Thursday 8 May 2014

शिमगा, शिवी आणि ओवी!

शिमगा, शिवी आणि ओवी!
सोनोपंत हांडेकर, साखरे महाराज, म.शं. गोडबोले अशा माऊलीच्या अभ्यासकांनाही ही शिवी गवसली नाही. त्यांनी त्याचा थातूरमातूर अर्थ केला, असे धोंडांचे म्हणणे आहे. शिव्या देणार्‍यांना ‘तुझ्या आईला’ या शब्दापासून सुरू होणार्‍या शिव्या कशा झटपट तोंडातून निघतात, हे सांगायला नको. ‘तुझ्या आईला’ ही सुरुवात आणि तीन शब्दाचा शेवट या आठ अक्षरात निरनिराळी जनावरे पतीखेरीज दुसरा पुरुष अथवा जे सुचेल, वाटेल ते घालून शिव्यांची ङ्गैरी झाडली जाते. धोंड याला ‘कुमार क्रोध क्षोभण’ मंत्र म्हणतात. कुमार म्हणजे पुत्र आणि बीजाक्षरे म्हणजे ‘तुझ्या आईला’ या शब्दापासून सुरू होणार्‍या शिव्या! असे धोंडांचे विवेचन आहे. ते प्रत्यक्षात वाचल्याशिवाय शिव्या आणि त्याचा दर्जा याचे ज्ञान प्राप्त होणार नाही. अशिष्ट भाषा न वापरता शिष्ट मंडळी एखाद्याचा कसा आणि किती उध्दार करतात हे ह्या शिमग्याच्या मुहूर्तावर समजून घ्यायला काय हरकत आहे?
होळी रे होळी पुरणाची पोळी|
साहेबाच्या वर बंदुकाची गोळी|
साहेब मेला संध्याकाळी...
यासारखी आणि
होळीच्या गवर्‍या पाच पाच
चल् गं पोरी नाच नाच...
अशी कवनं होळीच्या दिवशी घुमायची, गळ्यात ढुमकं बांधून जाम धांगडधिंगा व्हायचा. आता काळाच्या ओघात हे वातावरण ङ्गारसं दिसत नाही. गाण्याच्या भेंड्या जशा लावल्या जातात, तशा शिव्याच्या भेंड्या लावल्या जात होत्या. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. होळीच्या काळात शिव्यादेखील ‘बुरा न मानो होली है’ असं म्हणत म्हटल्या जातात. शिवी आणि ओवी या दोघांत एका अक्षराचाच ङ्गरक आहे. ओवी संतांची. म्हणजे, सज्जनांची अन् शिवी दुर्जनांची, असा सर्वसाधारण समज आहे.
माऊली म्हणजे ज्ञानेश्‍वर महाराज! अमृताशी पैजा जिंकणारी स्पर्धा करेल अशी शब्दकळा त्यांना अवगत होती. ज्ञानेश्‍वरांच्या या शब्दकळेत शिव्या होत्या कां? याचा तपासमात्र घेतला गेलाय. या माऊलीने कुणाला दुखावण्याचा प्रश्‍नच नव्हता. पण ज्ञानेश्‍वरांनीही विषयलंपटांना आपल्या शैलीतून शिव्या दिल्या आहेत, असं कांही विद्वानांनी शोधून काढलंय. रा.चिं. ढेरे यांनी ‘शिवी आणि समाजेतिहास’ या त्यांच्या लेखात अगदी शिवीच्या उगमापासूनचा इतिहास सांगितलाय. मराठीतल्या अनेक शिलालेखांत गाढवांचा उपयोग करून शिव्या दिल्याचे दिसते. याला ‘गधेगाळ’ असं नांव असून, हे गधेगाळ शब्द आणि शिल्प दोन्ही रूपात शिलालेखातून साकारल्याचेही दिसते. आई बहिणींचा आणि गाढवांचा संबंध शब्दरूपात आणि चित्ररूपात व्यक्त करण्याची ही परंपरा केवळ प्राकृत नाही, सुसंस्कृतही आहे. वसईतल्या एका शिलालेखात गाढवाबरोबरच घोड्यांचाही वापर करण्यात आला आहे. रा.चिं. ढेरे यांनी आपल्या लेखात ज्ञानदेवांनी ‘खर’ या दृष्टांताच्या परिच्छेदात जे सांगितलंय त्यातला कांही भाग असा आहे. शिमग्याच्या काळात उगाच अटक मटक ङ्गास्टङ्गूड वळणाच्या शिव्या खूप ऐकायला मिळतात. पण माऊलींची शैली ती माऊलींची शैली. ज्ञानदेवांचा ‘खर’ दृष्टांत आपल्यापुढे ठेवताना ढेरे म्हणतात- ‘साच आणि मवाळ; तसेच मितले आणि रसाळ’ असे अमृतकल्लोळासारखे शब्द त्यांच्या मुखातून स्रवत होते ते ज्ञानदेव, ऋतुजा आणि मधुरता यांचा प्रकर्ष ज्यांच्या वाणीत झाला आहे ते ज्ञानदेव, आपल्या रसनेला शिव्यांचा स्पर्श होऊ देणार नाहीत असे आपणास वाटणे साहजिक अन् स्वाभाविक आहे. विशेषतः सात्त्विक संतापही ज्यांनी कधी जवळ केला नाही, खळांची खळाळता सांडावी याचसाठी ज्यांनी करुणेची शिंपण केली, ते कुणाला शिव्या देतील अशी कल्पनाही करवत नाही. परंतु, आपल्या या अपेक्षेला ज्ञानदेवांच्या मृदु-मधूर वाणीनेही एक सौम्यसा धक्का एकदा दिलेला आहे. तेराव्या अध्यायात अज्ञान विवरणप्रसंगी विषयासक्तीचे वर्णन करताना ज्ञानदेवांनी म्हटले आहे-
खरी टेंको नेंदी उडे|
लातौनी ङ्गोडे नाकाडे|
तर्‍हा जैसा न काढे| माघौता खरु॥
तैसा जो विषयांलागि|
उडी घाली जळतिये आगी|
व्यसनाचि आंगि| लेणी मिरवी॥
(गाढवीण गाढवाला स्पर्श करू न देता, उसळून मागील लाथेने त्याचे नाकाड ङ्गोडते. तरीही, ज्याप्रमाणे गाढव मागे सरत नाही, त्याप्रमाणे विषयासक्त पुरुष जळत्या आगीसारख्या स्त्री देहाचा उपभोग घेण्यासाठी झेपावतो आणि त्या भोगातून प्राप्त होणारी संकटे ही शरीरावरील अलंकारासारखी मिरवितो.)...
हा दृष्टांत म्हणजे ज्ञानदेवांनी विषयालंपटांना दिलेली एक तिखट शिवीच आहे. ‘लोकसाहित्याचा शोध आणि समीक्षा’ या रा.चिं. ढेरे यांच्या पुस्तकातला हा ‘शिव आणि समाजेतिहास’ हा लेख त्यासाठी महत्त्वाचा वाटतो. शिव्या देण्यासाठी त्या याव्या लागतात आणि त्या नुसत्या याव्या लागत नाही, तर त्या कळाव्याही लागतात. त्याशिवाय त्यात ठसका आणि झटका येत नाही. मोठमोठ्या विद्वानांनासुध्दा शिवी कळत नाही. ज्ञानदेवांसारखे शब्दप्रभु जेव्हा शिवी देतात वा कुणी दिलेली शिवी सांगतात, तेव्हा तर, ज्ञानेश्‍वरीची वर्षानुवर्षे पारायणे करणारे, ज्ञानेश्‍वरीवर प्रवचन ठोकणारे आणि समीक्षक म्हणून सदासर्वदा कांहीतरी खरडणारे सुध्दा साङ्ग चकतात. त्यांना त्या शिवीतले सुध्दा कळत नाही.
तुम्हाला गंमत वाटेल, पण ज्ञानेश्‍वरीत एक महान शिवी असल्याचं म.वा. धोंड यांनी शोधून काढलंय. ही महान शिवी स्पष्ट करून सांगण्यासाठी त्यांनी एक लेखच लिहिलाय. ‘ज्ञानेश्‍वरीतील लौकिकसृष्टी’ या पुस्तकात या लेखाचा समावेश आहे. ज्ञानदेवांची महान शिवी सांगताना त्यांनी ज्ञानदेवांच्या कांही लहान शिव्यांचे दाखलेही ‘ज्ञानेश्‍वरी’मधून शोधून काढलेत. त्यात रा.चिं. ढेरे यांनी शोधलेला खर दृष्टांत नाही. पण राजा धृतराष्ट्राला ज्ञानदेवांनी म्हैस म्हटलंय; ही एक शिवीच असं धोंड म्हणतात. असूर चुकूनही खरं बोलणार नाहीत. हे सांगताना ‘ज्ञानदेवांनी त्यांच्या तोंडाला चक्क गांड म्हटले आहे,’ असं धोंड म्हणतात. आणि मग ज्ञानदेव तो अशिष्ट शब्द न उच्चारता नागरूपात तसं सांगतात, असा खुलासाही करतात. धर्मकृत्य हे इहपरलोकी हितकारक असले तरी त्याचा डांगोरा पिटल्याने ते सत्कृत अहितकारी ठरते, हे स्पष्ट करताना त्या डांगोर्‍याला ज्ञानदेव स्वतःच्या जननीस चव्हाट्यावर नागवे करण्याची उपमा देतात...
‘जैसी आपुली जननी|
नग्न दाविलेया जनी’
ही गोष्टही धोंड नोंदवतात आणि मग या सर्वाहून भारी म्हणजे महान शिवी कोणती, याकडे वळतात.
तेवि कुमारू क्रोधू भरे|
तैसेयां मंत्राचि बीजाक्षरे
तिथे निमित्यें ही अपारे| भीनलेया॥
परिधाता ही पाया पडता|
नूढी गतायु पांडुसूता|
तैसा नुपजे उपजविता क्रोधोर्मि तो॥ (१२०/८)
या दोन ओव्यात ही महान शिवी दडलीय. सोनोपंत हांडेकर, साखरे महाराज, म.शं. गोडबोले अशा माऊलीच्या अभ्यासकांनाही ही शिवी गवसली नाही. त्यांनी त्याचा थातूरमातूर अर्थ केला, असे धोंडांचे म्हणणे आहे. शिव्या देणार्‍यांना ‘तुझ्या आईला’ या शब्दापासून सुरू होणार्‍या शिव्या कशा झटपट तोंडातून निघतात, हे सांगायला नको. ‘तुझ्या आईला’ ही सुरुवात आणि तीन शब्दाचा शेवट या आठ अक्षरात निरनिराळी जनावरे पतीखेरीज दुसरा पुरुष अथवा जे सुचेल, वाटेल ते घालून शिव्यांची ङ्गैरी झाडली जाते. धोंड याला ‘कुमार क्रोध क्षोभण’ मंत्र म्हणतात. कुमार म्हणजे पुत्र आणि बीजाक्षरे म्हणजे ‘तुझ्या आईला’ या शब्दापासून सुरू होणार्‍या शिव्या! असे धोंडांचे विवेचन आहे. ते प्रत्यक्षात वाचल्याशिवाय शिव्या आणि त्याचा दर्जा याचे ज्ञान प्राप्त होणार नाही. अशिष्ट भाषा न वापरता शिष्ट मंडळी एखाद्याचा कसा आणि किती उध्दार करतात हे ह्या शिमग्याच्या मुहूर्तावर समजून घ्यायला काय हरकत आहे?
नारायण राणे-उध्दव ठाकरे यांचे शब्दबाण, ठाकरे आणि ठाकरेंसह समस्त शिवसेनेवर नेत्यांवर शिंपडलेला शेणखळा, मुलायम-अमरसिंह यांनी सोनियाजींच्या आड उभ्या झालेल्या समस्त शिखंडींवर चालवलेले शरसंधान आणि ‘बारा’ या आकड्याचे बार भरून बारामतीकर वीर मराठ्यावर समस्त इटालियन बटालियनने चढवलेले हल्ले हा सगळा पोरखेळ आहे. अस्सल शिव्या कशा द्यायच्या याचं शास्त्र आणि शस्त्र या किरकोळ मंडळींना पेलणार नाही. महात्मा ङ्गुले, विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक, आगरकर, अच्युतराव कोल्हटकर, भालाकार भोपटकर, दिनकरराव जवळकर, प्रबोधनकार ठाकरे आदि खानदानी घराणी या क्षेत्रात मराठदेशी होऊन गेले आहेत. प्रत्येक गोष्ट संस्कृती परंपरेच्या अभ्यासासाठीच असते, असे भासवणार्‍या चमनगोट्यांना स्मरून सांगतो. शिवीगाळीसारखा निंद्य सामाजिक आचारही सांस्कृतिक परंपरेचा वेध घेण्यासाठी कसा अभ्यासनीय आहे हे यावरून लक्षात यावे म्हणून हे लिहितोय. ..................... हरीश केंची

1 comment:

  1. केंची साहेब, आपण एक चांगला विषय अभ्यासासाठी सुचवला आहे. लेखात सांगितलेल्या संदर्भ साहित्यापेक्षा अजून काही उपलब्ध साहित्य असल्यास सुचवावे...

    ReplyDelete

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...