Saturday, 8 November 2025

कार्ल मार्क्स...

गोर्बाचोव यांच्या निधनानंतर जे अनेक लेख प्रसिद्ध झाले त्यात गोर्बाचोव यांनी पूर्व युरोपातील राष्ट्रवादी कम्युनिस्ट प्रभावाखालील राष्ट्र मुक्त केल्याचा उल्लेख होता. हे खरं आहे पण त्यामुळे कम्युनिझमचा प्रभाव कमी झाला नाही आणि अर्थात कार्ल मार्क्सच्या विचाराचा देखील. उलट जॉन कॅसिडी या अर्थशास्त्रावर नियमितपणे लिहिणाऱ्या लेखकाने, न्यू यॉर्कर मधे १९९८ मार्क्स परत येतोय अशा आशयाचा एक  लेख लिहिला. थॉमस पिकेटी यांनी कॅपिटल इन द २० सेंचुरी हा ग्रंथ लिहिला आणि मुठभर लोकांच्या हाती कशी सत्ता आणि पैसा एकत्र केला आहे ते दाखवून दिले.म्हणूनच मार्क्सचे विचार समजून घेणे नेहमीच आवश्यक ठरत आला आहे आणि कुठलाही विचार समजून घेण्यासाठी त्या माणसाचं चरित्रही थोडं ठाऊक हवं.
------------------------------------
कार्ल मार्क्सचा जन्म १८१८ मधला. त्याचे चरित्रकार सांगतात की त्याची तुलना केवळ जीजस किंवा महम्मद यासारख्या धार्मिक महान व्यक्तिमत्त्वांशी होऊ शकेल इतका त्याचा प्रभाव मोठा आहे. १० पैकी ६ माणसं या जगातील ही मार्क्सवादी सरकारच्या अधिपत्याखाली आहेत आणि हे सरकारं मार्क्सवादी तत्त्वावर चालतात. चीन आणि रशिया हेच त्याचे मोठे उदाहरण आहे.
केवळ कम्युनिस्ट समाजातच त्याचा प्रभाव आहे असं नाही तर ज्याला कंझर्व्हेटिव्ह  सरकार म्हणतात. त्यांनीही अनेक क्रांतिकारी मार्क्सवादी विरोधकांना संपवण्यासाठी सामाजिक सुधारणा राबवल्या. जगभरच्या राजकारणाचा भाग पाहिला तर त्यातही मार्क्सवाद प्रबळ दिसतो कारण मार्क्सवादाचा उल्लेख केल्याशिवाय कुठलाही समाज चालू शकत नाही. सर्वच देशात मुक्त  मोठ्या प्रमाणावर डावे विचारवंत दिसतात, डाव्या विचारांनी भारलेले ग्रंथ दिसतात. नॉम चॉमस्कीपासून ते स्टालिन-लेनिनपर्यंत अनेकांनी मार्क्सवादी साहित्यात प्रचंड भर टाकलेली आहे. साहित्य समीक्षा, चित्रपट समीक्षा, कला समीक्षा कविता समीक्षा सर्वांमध्ये प्रबळपणे मार्क्सवादाचा सढळपणे वापर झालेला दिसतो. मार्क्सच्या कल्पनांनी आधुनिक समाज शास्त्र तसेच इतिहास आणि तत्त्वज्ञान, साहित्य, कला सगळ्याच्या अभ्यासात वेगळीच भर टाकली आणि कलाटणी दिली. त्या अर्थाने पीटर सिंगर सारखा त्याचा चरित्रकार म्हणतो की आपण सगळेच आता मार्क्सवादी आहोत खूप मोकळ्याअर्थाने. 
त्याचा जन्म जर्मन म्हणजे ट्रायर शहरात  झाला. त्याचे वडील हेन्रीकआणि आई म्हणजे हेन्रीटा. दोघांचेही मूळ ज्यूईश होतं. पण नंतर काल मार्क्सच्या जन्माआधी त्यांनी प्रोटेस्टंट पंथाचा त्यांनी स्वीकार केला. कारण हेन्रीकला वकिली करायची होती आणि ज्यूईश असताना ते शक्य नव्हतं.  कुटुंब खाऊन पिऊन सुखी होतं. अगदी क्रांतीकारी विचार नसले तरी लिबरल ज्याला म्हणतात अशा विचारांचं ते होतं. राजकारण समाजकारण, धर्म या सर्वाबाबतीत त्यांची मतं लिबरल मानली जावीत अशी होती. 
वयाच्या सतराव्या वर्षी बॉन इथल्या विद्यापीठात वकिलाचा अभ्यास करण्यासाठी मार्क्सने प्रवेश केला. पण अत्यंत वाह्यात वागणं, अनिर्बंध खाणंपिणं आणि त्याला प्रचंड गुंडगिरी, दारू पिल्याचे आरोपावरून एकदा अटक झाली तर एकदा हाणामारीत जखमी झाला. आपली लहानपणापासूनची मैत्रीण जेनीवर प्रेम करू लागला. ही बुद्धिमान होती आणि तिच्यासाठी तर प्रेम पत्र लिहू लागला, प्रेम कविता लिहू लागला. वडिलांना त्याचा हे सगळं बेधुंद वागणं आवडलं नाही आणि त्यांनी त्याला परत बोलावलं आणि थोडं अभ्यासाकडे गंभीरपणे लक्ष द्यावं म्हणून बर्लिन विद्यापीठात त्याला प्रवेश करायला लावला. 
त्या विद्यापीठात त्याला अनेक समविचारी लोक भेटले. विचारवंत अभ्यासक  लोक भेटले. एके काळी हेगेल शिकवत होतात. त्यामुळे त्याला मोठे बौद्धिक परंपरा होती त्यामुळे मार्क्स वकिली शिकता शिकता तत्त्वज्ञानाकडे वळला.  आपल्याला लेक्चरर म्हणून नोकरी मिळावी म्हणून डॉक्टरेट थेसिस  ज्याला आज पीएचडी  म्हणतात ते करायला सुरुवात केली. हा थेसिस अभ्यासपूर्ण परंतु वेगळ्या विषयावर होता. डेमोक्रेटस त्या ग्रीक तत्त्वज्ञ आणि  एपीक्यूरस हा दुसरा ग्रीक तत्त्वज्ञ. त्यांच्या तत्वज्ञानातील फरक असा विषयावर तो घेऊन मार्क्सने विलक्षण संशोधन केलं आणि हेगेलच्या तत्त्वज्ञानाचा वापर करून या दोघांमधला फरक दाखवून दिला. तत्कालीन जर्मन विचारांचा आढावा घेतला. वयाच्या २३ व्या वर्षी म्हणजे १८४१ साली हा त्याचा पीएचडीचा प्रबंध स्वीकारण्यात आला परंतु त्याला लेक्चररशिप मिळाली नाही. 
प्राध्यापकाची नोकरी न मिळाल्यामुळे मार्क्सने चरितार्थासाठी आणि अर्थातच आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची जी बुद्धिमान माणसाला हौस असते त्यापायी सामाजिक, राजकीय,  तत्त्वज्ञान या विषयांवर लिहायला सुरुवात केली. त्यावेळेस एक नुकताच नवीन पेपर सुरू झाला होता. ज्याचं नाव होतं रायनेश गॅझेट (रायनेश झायटू) या संपादकांना त्याचे लेख आवडत आणि त्यातील बुद्धिमत्तेची खोली त्यांना जाणवत होती. पण त्याच्या  संपादकांनी १८४२ साली राजीनामा दिला. आणि सर्वांसमोर संपादक म्हणून नाव आले ते मार्क्सचे. पण हे संपादक पद अल्पकाळ टिकलं. अर्थात मार्क्सचा त्यात काही दोष नव्हता. पण प्रशियन सरकारच्या सेन्सर बोर्डाला यातील लेखन आवडत नव्हतं. विशेषत: कार्ल मार्क्सने मोजेल ही जी दरी होती ज्यात वाईन बनवली जात असे. त्या कामगारांच्या व्यथेकडे लक्ष वेधलं होतं आणि खळबळ ज्याने लेख लिहिले होते. सरकारला ते आवडले नसल्यामुळे त्यांनी पेपरवर दबाव टाकला आणि तो बंद झाला.
अर्थात त्याला दुसरे पर्याय शोधणे भाग होतं पण संपादकीयमधून मोकळा झाल्यावर तो इतर अनेक विषयांचा अभ्यास करू लागला. विशेषतः त्याला हेगेलच्या राजकीय तत्त्वज्ञानात आणि त्या काळातील त्या सर्व दूर पसरलेलं आणि अत्यंत प्रभावी असे तत्त्वज्ञान होतं. दुसरं म्हणजे त्याला जेनीशी लग्न करायचे होते. पण त्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हतो सात वर्ष तो तिची प्रेम करत होता. त्याला जर्मनीत सोडून इतरत्र राहायचं होतं कारण जर्मनीतील सेंसॉरचा दबाव पाहून तो विटला होता. अर्थात लग्नासाठी पैसे आवश्यक होते आणि आता तर तो बेकार होता त्यामुळे लग्न कसं करणार. पण एक उमदा बुद्धिमान तरुण लेखक म्हणून त्याची प्रतिमा तयार होत होती. त्यामुळे त्याला तेव्हा सुरू होत असलेल्या नव्या प्रकाशन जर्मन फ्रेंच अनाल्स  नावाच्या नियतकालिकात संपादक म्हणून नोकरी मिळाली त्याच्यातून त्याला बऱ्यापैकी पैसे मिळाले. त्यांनी लग्न केले. कुठे जायचं हा प्रश्न होताच. त्यावेळेस फ्रान्समध्ये सेटल व्हावं असं त्याच्या डोक्यात होतं. शिवाय हे नियतकालिक फ्रेंच आणि जर्मन लेखक आणि वाचकांसाठी होतं. 
कार्ल मार्क्स आणि जेनी १८४३ च्या उन्हाळ्यामध्ये पॅरिसमध्ये आले. अनाल्ससाठी दोन लेख लिहिले. पण नियतकालिक देखील तसेच अल्पजीवी ठरलं. 
१८४४ च्या कार्यकाळात त्याने तत्त्वज्ञानविषयक आपल्या लेखनावर आणि वाचनावर भर दिला. हळूहळू त्याचा स्वतःचं असं तत्त्वज्ञान सुरू होत होतं आणि त्यात राजकारण, समाजकारण आणि अर्थशास्त्र. या तिन्ही गोष्टींचा वर्ण त्याचा वाचनात होता. पण खऱ्या अर्थाने तो अर्थशास्त्रीय तत्त्वज्ञानावर लिहू लागलाते एंजल्सचं लेखन वाचल्यावर. पण मार्क्स आता स्वतःला कम्युनिस्ट म्हणून घेऊ लागला होता. त्या काळात पॅरिसमध्ये समाज सुधारक आणि कम्युनिस्टन ही मांदियाळीच होती. त्याच्यात मार्क्सला अनेक मित्र गवसले. 
त्याच वर्षी मार्क्स आणि एंजल्स यांच्या भेटी सुरू झाल्या पहिल्या अंकात एंजल्स ने लिहिलाच होतं. सुरुवातीला त्यांचा जमलं नाही पण नंतर जवळजवळ दहा-अकरा दिवस ते दोघे एकत्र राहिले आणि भरपूर चर्चा केली. एंजल्स जर्मन उद्योजकाचा मुलगा होता पण त्याची कॉटन फॅक्टरी होती मँचेस्टर मध्ये. इंग्लंडमध्ये एंजल अत्यंत संवेदनशील तसाच बुद्धिमान वाचकही होता. त्याने अनेक जर्मन बुद्धिमत्तांमध्ये त्याची उठबस होती आणि त्यामुळेच  कार्ल मार्क्सचे आणि एंजल्सचे अनेक मित्र कॉमन होते. यातूनच पुढे तो अर्थविषयक लेखन करू लागला आणि त्यातून कॅपिटल या जगात  अंमल गाजवणाऱ्या ग्रंथाची निर्मिती झाली. पण त्याही अगोदर १८४८ साली पॅरिसमध्ये दोघांनी मिळून कम्युनिस्ट मॅनिफेस्टो ही ४०,००० शब्दांची पुस्तिका लिहिली. त्यावेळेस ते अनेक भाषेत प्रसिद्ध झाली आहे आणि आजही त्याची लोकप्रियता घटलेले नाही. जगातील कामगारांना एक व्हा, तुमच्याकडे गमावण्यासाठी बेड्यांशिवाय काही नाही हे त्यातलं वाक्य जगभरच्या कामगार चळवळीचा उदगार ठरलं.
५ मे १८१८ साली कार्ल मार्क्स यांचा ट्रायर येथे जन्म झाला. त्यांची लाडकी कन्या एलेनॉर यांनी १८८३ साली त्यांचे आयुष्य व कामाबाबत काही गोष्टी लिहून ठेवल्यात त्यातील काही अंश-
कार्ल मार्क्स यांचा ५ मे १८१८ साली ज्यू धर्मिय कुटुंबात जन्मात झाला. त्यांचे वडिल हे निष्णांत वकील होते. वडलांवर १८व्या शतकातील धर्म, विज्ञान, कलेबाबतीतील फ्रेंच विचारांचा मोठा प्रभाव होता. त्यांची आई ही हंगेरीयन ज्यू कुटुंबातील होती जे कुटुंब नंतर हॉलंडमध्ये स्थायिक झालं होतं. त्याच्या सुरुवातीच्या मित्रमंडळींमध्ये जेनी (ज्या त्यांच्या नंतर पत्नी झाल्या) आणि एडगर व्हॉन वेस्टफॅलेन यांची नावं घ्यावी लागतील. अर्धे स्कॉटिश असलेले त्यांचे वडिल बॅरन व्हॉन वेस्टफॅलन यांच्यामुळे मार्क्स यांना रोमॅन्टिक गोष्टींची आवड निर्माण झाली. मार्क्स यांचे वडिल त्यांना वोल्तेयर आणि रसिनबाबतचे धडे त्यांना देत तर वेस्टफॅलन त्यांना होमर आणि शेक्सपियर वाचून दाखवत असत. शेवटपर्यंत हे त्यांचे आवडते लेखक होते. शाळेतही कार्ल यांच्याभोवती त्यांच्या प्रचंड खोडकर स्वभावामुळे त्यांच्यावर प्रचंड प्रेम करणारे व त्यांच्यातील प्रचंड उपहासात्मक, व्यंगात्मक कोट्या करत लिहिण्याच्या क्षमतेमुळे त्यांना प्रचंड घाबरणारा असा गोतावळा असे. 
शालेय शिक्षणानंतर त्यांनी बॉन आणि बर्लिन विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे वडलांच्या समाधानासाठी त्यांनी कायद्याचे तर स्वतःच्या समाधानासाठी इतिहास आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. १८४२ साली बॉन विद्यापीठातच प्राध्यापक म्हणून रूजू होण्याची शक्यता त्यांच्या आयुष्यात तयार झाली होती. मात्र १८४० साली फ्रेड्रिक विल्यम तिसरा याच्या मृत्यूनंतर जर्मनीत सुरू झालेल्या राजकीय आंदोलनामुळे त्यांच्या आयुष्याला संपूर्णपणे वेगळी दिशा मिळाली. ऱ्हायनिश परगण्यातील उदारमतवादी नेते कॅम्फॉजेन आणि हेन्समॅन यांनी त्याच दरम्यान ऱ्हाइनीश गॅझेट नावाचे वर्तमानपत्र कोलोन शहरात सुरू केले होते. मार्क्स यांनी स्थानिक विधिमंडळावर केलेल्या उत्कृष्ट तर्कसंगत टिकेची चर्चा तेंव्हा सर्वत्र झाली होती. त्यांच्या या टिकेमुळेच त्यांना या वर्तमानपत्राचे अवघ्या २४ व्या वर्षीच संपादकपद मिळाले. आणि यानंतर त्यांच्या आयुष्यातील हुकुमशाहीच्या व विशेषतः प्रशियन हुकुमूशाहीच्या विरोधातील सर्वात मोठा संघर्ष सुरू झाला. हे वर्तमानपत्र सरकारच्या सेन्सॉरशीपखालीच मोडत असे. मात्र मार्क्स कायम त्यात सरकारविरोधी महत्त्वाच्या बातम्या व लेख प्रकाशित करत असूनही बिचाऱ्या सेन्सॉर सदस्यांना काहीही करता येत नसे. त्यामुळे सरकारने बर्लिनहून आणखी एका अधिकाऱ्याला सेन्सॉरवर पाठवले मात्र या दुहेरी सेन्सॉरशीपनेही मार्क्स यांनी सरकारला जुमानले नाही. अखेर सरकारने १८४३ साली या वर्तमानपत्रावर गदा आणली आणि ते बंद करायला भाग पाडले. नेमक्या याच वर्षी आपल्या लहानपणच्या मैत्रिणीशी ज्यांच्याशी त्यांचा सात वर्षांआधीच वाङ्निश्चय झाला होता त्या जेनी व्हॉन वेस्टफॅलन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर पती-पत्नी पॅरिस येथे गेले. पॅरिस इथे त्यांनी अरनॉल्ड रूज यांच्यासोबत डॉयचा फ्रान्सियजोशss यावूशss नावाचं नियतकालिक सूरु केलं ज्यात त्यांनी पहिल्यांदा सामाजिक मुद्द्यांवरील प्रदीर्घ मालिका त्यांनी लिहीली. यातील महत्त्वाचं योगदान म्हणजे हेगेलच्या रेक्तफिलोसोफीवर त्यांनी केलेली टीका होती. दुसरा महत्त्वाचा लेख हा ज्यूईस क्वेश्चन (ज्यू प्रश्न) हा होता. जेंव्हा यावूशss प्रकाशित होणं बंद झालं त्यांनी वॉटवाssट्ज नावाच्या नियतकालिकात लिहिण्यास सुरुवात केली. अनेकदा ते या नियतकालिकाचे संपादक असल्याचं म्हटलं जातं मात्र या नियतकालिकाचं संपादक पद हेने, एव्हरबेक, एंगेल्स आदींकडे होतं. हे नियतकालिक खरंतर गंभीरपणे कधी चालवंलं गेलं नाही. यानंतर मार्क्स यांचं प्रकाशित झालेलं साहित्य म्हणजे हायलिके फमिलिया जे त्यांनी व एंगेल्स या द्वयीने लिहिलं होतं. यात ब्रूनो बावर आणि त्यांच्या हेगेलियन आदर्शवादी मंडळींवर टीका आहे. या संपूर्ण काळात त्यांनी आपलं लक्ष राजकीय अर्थशास्त्र आणि फ्रेंच क्रांती यांच्या अभ्यासावर केंद्रीत केलेलं होतं, सोबत प्रशियन सरकारसोबतचा संघर्षही सुरूच होता. अखेर प्रशियन सरकारला मार्क्स यांच्यावर कुरघोडी करण्यात यश मिळालं आणि त्यांनी त्यांना फ्रान्समधूनही परागंदा होण्यास भाग पाडलं. त्यानंतर ते ब्रुसेल्स येथे गेले. तिथे त्यांनी मुक्त व्यापारावरचं त्यांचं टिपण प्रसिद्धं केलं. त्यानंतर त्याच वेळी प्रुधाँ यांचं द फिलॉसॉफी ऑफ पॉव्हर्टी नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालं होतं. त्यांनी मार्क्सला या पुस्तकावरील आपल्या टोकदार टीकेची वाट पाहात असल्याचं पत्र पाठवलं. प्रुधाँ यांना फार वाट पाहावी लागली नाही. १८४७ सालीच प्रुधाँ यांच्या पुस्तकाला दुसऱ्या पुस्तकाने मार्क्स यांनी उत्तर दिलं, त्याचं शिर्षक होतं पॉव्हर्टी ऑफ फिलॉसॉफी! 
याच वर्षी मार्क्स यांनी जर्मन वर्किंग मेन्स क्लबची ब्रुसेल्स येथे स्थापन केली. तसंच त्यांच्या मित्रांसोबत त्यांनी कम्युनिस्टिक लिग या संघटनेचे सदस्यत्नही स्वीकारले. त्यांच्या या संघटनेतील प्रवेशानंतर संघटना केवळ बडबड करणे व संघटनांतर्गत कुरघोड्यांच्या पलिकडे जाऊन कम्युनिस्ट तत्त्वांच्या प्रचाराच्या जोरदार कामाला लागली. तसेच सरकारच्या दडपशाहीचे संकट लक्षात घेता
 संघटनेची कामं गुप्तपणे होऊ लागली. जिथे जिथे जर्मन वर्किंग मेन्स क्लबचं अस्तित्व होतं तिथे तिथे लीगचं ही अस्तित्व वाढायला सुरुवात झाली. ती खऱ्या अर्थाने पहिली जागतिक पातळीवरची समाजवादी चळवळ होती, असं म्हणावं लागेल. त्यात इंग्लिश, बेल्जियन्स, हंगेरियन्स, पोल्स, स्कॅन्डेनेव्हियन्स सभासद होते. लोकशाही समाजवादी पक्षाचं ते पहिलं संघटन होतं. १८४७ साली लिगचं लंडन येथे अधिवेशन होतं. त्याला यशस्वी करण्यासाठी मार्क्स व एंगेल्स काम करत होते. त्यांच्यावर या अधिवेशनाच्या निमित्तानेच कम्युनिस्ट पक्षाचा जाहिरानामा लिहिण्याची जवाबदारी देण्यात आली. हा १८४८च्या क्रांतीच्या काही दिवस आधीच प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्याची युरोपातील सर्वच भाषांमध्ये भाषांतरंही झाली. कम्युनिस्ट जाहिरनाम्यात समाजाच्या परिस्थितीच्या आढाव्याने सुरुवात केली आहे. पुढे त्यात जुनी सरंजामी वर्ग व्यवस्था संपून त्या ठिकाणी केवळ दोनच वर्ग मालक आणि मजूर हे कसे तयार झाले कामगार जे सर्वहारा आहेत, जे लुटले जात आहेत लूटारूंकडून, भांडवलदार वर्ग जे काहीही उत्पादन करत नसूनही जगातील सारी संपत्ती साधन समृद्धता त्यांच्याकडे आहे आणि कामगार वर्ग जे सगळं उत्पादन करतात व त्यांच्याकडे काहीच नाही, हे सांगण्यात आलं आहे. भांडवलदारांनी या सर्वहारांना त्यांच्या संरजामी व्यवस्थेशी असलेल्या लढाईत वापरून घेतलं व नंतर त्यांनाच गुलाम बनवलं. कम्युनिस्ट हे मालमत्ताच नष्ट करतात हा जो आरोप केला जात होता, त्याला या जाहिरनाम्यातून कम्युनिजम हा बुर्ज्वा मालमत्तेची व्यवस्था नष्ट करतो. ज्याद्वारे नऊ दशांश किंवा सामुहिक मालमत्ता नष्ट केली गेली आहे, असं उत्तर देण्यात आलं. कम्युनिस्ट हे लग्न व कुटुंब व्यवस्था उद्‌ध्वस्त करायला निघाले आहेत असाही आरोप केला जातो. जाहिरनाम्यात म्हटले आहे की, कामगार वर्गाला कुठलं लग्न आणि कुठलं कुटुंब सांगता आहात? त्यांच्यासाठी या शब्दांचे काही अर्थच उरलेले नाहीत. मातृभूमी आणि राष्ट्रीयत्व हेदेखील उद्‌ध्वस्त करण्याचा आरोप कम्युनिस्टांवर होतो पण सर्वहारांना यातून कधीच हद्दपार केलं गेलं आहे. धन्यवाद भांडवलदारांच्या उदयासाठी उद्योगाचा विकास झाल्याबद्दल!
भांडवली व्यवस्थेने इतिहिसात अनेक क्रांत्यांना जन्म देण्यासाठी खूप परिश्रम घेतले, त्यांनी संपूर्ण उत्पादन प्रक्रियेत क्रांती घडवून आणली. त्यांच्यामुळे वाफेवर चालणारं इंजिन, स्वयंचलित खेचरं, स्वयंचलित हातोडे, रेल्वे, जहाजं विकसित झाली. पण त्यांचं सगळ्यात महान उत्पादन हे सर्वहारा वर्ग ज्याची अवस्था अशी आहे की तो संपूर्ण समाजालाच फेकून देण्यासाठी जन्मला आहे हेच म्हणावं लागेल…या शब्दांत कामगार वर्गातील चेतना जागृत करणारा हा जाहिरनामा आहे. कम्युनिस्ट जाहिरनाम्याचा शेवट पुढील वाक्यांनी केला गेला आहे…
"कम्युनिस्ट आपली भूमिका निर्भिडपणे समोर ठेवत आहेत. समाजातील सध्याची अन्यायग्रस्त परिस्थिती हिंसकपद्धतीने फेकून देणं हेच त्यांच्या चळवळीचं ध्येय आहे. सत्ताधारी वर्ग हा कम्युनिस्ट क्रांतीमुळे हादरून जाऊदेत. सर्वहारा वर्गाकडे त्यांच्या बेड्यांशिवाय गमावण्यासारखं काहीच नाही आणि जगण्यासाठी संपूर्ण जग आहे. जगातल्या कामगारांनो एक व्हा!"….

No comments:

Post a Comment

लोकशाहीचा जागरण गोंधळ...!

"डान्स ऑफ डेमोक्रसी....! लोकशाहीच्या नृत्यात निव्वळ गोंधळ दिसून आलाय. कुणी भोवळ येऊन पडतोय. कुणी हंबरडा फोडतोय....