Wednesday, 22 October 2025

मोदी-शहा यांची गोबेल्स नीती....!


"सर्कल इज कंप्लीट, पिश्चर इज क्लिअर....! असं म्हटलं जातं. अगदी तशीच स्थिती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या एकत्र येण्याबाबत म्हणता येईल. प्रत्येक निवडणुकीत राज ठाकरे यांची बदलती भूमिका असली तरी लक्षांत राहिली ती २०१९ मध्ये झालेली लोकसभा निवडणूक! 'लाव रे तो व्हिडिओ...!' म्हणत त्यांनी मोदी-शहा यांच्यावर जो काही प्रहार केला होता त्याची आठवण आल्याशिवाय राहात नाही. मोदी-शहा यांचं वर्णन थेट हिटलर-गोबेल्स यांच्याशी केली होती. त्यावेळी त्याचं गांभीर्य लक्षांत आलं नाही. पण नंतर या वाक्याचा संदर्भ पाहिला आणि घडलेल्या घटना पाहिल्या तर त्यातली सत्यता जाणवू लागलीय. त्या घडामोडी पाहताना काही साम्यस्थळं आढळली. त्याचा घेतलेला हा धांडोळा आणि केलेली उठाठेव...!" 
-------------------------------------
राज्यात २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवर सर्वाधिक प्रभाव राज ठाकरे यांच्या भाषणांनी आणि प्रसारमाध्यमांना त्यांनी दिलेल्या मुलाखतींनी पाडला जातो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत असाच प्रभाव नरेंद्र मोदी यांच्या 'अच्छे दिन'च्या घोषणांनी पाडला होता. त्या भूलथापांवरच भाजपला देशाची सत्ता आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकात अनेक राज्यं जिंकता आली होती. दरम्यानच्या ५ वर्षांत 'आज बाळासाहेब ठाकरे असते, तर काय केले असते? काय बोलले असते...?' असे प्रश्न पडण्यासारखे अनेक प्रसंग शिवसेनालाच नव्हे, तर मोदीभक्तीत फसलेल्या भाजपनिष्ठांना आणि देशाला भोगावे लागलेत. त्याची 'उत्तरक्रिया' राज ठाकरेंच्या १० भाषणांच्या आणि मुलाखतींच्या मालेने २०१९ मध्ये मोठ्या ताकदीने केली होती. या निवडणुकीत 'मनसे'चा एकही उमेदवार उभा नव्हता; पण राज ठाकरेंच्या लाखांच्या सभांनी भाषणांनी थापाड्या-बाताड्यांच्या सत्तेचा अंत करता येतो; तो केला पाहिजे, ही उमेद महाराष्ट्रासह देशभरातल्या मतदारांत जागवली होती. लोकशाहीतल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विराट आविष्कार घडवला होता. यासाठी ते मोदी सरकारचा खोटेपणा, मनमानीपणा पुराव्यांसह दाखवत असताना अखेरीस, 'ही निवडणूक यापुढे लोकशाही राहाणार की हुकूमशाही येणार, या प्रश्नाचे उत्तर तुमचे मत देणार...' असल्याचा सावधतेचा इशारा लोकांना देत होते. संभाव्य हुकूमशाहीसाठी अॅडॉल्फ हिटलरचा दाखला देत होते. लोकशाहीच्याच माध्यमातून हुकूमशाही आणणाऱ्या आणि ज्यूंचा वंशद्वेष करत त्यांचा अमानुष छळ कत्तल करणाऱ्या अॅडॉल्फ हिटलर याचा कार्यकाल पहिले महायुद्ध २८ जुलै १९१४ ते ११ नोव्हें. १९१८ ते दुसरे महायुद्ध १९३९ ते २ सप्टेंबर १९४५ असा आहे. पहिले महायुद्ध दोस्त राष्ट्र किंवा ट्रिपल आँताँत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियन साम्राज्य, फ्रेंच प्रजासत्ताक ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र विरुद्ध जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी देशांच्या राजवटी या दोन गटात झाले. २८ जून १९१४ रोजी 'जहाल युगोस्लाव्ह राष्ट्रवादी' गॅव्हिलो प्रिन्सिप याने सारायेव्हो इथं ऑस्ट्रिया-हंगेरीच्या सिंहासनाचा वारसदार असलेल्या 'आर्चड्यूक' फ्रांझ फर्डिनांड्यो याची हत्या केली आणि पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली. पुढे या महायुद्धात जगातले सर्व आर्थिक महासत्ता ओढल्या गेल्या. या महायुद्धाची अखेर जर्मन, रशियन, ऑस्ट्रो-हंगेरीयन आणि ऑट्टोमन साम्राज्यं नष्ट होऊन झाली. यातून अनेक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली. त्यांनी आपल्या सीमारेषा निश्चित केल्या. नवीन शासन यंत्रणा निर्माण केल्या. त्यांना मान्यता मिळण्यासाठी तह, ताबा, उत्तराधिकाऱ्याचे नूतनीकरण याच्या प्रक्रिया सुरू झाल्या. त्यात अपमानित करण्यात आलेल्या अटी-शर्तीतूनच दुसऱ्या महायुद्धाची बीजं पेरली गेली. पहिल्या महायुद्धात जर्मनीने फ्रान्समधील व्हर्साय इथं शरणागती पत्करल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर दबाव टाकण्यासाठी अटी लादल्या. पराभूत जर्मनीला युद्ध लादल्याची शिक्षा म्हणून दोस्त राष्ट्रांना ६५० कोटी पौंडची रक्कम द्यावी; जर्मनीचे लष्कर १ लाख सैनिकांपेक्षा अधिक असू नये; नाविक दल - नेव्ही उभारू नये; जर्मनीच्या ताब्यातील सार प्रांत १५ वर्षांसाठी फ्रान्सला द्यावा; हाइन नदीलगतच्या ५० किलोमीटर परिसरात जर्मनीने लष्कर ठेवू नये, अशा अपमानित करणाऱ्या अटी जर्मनीला मान्य कराव्या लागल्या. त्यानंतर पहिले महायुद्ध समाप्तीचा ऐतिहासिक 'व्हर्सायचा तह' ११ नोव्हें. १९१८ ला झाला. या पहिल्या महायुद्धात अॅडॉल्फ हिटलर शिपाईगडी म्हणून सामील झाला होता. तो मूळचा जर्मनीच्या सीमेजवळील ऑस्ट्रियातील गावातला. जन्मः २० एप्रिल १८८९ मधला. वडिलांबरोबर तोही जर्मनीत स्थायिक झाला. त्याच्या पूर्वजांची ओळख गुंतागुंतीची आहे. त्यात अनेक वंश-प्रांताची सरमिसळ आहे. हिटलर अभ्यासात हुशार होता. उत्तम चित्रकार होता. पण त्याला 'आर्ट स्कूल' मध्ये प्रवेश मिळाला नाही. पोटापाण्यासाठी त्याने रस्त्यावरचा बर्फ साफ करण्याची; रंगरंगोटीची कामं केली. लष्कर भरतीत तो नापास झाला. पण पहिले महायुद्ध सुरू होताच सामाजिक संस्था-संघटनांतर्फे सैनिक भरती होऊ लागली. त्या माध्यमातून तो सैनिक झाला. युद्ध संपल्यावर त्याला पाद्री - फादर-ख्रिस्ती धर्मोपदेशक व्हायचे होते. पण जर्मनींना अपमानित करणाऱ्या व्हायच्या तहाची सल त्याच्या उरात रुतली होती. कारण या तहामुळे जर्मनी स्वबळावर उभी न राहाता अमेरिकेच्या भांडवलावर जगू लागली होती. जर्मनीतील अनेक शासकीय उद्योग भांडवलदारांच्या ताब्यात गेले. गरीब, मध्यमवर्ग, छोटे दुकानदार, कमी पगारवाले नोकरदार आर्थिक ओढाताणीने मेटाकुटीला आले. या पार्श्वभूमीवर हिटलरने लष्कराचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करण्याचा १९१९ मध्ये निर्णय घेतला. 'जर्मन वर्कर्स पार्टी'त तो सामील झाला. अवघ्या सहा महिन्यांत त्याने वक्तृत्वाच्या बळावर पक्ष कार्यकर्त्यांना जिंकले आणि पार्टीचा 'नॅशनल सोशॅलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी' असा नामविस्तार करून तो पक्षप्रमुखही झाला. या पक्षाची 'नाझी' अशी ओळख आहे. या संघटनेच्या माध्यमातून हिटलरने व्हर्साय तहाविरोधात असलेली जर्मनांची लोकभावना व्यक्त करायला आणि जर्मन लोकांत ज्यूविरोधी द्वेषभावना वाढवायला सुरुवात केली. जर्मनीचा महायुद्धात पराभव होताच जर्मनीचा राजा कैसर विलियम सहकुटुंब देश सोडून गेला. त्यानंतर दोस्त राष्ट्रांनी आपल्या इशाऱ्यानुसार चालणारं सिव्हिलियन सरकार स्थापन केलं. सद्दाम हुसेनला ठार केल्यावर अमेरिकेने इराकमध्ये रिपब्लिकन सरकार स्थापन केलं, तसाच हा प्रकार होता. जर्मन लष्करप्रमुखाऐवजी या रिपब्लिकन सरकारनेच व्हर्साय तहावर मान्यतेची स्वाक्षरी केली होती. त्यामुळे राष्ट्रप्रेम जागवत सरकारविरोधात लोकभावना संघटित करीत स्वतःची आणि पक्षाची ताकद वाढवत जाणे, हिटलरला सोपे गेले. या बळावर त्याने १९२३ मध्ये सरकार उलथवण्याचा प्रयत्न केला. तो असफल झाला. परिणामी, हिटलर देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलबंद झाला. तुरुंगातल्या वास्तव्यात त्याने आपलं आयुष्य आणि राजकीय लक्ष्य सांगणारं पुस्तक लिहिलं. जर्मन भाषेत लिहिलेल्या या पुस्तकाचा 'माय स्ट्रगल' नावाने इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाला. या पुस्तकाने हिटलर अधिक लोकप्रिय झाला. त्याची जेलमधून सुटका झाली, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने समर्थक जमले. त्याने हिटलरची आणि त्याच्या नाझी पक्षाची ताकद पूर्वीपेक्षा अधिक वाढली. पण त्यापेक्षा अधिक १९२९ मध्ये अमेरिकेचा शेअरबाजार कोसळल्यावर वाढली. या घटनेनंतर अमेरिकेने आपली अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी जर्मनीकडे दिलेला पैसा मागण्याचा तगादा लावला. तो पैसा देण्याच्या प्रयत्नात जर्मनीची आर्थिक स्थिती पूर्णपणे बिघडली. या संधीचा फायदा उठवत हिटलरने रिपब्लिक सरकारला धारेवर धरून, ते जर्मन जनतेच्या नजरेत नालायक ठरवण्यात यश मिळवलं. जसे नरेंद्र मोदींनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात आधीच्या मनमोहन सिंग सरकारला नालायक ठरवलं तसं ! यानंतर केंद्र सत्तेसाठीच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्या निवडणुकीत जर्मनीच्या सत्ताधारी पक्षासह कम्युनिस्ट पार्टी आणि हिटलरची नाझी पार्टी हे तीन मुख्य पक्ष म्हणून रिंगणात होते. पण जर्मनीच्या जनतेने यापैकी कुणाही एकाला सत्तेसाठीचं पूर्ण बहुमत दिलं नाही. अशा परिस्थितीत हिटलरने आपल्या भाषणकलेच्या जोरावर जर्मनीचं लोकमत आपल्याच बाजूने असल्याचं चित्र उभं केलं. त्यासाठी मोठमोठ्या रॅलीजचं आयोजन केलं. परिणामी, जर्मनीचे प्रेसिडेंट - राष्ट्रपती पॉल वॉन हिन्डेनबर्ग यांना जानेवारी १९३३मध्ये हिटलरला जर्मनीचा चान्सलर - प्रधानमंत्री बनवावं लागलं. कारण तोपर्यंत 'जर्मनीने गमावलेला सन्मान मीच पुन्हा मिळवून देऊ शकतो....' असा विश्वास समस्त जर्मनींच्या मनात रुजवण्यात हिटलर यशस्वी झाला होता. मात्र सत्ता मिळाल्यानंतर मोदी कसे बदलले, ते राज ठाकरे सांगतात; तसा माणूसच बदलावा तसा हिटलर बदलला.
*संघ दक्ष हिटलरकडे लक्ष*
हिटलर जर्मनीचा चान्सलर होताच, त्याच्या पुढे-मागे भांडवलदार हात जोडून उभे राहू लागले. 'एक राष्ट्र, एक ध्वज, एक पक्ष, एक नेता...!' ही नाझी पक्षाची घोषणा होती. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी हिटलरने जर्मनीतील लोकशाही संपवण्याचे भव्य स्वप्न रंगवले होते. त्यासाठी त्याला जर्मनीचं संविधान बदलून अध्यक्षीय पद्धतीची हुकूमशाही - फॅसिस्ट राज्य व्यवस्था आणायची होती. १९३४ मध्ये हिटलरला चान्सलर बनवणाऱ्या प्रेसिडेंट पॉल वॉन यांचं निधन झालं आणि ती संधी साधून हिटलरने संविधान बदलण्याचा डाव टाकला. पण त्याला विरोधी पक्ष असलेल्या कम्युनिस्टांचा विरोध होता. त्यामुळे संविधान बदलासाठी आवश्यक असलेलं बहुमत त्याला मिळणार नव्हतं. तो अडला, पण थांबला नाही. त्याने बुद्धी शक्तीने मार्ग काढला. २७ फेब्रुवारी १९३३ रोजी त्याने जर्मनीच्या राजकीय व्यवहार खात्याच्या इमारतीला आग लावली आणि त्याचा ठपका कम्युनिस्टांवर ठेवून त्यांना तुरुंगात टाकलं. ४,००० कम्युनिस्ट जेलबंद होताच; हिटलरने निवडणुका जाहीर केल्या. त्यात विरोधकच नसल्याने हिटलरच्या नाझी पक्षाच्या खासदारांची संख्या १०० ने वाढून २९९ झाली. अशाचप्रकारे नोटाबंदीचा डाव खेळून भाजपची सत्ता ताकद वाढवण्यात आणि व्यापक करण्यात आली. असो. हिटलरच्या हातात पूर्णपणे जर्मनीची सत्ता येताच, त्याने जनतेच्या मनात प्रथम भीती, असुरक्षिततेची भावना निर्माण केली. मग तोच त्यांचा पालनकर्ता, तारणकर्ता झाला. देशभक्तीचे धडे देत, नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्याचे म्हणजेच 'अच्छे दिन आनेवाले हैl' स्वप्न दाखवू लागला. 'तुम्ही पूर्वीच्या सरकारमुळे दुःखी आहात,' हे त्यांना पुनःपुन्हा सांगू लागला. जसे नरेंद्र मोदी गेली काही वर्ष पंडित नेहरू आणि इंदिरा गांदी यांच्या सरकारच्या नावाने खडे फोडत होते, तसाच हा मामला होता. दरम्यान, हिटलरच्या नाझी पक्षाच्या ऑल जर्मन स्टुडंटस् युनियनने सर्व विद्यापीठातली विरोधी विचारांची पुस्तकं जाळली. मोदी सरकारच्या काळात अशी जाळपोळ झाली नाही. पण पुण्याची फिल्म अकादमी, हैद्राबाद विद्यापीठ, दिल्लीची जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी - जेएनयू वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त करण्यात आली. अभ्यासक्रमात, क्रमिक पुस्तकात, 'विश्वकोश' सारख्या उपक्रमांच्या नोंदीत सोयीस्कर बदल करण्यात आलेत. हिटलरने एनएसडीएपी ही सशस्त्र संघटना उभारली होती. तिच्या कवायती, शस्त्रे, बॅण्ड लष्करासारखीच होती. सेवानिवृत्त पायलट हर्मन गोरिंग आणि लष्कर कॅप्टन अर्नेस्ट रोहोम हे या संघटनेचे प्रमुख होते. या संघटनेचं टोपणनाव 'ब्राऊन शर्ट' म्हणजे 'खाकी शर्ट' होते. या संघटनेला लष्कराचा दर्जा मिळावा, यासाठी हिटलर प्रयत्नशील होता. त्यामागे विरोधकांचे सरळसोट कायदेशीर हत्याकांड घडवून आणण्याचा हेतू होता. या संघटनेची तुलना रा.स्व. संघाशी करता येणार नाही. तथापि, संघाचं हिटलरच्या संघटनात्मक कामाकडे लक्ष आहे. तो त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. म्हणून 'संघ स्वयंसेवकांना १५ दिवसाचं प्रशिक्षण दिल्यास ते जवानांचं काम करू शकतील...!' असं वादग्रस्त विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी करून, हिटलरची बरोबरी साधली होती. संघ परिवाराच्या संघटनांच्या कार्यक्रमात मोदीजी भावुक होऊन बोलतात; तसाच हिटलर एनएसडीएपीच्या शिबिरात बोलायचा. सदस्यांना, प्रशिक्षणार्थीना 'शुद्ध रक्ताच्या जर्मन देशासाठी सर्वस्वाचा त्याग करा...!' असं आवाहन करायचा. आपली राजकीय ताकद वाढविण्यासाठी हिटलरने प्रसारमाध्यमांतील जाहिरातींवर, पोस्टर, भिंतीपत्रकावर प्रचंड पैसा खर्च केला. सत्तेच्या या देखाव्याला भुलून, घाबरून विरोधी पक्षातील काही नेत्यांनी सत्तेसाठी, पैशासाठी, सुरक्षेसाठी हिटलरबरोबर तडजोड केली. सत्ताधारी हिटलर सर्वसत्ताधीश झाला. त्याने एकेक करत स्वतंत्रपणे काम करणाऱ्या सरकारी व्यवस्थांवर ताबा मिळवला. गेस्टोपो ही जर्मन सिक्रेट पोलीस गुप्तहेर संघटना त्याने ताब्यात घेतली. १९३९ पासून हिटलरने जर्मन आणि जर्मनीने जिंकलेल्या युरोप भागातील ज्यूंना, सिक्रेट पोलिसांच्या माध्यमातून छळछावणीत धाडायला सुरुवात केली. तिथे ज्यूंचा ताबा नाझींच्या एसएस म्हणजे सिक्रेट सर्व्हिस गार्डकडे सोपवला जाई. याच काळात हिटलरने खास राजकीय खटले चालवण्यासाठी कोर्ट स्थापन केलं होतं. त्यात हजारोंना मृत्युदंडाची सजा सुनावण्यात आली. या मनमानी न्यायदानात कसलाही अडथळा येऊ नये, यासाठी समाजवादी आणि ज्यू सरकारी वकील, न्यायाधीशांना पदमुक्त करण्यात आले होते. वंशवादावर आधारित न्याय व्यवस्था आणि नवे कायदे हिटलरने सुरू केले. या व्यवस्थेला त्याने पीपल्स कोर्ट असे गोंडस नाव दिले होते. जर्मनीवर पूर्णपणे हुकूमत मिळवल्यानंतर हिटलरने व्हर्राय तहाच्या अटी मोडीत काढण्यास आणि जर्मनीच्या भोवतालच्या छोट्या राष्ट्रांना आपले अंकीत बनवण्यास सुरुवात केली. त्याच्या विस्तारवादाची पहिली शिकार त्याची जन्मभूमी असलेला देश ऑस्ट्रिया ठरला. त्यानंतर त्याने चेकोस्लाविया, पोलंड, नॉर्वे, डेन्मार्क, फ्रान्स आणि रशिया जिंकण्याचा क्रम लावला होता. यातील पोलंडवर १ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीने हल्ला केला. त्यानंतर हिटलरच्या नाझी पक्षाने केलेल्या मैत्री-करारानुसार, सोव्हिएत संघाने पूर्वेकडून पोलंडवर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून ग्रेट ब्रिटन - युनायटेड किंग्डम आणि फ्रान्सने जर्मनीवर हल्ला केला. त्यानंतर एकेक राष्ट्र त्यात सामील झाल्याने त्याला दुसऱ्या महायुद्धाचे स्वरूप आले. यात जवळपास ७० देशाचे सैनिक सामील झाले होते. जर्मनीच्या बाजूला जपान आणि इटाली हे दोनच देश मोठे होते. तर त्यांच्या विरोधात ग्रेट ब्रिटनच्या बरोबर अमेरिका, रशिया, चीन, भारत हे मोठे देश उतरले होते. १९३९ ते ४५ असे सहा वर्षं चाललेलं हे महायुद्ध हिटलरच्या हुकूमशाही बरोबरच त्याच्या नाझी पक्षाला संपवूनच संपलं. पण यात दोन्ही बाजूचे मिळून २ कोटी २० लाखापेक्षा अधिक सैनिकांचे आणि ४ कोटीपेक्षा अधिक नागरिकांचे बळी गेले. मालमत्तेचे तर अगणित नुकसान झाले, हा महाविनाश हिटलरच्या शुद्ध राष्ट्रवादाच्या अतिरेकीपणामुळे घडला. या अतिरेकीपणातल्या शिस्तीचे, राष्ट्रप्रेमाचे कौतुक करणारे बरेच लोक आहेत. त्यात बाळासाहेब ठाकरे आहेत; आणि राज ठाकरेही आहेत. नाझी पक्षाच्या स्वस्तिक ध्वज चिन्हामुळे बऱ्याच हिंदुत्ववाद्यांना हिटलर आपला 'आर्य' वाटतो. तथापि, हिटलरचं भारताबद्दल आणि हिंदूधर्माविषयीचं मत चांगलं नव्हतं. ते गैरसमज आणि चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे सुभाषचंद्र बोस यांनी हिटलरला एका भेटीत सुनावलं होतं. प्रधानमंत्री मोदी यांनी ज्याप्रकारे मंत्रिमंडळाला गुंडाळून ठेवून आपणच सर्वसत्ताधारी आहोत, असं चित्र उभं केलं, ज्याप्रकारे स्वतंत्रपणे चालणाऱ्या सरकारी यंत्रणा आपल्या ताब्यात घेतल्या, मोडीत काढल्या; स्वतःच्या जाहिरातींवर, विदेशवाऱ्यांवर सरकारी पैसा खर्च केला; जवानांच्या बलिदानाला दुर्लक्षित करून मतांसाठी लष्कराच्या कर्तबगारीला वापरण्याचा प्रयत्न केला, ते पाहिल्यास त्यांची पावलं हिटलर सारखीच पडत असल्याचे वाटणे साहजिकच आहे. या लोकशाहीविरोधी बदचालीला कठोर विरोधही झालाय. तरीही अनंत काळ नुकसान, यातना सोसलेल्या भारतीय जनतेने मोदी पक्षाला सत्ता यश दिले, तर मोदीजींना हिटलरी सत्तावर्तन करण्याचा हक्क आपसूक लाभतो. तथापि, हिटलरबरोबर मुसोलिनी - इटाली) आणि टोजो - जपान हेही हुकूमशहा होते. यातील दोघांनी आत्महत्या केल्या; तर मुसोलिनीला लोकांनी जाहीर चौकात फाशी दिली.
*देशी-विदेशी गोबेल्स*
राज ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक भाषणात 'मोदी आणि शहा या दोन व्यक्ती या निवडणुकीत भारताच्या राजकीय क्षितिजावरून कायमसाठी हटवल्या गेल्या पाहिजेत; यासाठी त्यांना पुन्हा सत्ताशक्ती देणाऱ्या कोणत्याही म्हणजे भाजप आणि शिवसेना पक्षास मतं देऊ नका...!' असं आवाहन लोकांना केलंय. नरेंद्र मोदी हे जनसंघ वा भाजपचे कार्यकर्ते वा पदाधिकारी नव्हते. ते रा.स्व. संघाचे 'पूर्ण वेळ प्रचारक' होते. ज्या प्रचारकाला राजकारणात रुची असते; त्याला त्याच्या कुवतीनुसार भाजपच्या शहर, जिल्हा वा प्रदेश कार्यकारिणीवर पिंडीवरच्या नागोबासारखे बसवले जाते. मोदींचाही गुजरातच्या राजकारणात प्रवेश झाला आणि केशुभाई पटेल-वाघेला यांच्या सत्तासाठमारीत आमदार नसताना त्यांची थेट गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. अशाच प्रकारे नितीन गडकरीही १९९५-९९ या शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मंत्री झाले होते. मोदींच्या या राजकीय उदयानंतर झालेल्या प्रत्येक वादग्रस्त घटनेत मोदींबरोबरच अमित शहा यांचं नाव चर्चेत येऊ लागलं. मोदी प्रधानमंत्री झाले, तसे अमित शहा भाजपचे 'राष्ट्रीय अध्यक्ष' झाले. हिटलरबरोबरच गोबेल्स हे नाव येतंच; तशी ही मोदी-शहा यांची जोडी आहे. मोदी सरकारमध्ये केंद्रीय सत्तेचा अधिक अनुभव असलेले सुषमा स्वराज, अरुण जेटली हे मंत्री होते. पण सरकारचा त्यांच्यापेक्षा अधिक धोरणात्मक निर्णय वा माहिती; कोणताही संविधानिक अधिकार नसताना अमित शहा यांनी जाहीर केला हाोता. 'स्वीस बँकेत असलेला भारतीयांचा ब्लॅकमनी देशात आणून प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील, हा जुमला होता...!' हे अमित शहा यांनीच निर्लज्जपणे सांगितलं आणि एकाही दहशतवाद्याच्या मुडद्याचा फोटो न दाखवता; 'ऑपरेशन बालाकोट' मध्ये २५० दहशतवादी मारल्याचंही त्यांनीच जाहीर केलं. खोट्या गोष्टी पुनःपुन्हा नव्या उत्साहाने सांगण्याला गोबेल्स-नीती म्हणतात. पॉल जोसेफ गोबेल्स याचा जन्म २९ ऑक्टो. १८८७ ला झाला. हा हिटलरचा प्रचारप्रमुख होता. त्याचे वडील कापड गिरणीत फोरमन होते. तो हिटलरच्या नाझी संघटनेतला सर्वात उच्च शिक्षित होता. इतिहास, वाङ्मय, तत्त्वज्ञान या विषयांचा तो अभ्यासक होता. पायातील व्यंगामुळे त्याची महत्त्वाकांक्षा अडखळली होती. ती कसर त्याने आपल्या पाताळयंत्री कारनाम्यांनी भरून काढली. कट्टर समर्थक असल्याने तो हिटलरचा खास विश्वासातला माणूस झाला. 'एखादी गोष्ट वारंवार सांगितली की, ती लोकांना सत्य वाटू लागते. यासाठी ती गोष्ट कमी शब्दांत असायला हवी आणि त्यातील काही मुद्दे ठळक असायला हवेत...!' हे हिटलरच्या प्रचाराबाबतचं मुख्य सूत्र होतं. ते प्रत्यक्षात आणणारा सूत्रधार जोसेफ गोबेल्स हा होता. यातूनच तो प्रचारतंत्र जनक म्हणूनही ओळखला जाऊ लागला. गोबेल्सने प्रोपगंडा आणि सेन्सॉरशिप ही दोन माध्यमं वापरून लोकांचं ब्रेनवॉश केलं. अलीकडच्या काळात, आपल्या इथे जशा श्रीराम सेना, हिंद जन जागृती, सनातन, बजरंग दल, गोरक्षासारख्या संघटनांचा वापर करण्यात आला; तशी हिटलरला विरोध करणाऱ्यांना रोखण्या-संपवण्यासाठी 'शूट्सस्टाफल' Schutzstaffel-SS ही सेना आघाडीवर होती. ती गोबेल्सच्या प्रचारतंत्राने क्रिया-प्रतिक्रिया करायची. या SSच्या माध्यमातूनच ६० लाख ज्यूंची छळछावण्यांतून कत्तल करण्यात आली. या गोबेल्स प्रचारतंत्रामुळे हिटलर सत्तेवर आला आणि १९३३ ते ४५ अशी १२ वर्ष सत्ता टिकवू शकला. १९३४ मध्ये हिटलर जर्मनीचा प्रेसिडेंट झाला आणि त्याने गोबेल्सला Enlightenment and Propaganda खात्याचा मंत्री केलं. 'सरकारी प्रचार हा अदृश्य; पण सर्वत्र असावा,' असं धोरण गोबेल्सने प्रचारमंत्री म्हणून अंमलात आणलं. त्यासाठी प्रसारमाध्यमं, साहित्य आणि कलानिर्मिती यावर निर्बंध घातले. हलकेफुलके मनोरंजनाचे कार्यक्रम अथवा नाझी विचाराचा प्रचार करणारे साहित्य, चित्रपट यांनाच परवानगी दिली जायची. 'चला, हवा येऊ द्या'सारखे- थुकरट वाडीतले टीव्ही शो, विज्ञानयुगात चेटकिणीभोवती फिरणारी 'अलबत्या-गलबत्या' सारखी जोरात चालणारी मोठ्या प्रेक्षकांच्या गर्दीची बालनाट्य किंवा राज ठाकरे यांनी सांगितलेले पॅडमॅन, सुईधागा, टॉयलेट यासारखे सरकारी योजनांचा प्रसार करणारे चित्रपट; हादेखील 'गोबेल्स' नीतीचा गावठी अवतार आहे. त्यात मराठा मोर्चा, बहुजन मोर्चा, दलित आक्रोश मोर्चा याची पेरणी करणाऱ्या सैराट चित्रपटाचाही समावेश करता येईल.
*वंशाचा चाळा भक्तांचा गळा*
गोबेल्स प्रचारमंत्री होताच त्याने 'आर्यन वंश हा सर्वात शुद्ध आहे आणि ज्यू हे देशद्रोही आहेत...!' या संदेशाचा मारा लोकांवर केला. ज्यू पत्रकारांवर बंदी घालण्यात आली. परिणामी, १९३५ मध्ये जर्मनीतील १,६०० नियतकालिकं बंद पडली आणि १९३९ पर्यंत सुरू असलेल्या पैकी ६९ टक्के नियतकालिकं नाझीवाद्यांच्या मालकीची झाली. या बदलाच्या मुळाशी असलेल्या वंशवादाची जागा मोदी सरकारच्या विचारवादाने घेतली. त्यानुसार बदल झाले. हिटलरच्या काळातच जर्मनीत रेडिओ लोकप्रिय होऊ लागला होता. त्याचा वापर करता येईल, हे गोबेल्सने ओळखले आणि प्रत्येक जर्मन माणसाला विकत घेता येईल, इतक्या अल्पदरात रेडिओ उपलब्ध करून देण्यात आले. त्यावरून हिटलर आणि गोबेल्स यांचीच भाषणं अधिकाधिक वाजत. ती लोकांच्या कानी सतत पडावी, यासाठी रस्त्यावर, पार्कात, रेस्टॉरंटमध्ये, सर्व सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर लावून त्यावरून रेडिओ ऐकवला जात असे. हिटलरच्या भव्य रॅलीज व्हायच्या. त्याचीही कॉमेंट्री रेडिओवरून सुरू असे. अशाच प्रकारे मोदीजींच्या सततच्या विदेश वाऱ्या आणि विदेशी राष्ट्रप्रमुख, मंत्र्यांच्या गुजरातेतल्या रोड शोचे रिपोर्ट टीव्हीवर साजरे करण्यात आले. हिटलरच्या १२ वर्षांच्या सत्ताकाळात नाझी विचारधारेला विरोध करणाऱ्या २,५०० साहित्यिकांवर बंदी घालण्यात आली; तर ज्यू धर्माविषयी आणि शांततावादी, समाजवादी, साम्यवादी विचारांचं समर्थन करणारी २०,००० पुस्तकं जाळण्यात आली. ज्यू संगीतकार आणि त्यांच्या जॅझ म्युझिक्चर संपूर्ण बंदी होती. मोदी सरकारच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश या विचारवंत, लेखकांच्या हत्येच्या निषेधार्थ ज्येष्ठ साहित्यिक, कलाकारांनी केलेली 'पुरस्कार वापसी' आणि सहा महिन्यांपूर्वी यवतमाळ येथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचे 'निमंत्रण रद्द' केल्यानंतर झालेली 'निमंत्रण वापसी' हे गोबेल्स नीतीला दिलेलं प्रत्युत्तर होतं. आदर्श साहित्य कसं असावं, याचं उदाहरण देण्यासाठी गोबेल्सने 'मायकल' नावाची कादंबरी लिहिली होती. बदलत्या काळानुसार, १० वर्ष प्रधानमंत्रीपद सांभाळलेल्या मनमोहन सिंग यांची थट्टा उडविणारा 'अॅन अॅक्सिडेंटल प्रायमिनिस्टर' हा चित्रपट आला; आणि मोदींचं गुणगान करणारा चित्रपट तयार झाला. सततच्या ज्यूविरोधी प्रचाराचा जर्मन नागरिकांवर असा परिणाम झाला, की त्यांना ज्यूविरोधात कोणतीही कृती करणं गैर वाटेनासं झालं. तेच मोदी सरकारच्या काळात गोमांसच्या निमित्ताने दलित आणि मुस्लिमांवर जीवघेणं संकट बनून कोसळलं. नाझी चळवळ सुरू होण्यापूर्वी जर्मन नागरिक आणि ज्यू यांचे सलोख्याचे संबंध होते. हिटलर सत्तेवर आल्यावर जर्मन नागरिक ज्यूंकडे संशयाने पाहू लागले. काहींनी ज्यूंशी संबंध ठेवले तर आपण अडचणीत येऊ, या भयाने ज्यूंशी असलेले संबंध तोडले. हा अतिरंजित वाटणारा इतिहास काही मोदीभक्तांनी सत्यात उतरवून दाखवला आहे. या कामगिरीबद्दल अमित शहा आणि त्यांच्यासारख्या वाढवलेल्या देशी गोबेल्सना मोदींनी काय दिलं, ते अजून उघड झालेलं नाही. परंतु प्रचारमंत्री म्हणून गोबेल्सने केलेल्या कामगिरीबद्दल हिटलरने त्याला अनेक सन्मानाची पदं दिली. दुसऱ्या महायुद्ध काळात १९४४ मध्ये गोबेल्सला युद्धमंत्री केलं. या पदाची हौस अमित शहा यांनी 'ऑपरेशन बालाकोट' मध्ये ठार झालेल्या दहशतवादींचा वादग्रस्त आकडा जाहीर करून भागवून घेतली. रशियाच्या फौजा जर्मनीत घुसताच हिटलरने आत्महत्या ३० एप्रिल १९४५ करण्याचा निर्णय घेतला. पण त्यापूर्वी त्याने गोबेल्सला जर्मनीचा चान्सलर - प्रमुख म्हणून घोषित केलं. गोबेल्स एकच दिवस जर्मनीचा राष्ट्रप्रमुख होता. १ मे १९४५ रोजी तो आत्महत्या करून मोकळा झाला. जाताना मागे तो गोबेल्स-नीती हा शब्द ठेवून गेला. एखादा राजकीय नेता स्वार्थासाठी खोटं रेटून बोलून लोकांत भ्रम निर्माण करतो, तेव्हा त्याच्या वागण्याचा उल्लेख गोबेल्स नीती असा केला जातो. मोदी-शहा यांना कठोर शब्दांत विरोध करताना राज ठाकरे हुकूमशाहीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी हिटलरचं चरित्र वाचा, असं सभांतून सांगत होते. हिटलरबरोबर गोबेल्स येणारच. या गोबेल्सच्या तंत्रानुसार, सोशल मीडियातून धिंगाणा घालणाऱ्या ट्रोल्सरना राज ठाकरे 'लावारिस कार्टी' म्हणतात. म्हणजे त्यांना जन्माला घालणाऱ्या गावठी गोबेल्सनी निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच आत्महत्या करायची का ?
*लोकांच्या भीती आणि आशेचा फायदा*
कदाचित २० व्या शतकातील सर्वात कुप्रसिद्ध व्यक्तिमत्व, अ‍ॅडॉल्फ हिटलर हा राष्ट्रीय समाजवादी जर्मन कामगार पक्ष, नाझी पक्षाचा प्रमुख होता आणि १९३० च्या दशकाच्या सुरुवातीपासून ते १९४५ मध्ये आत्महत्या होईपर्यंत तो जर्मनीचा हुकूमशहा बनला. १९३३ मध्ये जर्मन फ्युहरर नेता किंवा मार्गदर्शक ही पदवी धारण केल्यानंतर लगेचच  हिटलरने जोसेफ गोबेल्स यांनी काळजीपूर्वक आयोजित केलेल्या प्रचार मोहिमांद्वारे आपली शक्ती मजबूत करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या महायुद्धातील पराभवामुळे अपमानित झालेल्या आणि आर्थिक मंदीतून त्रस्त झालेल्या जर्मन लोकांच्या भीती आणि आशेचा फायदा घेऊन गोबेल्स आणि हिटलरने जर्मनीच्या भविष्याबद्दल राष्ट्रवादी, विस्तारवादी, वर्णद्वेषी दृष्टिकोनाला चालना दिली. त्यांच्या मोहिमेने अनेक जर्मन लोकांना नाझी राजवटीत सामील करून घेतले आणि अनेकांना हे पटवून दिले की विरोध निरर्थक आहे. नाझींनी सत्ता मिळवल्यानंतर, त्यांनी भाषण आणि सभा स्वातंत्र्य रद्द केले आणि यहूदी-विरोधी वातावरण निर्माण केले ज्यामुळे यहूदी, समलैंगिक आणि इतर अल्पसंख्याकांवर भयंकर अत्याचार झाले ज्याचा परिणाम होलोकॉस्टमध्ये झाला.
*रेडिओची ताकद*
हिटलरने १९३३ मध्ये गोबेल्सना रीच चेंबर ऑफ कल्चरची स्थापना करण्यासाठी नियुक्त केले. चेंबरचे फक्त सदस्यच सांस्कृतिक व्यवसायात काम करू शकत होते आणि गोबेल्सने खात्री केली की यहूदी, मार्क्सवादी आणि नाझीवादाला विरोध करणारे इतर सदस्य बनू नयेत. नाझी संस्कृती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी गोबेल्सने मान्यताप्राप्त कला आणि संगीताचा प्रचार केला. रेडिओच्या तुलनेने नवीन माध्यमाचा फायदा घेत, त्याने 'पीपल्स रिसीव्हर्स' नावाच्या स्वस्त रेडिओ सेटची विक्री आयोजित केली आणि हिटलरची भाषणे आणि इतर प्रचार कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी सार्वजनिक लाऊडस्पीकरची एक प्रणाली स्थापित केली.
दर सप्टेंबरमध्ये, नाझींनी न्युरेमबर्ग रॅलीआयोजित केली, जी पक्ष निष्ठा आणि शक्तीचे प्रदर्शन होते. १९३८ पर्यंत दहा लाखांहून अधिक लोक नाझीवादाच्या आठवडाभराच्या उत्सवासाठी जमले होते. लेनी रिफेनस्टाहल यांनी १९३४ च्या रॅलीचे चित्रीकरण तिच्या 'ट्रायम्फ ऑफ द विल' या प्रचार चित्रपटासाठी केले. सर्वात उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे पक्ष नेत्यांची बाहेरील संध्याकाळची रॅली. १९३५ मध्ये हिटलरचे वास्तुविशारद अल्बर्ट स्पीअर यांनी १५० सर्चलाइट्स मैदानाभोवती ठेवण्याची व्यवस्था केली, सरळ वर निर्देशित केले, ज्याला ब्रिटिश राजदूत सर नेव्हिल हेंडरसन यांनी 'प्रकाशाचे कॅथेड्रल' म्हटले. १९४२ मध्ये हिटलरने असे निरीक्षण केले, 'डॉ. गोबेल्स यांना बर्लिनमधील परिस्थिती ज्या दोन गोष्टींशिवाय नियंत्रित करता आली नसती अशा दोन गोष्टींची देणगी होती. मौखिक सुविधा आणि बुद्धिमत्ता....!' हिटलरकडे त्याच्या सहकाऱ्याचे कौतुक करण्याचे चांगले कारण होते, कारण गोबेल्सनेच फुहरर मिथक तयार केली होती, ज्यू, नफाखोर आणि मार्क्सवाद्यांपासून जर्मनीचा तारणहार म्हणून हिटलरची छद्म-धार्मिक उपासना आयोजित केली होती. ३० एप्रिल १९४५ रोजी, पराभवाच्या उंबरठ्यावर असताना, हिटलरने त्याच्या बंकरमध्ये आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी गोबेल्सनेही तेच केले, शेवटपर्यंत त्याच्या नेत्याशी एकनिष्ठ राहून.
निवडणुकीचा ज्वर सार्‍या देशभर भरून उरला आहे. जळी स्थळी, काष्टी पाषाणी एकच सवाल नरेंद्र मोदी २०१४ प्रमाणे सत्ता राखणार की गमावणार? बहुमत मिळत नाही हे पाहून सत्ताधारी तोडा फोडा आणि राज्य करा ही नीती वापरून सत्ता काबीज करणार का? तर दुसर्‍या बाजूला काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार की काँग्रेससह सर्व पक्षांचे मिळून मिलीजुली सरकार स्थापन होणार ? उत्तर फार कठीण आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे की आता २०१४ सारखी मोदी लाट नाही की त्यात भाजपचा टिळा लावलेले दगड धोंडे निवडून यायला… पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने आणि वास्तव यातला फरक लोकांच्या समोर आला आहे. मोदींच्या भीतीची पर्वा न करता उभी असलेली काही प्रसार माध्यमे आणि त्याच्या जोडीला असलेला सोशल मीडिया यांनी सत्ताधार्‍यांच्या पाच वर्षांच्या जुमलेबाजीची पोलखोल केली आहे. सत्य आणि असत्य यातला फरक जनेतेसमोर ठेवला आहे. आणि आपल्या काळजावर हात ठेवून आणि लोकशाहीचे स्मरण करून पहिल्या दोन टप्प्यात जनतेने मतदान केले असेल, अशी आशा आहे. आता आणखी दोन टप्पे बाकी आहेत आणि एक सवाल आहे : मोदी आणि हिटलर, शहा आणि गोबेल्स यात साम्य कसे?

गेले एक दोन महिने मोदी आणि शहा यांच्या प्रचारावर बारीक लक्ष द्या- काय दिसते? एकच गोष्ट दोघेही वारंवार सांगत आहेत आणि ती आहे काँग्रेस घराण्याचा भ्रष्टाचारी कारभार. आता हे लोकांना माहीत नाही का? काँग्रेस घोटाळेबाज आहेत ते. म्हणून तर लोकांनी पाच वर्षांपूर्वी भाजपच्या हातात बहुमताने देशाची सूत्रे दिली. १९७७ ला इंदिरा गांधींच्या आणीबाणीविरोधात जनतेने काँग्रेसला झाडूने साफ केले तसेच हाताला बाजूला सारून आशेचे कमळ फुलवले होते. पण, आज मागे वळून बघताना चित्र काय दिसते? रोजगार नाहीत, कधी नव्हती इतके कुशल आणि अकुशल लोक हाताला कामाविना बेकार आहेत. जीएसटी विषय चांगला असूनही घिसाडघाईने राबवण्याच्या निर्णयामुळे हजारो छोटे लघु उद्योग बंद पडले. संगणक क्षेत्रातील देशातील नामवंत उद्योजक अझीज प्रेमजी यांच्या विद्यापीठाच्या सर्व्हेनुसार ५० लाख लोकांना आपले रोजगार गमवावे लागले. नोटाबंदीच्या एका रात्रीत घेतलेल्या निर्णयामुळे लाखो लोक काही चूक नसताना रस्त्यावर आले. शेकडो लोकांना आपले जीव गमवावे लागले. काळा पैसा संपवण्याच्या नादात येथील जनता संपली, त्याचे उत्तर आजपर्यंत मिळालेले नाही आणि नोटाबंदीमुळे आज देश काळा पैसामुक्त झाला का, तर तसे ही चित्र नाही. श्रीमंतांना काही फरक पडलेला नाही, उलट गरीब माणूस संपला. शेतकरी देशोधडीला लागला. ज्याला हे सहन झाले नाही, त्याने हातात विषाचा प्याला घेऊन आणि मोदी-शहा यांच्या नावाने उर बडवत हे जीवन संपवले… ‘आपलं महानगर’ने बातमीचा पाठलाग करताना एकट्या महाराष्ट्राचा हिशोब मांडताना राज्यात सर्वाधिक १४ हजार पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे भीषण वास्तव मांडले आणि आज हेच वास्तव विरोधी पक्ष जनतेसमोर नेत आहे.

देशातला काळा पैसा संपवण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय आणि बाहेरचा काळा पैसा आणून देशातील प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करण्याची घोषणा मोदींनी केली होती. आज काय चित्र आहे. कोणाच्या खात्यावर किती पैसे आले. खोटे बोलण्याला काही मर्यादा आहेत की नाही आणि आज वर तोंड करून शहा महाशय सांगतात की मोदी तसे म्हणालेच नव्हते. लोकांची पोटे खपाटीला गेली असतील, पण अजून मेंदू काम करतोय… लोक विसरलेली नाहीत. तीच गोष्ट मुद्रा कर्ज योजनेची लाखांच्या वर कर्ज देऊन बेरोजगारी संपवायची होती. किती लोकांना कर्ज मिळाली. ३०-३२ हजारपेक्षा हाती कर्ज आले नाही. गरीब माणूस साधे चहा आणि भजीचे दुकान उघडू शकत नाही. लघु उद्योग तर दूर राहिले. उज्ज्वला योजनेने घरोघरी गॅस येतील आणि आया बहिणींच्या डोळ्यातील अश्रू थांबतील, असे चित्र रंगवले. आज काय वास्तव आहे की लाकडाच्या मोळ्या उचलत पाऊल थकून गेलंय आणि डोक्यावरचे ओझे जड तर झालेच, पण डोळ्याच्या खाचा झाल्यात… कवी आरती प्रभू म्हणतात तसे : दोन डोळे, दोन काचा आणि दोन खाचा, येथे प्रश्न येतो कुठे आसवांचा! मोदी आणि शहा यांच्या खोट्या आश्वासनांचा पाढा येथे वाचता येईल, पण या लेखाचा तो उद्देश नाही. लोकांना भाजपची असत्याची डोंगराएवढी गोष्ट आता समजून आली आहे. आपण फक्त एका काळ्या इतिहासाशी मोदी आणि शहा यांच्या कारभाराचे साम्य काय दिसते, यावर एक नजर टाकणार आहोत.

एखादी गोष्ट वारंवार सांगितली तर ती लोकांना सत्य वाटू लागते. त्यामुळे आपल्या मुद्याचा सतत प्रचार करावा आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा लोकांमध्ये प्रचार करत असतो, तेव्हा ती गोष्ट सोपी असायला हवी. फक्त काही ठळक मुद्दे असायला हवेत. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ती गोष्ट सातत्याने पुन्हा पुन्हा सांगायला हवी. हे जर्मनीचा हुकुमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरचं प्रचाराबाबतचे सूत्र होते, जे प्रत्यक्षात उतरवणारा सूत्रधार होता जोसेफ गोबेल्स. गोबेल्सची ओळख हिटलरचा एक विश्वासू सहकारी फक्त एवढीच नाही, तर तो एका प्रचारतंत्राचा जनक म्हणून गोबेल्सकडे पाहिले जाते. असे म्हटले जाते की याच ‘गोबेल्सनीती’मुळेच हिटलर सत्तेवर आला आणि सत्ता टिकवू शकला. आता गेल्या पाच वर्षांतील मोदी-शहा यांच्या कारभारावर एक नजर टाका. काय साम्य दिसते?आपल्या ‘माइन कॅम्फ’ या आत्मचरित्रात हिटलरनं राष्ट्र निर्मितीसाठी प्रॉपगेंडा किंवा प्रचाराचे काय महत्त्व आहे, हे सांगितले आहे. १९३४ साली तो जर्मनीचा हुकूमशहा बनला आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत तो त्या पदावर राहिला. त्याच्यावर अनेक संकटे आली, पण जर्मन लोकांचा त्याच्यावरील विश्वास कायम राहिला. जनतेच्या पाठिंब्याच्या बळावरच तो त्या पदावर कायम होता. ज्यूंवर होणारे अत्याचार, छळछावण्या आणि एकंदरच त्यांच्याविरुद्धचा हिटलरचा द्वेष उघड होता. मग हिटलरचे लष्कर त्यांच्यावर इतके अत्याचार करत असताना इतर जर्मन लोकांनी त्याची साथ का दिली किंवा त्याला विरोध का केला नाही? याचे कारण होते हिटलरने केलेला रीतसर प्रचार.

हिटलर-गोबेल्स यांच्या प्रचार तंत्राचा वापर आणि गेल्या पाच वर्षांचा मोदी आणि शहा यांच्या कारभारात काय साम्य दिसते : प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे येथील स्वायत्त संस्थांवर आपली पकड ठेवायची आणि सत्य बाहेर येऊ द्यायचे नाही. मुख्य म्हणजे लोकशाहीत ज्या विचार स्वातंत्र्याला अनन्यसाधारण महत्व आहे, त्याचा गळा आवळायचा. रिझर्व्ह बँक असो, नीती आयोग असो, न्याय व्यवस्था असो, विद्यापीठ यंत्रणा असो की फिल्म इन्स्टिट्यूट असो या सर्वांमध्ये भारताच्या इतिहासात पहिल्यांदा हस्तक्षेप करण्यासाठी पावले उचलली गेली. मोदी-शहा यांना असे का करावेसे वाटले. कारण त्यांना आपला अजेंडा राबवायचा होता. देशाच्या घटनेने स्वायत्त संस्था बनवून जे काही अधिकार बहाल केले होते, त्याच्यावर घाला घातला गेला… सत्ताधार्‍यांना इतकी कशाची घाई लागली होती. यातून एकच स्पष्ट आहे की त्यांना सर्व अधिकार आपल्या हाती ठेवून देशात अघोषित हुकूमशाही राबवायची आहे. इतके करून आपल्याला भारतातील लोकांचा पाठिंबा आहे हे मोदी आणि शहा यांनी सातत्याने लोकांना आपल्या हाती असलेल्या माध्यमातून दाखवण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे. तेच हिटलर आणि गोबेल्स यांनी केले होते. लोकांचा नाझी पक्षाला पाठिंबा आहे, हे दर्शवण्यासाठी रोड शोज आणि मोठे इव्हेंट आयोजित केले जायचे. त्या वेळी नेत्यांची भाषणे व्हायची. देशात सर्वकाही कसे चांगले आहे, अशा प्रकारच्या भाषणांची उजळणी या ठिकाणी केली जायची. हिटलरच्या वाढदिवशीदेखील मोठे कार्यक्रम आयोजित केले जायचे. १९३६ मध्ये ऑलिंपिकचे आयोजन करण्यात आले होते. जर्मन सरकार कसे यशस्वी आहे, हे दाखवण्याची आयती संधीच या कार्यक्रमातून गोबेल्सच्या हाती आली होती. त्याने तिचा पुरेपूर वापर केला आणि आर्यन वंश कसा शक्तिशाली आहे, हे देखील दाखवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला गेला. कला आणि कलाकार दोन्हीवर सरकारचे नियंत्रण हवे, असे या प्रचार मंत्रालयाला वाटायचे. त्यामुळे आर्ट गॅलरींमधून 6,500 चित्रं काढण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याऐवजी आर्यन वंशाच्या वीर योद्ध्यांची, सैनिकांची चित्रं तयार करण्याला प्रोत्साहन दिलं जाऊ लागलं. जर्मन सैनिक तसंच जर्मन लष्कर किती शक्तिशाली आहे, हे दाखवणार्‍या कलाकारांना विशेष प्रोत्साहन दिले जायचे.

हिटलरला स्थापत्यकलेत रस होता. त्याला वाटायचं की आपण अशा वास्तूंची निर्मिती करावी, ज्यांतून जर्मन साम्राज्याची शक्ती, समृद्धी दिसून येईल. अल्बर्ट स्पिअर या आर्किटेक्टकडून नुरेमबर्ग येथे मैदान बनवून घेण्यात आलं होतं. इथे हिटलरच्या भव्य रॅलीज व्हायच्या. प्रचारात वस्तुस्थिती सांगण्यापेक्षा भावनाप्रधान भाषेचा वापर केला जायचा. एखाद्या प्रश्नाचं अतिशय मोघम आणि सोपं उत्तर सादर केलं जायचं. विरोधक हे नेहमीच कसे चूक आहेत आणि त्यांनी वेळोवेळी कशा चुका केल्या, त्याची आठवण करून दिली जायची त्यामुळे आर्ट गॅलरीतून आपल्याला हवी तशी आणि हवी तितकी चित्रे काढून घेण्यात आली. त्या काळात नाझी विचार सोडून कोणत्याच विचाराला मान्यता नव्हती. अंदाजे २,५०० साहित्यिकांवर बंदी घालण्यात आली होती. नाझी विचारधारेला आव्हान देणारी पुस्तकं जाळून टाकली जात होती. ज्यू धर्माविषयी तसंच शांततावादी, समाजवादी आणि साम्यवादी विचारवंतांनी लिहिलेली पुस्तकं जाळून टाकली जायची. 1933 साली अंदाजे २० हजार पुस्तकं जाळण्यात आली होती. आदर्श साहित्य कसे असावे यासाठी एक पुस्तक उदाहरण म्हणून देण्यात आले होते. ते पुस्तक गोबेल्सने स्वतः लिहिलेलं होतं. ‘मायकल’ नावाची ती कादंबरी होती, आणि त्यासारखंच साहित्य निर्माण करावं, असं तो म्हणायचा. पार्टी प्रॉपगेंडासाठी चित्रपटांचा प्रभावी वापर केला जायचा. जर हलका फुलका मनोरंजन करणारा चित्रपट असेल तर त्याआधी पक्षाने तयार केलेल्या फिल्म्स दाखवल्या जायच्या. किंवा जर्मन लष्कराच्या शौर्याच्या कथा चित्रपटातून दाखवल्या जायच्या.

आपल्याकडे आता काय दिसते : मोदी सरकार विरोधात बोलायचे नाही. मग तो कलाकार असो की प्रसार माध्यमे. त्याच्यावर देशद्रोही नावाचा एक शिक्का मारून बाजूला सारायचे. देशात सरळ दोन गट पाडलेत. एक मोदी-शहा यांच्या कारभाराचे गोडवे गाणारा मोदीभक्त गट आणि दुसर्‍या बाजूला सत्तेला प्रश्न विचारणारा तट. या तटातील ६०० कलाकार मोदी विरोधक ठरवलेत आणि आपण किती महान आहोत हे दाखवण्यासाठी ९०० कलाकार मोदीभक्त असल्याचे दाखवून मोदींची कलाकारांबरोबरची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली… मोदी यांच्या जीवनावरील चित्रपट काढण्यात आला. त्याआधी टॉयलेट असे चित्रपट काढून सरकारी योजनांचा प्रचार प्रसार केला गेला. हे सारे कशासाठी तर लोकांना कळायला की आपण किती महान आहोत. हिटलरसाठी गोबेल्स हेच तर करत होता.

जर्मनीत नाझी पक्ष आणि हिटलरशिवाय कुणीच सक्षम नेतृत्व नाही, हे देखील लोकांना वारंवार सांगितले जात होते. एखाद्या उपक्रमात अपयश आले तर त्याचं खापर ज्यू किंवा कम्युनिस्टांवर फोडलं जायचं. देशातल्या प्रत्येक प्रश्नाचा संबंध ज्यू लोकांशी जोडून त्यांच्यामुळे तो प्रश्न कसा अस्तित्वात आला, याचा प्रचार केला जायचा. स्वस्तिक, ध्वज, गणवेश यांसारख्या राष्ट्रीय प्रतीकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. विरोधी विचारांचा समूळ नाश करण्यासाठी सेन्सॉरचा वापर, भव्य इव्हेंटबाजी, भाषणबाजी आणि सातत्याने नव्या, सोप्या आणि सुटसुटीत घोषणांचा वापर यामुळे गोबेल्सचे प्रचारतंत्र यशस्वी ठरले. हिटलरप्रती असलेल्या श्रद्धेमुळे गोबेल्स हिटलरचा अत्यंत विश्वासू बनला. १९४४ ला दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी त्याला हिटलरनं युद्धमंत्री बनवले. जर्मनी युद्ध हरणार, हे समजल्यानंतरही गोबेल्सने हिटलरची साथ दिली. रशियाच्या फौजा जर्मनीत घुसल्यानंतर हिटलरने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी हिटलरने गोबेल्सला जर्मनीचा चान्सलर घोषित केले आणि नंतर हिटलरने आत्महत्या केली. चान्सलर झाल्यावर जर्मनीने शरणागती पत्करावी, असा आदेश गोबेल्सनेच दिला. एका दिवसासाठी चान्सलर झालेल्या गोबेल्सने १ मे १९४५ रोजी आत्महत्या केली.

गोबेल्सच्या मृत्यूला ७३ वर्षं लोटली, पण ‘गोबेल्सनीती’ हा शब्दप्रयोग नेहमी ऐकायला मिळतो. एखादा राजकीय नेता खोटा प्रचार करताना दिसला तर त्याचे विरोधक म्हणतात की हा नेता गोबेल्सचं प्रचारतंत्र वापरतोय. कारण सोपं आहे आणि सिद्ध झालेलंही – एकच गोष्ट वारंवार सांगितल्याने असत्य देखील सत्य वाटू लागतं, आणि हेच गोबेल्सच्या नीतीचे सार होते. हेच सार घेत 5 वर्षांत भारताचा कारभार चालवला गेला आणि त्याला विकासाचे नाव दिले गेले. आता लोकांनी ठरवायचे आहे की लोकशाही हवी की ठोकशाही…!

हरीश केंची,
९४२२३१०६०९



Sunday, 19 October 2025

*विचारांची दिवाळी....!*

"दीपप्रज्वलन काय असतं. समाज कर्मकांडांत जखडला. पण समाजाची चिंतनशील वृत्ती तप्त ज्वालामुखीसारखी चार्वाकांच्या, गौतम बुद्धांच्या, महानुभावांच्या, ज्ञानदेवांच्या, नामदेवांच्या, तुकोबांच्या, महात्मा फुलेंच्या तोंडून रुढींवर तप्त लाव्हारस फेकत राहिली. बुद्धांच्या 'अत्त दीपो भव' मध्ये चिंतनशील होण्याचा संदेश होता. ज्ञानदेवांच्या 'का घराचिये उजेडू करावाl पराविये अंधारू करावाl हे नणेचि गा पांडवाl दीपु जैसाll' मधून दिव्यासारखं समतावादी होण्याचा आग्रह होता. नामदेवांच्या 'नाचू कीर्तनाचे रंगीl ज्ञानदीप लावू जगीll' असा उपदेश होता. महात्मा जोतिबा समाजहितैषी परंपरेतून जीवनाची ज्योत पाजळूनच अज्ञानांधकार दूर करण्या कटिबद्ध झाले. दीपावलीच्या दीपोत्सवाला महात्म्यांच्या चिंतनाने अर्थपूर्णता लाभली. देव-धर्मवादी उन्मादाने जगाला विनाशाच्या अंधारात ढकलण्याचा चंग बांधलाय. म्हणून प्रत्येकाने आपल्या मनोमंदिरात विवेकाचे दिवे उजळणं आवश्यक झालंय. समतेचा, बंधुत्वाचा, स्वातंत्र्यदीप पाजळला तर मानवजातीचं कल्याण दूर नाही!"
........................................................
*ये* दिवाळी ये...... विघ्नहर्ता गणेश घरी निघाले की, आम्ही 'पुढच्या वर्षी लवकर या...' म्हणून त्यांची आळवणी करतो. तुला असं आम्ही आळवत नाही, पण तू यावीस अशी इच्छा मात्र आम्ही मनात सतत तेवत ठेवतो. तू आलीस की, आम्हाला बरं वाटतं, हे आता तुझ्या लक्षात आलं असेल. घरोघर आम्ही दिवे लावतो. तुझ्या येण्याने तरी आमच्या अंधारल्या जीवनात प्रकाश यावा या आशेनेच हे घडतं. पण अजूनही सगळीकडचं अंधाराचं सावट आहे तसंच आहे. अंधार घालवायचा असेल तर एक चिमुकला दिवा लावा, असं कुणा साधुपुरुषानं केव्हातरी कुणाला तरी सांगितलंय म्हणतात. दिवे लावताना आम्ही ते आठवत असतो. दिवे लावतो, दीपोत्सव घडवतो, पण ह्या प्रकाशाच्या साक्षीने अंधारच अधिक दाटतो. आम्ही बाहेर दिवे लावतो, अंतरीचा ज्ञानदिवा विझून गेलाय याची आम्हाला दादच नसते. दिवाळी, कधीतरी तू आम्हाला साहिरोबांप्रमाणे 'अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे' असं निक्षून सांगशील का? तुझ्या लक्षात आलं असेल, आम्ही सोंगट्या बदलून नवा डाव खेळायला सुरुवात केलीय. बुद्धिबळात काळ्या आणि पांढऱ्या दोनच रंगाच्या सोंगट्या असतात, पण रंग वेगळे असले तरी दोन्ही सोंगट्यांची चाल सारखीच असते. पांढरा उंट तिरका जातो, तसाच काळा उंटही तिरकाच जातो. पांढरा घोडा अडीच घरे उडतो, तसाच काळा घोडाही अडीच घरेच उडतो. आमच्या नव्या सोंगट्यासुद्धा जुन्या सोंगट्यांसारखाच खेळ रंगवतील असं दिसतंय. आम्ही खिलाडू आहोत. आम्हाला 'बकअप' म्हणून सीमेबाहेरून ओरडायची हौस आहे. घोषणा करण्यात आमचे पुढारी जसे पटाईत आहेत तसेच 'की जय'चा घोष करण्यात आम्हीही पटाईत आहोत. जयजयकाराचा घोष सतत कानात दुमदुमत असला की, हरल्याची खंतच उरात उरत नाही. गांधीजींनी वाईट कधी बघणार नाही, वाईट कधी बोलणार नाही, वाईट कधी ऐकणार नाही असा संदेश तीन माकडांच्या द्वारा दिला. तोंड, डोळे, कान झाकणाऱ्या त्या माकडांना आम्ही आमचा आदर्श मानलंय. आम्ही तोंड असून न बोलण्याचा, डोळे असून न बघण्याचा, कान असून न ऐकण्याचा वसा घेतलाय. गांधींनी वाईट बोलणं, वाईट बघणं, वाईट ऐकणं नको म्हटलं होतं, पण त्यांच्यात चांगलं-वाईट पारखण्याची पात्रता होती. आम्हाला चांगलं काय वाईट काय हे ओळखणे कठीण झालंय.
जिब्रानची एक छान रूपक कथा आहे. परमेश्वरानं जग बनवतानाच एक सौंदर्यदेवी आणि कुरूपतेची देवी बनवली. दोघींना त्यांची ओळख पटावी अशी वस्त्रे-अलंकार दिले. दोन्ही देवींना पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली. दोघी तो कंटाळवाणा लांबचा प्रवास करून पृथ्वीवर आल्या आणि एक नितांत सुंदर सरोवर बघून त्यांनी तिथे आंघोळ करण्याचे ठरवले. दोघींनी आपली वस्त्रे-आभरणे काढून व्यवस्थित ठेवली आणि त्या सरोवरात शिरल्या. कुरूपता देवीने आपले स्नान झटपट ओटोपले, बाहेर पडून सौंदर्यदेवीची वस्त्रे-आभरणे अंगावर चढवली आणि ती निघून गेली. सौंदर्यदेवी बाहेर आली. आपली वस्त्रे नाहीत. करायचं काय ! शेवटी कुरूपता देवीची वस्त्रे चढवणे तिला भाग पडले. तेव्हापासून सौंदर्यदेवीची वस्त्रे लेवून कुरूपतादेवी वावरते आहे. कुरूपतेची वस्त्रे लेवून सौंदर्यदेवी वावरते आहे. जिब्रानच्या कथेत सौंदर्य-कुरूपता देवी आहेत. पण हीच कथा सत्य-असत्य, सुख-दुःख यांचीही आहे. सत्याची वस्त्रे लेवून असत्य वावरते, सुखाची वस्त्रे लेवून दुःख वावरते असे आपण अनुभवतो ते यामुळेच. दिवाळी, निदान सत्यात दडलेले असत्य, दुःखात दडलेला आनंद ओळखता येईल एवढा प्रकाश तू आमच्या डोक्यात पाडू शकशील ?
उरातले दुःख, निराशा आणि सदैवच मागे लागलेल्या विविध चिंता-आपदा विसरून आम्ही तुझे स्वागत 'आज आनंदी आनंद झाला' म्हणत करतो, हे तुला ठाऊक आहे. यावेळी निर्मल मनाने तुझे स्वागत करता येईल असे वाटले होते, पण तशी परिस्थिती नाही. राजसत्तेनं साखर, तेल, बेसनडाळ असलेला 'आनंदाचा शिधा' देण्याचे गोड सरकारी वचन दिलं होतं, ते मात्र राजसत्तेनं पाळले नाही. महागाईने जेरीस आलेल्या घरात बेसनलाडू बनवण्याचे बळ कुठून येणार? फटाक्यांचा कडकडाट ऐकतानाही काळजाला कंप फुटतो. कुठेही केव्हाही बॉम्ब फुटण्याचे भय कायमचेच माध्यावर टांगले गेले आहे.
शाळा-कॉलेजात जाणाऱ्या मुलाबाळांना सुट्ट्या असल्याने ती घरातच डोळ्यापुढे असणार. पण यांच्या नशिबात काय आहे, ह्या मुंग्यांनी मेंदू पोखरून काढलाय. लिगपिसाट-धनपिसाट सैतानांच्या सावल्या भोवती फेर धरून नाचत आहेत असं वाटून सरळमार्गी सज्जन अजूनही थरथरत आहेत, तरी आम्ही दिवे लावून तुझे स्वागत करत आहोत. तू म्हणशील तर आणखीही रोषणाई करू, वीजटंचाईची चिंता आम्ही करत नाही. तू करू नकोस. तुझ्यासाठी सारे काही करायला आम्ही सिद्ध आहोत. दुःखाचे फाजील प्रदर्शन करण्यात आम्ही जसे पटाईत आहोत, तसेच साऱ्या संकटांची, धोक्यांची दैन्याची, दुःखाचीही तमा न बाळगता सोहळ्यांचा जल्लोष उडवण्यातही आम्ही पटाईत आहोत. ज्यांना भवितव्यच नसते ते असेच आपल्यापुरते उन्मादी आत्मानंदात वर्तमान उधळून टाकतात, असं म्हटलं जातं. दिवाळी, कुणाला सांगणार नाही. मला सांग, खरंच का आम्हाला काही भवितव्य नाही?
जगाला दहशतवादाने आणि माणसाला अनेक ताणतणावांनी ग्रासलंय. या दोन्ही समस्या आजच्या नाहीत. पृथ्वीवर कधी काळी माणूस निर्माण झाला, तेव्हापासून या समस्या आहेत; आणि त्या मानवनिर्मित आहेत. या समस्यांचं मूळ मानवी स्वभावाच्या अहंगंडात आणि उणिवात आहे. साहित्यकार प्र. के. अत्रे यांनी ज्यांना 'कारुण्याचा विनोदी शाहीर' म्हटलं, त्या दत्तू बांदेकरांची आधुनिक काळातील आदम आणि ईव्ह ही कथा आहे. हे दोघेही कापडाच्या दुष्काळामुळे त्रस्त असतात. काळ्या बाजारातील महागडं कापड त्यांना परवडत नसतं. ते गरीब असतात; जेमतेम आडोशाच्या झोपडीत ते राहात असतात. लाजेस्तव ते रात्रीच्या वेळी नदीवर आंघोळीला जातात. ईव्ह आधी परतते. आदमनंतर येतो. तो दार ठोठावतो. ईव्ह दार उघडत नाही. ती आतून म्हणते, 'मी वस्त्रहीन आहे...!'. 'तो म्हणतो, 'अगं, दिवा विझवून टाक. म्हणजे अंधारात तू मला दिसणार नाही....!' ईव्ह लटक्या रागात म्हणते, 'जनाची नाही, तरी मनाची लाज...!' आदम हैराण होतो. तो म्हणतो, 'अगं, लवकर दत्तू दार उघड. मीदेखील बाहेर दिगंबर अवस्थेतच आहे...!' ईव्ह विचारते, 'अहो, तुमच्या अंगावर लंगोटी होती ना...?' आदम म्हणतो, 'नदीवर आंघोळ करायला गेलो, तेव्हा लंगोटी धुऊन वाळत टाकली. ती कुत्र्याने पळवली. अंधारात तसाच नागवा पळत आलोय! पण तूही अशी कशी? कालच मी तुला पिंपळाच्या पानांची साडी बनवून दिली होती ना! तिचं काय झालं...?' ती म्हणते, 'ती बकरीनं खाऊन टाकली...!' आदम विचार करून म्हणतो, 'मग आंब्याच्या डहाळ्यांनी तरी लाज झाकायची...!' ईव्ह म्हणते, 'त्याला मोठ-मोठे मुंगळे लागलेत...!' तो म्हणतो, 'अगं, मग केळीच्या पानाचा तरी उपयोग करायचा...!' ती म्हणते, 'केळीची पानं नेसली की गाई-म्हशी माझ्या अंगाला भिडतात. सकाळीच केळीच्या पानाची चड्डी शेजारच्या बैलानं खाल्ली! सरकार कपडा देत नाही आणि जनावरं झाडपाला नेसू देत नाहीत. आता मी करू तरी काय...?' आदम बाहेरून ओरडतो, 'मी तरी काय करू? लोकं म्हणे प्रेतावरचं वस्त्र पळवतात. म्हणून मी स्मशानात जाऊन तोही प्रयत्न करून पाहिला. एका प्रेतावरचं वस्त्र हळूच उचलण्याचा प्रयत्न केला. आणि तुला काय सांगू? ते प्रेतच जिवंत झालं. आपल्या प्रेतावरचं वस्त्र कुणी चोरील या भीतीने लोकही आजकाल फार मरत नाहीत...!' ईव्ह म्हणते, 'म्हणजे सारेच उपाय हरलेत म्हणायचे...!' आदम म्हणतो, 'म्हणून मी म्हणतोय. दार उघड. अंधार आहे तोपर्यंत पळत जाऊन गुहेत लपून बसू या. हा पहा सूर्योदय होत आलाय. चल, पळ लवकर. नाही तर आपल्या दोघांना अशा अवस्थेत पाहून उगवलेला सूर्यसुद्धा मागे परतायचा...!' ही गोष्ट बरीच मोठी आहे. तिचं हे सार आहे. ते आज भेडसावणाऱ्या समस्येवर विचार करताना, त्यावर उपाय शोधताना आपण मानवी जीवनाच्या सुरुवातीपर्यंत नकळत कसे पोहोचतो, याचा अनुभव देणारं आहे. अपायांवर शोधून योजलेले उपाय-उपचार हेच आपल्या ताणतणावांचे आणि समस्यांचे कारण आहेत. ब्लड प्रेशर मोजण्याच्या यंत्राचा शोध लागला नव्हता, तोपर्यंत ताण कळत नव्हता. आधुनिक एमआरआय तपासणीत रुग्णाच्या शरीरातले सर्व ताणतणाव-बिघाड कळतात. पण त्याचा रिपोर्ट मिळेपर्यंत रुग्णाच्या आप्तांच्या ताणतणावांत वाढ झालेली असते. माहिती तंत्रज्ञानामुळे जगातल्या घडामोडीचं काही संकेदांत सार्वत्रिकीकरण होते. हे काम प्रसारमाध्यमं चोखपणे पार पाडतात. परिणामी, कुठेतरी दूर घडलेली दुर्घटना आपल्याला हादरवते. दहशतवाद असाच जागतिक झालाय. अनेक वर्षांपासून माणूस राजेशाही, धर्म-भटशाही आणि परतंत्रशाहीचे प्रहार सोसतोय. आजच्या लोकशाहीव्यवस्थेत तो पब्लिक ओपिनियनचे छुपे प्रहार झेलतोय. यासाठी राजकीय पक्षांचं सत्ताकेंद्री बनेल राजकारण आणि प्रसारमाध्यमांची टीआरपी वाढवण्यासाठीची छटेल स्पर्धा विश्वासघातकी हत्यारासारखी वापरली जातेय. परिणामी, लोकशाहीमुळे राजेशाही आवळून त्याची जागा राजकारणातल्याच नाही, तर सर्वच क्षेत्रातल्या घराणेशाहीने घेतलेली दिसतेय. विज्ञानयुगात नटवी-फसवी धर्म-भटशाही संपली पाहिजे होती. पण ती नव्यानं वाढलेल्या मार्केटिंग आणि मीडिया एक्स्पर्टाच्या जोडीने टिकून राहिली आहे. ह्या सर्व धर्म-भटशाहीची मंत्र-तंत्रीय पोपटपंची लोकांना समजत नव्हती. तरी तिचा समाजावर अंमल होता. राजसत्तेला झुकवण्याची तिच्यात शक्ती होती. तथापि, त्यांची ही करामत लोकल होती. 'इंटेलेक्च्युअल' म्हणवणाऱ्या आजच्या मीडिया आणि मार्केटिंग एक्स्पर्टाचा आवाका फार मोठा आहे. ग्लोबल आहे. धर्म-भटशाहीने माणसाच्या विचारशक्तीवर पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, उच्च-नीच आदि भेदांचे आघात करीत ती बथ्थड केली आणि आपले स्वार्थ साधले. तेच काम आजचे ग्लोबल एक्स्पर्ट करीत आहेत. एडस् आणि योग या विरोधी विकार आचारांचं असंच ग्लोबलायझेशन झालंय. दोन्हींच्या वाढीत माणसाच्या सुख-शांतीचा हव्यास आहे. स्वतःला ओळखण्याची कुवत नसलेली माणसं अशा हव्यासात फसतात. माणसाला सुख-शांतीच्या समृद्धीची ओढ असते; त्याला ती आवडते. पण गरिबीवर उपचार करण्यास तो तयार नसतो. गरिबी म्हणजे विचारांची गरिबी. रूढी-परंपरा जपणाऱ्या धार्मिकतेने मानवी चेहऱ्याला नालायकीचं काळं फासलंय. मानवता ग्लोबल होण्याआधी सनातनी-कट्टर धर्मवादाने माजलेला दहशतवाद ग्लोबल झालाय. हे विचारांच्या दारिद्र्यामुळे घडलंय, घडतंय. विचार म्हणजे काय? आदिमानवाने मोठ्या दगडाला हटवण्यासाठी त्या दगडाखाली लाकडाचा ओंडका घालून तो दगड हवा तिथे ढकलत नेला, हा पहिला विचार! ज्याने एखाद्या वस्तूला गोलाकार चक्राकृती बनवून त्यावस्तूला गतिशील बनवलं, तो दुसरा विचार! हा प्रयत्न करणाऱ्याला लोकांनी आधी चक्रम ठरवलंय. पण विचारवंत काकासाहेब कालेकरांनी त्याला चक्रऋषी म्हटलंय. तिसरा विचारक अग्नीचा शोध लावणारा. चौथा विचारक गायीला उपयुक्त पशू बनवणारा. पाचवा विचारक शेतीला सुरुवात करणारा. 
या आद्य विचारांमुळेच मानवी विचारांना आणि जीवनाला गती मिळून मानव नव्या-नव्या विचारांनी इतिहास घडवत भविष्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. विचार केवळ मानवी जीवन सुसह्य, समृद्ध करणाऱ्या शोधांचाच नसतो; तर माणूसपण टिकवणारा, गुलामी झिडकणारा, स्वाभिमान दाखवणाराही असतो. 'फळाची अपेक्षा न करता कर्म करीत राहा...!' असं भगवद्गीतेतला श्रीकृष्ण सांगतो. तोदेखील विचार आहे. पण व्यवहारात तो निष्काम कर्मयोग ठरतो. विचार कृतीत येणं, तो साकार होणं, हा खरा विचार! छत्रपती शिवरायांनी स्वराज्याच्या मंत्र मावळ्यांत भिनवला आणि तसं स्वराज्य निर्माण केलं, महात्मा जोतिराव फुलेंनी सत्याचा आग्रह धरला आणि धर्माच्या नावाखाली जातीभेदाच्या भिंती निर्माण करणाऱ्या भटीव्यवस्थेचा चेंदामेंदा करण्याचा विचार समाजाला दिला. शिक्षण-स्त्री शिक्षण सर्वांसाठी खुलं करण्याचा आग्रह धरला आणि तो तडीस नेला. शाहूराजांनी जातिनिशी शूद्र ठरवून दारिद्रय लादलेल्यांसाठी आरक्षण हा विचार दिला आणि तो आपल्या कोल्हापूर संस्थानात अंमलातही आणला. आजच्या आरक्षणाच्या भूमिकेमागे शाहूराजांचाच विचार आहे. महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्यांचा आणि अस्पृश्यता विरोधी विचार दिला. त्यासाठी ते झटले-झगडले. स्वातंत्र्य मिळालं, अस्पृशता पाळणं हा गुन्हा ठरला. त्यांनी सत्य हाच परमेश्वर हा विचारही दिला. पण सत्तालोभी गांधीवाद्यांनी गांधीनाच फोटोत लटकवलं आणि पुतळ्यात कोंबलं. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असा विचार आपल्या अनुयायांना दिला. यामुळे करोडों लोकांना आपल्या विकासाचा मार्ग मिळाला. जगविख्यात विचारवंत आइनस्टाइनने E=mc² हा विचार दिला. त्यामुळे विज्ञान आणि गणितातले अनेक बुंले सुटले, नवे शोध लागले. हा सारा इतिहास म्हणजे विचारांची यात्रा आहे. विचाराच्या प्रक्रिया निर्मितीतच आजचा अंधार दूर करणारा प्रकाश उजळेल. त्यासाठी दिवाळी विचारांचीही हवी. दिवाळी आली किंवा एखादा सण आला की, आपण घराचे काने कोपरे साफ करतो. त्याचप्रमाणे मनातील कटुता, वाईट आठवणी किंवा एखाद्याने केलेली फसवणूक आपण मोठ्या मनाने विसरून जायला हवी. आज धकाधकीच्या जीवनात माणसाच्या मनावर कुटुंब, नोकरी-धंदा, मित्र परिवार याचं माठं ओझं असतं. त्यात रोज नव्या दुःखाची वाढ होत असते. अशा परिस्थितीत अनावश्यक कचरा कशाला मनात ठेवायचा? कष्ट शरीराला थकवतात; तर कडवेपणा मेंदूला थकवतो. काही वेळा हा कडवेपणा स्वतःबद्दलही असतो. तो आपल्याला संपवतो. खऱ्या अर्थाने दोनच प्रकारची माणसं जगत असतात. एक, ऐश्वर्य आणि सत्ता-अधिकार असूनही ज्यांच्या अंगी क्षमाशीलता आहे, असे; दोन, गरीब असूनही आपल्या अर्ध्या घासातला अर्धा घास गरजूला द्यावासा वाटतो असे. हा विचार आहे, माणूसपणाची कसोटी घेणारा. या कसोटीसाठी मनाची साफसफाई करावी लागते. त्याशिवाय विचारांची उजळणी कशी होणार? दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विचारांची दिवाळी आवश्यक आहे. अन्यथा बांदेकरांच्या आधुनिक आदम आणि ईव्ह सारखंच आपल्यावरही गुहेत राहाण्याचे दिवस येतील. जो माणूस, समाज विचारांना टाळतो, विचार करण्याचंही टाळतो; त्यांना गरिबीही टाळता येत नाही. सुख-शांतींच्या समृद्धीसाठी विचार हा हवाच. विचार कधी मरत नाही आणि फार काळ दडपलाही जात नाही. माणसाच्या विचार निर्मितीचं केंद्र मन आहे. ते स्वच्छ असेल तर आणि तरच लोकोपयोगी विचार निर्मिती होणार. असं मन विश्वमनाशी युनिव्हर्सल माईंड जोडलं जाणार! कारण विचार हा सर्वसंचारी असतो. महात्मा गांधींनी स्वच्छ मनाने स्वातंत्र्याचा आग्रह धरला होता. त्यासाठी ते सत्याग्रही झाले. इतरांतही सत्याग्रह रुजवला-वाढवला. म्हणूनच त्यांचं विचारकार्य ग्लोबल झालं. बुद्धाचे विचार विश्वशांतीचा संदेश देणारे झाले. अशांच्या विचारांनी आपण व्यवहारात वागलो, तरी दिवाळीचा आनंद चार दिवसांपुरताच मर्यादित देणारा राहाणार नाही; तर त्याने आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण आनंददायी होईल. असा चिरंतन आनंद आपणास लाभो !
हरीश केंची 
९४२२३१०६०९




Monday, 13 October 2025

वैचारिक दिवाळखोरी....!

"धार्मिक, जातीय, सनातनी उन्माद वाढलाय. भावना संकुचित झाल्यात. भिक्षुकी, भटीपाशाचा विळखा करकचून आवळला गेलाय. व्रतवैकल्ये वाढलीत. हिंदु नव्हे सनातनी धर्माचा जागर अन् प्रागतिक, सुधारणावादी, प्रबोधिनी विचारांना विरोध होतोय. सनातनी अभिनिवेश दाखवत सर्वोच्च न्यायालयात कुणी सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारतो तर कुणी प्रबोधिनी विचारांची पुस्तकं वाटली म्हणून ती फेकून मारतो. एवढं कौर्य येतं कुठून? 'सनातनी धर्माचा अपमान सहन करणार नाही..!' अशी मखलाशी केली जाते. सारी वैचारिक दिवाळखोरी! सनातनधर्मातल्या देव-धर्माच्या नावानं सोकावलेल्या सामाजिक रूढी-परंपरांचा, भिक्षुकी, भटीपाशाविरोधात 'हिंदू मिशनरी' बनून हिंदुत्वनिष्ठ प्रबोधनकारांनी समाचार घेतला होता. आज त्यांना धर्मविरोधी ठरवलं जातंय! एवढंच नाही संत साहित्याची अनुभूती न घेता वारकऱ्यांना नक्षलवादी ठरवलं जातंय. आज 'कोदंडाचा टणत्कार' आम्हाला आठवतोय. प्रबोधनकार, माफी असावी..! आम्ही तुमचा विचार पुढं नेऊ शकलो नाही...!"
------------------------
मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयातले अधिकारी राजेंद्र कदम यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्यावेळी समाज प्रबोधनात्मक प्रबोधनकार ठाकरे यांचं ‘धर्माची देवळे अन् देवळांचा धर्म....’, दिनकरराव जवळकर यांचं 'देशाचे दुश्मन...' ही पुस्तकं वितरित केली. रुग्णालयाच्या अधिसेविकेने कदम यांना बोलावून अपमानित करत या पुस्तकामुळे आमच्या भावना दुखावल्यात, असा आक्षेप घेतला. ही पुस्तकं का वाटली? असा जाब विचारला. सर्व सहकाऱ्यांसमोर हात जोडून माफी मागायला लावली. त्यानंतर महिलांनी कदम यांच्या अंगावर प्रबोधनकारांचे आणि दिनकरराव जवळकर यांची पुस्तकं फेकून मारली. या घटनेची ध्वनीचित्रफित बनवून ती प्रसारित केली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात समाजप्रबोधनाचे काम सातत्याने होत आलंय. समाजप्रबोधन करणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असून, पुस्तकं लिहिणं, वितरीत करणं, चर्चासत्र करणं, अंधश्रद्धा निर्मूलन हा त्याचाच भाग आहे. समाज सुधारणेवरचं पुस्तकं देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविताना शासनाने बंदी न घातलेल्या पुस्तकांचं वितरण करणाऱ्याला ही वागणूक देणं योग्य नाही. ही घटना महापालिका सेवा आणि नियमावलीचा भंग करणारी असून, दखलपात्र गुन्हा आहे. अधिसेविका अन् परिचारिका महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई करायला हवी. प्रबोधनकार ठाकरेंनी सत्य मांडलं, तर्कनिष्ठ, विवेकपूर्ण, अभ्यासू पद्धतीची वास्तव्यवादी मांडणी केलीय. पुस्तकं भेट दिली तर ती वाचायची, समजून घ्यायचं, एकाच विचारधारेच वाचून माणूस बौध्दिक दृष्ट्या प्रगल्भ होत नाही. एकांगी बनतो. दोन्ही विचारधारा वाचल्या की सत्य समजतं. प्रबोधनकार ठाकरे आणि दिनकरराव जवळकर यांनी जे लिहिलंय ते त्यांनी अनुभव आणि वाचनातून लिहिलंय. रुग्णालयातील या सुशिक्षित, प्रशिक्षित कर्मचारीवर्गाने प्रबोधनकार ठाकरे आणि दिनकरराव जवळकर सारख्या बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंतांच्या पुस्तकांना विरोध करावा हे मोठे आश्चर्य, तेवढेच घृणास्पदही आहे. त्यामध्ये काही कट्टर हिंदूत्ववादीचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष भावना भडकवण्याचे संबध असू शकतो. प्रबोधनकार यांनी १९२९ साली ही पुस्तक लिहिलीत अलीकडे बरीच वर्ष या पुस्तकावर चर्चा नव्हती. आता नवीन पिढी या निमित्ताने ही पुस्तकं आणि यातील कंटेंटवर चर्चा करील. पोलिसात तक्रार केली नाहीतर माफी मागून तिथंच मिटलं असतं तर चर्चा झाली नसती.
प्रबोधनकारांची पुस्तके फेकणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, प्रबोधनकारांचा नाही! मुंबईत प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांची विटंबना करण्यात आली आणि त्यांना हिंदुविरोधी ठरवण्याचा प्रयत्न झाला, हे अत्यंत निंदनीय, संतापजनक आहे. ज्यांनी आयुष्यभर समाजातली अंधश्रद्धा, विषमता, अन्यायाविरुद्ध लढा दिला, त्या प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर असा आरोप करणं म्हणजे इतिहासाची थेट विटंबना आहे. विचारांचा आदर सोडून विचारवंतांचा अपमान करणं ही समाजाच्या पतनाची सुरूवात असते. सध्या आपण त्याच दिशेने जातो आहोत. प्रबोधनकार ठाकरे हे खरे हिंदुत्त्ववादी सुधारक होते. त्यांनी धर्मातली अंधश्रद्धा, भोंदूपणा जातिभेदाविरुद्ध संघर्ष केला, कारण त्यांना हिंदू धर्म अधिक सशक्त अन् विवेकी करायचा होता. त्यांच्या लेखनात धर्माविषयी टीका असली तरी ती विध्वंसक नव्हती, ती सुधारक होती. त्यांनी सांगितलेलं हिंदुत्त्व हे समानता, बंधुता अन् विवेकावर आधारलेलं होतं. त्यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण करून हिंदू समाजात एकात्मतेचा संदेश दिला. विशेष म्हणजे प्रबोधनकार यांनीच सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात केली. तोच उत्सव आज सर्व हिंदुत्ववादी लोक ढोल-ताशांच्या गजरात, भक्तीभावानं साजरा करतात. त्याकाळी या उत्सवाचा उद्देश धार्मिक नसून सामाजिक होता. समाजातला भेद मिटवून सर्व हिंदूंना एकत्र आणणं, समाजातील दुर्बल घटकांनाही या सणात सहभागी करून घेणं हा त्यामागचा खरा हेतू होता. त्यामुळे प्रबोधनकार यांना हिंदुविरोधी ठरवणं म्हणजे अज्ञानाचं प्रदर्शन आहे. प्रबोधनकार  केवळ विचारवंत नव्हते, तर महान समाजसुधारक, पत्रकार, लेखक होते. त्यांचं 'प्रबोधन ' मासिक वादळासारखा प्रभाव टाकणारा ठरलं. अस्पृश्यता, स्त्रीशिक्षण, स्वातंत्र्य आंदोलन, आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी आपलं आयुष्य वाहिलं. कौटुंबिक दृष्ट्या पाहिलं, तर प्रबोधनकार हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील होते. आज महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख ठाकरे कुटुंबाचा पाया हाच विचारवंत, समाजसुधारक आणि खरा हिंदुत्त्ववादी आहे. अशा थोर व्यक्तींच्या पुस्तकांना फेकून देणं म्हणजे त्यांच्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा, हिंदुत्वाच्या खऱ्या आत्म्याचा अपमान आहे. हा प्रकार ढोंगी हिंदुत्त्ववादी राजकारणाचं जिवंत उदाहरण आहे. एकीकडे हिंदुत्त्वाचा नारा दिला जातो आणि दुसरीकडे खऱ्या हिंदुत्त्वाचे प्रवर्तक असलेल्या प्रबोधनकार ठाकरे यांचा अपमान केला जातो. समाजाने अशा प्रकाराचा तीव्र निषेध करावा आणि प्रबोधनकारांच्या विचारांचा दीप अधिक तेजाने प्रज्वलित ठेवण्याची जबाबदारी आता प्रत्येक मराठी माणसाची आहे.
न्यायालयात नेमंक काय घडलं? सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना राकेश किशोर यांनी थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बुट फेकला. त्याचवेळी सुरक्षा कर्मचारी किशोर यांना घेऊन जात असताना 'आम्ही सनातनचा कोणताही अपमान सहन करणार नाही...!' असं म्हणत आरडाओरड केली. पण सरन्यायाधीशांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही. १६ सप्टेंबर रोजी, सर्वोच्च न्यायालयाने खजुराहो येथील ज्वारी मंदिरातील भगवान विष्णूच्या सात फूट उंच मूर्तीची पुनर्बांधणी आणि पुनर्स्थापना करण्याचे निर्देश मागणारी याचिका फेटाळून लावली. ती याचिका  प्रसिद्धीसाठीची असल्याची टिप्पण्णीही केली. 'जा आणि देवाला काहीतरी करायला सांगा. तुम्ही म्हणता की, तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात. मग आत्ताच जाऊन प्रार्थना करा. हे एक पुरातत्वीय स्थळ आहे आणि एएसआयने परवानगी द्यावी लागते....!' अशी प्रतिक्रीया सरन्यायाधीशांनी दिली होती. या गोष्टीचा राग मनात धरुन राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश यांच्यावर हल्ला केला. पण या हल्ल्यानंतरही सरन्यायाधीश गवई इतर वकिलांना म्हणाले की, 'या सर्व गोष्टींमुळे विचलित होऊ नका. मी विचलित झालेलो नाही. या गोष्टींचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही...!' भूषण गवईंच्या या टिप्पणीने सोशल मीडियावर गोंधळ उडाला. सरन्यायाधीशांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप काहींनि केला. सरन्यायाधीश म्हणाले की, 'माझा अनादर करण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी सर्व धर्मांचा आदर करतो...!' सरकारचे सॉलिसिटर तुषार मेहता यांनी सरन्यायाधीशांचे समर्थन केलंय. अनेक वरिष्ठ वकील, कायदेतज्ज्ञांनी आरोपी वकिलावर कठोर कारवाईची मागणी केली. 'या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. हा सर्वोच्च न्यायालयावर झालेला जातीयवादी हल्ला आहे. सर्व न्यायाधीशांनी हल्ल्याचा निषेध करावा आणि हे स्पष्ट करावे की, न्यायालय वैचारिक हल्ले सहन करणार नाही. न्यायालयाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करत, सरन्यायाधीश यांनी व्यत्ययाशिवाय न्यायालयीन कर्तव्ये पार पाडल्याबद्दल त्यांचे कौतुक 
कायदेतज्ज्ञांनी केलंय . 
सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट कुणी मारला असेल तर तो, ज्यांनी शंबुक मारला, चार्वाक जाळला, एकलव्याचा अंगठा मागितला, ज्ञानेश्वर माऊलीना वाळीत टाकलं, चक्रधरांचा खून केला, तुकारामबुवांचा खून केला, बसवण्णा, त्यांचे शरण मारले, त्यांची वचन नष्ट केली, एकनाथांच्या मुलाला जिवंतपणी बापाचा दिवस घालायला लावला, शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक नाकारला, जिजामातेचा चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला, ज्योतिबा-सावित्रीमाईवर शेणाचे गोळे फेकले, राजर्षींच्याबद्दल घाणेरडे विनोद पसरवले, आगरकरांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली, गांधीजींची हत्या केली, प्रतीसरकारचे क्रांतिकारक पकडून दिले, प्रबोधनकारांना कडाडून विरोध केला,  दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेशना मारलं,
माणसाचं माणूसपण नाकारलं, समता नाकारली 
त्यांनीच प्रत्येक भारतीयाच्या थोबाडावर बूट फेकून मारलाय आणि नुसता बूट फेकून मारलेला नाही 
तर स्पष्टपणे सांगितलेलंय की, 'हिंदू म्हणून तुम्ही कितीही उड्या मारल्या आणि कितीही बलिदानं दिली, त्याग केला, स्वतःच्या बोकांडी कोर्टकज्जे खटले घेतले, लोकांची डोकी फोडली तरीही तुम्ही आमच्या बरोबरीला नाहीत, तुम्ही शुद्र आहात. गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही हेच अंतिम सत्य आहे....!' त्यांनी बूट तुमच्या थोबाडावर फेकलाय. याचं उत्तर काय असाव हे संविधानानं सांगितलेलंय. बुट फेकणारा केवळ एक व्यक्ती नसुन हा बुट त्या व्यवस्थेनं फेकलाय जी व्यवस्था शुद्रातिशुद्रांना ज्ञानार्जन करण्यास बंदी घालत होती. चुकून कोणी ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न जरी केलं, तर तुमच्या कानात गरमतेल ओतत होती, हा बुट त्या मानसिकतेनं मारला. तुम्ही रस्यावरून चालतांना तुमची सावलीच काय, तुमच्या पाऊलखुणादेखील त्यांना सहन होत नव्हत्या म्हणुन तोंडाला मडक अन् कमरेला झाडु बांधला.! हा बुट त्या मानसिकतेने मारला. जी मानसीकता त्या बोबळ्या बोलातुन बाहेर पडलेलं ब्राम्हणी वचन देखील बरदाश्त करू शकली नाही. शुद्रातिशुद्रांच्या जमावासमोर त्या लहान मुलाची जीभ हासडून लावली! तरीदेखील हा खालच्या जातीचा, सर्वोच्च पदावर बसलाच कसा? याचा द्वेष म्हणुन, हा बुट त्याच मानसिकतेने मारला, जी संविधानापुर्वीची व्यवस्था लागु करू पाहतेय, जी भारताला हिंदुराष्ट्र बनवू पाहतेय! फक्त आणि फक्त संविधानामुळेच खालच्या जातीतील पोर सरन्यायाधीश झालाय! होय हा बुट त्याच नीच मानसिकतेने मारलाय. सरन्यायाधीश बूट फेकणारा वर कारवाई न करण्याबद्दल कुणाला घाबरले? फेकलेला बूट, की तिवारी नावाच्या वकील व्यक्तीला, की सनातन धर्माला? आम्ही या घटनेचा धिक्कार केला पण सरन्यायाधीश यांनी गुन्हेगाराला माफ केलं! भर कोर्टात अनवधानाने मोबाईलची रिंग वाजली तरी कोर्टाचा अपमान झाला असे समजून कारवाई होते. इथे तर जाणून बुजून बूट फेकून मारलाय. गुन्हा करणारा साठ वर्ष वयापेक्षा कमी असेल किंवा ठार  वेडा असेल, तर तो गुन्हा ठरत नाही. पण तसं इथं काही नाही. गुन्हेगाराने आपला गुन्हा मान्य केलाय आणि त्यामागे दैवी शक्ती असल्याचे जाहीर केलंय. आरोपीचा बचाव हा कायद्याच्या कक्षेत बसत नाही. सरन्यायाधीश यांनी  ’कंटेम्प्ट ऑफ कोर्ट’ खाली शिक्षा करायला हवी. सरन्यायाधीशांनी उच्चारलेले वाक्य योग्य की अयोग्य याचं विवेचन करायला हवंय. बूट फेकला तो सरन्यायाधीशवर. राज्य घटनेचा योग्य अर्थ सांगून ती अबाधित राखणाऱ्यावर. तो फेकला राज्यघटना, संविधान लिहिणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारावर, अनुयायावर! गुन्हेगाराला माफ केलं हा मोठेपणा नाही, तो डरपोकपणा आहे! इतिहासातील ती मोठी घोडचूक ठरेल. तसं नाही घडलं तर इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही. 
चौकट 
ज्या महिलांनी प्रबोधनकारांच्या पुस्तकाला विरोध केला अन् त्यांची पाठराखण शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं, ही प्रबोधनकारांशी केलेली प्रतारणा आहे. त्यांनी ते पुस्तक वाचलेलं दिसत नाही. प्रबोधनकारांनी महिलांसाठी आपल्या साहित्यात अनेक पानं खरडलीत. प्रबोधनकारांनी 'माझी जीवनगाथा' या प्रकाशन समारंभात अखेरच्या भाषणात म्हटलं होतं, 'स्त्रिया आता खूप शिकल्या. खूप पुढं गेल्या. रूढी-परंपरेत त्याचा विकास खुंटून राहिला होता. पण त्यांनी आता इतकं पुढं जावं की, पुरुषांना वाटलं पाहिजे, स्त्रिया आपल्यावर सूड उगवत आहेत...!' तुमच्या या आशावादानं स्त्रियांना भटी छूमंतरच्या धुपाऱ्यानं सॉफ्ट टार्गेट करणारे पुरुषसत्ताकवादी सावध झाले असावेत. तुम्ही 'भिक्षुकशाहीचे बण्ड' या ग्रंथाच्या अखेरीला भट-ब्राह्मणांच्या भेज्यात काय रटरटत असतं ते सांगताना म्हटलंय, 'जावत्काल हिंदूसमाजातला स्त्रीवर्ग आम्हा भिक्षुकांच्या भजनी लागलेला आहे, तावत्काल आमच्या भिक्षुकशाहीचे वर्चस्व हाणून पाडण्याचे यत्न जेहेत्ते फोलच होणार...!' आपला हा मर्मवेध आजही सत्यात उतरताना दिसतो. स्त्रिया शिकल्या. पुरुषांच्या बरोबरीनं काम करताना त्या दिसतात. राजकारणात, समाजकारणातही मोठ्या पदावर आहेत. राष्ट्रपतीही आहेत. अवकाशात भरारी मारण्यातही त्या यशस्वी झाल्यात. असं असूनही त्या मोठ्या प्रमाणात भटीपाशात अडकल्यात. प्रबोधनकार, तुम्ही जो स्त्रियांच्या शोषणाविरोधात विचारांचा जबरदस्त सोटा चालवला, तो त्यांना ठाऊक नसावा. 'स्त्रियांच्या परवशतेचा, राष्ट्रदेवतांच्या गुलामगिरीचा, माताभगिनींच्या बौद्धिक अधःपाताचा प्रश्न स्वच्छ सुटल्याशिवाय 'भिक्षुकशाहीचे बण्ड'सुद्धा पुनःपुन्हा उपटल्याशिवाय राहाणार नाही...!' हा इशारा तुम्ही शंभर वर्षांपूर्वी दिलात. तेच वर्तमान असावं, त्याची साक्ष तुम्हाला विरोध करताना मिळावी, ही विचारीमनाला शरमिंदं करणारी घटना आहे. प्रबोधनकार, अशा घटना तुमच्या हयातीतही होत होत्या. पण तुमच्या लेखणी-वाणीत समाजमनाला भानावर आणणारी ताकत होती. या ताकतीला सत्यशोधक कार्यकर्त्यांची, शोषित कष्टकरी जनतेची साथ होती. आज समाजाला भूलथापा मारून त्यांना स्वार्थी राजकारणासाठी गुंगवणाऱ्यांची चलती आहे. त्यांचं मार्केटिंग करणारेही आहेत. अशा वातावरणात गरज असूनही तुमच्या विचारांचा प्रसार कुणी करायचा? स्पष्ट सांगायचं, तर बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय ओळख आहे म्हणून तुमचं नाव तरी घेतलं जातं. क्रांती आपली पिल्लं खाते, असं म्हणतात. पण आपल्या देशाचा न्याय याबाबतीतही उफराटाच आहे. ज्यांनी समाज सुधारणेसाठी खस्ता खाऊन, समाज विकास घडवून आणला, त्या विकासाच्या लाभार्थीनीच सुधारकांना, क्रांतिकारकांना विस्मरणाच्या आवंढ्यात गिळंकृत केलंय. प्रबोधनकार, तुमच्या या नेमक्या संवादात धनाने, मनाने आणि अकलेनेही श्रीमंत होऊनही भटी व्यवस्थेपुढे लाचार होणाऱ्या भारतीयांच्या मानसिकतेचं सार आहे. तुमच्या 'सत्य परमोधर्माः' या ब्रीदाशी प्रामाणिक राहून सांगतो; प्रबोधनकार, माफी असावी, तुम्ही आता नावापुरते आहात आणि तसबिरीतून दिसण्यापुरते आहात! तुमचं विचार-कार्य शासकीय प्रकाशनाच्या पाच खंडी ग्रंथांत बंदिस्त आहे. पत्थरी देव-देवता जागृत झाल्यावर तुमच्यासारख्या प्रबोधनकाराच्या वाट्याला दुसरं काय येणार? आजच्या तरुण पिढीचं हे दुर्दैव आहे.
हरीश केंची,
९४२२३१०६०९


Saturday, 11 October 2025

महाराष्ट्र कैलासवासी झालाय का...?

"सामाजिक, राजकीय बदलांचा वास शाहिरांनाच प्रथम लागतो. ते शरीरानंच नाही तर मनानंही समाजाच्या तळागाळात असतात. या शाहिरांच्या लेखणी-वाणीत इतिहास सांगण्याचीच नव्हे, तर इतिहास घडवण्याचीही ताकद असते. शाहीर साबळेंनी उभं केलेलं मराठी मुंबईच्या दुर्दशेचं चित्र पाहिलं की, सरकारच्या खोडसाळपणाला व्यक्त होण्याची शक्ती कोणी दिली, हे सांगायला पाहिजे का? ज्या नजरेनं परप्रांतीय मुंबई आपली मानतात, त्यादृष्टीनं महाराष्ट्रातले मराठी आपल्या राजधानीकडे पाहात नाहीत, ती आपलीच राहावी यासाठी झटत नाहीत, हे स्पष्टपणे दिसतं. हा मुर्दाडपणा आपण आणखी किती काळ कवटाळून बसणार? महाराष्ट्र कैलासवासी झालाय का? तसं असेल तर भोळा शंकराचा अवतार धारण करून आपला गोळा करून घेण्याऐवजी मराठीजनांनी आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या हक्काच्या मुंबईसाठी तांडव केलं पाहिजे, ते आकांडतांडव झालं तरी चालेल. ते करण्याचं बळ लाभावं ही तमाम शाहिरांची इच्छा...!"
--------------------------------------
'मुंबई फक्त आमचीच' असं मराठी लोकांनी कधीही म्हटलेलं नाही. परंतु, ज्यांना मुंबई ही धर्मशाळाच वाटते, ते नानाप्रकारे मराठींना डिवचत असतात. मुंबईत जन्म घालवायचा, इथल्या मराठी मुलीशी लग्न करायचं, मुंबईतल्या मराठी मतांवर निवडून येऊन वर आम्ही भाषिक अल्पसंख्य आहोत, असं म्हणत मराठी भाषेवर, मराठी माणसावर कुरघोड्या करण्याचे नीच डाव महाराष्ट्राला आता नवीन नाहीत. अशांना आमदारक्या-खासदारक्या, बरोबरच मंत्रिपदंही मिळतात. पक्ष नेत्यांना पैसा आणि मोटारी पुरवल्या की अशांना मराठी माणसाच्या तोंडावर थुंकत मुंबईत मिरवता येतं, ही बाब एकदा नव्हे, तर अनेकदा दिसलीय. अशांना कधी रजनी पटेल, कधी मुरली देवरा, मुकेश पटेल, किरीट सोमय्या, कृपाशंकर सिंह, मंगलप्रभात लोढा, संजय निरुपम यांच्यासारखा अमराठी तारणहार गवसतो. या साऱ्यांना मागं टाकण्याचं काम राज्य सरकार कडून घडलंय 'मुंबई-ठाण्यातून गुजराती-राजस्थानी गेले, तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईत काय उरेल,' असा मराठींची बेइज्जत करणारा प्रश्न राज्यपाल कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात विचारला होता; तो वादग्रस्त ठरला. राज्यपालांना अनाठायी वाद निर्माण करून क्षमायाचनेचे शेण खाण्याची खोडच असावी. काही महिन्यांपूर्वी त्यांनी 'रामदास स्वामी गुरू नसते, तर शिवाजी छत्रपती झाले असते का?' असा प्रश्न उपस्थित करून शब्दांचा यथेच्छ मार खाल्ला. हा वाद शमत नाही, तोच 'पुणे विद्यापीठ'च्या कार्यक्रमात 'जोतिबा फुले आणि सावित्रीबाई यांचा विवाह झाला, तेव्हा त्यांचे वय १३-१२ वर्षांचं होतं. ये उमर मे बच्चे लोग क्या करते है?' असा प्रश्न विचारून राज्यपालांनी वाद ओढवून घेतला होता. त्यानंतर 'मुंबई विद्यापीठ'च्या 'कलिना कॅम्पस'मधील 'इंटरनॅशनल स्टुडंट' हॉस्टेलचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी या हॉस्टेलला 'वीर सावरकर' यांचं नाव द्यावं, अशी सूचना केली. राज्यपाल हे राज्यातल्या सर्व शासकीय विद्यापीठांचे 'कुलपती'ही असतात. त्यांच्या सूचनेचा मान राखायचा असतो. मात्र, त्यांच्या ह्या सूचनेला विद्यार्थी संघटनांनी विरोध केला. 'छात्रभारती'च्या रोहित ढाले याच्या नेतृत्वाखाली आंदोलनही झाले. त्याचं म्हणणं, 'सावरकरांचा हॉस्टेल व्यवस्थेशी संबंध काय ? भारतात विद्यार्थी हॉस्टेल व्यवस्थेचा पाया कोल्हापुरात राजर्षि शाहू महाराज यांनी रचला. हे लक्षात घेऊन शाहूराजांचं नाव मुंबई विद्यापीठाच्या 'इंटरनॅशनल स्टुडंट हॉस्टेल'ला देणे उचित ठरेल. विद्यार्थी संघटनांचा हा आग्रह योग्य आहे. शाहूराजांनी गरीब-कष्टकरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी मांडलेला हॉस्टेलचा मोठा पसारा आजही कोल्हापूरच्या दसरा चौक परिसरात पाहायला मिळतो. मराठी-अमराठी अशी भांडणं लावून देणाऱ्या राज्यपालांनी मराठींतही जमेल तिथं भांडण लावण्याचा, फूट पाडण्याचा हलकटपणा केला होता. 'ठाकरे सरकार'च्या विरोधात 'भाजप'नं जितक्या कारवाया केल्या त्यालाही हातभार लावला होता, किंबहुना त्याच केंद्रबिंदूच ते होतं. राज्यपाल हे संविधानात्मक पद आहे. ते राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. 'संविधाना'नुसार, राज्यकारभार चालतो की नाही, ते पाहाण्याची अन् त्याचा अहवाल राष्ट्रपतींना पाठवण्यापुरतीच त्यांची मर्यादित जबाबदारी आहे. तथापि, 'मोदी-शहा सरकार'च्या आजवरच्या कार्यकाळात 'भाजप' विरोधी राज्य सरकारांना अडचणीत आणण्यासाठी राज्यपालांचा वापर केला जात असल्याचं स्पष्टपणे दिसून आलंय. सत्तेच्या वाटा अडवणारी ही पेंद्यागिरी राजकारणापुरती ठीक आहे. ती मराठी माणसाचा अपमान करणारी ठरणार असेल, तर ह्या आगाऊपणाला विरोध हा होणारच ! तसा राज्यपालांच्या त्या विधानावर तेव्हा झाला होता. त्यावर त्यांनी '... असे बोलून माझ्याकडून चूक झाली. राज्यातील जनतेने विशाल अंतःकरणाने क्षमा करावी, 'अशी माफी मागितली होती. ही क्षमायाचना विस्मरणात जाण्यापूर्वीच राज्यपाल कोश्यारींना राजीनामा द्यायला लागला. तथापि, त्याने इतिहास आणि वर्तमान बदलत नाही. 
*मुंबईचा लगाम कुणाच्या हाती राहिलाय*
मराठींनी जी मुंबई ५ वर्षांचा 'संयुक्त महाराष्ट्र'चा लढा देऊन महाराष्ट्रात राखली, ती 'आर्थिक राजधानी'च्या मोहापायी नाही. भाषावार प्रांतरचनेच्या सूत्रानुसार मुंबई मराठी भाषिक प्रदेशात आली. ती सर्वांची आणि सर्वांसाठी आहे; पण ती मराठी भाषिक महाराष्ट्राचीच आहे. हा इतिहास आहे! त्यात १०६ जणांचे हौतात्म्य आहे. वर्तमान मात्र भयाण आहे. काळ हा घोड्यासारखा असतो त्यावर हुकमतीनं स्वार झालात, तर तो तुमचा होतो. तुम्हाला पाहिजे तिथं पोहोचवतो. अन्यथा फरफट अटळ असते. 'संयुक्त महाराष्ट्र'चा लढा मराठींनी जिंकला. मुंबईसह मराठींचा महाराष्ट्र झाला मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली. पण लगाम कुणाच्या हाती राहिलाय? काँग्रेस, भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षांना मुंबईचं प्रदेशाध्यक्षपद देवरा, सोमय्या, लोढा, संजय निरुपम यांच्याकडे द्यावसं वाटतं, यातच या प्रश्नाचं उत्तर दडलंय. आज आर्थिक उलाढालीचं एकतरी क्षेत्र मराठी माणसाच्या ताब्यात आहे का? मोठे व्यवसाय जाऊ देत. मच्छी विक्री वा फळ-फूल-भाजी बाजारातले पारंपरिक हक्काचे धंदेही मराठींच्या हातून निसटलेत. औद्योगिकीकरण, शिक्षण, सहकार यातून असंख्य कुटुंबांना आर्थिक स्वस्थता लाभलीय. पण सामाजिक आणि मानसिक प्रगतीचं काय? अस्पृश्यता संपली; पण जाती-धर्माचा अहंकार माजत चाललाय. ६०-७० वर्षांपूर्वी गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्यासारखे संत भक्तीच्या माध्यमातून अंधश्रद्धांचं निर्मूलन करत. खचलेल्यांना जगण्याचं बळ देत. आज श्रद्धावंतांवर अंधश्रद्धांचा संस्कार करणाऱ्या स्वयंघोषित परमपूज्य सदगुरू मंडळींचा आणि टीव्ही मालिका, चित्रपटांचा सुळसुळाट आहे. विज्ञान आहे, पण त्यासोबत कॉम्प्युटर, लॅपटॉपचा प्रारंभ नारळ फोडून करणारे अज्ञानही आहे. धनाची श्रीमंती आहे, तशी ज्ञानाची गरिबीही आहे. नामवंत सज्जनाला निवडणूक उमेदवारी स्वीकारण्यासाठी राजकीय नेत्यांनी विनंती करण्याचे दिवस खूप मागे पडलेत. सध्या उमेदवारीसाठी 'फिक्सिंग' करण्याचे दिवस आहेत. पूर्वी राजकारणी लोक गुंड पाळायचे. आता गुंडच राजकारणी पाळतात. पोलीस, न्यायाधीश, तुरुंगाधिकारी, पत्रकार, कलाकारांना विकत घेऊ शकतात. भ्रष्टाचारानं तर प्रसूतिगृहापासून ते स्मशानापर्यंतच्या जीवनप्रवासाला स्पर्श करणारं एकही क्षेत्र सोडलेलं नाही. डोळे दीपवणारी प्रगती महाराष्ट्रात खूप झालीय; तरीही पाऊल टाकताच मराठी माणूस अडखळत असेल; तर कोश्यारींसारखे खोडसाळ राज्यपाल मराठींच्या डोक्यावर आपली 'काळी टोपी' झटकणारच ना ?
*मुंबई नगरीचं लावण्य...!*
'मुडद्यातही जान यावी,' अशा नाना गोष्टी मुंबईत क्षणोक्षणी घडत असतात. त्याचा अनुभव घेण्यासाठीच परप्रांतीयांचे रोज हजारोंचे लोंढे मुंबईत धडकत असतात. मुंबई वाढत्या लोकसंख्येनं त्रासलेली असली तरी तिनं अजून कुणाला झिडकारलेलं नाही. अशा मुंबापुरीचं अनेकांनी रसभरित वर्णन केलंय. शाहीर पठ्ठे बापूराव म्हणतात-'मुंबई नगरी बडी बाँका। जशी रावणाची लंका।' तर 'माझी मैना गावाला राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली...!' ही अजरामर 'छक्कड' लिहिणारे शाहीर अण्णाभाऊ साठे 'मुंबईची लावणी'मध्ये लिहितात ,
मुंबईतील उंचावरी, मलबार हिल इंद्रपुरी l
कुबेरांची वस्ती, इथं सुख भोगतो ll
परळात राहणारे, रात्रंदिवस राबणारे l
मिळेल ते खाऊन,घाम गाळती ll
शाहीर आत्माराम पाटील यांनीही महाराष्ट्राप्रमाणेच मुंबईची ओळख सांगणारी 'शाहिरी गीतं' लिहिली आहेत. अनिरुद्ध पुनर्वसू ऊर्फ नारायण आठवले यांनी तर 'मुंबई गीता' नावानं विडंबनात्मक खंडकाव्यच लिहिलंय. नामदेव ढसाळांचा 'गोलपीठा' आणि 'भाऊ पाध्येंच्या कथाही दृष्टीआडच्या मुंबईत फिरवतात. ह्या साऱ्यात शाहीर साबळेंच्या 'मुंबावतीची लावणी'चं लावण्य काही और आहे. ते असं आहे-
डौल तुझा परी थाट आगळा, 
सुभग सुलक्षणि तू मुंबावती । 
वदन विलोभस मूर्ती गोंडस, 
सुगंधमति तू पुष्पवती ।। 

भ्रमर भुरळती मधुरस पिऊनी, 
अवती भवती मरगळती। 
रूपगुणांच्या खुणा सांगतो, 
रसिकवरा आपसुक कळती ।।१

विपुल केशसंभार कुलाबा, 
दीपगृह खोवून आकडा । 
नक्षीदार जाळीत गुंफला, 
मलबार हिल तो आंबाडा ।। 

मरीनलाइन ठळक मोगरा, 
पुष्पांचा जणू सुबक तिढा। 
नीलकमल लवलवे भोवती, 
शोभिवंत दिसतो मुखडा ।।२

ताजमहाल-गेटवे म्युझियम, 
सोनफुले नक्षी खुलती। 
सचिवालय बिंदी भांगावर, 
चंचल दो बाजूस डुलती ।। 

केसबटा गोदी चौपाटी, 
भाळावर भुरूभुरू हलती ।
सटवीअक्षर युनिव्हर्सिटी जणू, 
टॉवर बुगडी रत्नवती।।३

भाग्य ललाटी ठळक उमटल्या, 
एकशे पाच त्या गोंद खुणा l 
ढळढळीत सौभाग्य लाभले, 
उरली ना शंका कुणा ll 

सेंट्रल टेलिग्राफ जीपीओ, 
कान सुबक दोन्हीच म्हणा. 
लायब्ररी हायकोर्ट हिरकणी, 
कर्णफुले खुलवित जना ll४

चर्चगेट अन् बोरीबंदर, 
डोळे गहिरे चमक उठे।
दिपून भुंगे मधुपोळ्यावर, 
घोंघावत मोहाळ सुटे।। 

म्युनिसिपालिटी कळी नासिका, 
नथनी मोत्याचीच नटे ।। 
चिरीमिरीच्या शिंका सर्दी, 
तरीही मोती कधि न फुटे ।।५

चमकी डाव्या नाकी खुलते, 
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट असे। 
रंगखड्यांचे कितीही बदलो, 
चित्र नेमके तेच दिसे ।। 

सीआयडी- पोलीस केंद्र जणू, 
गालावरचा तीळ असे। 
लहान नाजुक तोवर सुंदर, 
चरता गाली डाग दिसे ।।६

मुळजी जेठा बाजारपेठा, 
मार्केट तोटा कुठे नसे l
गोफ सोनेरी बारा पदरी, 
घट्ट गळ्याला धरून बसे। 
धान्य मसाला काथ्या जव्हेरी, 
बाजार सारे विसरू कसे । 
भवती पुतळ्या चितंग मध्ये, 
जय्या लोखंडी उठून दिसे ॥॥७

दागदागिने बहुत त्यातला, 
एक दागिना ठळक दिसे। 
काळ्या मण्यांची पोत डोरलं, 
गिरगावाची शान असे।। 
रोलगोल्डचा एक दागिना, 
सर्वाहून वेगळा दिसे।। 
भायखळ्याचा चर्च मधोमध, 
लांब साखळी रुजत असे ।।८

भुज्या दोन त्या महालक्ष्मी, 
आणि डोंगरी पुण्य घड़े। 
राणीबाग रेसकोर्स दंड ते, 
बाहीतून अर्धे उघडे ।। 
वक्षस्थल लालबाग बरळी, 
भर छातीचा दोहिकडे । 
करकचली कंचुकी तटातट, 
तारुण्याची ध्वजा उडे।।९

गिरमदुनि बांधली चोळीची गाठ, 
परळ टी.टी.त खरी। 
विटलेल्या चोळीत ज्वानीच्या, 
सौंदर्याची जादुगिरी ॥ 
दादर टी.टी. देठ बेंबीचा, 
सिंहकटि निरखली पुरी । 
टिळकपूल हा सलग बांधला, 
पट्टा नारीच्या कमरेवरी ।।१०

पार्क शिवाजी हिंदू कॉलनी, 
नितंब नित आनंदभरी। 
सेंट्रल वेस्टर्न निऱ्या साडीच्या, 
पायघोळ पसरल्या दुरी। 
माहीम माटुंगा मांड्या रेखीव, 
साडीचा चुरगळा करी । 
शीव बांदरा घट्ट पोटऱ्या, 
सळसळ हलते निरीनिरी ।।११

निळाशार सागर भवती जणू, 
मोरपिशी पैठणी जरी।
नीटनेटकी नार नेसली, 
काट रुपेरी चमकभरी ।।१२

विरार वसई कल्याण ठाणे, 
नेकीचे पाऊल पड़े। 
उपनगरे दाही बोटांची, 
संगत त्यांना सदा जडे ।। 
उभी आकृती सुकृतसुंदर, 
पाप्यांची पापणी उडे। 
मर्दमराठी तुझाच मालक, 
चिरडून टाकील दुष्ट किडे ।।१३

शाहीर साबळेंची ही कलाकारी मुद्दाम संपूर्ण दिलीय. कारण छापील रूपात उपलब्ध नाही. १९६६ मध्ये शाहीर साबळेचं 'आंधळं दळतंय' हे मुक्तनाट्य रंगभूमीवर आलं होतं. तेव्हा मुंबईतली मराठी मनं परप्रांतीयांच्या आक्रमणानं तगमगत होती. तिला वाचा फोडण्यासाठी-
महाराष्ट्राच्या मर्द मराठ्या, ध्यानी जरा घेई, स्वाभिमानाला आग लागली, शुद्धी कशी नाही?
परके आले घरात शिरले, मालक ते झाले !
हक्कावाचूनी वणवण फिरणे, तुझ्या नशिबी आले!
अशी ललकारी देत मराठींना संघटित करण्याची गरज होती. शाहिरांनी मराठींचा स्वाभिमान जागवणारी ललकारी 'आंधळं दळतंय' मधून दिली; तर मराठींना संघटित करण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी 'शिवसेना'च्या माध्यमातून केलं. 'बेस्ट'च्या बसवरचं फ्लोरा फाऊंटनचं 'हुतात्मा स्मारक' असं नामांतर 'आंधळं दळलंय'नं केलंय. मराठी माणूस संघटित झाला, तसा शाहिरांनाही आनंद झाला. आता मुंबईचं मराठीपण ज्वलंत होणार, फुलणार, बहरणार असं त्यांना वाटू लागलं. त्या मस्तीत त्यांनी त्यांना मुंबई जशी दिसली, तशी लावणीत आणली. या लावणीची जन्मतारीख १ ऑगस्ट १९६७ अशी आहे. १ ऑक्टोबर १९६७ ला 'आंधळं दळतंय' चा शतक महोत्सवी प्रयोग झाला. त्यावेळी ही लावणी शाहिरांनी सादर केली. त्यानंतर ही लावणी चोपडीत राहिली.
*युतीमुळे मराठी अशी झुकली..!*
'पद्मश्री' शाहीर साबळे यांना 'संपूर्ण महाराष्ट्र समिती'ने २००० च्या 'महाराष्ट्र दिनी' हुतात्मा स्मारकाच्या साक्षीने आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र वंदना'च्या कार्यक्रमात बोलाविले होते. तेव्हा -
मराठीच धरणी, मराठीच शाळा । 
परंतु उमाळा कुणाला नसे।। 
मराठी निमाली, मराठी हमाली। 
नसे कुणी वाली हे झाले कसे ।। 
हा 'आंधळं दळतंय' मधला फटका त्यांनी उपस्थितांना ऐकवला. हा कार्यक्रम त्यांना अस्वस्थ करून गेला असावा. ते सांगत होते, "गेली ५० वर्ष मी मुंबईत राहातो. सर्व बदल मी अनुभवलेत. आताचा वेग मात्र महाभयंकर आहे. आता जे काही पाहातोय, अनुभवतोय, ते सहन होत नाहीये. परंतु त्याला आपणच जबाबदार आहोत. वयपरत्वे पूर्वीसारखी रचना करणं जमत नाही. पण मनातली तगमग आवरत नाही म्हणून एक रचना लिहून काढलीय. तगमगीला वाट मोकळी करून देण्याचा हा प्रयत्न आहे...!" तेव्हा वयाची ७८ वर्षे गाठलेल्या शाहिरांकडून जी रचना झाली. ती आणखी अस्वस्थ करणारी होती. ती वाचताना तुम्हालाही आजच्या सत्ताकेंद्री राजकारणाचा उघडा-नागडा पाया दिसेल. त्यात शाहीर लिहितात -
मराठीचा मळवट पुसला, राहिली टिकली 
आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली।। ध्रु
शिवतीर्थावर गर्जला मराठी बाणा 
एकजात मराठागडी जाहला शहाणा 
तेव्हा नव्हता कुणी सजविला सत्तेचा मेणा 
मराठीचं गणित मांडले पण बेरीज चुकली ।।१
मुंबईसह महाराष्ट्र केली घोषणा 
भाळावर एकशे सहा गोंदल्या खुणा l
हुतात्म्यांच्या स्मारकापुढे घेतल्या आणा 
तत्त्वाला देऊन डूब, सत्तेची ऊब, मराठी झुकली ।।२
मराठीच्या रक्षणासाठी सजविली सेना 
काही काळ उडवली घुसखोरांची दैना 
पण मधे डोईवर चढली सत्तेची मैना 
आम्ही खुर्चीपायी मराठी अस्मिता फुंकली ।।३
एकसंध मराठी बंधु घरोबा होता 
'जय महाराष्ट्र' म्हणायचो आम्ही जाता येता 
गिरगाव, गिरणगाव, दादर कोठे आता डोंबिवलीपासून उपनगरे आम्ही जिंकली ।।४
पूर्वी शिवतीर्थावर गर्जत होता मराठी 
आता बिहारी यादव फिरवित येती काठी 
कुणी आम्हास छेडील त्यास करू आडकाठी 
झालो थंड आम्ही त्यांच्यापुढे मराठी झुकली ।।५
सारे पक्ष आजारी झाले बदलती खांदा 
ही सत्ता गेल्यावर होईल आपला वांदा 
महाराष्ट्र तोडायचा म्हणून काढला धंदा आकाशातल्या खुर्चीची नशा जमिनीला टेकली ।।६
सामाजिक, राजकीय बदलांचा वास शाहिरांनाच प्रथम लागतो, असा इतिहास आहे. कारण ते शरीरानंच नाही तर मनानंही समाजाच्या तळागाळात-मनात असतात. या शाहिरांच्या लेखणी-वाणीत इतिहास सांगण्याचीच नव्हे, तर इतिहास घडवण्याचीही ताकद असते. शाहीर साबळेंनी उभं केलेलं मराठी मुंबईच्या दुर्दशेचं चित्र पाहिलं की, सरकारच्या खोडसाळपणाला व्यक्त होण्याची शक्ती कोणी दिली, हे सांगायला पाहिजे का? ज्या नजरेनं परप्रांतीय मुंबई आपली मानतात, त्यादृष्टीनं महाराष्ट्रातले मराठी आपल्या राजधानीकडे पाहात नाहीत, ती आपलीच राहावी यासाठी झटत नाहीत, हे स्पष्टपणे दिसतं. हा मुर्दाडपणा आपण आणखी किती काळ कवटाळून बसणार? महाराष्ट्र कैलासवासी झालाय का? तसं असेल तर भोळा शंकराचा अवतार धारण करून आपला गोळा करून घेण्याऐवजी मराठीजनांनी आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या हक्काच्या मुंबईसाठी तांडव केलं पाहिजे, ते आकांडतांडव झालं तरी चालेल. ते करण्याचं बळ लाभावं यासाठी शाहीर साबळे खणखणीत शब्दांत सुनावतात -
संपूर्ण महाराष्ट्र राखाया जो झटतो 
तो मातेच्या गळसरी कोंदणी नटतो 
बुझदिल षंढ जो असेल मागे हटतो 
आता पुन्हा करा घोषणा ही मुंबई आपली 
हे मराठी राजा काळजापरिस तू जपली ।।७
शाहीर साबळे १० वर्षांपूर्वी गेले. त्यांचे जन्मशताब्दी वर्षही कधीच सरलंय. लेखणी-वाणी आणि कलाकारीनं 'महाराष्ट्राचा बाणा' तेजस्वी राखणाऱ्या शाहिरांची अपेक्षा फोल ठरू नये.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

मेरी गाली ही मेरा संदेश.....

मेरी गाली ही मेरा संदेश.....
माझी शिवी हाच माझा संदेश..
बिहारमधल्या एका रॅलीत एका अज्ञात व्यक्तीनं पंतप्रधानांना शिवीगाळ केली अशी चर्चा सुरू झाली, त्यामुळं गोंधळ उडालाय. राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी होतेय. पण सत्य हे आहे की, मोदींनी जे पेरलं तेच उगवलंय. त्याचा अनुभव ते स्वतः आणि त्यांचे सहकारी घेत आहेत.
●●
खरं तर, इतिहास प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात असभ्य भाषा आणि असभ्यता प्रस्थापित करणारे नेते म्हणून लक्षांत ठेवेल. राष्ट्रीय राजकारणातून गुजरातमध्ये सत्तेवर आल्यापासून त्यांच्या तोंडातून असभ्य भाषेच्या शब्दकळा अखंड वाहत असतात. त्यांचा मार्ग विरोधकांचा अपमान करणं आणि त्यांच्यावर असंसदीय शब्दांचा वर्षाव करणं असा राहिलाय.
दंगलीनंतर लगेचच, गुजरात गौरव यात्रेत त्यांनी एका समुदायाबद्दल असंवेदनशीलता आणि तिरस्कार दाखवला होता. गोध्रा इथल्या भाषणात त्यांनी मुस्लिमांनी भरलेल्या मदत छावण्यांना मुलं जन्म घालणारे कारखाने असल्याचं म्हटलं. आणि मेहसाणा इथं त्यांनी 'हम पांच हमारे पच्चीस' - आम्ही पाच, आमचे पंचवीस असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली. हे दंगलग्रस्तांवर झालेल्या गुन्ह्यांना थेट प्रोत्साहन होतं. तेव्हापासून आजतागायत ते कपड्यांवरून ओळख, घुसखोर, स्मशानभूमी अशा टिप्पण्या करत आहेत.
●●
त्यांची महिलांवर विशेष कृपा आहे. ५० कोटींची गर्लफ्रेंड, जर्सी गाय, काँग्रेसची विधवा, दीदी ओ दीदी ही इतिहासातली त्यांची अमिट वाक्यं आहेत.
वैयक्तिक टोमणेबाजी ही त्यांची शैली आहे. नेहरू आणि सोनिया हे त्यांचे आवडते विषय आहेत. त्यांनी राहुल गांधींवरच्या अपशब्दांना संपूर्ण भारतातला कुटीर उद्योग बनवलंय. परंतु विरोधकांसोबत त्यांनी संवैधानिक संस्थांनाही सोडलेलं नाही. ते मुख्य निवडणूक आयुक्त जे एम लिंगडोह यांना वैयक्तिकरित्या टोमणे मारत राहिले, इतके की अटल बिहारींना त्यांना गप्प करावं लागलं. आज ते व्हिडिओ यूट्यूब आणि न्यूज मीडियावरून काढून टाकण्यात आलेत पण ते लोकांच्या आठवणीत ताजे आहेत.
●●
जर राजा बागेतून एक फूल उपटतो तर सैन्य ते मुळापासून उपटून टाकते. ही सेना त्यांची आयटी सेल, अँकर आणि प्रवक्ते आहे. २०१२-१३ मध्ये जेव्हा आपण पहिल्यांदा "आयटी सेल" हा शब्द ऐकला तेव्हा ते एखाद्या मोठ्या तंत्रज्ञान जाणकाराचे आणि भारताचे भविष्य बदलणाऱ्या राजकीय पक्षाचे स्वप्न होते असे वाटले. ते घाणेरडे गैरवर्तन, घृणास्पद मीम्स आणि खोटेपणा पसरवण्याची एक यंत्रणा ठरली. पैसे देऊन ट्रोल करणारे डझनभर बनावट आयडी/हँडल आणि गैरवापर तयार करतील. हे एक नवीन राजकारण होते, जे नंतर सेंद्रिय बनले. या युक्तीने मोदींनी त्यांच्या मूर्ख, महामूर्ख आणि लैंगिकदृष्ट्या निराश झालेल्या मुख्य मतदारांना निर्लज्ज, वाईट तोंडाच्या राजकीय सैन्यात रूपांतरित केले. त्यांचे समर्थक सोशल मीडियापासून ते चौरस्त्यांपर्यंत आणि त्यांच्या घराच्या चार भिंतींमध्ये मुक्तपणे अपशब्द वापरतात.
मुख्य मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी, दररोज संध्याकाळी टीव्हीवर एक सर्कस सुरू झाली. अँकर प्रक्षोभक मुद्दे निवडत असत आणि प्रक्षोभक भाषेत बोलत असत. ते एका बाजूला उघडपणे गैरवर्तन करण्याची आणि खोटे बोलण्याची मोकळीक देत असत. सुरुवातीला, जुन्या रीतिरिवाजांचा परिणाम झाला. अँकर बदलले गेले. दुय्यम दर्जाच्या गुंडांनी सत्ता काबीज केली. २०१९ पर्यंत, टीव्ही उघडपणे शिवीगाळ आणि शिवीगाळ करण्याचे प्रशिक्षण केंद्र बनले होते. आता, फक्त तेच नेते आणि प्रवक्ते बढती मिळवतात जे खोटे बोलतात आणि शिवीगाळ करतात. कोणताही उच्चभ्रू व्यक्ती त्यांच्याविरुद्ध उभा राहू शकत नाही. म्हणून, आता, सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष, प्रत्येकजण शिवीगाळ संस्कृतीत पूर्णपणे प्रशिक्षित झाला आहे.
मोदींची सार्वजनिक संवाद व्यवस्था ही मुळात शिवीगाळ करण्याची व्यवस्था आहे. असभ्य आणि निर्लज्ज भाषेने प्रत्येक कोपऱ्यात विष पसरवले आहे.
सामान्य कामाच्या ठिकाणी, बैठकांमध्ये, द्विपक्षीय चर्चांमध्ये, शैक्षणिक क्षेत्रात किंवा सामान्य व्यासपीठांवर, शिवीगाळ करणे आता अवांछनीय राहिलेले नाही, तर सामान्य आहे. साध्या वादविवादात, अवज्ञा, खोटे बोलणे आणि वरिष्ठांचा वैयक्तिक अपमान करणे हे आता पहिले शस्त्र आहे. चर्चेतून निष्कर्ष काढणे कठीण आहे.
सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे या सवयीमुळे तरुणांना बेरोजगार बनवले आहे. ही पिढी आता नोकरीसाठी आणि उपयुक्त काम देण्यास योग्य नाही.
●●
अपमानाची गंगा, नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत, असा समाज निर्माण केला आहे जिथे अपमानाची गंगा प्रत्येक रस्त्यावर वाहू देऊन अपमानास्पद शब्द सामान्य आहेत. आई, बहीण, देहव्यापार यांच्याशी संबंधित सामान्य अपमानांचा लोकांवर कोणताही परिणाम होत नाही.
आता सार्वजनिक ठिकाणी अपमान करण्यास कोणालाही लाज वाटत नाही आणि गैरवापर झाल्याने कोणालाही दुखावल्यासारखे वाटत नाही. हीच सामान्य चर्चा आहे. मोदींनी भारताची भाषा बदलली आहे. त्यांच्या राजकीय जीवनाच्या संध्याकाळी, त्यांच्याकडे हा वारसा बदलण्यासाठी वेळ उरलेला नाही. इतर कोणत्याही खोल, क्रांतिकारी कामगिरीच्या अनुपस्थितीत, हा शब्दकोश त्यांचे योगदान आहे.
●●
महात्मा गांधींचे प्रसिद्ध वाक्य आहे - माझे जीवन हा माझा संदेश आहे. अपमान संस्कृती हा मोदींचा संदेश आहे. संदेश आता त्यांच्याकडे परत येत आहे. या देशात गैरवापराची सुनामी निर्माण करणारा नेता आता स्वतःच गैरवापराच्या सुनामीत बुडत आहे.
मग तक्रार का करायची? तुम्ही करू नये. हे त्यांनी पेरलेले पीक आहे. हा त्यांचा इतिहास आहे, हा त्यांचा वारसा आहे.
"माझा गैरवापर हाच माझा संदेश आहे"

लोकसेवक दीपक पायगुडे

 राजकारणात आणि लोकसेवेत कायम राहायचं असेल तर अळीवावरचं पाणी म्हणून असलेल्या आमदारकीच्या काळात संस्थात्मक काम उभं मोठ्याप्रमाणात केलं. लोकसेवा हे ब्रीद असल्यानं त्याच नावानं त्यांनी संस्थात्मक काम सुरू केलं. शिवसेना शाखाप्रमुख आणि त्याच शाखेचं उद्घाटन करायचं असेल तर काहीतरी मोठं काम उभं करायला हवं. या उद्देशानं त्यांनी एकाच वेळी पांच रुग्णवाहिका उभ्या केल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन हे त्यांचं स्वप्न साकार झालं.
७ ऑक्टोबर २०२४ दीपक पायगुडे यांचा आज वाढदिवस.....! पुणे शहराच्या पूर्व भागात आपण आपल्या सामाजिक राजकीय कार्याला सुरुवात केली आज आपण लहान वयात कमी काळात केलेले कार्य आणि मिळालेल्या राजकीय संधीचे सोने केले आणि दीर्घकाळ टिकणारी राजकारणात बहुजन समाजाच्या मुलांना लष्करी शिक्षण मिळण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी स्कूल ची निर्मिती करून आज आपण लावलेले छोटेसे रोप आज पंचवीस वर्षे पूर्ण करून शैक्षणिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरात आपल्या समाज कार्याला तोड नाही दूरदृष्टी दीर्घकाळ पूर्व भागातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बारा मावळ खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शिवकालीन गनिमी काव्याचे शिक्षण आणि सैनिकी शिक्षण यासाठी आपण सुभाषचंद्र बोस शाळेची निर्मिती केली लष्करी शिक्षणामुळे आपला दराखोऱ्यातील इतिहास आणि सामाजिक शैक्षणिक वातावरण त्या मुलांना आपल्या शिक्षण संस्थेद्वारे मिळणार आहे ही दूरदृष्टी तुम्ही ठेवली याचा आम्हाला अभिमान आहे त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहरातील अभिनव योजना मिसळ पाव वाटून प्रत्येक आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना तुम्ही अन्नदानाचा अभिनव उपक्रम राबवला. आजपर्यंत असा उपक्रम कधी कुणी केला नाही ग्रामीण भागातून येणारा आंबेडकर घटनेचा चाहता दिन दलित घटनेला मानणारा वर्ग आंबेडकरांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पुन्हा स्टेशनला मोठ्या प्रमाणावर येतात त्यांना चहा आणि नाश्ता देऊन आपण लांबून येणारा प्रत्येक व्यक्तीला अल्पोपार देण्याचा अभिनव पांडा आपण या पुणे शहरात खऱ्या अर्थाने सुरुवात केली व गरिबांची सेवा आणि आंबेडकरांना घटना समितीच्या अनुयायांना तुम्ही एका सामाजिक कार्याची जाणीव करून दिली तुमच्या अंतकरणात असलेले आंबेडकरवादी चळवळीचे प्रेम आणि प्रत्यक्षात कृतीद्वारे केलेले प्रयत्न याला तोड नाही त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले वाड्यात तुम्ही या समाजसुधारकाच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी मिसळ पाव आणि चहा दिवसभर देऊन अभिनव उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने लोक कार्याला लांब लांबून येणाऱ्या महात्मा फुलेंच्या अनुयायांना पहिली स्त्री शिक्षणाची शाळा चालू करणाऱ्या महापुरुषाला आपण अभिनव पद्धतीने अभिवादन केले. हाही पांडा तुम्ही सुरुवात करून दिली या तुमच्या कृतीचा आम्हाला अभिवादन अभिमान आहे त्याचप्रमाणे सारसबाग येथील शाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त थोर साहित्यिक कथा कादंबरीकार यांना अभिवादन करण्यासाठी वाचा आणि शिका यासाठी तुम्ही पुस्तक वाचकांची संख्या वाढण्यासाठी आपण साहित्यिक चळवळ म्हणून पुस्तक दान चळवळ चालू केली यालाही आपल्या कार्याला तोड नाही वाचन संस्कृतीला तुम्ही या योजनेद्वारे आपल्या सामाजिक कार्याला तोड नाही असा पुणे शहरात अभिनव पायंडा आणि ग्रामीण शहरी प्रत्येक अनुयायाला आपण उपाशी न पाठवता अल्पपार देऊन व पुस्तक संस्कृतीला प्राधान्य देऊन वाचनाला शिका कमवा साक्षरता वाचन संस्कृतीला आपण प्राधान्य देऊन पुणे शहरात या अभिनव उपक्रमाने वाटचाल केली खऱ्या अर्थाने आपला पिंड हा सामाजिक लोकशाही स्वातंत्र्य समता शिक्षणाचे महत्त्व ओळखून पुस्तक संस्कृती आणि तरुण पिढीला स्वतःच्या पायावर उभे करून आपण चांगले विविध योजना आपण राबवतात या आपल्या तरुण पिढीला व सामाजिक वातावरण आणि शैक्षणिक बुद्धिजीवी तरुणांची निर्मिती करणे हा आपला ध्यास आपण प्रत्यक्षात अमलात आणत आहात खऱ्या अर्थाने आंबेडकर फुले यांच्या चळवळीला आपण खऱ्या अर्थाने वाहून घेतले आहे पुणे शहराचे देशाला देशा देणारे या दोन समाज पुरुषांना त्यांच्या विचारांना भारत देशभर खऱ्या अर्थाने सामाजिक चळवळीला आपण खऱ्या अर्थाने बळ दिले हात मूळ तुमचा हेतू आजच्या भावी पिढीला पुढील काळात त्याचे महत्त्व समजेल असे ऐतिहासिक सामाजिक कार्य आपल्या हातून घडले आहे खऱ्या अर्थाने आपण केलेले सामाजिक उपक्रम व तरुण पिढीला शिक्षणाची द्वारे खुली करून देण्यामध्ये आणि शिक्षणाचा प्रसार खरा अर्थाने आपल्या हातून घडत आहे आपला वाढदिवसानिमित्त आपल्याला आपल्या परिवाराला उत्तम आरोग्य आणि नवनवीन कल्पना सामाजिक कार्यात आपल्या हातून घडो हीच आपल्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.....!

अभिवादन जयप्रकाशजीना

जयप्रकाशजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी, आणीबाणीच्या विरोधात जनजागृती करणारे नेते जयप्रकाश नारायण यांचा आज स्मृतिदिन! येत्या ११ ऑक्टोबर रोजी त्यांची जयंती आहे. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन...!
आजच्या स्थितीत त्यांची आठवण होणे साहजिकच आहे. ते भारतातील एक समाजवादी राजकीय धुरीण आणि सर्वोदय कार्यकर्ते. बिहारच्या सारन जिल्ह्यातील सिताबदियार इथं त्यांचा जन्म. तिथंच प्राथमिक आणि पुढं पाटणा इथं माध्यमिक शालेय शिक्षण. वयाच्या अठराव्या वर्षी प्रभावतीदेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सासरे ब्रजकिशोर हे बिहारमधील एक राष्ट्रीय नेते आणि प्रसिद्ध वकील होते. त्यांनीच चंपारण्यातील अन्यायाची दाद लावून घेण्यासाठी गांधीजींना बिहारमध्ये येण्यास पाचारण केलं. प्रभावतीदेवींमुळे गांधीजींशी प्रथमपासून त्यांचा निकट संबंध जोडला गेला. इंटरमध्ये असताना त्यांनी असहकाराच्या चळवळीत भाग घेतला. १९२२ मध्ये ते अमेरिकेस गेले. विस्कॉन्सिन विद्यापीठाची समाजशास्त्रातील एम्. ए. पदवी त्यांनी घेतली. १९२९ मध्ये ते भारतात परत आले.
अमेरिकेतच जयप्रकाशांचा मार्क्सवादी विचारांशी परिचय झाला. मानवेंद्रनाथ रॉय यांचा ‘आफ्टरमाथ ऑफ द नॉन-को-ऑपरेशन’ हा निबंध आणि मार्क्स, लेनिन, ट्रॉट्स्की यांचं साहित्य वाचून ते कट्टर मार्क्सवादी बनले. गांधींची विचारप्रणाली आणि कार्यपद्धती यासंबंधी काही काळ ते असमाधानी होते. तथापि काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीसंबंधीच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भूमिकेशीही ते सहमत नव्हते. मार्क्सवाद्यांनी मध्यमवर्गीयांशी सहकार्य करावं, त्यांनी चालविलेल्या वसाहतींमधील राष्ट्रीय चळवळीतून अंग काढून एकाकी पडू नये, या लेनिनच्याच मताचे ते होते. म्हणून भारतात परत आल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९३० मध्ये जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी जयप्रकाशांना काँग्रेसच्या कामगार विभागाचं प्रमुख नेमलं. गांधीजी गोलमेज परिषदेहून परत आल्यानंतर झालेल्या सत्याग्रह-चळचळीच्या दुसऱ्या पर्वात सर्व पुढारी तुरुंगात असताना जयप्रकाशांनी चळचळीची सूत्रं सांभाळली. १९३३ मध्ये मद्रास इथं त्यांना अटक होऊन एक वर्षाची शिक्षा झाली. अन्य समाजवादी तरुणांच्या साहाय्यानं आणि सहकार्यानं त्यांनी १९३४ मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश या पक्षाचे सरचिटणीस म्हणून नेमले गेले. आपल्या भूमिकेची सांगोपांग चर्चा त्यांनी 'व्हाय सोशॅलिझम' (१९३६) या पुस्तकात केलीय. भारतीय कम्युनिस्टांनी काँग्रेसला राष्ट्रीय आघाडी म्हणून मान्य केल्यामुळं जयप्रकाशांना समाजवादी कम्युनिस्ट संयुक्त दलाची शक्यता वाटू लागली म्हणून प्रमुख सहकाऱ्यांचा विरोध असतानाही भारतीय कम्युनिस्ट पक्षाबरोबर त्यांनी समझोता केला. परंतु ही एकता फार काळ टिकली नाही. १९३९ साली दुसरं महायुद्ध सुरू झालं, तेव्हा जयप्रकाशांनी युद्धविरोधाचं आणि स्वातंत्र्यलढा उग्र करण्याचं धोरण अवलंबिलं. त्यामुळं १९३९ मध्ये त्यांना अटक होऊन नऊ महिन्यांची शिक्षा झाली. १९४१ मध्ये पुन्हा त्यांना अटक करून राजस्थान मधील देवळी तुरुंगात ठेवण्यात आलं. तिथं राजबंद्यांवरील अन्यायाविरुद्ध ३१ दिवसांचं उपोषण करून सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यास त्यांनी भाग पाडलं. १९४२ च्या सुरुवातीस त्यांना बिहारमधील हजारीबाग तुरुंगात हलविण्यात आलं. यावेळी बाहेर ‘छोडो भारत’ आंदोलन सुरु झालं होतं. त्यात भाग घेण्यासाठी ८ नोव्हेंबरला अत्यंत साहसपूर्ण रीतीनं तुरुंगाच्या भिंतींवरून उडी मारून ते फरारी झाले आणि भूमिगत संघटनेचे नेतृत्व करू लागले. त्यांनी गनिमी तंत्रानं लढणारे ‘आझाद दस्ते’ संघटित केले. त्यांच्या नेपाळमधील हालचालींचा सुगावा लागल्यानं त्यांना नेपाळी पोलीस ब्रिटिश हद्दीत नेत असताना आझाद दस्त्याच्या सैनिकांनी अचानक हल्ला करून नेपाळी पोलीसांच्या हातून त्यांची सुटका केली. यानंतर जयप्रकाश भारतात परत येऊन भूमिगत राहून कार्य करू लागले. त्यावेळी सरकारनं त्यांना पकडून देणाऱ्यास दहा हजार रुपयांचे इनाम जाहीर केलं. १७ सप्टेंबर १९४३ रोजी अमृतसर रेल्वे स्थानकावर त्यांना पकडण्यात आलं आणि तिथून १९४६ साली त्यांची सुटका झाली. त्यानंतर त्यांनी टूर्वड‌्‌झ स्ट्रगल (१९४६) हे पुस्तक प्रसिद्ध करून राष्ट्रीय चळवळीची कारणमीमांसा केली.
ब्रिटिश सरकारनं सुरू केलेल्या वाटाघाटींना, ब्रिटिश सरकारनं नेमलेल्या संविधान परिषदेला तसेच देशाच्या फाळणीला जयप्रकाशांचा विरोध होता. अखेर गांधींच्याहत्येनंतर काँग्रेसमध्ये राहून समाजवादी समाजरचनेचे ध्येय साध्य होणार नाही म्हणून त्यांनी १९४८ मध्ये अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने स्वतंत्र समाजवादी पक्षाची स्थापना करून काँग्रेसला पर्यायी पक्ष निर्माण केला. पक्षानं नैतिक मूल्यांना सर्वोच्च स्थान द्यावं, साधनशुचितेचं महत्त्व मानावं, सत्ता धारण करणाऱ्यापेक्षा सेवा करणाऱ्यांची प्रतिष्ठाअधिक मानावी, असं आपल्या कार्यकर्त्यांना जयप्रकाशांनी आवाहन केलं. त्यांची भूमिका लोकशाही समाजवाद्यांची झाली होती. हिंसेपेक्षा गांधीप्रणीत सत्याग्रह तंत्राचा समाजवाद्यांनी अवलंब करावा, ही त्यांची विचारसरणी पक्षानं स्वीकारली. पक्षाचे पहिले सरचिटणीस म्हणून त्यांचीच निवड झाली.
जयप्रकाश नारायण यांनी कामगार आणि किसान संघटनेकडं १९४८ ते १९५० च्या दरम्यान विशेष लक्ष दिलं. हिंद मजदूर सभा, हिंद किसान पंचायत या संघटना त्यांच्याच प्रयत्नानं स्थापन झाल्या. अखिल भारतीय रेल्वे कामगार संघ, अखिल भारतीय टपाल व तार खातं संघ, अखिलभारतीय संरक्षण कामगार संघ यांचंही ते अध्यक्ष होते. १९५२ मध्ये त्यांनी आचार्य कृपलानी यांचा कृषक मजदूर प्रजा पक्ष आणि समाजवादीपक्ष यांचे विलीनीकरण घडवून आणण्यात पुढाकार घेतला. या विलीनीकरणातून अस्तित्वात आलेल्या प्रजासमाजवादी पक्षाचे तेच पहिले सरचिटणीस झाले. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रजासमाजवादी पक्षाचा पराभव झाला. त्याच सुमारास टपाल आणि तारखात्यातील कामगार संपाच्या बाबतीत संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी दिलेल्या तोंडी आश्वासनांवर भिस्त ठेवून त्यांनी संप मागे घेतला. आश्वासन मात्र पुरं करण्यात न आल्यामुळं अस्वस्थ होऊन जयप्रकाशांनी पुण्यात आत्मशुद्धीसाठी तीन आठवड्यांचे उपोषण केलं. यावेळी केलेल्या विचारमंथनातून त्यांची नवी वैचारिक भूमिका तयार झाली. तत्त्वप्रणाली म्हणून त्यांनी आता जाहीर रीत्या मार्क्सवादाचा त्याग केला. मार्क्सच्या ऐतिहासिक भौतिकवादात माणसानं सदाचारी का असावं, याला उत्तर मिळत नाही, असं मत झालं. भौतिक गरजांची परिसीमा आणि समाजवाद, पक्षीय राजनीती, सत्तेचं विकेंद्रीकरण, मानव समाजामध्ये राज्यसत्तेचं स्थान, जनतेचा समाजवाद विरुद्ध शासकीय समाजवाद, भावी समाजवादाचं रूप इ. प्रश्नांबाबत त्यांनी बराच ऊहापोह केला. १९५३ मध्ये नेहरूंनी जयप्रकाशांना वाटाघाटीला बोलावलं जयप्रकाशांनी आपला पक्ष बरखास्त न करता मंत्रिमंडळात येऊन सहकार्य करावं, अशी नेहरूंची सूचना होती, परंतु किमान कार्यक्रमावर एकमत झाल्याशिवाय अशा प्रकारचं सहकार्य अशक्य आहे, अशी जयप्रकाश यांनी भूमिका घेतली. ती नेहरूंना मान्य न झाल्यानं वाटाघाटी अयशस्वी झाल्या. त्या वर्षी रंगून इथं झालेल्या आशियाई समाजवादी परिषदेत भारतीय प्रतिनिधिमंडळाचे त्यांनी नेतृत्व केलं. आशियाई क्रांती ही किसान क्रांती असली पाहिजे आणि ही लोकक्रांती अहिंसक मार्गानं करणं इष्ट आहे, असं विचार त्यांनी परिषदेपुढं मांडलं.
त्यांनी १९५३ नंतर विनोबाजींच्या भूदान आंदोलनात भाग घेण्यास सुरुवात केली. १९ एप्रिल १९५४ मध्ये बोधगया इथल्या सर्वोदय संमेलनात भूदान कार्यासाठी पक्षीय राजकारणातून त्यांनी संपूर्णत: अंग काढून घेतलं. त्यांनी ए प्ली फॉर द रिकंस्ट्रक्शन ऑफ इंडियन पॉलिटी आणि फ्रॉम सोशॅलिझम टू सर्वोदय (१९५९) ही पुस्तके लिहिली. १९६१ च्या सर्वोदय संमेलनाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना आपल्या राजकारण-संन्यासाच्या मर्यादाही त्यांनी स्पष्ट केल्या होत्या पक्षीय राजकारणाचा त्याग म्हणजे देशातील घडामोडींसंबंधी उदासीन राहणं नव्हे उलट राष्ट्रीय जीवनात अधिक परिणामकारक आणि अधिक रचनात्मक भाग घेण्यासाठी पक्षीय आणि सत्तात्मक राजकारणातूनआपण दूर झालो आहोत, असं स्पष्टीकरण त्यांनी केलं. १९५४ ते १९७२ पर्यंत जयप्रकाश भूदान आंदेलनातच मग्न होते. परंतु या काळातही त्यांनी काही महत्त्वाची राजकीय कामे केली. १९६० मध्ये नवी दिल्ली इथं त्यांनी तिबेटच्या प्रश्नांवर आफ्रो-आशियाई परिषद भरविली १९६२ मध्ये पाकिस्तानबरोबर पुन्हा स्नेहसंबंध निर्माण व्हावा, या उद्देशानं ‘पाकिस्तान रिकन्सिलिएशन ग्रुप’ स्थापन केला नागालँडमध्ये शांतता स्थापन करण्यासाठी भारत सरकारनं नेमलेल्या शांतता मंडळाचे ते सदस्य होते. जयप्रकाशांच्या प्रयत्नानं १९६४ मध्ये भारत सरकार आणि नागा बंडखोर पुढारी यांत युद्धविराम तहावर सह्या झाल्या. १९६५ मध्ये त्यांना शांतता कार्याबद्दल रेमन मागसाय हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९७० मध्ये त्यांनी बिहारच्या मुझफरपूर जिल्ह्यात दौरा काढून तेथील नक्षलवाद्यांचं हृदयपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. १९७१ मध्ये त्यांनी बांगलादेशामधील परिस्थिती जगापुढं मांडण्यासाठी जागतिक दौरा केला आणि त्यावर्षी सप्टेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय परिषद भरविली मे १९७२ मध्ये मध्यप्रदेशातील २६७ अट्टल दरोडेखोरांनी जयप्रकाशांच्या विनंतीवरून भारत सरकार आणि मध्यप्रदेश सरकार यांच्या पुढे शरणागती पत्करली.
जयप्रकाशांनी संशोधन कार्य करणाऱ्या संस्थाही या काळात स्थापन केल्या. ‘असोशिएशन ऑफ व्हॉलंटरी एजन्सीज फॉर रूरल डेव्हलपमेंट’, ‘गांधीयन इन्स्टिट्यूट ऑफ स्टडीज’ आणि‘ अखिल भारतीय पंचायत परिषद’ या संस्थांचे ते अध्यक्ष किंवा मानसेवी संचालक होते. तसेच ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’ या वैचारिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्यास वाहिलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते एक संस्थापक आणि अनेक वर्षे मानसेवी अध्यक्ष होते. ‘इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम’ या संस्थेचे सुरुवातीपासून तेसदस्य आहेत.
प्रभावतीदेवी १५ एप्रिल १९७३ मध्ये निधन पावल्यानंतर जयप्रकाश यांची प्रकृती अधिकच खालावत गेली त्यांना मधुमेहाचा आणि रक्तदाबाचा विकार जडला. १९७० पासून भूदान आंदोलनाबद्दल त्यांना असमाधान वाटू लागलं. भूदान आंदोलनात केवळ अनुनयावर भर आहे, पण त्यांतून फलनिष्पत्ती होत नाही, असं अनुभवास आल्यामुळं अनुनय अयशस्वी ठरला, तर गांधीप्रणीत अहिंसात्मक असहकार अथवा प्रतिकाराचा मार्ग स्वीकारला पाहिजे, अशी भूमिका ते घेऊ लागले. या प्रश्नावर आचार्य विनोबांशी त्यांचे मतभेद झाले. देशातील सर्वंकष भ्रष्टाचार, दुबळ्या घटकांच्या विकासाकडं झालेलं दुर्लक्ष इ. प्रश्नांनी अस्वस्थ होऊन त्यांनी देशाला सर्वंकष क्रांतीची गरज आहे ही भूमिका घेतली आणि त्यानुरूप गुजरात राज्यातील राजकीय सत्तांतर आणि बिहारमधील आंदोलन यांचा पुरस्कार केला. २५ जून १९७५ पासून देशात आणीबाणी जाहीर झाली व त्यांना काही काळ स्थानबद्ध करण्यात आलं. पुढं त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांची मुक्तता करण्यात आली. जयप्रकाश मार्क्सवाद, लोकशाही, समाजवाद या मार्गांनी सर्वोदयाकडे वळले होते. परंतु या सर्व विचारपरिवर्तनात त्यांचा क्रांतीवरील विश्वास अखेरपर्यंत ढळलेला नव्हता

मोदी-शहा यांची गोबेल्स नीती....!

"सर्कल इज कंप्लीट, पिश्चर इज क्लिअर....! असं म्हटलं जातं. अगदी तशीच स्थिती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या एक...