Wednesday, 17 September 2025

तरुणांचा 'आऊट क्राय' अन् सत्तांतर...!

"शेजारी राष्ट्रांना प्राधान्य देणारं 'नेबरहूड फर्स्ट’ धोरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शेजारी राष्ट्रात राजकीय स्थैर्य असणं प्रगतीसाठी आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत शेजारी राष्ट्रांमधली अस्थिरता, तिथला चीनचा वाढता प्रभाव हे आव्हान ठरतेय. भविष्याच्या दृष्टीनं स्थिर राजकीय वातावरण असलेला अन् पुरक संबंध ठेवणारा शेजारी आपल्याला अभिप्रेत आहे. पण श्रीलंका, बांगला देश अन् आता नेपाळ इथं तरुणांचा 'आऊट क्राय' दिसला, तिथं उद्रेक झाला. पाठोपाठ सत्तांतर झालं. ही राष्ट्रं लोकशाही मानणारे असले तरी तिथं स्वार्थ, भ्रष्टाचार, सत्तलोलुपता याचा अतिरेक झाला. लोकांनी आपणच निवडून आणलेली सत्ता उलथून टाकली. ही सत्तांतरं भारतासाठी चिंताजनक ठरू शकतात. वैयक्तिक राजकीय संबंधांऐवजी भारतानं व्यावसायिक संपर्क, प्रादेशिक संपर्क या मूलभूत मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ज्या विषयांवर एकमत नाही अशा विषयांवरही चर्चा सुरू ठेवावी. त्यामुळं द्विपक्षीय संबंध सुधारतील.
-----------------------------------------
*आ*पल्या शेजारची राष्ट्रें श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ इथल्या भ्रष्टाचार विरोधातल्या आंदोलनातून उद्भवलेली स्थिती लक्षांत घेऊन भारतातल्या राजसत्तेतल्याच नव्हे तर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी बोध घ्यायला हवा. सरपंचापासून प्रधानमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक अगदी ग्राम पंचायत सदस्य यांच्यापर्यंत सर्वच 'भ्रष्टाचारी' नेत्यांनी आपल्याकडं असं काही घडणारच नाही अशा भ्रमात राहू नये. 'शिशुपालाचे शंभर अपराध कधी ना कधी भरतातच!' त्यावेळी त्यांना सजा ही मिळणारच. आता सोशल मीडियामुळं बलात्कारी, भ्रष्टाचारी, कामचुकार, गुंडगिरी करणारे, घराणेशाही राबविणारे नेते, पुढारी, अधिकारी, कर्मचारी हे सारे लोकांच्या नजरेतून जास्त दिवस सुटू शकणार नाहीत. लपून राहू शकणार नाहीत. जर लोक भडकले तर संबंधित राजकारण्यांची, राजसत्तेचा मलिदा खाणाऱ्या मंत्र्यांची प्रॉपर्टी, कारखाने, बँका, शाळा कॉलेज, बंगले, ऑफिस, हॉटेल आणि तत्सम व्यावसायिक प्रॉपर्टी शोधून शोधून जाळतील, सारं नष्ट करतील. आता आंदोलक बसेस, दुकानं, सरकारी कार्यालये, अशा सार्वजनिक मालमत्तेला हात लावणार नाहीत. इतर देशातल्या नेत्यांना आज लपण्यासाठी दुसरे देश तरी मिळताहेत. भारतातल्या भ्रष्टाचारी लोकांना आश्रय देणारे इतर देश मिळणं मुश्किल आहे. तेव्हा सर्वांनी शहाणं व्हावं. भ्रष्टाचार न करता इमानदारीनं कामं करावीत. अजूनही निकृष्ट रस्ते, पूल बनताहेत. राजसत्तेतले सटोडीये, ठेकेदार मालामाल होताहेत. लोकांना सध्या मूलभूत अगदी साध्यासुध्या सुविधा वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण या सेवेसाठीही त्रास सहन करावा लागतोय. लोकांच्या टॅक्सचा पैसा कुठं मुरतोय हे चांगलंच समजतंय. तेव्हा वेळ आहे तोवर सुधरायला हवंय. लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. इथल्या तरुणांना इतर देशाच्या मार्गानं जायला लावू नका. आजही अगदी बालवाडीपासून उच्चशिक्षणापर्यंत सगळीकडं भरमसाठ डोनेशन, देणग्या घेतल्या जाताहेत. आरोग्य सुविधेसाठी, कोर्टातल्या न्यायासाठी अडवणूक केली जातेय. भ्रष्टाचार सर्वत्र बोकाळलाय, त्यात रोजच्या रोज वाढच होतेय. अगदी न्यायाधीशपदावरची व्यक्ती असो नाहीतर मग सरकारी हॉस्पिटल मधला डॉक्टर असो, इथून तिथून सारेच भ्रष्टाचारी आढळताहेत.  लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. निवडणुका जिंकण्यासाठी, सत्ता अन् मत्ता मिळविण्यासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी गुंडांना हाताशी धरणं आता थांबवायला हवं. साधी सरपंच, नगरसेवक झालेली व्यक्ती एका वर्षात दारात स्कॉर्पिओ उभी करतो. हा पैसा कोणत्या भ्रष्टाचारी मार्गानं येतो, हे न समजण्याइतकी जनता अनपढ, दुधखुळी राहिलेली नाहीये. आपल्यानंतर आपल्या मुलानंच आपलं पद सांभाळावं, नाहीतर मुलगी, जावई, मेहुणा असावा हा अट्टाहास सोडायला हवा. इतर देशासारखी स्थिती इथं व्हायला लोकांना नकोय. इथल्या नेत्यांनी शेजारी जे काही घडतंय त्यातून बोध घ्यायला हवा. सोशल मीडियाची ताकद त्यांनी ओळखली असेलच. तुम्हाला मतदान करणाऱ्या मतदारांसाठी तरी पारदर्शक सरकार चालवायला हवंय. श्रीरामाच्या नावानं केलं जाणारं राजकारण लोकांनी अनुभवलंय, सत्ताकारण हे देशात रामराज्य यावं यासाठी राबवावं. नाहीतर शेजारी राष्ट्रातलं हे लोन इथंही पसरायला वेळ लागणार नाही, अशी भिती इथल्या शांतताप्रिय नागरिकांना वाटतेय.
आपली लोकशाही व्यवस्था प्रगल्भ आणि सुदृढ असल्यानं भारतात राजकीय स्थिरतेचा अनुभव येतो. सध्याचं मोदी सरकार विकासात्मक असल्यानं जीडीपी वाढीचा दर जगात सर्वाधिक आहे, असं सांगितलं जातंय. यामुळं लवकरच आपण जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असू, असा विश्वास दिला जातोय, पण सामान्यांना जीवन सुसह्य होईल अशी स्थिती नाहीये. १४० कोटींपैकी ८० कोटी लोक अजूनही मोफत रेशनिंगवर जगताहेत. ही परिस्थिती बदलायला हवीय. त्यासाठी लोकांची क्रयशक्ती वाढायला हवीय. तरच जो जीडीपी वाढल्याचा डांगोरा पिटला जातोय त्यावर विश्वास बसू शकेल. केवळ जीएसटीच्या दरात फेरबदल केल्यानं लोकांच्या हाती पैसा खेळेल असं वाटणं हा भ्रम आहे. मोदी सरकारला २०२४ मध्ये जनतेचा, तिसऱ्यांदा कौल मिळाल्यानं अर्थव्यवस्था वाढीचा वेग आश्वासक आहे असं चित्र निर्माण करण्यात राजसत्ता यशस्वी ठरलीय. यामुळं संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या आर्थिक प्रगतीकडं लागलेलंय. अशातच आपल्या शेजारी देशांमध्ये जी राजकीय, सामाजिक अस्वस्थता आहे त्यामुळं याचा एकत्रित परिणाम भारताच्या विकास वाढीवर होणं स्वाभाविक आहे. पाकिस्तान, चीन हे दोन शेजारी देश सुरुवातीपासूनच विरोधक असल्यानं त्यांच्या अंतर्गत बाबींचा परिणाम आपल्यावर तसा होत नाही. चीन विरोधक तसाच तो स्पर्धक सुद्धा आहे. याचं भान राजसत्तेला असेलच. त्यामुळं चीनशी व्यापार वेगळ्या अर्थानं बघता येतो. परंतु आपले इतर शेजारी राष्ट्रांशी परस्पर पूरक संबंध आहेत, ज्यामुळं आपलं वर्चस्व वाढण्याकडंचं धोरण आहे. शेजारी राष्ट्रांच्या धोरणांचा आपल्या आर्थिक स्थैर्यावरही परिणाम होतोय. मालदीव हे भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागरात वसलेलं लहानसं राष्ट्र आहे. लोकसंख्या अन् अर्थव्यवस्थेच्या तुलनेत नगण्य असलं तरी भूराजकीय संबंधांमध्ये तिथली व्यवस्था चीनच्या प्रभावाखाली येऊ लागलीय. नुकतंच निर्वाचित राष्ट्रपती मुइझू हे भारतविरोधी प्रचारामुळंच तिथं निवडून आलेत. ‘Oust India’ हाच त्यांच्या निवडणूक प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता. मालदीवची अर्थव्यवस्था भारतावर त्यातही तिथं येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून आहे. आता संबंध व्यावहारिक झाले असले तरी काही काळ दोन्ही राष्ट्रांत तणावपूर्ण वातावरण होतं. हेही आपण लक्षांत घ्यायला हवं.
दक्षिण आशियात, राजसत्तेतल्या नेत्यांचं राजकारण जनतेच्या संतापाच्या सुनामीमध्ये वाहत असल्याचं दिसून येतंय. आधी श्रीलंका, नंतर बांगलादेश अन् आता नेपाळमध्ये सत्तांतर झालंय. फ्रान्समध्येही तशा कुरबुरी सुरू झाल्यात. गेल्या दोन वर्षांत, आपल्या शेजारच्या तीनही महत्त्वाच्या देशांमध्ये, श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळमध्ये सरकारविरोधी निदर्शनांची अशी लाट उसळली की, रस्ते केवळ हिंसाचार अन् संतापानं भरले नाहीत तर सत्ताधारी नेतृत्वाचं सिंहासनही त्यांनी उलथवून टाकलंय. आर्थिक संकट, भ्रष्टाचार, राजसत्तेतल्या नेत्यांच्या मुलांचा स्वैराचार, बेकारी, तरुणांमधल्या निराशेकडं दुर्लक्ष करून दशकांपासून राजसत्तेत असलेल्या नेत्यांची सत्ता उलथवून टाकणं, सत्तांतर घडवून आणणं तेवढं पुरेसं नाही. हे आंदोलनकर्त्यांना लक्षांत आलं असेल. श्रीलंकेत राजपक्षे कुटुंबाचं झालेलं पतन, पाठोपाठ बांगलादेशात शेख हसीना यांचं सरकार कोसळलं आणि आता नेपाळमध्ये केपी शर्मा ओली यांचा राजीनामा यावरून हे स्पष्ट झालंय की, लोकशाही देशात सत्तेच्या बळावर लोकांचा आवाज, त्यांच्या मागण्या, त्यांचे हक्क तुम्ही दीर्घकाळ दाबू शकत नाही. नेपाळमध्येही असंच घडलंय. सरकारनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालताच, जनतेनं ओली सरकारलाही सत्तेवरून खाली फेकलं. २०२२ मध्ये श्रीलंकेनं इतिहासातलं सर्वात मोठं आर्थिक अन् राजकीय संकट पाहिलं. परिस्थिती अशी बनली की, देशात आणीबाणी लागू करावी लागली. परकीय चलन साठ्यातली घट, इंधन आणि औषधांचा तुटवडा, महागाई, बेसुमार कर्ज यामुळं जगणं कठीण झालं होतं. या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आणि निषेध केला. लोकांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना केवळ सत्तेवरून हाकलूनच लावलं नाही तर त्यांची घरंही जाळली. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना राजवाडा सोडून पळून जावं लागलं. निदर्शकांनी संसद भवन आणि राष्ट्रपती भवनावर कब्जा केला. म्हणजेच, एका झटक्यात, दशकांपासून सत्तेत असलेल्या राजपक्षे कुटुंबाचं साम्राज्य संपुष्टात आलं. श्रीलंका मागील काही वर्षांत आर्थिक संकटांचा सामना करतेय. २०१९ मध्ये राजपक्षे बंधू सत्तेवर आले, पण तेव्हा देश आर्थिक दू:चक्रातून जात होता. यामुळं २०२२ मध्ये प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांना राजीनामा द्यावा लागला अन् श्रीलंकेतून पलायन करावं लागलं. भारतानं आजवर श्रीलंकेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केलेलीय. आता श्रीलंकेतला नॅशनल पीपल्स पॉवर पक्ष सत्तेत असून तिथलं सरकार चीनच्या दबावाखाली येऊ नये म्हणून भारताला दक्षता घ्यावी लागणारय. श्रीलंका सरकारच्या मदतीनं चीन हिंदी महासागरात घुसखोरी करतोय असं यापूर्वी आढळून आलंय. तेव्हा आपण जागरूक राहणं गरजेचं आहे.
बांगलादेशमध्ये प्रधानमंत्री शेख हसीना यांचे सरकार २०२३ मध्ये लोकांनी उलथून पडलं. नोबेल विजेते मोहम्मद युनूस हे राष्ट्रपतींचे सल्लागार म्हणून पुढं आले, पण त्यांना राजकीय अनुभव नसल्यानं देश अनेक संकटांचा सामना करतोय. तिथं जमात-ए-इस्लामीच्या प्रभावाखालचा हिंसाचार, अल्पसंख्याक हिंदूंवर होणारे अत्याचार वाढलेत. भारतासाठी ही चिंतेची बाब ठरलीय. बेकायदेशीर स्थलांतर, पाकिस्तानच्या आयएसआयचे स्लीपर सेल्स यामुळं निर्माण होणारे संकट वेगळंच शिवाय बांगलादेशचं चीनकडून शस्त्रास्त्र खरेदीचं धोरणही भारताला अडचणीत आणणारं आहे. बांगलादेश पाकिस्तान कडून २५ हजार टन साखरेबरोबरच, ४० हजार तोफ गोळे, रणगाड्यांचे ८ हजार गोळे, २८ हजार उच्च तीव्रतेचे रॉकेट्स इत्यादी विकत घेतोय. बांगलादेश मधल्या अस्थिरतेचा धोका पूर्वोत्तर राज्यांत बेकायदेशीरपणे घुसणाऱ्या स्थलांतरितांकडून आहे. पाकिस्तानच्या आयएसआयचे स्लीपर सेल सुद्धा यात असू शकतात, ही एक भारतासाठी खूप मोठी चिंतेची बाब आहे. श्रीलंकेनंतर बांगलादेशातही हिंसक निदर्शने झालीत. २०२४ च्या सुरुवाती पासूनच महागाई, बेरोजगारी अन् सततच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध तरुण रस्त्यावर उतरू लागले. विद्यार्थी संघटना आणि विरोधकांच्या पाठिंब्यानं हे आंदोलन इतकं हिंसक झालं की, 'लोह महिला' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री शेख हसीनाला देश सोडून पळून जावं लागलं. शेख हसीना सध्या भारतात राहतात. 
नेपाळनं २००८ ला राजेशाही त्यागून लोकशाही स्वीकारली. परंतु नेपाळच्या राजकीय इतिहासात अस्थिरता आजवर कायम आहे. नेपाळी नेत्यांचा चीनकडं झुकण्याचा कल अन् भारताविरोधी धोरणं हा चिंतेचा विषय ठरतोय. २०१५ च्या इथल्या भूकंपानंतर भारतानं मोठी मदत केली असली तरी, नेपाळचं चीनबरोबरचे संबंध अधिक बळकट होताहेत. असं दिसून आलंय. पदच्युत प्रधानमंत्री केपी शर्मा ओली हे चीनकडे झुकले असल्याचं अनेकदा दिसून आलंय. त्यांची वक्तव्यंही भारत
विरोधी असतात. आता नेपाळमध्ये केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिलाय. आंदोलनाच्या या वादळात केपी शर्मा ओली यांच्या विरोधात संताप व्यक्त झालंय. सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या ओली सरकारच्या निर्णयानं जनतेच्या असंतोषाच्या आगीत तेल ओतलं. विद्यार्थी अन् तरुणांनी याला सेन्सॉरशिप अन् भ्रष्टाचार थांबवण्याचा प्रयत्न म्हटलं. त्यानंतर काठमांडूमध्ये 'जनरल झेड क्रांती' सुरू झाली. हे आंदोलन अचानक नेपाळभर पसरलं. निदर्शकांनी संसदेला घेराव घातला, नेत्यांच्या घरांना लक्ष्य केलं आणि पोलिसांशी झालेल्या हिंसक संघर्षात २६ हून अधिक लोक मारले गेले. परिस्थिती इतकी बिकट झाली की, लष्कराला रस्त्यावर उतरावं लागलं. श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळमधल्या लोकांचं रस्त्यावर उतरून वर्षानुवर्षे प्रस्थापित राजकारण उखडून टाकणं हेच दर्शवतं की, सरकारनं लोकशक्तीच्या भावनेला कमी लेखू नये. सरकारनं सरकारी व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास तोडू नये. लोकशाही अन् त्यातल्या स्वायत्त संस्था कमकुवत होऊ देऊ नये, पारदर्शक आणि जबाबदार शासन व्यवस्था लागू करा, अन्यथा ज्या दिवशी जनतेचा संयम तुटेल, त्या दिवशी अशा नेत्यांचे नेतृत्व देखील कायमचं संपेल...!
चौकट
*राजेशाही अन् हिंदू राष्ट्राची मागणी*
नेपाळच्या राजघराण्याचा इतिहास हा असा आहे. नेपाळच्या राजघराण्याची २००१ मध्ये संशयास्पद सामूहिक हत्या झाली. २००५ मध्ये राजे ज्ञानेंद्र शाह यांनी लोकशाही संपवून सत्तेची सूत्रे हाती घेतली. २००६ मध्ये प्रजासत्ताकासाठी पुन्हा जनआंदोलन उभा राहिलं. २००८ मध्ये राजे ज्ञानेंद्र शाह यांना सत्तेवरून हटवण्यात आलं. नेपाळनं २०१५ मध्ये धर्मनिरपेक्ष संविधान स्वीकारलं. नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही आणि हिंदू राष्ट्राची मागणी आता जोर धरतेय. राजेशाही संपुष्टात आल्यानंतर नेपाळ एक धर्मनिरपेक्ष गणराज्य म्हणून अस्तित्वात आलं. परंतु, सध्याच्या परिस्थितीत, काही राजकीय पक्ष, संघटना या पुन्हा राजेशाही, हिंदू राष्ट्राच्या पुनर्स्थापनेसाठी आंदोलन करताहेत. नेपाळचे चीनशी वाढत असलेले संबंध अन् भारताशी असलेली नाळ यामुळं या राजकीय बदलांचे परिणाम भारतीय कूटनीतीवर काय होतील, याकडे लक्ष लागलेलंय. नेपाळची राजधानी काठमांडूच्या रस्त्यांवर सध्या माजी राजे ज्ञानेंद्र शाह यांचं नाव घुमतेय. २००६ सालीही हे नाव तिथं घुमलं होतं. २०२५ मध्ये हेच नाव पुन्हा ऐकू येतेय. तेव्हाही रस्त्यावर आंदोलक होते आणि आताही आलेत. परंतु, दोन्ही वेळेची कारणं वेगळी आहेत. २००६ ला लोक राजेशाही संपवण्याची मागणी करत होते, आता २०२५ मध्ये राजेशाही पुन्हा स्थापन करण्याची मागणी करताहेत. या आंदोलनांत शेकडो लोक जखमी झालेत. त्यांची मागणी केवळ राजेशाही पुन्हा स्थापन करण्याची नाही, तर देशाला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करण्याचीही आहे. या मागणीमुळं भारतासाठी अनेक राजनैतिक प्रश्न निर्माण झालेत. नेपाळमध्ये असे फारच कमी लोक सापडतील, ज्यांना नेपाळ पुन्हा हिंदू राष्ट्र होऊ नये, असं वाटत असेल. लोकांचा या विषयाशी खूप भावनिक संबंध आहे. नेपाळमधल्या लोकांना त्यांचा देश हिंदू राष्ट्र असल्याचा अभिमान आहे आणि हीच त्यांची ओळख होती, पण ती हिरावून घेतली गेली.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Saturday, 13 September 2025

मॅडम प्रेसिडेंट प्रतिभाताई.....

राष्ट्रपती भवन, हा प्रतिभाताईंचा पत्ता बदलून त्या पुणेकर झाल्या, तरी त्या मूळच्या जळगावच्या. वकील असलेल्या नानासाहेब पाटील यांच्या कुटुंबात त्यांचा जन्म जाला. या कुटुंबाचं मूळ घराणं राजस्थानमधल्या सोळंकी आडनावाचं. पुढं यातले काहीजण स्थलांतर करून जळगावजवळच्या नाडगाव इथं स्थायिक झाले. ते इथल्या मराठी संस्कृतीशी एकरूप झाले. त्यांना नाडगावची पाटीलकी मिळाल्यावर ते पाटील या आडनावानं ओळखले जाऊ लागले. प्रतिभा लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीच्या होत्या. कॉलेजमधल्या, सगळ्या अॅक्टिव्हिटीजमध्ये त्यांचा सहभाग असे. त्या 'कॉलेज क्वीन' झाल्या त्या वर्षीच म्हणजे १९६२ मध्ये चाळीसगावला एका मेळाव्यात त्यांनी केलेलं भाषण ऐकून काहीजणांनी नानासाहेब पाटील यांना, प्रतिभा यांना राजकारणात पाठवण्याचा सल्ला दिला. नानासाहेब पाटील यांनी प्रतिभा यांना यशवंतराव चव्हाण यांच्यापुढं उभं केलं. १९६२ मध्ये विधानसभा निवडणुका होत्या. उच्चशिक्षित प्रतिभा यांना काँग्रेस पक्षाकडून विधानसभेची उमेदवारीही मिळाली. तेव्हा प्रतिभा यांचं वय फक्त २७ वर्ष होतं. या निवडणुकीत जळगाव मतदारसंघातून प्रतिभा पाटील यांनी विजयी होण्याचा पराक्रम केला. १९६७ मध्ये त्यांना एदलाबाद मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. या निवडणुकीतही त्या विजयी झाल्या. निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात त्यांची आरोग्य आणि समाजकल्याण खात्याच्या उपमंत्री म्हणून निवड झाली. तिथून सुरू झालेली प्रतिभा पाटील यांची राजकीय कारकीर्द नंतर सतत बहरतच गेली.
१९७४ मध्ये प्रतिभाताई कॅबिनेट मिनिस्टर बनल्या. १९७८ पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या खात्यांचं कॅबिनेट मिनिस्टरपद भूषवलं. १९७९ मध्ये पुलोद सरकारच्या काळात त्या विधानसभेतल्या विरोधी पक्षनेत्या होत्या. १९८२ ते ८५ च्या काळात त्या पुन्हा कॅबिनेट मंत्री बनल्या. १९८५ मध्ये त्या राज्यसभेच्या सदस्या बनल्या. १९८६ ते १९८८ या काळात त्यांनी राज्यसभेचं उपसभापतीपदही भूषवलं. राजीव गांधी यांची हत्या झाल्यावर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या अमरावती मतदारसंघातून निवडून आल्या. १९९६ नंतर काही वर्षं त्या राजकीय विजनवासात होत्या. २००४ मध्ये त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नेमणूक झाली. त्यानंतर २५ जुलै २००७ रोजी त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या
प्रतिभाताईंचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी लढवलेल्या कुठल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला नाही. आपल्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी कायम इंदिरा काँग्रेसच्या निष्ठावंताची भूमिका बजावली. १९७७ मध्ये आणीबाणीनंतर देशात झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा पराभव झाल्यावर अनेक मोठे नेते त्यांना सोडून गेले होते. प्रतिभा मात्र इंदिरा गांधी यांच्याशी निष्ठावान राहिल्या. इंदिरा गांधी यांना अटक केल्याचा निषेध केल्याबद्दल त्यांनी दहा दिवस तुरुंगवासही भोगला. गांधी घराण्यावरच्या या निष्ठेमुळेच त्यांना अनेक पदं मिळत गेली. १९८० मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यावर इंदिरा गांधी यांनी प्रतिभा यांना मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरवलंही होतं. परंतु संजय गांधी यांनी आपलं वजन ए.आर. अंतुले यांच्या पारड्यात टाकल्यानं अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. अर्थात, बाईंना राज्यात मंत्रिपद, राज्यसभा सदस्यत्व अशी अनेक पदं त्यानंतर मिळत राहिली. २००७ मध्ये सोनिया गांधी यांनी त्यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी घोषित केलं, तेव्हाही त्यांची गांधीनिष्ठा हेच त्याचं प्रमुख कारण होतं.
प्रतिभाताई यांचे पूर्वाश्रमी डॉ. अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपतीपदाला एक वेगळीच लोकप्रियता प्राप्त करून दिली होती. प्रोटोकॉलचा पडदा बाजूला करून कलाम सामान्य लोकांमध्ये मिसळत. याबाबतीत प्रतिभाताईही त्यांचंच अनुकरण करणाऱ्या होत्या. त्यामुळंच भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळयात्री सुनिता विल्यम्स असोत किंवा नाशिक-जळगाव जिल्ह्यातले शाळकरी मुलं असोत, राष्ट्रपती भवनात त्या आपुलकीनं त्यांची भेट घेतात. प्रतिभाताईंना जुनी हिंदी-मराठी गाणी, नाट्यसंगीत, भावगीतांची आवड आहे. त्यांना चिवडा, चकल्या, बदाम शिरा, चिरोटे हे पदार्थ आवडतात. क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ आहे. त्या धार्मिक स्वभावाच्या आहेत. संत बहिणाबाईंच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे.
भारताच्या लोकशाही व्यवस्थेत राष्ट्रपती हे सर्वोच्च पद आहे. राष्ट्रपती लष्कराच्या तीनही दलांचे प्रमुख असतात. अशा सर्वोच्च पदाचा मान भारताच्या लोकसंख्येत निम्मा हिस्सा असलेल्या स्त्रियांपैकी एखादीला मिळणं, ही ऐतिहासिक घटना ठरलीय. कारण गेल्या ६० वर्षांत राष्ट्रपतीपदासाठी एकाही स्त्रीची निवड झाली नव्हती. पुरुषांसाठी राखीव अशीच या पदाची ओळख होती. त्यामुळे त्या पदासाठी प्रतिभाताईंची निवड होणार, हे स्पष्ट झाल्यावर राष्ट्रपतीतल्या 'पती' या शब्दावर चर्चा सुरू झाली. परंतु गणपती अथवा सभापतीतील पती हा गणाचा अथवा सभेचा पती म्हणजे नवरा नसतो; तसा राष्ट्रपती हा राष्ट्राचा पती नसतो. ते पदनाम आहे, हे या खुळचटांना कोण सांगणार? पदांप्रमाणे विशेषनामालाही लिंगभेद नसतो. तरीही शब्दांशी खेळणाऱ्या क्षेत्रातही विद्वान-विदुषी, लेखक-लेखिका, संपादक- संपादिका, कवी-कवयित्री, गायक-गायिका, निवेदक-निवेदिका, शिक्षक-शिक्षिका असा लिंगभेदाचं प्रदर्शन घडवणारा अतिशहाणपणा वहिवाट म्हणून राजरोस सुरू आहे. अशा वातावरणात प्रतिभाताईंचं राष्ट्रपतीपण हे खटकणारच. तरीही प्रतिभाताई राष्ट्रपती झाल्या, ते स्त्री म्हणूनच ! त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडीमागे काँग्रेस आणि इंदिरा गांधी कुटुंबाशी असलेली निष्ठा जशी कामी आली, तशीच भारतीय स्त्रीचं पारंपरिक दर्शन घडवणारी त्यांची प्रतिमाही कामी आलीय. प्रतिभाताई १९६२ पासून राजकारणात आहेत. त्यांच्या अगोदरपासून स्त्रिया राजकारणात आहेत. कार्यकर्त्या आहेत, नेत्या आहेत. अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, प्रेमा पुरव, तारा रेड्डी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्राच्या राजकारणात उमटवला आहे. त्यांच्या तुलनेत तरुण समजल्या जाणाऱ्या पिढीत सूर्यकांता पाटील, निलम गो-हे, विद्या चव्हाण या आहेत. त्या समाजाचे प्रश्न ऐरणीवर आणून राजकारण करीत आहेत. पक्षात आणि पक्षाबाहेरील सत्तेच्या विरोधात आवाज उठवण्याची धमक त्यांनी दाखवलीय. त्यांचं हे काम स्त्री-प्रतिमा भेदणारं आहे. स्त्रियांना हिंमत देणारं ठरलंय. याउलट प्रतिभाताईंची प्रतिमा आहे. संघर्ष ही त्यांची ओळख नाही. सोशिकता त्यांनी वैयक्तिक जीवनाप्रमाणे राजकारणातही जपलीय. हुंडा द्यायचा नाही, म्हणून त्यांनी लग्न अडवून धरलं; तथापि, गैर-अनिष्ट रूढी- परंपरांना विरोध करण्यासाठी त्या थेट रस्त्यावर उतरल्या, असं घडलेलं नाही. माणसा-माणसांत भेद जपणाऱ्या-वाढवणाऱ्या देव-धर्म-संस्कृतीचा आदर त्यांनी डोईवरल्या पदराप्रमाणे जपलाय. ही प्रतिमा राजकारणातल्या गोळा-बेरजेसाठी उपयुक्त ठरणारी असल्यामुळेच त्या राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यात त्यांच्या निष्ठा आणि प्रतिमेप्रमाणे समाजाची मानसिकताही महत्त्वाची ठरली आहे. आज देशात जागतिकीकरणाच्या माध्यमातून आधुनिक विचार-व्यवहाराचे वारे जोरात वाहात असले, तरी त्याचं सार्वत्रिकीकरण होऊ नये, यासाठी खोटारडी पण सनातन व्यवस्था प्रयत्नशील आहे. अशांसाठी स्त्रिया ह्या आजही सॉफ्ट टार्गेट आहेत. यासाठी टीव्ही चॅनल्सवरच्या मालिकांतून आणि देव-धर्म-सत्संगाच्या बाजारातील दलालांकडून उतू जाईस्तोवर भडवेगिरी सुरू आहे. मीडियाने ह्यातही हात धुऊन घेतले आहेत. ह्या साऱ्याचा प्रभाव जनमनावर होणं अटळ आहे. तथापि, काळाला साजेसं जगणं ह्यात माणूसपण आहे. ते जगण्याचा आनंद घेण्यासाठी आणि मिळालेल्या जन्मावर शतदा प्रेम करण्यासाठी आवश्यक आहे. भारतीय स्त्री या आनंदाच्या किती जवळ आहे? ज्या थोड्याफार स्त्रिया या आनंदाचा लाभ घेतात, त्यांची प्रतिमा म्हणजे प्रतिभाताई आहेत का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं अजिबात नाही अशीच आहेत. आजही जीवनाचा आनंद मुक्तपणे घेणाऱ्या स्त्रीकडेच नव्हे, तर पुरुषाकडेही आश्चर्यकारक नजरेने पाहिलं जातं. प्रेमात पडणाऱ्या अनेक तरुण-तरुणींना कारपेक्षा मोटारबाईक अधिक आवडते. दोन चाकांवर आपण दोघंच! असा हा मामला असतो. पार्टनरशिपसाठी तो आवश्यक असतो. अन्यथा कॉम्प्रेसरशिवाय एअरकंडिशन, असा प्रकार होतो. पण अशा युगुलांला 'हा कलियुगाचा दाखला आहे' अशा टिपणीने हेटाळलं जातं. त्यासाठी विशेषतः तरुणीला महिलेला अधिक जबाबदार धरलं जातं. खरं तर, वृद्ध रसिकांना मरावंसं वाटणार नाही, असे दिवस आलेत. ई-मेल, ई-शॉपिंग, ई-बुकिंग, ई-बैंकिंगच्या जमान्यात चूल-मूल आणि करियरया तिढ्यात सापडलेली स्वी ई-गृहिणी होऊ पाहातेय. शेतात आणि इतरत्र राबणारी स्त्रीही आपल्या मुलीला आधुनिकतेच्या दिशेने ढकलताना दिसतेय. कशी असेल ही आधुनिक स्त्री? ती मैत्रीवादी, विचारवादी, पुस्तकवादी असेल. स्वतंत्र विचार करणारी असेल. स्वयंपाकात अथवा रीतिरिवाजात अडकणारी नसेल. ती पतीच्या उपस्थितीत अन्य पुरुषाशी बोलताना कचरणार नाही. तसंच कोणताही पुरुष तिच्या मर्जीशिवाय तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण करू शकणार नाही. अशी स्त्री कितीजणांना आपल्या घरात कुटुंबात-समाजात हवी आहे? या प्रश्नाच्या उत्तरात नकारात्मक टक्केवारी अधिक आहे. जे घरात आणि समाजात, तेच राजकारणात असणार. यावर चर्चा होऊ नये, स्त्री वर्गात अस्वस्थता पसरू नये, यासाठी प्रतिभाताई पाटलांसारख्या परंपरावाद्यांचं प्रतीक असलेल्या महिलेला मोठेपणा दिला जातो. दुसऱ्या बाजूला शालिनीताई पाटील यांच्यासारख्यांना 'मराठ्यांच्या आरक्षणासाठी' सरकारवर तुटून पडायला पुढे केलं जातं. या दोघींच्या मोठेपणाचं कौतुक करताना 'तुम्ही स्त्रियांसाठी काय केलं? त्यांच्यावरील पारिवारिक-सामाजिक गळचेपीविरोधात कधी आवाज उठवला का?' असे प्रश्न विचारले जात नाहीत. कारण त्यांचा सार्वजनिक वावर महिलांमध्ये अधिक नसतो. राजकारणातल्याच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांतील पुरुषांना समतेचा आव दाखवण्यासाठी अशा महिला लागतात. अशांच्या फसव्या खेळींना जनता भुलते. प्रतिभाताईच्या राष्ट्रपती होण्याबाबतही असंच झालं आहे. त्यांचं राष्ट्रपतीपद हे सामाजिक बदलाची साक्ष देण्यासाठी नाही की, तसा बदल घडवून आणण्यासाठीही नाही. असेलच तर, 'सबुरी का फल मिठा होता हैl' हा सोशिकतेचा जागर भारतीय महिलांत कायम राहाण्यासाठी तो बनाव आहे. राजकारणात सत्तेची गणितं मांडताना कोणतीही चाल उलटी खेळली जाते. यातूनच हिंदू मत मिळवण्यासाठी टोकाचा मुस्लीमद्वेष केला जातो. जात हे वास्तव आहे. ते भारतातील सर्व धर्मियांत आहे. पण मतांची गोळाबेरीज करण्यासाठी जातवार गणित आखलं जात नाही. त्यासाठी धार्मिक श्रद्धांचा कट्टरतेचा वापर केला जातो. त्यात छुपी गोळाबेरीज जातींची असते. काँग्रेसच्या नरसिंह राव यांचा जातीय कासोटा तथाकथित हिंदुत्ववाद्यापेक्षा घट्ट होता. त्याचा फटका काँग्रेसला बसला. सत्ता गेली. त्याची दुरुस्ती करण्यासाठी काँग्रेसने भाजप परिवाराच्या भटी चलाखीवर प्रहार करायला हवा होता. परंतु काँग्रेसने के. आर. नारायणन् यांच्या दलितपणाचा वापर केला. त्यांना राष्ट्रपती बनवून आपला सेक्युलरपणा जपला. भाजपनेही वाजपेयी सरकारच्या काळात आपला मुस्लीमद्वेष आणि थोतांडाची खुलं दिसू नये, यासाठी वैज्ञानिक डॉ. कलाम यांना 'राष्ट्रपती' केलं, आजच्या मार्केट कल्चरमध्ये स्त्रीचा वावर मोठ्या प्रमाणात दिसतो. पण हा वावर नसून वापर आहे. हा वापर वस्तूसारखा मोठ्या प्रमाणात होतोय. ज्या वस्तू नसतात, त्या गिन्हाईक होतात. ही दोन्ही रूपं भारतीय संस्कृतीशी निगडित आहेत. या संस्कृतीनुसार, स्त्री ही अबला आहे आणि दुर्गाही आहे. पण ते सोयीनुसार ठरतं. या परंपरेनुसारच प्रतिभाताई 'राष्ट्रपती' झाल्या आहेत. अनेकदा वास्तवाची दाहकता इतकी असते की, त्याने माणसाची विचारशक्तीच आंधळी-बहिरी होऊन जाते. रामायण-महाभारत काल्पनिक असलं तरी त्यात शिकण्यासारखं खूप आहे. उत्तर रामचरितमध्ये भवभूतीने वशिष्ठांची पत्नी अरुंधती हिच्या तोंडी शब्द टाकले आहेत. ते सत्याचा अस्सल आग्रह धरणारे आहेत. रामाने सीतेचा त्याग केला, तेव्हा अरुंधती म्हणते, 'मी सीतेशिवाय अयोध्येत पाय ठेवणार नाही.' सीता आणि अरुंधती ही कथेतील पात्रं. पण अरुंधतीला सीतेचं दुःख वेगळं वाटत नाही. धर्माच्या काँट्रॅक्टरनी, परंपरेच्या बिल्डरांनी आणि त्यांच्यासाठी दगड-विटांचं मुर्दाड आयुष्य जगणाऱ्या धर्म-परंपरावाद्यांना थोडी जरी माणुसकी असेल, तर स्वतःला विचारायला हवं, 'सीता, दौपद्री आणि सावित्रीचं वैवाहिक जीवन संपूर्णपणे दुःखमुक्त असतं, तर त्यांना सतीचा मान प्राप्त झाला असता का?' नाही! दुःखी होणं ही सती होण्याची अट आहे. आजचं युग हे सतीचं नाही, तर सखीचं आहे. आजची सीता ही प्रीतमची सखी आहे, पाटर्नर आहे, कन्सल्टंट आहे, काऊन्सेलर आहे आणि गर्लफ्रेंडही आहे. ती पतीची आज्ञापालक, सेविका वा दासी नाही. पतीबरोबरची मैत्रीच ही तिच्या प्रामाणिकपणाची साक्ष आहे. तिला कुणी बॉस नाही आणि कुणासाठी अग्निदिव्य करायलाही ती बांधील नाही. अशी सीता आजच्या काळाला वंदनीय आहे. धर्म-संस्कृतीवादी ज्याला कलियुग म्हणतात, ते खरं तर मैत्रीयुग आहे. या युगातच जगाचं विश्वदर्शन झालं. विज्ञानाचा विकास झाला आणि माणसाचं दुःख-वेदना एकेक करीत दूर झालं. या युगाचा आनंद लुटायचा तर सती आऊट आणि सखी इन झाली पाहिजे. हे धर्माचे टिळे लावून, बुरखे घालून अथवा नवरेपणाची आणि पक्ष-नेतृत्व निष्ठेची उजळणी करून होणार नाही. त्यातून फक्त दहशतच निर्माण होते, असा इतिहास आहे. वर्तमानही त्यापेक्षा वेगळा नाही. या दहशतीचा त्रास भारतात दलितांप्रमाणेच स्त्रियांही शतकानुशतकं सोसत आहेत. तो संपवण्याची प्रक्रिया महात्मा फुले आणि लोकहितवादी देशमुख यांच्या प्रयत्नांपासून गेली दीडशे वर्ष महाराष्ट्रात सुरू आहे. त्यासाठी अनेक सुधारकांनी आपलं आयुष्य झिजवलं आहे. तथापि, देश स्वतंत्र होऊन ६० वर्ष उलटली, तरी दलित वस्त्यांवर हल्ले होतात. स्त्रीची नग्न धिंड काढली जाते. आई-बहिणीवरून शिवी देऊन राग व्यक्त केला जातो. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात स्त्रियांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक टाळणारं अंधश्रद्धाविरोधी विधेयक तब्बल वीस वर्षं मंजूर होत नाही. आमदार-खासदाराच्या निवडणुकीत ३३ टक्के आरक्षणाचं वारं शिरू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते. जय माता! आदि माता! गोमाता! हिंदमाता! असा घोष जोरात असतानाही शंकराचार्याच्या पदी महिला बसू शकत नाही. कामावरून आलेल्या सुनेला पाण्याचा ग्लास देणारी सासू तुरळक का होईना, आता पाहायला मिळतात. तसे सासरे पाहायचे दिवस अजून कल्पनेतच गटांगळ्या खाताहेत. स्त्रियांनी अनेक अडथळे पार करीत कर्तृत्वाची अनेक शिखरं गाठलीत. त्यापुढे समाजही नतमस्तक झालाय. तरीही स्वियांचे प्रश्न आणि त्यांच्यावर परंपरेने होणारे अन्याय-अत्याचार कायम आहेत. त्याला चाप बसावा, यासाठी केंद्र सरकारने विशेष कायदाही केलाय. मुली नाकारणाऱ्या 'स्त्रीभ्रूणहत्ये' विरोधात मोठ्या प्रयत्नात जनजागृती सुरू आहे. हे सारे प्रयत्न स्त्रीचा माणूस म्हणून स्वीकार करण्यासाठी आहेत. त्याचा एकदा स्वीकार केला की, प्रतिभा पाटील यांच्या राष्ट्रपतीपदाचं वेगळंपण उरत नाही आणि सलतही नाही.



बापू...! सलवा जुडूममधून बाहेर या... !

महात्मा गांधी आजकाल पुन्हा संकटात आहेत. खरंतर, त्यांचं संपूर्ण आयुष्य संकटात आहे आणि त्यांच्यासोबत राहिलेले जे कोणी होते ते अधिक संकटात आहेत. प्रथम दक्षिण आफ्रिकेतले लोक संकटात आले आणि नंतर महात्मा गांधींच्या संकटानं संपूर्ण भारताला वेढलं. दक्षिण आफ्रिका आणि भारत देखील बापूंसाठी त्रासदायक भूमी आहेत, जरी ते महात्मा गांधींना समस्यानिवारक मानत असलं तरी. स्वातंत्र्यानंतर गांधींनी काँग्रेसला अडचणीत आणलं आणि ते विसर्जित करून लोकसेवक संघात रूपांतरित केलं पाहिजे असं म्हटलं. काँग्रेसचे नेते मूर्ख नव्हते. त्यांनी महात्मा गांधींना दाखवलं की स्वातंत्र्यानंतर एकविसाव्या शतकापर्यंत काँग्रेस देशात कशी सत्तेत राहिलीय. काँग्रेसनं लोकसेवक संघाच्या जागी संयुक्त पुरोगामी आघाडीची स्थापना केलीय. गांधींना हवं असेल तर ते लोकसेवक संघ मानू शकतात. काँग्रेसनं खादी घालावी आणि दारू पिऊ नये असा गांधींचा आग्रह होता. काँग्रेसनं गांधींच्या या अव्यवहार्य शिकवणीच्या उलट केलंय. आता दारू पिण्याची आणि खादी न घालण्याची सवय काँग्रेसचा भाग बनलीय. गांधींनी यावर समाधान मानावं. सल्ल्यातल्या दोन्ही अटी काही प्रमाणात स्वीकारल्या गेल्यात.
स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी म्हटलं होतं की, गांधी इच्छित असल्यास ते भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना वाचवू शकतात जे फाशीवर लटकत होते. महात्मा गांधींनी स्पष्टपणे उत्तर दिलं की ते हिंसाचाराचं समर्थन करू शकणार नाहीत. सीतेच्या वनवासाप्रमाणे, भगतसिंग प्रकरण कलियुगातल्या या रामावर कलंक म्हणून चिकटलं. तरीही या मसीहानं हिंसाचाराचं समर्थन करण्यास नकार दिला. गांधींना स्वतःच्या सरकारशी लढावं लागलं नाही परंतु आयुष्यभर त्यांनी स्वतःला सरकारविरुद्ध अराजकतावादी घोषित केलं. अशा कोणत्याही सरकारवर त्यांचा विश्वास नव्हता जे तांत्रिकदृष्ट्या संसदेच्या इंग्रजी व्यवस्थेद्वारे आणि कायदा आणि सुव्यवस्थेद्वारे राज्य करते. त्यांनी आजच्या भारतातल्या संसदेला वेश्या देखील म्हटलं. शंभर वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या ऐतिहासिक ग्रंथ 'हिंद स्वराज' मध्ये आखलेल्या आणि ज्यावर त्यांना तीव्र आक्षेप होता, तो शासनाचा आराखडा आज भारतात चालू आहे.
गांधीजींनी त्यांच्या सार्वजनिक जीवनात आदिवासींच्या समस्यांवर जास्त वेळ घालवला नाही. ठक्कर बापासारख्या विश्वासू सहकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार, गांधींनी आदिवासींच्या समस्यांवरही चिंतन केलं आणि त्यांच्या मूलभूत हक्कांना पाठिंबा दिला. 'हिंद स्वराज'मध्ये गांधीजींची मुख्य चिंता अशी होती की, ब्रिटनमध्ये निर्वासित राहणाऱ्या त्या भारतीयांशी त्यांचं अजिबात सहमत नव्हते जे हिंसाचाराद्वारे ब्रिटिश साम्राज्य उलथवून टाकू इच्छित होते. म्हणूनच, स्वतंत्र भारतात कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचं समर्थन करणं गांधींना अशक्य आहे. सत्य आणि अहिंसेमध्ये, गांधीजींना अहिंसा सोडावी लागली तरी सत्य सोडता येत नव्हतं, परंतु हे शक्य नव्हतं कारण सत्य आणि अहिंसा एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या, जसं शोले चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या हातात असलेल्या नाण्यासारखं. जेव्हा मोठी गरज होती, तेव्हा गांधीजींनी अहिंसा सोडण्याचा सल्लाही थोड्या काळासाठी दिला होता, जर त्यामुळं अहिंसक उद्दिष्ट साध्य झालं असतं.
अशा मोहनदास करमचंद गांधींनी दक्षिण आफ्रिका आणि भारतात गोऱ्यांना आव्हान दिलं पण ते छत्तीसगडमधल्या काँग्रेस नेत्याच्या आणि भाजपच्या सलवा जुडूममध्ये अडकलेत. निष्पाप मुख्यमंत्री यांच्यापासून ते तीव्र असंतुष्ट भाजप नेत्यापर्यंत, सर्वजण सलवा जुडूम ही गांधीवादी शैलीची चळवळ असल्याचा फतवा काढताहेत. संघ परिवाराच्या एका स्वयंसेवकानं मुस्लिमांना पाठिंबा देण्याच्या किंवा पाकिस्तानसाठी काही कोटी रुपये मिळवण्याच्या आरोपाखाली बापूंची हत्या केली. जेव्हा गांधी अहिंसेच्या काठीनं इंग्रजांच्या हिंसक तोफेशी झुंजत होते, तेव्हा विनायक दामोदर सावरकर वगळता हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या लोहारांच्या दुकानात अशी शस्त्रे बनवत होते ज्यांना इंग्रजांशी लढण्याची आवश्यकता नव्हती परंतु स्वातंत्र्यानंतर गांधींना संपवलं. आता हाच गांधी बस्तरमधल्या सलवा जुडूममध्ये त्रास सहन करत आहे आणि सर्वांना ओरडून सांगत आहे की मी ही चळवळ सुरू केली नाही.
'अहिंसा ही शूर हृदयासाठी प्राणवायू आहे...!' असं महात्मा गांधी म्हणाले होते, नक्षलवादी हिंसाचाराच्या माओवादी पद्धतींवर विश्वास ठेवतात. हिंसाचार आणि अहिंसा यातल्या फरकाशी त्यांचा काहीही संबंध नाही. ते भारतीय लोकशाही आणि संविधानावरही विश्वास ठेवत नाहीत. नक्षलवादाच्या मूळ कागदपत्रांमध्ये, सरकारविरुद्ध जनयुद्धाची कल्पना कनू सन्याल, चारू मजुमदार आणि जंगल संथाल इत्यादींनी केली असावी. आता बस्तर आणि सुरगुजाचे नक्षलवादी किंवा म्हणायचं तर माओवादी लोकांविरुद्धच लढताहेत, जर असे लोक सरकारकडे मदत मागतात. अशा परिस्थितीत, सध्याचा नक्षलवाद म्हणजे सरकारविरुद्धचा अविचारी बंड आहे, कारण त्याला तत्वांपेक्षा कंत्राटदारांकडून चौथ वसूल करण्यात जास्त रस आहे. तो शाळा आणि रुग्णालये नष्ट करू शकतो. तो आदिवासींना त्यांच्या घरांमधून आणि जमिनींमधून हाकलून लावू शकतो. तो कोणालाही मारू शकतो आणि लहान मुलांना जबरदस्तीनं नक्षलवादी पोशाख घालायला लावू शकतो.
अशा अराजकतावादी घटकांना तोंड देण्यासाठी भारतीय संविधानानं सरकारे स्थापन केली आहेत आणि त्यांना अमर्याद अधिकार दिलेत. सार्वजनिक अभिव्यक्ती दाबण्याच्या नावाखाली सरकारांनी इतके कठोर कायदे केलेत की लोकशाहीचा लवचिक वृक्ष सुकून बुंध्यासारखा झालाय. सरकारांकडे अधिकारी आहेत. पोलिस आहेत. नेते आहेत आणि त्या सर्वांना समन्वय साधणारे दलालही आहेत. असे दलाल दृकश्राव्य आणि दृश्य माध्यमांमध्येही आपल्या कुंचल्यानं सरकारचा पांढरा चेहरा कोरत राहतात. अधिकारी त्यांच्या अधिकाराच्या खुर्चीवरून खाली येत नाहीत. पोलिस अधिकारी जितके मोठे असतील तितकेच ते समस्यांच्या क्षेत्रापासून दूर असतात. नेते हंगामी असतात, म्हणून ते फक्त अनुकूल हवामानातच टिकतात. दलाल लता वेली असतात. ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर चढतात आणि त्या झाडाचा रस शोषतात. या चांडाल चौकडीच्या चौपालमध्ये एके दिवशी एक नवीन रोबोट तयार झाला, ज्याचं नाव सलवा जुडुम होतं. त्याची खासियत अशी आहे की, तो ज्याच्या मेंदूला चिकटतो त्याला त्याच्या समर्थनार्थ गर्जना करायला लावतो. उदयास आलेल्या मनाच्या सर्व नवीन साधनांपैकी, हा सर्वात आधुनिक, उलट उत्तर-आधुनिक आहे.
जागतिकीकरणाच्या युगात असं घडतं की, उत्पादन काहीही असो, त्याचे ब्रँड नेम किंवा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असणं आवश्यक आहे. छत्तीसगडमध्ये, प्रत्येक गावातून भजिया गायब झालाय अन् हळूहळू त्याची जागा मॅकडोनाल्ड्स, किंगफिशर येतील. दोन किंवा तीन रुपयांच्या बटाट्याच्या बोंड्याऐवजी, तुम्हाला पन्नास रुपयांना बटाट्याच्या बोटांचा अमेरिकन डोना मिळेल. गरीब मरारी उद्ध्वस्त होत आहेत आणि तथाकथित श्रीमंत भारतीय मुकेश अंबानी देखील सर्वात मोठा मरारी बनलेत. प्रत्येक गावातून लोहार गायब झालेत आणि त्यांनी बस्तरमध्ये टाटा आणि एस्सारला त्यांची भूमिका सोपवलीय. जंगले, संस्कृती, चारा, चिरोंजी, कोंबडी, बकरी, तिखूर, जिरागोंडा गायब होताहेत आणि नवीन दारू कंत्राटदार, राजकीय दलाल, व्याजदार, साठेबाज, भ्रष्ट अधिकारी आणि नेते जे पूर्वी असूनही अभूतपूर्व आहेत त्यांची टोळी आकाशासारखी जंगलात पसरलीय. पण हे सर्व गैरवापर आहेत. ब्रँड अ‍ॅम्बेसेडर अमिताभ बच्चन कुटुंब किंवा शाहरुख खान किंवा सचिन आणि धोनीसारखे गैरवापर नाहीत.
हे आश्चर्यकारक आहे की, आदिवासींनी कधीही बस्तरला न भेटलेल्या गांधींच्या नावानं अज्ञात कवींनी लोकभाषेत शेकडो गाणी लिहिलीत. आता सरकार हुशार लोकांचं आहे, त्यांनी विचार केला की, गांधींना सलवा जुडूमचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर का बनवू नये. तो अर्धनग्न फकीर अगदी कोणत्याही आदिवासी वृद्धासारखा दिसतो. तो काठी टेकवून चालतो आणि बकरीचं दूध पितो. तो पोटभर जेवत नाही. तुम्ही त्याला धमकावलं आणि मारहाण केली तरी तो आपली काठी उचलत नाही. त्याला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनण्यास कोणीही आक्षेप घेणार नाही कारण त्याचा पक्ष काँग्रेसला त्याची छायाचित्रे किती काळापासून संघ परिवाराच्या कार्यालयात लटकत आहेत याची काळजी नाही, ज्या विचारसरणीनं गांधींना मारलं. आता कोणीतरी विचारलं पाहिजे की, ज्या गांधींनी भगतसिंग, सुभाषचंद्र बोस यांनाही इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचलण्यास मनाई केली होती, ते सरकारकडे एक प्रचंड पोलिस दल असूनही गरीब आदिवासींना शस्त्र उचलण्यास का सांगेल ज्यांच्या खेचण्याची त्यांना माहितीही नाही. कोतवार, पटवारी आणि हवालदारांसमोर शरण येणाऱ्या आदिवासींना इतकी भीती कशी वाटेल की, ते नक्षलवाद्यांना आव्हान देऊ शकतील, ज्यांच्यासमोर पोलिस दलही अनेक वेळा असहाय्य होते. या देशात, गांधी हा प्रत्येक समस्येवर इलाज आहे, त्रासलेल्यांसाठी नाही. अत्याचार करणाऱ्यांसाठी.
हे गांधीजी! तुम्ही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रुमन यांच्याकडून भारताच्या स्वातंत्र्यासाठी मदतीची ऑफरही नाकारली होती. कारण तुम्ही इतिहासात खरे ट्रुमन सत्यवादी आहात. तुम्ही जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांना काँग्रेसच्या पाठिंब्यानं निवडून आणलं आणि त्यांना जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात समाविष्ट केलं. मरताना तुमच्या तोंडातून फक्त 'हे राम' निघालं. तुम्ही आयुष्यभर हिंसाचाराला विरोध केला. मार्टिन लूथर किंग आणि नेल्सन मंडेला आणि बिशप तुटू आणि आंग सांग सू की यांनी तुमच्याकडून प्रेरणा घेतली पण शस्त्रे उचलली नाहीत. तुम्ही एकशे एकोणचाळीस वर्षांचे झाला आहात. आता या वयात, बस्तरच्या निष्पाप आदिवासींना त्यांची घरं सोडून नक्षलवाद्यांविरुद्ध शस्त्रे उचलण्याचा आणि सलवा जुडुम सारख्या छावण्यांमध्ये राहण्याचा सल्ला देणं तुम्हाला शोभत नाही जे तात्पुरते वाटतात पण कायमचे होताहेत. ज्यांच्याकडे तुमची पुस्तकं नाहीत. ज्या विचारसरणीनं चरखा जाळला आणि मँचेस्टर गिरणीचे कपडे घातले. जी अहिंसेला भ्याडपणा मानते. तुमचं प्रार्थनागीत 'ईश्वर अल्लाह तेरो नाम' कोण सार्वजनिकरित्या गाऊ शकत नाही. जो उर्दू, इस्लाम आणि दहशतवादी यांना समानार्थी मानतो. भारताच्या फाळणीसाठी तुम्हाला कोण दोषी ठरवतं? तुमचे शिष्य जवाहरलाल आणि सरदार पटेल यांना कोण एकमेकांशी भांडायला लावतं? तुमच्या नावावर कोणत्याही नवीन संस्थेचं, विद्यापीठाचं किंवा वसाहतीचं नाव कोण ठेवत नाही. तुम्ही त्या सर्वांच्या आत्म्यात, त्यांच्या गळ्यांत, त्यांच्या कृत्यात प्रवेश केलात? बापू, तुम्ही काय केलंय? ज्यानं तुम्हाला मारलं तो आता तुम्हाला आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे आणि तरीही तुम्ही रात्रीच्या अंधारातही सलवा जुडूमपासून पळून जात नाही आहात? अहो गांधी! तुम्हीही कोणाच्या स्वप्नात आला आहात का? अशी स्वप्ने आजकाल छत्तीसगडमध्ये एकामागून एक राजकारणी पाहत आहेत. तुम्हीही कोणाला स्वप्न दिलंय का की सलवा जुडूम छावणीत येणाऱ्या इतिहासात तुमचं नाव कलंकित करण्यास तुम्ही तयार आहात. आणि तेही ज्या वर्षी संपूर्ण जग तुमच्या नावानं अहिंसेचे वर्ष साजरे करत आहे.

भटांनी सार्वजनिक केलेले पेशव्यांचे दैवत

"भारत आणि भारताबाहेरही ज्या गणरायाच्या गजमुख मूर्ती सापडतात आणि त्यांची मोठ्या भक्तिभावानं पूजा केली जाते, त्या गजमुख गणपतीची मूर्ती पहिल्यांदा आढळते ती गुप्तकाळात म्हणजे इ. स. ४५० ते ५०० या काळात. गणेशोत्सवात तसंच दैनंदिन पूजा-पाठात ज्या गणेशाची आपण सर्व मोठ्या भक्तिभावनं पूजा-अर्चा आणि आरती करत असतो, तो गणराज गजानन केवळ दिड हजार वर्षांपेक्षा जुना नाही असं म्हटलं, तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल!" 
---------------------------------------------
वेदपूर्वकाळापासून भारतात तंत्रमार्ग अस्तित्वात होता; पण वैदिकांनी त्याला उशिरा मान्यता दिली. मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासात या मार्गानं मोलाचं योगदान दिलंय; पण त्यातल्या पंच'म'कार साधना विकृतीकडे वळल्यामुळं या मार्गाचा पुढं सुधारकांनी निषेध केला. मंत्रांमध्ये अलौकिक शक्ती असल्याची धारणा तंत्रमार्गानंच दृढ केली, तसंच यंत्रपूजा प्रतिष्ठित केली. तंत्रमार्गातले यंत्र हे योनीच्या आकाराचं असत. स्त्रियांची योनी ही तंत्रांनी आपल्या साधनेचं केंद्र मानलं होतं. त्यामुळं यंत्रांना योनीचा आकार मिळाला. पुढं वैदिकांनीही आपल्या यज्ञकुंडाचा आकार योनीसारखा केला. तंत्रसाधनेत स्त्रियांना महत्त्वाचं स्थान होतं. स्त्रियांना 'वामा' या शब्दानंही संबोधतात; म्हणून तंत्राला 'वामाचार साधना' असंही म्हणतात. तंत्रसाधना करणाऱ्या तांत्रिकाला 'वामाचारी' म्हणून पुढं हिणविलं गेलं. तंत्रसाधनेत मद्य, मांस, मैथुन, मत्स्य आणि मुद्रा या पाच 'म'कारांना महत्त्व होतं. पुढं त्याचा अतिरेक झाल्यावर संतांनी त्याच्या विरोधात आघाडी उभारली. तरीही शेती भरभरून येण्याकरिता तंत्रसाधना कमी-अधिक प्रमाणात सुरूच राहिल्या. त्यांचं स्वरूप कसं होतं, हे डॉ. स. रा. गाडगीळ यांनी सांगितलंय. ते स्त्रियांशी संबंधित का होतं, ते पहा - डॉ. गाडगीळ म्हणतात, 'कृषिविषयक मंत्र तंत्रात्मक विधी स्त्रीकडे येण्याचं कारण म्हणजे, स्त्री आणि भूमी यांमधलं साधर्म्य हे होय. दोन्हीही निर्मितिकेंद्रेच आहेत. स्त्री मानवाला जन्म देते. विश्वाला जन्म देणाऱ्या आदिमातेचीच ही दोन्ही रूपं आहेत. संस्कृतीच्या सर्व थरांवर स्त्री आणि भूमी यांचं साम्य माणसानं कल्पिलेलं आढळतं. भूमीच्या सुफलीकरणासाठी स्त्रीची योजना केली जाते. तिच्या ठिकाणी पृथ्वीप्रमाणेच नवनिर्मितीचे काही विलक्षण यात्वात्मक सामर्थ्य असलं पाहिजे. निसर्गशक्तींना वश करण्यासाठी मानवानं जी कृती केली, त्याला 'यातुविधी' असं म्हणतात. हे सामर्थ्य मंत्रात्मक विधींनी वाढविता येतं. एवढंच नव्हे, तर या सामर्थ्याचा उपयोग करून भूमीची प्रसवक्षमताही वाढविता येते. ज्या स्त्रीला विपुल संतती आहे, तिच्या हस्ते भूमीचा सुफलीकरणविधी करावा, असा संकेत आहे. याउलट, निपुत्रिक स्त्रीच्या हातून बीजारोपण अगर वृक्षारोपण करू नये, अशीही समजूत आहे.

आपल्या शेतीत भरघोस पीक येण्याकरता, म्हणजेच सुफलीकरणाकरता शेतमालकानं सपत्निक शेतात जाऊन मैथुन करण्याची चाल अनेक देशांमध्ये अजूनही आहे. त्याविषयी डॉ. गाडगीळ म्हणतात, 'नागा लोकांमध्ये सुगीच्या आणि पेरणीच्या दिवसांत मुक्त समागमाची आवश्यकता आहे, असं मानतात. मद्यपान आणि मुक्त-स्वैर-मैथुन यांना या दिवसांत भर येतो. युरोपमध्ये वनस्पतींची चांगली वाढ व्हावी यासाठी पुरुष आणि स्त्री वृक्षदेवतांचे विवाह लावून देतात आणि हे विवाह सफल व्हावेत म्हणून स्त्री-पुरुषांचा विधियुक्त संयोग घडवून आणतात. मध्य अमेरिकेत पेरणीच्या वेळी मैथुनविधी आवश्यक मानला जातो. पिकांच्या समृद्धीसाठी शेतकरी आपल्या स्त्रियांसह रात्री शेतावर जातो आणि धार्मिक श्रद्धेनं मैथुनविधी आचरतो. पेरणी करणाऱ्या तरुण जोडप्यांनी शेतात जमिनीवर पडावं आणि पेरलेल्या बियाणांवरून लोळावं, अशी चाल युक्रेनमध्ये आहे. जर्मनीतही अशी चाल आहे. मूळ मैथुनविधीचे हे अवशेष असावेत. पेरू या देशातले पुढील आचार तर शाक्तांच्या तंत्रोपासनेप्रमाणेच आहे.

ऑस्ट्रेलियातल्या वन्य जमातींची एक समजूत अशी आहे की, पृथ्वी (भूमाता) हे स्त्रीत्व आणि सूर्य हे पुरुषत्व; यांचा संयोग वर्षातून विशिष्ट दिवशी एकदाच घडतो. या संयोगानंतर भूमाता सुफलित होते. याप्रसंगी स्त्री-पुरुषांच्या सामूहिक मैथुनविधीला महत्त्व असतं. वैश्विक कामभावनांशी सहभाव साधण्यासाठी मानवी कामसाधनेची आवश्यकता असते, अशी ही श्रद्धा आहे. सूर्यदेव आणि भूमी यांच्या समागमप्रसंगी या स्त्री-पुरुष तत्त्वांचे मानवी देहधारी प्रतिनिधी म्हणजे स्त्री आणि पुरुष यांनी विधियुक्त समागम करावा, असा हा संकेत आहे. ब्रिटिश उत्तर बोर्निओत हा विधी पंधरा मिनिटे सामूहिकरीत्या चालतो. त्यानंतर पुन्हा सामाजिक-नैतिक बंधनं कडकपणे पाळावी लागतात. म्हणजे, सामूहिक समागम ही जणू सामूहिक प्रार्थनाच! मलायामध्ये भाताच्या हंगामात स्त्रियांची अदलाबदल करून हा विधी साजरा केला जातो.

या सर्व उदाहरणांवरून जमिनीच्या सुफलीकरणाकरता करावयाचे विधी जगभर कमी-अधिक प्रमाणात सारखेच आहेत, हे दिसून येतं. तंत्रसाधना साऱ्या धर्माच्या प्राथमिक अवस्थेत प्रचलित होती, या वास्तवाचाही शोध यातून लागतो. भारतात शिव वा शक्तीला, तसेच गणपतीला मानणाऱ्या अनुयायांनी जी मंदिरं निर्माण केली, त्यांवर जी मैथुनशिल्पे आढळतात, त्यामागं या तंत्रसाधनांची प्रेरणा आहे. पुढं वैष्णव, जैन, बौद्ध इ. संप्रदायांच्या अनुयायांनीही या 'तंत्र' साधनांचा स्वीकार केला. उत्तर पेशवाईत जे 'गणयाग' चालत त्यातला 'घटकंचुकींचा' खेळ या साधनांचा अलीकडचा पुरावा होय. पुण्यात पेशवाईत काहींची घटकंचुकी चालत असे. काही निवडक स्त्री-पुरुष रंगमहालात जमून स्त्रियांच्या चोळ्या एका घटात घालत. ज्या पुरुषाला ज्या स्त्रीची चोळी सापडे तिच्याशी तो सर्वांदेखत कामक्रीडा करत असे. या खेळाला घटकंचुकी म्हणत. ही घटकंचुकी कर्नाटकातही पाचपन्नास वर्षांपूर्वी प्रघातात होती. अशी नोंद इतिहासाचार्य राजवाडे आणि प्रबोधनकार ठाकरे यांनीही करुन ठेवलीय. 

या तंत्रसाधना दक्षिणेत अधिक बहरल्या. श्रीशैल हे शाक्त संप्रदायाचे मोठं केंद्र या साधनांसाठी प्रसिद्ध होते. सुफलीकरणासाठी आवश्यक वाटणाऱ्या या तंत्रसाधनांचे रूपांतर पुढे लैंगिक विकृतीत झाले. त्यातील बीभत्सपणा सामाजिक संतुलन घालविण्यास कारणीभूत ठरला. म्हणून त्यांच्या विरोधात महानुभाव आणि वारकरी संप्रदाय जन्माला आले. लीळाचरित्र, नामदेवांचे अभंग, तसंच तुकोबांची गाथा यांतून तंत्रसाधनांचा निषेध स्पष्टपणे उमटलाय. एकनाथांनीही त्यावर ताशेरे ओढलेत. हे सारं मात्र भूमातेच्या आराधनेतून होत होतं, हे आज कुणालाही खरं वाटणार नाही.

गणेश किंवा गणपती या देवतेची वेदांमध्ये माहिती आढळत नाही. परंतु कालांतरानं हे एक आराध्य दैवत बनले. इ.स. ५ व्या शतकाच्या थोडसं आधी गणेशपूजन करण्याची सुरुवात झाली असावी. भाद्रपद चतुर्थी हा गणेशपूजनाचा एक महत्त्वाचा दिवस असल्याबद्दलची माहिती प्राचीन धर्मग्रंथां - मध्ये मिळते. महाराष्ट्रामध्ये पेशव्यांच्या राजवटीपासून गणेश या दैवतास विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले. पेशव्यांच्या काळात गणपतीला एक आराध्य दैवत म्हणून आणि उत्सवाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त का झालं याचं स्पष्टीकरण देता येतं. कारवार, गोवा, कोकण या पश्चिम भारताच्या समुद्रकिनारपट्टीवरील प्रदेशांमध्ये गणपतीला पेशव्यांच्या आधीपासूनच प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. प्राचीन काळातली परशुरामाची कथा या परिसराशी निगडीत आहे. परंपरेनुसार परशुराम हा शिवभक्त होता. गणपतीचा शिवाशी किती जवळचा संबंध आहे हे तर सर्वश्रुत आहे. चित्पावन ब्राह्मणांच्या उत्पत्तीचा परशुरामाशी संबंध जोडला गेलाय. याचा अर्थ असा निघतो की, शिवाच्या उपासनेमधून हळू हळू चित्पावनांनी गणपतीला आराध्य दैवत म्हणून मानण्याचे ठरविलं असावं.

पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट हा श्रीवर्धनचा. चिपळूण हे बंदर १७ व्या शतकामध्ये जंजिरा इथल्या सिद्दिच्या ताब्यात होतं. त्यांच्या वतीनं मीठबंदराचा हवाला १७ व्या शतकाच्या शेवटी बाळाजी विश्वनाथ भट यांच्याकडे होता. याच सुमारास चिपळूणमध्ये ब्रह्मेंद्रस्वामी नावाचे गुरू होते. आपल्या अगाध ज्ञानामुळं आणि पवित्र आचार-विचारांमुळं त्यांना पश्चिम किनारपट्टीवरच्या प्रदेशात लौकिक मिळाला होता. बाळाजी विश्वनाथही हळूहळू कालांतरानं ब्रह्मेद्रस्वामींचा भक्त बनला. असंच एकदा बाळाजी त्यांच्या भेटीला आला असताना स्वामींनी त्याला 'श्रीगजानन आणि भार्गव तुला महत्पद देईल' असा आशीर्वाद दिला. १८ व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच बदल झाले. संभाजी पुत्र शाहू इ. स. १७०७ मध्ये सातारात आल्यापासून तर थेट इ.स. १७१३ मध्ये पेशवेपद मिळेपर्यंत बाळाजी विश्वनाथची राजकीय प्रतिष्ठा अधिकाधिक वाढत गेली. स्वामींच्या म्हणण्यानुसार हा जणू गजाननाचा बाळाजीला लाभलेला कृपाप्रसादच होता!

अशारितीनं गणेशाला पेशव्यांच्या देव्हाऱ्यात कुलदैवत म्हणून स्थान मिळालं. स्वतः ब्रह्मेन्द्रस्वामींचं मुख्य दैवत गणपती होते. ते गणपतीची उपासना परंपरागत पद्धतीनुसार करत. याशिवाय भाद्रपद महिन्यात ते गणेश चतुर्थीला गणपती उत्सव साजरा करत असत. अशारितीनं किनारपट्टी- जवळच्या प्रदेशात गणपतीचा उत्सव प्रचलित झाला. पेशव्यांच्या काळात सुरू झालेल्या गणपती उत्सवाचं मूळ यामध्ये दिसतं. पुढं इ.स. १७२८ मध्ये ब्रह्मेंद्रस्वामींनी आपलं बस्तान कोकणातून साताऱ्याजवळच्या धावडशी इथं हलवलं. तेव्हापासून साताऱ्यातही गणेशोत्सव सुरू झाला.

पहिल्या बाजीराव पेशव्याच्या वेळेपासून मराठ्यांचा राजकीय विस्तार उत्तरेकडे होऊ लागला. इ.स. १७२७-२८ मध्ये त्यानं माळवा, बुंदेलखंडची मोहीम आखली होती. आता पेशव्यांपुढं जास्त आव्हानं होती. ती पेलताना त्यांना मनोधैर्य मिळविण्यासाठी गणपती या विघ्नहर्त्याची भावनिकदृष्ट्या जास्त गरज होती. यानंतरचा पेशवा नानासाहेब याच्या काळात तर मराठ्यांचा मुघल दरबारच्या राजकारणात प्रवेश झाला. इ. स. १७५२ च्या तहामार्फत पेशव्याला फक्त आग्रा आणि अजमेर इथल्या सुभेदाऱ्याच मिळाल्या नाहीत तर राजनैतिक महत्त्वही मिळालं. ही एवढी मोठी झेप घेताना त्यांना भक्कम भावनिक आधार हवा असणार हे नक्की. आपली विघ्ने गणपती टाळेल असा विश्वास पेशवे घराण्यात आणखी आणखी रुजत गेला असावा. किंबहुना म्हणूनच नानासाहेबानं गणपतीला आणखी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यानंच गणेशोत्सव सुरू केला. शनिवारवाड्यामध्ये नानासाहेबानं गणेश रंगमहाल बांधला. या महालाच्या एका भिंतीत एक मखर तयार करवून त्यानं त्यामध्ये संगमरवरी दगडाची एक भव्य गणेशमूर्ती कायम स्वरूपात प्रतिष्ठापित करवून घेतली होती. शनिवारवाड्याला जी प्रमुख पाच प्रवेशद्वारं होती त्यांपैकी एक प्रवेशद्वार गणेश दरवाजा या नावाचं होतं. नानासाहेबांच्या काळापासून गणेशोत्सव या गणेशमहालातच साजरा होत असे. माधवराव पेशव्यांचीही गणपतीवर असीम श्रद्धा होती. त्यानं नीलमण्यांची गणेशाची मूर्ती मुद्दाम करवून घेतली होती. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने हळूहळू महाराष्ट्रातील अष्टविनायक प्रसिद्धीस येऊ लागले ही गोष्ट नमूद करण्याजोगी आहे. कदाचित ही स्थानिक देवळे छोटी देवळे या स्वरुपात असतीलही, महड, पाली, मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, रांजणगाव, लेण्याद्री आणि ओझर या अष्टविनायकांचे एक मंडलच जणू पुण्याभोवती निर्माण झाले. 

पेशव्यांच्या काळात हा उत्सव दहा दिवस चाले. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत तो साजरा होत असे.  या वेळी गणपतीची एक मूर्ती विकत आणली जाई. ज्या ठिकाणी ही मूर्ती ठेवली जाई तेथे दिवे, आरसे, चित्रकलेचे नमुने इत्यादी लावून आरास केली जाई, कधी कधी काही चोपदारही या दृश्यात रंग भरण्यासाठी उभे राहत. दहा दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवात कीर्तन, लळीत, संगीतविषयक कार्यक्रम वगैरे केले जात. या प्रसंगी गोसावी, हरदास, गवई कलावंतिणी इत्यादींना बोलावले जाई. हा उत्सक नेमके कोणते दहा दिवस साजरा होत असे त्याबद्दलची नोंद अशी - श्रीगणपती उत्सव खर्च : भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा उत्साह प्रतिपदेपासून दशमीपर्यंत दहा दिवस झाला त्याची बिदागी देणे गोसावी व गवई व कलावंतिणी वगैरे गुणीजनयांस, बाबत वाटणी, रसानगी यास...' नानासाहेब पेशव्याच्या काळापासून उत्तरोत्तर हा सण आणखी थाटामाटाने साजरा होत गेला. ही बाब उत्सवातील खर्चाच्या नोंदीवरून समजू शकते. नानासाहेब पेशव्याच्या काळात जो गणपती-उत्सव झाला त्यासाठी २६८२ रुपये इतका खर्च झाला. सवाई माधवराव पेशवा असताना इ.स. १७९४- ९५ मध्ये साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवातील कलाकारांना ४३५८ रुपये इतकी बिदागी पेशव्यांकडून मिळाली. या कलाकारांमध्ये १८१ गोसावी हरदास, ३४ गायक आणि ४३ कलावंतिणी यांचा समावेश होता. याखेरीज गुरव पखवाजीही होते. सवाई माधवरावाच्या काळात शनिवारवाड्यामध्ये एक खास गणेश रंगमहाल बांधला होता असेही दिसते. 

पेशवाईच्या काळात सण-समारंभांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. समारंभांचा एक अविभाज्य भाग म्हणजे नृत्याचे आयोजन. पेशव्यांचे महत्त्वाचे दैवत म्हणजे गणपती. त्यामुळे गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाई. हा उत्सव दहा दिवस चाले. इ.स. १७९१ मध्ये कॅप्टन मूर या पुणे येथील ब्रिटिश रेसिडेंटने असे नमूद केले आहे की, शनिवारवाड्यातील गणेश रंगमहालात त्याला आमंत्रित केले असता त्याने शंभर नायकिणींचे नृत्य पाहिले. गेल्या दीड हजार वर्षांपूर्वी दैवतरूपात पूजनीय ठरलेल्या गजमुख गणपतीचे माहात्म्य वर्णन करणारी गणेशपुराण व मुद्गलपुराण अशी दोन स्वतंत्र उप-पुराणे महाराष्ट्रातील गणेशभक्तांनी रचली आहेत, असे संशोधकांचे मत आहे. या पुराणांमध्ये वर्णिल्यानुसार, विघ्नहरण करणाऱ्या गणपतीची उपासना वाढू लागल्यावर इ. स. पाचवे ते नववे शतक यादरम्यान 'गाणपत्य संप्रदाय' उदयास आला व प्रस्थापित झाला. पुढे तंत्रमार्गी लोकांनीही गणपतीला पूजास्थानी मानले. तंत्र म्हणजे तनाशी, अर्थात शरीराशी आणि शेतीशी संबंधित. तांत्रिक हे वामाचारी होते, असे उल्लेख प्राचीन वाङ्गयात सापडतात. वामा म्हणजे स्त्री. वामाचारी म्हणजे स्त्रीसंबंधाला व विशेषतः स्वैरसंबंधाला प्राधान्य देणारे. तांत्रिक मार्गात मद्यपान, स्वैरमैथुन इत्यादी आचारांना पूजेचे अंग मानले आहे. पेशवाईच्या अखेरीस उच्चपदास पोहोचलेल्या काही ब्राह्मण जहागीरदार व सरदारांमध्ये घटकंचुकीसारखे वाममार्गी 'गणेशतंत्र' चालत असे, हे पेशवाईच्या इतिहासावरून दिसते. पेशव्यांचे दैवत गणपती होते, त्यामुळे पुण्याच्या आसपास असलेल्या गावांमधील गणपती मंदिरांची अष्टविनायकांमध्ये गणना झाली.

आज आपल्या प्राचीन लोकशाही गणराज्यातील गणांचा अधिपती असलेला गणपती गणेश नवनव्या रूपात जागोजागी आढळतो. त्याच्याशी थट्टा केली, तरी तो काही कोपत नाही, अशी सर्वांचीच समजूत असल्यामुळे त्याला कधीकधी गमतीचा विषयही बनविले जाते. अशीच एक गंमत २१ सप्टेंबर १९९५ रोजी देशभर व देशाबाहेरही केली गेली. गणपतीला दूध पाजण्याचा उपक्रम योजनाबद्ध रीतीने पार पाडला गेला. एस.टी.डी., पी.सी.ओ. टेलिफोन केंद्रांचा वापर, दूरदर्शन, आकाशवाणी इत्यादी माध्यमेही या कामी सर्रासपणे वापरली गेली. गेली दीड हजार वर्षे ज्या गणपतीला दुर्वा व मोदकांवर समाधान मानावे लागले, त्या बिचाऱ्याला नव्याने दूध या स्निग्ध पदार्थाची चव जबरदस्तीने दिली गेली. या घटनेचा फायदा तथाकथित तांत्रिक चंद्रास्वामी याने घेऊन या साऱ्या दैवी चमत्कारामागे आपलाच हात असल्याची थाप मस्तपैकी ठोकून दिली. खरे तर हा प्रकार म्हणजे आपल्या फुले-शाहू-आंबेडकर या महापुरूषांनी गेल्या शे पाऊणशे वर्षांत शिक्षणाची गंगा ब्राह्मणेतर बहुजनांच्या दारात नेली होती त्यावर उगवलेला सुड होता. त्या विद्येच्या गंगेत न्हाऊन एकंदरीत बहुजनांच्या मेंदुत काही प्रकाश पडला की नाही याची ती एकप्रकारे चाचपणीच होती. परंतु इतक्या सोयीसुविधा, शैक्षणिक हक्क व मुलभूत अधिकार प्राप्त करुनही बहुजन वर्गाने या चाचपणीत सपशेल नापास होवून आपल्या अक्कलेचे दिवाळे गणपतीला दूध पाजून दाखवून दिले. 

बहुजन समाजातील अज्ञानाचा अंधःकार दुर व्हावा व त्यांनी विज्ञानाची कास धरावी यासाठी राजर्षी शाहू महाराज छ्त्रपतींनी सर्वांसाठी शिक्षण मोफत आणि सक्तिचे करण्याचा आदेश २१ सप्टेंबर १९१७ रोजी काढला होता परंतु मनोहर जोशी हा भटजी मुख्यमंत्री झाल्यानंतर १९९५ साली बरोबर २१ सप्टेंबर या दिवशीच त्या भटजीने माझ्या घरातला गणपती दूध पितो अशी अफवा उडवून दिली. या अफवेमुळे आपण मुर्ख बनवले जातोय याची पर्वा न करता चौकाचौकात मंडप घालून, ध्वनिक्षेपक लावून पुजा, आरत्या करण्याच्या स्पर्धा सुरु झाल्या. या सर्व प्रकारातून असे दिसुन आले की बहुजन वर्ग कितीही उच्चशिक्षित झाला तरी त्याने आपला मेंदू भटपुरोहितांच्या जानव्यात गुंडाळून त्यांच्या चरणांवर अर्पण केला आहे. अशाप्रकारे दिसुन येते की, पाचव्या शतकात उदयाला आलेला हा गणपती प्रथम तंत्रसाधना करणारांकडून, नंतर वैदिकांकडून व त्या पुढच्या काळात पेशव्यांचे आराध्य दैवत बनून प्रसिद्धी पावला. कोकणात व पेशव्यांच्या शनिवारवाड्यात मर्यादित असलेला हा गणपती स्वातंत्र्य चळवळीच्या काळात महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजामुळे दुरावलेल्या हिंदूंना ब्राह्मणी वैदिक धर्माकडे वळवण्यासाठी व हिंदू-मुस्लिम एकी तोडून हिंदूंना मुस्लिमांविरोधात एकवटून, हिंदुंच्या नेतृत्वाच्या नाड्या भटपुरोहितांच्या हातात येण्यासाठी ब्रह्ममान्य टिळकांनी त्याचा सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून अधिक प्रमाणात सुनियोजितपणे प्रसार करुन अधिक मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचला. वैचारिक व राजकीय प्रचाराचे  सांस्कृतिक साधन म्हणून गणेशोत्सवाचा वापर त्या वेळी झाला. तर असा हा गजमुख गणपती स्वातंत्र्योत्तर काळात सार्वजनिक गणेशोत्सवाचे व्यापक रुप घेऊन आता चौकाचौकांत व घराघरात विराजमान झाला आहे... 
(संदर्भ : हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र - पां. वा. काणे, 
एन्सायक्लोपीडिया ऑफ धर्मशास्त्र - एस. एस. डांगे,
गणेश लॉर्ड ऑफ ऑब्स्टॅकल्स, लॉर्ड ऑफ बिगीनींग - पॉल कोर्टराईट, 
पूना इन दि बायगॉन डेज - डी. बी. पारसनीस, 
सिलेक्शन फ्रॉम सातारा राजाज ॲन्ड पेशवा डायरीज - ग. चि. वाड, 
पेशवे दप्तरातून निवडलेले कागद - गो. स. सरदेसाई, 
पेशवेकालीन महाराष्ट्र - वा. कृ. भावे, 
श्री ब्रह्मेन्द्रस्वामी धावडशीकर चरित्र व पत्रव्यवहार - द. बा. पारसनीस, 
पेशव्यांचे विलासी जीवन - डाॅ. वर्षा शिरगांवकर, 
गणपती देवता, दैवतांची सत्यकथा - डॉ. अशोक राणा) 
 

पुण्याच्या खाद्य संस्कृतीचा दीपस्तंभ..!

'पूना गेस्ट हाऊस' चा वर्धापन दिन. 
पुण्यनगरीचं भूषण आणि पुण्याची शान म्हणून ज्या काही पूर्वापार अन् प्रदीर्घ काळ चालत आलेल्या अनेक गोष्टी पुण्यात आहेत, त्यात वैभवशाली लक्ष्मी रोडवर असलेल्या 'पूना गेस्ट हाऊस'चा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाणं या इतिहासाला कधीच शक्य होऊ शकणार नाही. तो एक मानदंड ठरलाय. 
'पूना गेस्ट हाऊस' हे पुण्यात येणाऱ्या पथिकांच्या मध्यवर्ती निवासाची वर्षानुवर्ष अतिशय चोख आणि दक्ष अशी व्यवस्था निगुतीने पार पाडणारं ठिकाण आहे, पाहुण्या पुणेकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचं असं एक विश्रांतीस्थान, निवासस्थान ठरलेलंय! त्याचवेळी क्षुधाशांतीची घरच्यासारखी सोय पाहणारं एक महत्त्वाचं ठिकाण आहे! आज अनंत चतुर्दशीला प्रतिष्ठित 'पूना गेस्ट हाऊस'  आपल्या वयाची ९० वर्षे पूर्ण करत आहे..!! ती नुसतीच नऊ दशकं पुरी करत नाहीयेत तर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण, सेवाभावी, नम्र वाटचालीच्या यशाची कमान चढती ठेवत मार्गस्थ होताहेत. 
चित्रपट सृष्टीतले कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांना राहण्यासाठी आणि आपल्या उपजीविकेचं साधन म्हणून 'पूना गेस्ट हाऊस'ची स्थापना आद्य मूकपट निर्माते नरहर तथा नानासाहेब सरपोतदार यांनी १९३५ मध्ये केली. त्यांचा आर्यन फिल्म स्टुडिओ हा पेशवे पार्क शेजारच्या जागेत होता. त्याकाळी पुण्यामध्ये प्रभात फिल्म स्टुडिओ, दादासाहेब तोरणे यांचा स्टुडिओ आणि आणखी दोन असे स्टुडिओ होते. इथं चालणाऱ्या चित्रपटाच्या शुटिंगसाठी येणारे कलाकार, साहित्यिक, गायक, वादक, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, निर्माते, लेखक हे सारे नानासाहेबांच्या प्रेमामुळं 'पूना गेस्ट हाऊस' मध्ये राहात असत. त्याकाळी बाजीराव चिवडा, मस्तानी मिसळ असे पेशवाईचा प्रभाव असणारे पदार्थ ते इथं विकत असत. ही त्या काळातली 'पूना गेस्ट हाऊस' ची खासियत होती. 'घरट्यात आपल्या पिल्लांना खाऊ भरवणारी चिमणी...!' हे 'पूना गेस्ट हाऊस' चे बोधचिन्ह साक्षात गदिमा आणि आचार्य अत्रे यांच्या कल्पनेतून साकारलेलं आहे. त्या काळापासून इथं साहित्यिक, कलाकारांचा राबता कायम आहे. इथल्या कांद्याची कुरकुरीत भजी खाल्ल्यानंतर आचार्य अत्रे यांनी 'खेकडा भजी' असा त्यांचा उल्लेख केला होता आणि तेव्हापासून तो शब्द आणि पदार्थही प्रचलित झालाय. बालगंधर्व, लता मंगेशकर, पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व या दिग्गजांच्या वास्तव्यासोबतच मैफली या वास्तुत बहरत असत. आजही तो प्रघात किशोर सरपोतदार यांनी सुरू ठेवलाय. शिवाय नुकतंच पुण्यातल्या प्रतिथयश उद्योजकांना इथं दर सोमवारी बोलावून त्यांच्या उद्योगाची वाटचाल नव्या पिढीला देत त्यांच्यात उद्योग व्यवसाय करण्याची प्रेरणा किशोर - अभय हे देत असतात. 
जुन्या पिढीतले  सूर्यकांत मांडरे, चंद्रकांत मांढरे, वसंत शिंदे, जयश्री गडकर, मास्टर धुमाळ, मास्टर विनायक, मास्टर विठ्ठल, वसंतराव पहिलवान, प्रभाकर पणशीकर, दादा कोंडके, रमेश आणि सीमा देव, भालजी पेंढारकर, ललिता पवार, जयश्री गडकर, काशिनाथ घाणेकर, सुलोचना दीदी, अशोक सराफ, राम कदम अशा मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज नामवंत कलाकार नियमितपणे इथं वास्तव्य करत असत. काळ बदलला तरी काही मराठमोळे कलाकार आवर्जून इथं मुक्कामाला, भोजनाला येतात. ख्यातनाम नाटककार बाळ कोल्हटकर यांनी तर त्यांची सर्व नाटकं 'पूना गेस्ट हाऊस' च्या चार नंबरच्या रूममध्ये बसून लिहिली आहेत असं त्यांनीच नमूद केलंय. शिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतले मोहम्मद रफी, देव आनंद, बिमल रॉय अशी कितीतरी दिग्गज नावं सांगता येतील की, ज्यांचं 'पूना गेस्ट हाऊस' शी खूप जिव्हाळ्याचं नातं ऋणानुबंध होते. योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली ती 'पूना गेस्ट हाऊस' मधूनच. टिळकांचे नातू आणि दैनिक केसरीचे संपादक ग. वि. केतकर हे त्यांच्या शेवटच्या काळात इथंच राहायला होते. प्रख्यात विनोदी अभिनेता मधू आपटे यांचं शेवटच्या चार वर्षांचं वास्तव्य इथंच होतं. अभिनेते काशिनाथ घाणेकर यांनीदेखील करिअरच्या सुरुवातीची काही वर्षे आणि आयुष्यातली शेवटची साडेचार वर्षे 'पूना गेस्ट हाऊस' मध्येच आपला मुक्काम केला होता. निराधार, एकाकी, निष्कांचन कलावंतासाठी तर चारूकाका सरपोतदार त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असत. जुने संगीत रंगभूमीचे गायक नट श्रीपाद जोशी, मधू आपटे यांनी तर अखेरचा श्वास 'पूना गेस्ट हाऊस' मध्ये घेतलाय, तो चारू काका सरपोतदार यांच्या सहृदयतेमुळंच. 
सरपोतदार कुटुंबाच्या दुसऱ्या पिढीनं  'पूना गेस्ट हाऊस'ची ध्वजा दिल्लीत नेऊन रोवली होती. संसदेचं कॅन्टीन देखील त्यांच्याकडं होतं. त्यांच्याकडं असलेला कमालीचा जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आणि कलावंतांशी असणारे ऋणानुबंध पिढ्यानपिढ्या जपणाऱ्या 'पूना गेस्ट हाऊस' ची किशोर, अभय, साधना, शर्मिला, सनत, शौनक ही सरपोतदार कुटुंबाची पुढची पिढी मोठ्या उत्साहात आपल्या कुटुंबाचा वारसा पुढं नेत आहेत. शिवाय व्यवसायात आधुनिकता आणण्याचाही प्रयत्न करत असतात. १९३५ मध्ये पुण्यातल्या लक्ष्मी रोडवर सुरू झालेला 'पूना गेस्ट हाऊस' चा प्रवास सरपोतदारांच्या चौथ्या पिढीनं सेनापती बापट रस्त्यावरच्या पॅव्हिलियन मॉलमध्ये, तसंच विकसित बाणेर मधल्या हाय स्ट्रीटवर यशस्वीपणे नेऊन ठेवलाय. त्याशिवाय खडकवासला कुडजे गावातल्या झपूर्जा संग्रहालय इथंही आपला ठसा उमटवलाय. 
--------------------------------------------------
सरपोतदार कुटुंबातल्या चौथ्या पिढीनं सनत किशोर सरपोतदार आणि त्यांची पत्नी आदितीनं नव्या युगात प्रवेश केलाय. 'पूना गेस्ट हाऊस' मध्ये लोकप्रिय ठरलेली रुचकर आणि स्वादिष्ट "मिसळ, पातळ अळूची भाजी, मटार उसळ आणि मसाले भात...!" याला देशविदेशातून मागणी असल्यानं 'रेडी टू इट' पाकीटं तयार केली आहेत. त्याचा शुभारंभ आज अनंत चतुर्दशी आणि ९० व्या वर्धापन दिनी करण्यात आलाय. त्याचे डिझाईन आणि पॅकेजिंग माझ्या मुलानं मृणाल यानं आमच्या 'फायर फ्लाय क्रिएटिव्ह सोल्युशन' या जाहिरात संस्थेनं तयार केलंय. याचा आम्हाला अभिमान वाटतो. ही संधी सरपोतदार कुटुंबानं आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.
---------------------------------------------
सरपोतदार आणि  'पूना गेस्ट हाऊस' ला मनापासून धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा...! 

Friday, 5 September 2025

वैचारिक संघर्ष आणि प्रादेशिक अस्मिता...!


"स्वातंत्र्यानंतर देशावर उत्तरेकडच्या नेतृत्वाचा वरचष्मा राहिलेलाय. प्रधानमंत्री उत्तरेकडचे तर राजकीय समतोल साधण्यासाठी दक्षिणेकडचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती नेमण्याचा प्रघात होता. मात्र राजकीय खेळीसाठी तो खंडित झाला. परंपरेऐवजी निष्ठा आणि विवेकाऐवजी उपयुक्ततेला प्राधान्य दिलं जाऊ लागलं. त्यानंतर जात, जमात, मतदारसंघ हे निवडीचे निकष ठरले. राजसत्ता संसदेकडे संवादाचं व्यासपीठ म्हणून न पाहता कायदे संमत करून घेण्याची जागा म्हणून पाहू लागल्यानंतर या पदाला धोरणात्मक महत्त्व प्राप्त झालं. त्यातून संघर्ष निर्माण झाला. जयदीप धनखड यांच्या गच्छंतीनंतर होणाऱ्या निवडणुकीत वैचारिक संघर्ष अन् प्रादेशिक अस्मिता उभी ठाकलीय. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचा अध्यक्ष संविधानाचा, संयमाचा रक्षक की राजसत्तेला हवं ते करून देणारा हे आता ठरणारंय! 'क्रॉस व्होटिंग' ची भीती राजसत्तेला असल्यानं दक्षता घेतली जातेय!"
---------------------------------------------
उपराष्ट्रपतीपदी बसलेल्या व्यक्तीनं राजकारण करू नये. राज्यसभेतला समतोल साधावा असा संकेत असतो. पण मूळचे भाजपेयी नसलेल्या जयदीप धनखड यांनी अध्यक्षपदावरून राजकारण करायला लागल्यानंतर राजसत्ता धोक्यात येतेय असं दिसताच त्यांचा राजीनामा घेतला गेला. उचलबांगडी केली गेली. धनखड यांचा स्वभावही बेधडक! ‘कायदेमंडळ हेच सर्वोच्च असून, न्यायमंडळानं आपल्या मर्यादा ओलांडू नयेत...!’, असं सुनावण्याला त्यांनी मागं-पुढं पाहिलं नाही; परंतु हाच बेधडकपणा त्यांना भोवला. त्यांच्या रिक्त जागेवर ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होतेय. या निवडणुकीतून भारतीय राजकारणाचा लंबक उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा ठरतोय!
कायम निवडणुकजीवी असलेली भाजप सत्तेसाठी सतत खेळी करते. ज्या राज्यात निवडणुका असतील तिथला उमेदवार देण्याला त्यांचा प्राधान्य असतं. मग राजकीय, जातीय, भाषिक, प्रादेशिक समीकरणं तिथं मांडली जातात. त्यात यशही मिळताना दिसतं. जेव्हा ओरिसातल्या विधानसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली. ती त्यांची खेळी यशस्वी ठरली. ओरिसा ताब्यात आलं. नेहमी भाजपच्या पाठीशी राहिलेल्या बिजू जनता दलाला इथं हरवलं. आता तामिळनाडूमध्ये घडण्याची शक्यता दिसते. त्यासाठीच महाराष्ट्राचे राज्यपाल मूळचे तामिळनाडूचे चंद्रपुरम पोनुसामी तथा सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी भाजपनं उभं केलंय. सत्ताधारी एनडीएकडं पुरेसं संख्याबळ आहे. त्यामुळं उपराष्ट्रपतींची निवड ही केवळ औपचारिकता होती. पण विरोधकांच्या इंडिया आघाडीनं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना रिंगणात उतरवून उत्कंठा निर्माण केलीय. राधाकृष्णन यांना उमेदवारी देऊन भाजपनं दक्षिण दिग्विजयाच्या दिशेनं पाऊल टाकल्याचं मानलं जातंय. जन्मानं तमिळ असलेल्या राधाकृष्णन मुळात संघाचे स्वयंसेवक. १९९८ सालच्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूतून विजयी झालेले एकमेव भाजप खासदार होते. कोईम्बतूरमधून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर लागोपाठ तीनवेळा त्यांचा याच मतदारसंघात पराभव झाला. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ पक्षकार्याला झोकून दिलं. पक्षनिष्ठेची पावती म्हणून त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. स्पष्टवक्ता अन् स्वच्छ प्रतिमा असलेला नेता, अशी प्रतिमा असलेल्या राधाकृष्णन यांनी झारखंडमधल्या आदिवासी आणि वंचित समुदायांचं जीवनमान उंचावण्यासाठी खूप कष्ट घेतले. मात्र, झारखंडच्या राजभवनातला त्यांचा काळ कसोटीचा ठरला. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारशी त्यांचा संघर्ष झाला. राज्यपालपदी नियुक्त झाल्यानंतरच्या सत्कार सोहळ्यात त्यांनी स्वतःला ‘स्वाभिमानी आरएसएस केडर’ म्हटलं. त्यामुळं त्यांच्यावर तेव्हा बरीच टीका झाली; परंतु  आता या उमेदवारीसाठी ‘कट्टर संघनिष्ठ’ हीच जमेची बाजू ठरलीय, हे नाकारता येत नाही. 
इंडिया आघाडीचे उमेदवार न्या. रेड्डी यांनी आपल्या सोळा वर्षाच्या सर्वोच्च न्यायालयातल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे खटले हाताळलेत. नागरी हक्कांचे पुरस्कर्ते म्हणून ते ओळखले जातात. गरीब आणि वंचितांच्या संवैधानिक हक्कासाठी त्यांचं योगदान महत्त्वाचं मानलं जातं. रेड्डी यांच्या उमेदवारीमुळं तेलुगू देसम, वायएसआर काँग्रेस, बीआरएसपुढं तेलगू अस्मितेचा पेच निर्माण झालाय. या पक्षांकडे लोकसभा आणि राज्यसभा मिळून ३४ खासदार आहेत. सत्ताधारी एनडीएकडं बहुमतासाठीच्या  संख्येपेक्षा ३१ मते अधिक आहेत. शिवाय, दोन्ही आघाड्यांत नसलेल्या, तसेच नामनिर्देशित सदस्यांची संख्या लक्षात घेता, राधाकृष्णन यांची निवड निश्चित मानली जातेय; परंतु या निमित्तानं दक्षिणेतल्या राजकीय पक्षांची कोंडी करण्याची संधी विरोधकांनी साधलीय. १९६९ साली काँग्रेसफुटीनंतर झालेली राष्ट्रपतिपदाची निवडणुक आठवतेय. तेव्हा सिंडिकेट काँग्रेसचे नीलम संजीव रेड्डी विरुद्ध इंदिरा काँग्रेसचे व्ही. व्ही. गिरी या दक्षिण भारतातल्या उमेदवारांमध्ये अशीच चुरशीची लढत झाली होती. कोण जिंकणार, हे खात्रीपूर्वक सांगता येत नव्हतं. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी खासदारांना तुम्ही आपल्या ‘अंतरात्म्याचा आवाज ऐका....!' असं आवाहन केलं होतं. त्याला  प्रतिसाद मिळाला आणि व्ही.व्ही. गिरी विजयी झाले! यावेळीही अशीच तमिळ आणि तेलुगू अस्मितेच्या मुद्द्यावरून दोन्हीकडून आवाहन करत एकमेकांना भाषिक आणि प्रादेशिक पेचात पकडण्याचं प्रयत्न होतील. दक्षिणेत आता ‘तेलुगू की तामिळ’ असा राजकीय पेच निर्माण होईल. आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेल्या न्या. रेड्डी यांच्या माध्यमातून तेलुगू देसम, वायएसआर काँग्रेस आणि तेलंगणातली बीआरएस या प्रादेशिक पक्षांना भाषिक, प्रादेशिक अस्मितेच्या खिंडीत गाठण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडीतल्या स्टॅलिन यांना तमिळ, द्रविडी अभिमानाबद्दल निष्ठा सिद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलं जातंय. 
राजसत्तेला या निवडणुकीत क्रॉस व्हॉटिंग होण्याची  भीती आहे. त्यामुळं पक्षीय स्तरावरून दक्षता  घेतली जातेय. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभा खासदार मतदान करतात. ते गुप्त पद्धतीनं होत असतं. यापूर्वीही क्रॉस व्होटिंग झालेलं आहे. नुकतंच 'कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया' या लोकसभा, राज्यसभा खासदारांचा जो क्लब आहे. याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अमित शहांचे उमेदवार संजय बालियन यांचा भाजपचे बंडखोर राजीव प्रताप रूढी यांनी पराभव केला. काँग्रेसनं त्यांना पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झालं. भाजपच्या काही खासदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं होतं. इथं मतदान करणारेच खासदार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदार असल्यानं भाजपमध्ये अस्वस्थता पसरलीय. मोदी शहा यांच्या वर्चस्वाला इथं आव्हान दिलं गेलं होतं. गेली तीन तीन टर्म निवडून येऊनही पदरात काही पडलेलं नाही याची खंत अनेकांना आहे. त्यातूनच हे क्रॉस व्होटिंग झालं. अशी चर्चा होती. पण राजसत्तेनं साऱ्या मंत्र्यांना हाती धरून या प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली असली तरी अघटीत घडण्याची शक्यता वर्तवली जातेय. यामुळं निवडणुकीत रंगत वाढलीय. लोकसभेत ५४३ मतं आहेत त्यापैकी एनडीएकडं २९३ मतं आहेत. राज्यसभेत २४५ मतं आहेत त्यापैकी एनडीएकडं १३२ मतं आहेत. एकूण ७८८ मतं आहेत त्यापैकी ४२५ मतं एनडीएकडं आहेत. विरोधकांकडे ३६३ मतं आहेत. कागदोपत्री पाहिलं तर एनडीएकडं ६२ मतं अधिक आहेत. तरीही जर 'कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया' च्या निवडणुकीत जसं क्रॉस व्होटिंग झालं तर मात्र वेगळा निकाल लागू शकतो. जरी इथं भाजपच्या राधाकृष्णन यांचा विजय कमी मतांनी झाला तरी आगामी राजकारणासाठी राजसत्तेसाठी तो एक धोक्याची सूचना ठरू शकते. त्यामुळं क्रॉस व्होटिंग होऊ नये यासाठी पक्षपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. क्रॉस व्होटिंग व्हायचंच असेल तर ते विरोधकांमध्ये व्हावं असा प्रयत्न राजसत्तेकडून सुरू आहे. त्यासाठी राजनाथसिंह विविध पक्षांच्या नेत्यांना फोन करून विनंती करताहेत. बिहारच्या विधानसभा निवडणूक व्होट चोरीच्या मुद्द्यावरून गाजत असतानाच उपराष्ट्रपती निवडणुकीत जर क्रॉस व्होटिंग झालं तर मात्र मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहील !
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी दक्षिण विरुद्ध दक्षिण असा सामना रंगतोय. भाजपनं राधाकृष्णन यांचं तमिळ कार्ड बाहेर काढलंय. तमिळ अस्मितेसाठी सतत लढा देणाऱ्या द्रविड मुनेत्र कळघमची गोची झालीय. इंडिया आघाडीनं बी. सुदर्शन रेड्डी यांचं तेलुगू कार्ड वापरत अस्मितेचं राजकारण करणाऱ्या चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देशमपासून भारत राष्ट्रीय समितीच्या के. चंद्रशेखर राव अन् वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डीपर्यंत अनेकांची चिंता वाढवलीय. सत्ताधारी आणि विरोधकांनी दक्षिण भारतातले उमेदवार देत एकमेकांच्या मित्रपक्षांची गोची केलीय. प्रदिर्घ कालावधीनंतर तमिळ व्यक्तीला उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळाल्यानं राधाकृष्णन यांना मतदान करण्यासाठी द्रमुकवर अप्रत्यक्ष दबाव वाढलाय. द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांची कोंडी झालीय. तमिळ अस्मिता हाच त्यांच्या राजकारणाचा पाया आहे. तमिळनाडूतले लोकसभेचे सगळेच्या सगळे म्हणजेच ३९ खासदार इंडिया आघाडीचे यातही २२ खासदार हे द्रमुकचे आहेत. याशिवाय राज्यसभेत द्रमुकचे १० खासदार आहेत. विरोधकांच्या तेलुगू कार्डनं देखील आंध्र प्रदेश, तेलंगणातल्या खासदारांची गोची झालीय. आंध्र प्रदेशात आणि केंद्रात नायडू हे एनडीएचे भाग आहेत. त्यांचे केंद्रात मंत्री आहेत. जगनमोहन रेड्डी यांनी आजवर अनेक मुद्द्यांवर मोदी सरकारला साथ दिलेलीय. इंडिया आघाडीनं तेलुगू उमेदवार दिल्यानं दोघांची कोंडी झालीय. तेलुगू देशमचे लोकसभेत १६, तर राज्यसभेत २ खासदार आहेत. वायएसआर काँग्रेसचे लोकसभेत ४, तर राज्यसभेत ७ खासदार आहेत. दोन्ही पक्षांच्या खासदारांचा एकूण आकडा २९ च्या घरात जातो. त्यामुळं या पक्षांची भूमिका इथं महत्त्वाची असेल. तमिळनाडूत एनडीएचा एकही खासदार नसताना भाजपनं तिथल्या राधाकृष्णन यांना संधी दिलीय. तर आंध्र प्रदेशात लोकसभेत इंडिया आघाडीचा एकही खासदार नसताना त्यांनी  सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिलीय. 
उपराष्ट्रपतिपद एकेकाळी हे शांत, विवेकी विचाराचं स्थान होतं; आता मात्र तिथं वादग्रस्त राजकारण होतंय. जिथं गांभीर्य अपेक्षित होतं, तिथं आता वैचारिक प्रणालीमधल्या भांडणांचा तो रंगमंच झालाय. जातीपाती, प्रादेशिक हिशेबांच्या कटकटी इथं होताहेत. तत्त्वशील, मुत्सद्दी, घटनेचे संरक्षक म्हणून बघितल्या जाणाऱ्या या स्थानाला आता क्षुद्र मारामाऱ्या, निवडणुकीतली साठमारी अन् वैचारिक अतिरेकीपणाची लागण झालेलीय. एनडीएनं मुद्दाम गाजावाजा करत सी.पी. राधाकृष्णन या ज्येष्ठ संघ स्वयंसेवकाला आणि पक्क्या तामिळीला उमेदवारी दिलीय. त्यामागे द्रविडियन वर्चस्वाचा भेद करून दक्षिणेकडे एककेंद्री राष्ट्रवादाचा विचार नेण्याचं राजसत्तेचं धोरण दिसतंय. याउलट इंडिया आघाडीनं न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी या कायदेपंडितांना उमेदवारी दिली. रेड्डी जन्मानं उच्चकुलीन असले, तरी उदारमतवादी आहेत. नागरी स्वातंत्र्य, घटनात्मक नैतिकता आणि न्यायाची बूज राखण्याचा पुरस्कार त्यांनी न्यायदान करत असताना केलेलाय. संघ परिवाराच्या मते रेड्डी न्यायिक साहसवादाचं उदाहरण असून, कायद्याच्या नावानं सुरक्षितता धोक्यात घालणारे, न्यायदानातून क्रांती घडवता येईल, असं  मानणारे आहेत. हे दोन्ही उमेदवार हे आपापल्या दोन वेगवेगळ्या वैचारिक संघर्षाचे प्रतिनिधी ठरतात. थोडक्यात अभिजनांचा राष्ट्रवाद आणि बहुमुखी उदारमतवाद, अशा दोन सांस्कृतिक टोकांमधला हा संघर्ष असेल.
उपराष्ट्रपतिपद हे शोभेचे पद आहे असं समजलं जातं तरीदेखील, त्यासाठी राजकारण्यांमध्ये का एवढं वातावरण तापलंय? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. उपराष्ट्रपती हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेचे अध्यक्ष असतात, हे त्याचे उत्तर! घटनात्मक संयम आणि बेलगाम बहुमतशाही यांच्यातला तो संस्थात्मक संवादक दुवा समजला जातो. लोकसभा ही हवे तसे कायदे करण्याची जागा झालेली असताना, राज्यसभा हा विरोधाचा शेवटचा आधार ठरतो. उपराष्ट्रपती जर निष्क्रिय असतील, तर असे कायदे करणाऱ्यांचं फावतं. तत्त्वनिष्ठ असेल, तर हुकूमशहांची मुजोरी ते मोडून काढू शकतात. याचाच अर्थ हे पद शोभेचं न राहता ते परिणामकारक, धोरणात्मक अन् महत्त्वाचं ठरतं. राजसत्तेनं गेल्या काही दशकांत मतैक्यानं उपराष्ट्रपतींची निवड करून त्या पदाची प्रतिष्ठा राखली होती. त्यात सर्वपल्ली राधाकृष्ण, झाकीर हुसेन, गोपाल स्वरूप पाठक हे सारे बिनविरोध निवडून आले होते. विद्वत्ता आणि स्थैर्याचं ते प्रतिक ठरलं होतं. इंदिरा गांधींनी या पदाचा साधन म्हणून वापर करायला सुरुवात केली. परंपरेऐवजी निष्ठा आणि विवेकाऐवजी उपयुक्ततेला प्राधान्य दिलं जाऊ लागलं. त्यानंतर जात, जमात, मतदारसंघ हे निवडीचे निकष ठरले. सत्तारूढ पक्ष संसदेकडं संवादाचं व्यासपीठ म्हणून न पाहता कायदे संमत करून घेण्याची जागा म्हणून पाहू लागल्यानंतर या पदाला धोरणात्मक महत्त्व प्राप्त झालं. यापूर्वी अनेक सरकारांनी पाशवी बहुमताच्या जोरावर लोकसभेत विधेयकं मंजूर करून घेतलीत, तेव्हा लोकशाहीच्या रक्षणाचा शेवटचा आधार ही राज्यसभा ठरली होती. अशा परिस्थितीत वरिष्ठ सभागृहावरचं उपराष्ट्रपतीचे नियंत्रण हे दबाव टाकण्याचं साधन ठरलं गेलं. त्यामुळं त्या पदावर कोण असेल याला महत्त्व आलं. इथंच राजसत्तेचा इरादा स्पष्ट होतो. तत्वनिष्ठ व्यक्ती ही इथल्या त्यांच्या मनसुब्याला स्पीडब्रेकर ठरेल, त्यामुळं ती सहप्रवासी असेल, तर अधिक बरं असा विचार करून भाजपनं संघाचा स्वयंसेवक उमेदवार म्हणून दिलाय. संघाचा निष्ठावान कार्यकर्ता विरुद्ध एक कायदेपंडित, असा हा सामना आहे. यानिमित्तानं दक्षिण भारत आता वेगळ्या वळणावर उभा ठाकलाय. भाजपचा माणूस तमिळ अस्मिता स्वीकारेल का? केंद्राच्या हुकूमतीपुढं तेलुगू निष्ठा, अस्मिता नमतं घेईल का? आजतरी संसद आणि मित्रपक्षात भाजपची बाजू सरस आहे. कुंपणावरची मंडळीसुद्धा यावेळी सरळ होतील, परंतु जो निकाल लागेल त्यातून आगामी राजकारणाची दिशा असं खूप काही सूचित होईल. ही निवडणूक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विरुद्ध पंडित नेहरूंचा विचार, तामिळ विरुद्ध तेलुगू आणि स्टालिन विरुद्ध संघ अशीच होण्याची शक्यता आहे. एकजिनसी विचार, आणि सुधारक, नियंत्रण विरुद्ध विवेक यांच्यातल्या संघर्षात उपराष्ट्रपतीपद सापडलंय. मात्र इंडिया आघाडी सुदर्शन रेड्डी यांच्या प्रादेशिक अस्मितेवर आणि प्रतिमेवर विसंबून आहे. एनडीएत त्यामुळं फूट पडेल, असं त्यांना वाटतं. याउलट जुन्या विचारांचा तामिळी संघ स्वयंसेवक विरोधकांना चालणार नाही आणि त्यातून धर्मनिरपेक्ष तंबूत फूट पडेल, असा एनडीएचा कयास आहे. ही निवडणूक भारतातल्या राजकीय संस्कृतीवरही एक कौल देणारा ठरणारा आहे. यापूर्वी हमीद अन्सारी आणि जगदीप धनखड यांच्यासारखे पक्षपाती उपराष्ट्रपती विरोधी सदस्यांशी वारंवार हुज्जत घालत असत. हे पद आता तटस्थ राहिलेलं नाही, असा समज तयार झालाय. भारतीय लोकशाही ही आता उपराष्ट्रपती राजकीय दलदलीत न फसणारा जातीपातींच्या पुढं पाहणारा मागतेय. संसदेच्या वरिष्ठ  सभागृहाचा अध्यक्ष संयमाचा रक्षक असणार की राजसत्तेला हवं ते करून देणारा असेल हे आता ठरणारंय. खासदार मतदान करून केवळ उपराष्ट्रपती निवडणार नाहीत, तर उजव्या आणि डाव्या या दोन वैचारिक दृष्टिकोणातून एकाची निवड करतील. अजस्त्र पाशवी बहुमतशाही, की  गाजावाजा करून प्राण फुंकलेली बहुलवादी शक्यता!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Monday, 18 August 2025

राजसत्तेची कोंडी...!

"देशात 'मतचोरी'च्या आरोपामुळं वातावरण ढवळून निघालंय. अनेक बाबी उघड झाल्यात. हरियाणातला ईव्हीएम घोटाळा सर्वोच्च न्यायालयात उघड झालाय. निवडणूक आयोगाचं वस्त्रहरण होतंय. ते गप्प आहेत 'निवडणूकजीवी' राजसत्तेला त्याची फिकीर नाही. ते वर्तमान, भविष्यकाळ याऐवजी इतिहासात रमताना दिसतात. त्याचं प्रत्येक भाषण हेच दर्शवतं. आरक्षण, संविधान, जातिनिहाय जनगणना आता मताधिकार यातून राजसत्तेपुढं आव्हान उभं ठाकलंय. आजवर इडी, सीबीआय, इन्कमटॅक्स, सेबी यांना राजसत्तेनं 'शिखंडी' बनवलं होतं. राजकीय महायुद्धात त्यांचं सारथ्य होतं. तरीही राजसत्ता हवालदिल झालीय. बिहार निवडणुकीत राजसत्तेचं कस लागणार आहे. याच बिहारमध्ये राहुल गांधींची 'व्होटर अधिकार यात्रा' आजपासून सुरू होतेय!"
-----------------------------------------------
महाभारतातली जुनी कथा आहे. जेव्हा अर्जुनाला श्रीकृष्णानं सांगितलं की, युद्धात तू भीष्म पितामह यांना हरवू शकत नाहीस. पण त्यांना पराभूत करण्याचा एक उपाय आहे. तू तुझ्या रथाचं सारथ्य हे शिखंडीकडे सोपव. त्याच्या आडून तू जेव्हा भीष्म पितामह यांच्यावर शरसंधान करशील तेव्हा तुझ्यावर आक्रमण होणार नाही. कारण भीष्म पितामह यांनी प्रतिज्ञा केलीय की, मी शिखंडीवर तीर, बाण मारणार नाही....! अशाचप्रकारे राजसत्तेनं आपल्या कुकर्माला लपवण्यासाठी संवैधानिक संस्थांना कायमच पुढं केलंय. ते कुणाकुणाला पुढं करतात हे आपण पाहिलंच आहे. कधी इडी, कधी सीबीआय, कधी इन्कमटॅक्स, कधी सेबी तर कधी निवडणूक आयोग यांना पुढं केलंय. शिवाय लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती यांचाही वापर राजसत्तेनं संसदेत विरोधकांचे हल्ले होऊ नयेत, यासाठी केलाय. गेल्या आठवड्यात लोकसभेतले विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी बंगळुरूत पत्रकार परिषदेत घेऊन निवडणूक आयोगाच्या 'मतचोरी'चा प्रकार  पुराव्यासह उघडकीला आणला. राजकारणातल्या या महाभारत युद्धात राजसत्तेनं निवडणूक आयोगाला शिखंडी बनवून विरोधकांसमोर उभं केलंय. आजवर त्या आड राहून राजसत्तेनं मग कोणतीही निवडणुक असो प्रत्येकवेळी लोकांची मतं मिळवलीत, चोरलीत. राजसत्तेचा हा मतं लुटण्याचा, मतदार यादीत गडबड घोटाळा करण्याचा, चुकीची नावं घुसडवण्याचा, एकाच ठिकाणी शेकडो नावं घालणं, मेलेल्यांना जिवंत करणं, जिवंत असलेल्यांना मृत दाखवणं असे प्रकार राजसत्तेनं कधीपासून सुरू केलंय हे पाहिलं तर ते खूप दूरवर जाईल. पण एक मात्र निश्चित की, हे प्रकरण खूप गंभीर बाब आहे. त्याची दखल घ्यायलाच हवीय.
राहुल यांनी बंगळूर मधल्या चाळीतल्या एका खोलीत ८० मतदार नोंदवल्याचं दाखवून दिलं.या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी काही प्रसिद्धी माध्यमांनी बंगळुरू गाठलं. तिथं जाऊन पाहणी आणि चौकशी केली. तेव्हा त्यात तथ्य असल्याचं त्यांना आढळलं. तेवढ्यावरच हे प्रकरण शांत होत नाही, तर या ८० मतदारांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महादेवपुरा विधानसभा मतदारसंघ मधल्या बूथ क्रमांक ३७० मध्ये मतदान सुद्धा केलेलं आढळलं. एकाच मतदारानं ८० मतं टाकलीत असं समजलं तर एका मतासाठी किमान एक मिनिटाचा अवधी लागतो. म्हणजे ८० मतांसाठी किमान ८० मिनिटं तरी लागली असतील. अशावेळी मतदान खोलीत राजकीय पक्षांचे जे पोलिंग एजंट ते काय करत होते? ही ८० मतं एकाच माणसांनी दिलीत की, वेगवेगळ्या ८० लोकांनी दिलीत, हे पाहण्यासाठी त्या मतदान खोलीत जो सीसीटीव्ही होता त्याचं फुटेज नियम १७ सी नुसार विरोधीपक्षानं आयोगाकडं मागितलं. मात्र त्यांनी दिलं नाही. विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. खरंतर, सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग अशाचसाठी असतं की, तिथं गैरप्रकार घडले तर ते लगेचच सापडावेत! मात्र ते फुटेज आयोगानं दिलं नाही. दुसरं, मतदानयंत्रात आपण कुणाला मत दिलंय हे समजू शकतं. त्याला एक 'डी कोडींग'चं इन्स्ट्रुमेंट असतं त्यातून हे समजून येतं की, कुणी कुणाला आणि कधी मत दिलंय. त्यावरून समजेल की, या ८० मतदारांनी इथं कुणी कुणाला कधी मत दिलंय. पण निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही अन् मतदानयंत्राचा तपशील द्यायला नकार दिला. बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की, निवडणूक आयोगानं नुकताच एक नवा नियम केलाय. ज्याला सर्वोच्च न्यायालयानंही संमती दिलीय. पूर्वी मतदारसंघातली कुणीही व्यक्ती इलेक्शन पीटिशन दाखल करू शकत होती. राजसत्तेच्या सांगण्यावरून आयोगानं मोठ्या हिकमतीनं, यात नियम बदल केला, केवळ पराभूत दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाचा उमेदवारच इलेक्शन पीटिशन दाखल करू शकेल, इतर कुणीही नाही. जो अधिकार सामान्य मतदाराला होता तो राजसत्तेनं, आयोगानं अन् न्यायालयानं सीमित करून टाकला. लोकशाही अन् संविधानाला हा एकप्रकारचा धक्का आहे.
राहुल यांनी आणखी एक प्रकरण दाखवलंय. ते प्रधानमंत्र्यांच्या वाराणशी मतदारसंघातलं आहे. इथं रामकमलदास नावाची एक व्यक्ती आहे. त्याच्या ४२ मुलं मतदार आहेत. सर्वात लहान २९ तर मोठा ४८ वर्षाचा. वयात फरक १९ वर्षाचा आहे. या काळात त्यानं ४२ मुलं जन्माला घातलीत. एका वर्षात तर त्यानं तब्बल ११ मुलं जन्माला घातलीत. कदाचित त्याला ११ बायका असतील. त्याला मुलगेच कसे झाले, एकही मुलगी का नाही? अशा थोराड मुलांची लग्नसुद्धा झालेली नाहीत, अविवाहित आहेत. कारण, त्यांच्या बायकाही इथं दिसत नाहीत. असं कोणतं घर असेल की, जिथं आई, वडील अन् ४२ मुलं राहत असतील?  हे कसं समजेल की, सारी मुलं ही रामकमलदास याचीच आहेत. याची चौकशी तर झालीच पाहिजे. आणखी एक, बंगळूरच्या एक हॉटेलमध्ये ५३ मतदार आहेत. एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीनं तिथं जाऊन चौकशी केली. तिथल्या मॅनेजरला ती नावं दाखवली तेव्हा त्यानं सांगितलं की, अशा नावाच्या कोणत्याच व्यक्ती इथं नाहीत. जे आमचे कामगार आहेत ते त्यांची नावं त्यांच्या घराच्या ठिकाणी नोंदवलेली आहेत. 
जे असा घोटाळा करतात ना ते विसरून जातात की, हा घोटाळा कधी ना कधी पकडला जाणार आहे. राजसत्तेतले लोक जेव्हा कधी अत्याचार, दुराचार, व्यभिचार, भ्रष्टाचार करतात तेव्हा त्यांना माहीत असतं की, आपला बॉस वर बसलाय. 'सैय्या भये कोतवाल, तो काहे का डर!' राजसत्तेच्या खिशात निवडणूक आयोग आहे मग आमचं कोण काय वाकडं करणार? म्हणून राजसत्तेतले लोक संधी मिळेल तेव्हा नंगानाच घालताहेत. जेव्हा कधी पकडले जातात तेव्हा नियमांची बढाई, भलाई सांगितली जाते. राहुल गांधींनी आयोगाला उघडं नागडं केलंय, पुरावे दिलेत तेव्हा आयोगानं त्यांना प्रतिज्ञापत्र द्यायला सांगितलं. भारतीय संविधान यांनी वाचलं तर लक्षांत येईल की, तक्रार करणाऱ्याला कधीच प्रतिज्ञापत्र द्यावं लागत नाही. निवृत्त निवडणूक आयुक्त रावत यांनी ही बाब स्पष्ट केलीय. ही मंडळी संविधानाची, त्यांच्या प्रतिष्ठेची, गरिमाची उघडपणे हत्या अन् लोकशाहीला गाडण्याचं काम करताहेत. मानवी हक्कांवर बलात्कार करताहेत. तरीही म्हणतात आम्ही देशसेवा करतोय. ही मंडळी सुशिक्षित असूनही अडाणी आहेत. 
परवा स्वातंत्र्यदिन झालाय. स्वातंत्र्यासाठी जान कुर्बान होत होते, तुरुंगवास भोगला जात होता. राजसत्तेली मंडळी तेव्हा इंग्रजांसोबत होते. त्यांना स्वातंत्र्याची किंमत काय समजणार ते गुलामच आहेत. गुलामाला 'हीज मास्टर्स व्हाईस' असते. त्यांच्यासाठी स्वामीची भक्ती हेच सारं काही असतं. त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. इथं एक महत्वाची बाब आहे, जी 'मतचोरी'साठी कारणीभूत ठरलीय. त्याकडं कुणाचं लक्ष गेलेलं नाही. 'मतचोरी'चा प्रकार हा २०१९ मध्ये निश्चित केला गेला. २०१९ची निवडणूक पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झाली, तिथं ३५० किलो आरडीएक्स कुठून आलं हे आजपर्यंत सापडलेलं नाही. त्यावेळी शहीद जवानांच्या नावावर मतं मागितली गेली. सत्ता मिळाली पण तेव्हाच त्यांच्या लक्षांत आलं होतं की, आपलं पुढच्या काळात काही खरं नाही. तेव्हा त्यांनी २०२१ मध्ये होणारी जनगणना करायची नाही असंच ठरवलं. ती केली तर सारी पोलखोल होईल. देशातली पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५२ साली झाली, त्यापूर्वी १९५१मध्ये जनगणना झाली. त्यातून पहिली मतदार यादी तयार झाली. त्यानंतर या दोन्ही बाबी समांतर सुरू होत्या. आज १४५ कोटी लोकसंख्या आहे. ८२ कोटी मतदार त्यात १८ वर्षांवरील अधिक आहेत. जनगणना थांबली. त्यामुळं किती मतदार आहेत. जिवंत किती, मृत किती, तरुण, वृद्ध, महिला, पुरुष किती आहेत, नाहीत ते समजू शकलेलं नाही. मग राजसत्तेनं जाणूनबुजून जनगणनेला तिलांजली दिली. तेव्हा कोविडचं कारण दिलं गेलं. २०२१ ची जनगणना झाली नसल्यानं आकडे उपलब्ध नाहीत. आहेत त्याला कोणताच आधार नाही. बिहारमध्ये आयोगानं 'स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन एसआयआर' च्या माध्यमातून मतदारांचं सर्व्हेक्षण केलंय. त्यातून ६५ लाख मतदार वगळलेत. मतदार सर्व्हेक्षणात गडबड घोटाळा झाल्याचं निदर्शनाला आणलं. आयोगानं नागरिकता सिद्ध करण्यासाठी आधार कार्ड, मतदार कार्ड, रेशनिंग कार्ड बेकायदा ठरवलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं ज्यांची नावं वगळलीत, त्यांची यादी १९ ऑगस्टपर्यंत आयोगाकडं मागितलीय. शिवाय आधारकार्ड अधिकृत ठरवलंय त्यामुळं आयोगाची त्रेधातिरपीट उडालीय. बिहारमध्ये ७ कोटी ८९ लाख मतदार होते त्यातून ६५ लाख मतदार कमी करण्यात आलीत. अशा हेराफेरीतलं आणखी एक प्रकरण न्यायालयात उघड झालंय. हरियाणात पंचायत समिती निवडणुकीत पराभूत झालेला उमेदवार हा न्यायालयात ईव्हीएम मशिन्स मधल्या मतांची मोजणी केल्यानंतर विजयी ठरलाय. म्हणजे ही ईव्हीएम मशिन्स आणि त्यातून लागलेले निकाल ही तकलादू आहेत हे दिसून आलंय. त्यामुळं ईव्हीएम मशिन विरोधात आंदोलन करणाऱ्या मंडळींना या निकालातून ऊर्जा मिळणार आहे. पण निवडणूक आयोगाचे तीनही आयुक्त यावर गप्प आहेत. त्यांची लबाडी पकडली गेलीय. त्यामुळं त्यांची, त्यांच्या कार्यालयाची, घरची सुरक्षा वाढवलीय. आयोग इतकं घाबरलं की, त्यांनी त्यांची वेबसाईटच बंद करून टाकलीय. महाराष्ट्र आणि हरियाणा मधल्या मतदार याद्या देण्याचं न्यायालयात सांगूनही अद्याप याद्या द्यायला टाळाटाळ केली जातेय. राहुल यांच्या पत्रकार परिषदेची दखल सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गवई यांनी घेऊन आयोगाला जाब विचारलाय. माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार देश सोडून माल्टा देशात पळून गेलेत, त्यांनी तिथलं नागरिकत्व घेतल्याची चर्चा आहे. राजसत्तेच्या इशाऱ्यावर 'मत चोरी' करून राजसत्तेला यश मिळवून देणं हे उघड झाल्यावर देशातून पळून जाणं हे अगदी त्याच धर्तीवर आहे ज्याप्रमाणे अनेक लोक बँका लुटून परदेशात पळून गेले. निवडणूक आयोग, सरकार आणि सर्वोच्च न्यायालय भारतातल्या धीरगंभीर जनतेच्या संयमाची परीक्षा घेताहेत. त्यांची संवैधानिक जबाबदारी गायब झालीय, मतदान प्रक्रियेतली हेराफेरी शिगेला पोहोचलीय. मतं आणि निवडणुका चोरण्याचे खूप गंभीर आरोप आहेत. आज राजसत्ता उपभोगणाऱ्यांनी वा त्यांच्या जुन्या नेत्यांचा कधीच स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता. उलट त्यांनी इंग्रजांनाच मदत करून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना विरोध केला, त्यांच्या लढ्याला सक्रिय विरोध केलाय, हा इतिहास आहे. आज अशांचीच चलती आहे. त्यामुळं त्यांना त्याची किंमत कळणार नाही.
संविधान, अधिकार, आरक्षण हे मुद्दे समोर येताहेत. राहुल गांधी भारत यात्रेनंतर बिहारमध्ये 'व्होट अधिकार यात्रा' आजपासून काढताहेत. बिहारमध्ये आजवर भाजपचा मुख्यमंत्री बनलेला नाही. जेव्हा कधी लोकशाही वाचविण्यासाठीची लढाई उभी ठाकली, स्वातंत्र्याचा लढा निर्णायक वळणावर आला, सत्तेच्याविरोधात संघर्ष राजनैतिक शंखनाद झाला तेव्हा बिहार सर्वांच्या पुढं होता. मग १९४२ ची ऑगस्ट क्रांती असो, १९७४- ७५ चे जयप्रकाश आंदोलन असो, १९८८- ८९ चे बोफोर्स आंदोलन असो, २०१५ मध्ये 'अच्छे दिन आने वाले हैं' ही घोषणा देणाऱ्या मोदींचा भारतभर प्रतिमा निर्माण करणारी घोषणा असो, पाटण्यातलं गांधी मैदान आणि बिहारच्या जनतेची भूमिका नाकारता येत नाही. बिहारनं आपली राजनैतिक क्षमता आणि परिपक्वतेचा परिचय प्रत्येकवेळी दिलाय. भाजपची सत्ता इथं येणार असं वातावरण असताना अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीनं आणि राहुलच्या या भूमिकेनं त्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. आज भाजपची प्रतिमा आहे तीच १९९० मध्ये लालू यादव यांची होती. तिनं लालूंना सत्तेपर्यंत पोहोचवलं होतं. २००५, २०१० आणि २०२०मध्ये नितीशकुमारांची होती, त्यांना सत्तेवर बसवलं. पण १९९५ आणि २०१५ मध्ये तब्बल २० वर्षानंतर आपल्या ताकदीवर लढण्याचा प्रयत्न त्यांना पराभूत लागलं होतं. हीच भाजपची वस्तुस्थिती आहे. आज त्यात विषम स्थिती निर्माण करून गेलीय. २०१४ मध्ये मोदी प्रधानमंत्री बनले तेव्हा देशभर दुहेरी लढत होत होती, मात्र बिहारमध्ये त्रिकोणी लढत झाली. भाजप, लालू आणि नितीशकुमार. त्याचा फायदा भाजपला मिळाला. त्यानंतर लालू यादव आणि नितीशकुमार एकत्र आले. भाजपबाबत बिहारमध्ये अविश्वास होताच त्याचं प्रत्यंतर पुन्हा यावेळी आलं. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं आरक्षण विरोधातलं वक्तव्य कारणीभूत ठरलं. आरक्षणाचं सर्व्हेक्षण करण्याचं वक्तव्य आरक्षण रद्द करण्यापर्यंत पोहोचलं! कर्पूरी ठाकूर यांच्यापासून व्ही.पी.सिंग यांच्यापर्यंत मंडलच्या जागी कमंडल आणण्याचा प्रयत्नाचं अमृतमंथन घडलं त्यातून भाजपचं 'अमृत काळ' चं नरेटीव्ह ध्वस्त होताना दिसतंय. आरक्षणाचा विषय हा इथला संवेदनशील विषय आहे. जातिनिहाय जनगणना, एससी,एसटी कायदा यातून भाजपबाबत अविश्वास निर्माण झालाय. जातिनिहाय जनगणनाला भाजपचा विरोध होता. नंतर ते करायचं जाहीर केलं पण त्याला कालावधी जो सांगितलाय तोवर इथल्या निवडणुका होऊन जाताहेत. आता व्होट अधिकार यात्रा! 'स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन एसआयआर' मधून मतदारांची संख्या कमी करण्याचं षडयंत्र सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं तसं ते इथल्या गावागावात पोहचलं. लोकसभा निवडणूक दरम्यान भाजपचे काही नेते, प्रधानमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार अजित ओबेरॉय संविधान बदलून नवं संविधान आणण्याचं वक्तव्य केल्यानं इथंल्या अस्वस्थतेत जागृती झाली. त्याचे पडसाद उत्तर प्रदेशातही उमटले. तिथं अखिलेशना यश मिळालं. रामविलास पासवानांच्या निधनानंतर, मायावतींचा करिश्मा संपल्यावर इथल्या दलितांमध्ये जातीय अभिनिवेश भाजपच्या हिंदुत्ववादी घोरणात समाविष्ट होत होता, तेव्हा संविधान वाचविण्यासाठी दलितांना पुढं यावं लागलं. भाजपची ४०० पार ची घोषणा हवेत विरली. आता एसआयआर च्या माध्यमातून वंचितांचा मताधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होतोय, त्यांना दूर केलं जातंय असं दिसल्यानं ते अस्वस्थ झालेत. आरक्षण, संविधान, जातिनिहाय जनगणना आणि मताधिकार ह्या चारही बाबीं भाजपच्या सत्ताकाळातच का निर्माण झाल्या? यापूर्वी नेहरूंपासून मनमोहनसिंग यांच्या काळात हे मुद्दे उपस्थित झाले नाहीत. मग मोदी काळातच का निर्माण झाले? बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यांचे प्रश्न, महागाई हे मुद्दे आहेतच पण जेव्हा मताधिकाराचा मुद्दा येतो तेव्हा इथली जनता जागृत होते. इथले १९ टक्के दलित, १८ टक्के अल्पसंख्यांक तर १५ टक्के यादव म्हणजे ५२ टक्के लोक भाजप विरोधात जाण्याची शक्यता आहे. उरलेल्या ४२ टक्क्यात नितीशकुमार, सैनी, मांझी, कुशवाह, कम्युनिस्ट आहेत. १४-१५ टक्के भाजपचे आहेत. त्यात आता प्रशांत किशोर आहेत. गेली ३५ वर्षे सत्तेची वाट पाहिलेल्या भाजपची व्होटबँक विखुरताना दिसतेय. १९९० पासून २०२५ पर्यंत भाजपच्या कोअर टीमनं लालू यादव आणि नितीशकुमार यांच्यापासून बिहारला मुक्ती देण्यासाठी अन् भाजपची एकहाती सत्ता संपादन करण्याचे जे प्रयत्न केलेत ते यशस्वी झालेले नाहीत. भाजप बरोबरच नितीशकुमार आणि इतरांच्या मतांवर तेजस्वी यादवच्या साथीनं काँग्रेसनं लक्ष केंद्रित केलंय. पाहू या काय होतंय ते...!
हरीश केंची
९४२२३१०६०९

तरुणांचा 'आऊट क्राय' अन् सत्तांतर...!

"शेजारी राष्ट्रांना प्राधान्य देणारं 'नेबरहूड फर्स्ट’ धोरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शेजारी राष्ट्रात राजकी...