रातील भाजपेयीं सरकारमध्ये सत्तासाथीदार आहेत. बिहारमध्येही यांच्याच युतीचं सरकार आहे. त्यांचे दुसरे साथीदार हिमांशू शर्मा आहेत जे मोदींच्या 'मिशन २७२' आणि मिसकॉल अभियानाशी संबंधित आहेत. त्यागी आणि राय यांच्याशी संबंधित इतर काही कंपन्याही आहेत. याबाबत प्रसिद्धीमाध्यमांनी फारशी चर्चा केलेली नाही. त्याबाबतची माहिती आम्ही इथं देतोय. या कंपन्यांमध्ये 'स्टील्थ ऐनोलिटिक्स अँड बिजनेस सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, रूटियर ऑपरेशन्स कन्सलटिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि स्पॅन हाऊस कस्टमर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या आहेत. यांच्याशी संबंधित लोकांमध्ये अंकुर दहिया, अद्वैत विक्रमसिंह, आणि मदेला गिरीकुमार आहेत. हे सारे लखनौच्या भारतीय प्रबंधन संस्थान लखनऊ इथे शिकलेले आहेत. ही सारी मंडळी आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या कंपन्या यांची सर्व माहिती खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
https://www.tofler.in/visualization?cin=U93000DL2007PTC169445
https://www.tofler.in/amrish-kumar-tyagi/director/01270318
https://www.tofler.in/avneesh-kumar-rai/director/02964979
https://www.tofler.in/stealth-analytics-and-business-solutions-private-l...
https://www.tofler.in/ankur-dahiya/director/07797248
https://www.linkedin.com/in/ankur-dahiya-104891102/
https://www.linkedin.com/in/girikumarmaddela/
https://www.tofler.in/routier-operations-consulting-private-limited/comp...
https://www.tofler.in/visualization?cin=U93000DL2007PTC169445
केंब्रिज एनालिटिकाच्या म्हणण्यानुसार त्यांनी २०१० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयु आणि भाजपेयींसोबत काम केलं आहे. पण आता त्यांची वेबसाईट काम करत नाही. त्या वेबसाईटवर दावा करण्यात आला होता की, "आमच्या क्लायंटनं तिथं मोठं यश मिळवलं होतं. केंब्रिज एनालिटिकाने जितक्या जागा मिळवण्यासाठी लक्ष्य ठेवलं होतं त्यापैकी ९० टक्के यश मिळवलं आहे!" २७ मार्च २०१८ ला 'दि प्रिंट' ला दिलेल्या मुलाखतीत राय यांनी म्हटलं होतं, की १९८४ पासून आजवर त्यांनी अनेक राजकीय पक्षांशी सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री आणि नोएडाचे खासदार महेश शर्मा यांच्यासोबत काम केलं होतं. त्याचवेळी त्यागी यांनी राजकीय पक्षांसाठी माहिती गोळा करण्याचं, सर्व्हे करण्याचं कामदेखील केलं होतं. दोघांनी राज्यस्तरावर प्रत्येक कुटुंबांशी संबंधित माहिती संकलित करून त्याचा डेटाबेस तयार केला होता. ज्यात लोकांच्या जाती-जमाती आणि त्यांची राजकीयदृष्ट्या विचारसरणी याबाबत माहिती संकलित केली होती. त्याचा वापर निवडणुकीला उभं राहणारे उमेदवार, इच्छुक करत होते. राय यांच्या म्हणण्यानुसार केंब्रिज एनालिटिकानं भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी राजस्थान आणि मध्यप्रदेश मधील विधानसभा निवडणुकीत मिळणाऱ्या यशाबाबत चाचपणी केली होती. त्यांचा आरोप आहे की, निक्सनं अधिकाधिक पैसे मिळवण्यासाठी आपल्या क्लायंटना 'डबलक्रॉस' देखील केलं होतं.

हे सारं प्रकरण उघडकीस आणणारे ख्रितोफर विली यांनी ब्रिटनच्या संसदीय समितीसमोर मार्चमध्ये दिलेल्या जबाबानंतर दुसऱ्या दिवशी सांगितलं की, या कंपनीनं भारतातल्या लाखो गावांशी संबंधित माहिती संकलित केलीय. त्यांनी सांगितलं की, ही कंपनी २००३ पासून भारतात काम करतेय. उत्तरप्रदेश, बिहार, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, झारखंड, मध्यप्रदेश आणि राजस्थान इथं झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही सक्रिय होते. 'द वायर'च्या एका बातमीनुसार अवनिश रे यांनी विलीनं दिलेली माहिती नाकारलीय. केंब्रिज एनालिटिकाचा दावा आहे की, त्यांनी २०१० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयु आणि भाजपसोबत काम केलंय. केंब्रिज एनालिटिकाच्या लोकांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांशी चर्चा केली होती. पण या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी असं काही घडलं नसल्याचं म्हटलंय. ३० मार्च २०१८ काँग्रेसचा डेटा विश्लेषण करणाऱ्या प्रवीण चक्रवर्ती यांची एक मुलाखत प्रसिद्ध झालीय त्यात त्यांनी सोशल मीडियावर व्यक्तिगत आणि सार्वजनिक माहिती वेगवेगळी करून पाहिल्याचं सांगितलं. त्यांनी स्पष्ट केलं की, ट्विटर जर कुणी काही टाकलं तर ते सार्वजनिक होतं. फेसबुकवर आपल्या काही मित्रांसाठी पोस्ट टाकली असेल तर ती मी वापरत नाही. म्हणजे त्यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे. सार्वजनिक माहितीला छेदून व्यक्तिगत माहितीचा वापर त्यांच्या संमतीशिवाय करणं हे खासगी जीवनावर केलेलं हनन आहे. पुढं ते म्हणतात, फेसबुकनं विश्वासघात केलाय. ज्या विश्वासावर लोक असप्लि माहिती नोंदतात त्याचा गैरवापर करणं हे त्यांच्या मूलभूत हक्कावर केलेलं आक्रमण आहे. हीच मूळ समस्या आहे. हे प्रकरण जेवढं केंब्रिज एनालिटिकाशी संबंधित आहे तेवढंच ते फेसबुकशीही संबंधित आहे. साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर केंब्रिज एनालिटिका नीरव मोदी आहे तर फेसबुक पंजाब नॅशनल बँक आहे. यात दोघेही तेवढेच दोषी आहेत. असं सांगितलं जातं की, चक्रवर्ती यांनी जी काही तुलना केलीय ती फारशी योग्य नाही. फेसबुक आणि ट्विटरवर ज्या पोस्ट केल्या जातात त्या सगळ्याच सार्वजनिक आहेत. फक्त व्यक्तिगत संदेश आणि खातं उघडताना दिली जाणारी माहिती सोडून.

भारत सरकारनं २३ मार्च२०१८ ला केंब्रिज एनालिटिका आणि २८ मार्च २०१८ ला फेसबुकला कारणे दाखवा नोरीस बजावली आहे. सरकारनं फेसबुकला विचारलंय, सुरक्षेसाठी फेसबुक तात्काळ कोणती व्यवस्था करीत आहे. कसरत भारतातल्या लोकांशी संबंधित माहितीचा वापर निवडणुकांवर परिणाम करण्यासाठी होऊ शकणार नाही. सरकारनं फेसबुककडून हेही विचारलंय की, भरतातल्या लोकांची व्यक्तिगत माहिती लीक झालीय का? फेसबुक आणि त्यांच्याशी संबंधित इतर दुसऱ्या कंपन्यांनी ह्या माहितीचा दुरुपयोग निवडणुकीवर परिणाम करण्याचा प्रयत्न झालाय का? आणि डेटा सुरक्षा करण्यासाठी कोणत्या उपाय योजना केल्या आहेत? केंब्रिज एनालिटिकानं असा दावा केलाय की, भारतातल्या लोकांशी संबंधित फेसबुकवरून अशी कोणतीही माहिती बेकायदेशीररित्या काहीही मिळवलेली नाही. पण ही माहिती जनमत सर्व्हेक्षण आणि शोधाद्वारे मिळाली आहे. २६ जुलै २०१८ रोजी केंद्रीय सूचना आणि प्रसारण, दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी संसदेत सांगितलं की, फेसबुक वापरणाऱ्या भारतीयांशी संबंधित व्यक्तिगत माहिती केंब्रिज एनालिटिकाकडून संभावित दुरूपयोग प्रकरणाची चौकशी सीबीआयला सोपविण्यात आलीय. दरम्यान कॅलिफोर्निया इथल्या फेसबुक मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी चिंता व्यक्त केलीय की, फेसबुकवरील माहितीची सुरक्षितता संदर्भात उपाययोजना करण्यासाठी जो काही मोठा खर्च करावा लागणार आहे, त्यानं पुढच्या अनेक वर्षातला नफा कमी होणार आहे.

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...