Sunday, 25 May 2025

युद्धबंदी सरकारची, लक्ष्य मात्र अधिकारी...!

युद्धबंदीच्या निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष ट्रॅम्प्स यांनी जाहीर केला. तो निर्णय राणा भीमदेवी थाटाचा वल्गना करणाऱ्या भाजपने मान्य केला. मिट्टी में मिला दे.....! चुन चुन के मारेंगे.....! म्हणणारे अगदी गपगार झाले. युद्ध मागे घेतलं गेलं, तो निर्णय सरकारचा होता;  कोणत्याही अधिकाऱ्याने तो घेतलेला नव्हता, नाही. मात्र त्यासाठी अधिकाऱ्याला जबाबदार धरलं गेलं. हे अत्यंत असंवेदनशील, निंदनीय, लज्जास्पद, आक्षेपार्ह आणि दुर्दैवी आहे की, काही समाजकंटक-गुन्हेगार घटक देशाच्या एका अत्यंत उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर अन् त्यांच्या कुटुंबावर अत्याचाराच्या सर्व मर्यादा उघडपणे तोडत आहेत, परंतु त्यांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी, भाजप सरकार किंवा त्यांचे कोणतेही मंत्री पुढे येऊन अशा अवांछित पोस्ट पोस्ट करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्याबद्दल बोलत नाहीत. 
---------------------------------------
अशा पोस्ट आणि विधानांमुळे देशासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मनोबल खचते. भाजप सरकार आपल्या अपयश आणि अपुरेपणापासून लक्ष दुसऱ्याकडे वळवून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल का? भाजप सरकारकडून आमची उघड मागणी आहे की या सर्वांची तात्काळ सखोल चौकशी करावी आणि त्यांच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्स, बँक अकाउंट्स आणि ई-पेमेंट अकाउंट्सची संपूर्ण माहिती मिळवावी. आज, ताबडतोब, आत्ताच, ईडी, सीबीआय, सायबर सुरक्षा आणि इतर तपास संस्थांना कामाला लावले पाहिजे आणि त्यांच्या मागे कोणत्या शक्ती काम करत आहेत आणि हे देशद्रोही लोक कोणत्या परदेशी शक्तींकडून पैसे घेऊन देशातील शांतता आणि सौहार्द बिघडवत आहेत हे शोधून काढले पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली प्रत्येक छोट्या मुद्द्यावर प्रतिष्ठित यूट्यूब चॅनेल बंद करणारे भाजप सरकार अशा लोकांबद्दल गप्प का आहे? जर हे सर्व भाजपच्या संमतीने घडत नसेल, तर हा आणखी गंभीर मुद्दा आहे आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक आहे कारण असे घटक देशात बसले आहेत आणि भाजप सरकार त्यांचे कोणतेही नुकसान करू शकत नाही. हे तेच लोक आहेत जे उघडपणे कोणाविरुद्धही विषारी गोष्टी लिहितात पण त्यांच्या केसालाही इजा होत नाही. काही पैशांसाठी विकले जाणारे हे लोक कोणाशीही संबंधित असू शकत नाहीत. जर भाजप सरकारने अशा लोकांना रोखण्यासाठी २४ तासांच्या आत कोणतीही कारवाई केली नाही, तर देशातील जनतेला हे समजण्यास वेळ लागणार नाही की हे कोणाचे लोक आहेत, ते कोणासाठी काम करतात, त्यांचे संरक्षण कोण करत आहे आणि का करत आहे. भाजपचे मौन हे त्याचा सहभाग मानले जाईल. अतिशय घृणास्पद गोष्ट घडतेय काल पासून.
भक्त, आयटी सेल, भाजप कार्यकर्ते अक्षरश: थयथयाट करू लागले. त्यांची मानसिक स्थिती इतकी बिघडली गेली की त्यांनी विक्रम मिस्त्री यांना शिव्या द्यायला सुरुवात केली. नुसत्याच शिव्यांवर थांबले नाहीत तर त्यांच्या मुलीला बलात्काराच्या थ्रेड द्यायला सुरुवात केली. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांना आपले ट्विटर अकाऊंट लॉक करावे लागले. कारण ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल आणि आपण या नव्या भारतात राहतो, हे मनाला पटणार नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी संदर्भात ट्विट करून युद्ध थांबल्याचे जाहीर केले. त्यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. ना परराष्ट्र मंत्रालयाने ना गृहखात्याने ना प्रधानमंत्री कार्यालयाने. पण या सगळ्याचा बळी पडले ते एकटे विक्रम मिस्त्री. 
युद्ध संपताच रक्ताला आसुसलेले  
या ट्रोलिंग ला कंटाळून शेवटी विक्रम मिस्त्री यांनी आपले ट्विटर अकाऊंट लॉक करायचा निर्णय घेतला. हे सगळे ओपन प्लॅटफॉर्म वर चालू आहे. जागतिक पातळीवर विक्रम मिस्त्री मोठी हस्ती आहेत. त्यांना जगभरातील लोकं फॉलो करतात. भारत पाकीस्तान युद्धाला सुरुवात झाल्यापासून त्यांच्या भूमिकेला जगभरातून ऐकणारे लोकं आहेत. अशातच अशा ट्रोलिंगने भक्तांनी, भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जगभर आपली शिवराळ, घाणेरडी संस्कृती पोहोचवली. २०१४ पासून या भक्तांचा उदय झाला. त्यांना देशाशी काही मतलब नाही. फक्त मोदी मोठे झालेले हवेत. यांना रक्तरंजित भारत हवाय. यांना दुसऱ्यांच्या प्रार्थनास्थळासमोर थैमान घालायला हवे आहे. भारत देश नासला तरी चालेल पण मोदींना हरताना बघायचे नाही. मला तर आता शंका वाटतेय, भविष्यात कधी मोदी हरले तर हे भक्त देश पेटवायला मागेपुढे जराही विचार करणार नाहीत. खूपच चिंताजनक आणि घृणास्पद अवस्थेत भारत पोहोचला आहे. ही नव्या भारताची संकल्पना असेल तर नको आम्हाला नविन भारत. २०१४ च्या आधीचा शांत, संयमी, एकमेकांचा आदर करणारा भारत आम्हाला परत द्या.
इंदिरा गांधी जितक्या कणखर नेत्या होत्या तितक्याच त्या चाणाक्ष डिप्लोमॅट, मुत्सद्दी होत्या. १९७१ च्या युद्धाच्या वेळेस अमेरिकेच्या पाठिंबा मिळवण्यासाठी त्या तिकडे गेल्या होत्या तेव्हा अमेरीकेचे अध्यक्ष निक्सन आणि इंदिराजी मध्ये जो काही संवाद झाला होता, तो किती तरी हाय व्होल्टेज  तर होताच, पण आपण मदत, सहानभूती मागतोय म्हणजे आपण शरण जातोय असे न वाटता जे काय बोलल्यात त्याला तोड नाही. इंदिराजी अमेरिकेत गेल्यानंतर हाऊसच्या हिरवळीवर इंदिराजींचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी निक्सनबरोबर परराष्ट्र मंत्री रॉजर्स, अमेरिकेचे सरसेनापती जनरल वेस्टमुरलँड आणि सर्व नागरी आणि लष्करी बडे अधिकारी उपस्थित होते. इंदिराजीचा हिरवळीवर प्रवेश होताच आणि त्या समोर दिसताच निक्सन पुढे येऊन हस्तांदोलन करताना हसत म्हणले, "we should have spread the red carpet from india to the states to welcome you mrs.gandhi! But... निक्सन यांच्या बोलण्यातला खवचटपणा इंदिराजींच्या लक्षात आला आणि निक्सन पुढे बोलण्याच्या आधीच त्या म्हणाल्या, थँक्यू प्रेसिडन्ट! we are the moment battling the policies of your demagogue general Yahyakhan! आमचं सारं उपखंडच याह्याखानाच्या तावडीत सापडलं आहे... लाल गालीच्यावरच स्वागत करून घेण्यासाठी काही मी इथे आलेले नाही. निक्सनने पुन्हा खोचकपणे म्हणाले, पण लाल गालिचा तर आपल्या पायाखाली अंथरलेलाच आहे...! भारत-रशिया वाढते मैत्री संबंध आणि त्यातून मूर्त रुपाला आलेल्या कराराला उद्देशून हे बोलणं असल्याचे इंदिराजींच्या लक्षात आलं. त्या हसून म्हणाल्या, काट्याकुट्यांप्रमाणे गालीच्यावरून चालण्याची आम्हाला चांगली सवय आहे. सध्या तरी आमचा रस्ता काटकुट्यांनी भरलेला आहे... आणि परराष्ट्र मंत्री यांच्याकडे बघत त्या म्हणाल्या, हे काटे फार मोठे आहेत. यावर निक्सन हसत म्हणाले, 'काट्यांची फुलं व्हायला काय वेळ लागतो...?' पुढे असेच बोलणे चालू असताना निक्सन म्हणाले की, इंडियन समरची आठवण करून देणारं हे ऊन आहे नाही का? इंदिराजी त्या उन्हाकडे बघत म्हणाल्या, 'some times there are clouds also'! कित्येक वेळा पडलेलं ऊन ढगांना बघवत नाही...!' पुढे स्वागतसोहळा सुरु झाला, निक्सन यांनी भाषण केले. इंदिराजी कशा मोठ्या लोकशाही देशाच्या प्रतिनिधी आहे असे गोड बोलून झाले. यात भारत-रशिया कराराचा राग त्याचा भाषणात होताच.
यावर उत्तरपर भाषण देताना इंदिराजी म्हणाल्या की, जगातील आमच्या भागात निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल अमेरिकेची सहानभूती लाभावी म्हणून मी इथे आले आहे. बांगला देशातील घडामोडी म्हणजे निव्वळ मानवनिर्मित शोकांतिका आहे. बांगला देशातील येण्याऱ्या लक्षावधी निर्वासितांनी माझ्या मनाला मनस्वी धक्का बसला आहे. त्यांना कोणत्या दारुण परिस्थितीत देश सोडावा लागला याची कल्पना त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर येते. सारी माणुसकीच पायातळी तुडवली जात असताना तुमचं हे स्वागत मला कसं गोड वाटणार? साहाय्याची हाक मारण्यासाठी मी इथे आले आहे. याप्रसंगी आपकी साद हवी आहे. सक्रिय सहानुभूतीची साद हवी आहे.
स्वागत समारंभ पार पडला आणि वेळ आली मुख्य वाटाघाटीची. मुख्य वाटाघाटीत इंदिराजींनी बांगला देशाच्या परिस्थितीचे अवस्था मांडत त्याला जोड भारतीय संस्कृतीची दिली. तसेच भारत-पाकिस्तान, बांगलाला जोडण्याऱ्या नद्या रक्ताने वाहत असल्याचे दाखले दिले. तसेच लिंकनचा संदर्भ देत म्हणाला की घर एकदा दुभंगला म्हणजे ते कधीच उभं राहू शकत नाही. अर्धवट स्वातंत्र्य कधीच शेवटाला जात जात नाही. यात अजून भर घालून १९६० सालचा केनेडींचा संदर्भ देऊन तर निक्सन यांना बावचळून टाकले. निक्सन यांना कळून चुकले होते की, ही बाई खतरनाक असून हिचे जुन्या इतिहासाचे धडे तोंडपाठ आहेत आणि आता नवीन भूगोल निर्माण करण्यासाठी निघाली आहे.
शेवटी निक्सन यांनी सहानभूती दाखवली पण इंदिराजी यांना कळून चुकले की, ही सहानभूती काही कामाची नसून उलट अजून आगीत तेल ओतण्यासारखे आहे. अमेरिकेतून बाहेर पडताना त्यांनी जे करायचं ते आपल्यालाच करायचे आहे परंतु अमेरिकेने आडकाठी आणली तर ही सहानुभूतीचे हत्यार बाहेर काढायचे आणि पुढे इंदिरा गांधीने साहसी पाऊल उचलून पाकिस्तानचे विभाजन गेले. फाळणी झाल्यानंतर पूर्ण देश त्यांच्या मागे उभा राहिला कारण इंदिराजींवर त्यांचा विश्वास तर होताच पण त्यांच्या बुद्धीचातुर्याची खात्री देखील होती. आज घडीला इंदिराजींनी उचलेलले धाडसी जगाच्या इतिहासात अभ्यासाचा विषय आहे. त्यांनी लष्कराला केलेले मार्गदर्शन आणि हाताळलेली परिस्थिती याला तोड नाही. त्यांच्या मुत्सद्दीपणामुळे पुढे निक्सन चा तिळपापड झालाच झाला आणि ही बाई पुढे आपल्यासाठी थ्रेट निर्माण करू शकते याची दहशतही निक्सन च्या मनात निर्माण झाली.
संदर्भ : आनंद भवन-भा.द.खेर

No comments:

Post a Comment

मराठीच्या मरणकळा.....!

"पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू येत्या पाच तारखेला मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताहेत. ...