Saturday, 25 October 2025

लडाख आंदोलनामागचे वास्तव

"भारताच्या उत्तरेकडे वसलेला एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे स्वर्गाची अनुभूती म्हणजे लडाख. शांत, प्रसन्न, आल्हाददायक लडाख मात्र गेले काही दिवस तापलाय. लडाखची जनता आंदोलन करतेय. या 'आंदोलनरूपी तापमानवाढीमागील' खरी कारणे काय आहेत? नेमकी मेख काय आहे? हिमाच्छादित पर्वतरांगा, नितळ आणि शुचित अशादायिनी हिमनद्या, निलशार स्वच्छ दलाचे तलाव आणि शुष्क बर्फाळ वाळवंट म्हणजे लडाख. भारताच्या उत्तरेकडे वसलेला हा एक केंद्रशासित प्रदेश. अतिशीत गाठले लडाख गेल्या काही दिवस मात्र 'ताप' आहे. लडाखची जनता आंदोलन करतेय
सुरक्षेसह, राजकीयमोडींच्या, परराष्ट्रनीती, संवर्धनाच्या, आदिवासी जनजातींच्या सांस्कृतिक जतनाच्या भारताच्या विकासाच्या. मुळात लडाखचा हा विषय अलीकडचा नाही. काश्मीर संस्थानचे महाराजाचे संस्थानिक राजा हरीसिंग यांनी जेव्हा नमूद केलं होतं, तेव्हा जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही प्रदेश एकाच राज्याचे भाग बनले आणि त्यांना कलम ३७० चे संरक्षण. लडाख जनजीवन, परंपरा, संस्कृती, भाषा, विषयच तर रंगरूप जम्मू काश्मीर खोऱ्यातील लोकांचे फार निराळे आहेत. आपली एक वेगळी ओळख ओळखली जाते, असे लडाखच्या लोकांना वाटे. शिवाय त्यांना एक भावना कायमस्वरूपी आलीय, फक्त स्वत:ला केंद्रस्थानी ठेवून लढा दिलाच पाहिजे आणि लडाख क्षेत्र स्वतंत्र कुटुंब आहे. भारतीय जनता पार्टी २०१४ च्या घटनेच्या घटनानाम्यामध्ये लडाखला केंद्रशासित बनविण्याचा मुद्दा होता. ५ ऑगस्ट २०१९ ला जेव्हा जम्मू काश्मीर राज्याचे कलम ३७० रद्द स्वतंत्र जम्मू काश्मीर आणि लडाख यांना दोन केंद्रशासित प्रदेश बनवले. केंद्राच्या या निर्णयाचे लडाखच्या लोकांनी जोशात स्वागत केले होते. मात्र १ जुलै २०१९ ला जेव्हा अधिकृत रीतीने लडाख केंद्रशासित प्रदेश बनले तेव्हा लडाखला मुक्त केंद्रशासित प्रदेश बनले लडाखवासी नाराज झाले. मात्र वर्ष २०२३ पासून त्यांच्या स्थानिकांचे दोन स्वरूप बदलले आणि त्यांच्या चळवळीला वेग आला. अचानक या आंदोलनाला परत धार का आली? ते वर्षात असे काय, की या स्मारकांनी पुन्हा जोर धरला? या प्रश्नातच खरी मेख आहे.
 
सोनम वांगचूक यांनी आपण आंदोलनाचे स्वरूप उग्र करणार, असे वक्तव्य २०२३ मध्येच केले होते. ४ मार्च २०२४ रोजी अ‍ॅपेक्स बॉडी ऑफ लेह चे तीन सदस्य आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सचे तीन सदस्य अशा एकूण सहा सदस्यांनी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह दिल्लीमध्ये एक बैठक केली आणि त्यांच्यासमोर आपल्या मागण्या ठेवल्या. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा. तसे शक्य नसल्यास किमान लेह आणि कारगिल या दोन्ही जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या संसद जागा देण्यात याव्यात; लडाखला संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करावे आणि लडाख लोकसेवा आयोगाची स्थापना करून लडाखच्या युवकांना शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे, या मागण्या सदस्यांनी केल्या. या भूभागातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि स्थानिक जनजातींच्या सांस्कृतिक जतनासाठी आपण या मागण्या करीत आहोत, असे या आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या बैठकीमध्ये त्यांना अपेक्षित असा निर्णय होऊ शकला नाही आणि म्हणून ६ मार्च २०२४ पासून पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली लडाखच्या लोकांनी उपोषण चालू केले. आदिवासी जनजातींना स्वायत्तता आणि पर्यावरणाचे संरक्षण असे जे या प्रश्नाचे साधे सोपे रूप बनविले जात आहे तेवढा सरळ हा प्रश्न नाही. हे तर केवळ हिमनगाचे वर दिसणारे टोक आहे. या प्रश्नाची गुंतागुंत, क्लिष्टता आणि गांभीर्य सहज न दिसणारे व खोल रुजलेले आहे. हा संपूर्ण विषय जर साकल्याने जाणून घ्यायचा असेल तर लडाखवासीयांच्या मागण्यांबरोबरच या परिसराची भौगोलिक परिस्थिती, तेथील हवामान व जलवायू, सीमावर्ती सुरक्षेच्या दृष्टीने या भूमीचे महत्त्व आणि या संपूर्ण प्रश्नामागील चीनची भूमिका हे सर्व समजून घेणे अधिक आवश्यक आहे. वर जसे नमूद केले की, मागील वर्षापासून या मागणीने जोर का धरला ही मेख समजून घेण्यासाठी सर्वात आधी लडाखची थोडी भौगोलिक पार्श्वभूमी जाणून घेऊ. हिमालय आणि काराकोरम पर्वतरांगांच्या परिसरात पराहिमालयामध्ये स्थित असलेले लडाख हे एक शुष्क बर्फाळ पठार आणि शीत वाळवंट आहे. हा भूभाग पाकिस्तान, तिबेट आणि चीन या देशांच्या सीमेलगत असून सीमावर्ती सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि अतिमहत्त्वपूर्ण असा हा प्रदेश आहे. शुष्क पठार असले तरी हिमनद्यांचे स्रोत या परिसरात मुबलक आहेत. या गोड्या पाण्याच्या शुद्ध हिमनद्या म्हणजे जणू नैसर्गिक साधनसंपत्तीचा खजिना आहेत. लडाखला जोडलेले तिबेट हे आर्क्टिक आणि अंटार्क्टिकानंतरचे सर्वात मोठे जलस्रोत मानले जाते. याला थर्ड पोल आणि ‘वॉटर टॉवर ऑफ द वर्ल्ड’ असेही म्हणतात. तिबेटमध्ये अनेक नद्यांचे स्रोत आहेत, त्यापैकी काही लाइन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोलच्या आत लडाखमध्ये आहेत.
 
गिल्गिट बाल्टिस्तान ज्यावर आज पाकिस्तान आपला हक्क सांगतो आणि अक्साई चीन जे १९६२ पासून चीनच्या नियंत्रणाखाली आहे, हे दोन्ही प्रदेश लडाखमध्येच आहेत. शक्सगम खोरे जे पाकिस्तानने परस्पर चीनला १९६३ मध्ये भेट म्हणून देऊन टाकले तेदेखील याच भूमीवर आहे. आजवर स्वतंत्र भारताने जी युद्धे लढली १९४७-४८ असो वा ६५ चे असो वा कारगिल युद्ध असो, या लढाया लडाखच्या भूमीवर लढल्या गेल्या आहेत. लडाखचे हे भौगोलिक वैशिष्ट्य एवढ्या तपशीलवार येथे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे माणसाच्या वास्तव्याच्या दृष्टीने फारसे अनुकूल वातावरण नसलेल्या लडाखबाबत चीनच्या ज्या काही उघड आणि छुप्या कुरापती चालू असतात त्याचे मुख्य कारण या नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवणे हे आहे. आज जगभरात राष्ट्राराष्ट्रांमध्ये होणारी युद्धे आणि तणाव पाहिले तर त्यांच्या मुळाशी नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक असलेल्या भूमीसाठी होणारा झगडा हे कारण असते. थोडक्यात, नैसर्गिक देणगी लाभलेली ही भूमी भारताच्या विकासाच्या, सुरक्षेच्या, परराष्ट्र व्यवहाराच्या आणि मुख्यतः चीनच्या हालचालींच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. चीनला या नद्यांवर ताबा हवा आहे. तिबेटमधील यारलुंग सांगपो म्हणजे आपल्याकडील आसामची जीवनरेखा असलेल्या ब्रह्मपुत्रा नदीची दिशा चिंजांगकडे वळवण्याचे चीनचे मनसुबे आहेत. शिवाय, त्यांना सुमारे १३५ किमी लांबीचे पँगॉन्ग सरोवर पूर्णपणे काबीज करायचे आहे. या सरोवराचा ४० किमी भाग लाइन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोलच्या भारतीय बाजूच्या आत आहे. त्यामुळे पाण्यावर हक्क हवा म्हणून चीनची लडाखवर धूर्त नजर आहे. शक्सगम खोरे जेथे आज २५० पेक्षा जास्त हिमनद्या आहेत, ते पाकिस्तानने चीनला परस्पर दिले. त्याचे कारण येथील हिमनद्या. हिमनद्यांचे हे शुद्ध पाणी भौतिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. आज पेसमेकरपासून स्मार्ट फोनपर्यंत अक्षरशः प्रत्येक आधुनिक उपकरणामध्ये जे मायक्रो चिप आणि मायक्रो वेफर्स वापरले जाते ते बनविण्यासाठी शुद्ध पाणी आणि वाळू या दोन गोष्टींची आवश्यकता असते. चीन हे निश्चित जाणते की, चीनमधील नद्या आता प्रदूषित असल्याने त्यांना मायक्रो चिप सुपर पॉवर बनण्यासाठी हिमालय आणि काराकोरम भागातील या हिमनद्यांची नितांत गरज भासणार आहे. त्यादृष्टीने चीनने आधीच चीननियंत्रित लडाखमध्ये काम चालू केले आहे. सियाचीन ग्लेशियर आणि शक्सगम खोर्‍याजवळ, ज्यावर चीनची अनधिकृत सत्ता आहे, तेथील झिंगजियांग भागात जीसीएल पॉली एनर्जी होल्डिंग्स या चीनच्या कंपनीने पॉलिसिलिकॉन उत्पादन करण्यासाठी प्लांट आधीच उभारलेला आहे. त्यामुळे चीनचे हे मनसुबे रोखणे आणि आपली नैसर्गिक साधनसंपत्ती संरक्षित ठेवणे हा केंद्र सरकारसमोर जास्त गंभीर प्रश्न आहे. या नैसर्गिक संपत्तीवर भारताचा ताबा असणे हे अतिशय गरजेचे आहे.

लडाखवर चीनची नजर असण्याचे आणखी एक कारण म्हणजे तेथील खनिज साठा. लडाखमध्ये अनेक खनिजांचा खजिना आहे. या भागात युरेनियम, लिथियम, तांबे, जस्त, शिसे अशी जवळपास ९४ प्रकारची विविध खनिजे आहेत. चीनचे मुख्य लक्ष या पठारामध्ये दडलेल्या युरेनियममध्ये आहे. युरेनियम अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. ९ फेब्रुवारी २०२३ मध्ये जम्मू काश्मीर आणि लडाखच्या भागात लिथियमचा प्रचंड मोठा साठा सापडला. आजच्या आधुनिक जगात औद्योगिकीकरणासाठी आणि देशाच्या विकासासाठी युरेनियम आणि लिथियम ही दोन्ही खनिजे अत्यावश्यक आहेत. स्मार्ट फोन, विद्युत वाहन आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तू बनविण्यासाठी लिथियम मोठ्या प्रमाणात वापरले जाते. आजवर भारताला लिथियम आयात करावा लागत असे. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया अजून या लिथियमचा अभ्यास करीत आहे; पण प्राथमिक अंदाजानुसार सापडलेला हा लिथियमचा साठा भारताला लिथियम उत्पादनात दुसर्‍या क्रमांकावर नेऊ शकतो. ज्या धातूच्या आयातीवर आज भारत अब्जावधी रुपये खर्च करतो त्याचा साठा आपल्याकडे मिळणे, ही एक मोठी बाब आहे. आज जगात लिथियम बॅटरींची मागणी प्रचंड प्रमाणात आहे. चीन लिथियम बॅटरीच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील एकूण उत्पादनातील ७०% लिथियम बॅटरीचे उत्पादन चीनमध्ये होते. आपल्याकडे सापडलेल्या साठ्यामुळे चीनला हादरा बसला आहे. या साठ्यावर ताबा मिळविण्यासाठी चीन साम, दाम, दंड, भेद सर्व काही वापरणार हे निश्चित. चीनच्या या दुष्ट खेळींचा या आंदोलनामागे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हात तर नाही ना हे तपासावयास हवे.

या तपशीलवार माहितीच्या पार्श्वभूमीवर आता या मागण्यांचा विचार करू. आंदोलनकर्ते आणि त्यांचे समर्थक म्हणत आहेत की, लिथियम बॅटरी निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी लागते आणि खाण उद्योग लडाखच्या पर्यावरणाला हानी पोहोचवू शकते. औद्योगिकीकरण तेथील जलवायूसाठी हानीकारक आहे. पर्यावरणाला वाचविण्यासाठी लडाखमध्ये औद्योगिकीकरण होऊ नये आणि त्यासाठी लडाखला सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करून सुरक्षा द्यावी, जेणेकरून तेथील पर्यावरण सुरक्षित राहील. ही सहावी अनुसूची म्हणजे नेमके काय? भारताचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याची विविधता. भौगोलिक, भाषिक, सांस्कृतिक, पारंपरिक अनेकविध वैविध्यांनी नटलेला आपला भारतच; परंतु या विविधतेला जपत आपली एकता टिकविण्याचे शिवधनुष्य आपल्या संविधानाला पेलायचे होते. ते लीलया पेलण्यासाठी आपल्या संविधानात अनेक तरतुदी आहेत. त्यापैकी एक म्हणजे संविधानाच्या भाग १० मधील कलम २४४. याचे दोन भाग आहेत, एक पाचवी अनुसूची आणि दुसरा सहावी अनुसूची. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतात अशा कित्येक जातीजमाती होत्या ज्या भारताच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेल्या होत्या. अनेक आदिवासी जमातींना आपल्याच प्रदेशात आपल्याच पद्धतींनुसार राहायचे होते. त्यांना सन्मानाने त्यांच्या सांस्कृतिक परंपरा जतन करता याव्यात, त्यांना नाराज न करता सामाजिक ऐक्य टिकावे आणि त्यांना मुख्य प्रवाहाशीदेखील जोडता यावे म्हणून हे कलम २४४ काही आदिवासी जमातींना स्वायत्तता देण्यासाठी बनविले गेले. संविधानानुसार त्या वेळच्या आसाममधील आणि आजच्या मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आणि आसाम या चार राज्यांतील काही जमातींना सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केले आहे. त्यानुसार त्यांच्या भूप्रदेशात तेथील स्थानिक लोकांना बरेच निर्णय घेण्याची मुभा मिळते. उर्वरित भारतातील ज्या आदिवासी जमाती मुख्य धारेपासून दूर आहेत त्यांना पाचव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केले गेले. लडाखचे म्हणणे आहे की, तेथेही ९० टक्के जनता आदिवासी आहे आणि त्यांची संस्कृती व तेथील हवामान, पर्यावरण आगळेवेगळे आहे. त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी लडाखलादेखील सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करावे. मात्र सहावी अनुसूची ही संविधानाने केवळ ईशान्येकडील राज्यांमधील अशा जमातींसाठी दिली आहे ज्या भारताच्या मुख्य धारेपासून पूर्णतः तुटलेल्या आहेत. लडाख असे पूर्णपणे तुटलेले नाही. पर्यटन व्यवसायामुळे तेथे काही महिने जगभरातून लोक येतात.

येथील जवळपास ९०% जनता आदिवासी असून चांगपा, बाल्टी बेडा, ब्रोकपा, दार्द अशा वेगवेगळ्या आदिवासी जमाती येथे आहेत. मात्र लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे २०११ च्या जनगणनेनुसार, कारगिलची एकूण लोकसंख्या १ लाख ४० हजार ८०२ असून ७६.८७% लोक धर्मांतरित मुस्लीम बहुतेक शिया आहेत. लेहमध्ये एकूण लोकसंख्या १ लाख ३३ हजार ४८७ असून त्यातील ६६.४०% बौद्ध झाले आहेत. येथे तिबेटचा प्रभाव असल्याने बौद्ध धर्म झपाट्याने पसरला आहे. शिवाय मुस्लीम धर्मांतरणदेखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने तेथे सहावी अनुसूची लागू करणे कितपत योग्य होईल यावर अनेक अभ्यासक शंका व्यक्त करतात. लडाखच्या आदिवासी जनजातींच्या संस्कृतीला जतन करण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी या मागण्या आहेत, असे सोनम वांगचूक व त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे; पण जर २०११ च्या जनगणनेचा अभ्यास केला तर या भूप्रदेशात धर्मांतरणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. ७० वर्षे कलम ३७० ची विशेष स्वायत्तता आणि सुरक्षा मिळूनदेखील सीमेलगतच्या पाकिस्तान, चीन आणि तिबेटच्या प्रभावामुळे येथील स्थानिक आदिवासी लोकांचे मोठ्या प्रमाणात इस्लाम आणि बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर झालेले आहे. म्हणजेच आदिवासींच्या संस्कृतीला विशेष स्वायत्तता फारशी उपयुक्त ठरली नाही असेच दिसते.
 
सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट झाल्यावर स्थानिक लोकांना अधिक स्वायत्तता मिळते हे खरे. मात्र लडाख हे क्षेत्र चीनपासून वाचवायचे असेल तर केंद्राकडे जास्त अधिकार असायलाच हवे. त्याशिवाय केंद्र सरकार चीनला रोखू शकणार नाही. त्यामुळे या मागणीवर या दृष्टीनेदेखील विचार करायला हवा. पर्यावरणाचे संवर्धन हा आज अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा आहेच. त्यात वादच नाही. मात्र आजच्या आधुनिक युगात ज्या धातूचा सर्वात जास्त वापर होतो, जो धातू देशाला महासत्ता बनवू शकतो, त्यास पूर्णपणे दुर्लक्षित करणे हा पर्याय निश्चितच होऊ शकत नाही. भारताने जर आज या साठ्यांकडे आणि आपल्या हिमनद्यांकडे दुर्लक्ष केले तर चीन त्याचा गैरफायदा घेणार हे निश्चित. चीन आपल्या महासत्ता बनण्याच्या हव्यासापोटी या भूभागातील पर्यावरण नष्ट करतच आहे. याचे अनेक पुरावे आहेतच. त्यामुळे सहावी अनुसूची हा योग्य पर्याय वाटत नाही. भारत सरकारने लडाखच्या विकासाच्या दृष्टीने पावलेदेखील उचलली आहेत. कलम ३७० रद्द करण्यामागे जम्मू काश्मीर आणि लडाखमधील शुद्ध पाण्याचे स्रोत, खनिजे व येथील नैसर्गिक साधनसंपत्ती चीनच्या हातात जाऊ नये हेदेखील एक कारण आहे. भारताने दक्षिण कोरिया, जपान आणि तैवान या तीन देशांना या प्रदेशात मायक्रोचिप बनविण्याचे प्लांट उभे करण्यासाठी बोलविले आहे. आपण या तीन देशांच्या साहाय्याने लडाखमधील जलवायूला हानी न पोहोचवता विकास करण्याचे प्रयत्न करीत आहोत. लडाखमध्ये जगातील सर्वात मोठे सौर ऊर्जा प्लांट उभारले जात आहे. याच्या मदतीने वीजनिर्मितीसह एक वर्षात जवळपास १२ हजार ७५० टन एवढे कार्बन उत्सर्जन रोखले जाईल.
 
हे सत्य आहे की, काही देशांमध्ये अशा नैसर्गिक साधनसंपत्तीचा साठा सापडल्यावर त्यांची भौतिक प्रगती झाली. मात्र पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले व त्याचे अन्य दुष्परिणाम जगाला भोगावे लागले; पण एखादी कृती इतिहासात धोकादायक ठरली म्हणून सोडून देण्याऐवजी त्यातील धोके ओळखून, इतिहासातून शिकून, नवीन उपाययोजना करून, धोके टाळून ती कृती योग्य पद्धतीने करणे हे सुज्ञपणाचे लक्षण असते. औद्योगिकीकरण वाईट नाही. औद्योगिकीकरणाशिवाय आज पर्यायदेखील नाही. योग्य नियम, कायदे आखून, पर्यावरणपूरक पद्धतींनी विकास साधला जावा. खनिजसंपत्ती, खाण उद्योग आणि नैसर्गिक साधनांचा वापर तारतम्य बाळगून सदसद्विवेकबुद्धीने करण्यासाठी सोनम वांगचूक यांच्यासारख्या पर्यावरणवादी अभ्यासकांनी, शास्त्रज्ञांनी, चिंतकांनी आणि आपण सर्व भारतीयांनी सरकारला मदत करावी. आपला भूप्रदेश आणि आपली साधनसंपत्ती चिनी ड्रॅगनच्या घशात न जाऊ देता त्याचा आपल्या देशाच्या विकासासाठी आणि संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी उपयोग करून घ्यावा.
 
अजून एक बाब म्हणजे, असे नाही की लडाखच्या स्थानिक जनतेचा तेथील निर्णयात मुळीच सहभाग नाही. लडाखला आपले प्रश्न, आपली मते आपल्या स्थानिक लोकांमार्फत मांडता यावेत म्हणून १९९५ मध्ये लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषद स्थापन करण्यासाठी कायदा करून लेह जिल्ह्यासाठी लेह अ‍ॅपेक्स बॉडी स्थापन केली गेली होती. कारगिल जिल्ह्यासाठी २००३ मध्ये कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स निर्माण केली गेली. या दोन्ही परिषदांमध्ये प्रत्येकी ३० सदस्य असतात. त्यातील २६ निवडून आलेले स्थानिक सदस्य असतात, तर ४ नामित सदस्य असतात. म्हणजेच लडाखच्या प्रश्नांना मांडण्यासाठी निवडून आलेले ५२ सदस्य आणि नामित ८ सदस्य आहेत, जे तेथील भूमी, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य अशा मुद्द्यांवर सल्ला देतात, आपले मत मांडतात आणि लोकांचे प्रश्न सरकारसमोर ठेवतात. याशिवाय लेह आणि कारगिल या दोन्ही जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या दोन संसदेच्या जागा द्याव्यात, अशीही लडाखची मागणी आहे. सध्या स्वायत्त परिषदेच्या रूपाने निवडून आलेले सदस्य सल्ला देत असले तरीदेखील विधानसभा आणि संसदेच्या जागा या दोन्ही मागण्यांवर सरकार निश्चित सकारात्मक विचार करू शकते. स्वत:, लडाखच्या वरकरणी योग्यतेने योग्य वाटत असले तरी ते मान्य करत भारताला दूरगामी नुकसान होऊ शकते. चीनची शांतता कमी करणे, हे टक्कर भारताला सक्त व्हायचे असेल, तर लडाखयूवर भारताचे नियंत्रण जलाच्या नियंत्रणासाठी अत्यावश्यक आहे. आज गरज आहे लडाख विकास साधकांच्या भावना त्यांच्या जपत संस्कृतीचे, जलवायूचे संरक्षण करणे भारताचे आहे. लडाख आपला आहे, लहानला आपण स्वतःला राखून ठेवण्यासाठी पावले गुण लायत. 'वसुधैव कुटुंबकम्' या तत्त्वावर श्रद्धा श्रद्धा आपला भारत निश्चित पर्यावरणपूरक पावले शक्ति विकास साधू शकतो.




प्रबोधन आणि प्रबोधनकार

महाराष्ट्राच्या बुद्धिप्रामाण्यवादाचा इतिहास
प्रबोधन हे नाव खर्‍या अर्थानं सार्थ झालं ते 'प्रबोधन' पत्रामुळं. 'प्रबोधन'च्या माध्यमातून 'प्रबोधन'कार ठाकरे यांनी संपूर्ण बहुजन समाजाला एक प्रकारचे ज्ञानचक्षू अर्थात बुद्धीचे डोळे देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, हे काम करताना ते कोणत्याही दडपणाला बळी पडले नाहीत. तसेच त्या काळात बुद्धिप्रमाण्यवादाचा किल्ला एकहाती लढवणं हे त्यांचं सगळ्यात मोठं काम सांगता येईल. 
'प्रबोधन'कार केशव सीताराम ठाकरे यांनी शंभर वर्षांपूर्वी 'प्रबोधन' नावाचं नियतकालिक सुरू केलं होतं. या शताब्दीच्या निमित्तानं 'प्रबोधन'मधल्या प्रबोधनकारांच्या लेखांचा त्रिखंडात्मक ग्रंथ 'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा'नं प्रकाशित केला. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचं संपादन सचिन परब यांनी केलं. खरं तर 'प्रबोधन'कार ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री अशी आहे. प्रबोधनकारांच्या संस्कारात, तालमीतच बाळासाहेब ठाकरे लहानाचे मोठे झाले. इतकंच नव्हे, तर शिवसेना स्थापन करण्यामागची प्रेरणा बाळासाहेबांना प्रबोधनकारांकडूनच मिळाली होती. सचिन परब हे गेली कित्येक वर्षं सातत्यानं आषाढी एकादशीच्या निमित्तानं 'रिंगण' नावाचा अंक प्रकाशित करतात, त्याद‍ृष्टीनं त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे. विशेष म्हणजे, दहा-बारा वर्षांपूर्वी त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंवर वेबसाईट स्वतः पुढाकार घेऊन केली होती. तेव्हापासून त्यांनी प्रबोधनकारांच्या कार्याचा ध्यास घेतला होता. त्यांनी संपादित केलेलं हे काम एक प्रकारचा कलशाध्यायच म्हणावा लागेल. कारण, 'प्रबोधन'चे अंक वाचकांसाठी कुठं उपलब्ध नव्हते. हे अत्यंत दुर्मीळ असे अंक सचिन परब यांनी मिळवले. या अंकातले प्रबोधनकारांचे लेख या त्रिखंडात समाविष्ट करण्यात आलेत. या खंडाचं नुकतंच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झालं.
अत्यंत परखड, स्पष्ट वक्‍ते, निर्भीड, निस्पृह पत्रकार अशी प्रबोधनकारांची महाराष्ट्राला ओळख आहे. समोरचा प्रतिस्पर्धी किती मोठा आहे, याचा विचार न करता सत्याचा पाठपुरावा करणं हे आपलं काम आहे, असं समजून प्रबोधनकारांनी लेखन केलं. भाषणं केली. त्यांचं व्यक्‍तिमत्त्व अष्टपैलू होतं. ते नट होते. दिग्दर्शक होते. नाटककार होते. संशोधक होते. इतिहास संशोधक होते. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात वक्‍तृत्वशास्त्रावरील पुस्तकानं झाली. हे पुस्तक मुद्रणालयात छापलं जात असताना काही कारणानिमित्त लोकमान्य तिथं आले होते. त्यांच्या नजरेस हे पुस्तक पडलं. त्यांनी ते चाळलं. तेव्हा प्रबोधनकार विशीच्या आसपास होते. या पुस्तकाचं कौतुक लोकमान्य टिळकांनी केलं होतं. त्यानंतरचं प्रबोधनकारांचं महत्त्वाचं काम वि. का. राजवाडे यांच्या संदर्भानं सांगता येतं. वि. का. राजवाडे यांनी केलेल्या संशोधनाचं महत्त्व खुद्ध प्रबोधनकारांनाच माहीत होतं. राजवाडे गेल्यानंतर प्रबोधनकारांनी लिहिलेल्या मृत्युलेखात राजवाड्यांच्या कामाचा यथोचित गुणगौरव केलाय.
पुढचा राजवाडे जन्माला येण्यासाठी काही शतकं लागतील, असं त्यांनी म्हटलं होतं. गुणगौरव केला, तशी राजवाड्यांवर टीकाही त्यांनी केली. राजवाडे चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी सांगू लागले. त्यांच्या सांगण्यामध्ये काही जातींचा अधिक्षेप कारण नसताना झाला, तेव्हा मात्र प्रबोधनकारांनी राजवाड्यांच्या संशोधनाची अक्षरशः चिरफाड केली. तसेच चांद्रसेनीय कायस्थ प्रभू या आपल्या जातीचा किल्ला एकहाती लढवला. त्यांच्या या कामाचं मोल फार आहे. त्यांची ही कीर्ती राजर्षी शाहू महाराज यांच्यापर्यंत पोहोचली. मग शाहू महाराजांनी प्रबोधनकारांना बोलावून घेतलं. शाहू महाराज अनेक बाबतींमध्ये प्रबोधनकारांना सल्ला देत. नंतरच्या काळात त्यांनी ब्राह्मणेतर चळवळीमध्ये सक्रिय भाग घेतला. 'प्रभात'कार वा. रा. कोठारी, 'जागृती'कार भगवंतराव पाळेकर, श्रीपतराव शिंदे अशी किती तरी नावं सांगता येतील. त्याच दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'मूकनायक' सुरू केलं होतं. मुकुंदराव पाटील यांचं 'दीनमित्र' हे वर्तमानपत्रही चालायचं. त्याच काळात जहाल पत्रकार म्हणून ओळख असलेले दिनकरराव जवळकर हेही उदयाला येत होते. 'प्रबोधन'मध्ये ब्राह्मणेतर चळवळीचा प्रचार होता. आपल्याच ज्ञाती बांधवांचं जागरण करावं, त्यांना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांच्यातल्या काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्यालाही दूर लोटावं, या पद्धतीनं त्यांनी 'प्रबोधन' हे पत्र चालवलं. त्यामुळं ब्राह्मणेतर चळवळीला बुद्धिप्रामाण्यवादाचं अधिष्ठान लाभलं. ते देण्यात प्रबोधनकार ठाकरे यांचं योगदान फार आहे. ब्राह्मणांच्या देवांऐवजी आपल्या देवांची स्थापना करा किंवा त्यांच्या धर्मइतिहासाऐवजी आपला धर्म इतिहास लिहा, अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये ते अडकले नाहीत. त्यापुढं जाऊन हिंदू धर्मासह एकूणच धर्मसंस्थेतल्या उणिवांवर प्रहार केले. धर्मात असलेल्या मध्यस्थावर कडाडून प्रहार केले.
त्या काळातल्या महाराष्ट्राचं वर्णन 'प्रबोधनयुग' असं केलं जातं. प्रबोधन हे नाव खर्‍या अर्थानं सार्थ झालं ते 'प्रबोधन' पत्रामुळं. 'प्रबोधन'च्या माध्यमातून प्रबोधनकारांनी संपूर्ण बहुजन समाजाला एक प्रकारचे ज्ञानचक्षू अर्थात बुद्धीचे डोळे देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, हे काम करताना ते कोणत्याही दडपणाला बळी पडले नाहीत. तसेच त्या काळात बुद्धिप्रामाण्यवादाचा किल्ला एकहाती लढवणं हे त्यांचं सगळ्यात मोठं काम सांगता येईल. बर्‍याच लोकांना वाटायचं की, राजर्षी शाहू महाराज यांच्या गुडबुक्समध्ये प्रबोधनकार आहेत. याचा अर्थ शाहू महाराजांची प्रत्येक गोष्ट प्रबोधनकारांना मान्य होती, असं नाही. ज्या वेळेला प्रबोधनकारांनी आपलं विरोधी मत दर्शवलं त्यावेळेला शाहू महाराजांनी त्यांच्या मताचा आदरच केला आहे. माझ्या द‍ृष्टीनं महाराष्ट्रातली ही फार महत्त्वाची जोडी होती. दुसरी जोडी अर्थातच कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे यांची. कर्मवीरांसाठी प्रबोधनकार हे गुरुतुल्य स्नेही होते. कर्मवीरांमुळंच प्रबोधनकारांनी मुंबईत सुरू केलेलं 'प्रबोधन' सातार्‍याला न्यायचं ठरवलं. पुढं त्यांनी 'खरा ब्राह्मण' नावाचं नाटक लिहिलं. संत एकनाथ यांच्या जीवनावर आधारित हे नाटक होतं. त्याचे खूप प्रयोग झाले. हे नाटक गाजलंही. आपल्या जातीवर टीका आहे, म्हणून काहीजणांनी कोर्टात जाऊन त्यावर बंदी आणण्याचा प्रयत्नही केला. मात्र, तो यशस्वी होऊ शकला नाही. प्रबोधनकारांनी गाडगे महाराजांचं, रंगो बापूजींचं चरित्रही लिहिलं. १८५७ च्या उठावात रंगो बापूजींचा फार मोठा सहभाग होता. त्यांचं चरित्र लिहावं, अशी शाहू महाराजांची इच्छा होती. प्रबोधनकारांनी ते लिहून शाहू महाराजांची इच्छा पूर्ण केली. शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे, असं त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी 'शेतकर्‍यांचे स्वराज्य' लिहिलं. पुढं संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीतल्या नेत्यांच्या बैठका प्रबोधनकारांच्या घरीच होत. त्यात श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, एस. एम. जोशी असे अनेक मोठमोठे लोक होते. या सगळ्या बैठकांमधूनच चळवळीनं आकार घेतला, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्या अर्थानं प्रबोधनकारांनी कोणती संघटना बांधली नाही. त्यांनी स्वतःचा असा अनुयायी वर्ग केला नाही. त्यामुळं एरव्ही त्यांच्या विचारांचा तितका गौरव होेऊ शकला नाही. वास्तविक, त्यांनी केलेल्या कामाला श्रेय हे मिळायलाच हवं होतं. परंतु, इतिहास कधी तरी न्यायाधीश होतो आणि होऊन गेलेल्या लोकांचं मूल्यमापन करतो. त्याला काव्यगत न्याय म्हणायलाही हरकत नाही. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळानं प्रकाशित केलेले हे तीन खंड या द‍ृष्टीनं महत्त्वाचे आहेत.
 हे सगळं साहित्य इंग्रजीत येणं ही गोष्टही महत्त्वाची आहे. या खंडांचं वाचकांच्या द‍ृष्टीनं मोल काय आहे, तेही थोडक्यात सांगता येईल. एक तर महाराष्ट्राच्या इतिहासाची महत्त्वाची बाजू जी एरव्ही मुख्य प्रवाहात येत नाही, ती समजून घेण्यासाठी हे खंड वाचण्याची गरज आहे. दुसरा मुद्दा की, १९२० ते १९३० हे दशक महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या द‍ृष्टीनं एक केऑस आहे. नेतृत्वाच्या द‍ृष्टीनं महाराष्ट्र या काळात चाचपडत होता. कारण, दोन महत्त्वाचे नेते एक राष्ट्रवादी लोकांचे नेते लोकमान्य टिळक आणि ब्राह्मणेतर पक्षाची बाजू लढवणारे शाहू महाराज दशकाच्या सुरुवातीलाच कालवश झाले होते.
त्यामुळं त्यांच्या अनुयायांसमोर चांगला नेता नव्हता. या काळात प्रबोधनकार ठाकरे पुढं येऊन महाराष्ट्रासमोरची वैचारिक पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. याद‍ृष्टीनं या त्रिखंडात्मक ग्रंथाचं महत्त्व आहे. महाराष्ट्रातल्या बुद्धिप्रामाण्यवादाचा इतिहास समजून घेण्यासाठी हे प्रबोधनकारांचं या खंडात दडलेलं विचारधन वाचणं आवश्यक आहे.
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. महाराष्ट्राच्या इतिहास आणि भूगोलालाही वळण लावणारी थोर व्यक्तिमत्वं विसाव्या शतकात होऊन गेली, त्यातलं एक महत्त्वाचं नाव. महात्मा फुले यांच्या सत्यशोधनाचा विचार पुढे नेणारे आक्रमक विचारवंत, भिक्षुकशाहीचा कर्दनकाळ ठरलेले समाजसुधारक, हुंड्यासारख्या चालीरितींविरुद्ध उभे ठाकलेले सामाजिक कार्यकर्ते, मराठी पत्रकारितेला नवी दिशा देणारे संपादक, जातनिष्ठ इतिहास लेखनाचा फोलपणा दाखवून इतिहासाची नवी मांडणी करणारे इतिहासकार, महाराष्ट्रभर सातत्याने फिरून विद्रोहाची पेरणी करणारे ज्वलंत वक्ते, समाज सुधारणांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे नाटककार, दिग्दर्शक आणि निर्मातेही, मोजक्याच पण ठसकेबाज भूमिका करणारे लक्षवेधी अभिनेते, सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे संस्थापक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे गुरुतुल्य मार्गदर्शक, संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात आणण्यासाठी वयाच्या सत्तरीत तुरुंगवास भोगणारे आंदोलनाचे नेते, गेल्या अर्धशतकापेक्षाही जास्त काळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ठाकरे कुटुंबाचे प्रेरणास्थान, याशिवाय लेखक, कवी, संगीतकार, सतारवादक, चित्रकार, फोटोग्राफर, शिक्षक, उद्योजक, विक्रेते, जनसंपर्क अधिकारी अशा विविध भूमिकांत वावरलेल्या अफाट बहुआयामी व्यक्तिमत्वाचं कर्तृत्व शब्दांत पकडणं कठीण आहे.
प्रबोधनकारांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३ चा. त्यांना ८८ वर्षांचं दीर्घायुष्य लाभलं. हा बहुरंगी माणूस एका आयुष्यात अनेक आयुष्य जगला. पण त्यात त्यांची ओळख बनलं ते त्यांनी संपादित केलेलं 'प्रबोधन` हे नियतकालिक. १६ ऑक्टोबर १९२१ ला `प्रबोधन`नियतकालिकाचा पहिला अंक मुंबईहून प्रकाशित झाला. त्याला २०२१ च्या १६ ऑक्टोबरला शंभर वर्षं होतील. `प्रबोधन`चा शेवटचा अंक मार्च १९३० ला प्रसिद्ध झाला. या दरम्यान साधारण सहा प्रकाशन वर्षांत एकूण ९५ अंक प्रसिद्ध झाले. त्यापैकी ९१ अंक आज अभ्यासकांनी शोधून काढलेत.`प्रबोधन` नियतकालिकाने घडवलेली जागृती हा महाराष्ट्राच्या समाज प्रबोधनाच्या, समाज सुधारणेच्या आणि पत्रकारितेच्या इतिहासाचा फार महत्त्वाचा भाग आहे. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीयुगाला सामोरं कसं जावं याविषयी महाराष्ट्र गोंधळलेला होता. त्याचबरोबर वेदोक्त प्रकरण आणि त्यातून निर्माण झालेला ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद टोकाला गेल्याने महाराष्ट्र हादरलेला होता. या पार्श्वभूमीवर `प्रबोधन`चा जन्म झाला. त्यानंतरच्या म्हणजे १९२० च्या दशकातल्या जवळपास नऊ वर्षांच्या महत्वाच्या नोंदी `प्रबोधन`मध्ये आहेत. किंबहुना `प्रबोधन` हा या सगळ्या सामाजिक आणि राजकीय घुसळणीचा एक भाग आहे. पहिल्या महायुद्धानंतर अमेरिका आणि जपान यांचा महासत्ता म्हणून होणारा उदय, असहकार आंदोलन, मोपल्यांचा मलबार येथील हिंसाचार, खिलाफत चळवळ या राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी, तसंच १९२३ ची प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका, त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीतल्या हालचाली, ब्राह्मणी वर्चस्ववाद्यांच्या कारवाया, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यांमुळे झालेले वाद, मुळशी सत्याग्रह, या महाराष्ट्रातल्या घडामोडींवर प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या महाराष्ट्रभर उत्तम जनसंपर्क असलेल्या अभ्यासू संपादकाने केलेली भाष्यं हा आज एक ऐतिहासिक दस्तावेज आहे.
त्यापेक्षाही महाराष्ट्रातल्या सामाजिक संघर्षाचा तपशीलवार पट `प्रबोधन`मधून उभा राहतो, तो महत्त्वाचा आहे. `मराठी वृत्तपत्रांचा इतिहास` या ग्रंथात रा. के. लेले म्हणतात, `ठाकरे यांच्या `प्रबोधन` पत्राची कारकीर्द अवघी पाचसहा वर्षांचीच होती. पण तेवढ्या अल्पावधीत त्याने केलेली वृत्तपत्राच्या आणि सामाजिक चळवळीच्या क्षेत्रांतील कामगिरी न विसरता येण्यासारखी आहे. ठाकरे ह्यांच्या पत्राचे स्वरूप राजकीय प्रश्नांवर भर देणारे नव्हते. आगरकरांप्रमाणे सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करणारे हे पत्र होते. आगरकरांच्या सामाजिक सुधारणांचा पाया अत्यंत शास्त्रशुद्ध होता. पण त्यांनी ज्या सुधारणांचा पुरस्कार केला, त्या पांढरपेशा वर्गापुरत्याच मर्यादित होत्या. त्यांच्या सुधारणावादाचे आवाहन बहुजन समाजापर्यंत पोचले नाही. त्यांनी म. जोतीराव फुले यांनी प्रसृत केलेले विचार आणि केलेले कार्य ह्यांची दखल घेतल्याचेही आढळत नाही. या दृष्टीने पाहीले तर ठाकरे ह्यांनी प्रबोधनाद्वारा ज्या सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला त्या अधिक व्यापक होत्या. या दृष्टीने ह्यांचे `प्रबोधन` आगरकरांच्या पुढे काही पावले गेलेले होते.`
`प्रबोधन`ने त्याच्या प्रकाशनकाळात महाराष्ट्रावर कसा प्रभाव टाकला, हे आचार्य अत्रेंच्या या उताऱ्यावरून लक्षात येऊ शकतं, `अच्युतराव कोल्हटकर यांच्या `संदेश` या पत्राने महाराष्ट्रात जी जागृती आणि खळबळ केली, तशाच प्रकारची खळबळ ठाकरे यांच्या `प्रबोधन`ने करून सोडली, असे म्हणावयास प्रत्यवाय नाही. सदर मासिकामध्ये पाच सहा वर्षेपर्यंत निरनिराळ्या सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक विषयांवर खळबळीत लेखमाला आणि निबंध लिहून ठाकरे यांनी बहुजन समाजाचे अक्षरशः `प्रबोधन` केले, यात संशय नाही. भिक्षुकी वृत्तीच्या आणि सनातनी दृष्टीच्या ब्राह्मण समाजावर अनेक निकराचे हल्ले त्यांनी आपल्या या पाक्षिकात चढविले, त्यामुळे `कोदण्डाच्या टणत्कारा`पासून ब्राह्मण विद्वानांत अप्रिय झालेले त्यांचे नाव अधिकच तीव्रतेने त्या समाजाच्या डोळ्यांत सलू लागले. तथापि, सनातनी भिक्षुक समाजात हे जितके अप्रिय ठरले, तितकेच ब्राह्मणेतर समाजामध्ये ते लोकप्रिय होऊन बसले....!`
प्रबोधनकारांनी मराठी समाजातले अनेक दोष १०० वर्षांपूर्वी दाखवलेले आहेत, जे आजही जसेच्या तसे आहेत. हुंड्याच्या विरोधात त्यांनी आंदोलनही केलं. पण आजही हुंडा थांबलेला नाही. भिक्षुकशाहीच्या विरुद्ध त्यांनी रणशिंग फुंकलं होतं. पण आज जुनीच भिक्षुकशाही नवे मुखवटे घालून तसंच शोषण करते आहे. महाराष्ट्रातला इतिहास अजूनही स्वजातिभिमानाच्या चिखलात रुतून बसलाय. महिला सक्षमीकरणाची प्रबोधनकार सांगत असलेली निकड अजूनही कायम आहे. पूर्वीइतकी तीव्र अस्पृश्यता उरली नसली तरी जातिभेदाचे दुष्परिणाम महाराष्ट्र अजूनही भोगतोच आहे. महाराष्ट्रातल्या तरुणाला `मानसिक गुलामगिरीविरुद्ध बंड` करण्याची ताकद आजही `प्रबोधन`कारांचे हे लेख देऊ शकतात. बहुजनवाद, हिंदुत्ववाद, गांधीवादच नाही तर कम्युनिझमविषयी आजच्या संदर्भात विचार करताना त्यांचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो.
इंग्रजी शाळेत असतानाच प्रबोधनकारांनी इंग्रजीतून मराठीत अनुवाद केलेले दोन लेख करमणूक या आघाडीच्या साप्ताहिकात छापून आले होते. त्यांनी घरात दाबयंत्र तयार करून विद्यार्थी नावाचं हौशी साप्ताहिक चालवलं होतं. `प्रबोधन`कारांचं जन्मगाव पनवेलमध्ये पहिलं साप्ताहिक हे १९५० च्या सुमारास निघालं. तेही अल्पायुषी निघालं. १९६७ ला किल्ले रायगड हे दीर्घकाळ चाललेलं पहिलं साप्ताहिक पनवेलमधून सुरू झालं. हे लक्षात घेता एकोणिसाव्या शतकातच प्रबोधनकारांनी केलेला साप्ताहिक विद्यार्थीच्या प्रयोगाचं मोल लक्षात येतं. १७-१८ व्या वर्षी ते मुंबईच्या प्रसिद्ध तत्त्वविवेचक छापखान्यात असिस्टंट प्रूफरिडर म्हणून काम केलं. नंतर ते अनेक नियतकालिकांत सातत्याने लिहित होते. वयाच्या विशीत सांगलीकर नाटक मंडळीत असतानाच्या पंढरपूर आणि विजापूर अशा दोन शहरांतल्या मुक्कामांचं वर्णन त्यांनी केलंय. त्या दोन्ही ठिकाणी अनोळखी असणारे त्यांचे चाहते वाचक त्यांना शोधत आल्याचे उल्लेख आहेत. म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या नियतकालिकांत लिखाणाचा एक चाहतावर्ग तयार झाला होता. जळगावात असताना प्रबोधचंद्रिका साप्ताहिकाचे संपादक नारायण नरसिंह उर्फ नानासाहेब फडणीसांनी `प्रबोधन`कारांमधला संपादक नेमका हेरला आणि त्यांना एक सारथी नावाचं मासिक सुरू करायला लावलं. ते वर्षभर चाललं. प्रबोधनकारांच्या नोंदीनुसार हे सगळं १९०६-०७ मध्ये घडत होतं. याचा अर्थ प्रबोधनकार अवघ्या २१-२२व्या वर्षी संपादक बनले.
इतिहासाचार्य वि. का. राजवाडेंनी भारत इतिहास संशोधन मंडळाच्या चौथ्या वर्षाच्या अहवालात कायस्थदीप या पुस्तकावर एक २२ पानी लेख छापला. त्यात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपी समाजाची कुळी हीन असल्याचा आरोप केला. प्रबोधनकारांनी राजवाडेंचं संशोधन खोडून काढणारं पुस्तक लिहायचं ठरवलं. त्याचं कारण ते सांगतात, `एका काळच्या सत्तामदाने शिरजोर झालेले ब्राह्मण पंडित, इतिहास संशोधनाच्या किंवा आखणी कसल्या तरी फिसाटाच्या पांघरुणाखाली कायस्थादी ब्राह्मणेतरांवर आणि अनेक चित्पावनेतर ब्राह्मणांवरही हल्ले चढवायला सवकलेले आहेत. त्यांचा एकदा कायमचा पुरा बंदोबस्त केलाच पाहिजे या हिरीरीने मी कोदण्डाचा टणत्कार हे पुस्तक लिहून प्रसिद्ध केले.` कोदण्डाचा टणत्कार अर्थात भारत इतिहास संशोधन मंडळास उलट सलामी हे तडाखेबंद पुस्तक १७ नोव्हेंबर १९१८ ला प्रकाशित झालं. या ग्रंथाच्या सहा हजार प्रती अवघ्या पंधरा दिवसात संपल्याचा दावा प्रबोधनकारांनी केला आहे. कारण प्रबोधनकारांचा हा प्रतिवाद फक्त सीकेपींचा उरलेला नव्हता, तर तो ब्राह्मणी संशोधकांच्या बदनामी मोहिमांमुळे अस्वस्थ असलेल्या सगळ्याच ब्राह्मणेतरांचा झाला होता. याच दरम्यान वेदोक्त प्रकरण गाजत होतं. जातवर्चस्ववादाचं हिडीस रूप महाराष्ट्र बघत होता. त्यातून `प्रबोधन`कारांचंही विचारचक्र सुरू होती. त्यातून ते एका निष्कर्षापर्यंत पोचले, ब्राह्मणेतर समाजाची पहिली गरज ही भिक्षुकशाहीच्या सापळ्यातून मुक्तता ही आहे. दुसरीकडे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने सत्यशोधकी नियतकालिके सुरू करण्याचा धडाका सुरू होता. प्रबोधनकारांचा तर त्यांच्याशी आत्मीय स्नेह निर्माण झाला होता. त्यातून प्रबोधनकारांनी १९२१ च्या सप्टेंबर महिन्यात स्वतःचं वृत्तपत्र काढण्याचा निर्णय घेतला. `प्रबोधन`चा पहिला अंक १६ ऑक्टोबर १९२१ ला प्रसिद्ध झाला
प्रबोधन`च्या कामासाठी प्रबोधनकारांनी दादर मधल्याच खांडके बिल्डिंगमध्ये एक ब्लॉक भाड्याने घेतला होता. तिथे अनेक तरुण `प्रबोधन`कारांकडे ओढले गेले. अभ्यास करण्यासाठी ते दिवसभर तिथेच असत. त्यातून स्वाध्यायाश्रम नावाची संस्था सुरू झाली. या तरुणांनी हुंडा विध्वंसन संघ स्थापन करून मुंबईत एक वादळच निर्माण केलं होतं. या संघटनेने प्रामुख्याने सीकेपी समाजातली हुंडा घेऊन होणारी लग्नं उधळून लावली. हुंडा निषेधाची गाणी गात मोठ्या मिरवणुका काढल्या. गाढवाच्या वराती घेऊन लग्नाच्या ठिकाणी हल्लाबोल केला. १९२२ -२३ च्या लग्नसराईत २०-२५ लग्नात हुंडा विध्वंसन संघाने धुमाकूळ घातला होता. या आंदोलनाला `प्रबोधन`चा सक्रिय पाठिंबा होता. खरं तर `प्रबोधन`च्याच नेतृत्वात हे सुरू होतं. हुंडा विरोधामागचा विचार `प्रबोधन`नेच समजावून सांगितला होता. हुंडा घेऊन लग्न करणाऱ्यांची नावं `प्रबोधन`मध्येच प्रसिद्ध होत.
याच काळात प्रबोधनकारांनी सरकारी नोकरी सोडली. त्यासाठी प्रबोधनकारांच्या आईचा विशेष आग्रह होता. त्या नेहमी सांगत की वेळ आली तर भीक माग पण इंग्रज सरकारची नोकरी करू नकोस. सरकारने परवानगी दिल्यामुळे `प्रबोधन` सुरू ठेवण्यात तांत्रिकदृष्ट्या अडचण काहीच नव्हती. पण प्रबोधनकारांच्या मनाला ते पटत नव्हतं. ते लिहितात, `एकीकडे नोकरी नि दुसरीकडे बहुजन समाज जागृतीचे कार्य, अशा परस्पर विरुद्ध दोन टोकांवरच्या डगरीवरचा कसरती खेळ माझ्या स्वभावाला पटेनासा झाला. सद्सद्विवेकबुद्धी सारखी टोचण्या देऊ लागली. सभांतून सरकारी धोरणांवर टीका करायची आणि प्रबोधनात मानसिक दास्याविरुदध बंड या विषयावर स्पष्टोक्तीची लेखमाला लिहायची हे मला सहन होईना...!` केवळ आपले विचार आणि कृती यात तफावत राहू नये, यासाठी अडीचशे रुपये मासिक पगाराची नोकरी सोडून पुन्हा गरिबीत उडी घेणारा संपादक विरळाच. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाने केलेल्या त्यागाची दखल मात्र इतिहासाने हवी तशी घेतलेली नाही.
`प्रबोधन`ला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे त्यांना `प्रबोधन`ची पानं आणि प्रती वाढवण्याची इच्छा होती. स्वतंत्र छापखाना नसल्यामुळे त्यांच्या या मनसुब्यात अडचणी येत होत्या. साताऱ्यातले उद्योजक धनजीशेठ कूपर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना `प्रबोधन`कारांकडे पाठवले. साताऱ्याजवळच्या पाडळी या गावात छापखाना उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. त्याला भुलून प्रबोधनकारांनी `प्रबोधन`चा कारभार साताऱ्याला हलवण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या दरम्यान प्रबोधनकारांनी कूपर यांच्या गटातले भास्करराव जाधव यांच्याविरोधात भूमिका घेतली. तसंच त्यांनी `अस्पृश्यांनो स्पृश्यांपासून सावधान` असं स्फुट प्रबोधनात लिहून बॉम्ब टाकला होता. परिणामी या दोघांच्या विरोधात कूपरने षडयंत्र रचायला सुरवात केली. त्यामुळे प्रबोधनकारांनी त्यात सगळा हिशेब देऊन कफल्लकपणे सातारा सोडला. `प्रबोधन`प्रेमी रामचंद्र उर्फ बापूसाहेब चित्रे यांनी पुण्यात कर्जात बुडालेला एक छापखाना विकत घेतला होता. त्याचा व्यवहार करण्यासाठी छापखान्याचा मालक, ज्याचा उल्लेख प्रबोधनकार गायतोंड्या भट असा करतात, सातारा रोडला प्रबोधनकारांना भेटायला आला होता. तो आला त्याच दिवशी `प्रबोधन`कारांची एका मुलीचं डायरियाने अचानक निधन झालं. तिचे अंत्यसंस्कार करत असतानाच घाईत असलेल्या छापखाना मालकाशी जड हृदयाने व्यवहाराच्या गोष्टीही करत होते. ते बघून प्रबोधनकारांच्या पत्नीने त्यांना सुनावलं, `प्रबोधनापुढे पोटच्या गोळ्याची सुद्धा यांना तिडीक येत नाही...!` तो उद्वेग स्वाभाविक असला तरी तो एका संपादकाच्या निष्ठेचा सन्मानही होता.
साताऱ्यातून प्रकाशित झालेल्या तिसऱ्या वर्षाच्या १७ व्या अंकातच पुढचा अंक पुण्यातून प्रकाशित होणार असल्याची घोषणा झाली. त्यानुसार सदाशिव पेठेत घर आणि बुधवार पेठेत छापखाना असा संसार त्यांनी थाटला. पण पुण्यातल्या काही सनातनी ब्राह्मणांनी मूळ मालकाला छापखाना प्रबोधनकारांना न देण्यासाठी उचकवलं. त्याला बळी पडून त्याने छापखान्याला टाळं लावलं. सनातन्यांनी `प्रबोधन`च्या नावाची पाटीही भररस्त्यात जाळली. वर पुण्यात `प्रबोधन`ला जाळून खाक करू अशी शेखी मिरवली. त्यामुळे पुण्यातच `प्रबोधन`चा छापखाना उभारण्याची प्रतिज्ञा प्रबोधनकारांनी केली. तोवर `प्रबोधन`चा तिसऱ्या वर्षाचा शेवटचा एकच अंक प्रकाशित होऊ शकला. प्रबोधनकारांनी नव्या छापखान्यासाठी कर्ज आणि देणग्या मिळवल्या. त्यातून सदाशिव पेठेत छापखाना उभा करण्याची तयारी झाली. पण प्रबोधनकारांनी मुंबईतून विकत घेऊन पाठवलेलं ट्रेडल मशीनचं चाक रेल्वेने पुण्यात पोहचेपर्यंत तुटलं. तरीही धीर न सोडता प्रबोधनकारांनी भांडवल उभं करण्यासाठी धावाधाव सुरूच ठेवली. त्यासाठी मुंबईत असताना धावपळीमुळे ते आजारी पडले. त्यातून बाहेर यायला चार महिने लागले. अर्धी मशिनरी पुण्यात, उरलेली अर्धी मुंबईत दुरुस्त होतेय, कारागिरांचे पगार थकलेत, उपचारासाठीही पैसे नाहीत अशी भयंकर परिस्थिती होती. पण यातून बाहेर येत १९२५ च्या जानेवारीत ते कसेबसे पुण्याला पोचले. पुन्हा `प्रबोधन` उभं करण्याच्या प्रयत्नांना लागले. पुढच्या चार महिन्यांत मशीन सातवेळा तुटलं. इतरही अडचणी येतच राहिल्या.
या सगळ्या अडचणींतून मार्ग काढत ९ महिन्यांच्या खंडानंतर `प्रबोधन` १९२५ च्या एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा सुरू झाला. `प्रबोधन`ला देवाज्ञा झाली अशी टीका करणाऱ्यांना `प्रबोधन`ने नव्याने सुरुवात करून उत्तर दिलं. चौथ्या महिन्याचा पहिला अंक हा आता पाक्षिक नसून मासिक होता. पानांची संख्या ४० होती. पुढे नोव्हेंबर १९२७ पर्यंत ३२ महिन्यांत मासिक `प्रबोधन`चे २२ अंक निघाले. त्याचसोबत प्रबोधनकारांनी ३१ ऑगस्ट १९२७ पासून लोकहितवादी हे नवीन साप्ताहिकही सुरू केलं. त्याचा शेवटचा तेरावा अंक पुण्याहूनच डिसेंबर १९२७ ला निघाल्याचा उल्लेख शनिमहात्म्य या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे जून १९२४ ला पुण्यात आल्यापासून नोव्हेंबरमध्ये मुंबईत परतेपर्यंत प्रबोधनकार अडचणींवर मात करत सनातन्यांच्या नाकावर टिच्चून `प्रबोधन` जगवत राहिले.
प्रबोधनकार पुण्यात होते त्या काळात ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद अगदी टोकाला पोहोचला होता. ब्राह्मणेतर पक्षाचे नेते केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर त्यांना भेटण्यासाठी जवळपास दररोज `प्रबोधन` कचेरीत येत. शिवाय लोकमान्य टिळकांचे सुपुत्र रामभाऊ आणि श्रीधरपंत हेही असत. त्यामुळे या सगळ्याचे सूत्रधार प्रबोधनकारच असल्याचा समज पुण्यात पसरला होता. विशेषतः देशाचे दुष्मन हे पुस्तक प्रबोधनकारांनीच लिहिलं असल्याचं अनेकांना वाटत होतं. प्रबोधनकारांचा छापखाना अगदी ब्राह्मणी वस्तीमध्ये असल्याने त्यांना या सगळ्याचा त्रास भोगावा लागत असे. एका सभेवरून घरी जाणाऱ्या सनातन्यांनी `प्रबोधन`च्या छापखान्यावर जाऊन जवळपास दोन तास शिव्याशाप दिले. कारखान्याच्या नावाचा फलक खाली पाडला. त्यानंतर पुढच्याच आठवड्यात ते पर्वतीजवळ फिरायला गेले असताना तीन चार जणांनी लाठीहल्ला केला. पण प्रबोधनकारांनी वॉकिंग स्टिकमधली गुप्ती बाहेर काढल्याने ते पळून गेले. खोटी निमंत्रणपत्रिका बनवून छापखान्याला पोलिसी प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्नही केला गेला. गोडबोले नावाचा एक गुंड प्रबोधनकारांना भेटायला आला. छापखान्यातल्या कामगारांमुळे तो काही करू शकला नाही. पुढे पोलिसांना सांगून त्याचा बंदोबस्त करावा लागला. त्यांच्या लिखाणाला प्रक्षोभक ठरवून कोर्टात जाण्याचेही प्रयत्न केले. छापखान्यात आगीचा गोळा टाकून कागदाच्या थप्प्यांना आगही लावण्यात आली. शिवाय मेलेली कुजलेली कुत्री दारासमोर फेकण्यात आली. एकदा तर मेलेलं गाढवही टाकण्यात आलं. अनेकदा पैसे देऊनही छपाईसाठी चांगला कागद मिळून दिला जात नसे. तसंच पुण्यातल्या ब्राह्मण एजंटांनी `प्रबोधन`वर बहिष्कारही घालून बघितला. `प्रबोधन`चे अंक विकलात तर केसरी, ज्ञानप्रकाशचे अंक मिळणार नाहीत, असा दबाव त्यांनी विक्रेत्यांवर आणला. पण `प्रबोधन` छापखान्यातल्या कामगारांनी चौकाचौकात विकून त्यावर मात केली. तसंच चांगलं कमिशन दिल्याने विक्रेतेही नरम पडले. अनेकदा तर अंक वाचकांपर्यंत जाऊ नयेत यासाठी एकगठ्ठा विकतही घेतले जात. या सगळ्या अडचणींवर मात करत प्रबोधनकार पुण्यात `प्रबोधन` चालवत होते. एका मोठ्या जातीचा, सत्ताधाऱ्याचा किंवा चळवळीचाही थेट पाठिंबा नसताना पुण्यात भिक्षुकशाहीच्या विरोधात संघर्ष करणं महाकठीण होतं. त्यासाठी प्रबोधनकारांसारखा वीर योद्धाच हवा होता. खुद्द सदाशिवपेठेत राहून ब्राह्मणेतरी विचारांचे `प्रबोधन`चे २२ आणि लोकहितवादीचे १३ अंक प्रकाशित करणं, यासाठीची हिंमत कळण्यासाठी तो काळ समजून घ्यावा लागेल.
चौथ्या वर्षाच्या काळात प्रबोधनकारांनी इंदूरचे राजे तुकोजीराव होळकर यांना खुनी ठरवणाऱ्या बावला मुमताज प्रकरणावर आपली लेखणी जोरात चालवली. त्यातल्याच `टेम्प्ट्रेस` या लेखात `द बॉम्बे क्रॉनिकल` या वर्तमानपत्राचे प्रख्यात ब्रिटिश संपादक बी. जी. हॉर्निमन यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे चिडून त्यांनी प्रबोधनकारांच्या विरोधात मुंबईतल्या कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. त्यासाठी वकील द्यायला प्रबोधनकारांकडे पैसे नव्हते. त्यामुळे `प्रबोधन`चे अनेक प्रेमी मदत करण्यासाठी पुढे आले. याच खटल्यासाठी ७ नोव्हेंबर १९२७ला मुंबईत आल्यावर प्रबोधनकार पुन्हा एकदा गंभीर आजारी पडले. ते एकटेच नाहीत तर पत्नी, मुली आणि मुलगा असं संपूर्ण कुटुंबच वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त झाले. त्यामुळे मुंबईत अडकलेले प्रबोधनकार पुन्हा `प्रबोधन` चालवण्यासाठी पुण्यात जाऊ शकले नाहीत.
`प्रबोधन` जवळपास दोन वर्ष बंद होतं. त्यानंतर ते १९२९ च्या दसऱ्याला पुन्हा सुरू झाला. तो क्रांन्त्यंक असं नाव होतं. किल्ल्यातून बाहेर येणारा वाघ त्यावर दिसत होता. प्रबोधनकार नावाच्या वाघानेही नव्याने डरकाळी फोडली होती. नोव्हेंबर १९२९ पासून मार्च १९३० पर्यंत `प्रबोधन`चे पाच अंक निघालेले दिसतात. त्यानंतर `प्रबोधन`चा अंक सापडत नाही. `प्रबोधन` बंद करण्यात येत असल्याची घोषणा केलेली नाही. माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात प्रबोधनकारांनी `प्रबोधन`शी संबंधित इतर घडामोडींची तपशीलवार चर्चा आहे. पण त्यात `प्रबोधन` मुंबईतून पुन्हा कसं सुरू केलं आणि ते सहा अंकात कसं बंद पडलं, याच्याविषयी काहीही सांगितलेलं नाही. फक्त उदरनिर्वाहासाठी `प्रबोधन`चा छापखाना आधी भाड्याने दिल्याचा आणि नंतर विकल्याचा उल्लेख आहे. पण या व्यवहारात मित्रांनी फसवल्यामुळे प्रबोधनकारांच्या हातात काहीच लागलं नाही. या काळात प्रबोधनकारांनी `शनिमहात्म्य` आणि `शेतकऱ्यांचे` स्वराज्य ही दोन महत्त्वाची पुस्तकं लिहिली. दोन्ही पुस्तकं त्या काळात अत्यंत लोकप्रिय झाली होती. शिवाय दादरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवातले ब्राह्मणी वर्चस्व मोडीत काढण्यासाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत चालवलेली चळवळ आणि त्यातून सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात या त्यांच्या सार्वजनिक जीवनातल्या महत्त्वाच्या घडामोडी `प्रबोधन`च्या याच टप्प्यात झाल्यात.
`प्रबोधन`च्या शेवटच्या पर्वात म्हणजे नोव्हेंबर १९२७ ते मार्च १९३० या दरम्यान `प्रबोधन`चे फक्त सहाच अंक निघालेले आहेत. पण त्यात वेगळे प्रबोधनकार दिसतात. `प्रबोधन`ची सुरवात ईशस्मरणाने करणारे प्रबोधनकार नोव्हेंबर १९२९ च्या अंकात नवी सुरुवात करताना लिहितात, `कोणत्याही कार्याच्या प्रारंभी – मग ते बॉम्ब फेकण्याचे असो नाहीतर बोंब मारण्याचे असो – कोणत्या तरी देवदेवतेचे नामस्मरणपूर्वक वन्दन करण्याचा हिन्दुजनांचा शिष्ट संप्रदाय आहे. यापूर्वीच्या माझ्या प्रत्येक ग्रंथारंभी हा शिष्ठाचार मी भक्तीपूर्वक इमानेइतबारे पाळलेला आहे… पण प्रागतिक मनुष्याने मतांच्या ठरावीकपणाला चिकटून बसण्याइतका मनाचा दुबळेपणा दाखविणे म्हणजे जगात जगण्याची आपली नालायकी सिद्ध करण्यासारखे आहे. कालपर्यंत मी देवदेवतांचे अस्तित्व मानणारा होतो. आज मी देवविषयक सर्व भावनांच्या छाताडावर बॉम्ब फेकणारा लालबुंद क्रान्तिकारक बनलो आहे.` मार्च १९३० च्या शेवटच्या अंकात ते लिहितात, `प्रबोधन निरीश्वरवादी आहे. त्याचे सत्यशोधन सत्यशोधक समाजाच्याही पुढे गेलेले आहे. देव मानवात दलाल नको, या काथ्याकुटापेक्षा देवालाच उखडला तर दलाल उरतोच कोठे?` इथे `प्रबोधन`च्या लिखाणाचं एक वर्तुळ पूर्ण होतं.






आज लोकशाही अशी मरते आहे ...!

"जागतिक लोकशाही मंदीचे उदाहरण भारत देतो. भारताचे अलिकडेच हायब्रिड राजवटीत रूपांतर होणे हे जगाच्या हुकूमशाहीवर मोठा प्रभाव पाडते. आणि भारतातील लोकशाहीच्या घसरणीची पद्धत आज लोकशाही कशी मरते हे दर्शवते: नाट्यमय बंड किंवा विरोधी नेत्यांच्या मध्यरात्री अटकेद्वारे नाही, तर विरोधी पक्षांचा पूर्णपणे कायदेशीर छळ, माध्यमांना धमकावणे आणि कार्यकारी अधिकाराचे केंद्रीकरण यातून ते पुढे जाते. सरकारी टीकेची तुलना राष्ट्राप्रती असलेल्या बेईमानीने करून, नरेंद्र मोदींचे सरकार विरोधी पक्ष कायदेशीर आहे ही कल्पनाच कमी करत आहे. आज भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही राहिलेली नाही!" 
भारतापेक्षा कोणताही देश आपल्या जागतिक लोकशाही मंदीचे चांगले उदाहरण नाही. त्याच्या स्थापनेच्या वेळी, भारताच्या लोकशाहीने पहिल्या सात दशकांमध्ये अधिक स्थिरता मिळवून विरोधकांच्या सैन्याला गोंधळात टाकले. भारताची लोकशाहीची तीव्रता औपचारिक मार्गांनी झाली, लष्करावर नागरी राजवटीचे एकत्रीकरण तसेच दशकांच्या उत्साही बहुपक्षीय स्पर्धेद्वारे आणि  अनौपचारिक मार्गांनी, निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्याभोवतीच्या नियमांचे बळकटीकरण आणि औपचारिक राजकीय जीवनात महिला आणि इतर सामाजिक गटांचा वाढता सहभाग याद्वारे! भारतात लोकशाहीच्या बाबतीत दोन महत्त्वपूर्ण घसरण झाली आहे: जून १९७५ ते मार्च १९७७ हा २१ महिन्यांचा कालावधी, ज्याला आणीबाणी म्हणून ओळखले जाते आणि २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीपासून सुरू झालेला समकालीन घसरण. मोदींच्या कार्यकाळात, प्रमुख लोकशाही संस्था औपचारिकरित्या अस्तित्वात राहिल्या आहेत, तर लोकशाहीला आधार देणारे नियम आणि पद्धती मोठ्या प्रमाणात बिघडल्या आहेत. समकालीन भारतातील ही अनौपचारिक लोकशाही घसरण आणीबाणीच्या अगदी विरुद्ध आहे, जेव्हा इंदिरा गांधींनी जवळजवळ सर्व लोकशाही संस्था औपचारिकपणे संपवल्निया. नीवडणुकांवर बंदी घालणे, राजकीय विरोधकांना अटक करणे, नागरी स्वातंत्र्यांना हिरावून घेणे, स्वतंत्र माध्यमांना गळा दाबणे आणि देशाच्या न्यायालयांच्या अधिकाराला कमकुवत करणाऱ्या तीन घटनात्मक सुधारणा मंजूर करणे.तरीही लोकशाहीचे पर्यवेक्षक हे मान्य करतात की आज भारत पूर्ण लोकशाही आणि पूर्ण हुकूमशाही यांच्यातील एका खालच्या भागात कुठेतरी राहतो. लोकशाहीवर लक्ष ठेवणाऱ्या संस्था लोकशाहीचे वेगवेगळे वर्गीकरण करतात, परंतु ते सर्व आज भारताला "हायब्रिड राजवट" म्हणून वर्गीकृत करतात - म्हणजेच, पूर्ण लोकशाही किंवा पूर्ण हुकूमशाही नाही. आणि हे नवीन आहे. २०२१ मध्ये, फ्रीडम हाऊसने भारताचे रेटिंग फ्री वरून अंशतः फ्री (फक्त उरलेली श्रेणी फ्री नाही) असे खाली आणले. त्याच वर्षी, व्हेरिएटीज ऑफ डेमोक्रसी (व्ही-डेम) प्रकल्पाने भारताला बंदिस्त हुकूमशाही, निवडणूक हुकूमशाही, निवडणूक लोकशाही किंवा उदारमतवादी लोकशाहीच्या प्रमाणात "निवडणूक हुकूमशाही" च्या स्थितीत खाली आणले. आणि इकॉनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिटने भारताला पूर्ण लोकशाही, सदोष लोकशाही, संकरित राजवट आणि हुकूमशाही राजवटीच्या प्रमाणात "दोषपूर्ण लोकशाही" श्रेणीत स्थान दिले. भारताच्या लोकशाही अवनतीमुळे जगातील ८ अब्ज लोकांपैकी १.४ अब्ज लोक निरंकुश देशांच्या श्रेणीत आले. मुक्त ते अंशतः मुक्त असे त्याचे प्रमाण कमी झाल्याने स्वतंत्र देशात राहणाऱ्या जगाचा वाटा पूर्णपणे निम्मा झाला. लोकशाहीची भूमी, हुकूमशाहीचा समुद्र आणि संकरित प्रदेशांना चिन्हांकित करणारे दलदलीचे प्रदेश यांच्यातील संकल्पनात्मक रेषा तुम्ही जिथे काढता तिथे, भारताशिवाय आपले लोकशाही जग खूपच कमी लोकसंख्या असलेले आहे. आज भारत लोकशाही आहे का हा प्रश्न केवळ देशाच्या राजकीय भविष्याच्या विश्लेषणासाठीच नाही तर लोकशाही ट्रेंडच्या अधिक व्यापक आकलनासाठी महत्त्वाचा आहे. यावर्षी जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश भारत हा आहे जिथे लोकशाहीसाठी जागतिक लढाई लढली जात आहे.
काही लोक भारताचे हायब्रिड-राजकारण क्षेत्रात रूपांतर झाले आहे यावर असहमत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भारत सरकारने पाश्चात्य पक्षपातीपणाच्या आरोपांसह प्रतिक्रिया दिली आहे, भारताच्या लोकशाही अवनतीला "दिशाभूल करणारे, चुकीचे" म्हटले आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये, भारताच्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने लोकशाही क्रमवारीतील विसंगतींवर प्रकाश टाकणारा एक कार्यपत्र प्रसिद्ध केला. तरीही मध्यवर्ती बँकेच्या व्याजदरांप्रमाणे राजवटीचे मूल्यांकन स्वतंत्र संस्थांकडून सर्वोत्तम का केले जाते याचे कारण आहे. विशेष म्हणजे, लोकशाहीचे निरीक्षण करणारे पाश्चात्य लोकशाहीच्या गुणवत्तेवर टीका करण्यास लाजत नाहीत. परंतु स्वतंत्र आवाजांचा एक अल्पसंख्याक गट देखील भारताच्या संकरित राजवटीच्या पुनर्वर्गीकरणाला विरोध करतो. "भारताची लोकशाही का मरत नाही" या लेखात अखिलिश पिल्लमारी लिहितात की, "आज भारतातील सांस्कृतिक आणि सामाजिक ट्रेंड हे लोकशाहीच्या मागे जाण्याचे पुरावे नाहीत, तर ते भारतातील सामाजिक नियमांचे पुरावे आहेत जे भाषण, वैयक्तिक अभिव्यक्ती आणि टीकेबद्दल उदारमतवादी आहेत." तर भारत खरोखरच लोकशाहीच्या किनाऱ्यावरून निघून गेला आहे का? आणि जर तसे असेल तर, भारताचे संकरित राजवटीत संक्रमण उलट करता येईल का? दोन्ही प्रश्नांचे उत्तर हो आहे.
नावात काय आहे ?
भारताच्या लोकशाहीच्या घसरणीचे मूल्यांकन करण्यासाठी, सर्वप्रथम लोकशाहीची व्याख्या करणे आवश्यक आहे, कारण भारताच्या लोकशाहीच्या घसरणीवरील वादविवादाचा निर्णय संकल्पनात्मक स्पष्टतेवर अवलंबून आहे आणि कारण लोकशाही निःसंशयपणे मानक वैधतेचा अर्थ देते. अब्राहम लिंकनच्या म्हणण्यानुसार, लोकशाही ही एक संकल्पना आहे जी "लोकांची, लोकांद्वारे आणि लोकांसाठी" सरकारची व्यवस्था स्थापित करते. या कल्पनेला चालना देणाऱ्या लोकशाहीच्या गैर-मानक पैलूंवरील स्पष्टता आपल्याला भारताच्या लोकशाहीच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आपण वापरू शकतो अशा निकषांकडे निर्देश करते.
देशाला लोकशाही म्हणून घोषित करण्यासाठी पाच संस्था केंद्रस्थानी असतात यावर बहुतेक विद्वान सहमत आहेत. या पाच संस्थांपैकी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कायदेमंडळाच्या निवडणुका या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या आहेत. लोकशाहीचा दुसरा संस्थात्मक आधारस्तंभ म्हणजे खऱ्या राजकीय स्पर्धेची उपस्थिती. ज्या देशांमध्ये व्यक्तींना निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे, परंतु जिथे सत्ताधारी विरोधी पक्षांना संघटित करणे कठीण करतात त्यांना सामान्यतः लोकशाही मानले जात नाही. लोकशाहीसाठी इतर शक्तींकडून सरकारी स्वायत्तता देखील आवश्यक असते - जसे की वसाहतवादी शासक किंवा शक्तिशाली लष्करी अभिजात वर्ग - जे लोकशाही निवडणुका थांबवू शकतात किंवा पूर्णपणे उलथवू शकतात; ही स्वायत्तता तिसरा संस्थात्मक आधारस्तंभ आहे.
लोकशाहीसाठी आणखी दोन संस्था संकल्पनात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत कारण त्या नागरिकांना आणि सरकारच्या स्वतंत्र शाखांना सरकारच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यास सक्षम करतात: नागरी स्वातंत्र्य, चौथा स्तंभ आणि  कार्यकारी नियंत्रण, पाचवा स्तंभ. अनेक प्रमुख विद्वानांनी योग्यरित्या असा युक्तिवाद केला आहे की मूलभूत नागरी स्वातंत्र्यांचा समावेश नसलेल्या लोकशाहीच्या व्याख्या अपुर्या आहेत. गंभीर जनमत तयार करण्यास सक्षम करणारी स्वतंत्र प्रेस या नागरी स्वातंत्र्य स्तंभाचा भाग म्हणून वाढत्या प्रमाणात समजली जात आहे. लोकशाहीचा अंतिम संस्थात्मक स्तंभ, कार्यकारी नियंत्रण, ही निवडून आलेल्या सरकारच्या प्रमुखाला घोषित करण्यापासून रोखते.  लोकशाही ही अशा संस्थांचा संच आहे जी सरकारी जबाबदारीची प्रथा अंतर्भूत करते. ही जबाबदारी दोन रूपे घेते: लोक आणि निवडून आलेल्या सरकारच्या सर्वोच्च पातळींमधील उभ्या जबाबदारी, विशेषत: निवडणुका आणि पर्यायी राजकीय शक्ती; आणि कार्यकारी आणि स्वतंत्र संस्थांमधील क्षैतिज जबाबदारी, विशेषत: स्वतंत्र कायदेमंडळे आणि न्यायालये जी निवडून आलेल्या कार्यकारी अधिकारीला नागरी स्वातंत्र्य पायदळी तुडवण्यापासून रोखू शकतात.
लोकशाहीच्या या पाच-स्तंभीय संकल्पनेतून दोन महत्त्वाचे मुद्दे पुढे येतात जे भारताच्या समकालीन लोकशाही अधोगतीच्या आपल्या मूल्यांकनाशी संबंधित आहेत. पहिले म्हणजे लोकशाहीची विद्वत्तापूर्ण व्याख्या कालांतराने योग्यरित्या विस्तारली आहे. गेल्या अर्ध्या शतकात, हुकूमशाही नेत्यांनी लोकशाहीच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या संस्थांना रद्द करताना तिचे चौकटीत बसणे शिकले आहे, त्यामुळे लोकशाहीचे निरीक्षकांनी सरकारी संस्थांमध्ये जबाबदारी आहे का आणि संस्थात्मक अधिकार केवळ कायद्यातच नाहीत तर व्यवहारातही अस्तित्वात आहेत का याचे अधिक चांगले मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करून हुशारीने अनुकूलन केले आहे. लोकशाहीच्या विद्वत्तापूर्ण संकल्पनांचा विस्तार ज्या विशिष्ट पद्धतीने झाला आहे तो म्हणजे लोकशाहीला बळकटी देण्यासाठी संस्थात्मक नियमांचे महत्त्व नवीन प्रकारे समजले आहे. नॅन्सी बर्मेओ यांनी २०१६ मध्ये या पानांमध्ये भविष्यसूचकपणे लिहिले आहे की, आपण लोकशाहीच्या मागे हटण्याच्या युगात जगत आहोत, ज्याचे वैशिष्ट्य उघड लोकशाही बिघाडाचे पतन आहे. सत्तापालटाची जागा वचनबद्ध सत्तापालटांनी घेतली आहे "निवडून आलेल्या सरकारची हकालपट्टी लोकशाही कायदेशीरतेच्या संरक्षण म्हणून सादर करणे"; कार्यकारी सत्तापालटांची जागा कार्यकारी वाढीने घेतली आहे "निवडून आलेले अधिकारी कार्यकारी अधिकारावरील नियंत्रणे एकामागून एक कमकुवत करतात, कार्यकारी प्राधान्यांना आव्हान देण्याच्या विरोधी शक्तींच्या शक्तीला अडथळा आणणारे संस्थात्मक बदलांची मालिका हाती घेतात"; आणि निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या फसवणुकीची जागा निवडणुकीपूर्वीच्या धोरणात्मक हाताळणीने घेतली आहे "पदाधिकाऱ्यांच्या बाजूने निवडणूक क्षेत्र झुकवण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतींची श्रेणी" प्रतिबिंबित करते. दुसऱ्या शब्दांत, लोकशाही घसरण लोकशाही संस्थांच्या वाढत्या कमकुवतपणाचे रूप धारण करत आहे जिथे "त्रासलेल्या लोकशाही आता तुटण्याऐवजी क्षीण होण्याची शक्यता जास्त आहे." 
आणि अशा लोकशाही ऱ्हासाची सर्वात स्पष्ट चिन्हे म्हणजे निवडून आलेले नेते सर्व विरोधकांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि ते कमकुवत करण्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रत्येक कायदेशीर साधनाचा वापर करतात. ऐतिहासिक प्रकरणांच्या विस्तृत श्रेणीचा आधार घेत, स्टीव्हन लेवित्स्की आणि डॅनियल झिब्लॅट असा युक्तिवाद करतात की राजकीय विरोधाप्रती अलिखित नियम आणि वर्तनाचे निकष हे अशा लोकशाही ऱ्हासाला रोखण्याची गुरुकिल्ली आहेत. त्यांचा असा युक्तिवाद आहे की दोन सर्वात महत्वाचे निकष म्हणजे  विरोधी सहिष्णुता,  म्हणजे राजकीय विरोधकांना शत्रू म्हणून वागणूक दिली जात नाही तर फक्त राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून वागवले जाते आणि  सहनशीलता,  म्हणजेच कार्यकारी आदेश, व्हेटो आणि फिलिबस्टर यासारख्या विरोधकांना रोखण्यासाठी कायदेशीर पद्धतींचा मर्यादित वापर. 6  समकालीन लोकशाही विरोधी पक्ष एका रात्रीत हुकूमशाहीत रूपांतरित होत  नाहीत  . त्याऐवजी, जेव्हा विरोध सहन केला जात नाही आणि जेव्हा निवडून आलेले राजकारणी राजकीय विरोधाशी तडजोड करण्याऐवजी कायद्याच्या पूर्ण शक्तीचा वापर करून ते रद्द करतात तेव्हा लोकशाही हळूहळू मरते.
भारताचा समकालीन लोकशाहीचा ऱ्हास हा लोकशाहीला पाठिंबा देणाऱ्या या महत्त्वाच्या निकषांचा झपाट्याने ऱ्हास होत असल्याचे एक उदाहरण आहे. भारताच्या लोकशाहीच्या औपचारिक संस्था मुख्यत्वे फ्रीडम हाऊसच्या राजकीय-हक्क श्रेणीत प्रतिबिंबित होतात आणि लोकशाहीच्या निवडणुका, स्पर्धा आणि स्वायत्तता स्तंभांशी संबंधित गेल्या दशकात तुलनेने स्थिर राहिल्या आहेत. याउलट, भारताचा नागरी स्वातंत्र्य क्रमवारी २०१९ पासून वर्षानुवर्षे घसरत चालला आहे, २०१० मध्ये ४२ संभाव्य ६० पैकी गुणांवरून २०२३ मध्ये ३३ वर घसरला आहे. फ्रीडम हाऊसच्या नागरी स्वातंत्र्य निर्देशांकातील ही नऊ-बिंदूंची घसरण भारताला लोकशाहीच्या श्रेणीतून सर्वसाधारणपणे ७० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या संकरित राजवटीच्या प्रदेशात सर्वसाधारणपणे ३५ आणि ७० दरम्यान गुण मिळवणाऱ्या नेऊन टाकली आहे. आणि, मी खाली तपशीलवार सांगितल्याप्रमाणे, डाउनग्रेड आवश्यक आहे.
दुसरा, संबंधित मुद्दा असा आहे की एकच राजवट वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारे निरंकुश बनू शकते. आणि वेगवेगळे राजवटी तितक्याच अलोकतांत्रिक असू शकतात, परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे. लोकशाही मंदीने नाट्यमय स्वरूप धारण करण्याची गरज नाही, जसे की लष्करी उठाव किंवा  इंदिरा गांधींच्या आणीबाणीत भारताने पाहिलेल्या ऑटोगोल्पचा प्रकार. २०२३ मध्ये, फ्रीडम हाऊसने इराक आणि माली दोघांनाही मुक्त नाही म्हणून वर्गीकृत केले आणि त्यांना २९ गुण दिले - परंतु पूर्णपणे भिन्न कारणांसाठी. राजकीय अधिकारांमध्ये मालीचा क्रमांक कमी आहे. ४० पैकी ८ गुण कारण लष्करी उठावानंतर देश अद्याप नियमित निवडणुका घेण्यास परतलेला नाही. परंतु नागरी स्वातंत्र्यांसाठी पूर्ण हुकूमशाहींमध्ये माली उच्च स्थानावर आहे ६० पैकी २१ गुण कारण त्याचे माध्यम तुलनेने स्वतंत्र आहे आणि त्याला मतभेद आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व्यापक अधिकार आहेत. याउलट, इराक राजकीय अधिकारांवरील पूर्ण हुकूमशाहींमध्ये ४० पैकी १६ गुण तुलनेने उच्च आहे कारण ते नियमित, स्पर्धात्मक निवडणुका घेते आणि त्याचे विविध धार्मिक आणि वांशिक गट राजकीय व्यवस्थेत प्रतिनिधित्व राखतात. तरीही इराक नागरी स्वातंत्र्यांच्या बाबतीत कमी चांगले आहे ६० पैकी १३ गुण कारण मिलिशिया नागरिक आणि पत्रकारांना स्वातंत्र्यापासून वंचित ठेवत असल्याच्या वारंवार नोंदलेल्या घटना आहेत. काही क्षेत्रांमध्ये तीव्र घसरण होऊन देश लोकशाहीच्या उंबरठ्याखाली जाऊ शकतात. परंतु ते विविध निर्देशकांमध्ये काही प्रमाणात घसरण होऊन हायब्रिड-राजव्यवस्थेच्या क्षेत्रात देखील जाऊ शकतात - आणि हेच आपण समकालीन भारतात पाहतो.
स्थिर हक्क आणि घटते स्वातंत्र्य
भारताची लोकशाही कधीही उच्च दर्जाची नव्हती. स्वायत्त, स्पर्धात्मक निवडणुकांच्या औपचारिक अंमलबजावणीमध्ये व्यापक प्रमाणात नागरी स्वातंत्र्ये होती - जरी ती मोठ्या प्रमाणात गरिबी निर्मूलन कार्यक्रम आणि जगातील सर्वात मोठ्या सकारात्मक कृती कार्यक्रमात रूपांतरित झाली - त्यात नेहमीच अनेक कमतरता होत्या. परंतु लोकशाहीमध्ये एक अंतर्निहित ऑटोकरेक्ट वैशिष्ट्य देखील होते, ज्यामुळे सत्ताधारींना सत्तेवरून बाहेर काढता आले. ते ऑटोकरेक्ट वैशिष्ट्य आज बहुतेक  अनौपचारिक  मार्गांनी धोक्यात आले आहे. फ्रीडम हाऊसच्या राजकीय-हक्क स्कोअरच्या बाबतीत निवडणुका, स्पर्धा आणि स्वायत्ततेचे आधारस्तंभ समाविष्ट करून, मोदी सत्तेवर येण्यापूर्वीच्या नऊ वर्षांसाठी भारताची सरासरी २०१४ पासूनच्या नऊ वर्षांसारखीच होती. विद्यमान उलाढाल निवडणूकदृष्ट्या शक्य आहे परंतु अशक्य आहे कारण मोदी सरकारने लोकशाहीचे चौथे आणि पाचवे स्तंभ असलेल्या नागरी स्वातंत्र्यांचे आणि कार्यकारी निर्बंधांचे प्रत्यक्ष संरक्षण लक्षणीयरीत्या कमी केले आहे. भारताच्या नागरी-स्वातंत्र्य रेटिंगमधील घसरण ही त्याच्या समकालीन लोकशाही घसरणीचे कारण आहे. भारतीय न्यायालयांमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या केवळ अनियमितपणे संरक्षित असलेला मतभेदाचा कायदेशीर अधिकार कायदेशीररित्या अजूनही अस्तित्वात आहे, तर जबरदस्त छळापासून मुक्त असलेल्या मुखर मतभेदाची व्यावहारिक शक्यता जवळजवळ नाहीशी झाली आहे. २०१४ मध्ये मोदींचे भारतीय जनता पक्ष सरकार सत्तेत येण्यापूर्वी भारतातील माध्यमे, सामान्यतः चैतन्यशील आणि मुक्त असली तरी, कधीकधी त्यांच्यावर सेन्सॉरशिप करण्यात आली होती. परंतु आज, माध्यमे कायदेशीररित्या मतभेद व्यक्त करण्यास मुक्त असताना, स्वतंत्र पत्रकारितेचा व्यापक छळ आणि एकाग्र मालकी संरचनांमुळे पत्रकार आणि व्यक्ती उच्च प्रमाणात स्व-सेन्सॉरशिपचा सराव करत आहेत. कार्यकारी अधिकारावरील नियंत्रणे,औपचारिकरित्या अस्तित्वात असताना, वेगाने कमी होत आहेत.
नागरी स्वातंत्र्यांवर आमूलाग्र बंधने आहेत. २०१६ पासून, नागरी स्वातंत्र्यांवर काही प्रमाणात कायदेशीर आणि काही प्रमाणात व्यावहारिकदृष्ट्या अंकुश लावण्यात आला आहे. १९७ देशांमध्ये जागतिक नागरी स्वातंत्र्यांचा मागोवा घेणारी आंतरराष्ट्रीय संस्था, CIVICUS, आता भारताला खुले, अरुंद, अडथळा, दडपलेले आणि बंद अशा घटत्या प्रमाणात "दडपलेले" म्हणून वर्गीकृत करते. २०१९ मध्ये घडलेल्या "अडथळाग्रस्त" वरून अवनत केल्यामुळे, संस्थेच्या वेबसाइटनुसार, भारताचे नागरी स्थान असे होते जिथे "सत्ताधारकांवर टीका करणारे नागरी समाज सदस्य पाळत ठेवणे, छळ, धमकी, तुरुंगवास, दुखापत आणि मृत्यूचा धोका पत्करतात." त्याच्या शेजारी देशांमध्ये, भारत आता पाकिस्तान आणि बांगलादेशच्या समान रेटिंग श्रेणीत आहे आणि नेपाळ आणि श्रीलंकेपेक्षा कमी श्रेणीत आहे.
मोदी सरकारने टीकाकारांना शांत करण्यासाठी दोन प्रकारचे कायदे वाढत्या प्रमाणात वापरले आहेत - वसाहतकालीन देशद्रोह कायदे आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (UAPA). पोस्टर्स, सोशल मीडिया पोस्ट, घोषणा, वैयक्तिक संवाद आणि एका प्रकरणात, पाकिस्तानी क्रिकेट विजयासाठी आनंदाचे संदेश पोस्ट करण्याच्या स्वरूपात असहमती दर्शविल्याबद्दल अधिकाऱ्यांनी नियमितपणे देशद्रोह कायद्यांतर्गत व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत.  २०१० ते २०२१ दरम्यान देशद्रोहाच्या प्रकरणांमध्ये २८ टक्क्यांनी वाढ झाली. सरकारवर टीका केल्याबद्दल नागरिकांवर दाखल झालेल्या देशद्रोहाच्या खटल्यांपैकी ९६ टक्के खटले २०१४ मध्ये मोदी सत्तेत आल्यानंतर दाखल करण्यात आले होते. एका अहवालाचा अंदाज आहे की फक्त एका वर्षाच्या काळात, एकाच जिल्ह्यातील दहा हजार आदिवासी कार्यकर्त्यांवर त्यांच्या जमिनीच्या हक्कांसाठी देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला होता. २०१९ मध्ये बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्यात आली ज्यामुळे सरकारला दहशतवादी संघटनेशी विशिष्ट संबंध नसलेल्या व्यक्तींना दहशतवादी म्हणून घोषित करण्याची परवानगी देण्यात आली. या वर्गीकरणाला आव्हान देण्यासाठी न्यायालयीन उपाययोजनांची कोणतीही यंत्रणा नाही. कायदा आता स्पष्ट करतो की त्याचा वापर "धमकी देण्याची शक्यता" किंवा "लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याची शक्यता" अशी कोणतीही कृती करणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य करण्यासाठी केला जाऊ शकतो. २०१५ ते २०१९ दरम्यान, UAPA अंतर्गत अटकेत ७२ टक्के वाढ झाली आहे, अटक केलेल्यांपैकी ९८ टक्के जामिनाविना तुरुंगात आहेत. या मजबूत कायद्यांचे वारंवार आवाहन हे नवीन आहे आणि त्यामुळे मतभेदांना थंडावले आहे.  सरकारी धोरणांवरील टीकांना राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध किंवा "राष्ट्रविरोधी" असे व्यापकपणे लेबल लावून आणि समस्याग्रस्त ऑनलाइन मतभेद ओळखण्यासाठी स्वयंसेवकांची फौज नियुक्त करून राज्याने विरोधकांना घाबरवले आहे. भाजपच्या राजकारण्यांनी व्यक्ती, कारणे आणि संघटनांना लक्ष्य करणाऱ्या पद्धतींमध्ये "राष्ट्रविरोधी" हा शब्द लोकप्रिय केला आहे. 9  प्रथम शैक्षणिकांना लक्ष्य केले गेले, विद्यापीठ प्रशासक आणि प्राध्यापकांची चौकशी करण्यात आली, त्यांना शिस्त लावण्यात आली किंवा त्यांच्या राजकीय विचारांमुळे त्यांना पद सोडण्यास भाग पाडण्यात आले. परंतु अशा युक्त्या लवकरच वाढवल्या गेल्या ज्यामुळे कोणत्याही उच्च-प्रोफाइल मतभेदांना समाविष्ट केले गेले.
भारतातील मुस्लिम समुदाय, जो लोकसंख्येच्या १४ टक्के आहे, त्यांना नागरी स्वातंत्र्यांमध्ये विशेषतः लक्षणीय घट झाली आहे. मुस्लिमविरोधी हिंसाचाराच्या घटनांमध्ये, ज्यात लिंचिंग किंवा जमावाने केलेल्या हत्यांचा समावेश आहे, झपाट्याने वाढ झाली आहे. इंडियास्पेंडच्या मते, २०१० पासून भारतात हिंसाचाराच्या प्रमाणात गोवंशाशी संबंधित जमावाने केलेल्या मृत्यूंमध्ये (ज्यात गोमांस हाताळणाऱ्यांच्या अफवांचा समावेश आहे, विशेषत: मुस्लिम) लक्षणीय वाढ झाली आहे, २०१४ मध्ये मोदी सत्तेत आल्यानंतर २०१० ते २०१७ दरम्यान ९७ टक्के गोवंशाशी संबंधित हल्ले झाले आहेत. सार्वजनिक हत्येचे बळी बहुतेक मुस्लिम असल्याचे मानले जाते. ह्यूमन राईट्स वॉच आणि यूएस कमिशन ऑन रिलिजियस फ्रीडमसह अशा बाबींवर अहवाल देणाऱ्या बहुतेक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संस्थांनुसार, भारतातील सर्वात मोठा अल्पसंख्याक आता "भीतीच्या व्यापक वातावरणात" जगत आहे. १०  २०१९ मध्ये संसदेने नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर केल्यानंतर, मुस्लिमांविरुद्ध भेदभाव कायदेशीर स्वरूप धारण केले, विशेषतः मुस्लिम निर्वासितांना सुव्यवस्थित नागरिकत्व प्रक्रियेतून वगळण्यात आले. निरीक्षकांचा असा विश्वास आहे की या कायद्याचा, नियोजित राष्ट्रीय नागरिक नोंदणीसह, नागरिक असल्याचे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे नसलेल्या मुस्लिम मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी वापरला जाईल. भारतातील एकमेव मुस्लिम बहुल राज्य, जम्मू आणि काश्मीर, त्याच्या नागरी स्वातंत्र्यांवर बंदी घालत आहे जे प्रत्येक बाबतीत भारताच्या आणीबाणीसारखेच आहे - ही वस्तुस्थिती फ्रीडम हाऊसने भारतीय काश्मीरचे स्वतंत्र वर्गीकरण नॉट फ्री म्हणून केले आहे.
मतभेद व्यक्त करण्याच्या मर्यादित वैयक्तिक स्वातंत्र्यामुळे एकत्र येण्याच्या स्वातंत्र्यावरील कायदेशीर बंधने अधिकच वाढतात. भारतातील एकत्र येण्याच्या स्वातंत्र्याचे मूल्यांकन करणाऱ्या २०२१ च्या इंटरनॅशनल सेंटर फॉर नॉट-फॉर-प्रॉफिट लॉच्या अहवालात असे आढळून आले आहे: "सार्वजनिक निषेधांना राक्षसी आणि गुन्हेगारी करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीमध्ये, ज्यामध्ये संमेलन आयोजकांची बदनामी देखील समाविष्ट आहे, एक दंडात्मक, सुरक्षा-केंद्रित दृष्टिकोन वाढत्या प्रमाणात वापरला जात आहे." ११
सरकारने निषेधाचे समन्वय साधण्याचे प्रत्यक्ष साधन असलेल्या इंटरनेटवर वारंवार बंदी घातली आहे. २०२२ मध्ये सरकार-निर्देशित ८४ इंटरनेट बंदसह भारत केवळ जगात आघाडीवर नाही, तर प्रभावी सार्वजनिक समन्वयाला अडथळा आणण्यासाठी निदर्शनांच्या आधी आणि दरम्यान हे ब्लॅकआउट लागू केले जातात, बहुतेकदा निलंबनासाठी स्पष्ट निकष नसतात. १२  अहवालात असे आढळून आले आहे की भाषण आणि सभेसाठीचे कायदेशीर संरक्षण केवळ किरकोळ प्रमाणात कमी झाले असले तरी, प्रत्यक्षात संरक्षण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.
नागरी समाजातील सरकारच्या टीकाकारांना वारंवार प्रशासकीय छळाचे लक्ष्य केले जाते. २०२० मध्ये, मोदी सरकारने नागरी समाजाच्या स्वातंत्र्याचा गळा दाबण्यासाठी परकीय योगदान नियमन कायदा (FCRA) कडक केला, परकीय निधी हस्तांतरणाच्या रसदांना लक्ष्य केले, स्वयंसेवी संस्थांमध्ये खर्चाचे स्वरूप आणि निधी वाटप मर्यादित केले, केंद्र आणि राज्य सरकारांना स्वेच्छेने स्वयंसेवी संस्थांना निलंबित करण्याचा अधिकार दिला आणि सार्वजनिक कर्मचाऱ्यांना संघटनांमध्ये सामील होण्यापासून रोखले. सरकारी अधिकाऱ्यांनी अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल, ग्रीनपीस, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च, फोर्ड फाउंडेशन, लॉयर्स कलेक्टिव्ह आणि ऑक्सफॅम यासारख्या नागरी समाज गटांच्या विस्तृत श्रेणीविरुद्ध तांत्रिक परंतु पूर्णपणे कायदेशीर आधारांवर आर्थिक ऑडिट आणि कर-संबंधित छापे पद्धतशीरपणे वापरले आहेत. १३
गेल्या दशकात, भारतीय माध्यमांनी थेट धमकी आणि संरचनात्मक बदलांमुळे सरकारवर टीका करण्याचे प्रमाण कमी केले आहे. २०१४ पासून, रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्सच्या जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकात भारत १८० देशांपैकी १६१ व्या स्थानावर घसरला आहे, जो अफगाणिस्तान, बेलारूस, हाँगकाँग, लिबिया, पाकिस्तान आणि तुर्कीपेक्षा खाली आहे. संस्थेच्या मते, भारतीय पत्रकारांना कधीकधी जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात आणि सरकारशी संबंधित ट्रोल फार्मद्वारे चालवल्या जाणाऱ्या सोशल-मीडिया द्वेष मोहिमांचे ते वारंवार लक्ष्य असतात. प्रमुख माध्यम नेटवर्क मोदी सरकारवर टीका करण्यास मोकळे वाटत नाहीत. २०२० मध्ये तीन महिन्यांत टाईम्स नाऊ या चॅनलवरील प्राइम-टाइम टेलिव्हिजन वादविवादांचे विश्लेषण करणाऱ्या एका अभ्यासात असे आढळून आले की  ज्यामध्ये कोणत्याही स्वरूपात मोदी सरकारवर टीका केलेली एकही  एपिसोड नाही  . २०१७ ते २०२० पर्यंत रिपब्लिक टीव्हीच्या एका वेगळ्या अभ्यासात कव्हरेज "मोदी सरकार आणि त्याच्या धोरणांच्या बाजूने सातत्याने पक्षपाती" असल्याचे आढळून आले. १४  मोदींनी स्वतः माध्यमांशी संवाद मर्यादित केला आहे, गेल्या नऊ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही.
निवडक परवाने देणे, मोदींशी संलग्न व्यावसायिकांकडून स्वतंत्र नेटवर्क्सचे अधिग्रहण करणे आणि उर्वरित काही स्वतंत्र आउटलेट्सचा छळ करणे यासारख्या पद्धती मीडिया स्वातंत्र्याला आणखी कमकुवत करतात. उदाहरणार्थ, सरकारने टेलिव्हिजन प्रसारणासाठी परवाना दिला पाहिजे आणि महत्त्वाच्या देशांतर्गत संस्थांना परवाने नाकारले पाहिजेत. सरकारने क्विंट न्यूज वेबसाइटचे संस्थापक राघव बहल (ब्लूमबर्गसोबत भागीदारीत काम करत) यांचा परवाना इतका काळ रोखला की त्यांनी कंपनीचा टेलिव्हिजन विभाग बंद केला. २०१९ मध्ये बहलची चौकशी करण्यात आली आणि त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप ठेवण्यात आला .
भारतातील वृत्तसंस्थांची संख्या ही भरभराटीच्या माध्यमांना सूचित करते असे दिसते, परंतु कार्यात्मक मालकी संरचनेची तपासणी अन्यथा दर्शवते. स्वतंत्र मीडिया ओनरशिप मॉनिटरला भारतात "केंद्रित होण्याकडे आणि शेवटी सामग्री आणि जनमतावर नियंत्रण ठेवण्याकडे एक महत्त्वपूर्ण कल" आढळतो. १५  मोदींशी जवळचे संबंध असलेले उद्योगपती मुकेश अंबानी, किमान ८०० दशलक्ष भारतीयांनंतर थेट माध्यमांचे नियंत्रण करतात. मोदींचे आणखी एक जवळचे सहकारी, गौतम अदानी यांनी डिसेंबर २०२२ मध्ये भारतातील शेवटचे मोठे स्वतंत्र टेलिव्हिजन नेटवर्क, एनडीटीव्ही विकत घेतले. १६  विश्लेषकांच्या मते, अदानी यांनी एनडीटीव्हीचे अधिग्रहण "भारतातील स्वतंत्र माध्यमांसाठी शेवटचा खेळ दर्शविते, ज्यामुळे देशातील सर्वात मोठे टेलिव्हिजन वृत्तवाहिन्या भारत सरकारशी मजबूत संबंध असलेल्या अब्जाधीशांच्या हाती सोडल्या जातात." १७  स्वतंत्र बातम्यांचे काही लहान, दृढनिश्चयी स्रोत शिल्लक असताना, २०१३ पासून त्यांना त्यांच्या रिपोर्टिंगसाठी कर छापे आणि खटल्यांचा सामना करावा लागला आहे.
सरकार आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनाही त्यांच्या टीकेसाठी लक्ष्य करते, सामान्यत: टीकात्मक परदेशी बातम्यांचे वृत्तांकन भारताच्या जागतिक उदयाला रोखण्याच्या कटाचा भाग म्हणून दाखवते.  ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या भारतीय कार्यालयांवर फेब्रुवारी २०२३ मध्ये छापे टाकण्यात आले होते, वृत्तसंस्थेने मोदी सरकारवर टीका करणारा एक माहितीपट प्रसिद्ध केल्यानंतर काही आठवड्यांनीच. आणीबाणीच्या काळात वापरल्या जाणाऱ्या कायद्यांचा वापर करून काही महिन्यांपूर्वीच बीबीसी माहितीपट आणि कोणत्याही क्लिप भारतात प्रसारित करण्यावर बंदी घालण्यात आली होती. छापे टाकताच, भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी बीबीसीला "जगातील सर्वात भ्रष्ट संस्था" म्हटले. १८  मी शिकवत असलेल्या डझनभर भारतीय विद्यार्थ्यांपैकी काहींनी ऑक्सफर्ड विद्यापीठात या माहितीपटाचे खाजगी प्रदर्शन आयोजित केले तेव्हा त्यांच्यात भीती स्पष्टपणे जाणवली. निमंत्रितांना सोशल मीडियावर पोस्ट करण्यापासून आणि व्हॉट्सअॅप संदेशांची देवाणघेवाण करण्यापासून दूर राहण्यास सांगितले गेले, कारण नियमित थांब्यांदरम्यान पोलिसांनी व्यक्तींना त्यांचे फोन अनलॉक करण्यास सांगितलेले व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. १९ मोदी सरकारच्या काळात कार्यकारी कारवाईची कायदेशीर तपासणी खऱ्या अर्थाने कमी होत चालली आहे. भारतातील प्राथमिक संसदीय संस्थांच्या समित्या कार्यकारी मंडळावर एक महत्त्वाचा नियंत्रण म्हणून काम करतात, सर्व विधेयकांच्या गुणवत्तेचे बारकाईने परीक्षण करतात आणि त्यावर चर्चा करतात. मोदी सत्तेत येण्यापूर्वी २००९-१४ च्या संसदेत समित्यांनी ७१ टक्के विधेयकांची छाननी केली आणि मोदींच्या पहिल्या कार्यकाळात २०१४-१९ च्या संसदेत फक्त २५ टक्के विधेयकांची छाननी केली. २०१९ पासून, अशा छाननीचे प्रमाण १३ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे, २०२० च्या साथीच्या काळात एकही कायदेविषयक विधेयक समितीकडे पाठवले गेले नाही. अलिकडच्या काळात भारतातील काही महत्त्वाचे कायदे आणि राजकीय निर्णय - चार तासांच्या सूचनेसह राष्ट्रीय लॉकडाऊन लादणे, नोटाबंदी, शेती कायदे - संसदीय सल्लामसलतीशिवाय आणि विरोधी पक्षांच्या निषेधाशिवाय मंजूर झाले. मोदी सरकारने व्हिसलब्लोअर संरक्षण कमकुवत करण्यासाठी अनेक कायदेशीर सुधारणा देखील आणल्या. २०
संसदेला कार्यकारी जबाबदारीचा वाढता अभाव वाढत चाललेल्या शांत न्यायव्यवस्थेमुळे अधिकच वाढला आहे. सर्वोच्च न्यायालय हे  भारताच्या संविधानाचे आणि त्याद्वारे नागरी स्वातंत्र्यांचे संरक्षक  आहे. २०१४ पूर्वीच्या दोन दशकांमध्ये, सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून आले, ज्यामुळे त्याला "जगातील सर्वात शक्तिशाली सर्वोच्च न्यायालय" असे नाव मिळाले. २१  केंद्र सरकारने वादग्रस्तपणे स्वतंत्र विचारसरणीच्या न्यायाधीशांची बदली केल्याने आणि कार्यकारी अधिकार नियंत्रित करणारे निकष कमी केल्याने हे लक्षणीयरीत्या बदलले आहे. २२  अशा हालचालींमुळे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या चार सर्वात वरिष्ठ सदस्यांनी २०१८ मध्ये एक अभूतपूर्व पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्यांनी इशारा दिला की मुख्य न्यायाधीशांनी खटले असामान्यपणे सोपवणे हे राजकीय हस्तक्षेपाचे लक्षण असू शकते. त्या चार न्यायाधीशांपैकी एक, जस्ती चेलमेश्वर यांनीही मुख्य न्यायाधीशांना एक खुले पत्र लिहून इशारा दिला की "कोणत्याही राज्यातील न्यायव्यवस्था आणि सरकारमधील सौहार्द लोकशाहीसाठी मृत्युघंटा असल्याचे दिसते." २३  सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या मंदिर, आधार बायोमेट्रिक आयडी सिस्टम,  काश्मीरमधील हेबियस कॉर्पस  , निवडणूक बंधपत्रे, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा यासारख्या प्रत्येक प्रमुख राजकीय मुद्द्यावर दिलेले निर्णय मोदी सरकारच्या बाजूने गेले आहेत. हे भूतकाळातील परिस्थितीशी एक वेगळेपणा दर्शवते. आणीबाणीच्या काळात आणि आजच्या सर्वोच्च न्यायालयातील व्यावहारिक फरक कमी आहे. काही जण असाही युक्तिवाद करतात की, आजची आणीबाणी ही फक्त "अघोषित" आहे. २४
 भारतीय लोकशाही वाचवता येईल का?
जगातील इतरत्रांप्रमाणे भारतातील लोकशाही आज लष्करी उठाव किंवा विरोधकांच्या नाट्यमय, समन्वित सामूहिक अटकेमुळे मरत नाही. त्याऐवजी, हुकूमशहांनी लोकशाही पद्धतीने बोलणे आणि हुकूमशहा पद्धतीने चालणे शिकले आहे, लोकशाहीचा कायदेशीर चेहरा राखत विरोधकांना त्रास देत आहे आणि निष्ठावंत मतभेदांसाठी जागा कमी करत आहे. भारतातील लोकशाहीच्या औपचारिक संस्था देखील दबावाखाली आहेत - मोदींच्या सर्वात प्रमुख राजकीय प्रतिस्पर्ध्यांना अलीकडेच निवडणुकीत उतरण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे - हे प्रामुख्याने सामान्य नागरिकाला सरकारी धोरणांचे गंभीर मूल्यांकन वाचण्याची, छळाच्या भीतीशिवाय बोलण्याची आणि मुक्तपणे एकत्र येण्याची असमर्थता तसेच कार्यकारी अधिकारांवर ठोस नियंत्रण नसल्यामुळे भारत एका संकरित राजवटीत बदलला आहे.
भारताची लोकशाही घसरण वास्तविक असली तरी ती अपरिवर्तनीय नाही. जरी संकरित राजवटी बहुतेकदा स्थिर असतात, परंतु जोपर्यंत मतपत्रिका गुप्त राहतात आणि निवडणुकांचे निष्पक्ष निरीक्षण केले जाते तोपर्यंत निवडणुका जबाबदारीचे खरे क्षण राहतात. देखरेखीच्या पूर्णपणे सुधारित धोरणांसह पूर्णपणे हुकूमशहा राजवटी देखील प्रभावी निषेधाच्या क्षणांना सामोरे जातात कारण हुकूमशहा सत्तेच्या रचना अशा राजवटींना नागरिकांच्या चिंता - लोकशाही काय सर्वोत्तम करते याची अचूक समज मिळविण्यापासून रोखतात. चीनच्या शून्य-कोविड धोरण, इराणचे नैतिकता पोलिस आणि भारताच्या कृषी कायद्यांविरुद्धच्या अलीकडील निषेधांनी मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होण्याच्या शाश्वत शक्यतांवर प्रकाश टाकला आहे.
पुढे जाऊन, लोकशाही पुनरुज्जीवनाचा भारताचा सर्वात खात्रीशीर मार्ग म्हणजे सुविकसित संघटनात्मक मुळे असलेला खरा विरोधी पक्ष उदयास येणे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकेकाळी असाच पक्ष होता, परंतु १९६९ मध्ये इंदिरा गांधींनी पक्षाचे विभाजन केले आणि सत्तेचे केंद्रीकरण करण्याच्या प्रयत्नात तळागाळातील पक्ष पायाभूत सुविधा तोडल्या तेव्हा त्यांचे तळागाळातील संबंध नाहीसे झाले. भारतातील सिलिकॉन व्हॅलीचे घर असलेल्या दक्षिणेकडील राज्य कर्नाटकमध्ये अलिकडच्याच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश भाजपच्या चालू निवडणूक असुरक्षिततेला अधोरेखित करते आणि राहुल गांधींच्या तळागाळातील मोहिमे, भारत जोडो यात्रेला कदाचित त्याचे काही कारण आहे. २५  लहान पातळीवर, आम आदमी पक्ष ही एक आशादायक राजकीय शक्ती आहे जी दिल्लीच्या पायाच्या पलीकडे जाण्यात यशस्वी झाली आहे. परंतु दोन्ही पक्षांना त्यांच्या करिष्माई नेत्यांच्या पलीकडे कायमचा विकास करण्यासाठी दीर्घ लढाईचा सामना करावा लागतो. आणि नेहमीप्रमाणे, सत्तेचा प्रभावीपणे वापर करण्यापूर्वी व्यक्तींच्या पलीकडे चांगले संघटित असले पाहिजे. भाजपा, ज्यांची संघटनात्मक मुळे जवळजवळ एक शतकापासून वाढत आहेत, त्यांच्याविरुद्ध उभे राहणे ही एक कठीण परिस्थिती असेल. पण अशक्य नाही.
हरीश केंची,
९४२२३१०६०९






'नाही मी बोलत आता... !'

भारताइतपत बडबड-पटू वाचाळ देश दुसरा नसेल! इथली ताडित, पीडित नि शोषित गरीब जनता मुक्या मेंढराप्रमाणे असली, तरी बुद्धिजीवी 'पुढारी' क्लास भलताच बोलघेवडा आहे. म्हणूनच 'मौन' हे दुर्मिळ नि महत्वाचं...! काही वर्षापूर्वी मौन हे एक वाचिक हत्यार समजलं जात असे. महात्मा गांधींपासून विनोबाजी भावे यांच्यापर्यंत अनेकांनी ही मौन धारण केलं होतं. आज मात्र वाचाळ नेत्यांची मांदियाळी झालीय. ताल, तोल, बोल यांचा मनसोक्तपणे अन् उदंड वापर करत विरोधकांवर हल्लाबोल करत असतात. त्याचं कुणालाच वैषम्य वाटत नाही. याबाबत त्यांच्या मालकांना, चालकांना ना खेद, ना चीड, ना चाड राहिलीय. या पार्श्वभूमीवर मौन हे किती महत्वाचं असतं, त्याचं सामर्थ्य किती असतं ते दिसून येईल. मौनाचं हे महत्व आचार्य विनोबाजी भावे यांच्या 'मौनवता'च्या घोषणेनं अधिकच वाढवलं होत. 'आचार्यांचं वर्षभराचं मौनव्रत ही एक कठोर साधना होती. त्यायोगे ते उच्चतर आध्यात्मिक शिखरं पादाक्रांत केलं आहे. सर्वोच्च तत्त्वांवर त्यांची दृष्टी स्थिर होत आहे...', असं जे भाष्य जयप्रकाश नारायण यांनी केलं होत, त्यावरूनही विनोबाजीच्या मौनाचं माहात्म्य लक्षात येईल. अध्यात्म-साधनेतच नव्हे, तर व्यवहारसाधनेतही मौन फार उपयुक्त ठरतं, हे आपल्या शहाण्या पूर्वजांनी ओळखलं होतं. म्हणूनच त्यांनी अनेक 'मौन-प्रकार' सुचविलं होतं. उदाहरणार्थ, मूर्खत्व झाकणारं मौन ! विद्वानांच्या सभेत अ-विद्वानांनी गप्प बसणंच श्रेयस्कर "विभूषणं मौनम पंडितानाम् ....!' त्यामुळं अ-विद्वानांचं अज्ञान प्रकट न होता तथाकथित विद्वत्तेची झाकली मूठ सव्वालाखाची ठरतं! बेसूर गवय्यांना संगीत सभेत 'गानमीन' भूषणावह ठरतं. जसं सुरेल नि सुमधुर कोकिळांच्या मैफलीत कर्णकटू कावळ्यांनी 'कौरव' न करणंच शोभादायक! अलीकडं राजकीय आजाराप्रमाणेच 'राजकीय मौन' ही बरंच प्रचारात आलंय. पत्रकारांनी विचारलेल्या खोचक प्रश्नांना राजकीय पुढारी उत्तर देण्याचं टाळतात नि 'नाही मी बोलत आता....!' असं म्हणतात तेव्हा अनेक तर्ककुतर्कांना जन्म देणारं 'राजकीय मौन' आकारास येतं !
'नाही मी बोलत नाथा...', असं म्हणणाऱ्या प्रणयिनीचं खोट्याखोट्या रागातील 'अनुरागमौन' तर रसिकांच्या चांगल्याच परिचयाचं आहे. प्रियकराच्या गळ्यात गळा घालून उद्यानातल्या निवांत कोपऱ्यात केलेल्या कुंजकूजनाहूनही, शयन मंदिरात केलेलं हे 'अनुराग मौन' अधिक लज्जतदार असतं कारण ते प्रियकराच्या अनुनय कौशल्याला उधाण आणतं. 
'नच सुंदरी करू कोपा...' पासून ते 
'हम भी मुंह में जवान रखते हैं।
काश पूछों के मुद्दुआ क्या है...॥' 
ह्या अर्ज-विनंतीपर्यंत शेकडो गोड गोड शब्दांचे नाजूक बुडबुडे त्याला उधळावे लागतात! इतकंच नव्हे, तर 'पाया पडतो. राणीसरकार, दासाला क्षमा करावी अन् आपल्या साखरओठांतून साखरेहून गोड शब्द बाहेर येऊ द्यावेत अशी शरणागती देऊन प्रेयसीच्या चरणारविंदी मिलिंदायमान व्हावं लागतं आणि मग त्या लटक्या क्षणभंगुर-अबोल्याची ऊर्फ मौनाची शृंखला जेव्हा खुदकन हास्यानं ताटकन तुटतं तेव्हा शृंगारही उत्-शृंखल होतो! इतका की प्रेयसी पुनश्च मुक्याचं व्रत आचरतं पण त्याचं कारण, तिच्या नाजुक ओठावर शंभर मुक्यांची अखंड बरसात होतं हेच! मग  "जे शब्देवीण संवादिजे..!' असं रतिरंगनाट्य बहरास येतं !
विविध प्रकारांच्या ह्या मौनांची महती ठाऊक असूनही विनोबाजीच्या मौनव्रतांनं व्यथित झालेले लाखो लोक ह्या देशात होते कारण, विनोबांनी केवळ अध्यात्मसाधनेसाठी 'नाही मी बोलत आता...!' हा बाणा वर्षभरासाठी स्वीकारला असावा असं त्यांना वाटत नाही आचार्य विनोबांचे सर्वोदयी विचार सर्वांना पटतील असं नाही. किंबहुना या तामसीयुगात नि भोगवादी दुनियेत ते बहुतेकांना अव्यवहार्यच वाटतात आणि तरीही ज्यांनी काही बोलावं, देशकालपरिस्थितीवर आपलं मौलिक विचार मांडावेत; विचारांना धक्के देऊन विचार प्रवर्तक भाष्य करावं, अशा मोजक्या चितनशील विद्वानांत त्यांचा समावेश जरूर होतो. अशा ज्ञानयोगी संतपुरुषाला प्रदीर्घ मौन स्वीकारणंच श्रेयस्कर वाटावं, हीच सध्याच्या स्वार्थग्रस्त भ्रष्ट जमान्यावर अत्यंत बोलकी टीका होय, असंच अनेकांना वाटतं होत. 'महाभारता'चे निर्माते व्यासमहर्षी एके ठिकाणी वैतागानं म्हणतात.
'ऊर्ध्ववाहु विरोम्येष नहि कश्चित् शृणोतु मे...l'
मी बाहू उंचावून आक्रंदन करीत आहे, पण माझे कोणीही ऐकत नाही....! 
व्यासमहर्षीप्रमाणेच ह्या सर्वोदयमहर्षीला तेव्हा वाटलं असेल काय? आणि म्हणूनच त्यांनी हे प्रदीर्घ मौनव्रत स्वीकारलं असेल काय ? 'राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय' अशा घोषणा करत कैक सत्ताधारी साधनशुचितेला पायदळी तुडवीत आहेत आणि त्यांना विरोध करणारेही कैक महात्मे 'End justifies the means' ह्या कम्युनिस्ट धोरणाचा कळत-नकळत पाठपुरावा करताहेत, केवळ प्रक्षोभाचं सनसनाटी राजकारण खेळताहेत.
तर मग कोणाला निंदावं? कोणाला वंदावं? कोणाला शहाणपण सांगावं ? मद्यप्याच्या मदहोष मैफलीत सात्त्विक मार्गाचा मंत्रघोष काय कामाचा ? ह्या वैतागातूनच आचार्य विनोबांचं हे सांवत्सरिक मौन अवतरलं होत काय ? मिर्झा गालिबप्रमाणेच हा संतपुरुष मनातल्या मनात
'है ऐसीही कुछ बात जो चुप हूं। 
वर्ना क्या बात करनी नहीं आती?...॥'
अशाच काही जीवघेण्या घटना घडल्या आहेत म्हणून मी चूप बसलो आहे. एरव्ही काय मला उत्तम वक्तृत्व करता येत नाही? असं म्हणत असेल काय ?
अहो, विनोबाच का? ह्या देशातील हजारो सुज्ञ पुरुषांना 'मौन बरं वाटतं...!' बुद्धिमंतांना हतबुद्ध करणाऱ्या ह्या सत्तांध राजकारणाच्या नि भ्रष्ट अर्थकारणाच्या जमान्यात कुणाला काही शहाणपण सांगणं हाच वेडेपणा, असं खऱ्या विद्वानांना वाटू लागलं आहे. हा लोकशाहीचा नव्हे, तर झुंडशाहीचा वर्षाकाळ ह्या काळी कैक विद्वत्-कोकीळ स्वतःला म्हणताहेत,
भद्रं भद्रं कृतं मौन। 
कोकिळाः जलदागमे ॥
अरे, जिथं डबक्यातले बेडूक महान वक्ते बनले आहेत, तेथे कोकिळांनी आपला गळा न शिणविणेच चांगले !
-कृष्णद्वैपायन

कबूतर जा... जा.... जा


अरेबियन नाईटस् कथांमधील निरोप्याचं काम करणारी कबुतरं मुंबईत राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेली आहेत. दोन महिन्यांपूर्वी भूतदयावादी जैन बांधवांनी दादर कबुतरखान्यावर आच्छादलेल्या ताडपत्र्या, चाकू-कात्र्या घेऊन, कापून काढल्या होत्या, त्यामध्ये महिला आघाडीवर होत्या. सर्वत्र टीका झाल्यावर त्यांच्यावर महानगरपालिकेनं गुन्हे नोंदवलेले होते. त्यानंतर परम अहिंसक मुनींनी सर्वोच्च न्यायालयालाच आव्हान दिलं होतं. न्यायालयाचा निर्णय मानणार नाही. असा पवित्रा घेतला होता. अध्यात्म कायद्याचं राज्य मानत नाही. याला असं म्हणावं काय? पण कायद्याचं राज्य तर ,सर्वच धर्मांना, गुण्यागोविंदानं नांदण्याचं स्वातंत्र्य देतं. कायद्याला न जुमानणाऱ्या मुनींमधील अहंकार किती पराकोटीचा आहे. हे त्यांच्या ताज्या वक्तव्यावरुन दिसून येत आहे.
"एखाद-दुसरा माणूस मेला तरी हरकत नाही,पण कबुतर जगलं पाहिजे" असं प्रवचन देणाऱ्या मुनींनी आपलेही पाय मातीचेच आहेत, याची कबुली दिली आहे. धर्म तर्कशास्त्र मानणारा आहे, विज्ञानवादी आहे, असं समजलं जातं. ते खरंही असेल पण सध्या मुंबईत जे काही चाललं आहे, त्यावरुन ही जैनबुध्दी नसून राजकारणासाठी दुसराच मेंदू सध्या मुंबईत फिरत आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवलेल्या होत्या. त्या आता जानेवारीपर्यंत उरकावयाच्या आहेत. गेली पाचसहा वर्षे महाराष्ट्राच्या दूषित राजकारणाचा गळू फुटून वाहात आहे. त्याचे ओघळ एका मुनीच्या बैठकीखाली वाहात आलेले आहेत. त्याच्या संसर्गानं मुनीची सगळी तपश्चर्या वाया घालवली आहे. मुंबईतील सगळेच जैन बांधव मुनींच्या मतांचे नाहीत. हे इथं ध्यानात घ्यावं लागेल. काही डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयात हे सिद्ध केलेलं आहे की, कबुतरांच्या विष्ठेमुळं आणि पंखातील विषाणूंमुळं श्वसनाचे विकार होऊन फुफ्फुसे निकामी होतात. यावर मुनींनी डॉक्टरांना मूर्ख म्हणून आगपाखड केली आहे. त्यामध्ये जैन डॉक्टरांचाही समावेश आहे. जैन प्रॅक्टिशनर अधिक तर होमिओपॅथी प्रॅक्टिस करतात. कांदा-लसूण या उग्रांचं वावडं असल्यानं, सात्विकता म्हणून होमिओपॅथी प्रॅक्टिस करीत आहेत. पण बोलणं आणि कृती यांमध्ये जी ठासून भरलेली हिंसा आहे. ती होमिओपॅथी साबुदाणा गोळ्यांनाही दाद देत नाही. एका बाजूला व्यापारातून आर्थिक शोषण करायचं. दुसऱ्या बाजूला कबुतरांना दाणे टाकून पापक्षालन करायचं.
जर्दा-गुटक्याची लत लाऊन अन् कॅंसरचं इस्पितळही खोलायचं आणि पुण्यात्मा म्हणून मिरवूनही घ्यायचं. चोवीस तिर्थंकरांच्या शिकवणुकीवर पार बोळा फिरवला आहे.
कबुतरांबद्दल आकस असण्याचं काही कारण नाही, इतर पक्षांमुळंही असं होऊ शकतं. पण कबुतर माणसांच्या घराच्या आसपास सतत गिरक्या घेत असतात. वळचणीला त्यांनी संसार थाटलेला असतो. त्यामुळं कबुतरांच्या उपद्रवाचा अनुभव आला आहे. म्हणूनच कबुतरांबद्दल बोललं जातं. इतर पक्षांचा अनुभव आला तर, त्याबद्दलही बोललं जाईल. "जगा आणि जगू द्या" या वचनाला हरकत असण्याचं काही कारण नाही. पण कबुतरं जगविण्यासाठी माणसं मेली तरी हरकत नाही. असं म्हणणारे मुनी म्हणजे अहिंसेतही स्पृश्यास्पृश्य मानणारे म्हणावे लागतील. आपण कोणत्या थराला जात आहेत याचं भान त्यांनाही नाही. असो.
मुंबई हा देशाचा खजिना आहे. त्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न अनेक दशकं चाललेला आहे. पण यश आले नाही. अनेकांनी,शंका व्यक्त केली आहे की, मुंबईतील काही राजकारण्यांनी ठरवलेलं आहे की, मुंबई बिगर मराठी माणसांनीताब्यात घेऊन पालिकेत ठराव करायचा की, मुंबईला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा द्यायचा. कालांतरानं मुंबई गुजरातला जोडून घ्यायची. शंका व्यक्त करणाऱ्यांना हे ठाऊक नाही की, मुंबईसाठी मराठी माणसांनी जे रक्त सांडले होते त्याला छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वाभिमानाची परंपरा आहे. सुरतेवर हल्ला करुन सुरतेला तेव्हाच इशारा दिला होता की, मराठी माणसांच्या नादी लागू नका. नाहीतर बद-सुरत करु.
वास्तविक कबुतर पालनाचा या राजकारणाशी काहीही संबंध नाही. महाराष्ट्रात एकेकाळी, कबुतरांच्या अनेक ढाबळी होत्या. पण कालौघात जागेचं अपुरेपण शहारांची महानगरं बनली माणसांनाच खुराडी अपुरी पडू लागली आहेत, तेथे कबुतरांवर गंडांतर येणारच दाट लोकसंख्येच्या घनतेमुळं रोगराई लवकर पसरते. औद्योगिक मुंबई चोवीस तास जागी असते. त्यामुळं आसपासचं पक्षी जगतही जागं असतं. माणसांच्या सवयी पाखरांनाही लागतात. उडणाऱ्या पक्षांना वळचणीसाठी सातबाराच्या दाखल्याची आवश्यकता नसते. माणसांसारखी हाव पक्षांना नसली तरी निवाऱ्याला वळचण लागतेच. मानवी वस्तीत अन्नाची गरज भागते. हे त्यांना माहित झालं आहे. पण कबुतरांची गरज माणसांना नाही म्हणून निर्मनुष्य ठिकाणी कबुतरांच्या अन्न पाण्याची व्यवस्था करावी अशी अपेक्षा आहे. जैनांना जे काही पुण्य कमवायचं आहे. ते त्या ठिकाणी जाऊन कमवावं. पण मतांसाठी माणसांचे बळी घेऊ नयेत. एकाच पक्षावर लक्ष्य केंद्रित करुन राजकीय पक्ष काय साधणार आहेत ? राजकीय सत्तेसाठी मतांची अशी गोळाबेरीज होणार असेल तर भारताचा प्रमुख उद्योग राजकारण आहे. तो घरांघरात चालत आहे. या कुटिरोद्योगापायी, नितीमत्ता हा शब्दही लुप्त होईल. तेव्हा पंचविसावे तीर्थंकर अवतरतील.

Wednesday, 22 October 2025

मोदी-शहा यांची गोबेल्स नीती....!


"सर्कल इज कंप्लीट, पिश्चर इज क्लिअर....! असं म्हटलं जातं. अगदी तशीच स्थिती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या एकत्र येण्याबाबत म्हणता येईल. प्रत्येक निवडणुकीत राज ठाकरे यांची बदलती भूमिका असली तरी लक्षांत राहिली ती २०१९ मध्ये झालेली लोकसभा निवडणूक! 'लाव रे तो व्हिडिओ...!' म्हणत त्यांनी मोदी-शहा यांच्यावर जो काही प्रहार केला होता त्याची आठवण आल्याशिवाय राहात नाही. मोदी-शहा यांचं वर्णन थेट हिटलर-गोबेल्स यांच्याशी केली होती. त्यावेळी त्याचं गांभीर्य लक्षांत आलं नाही. पण नंतर या वाक्याचा संदर्भ पाहिला आणि घडलेल्या घटना पाहिल्या तर त्यातली सत्यता जाणवू लागलीय. त्या घडामोडी पाहताना काही साम्यस्थळं आढळली. त्याचा घेतलेला हा धांडोळा आणि केलेली उठाठेव...!" 
-------------------------------------
राज्यात २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवर सर्वाधिक प्रभाव राज ठाकरे यांच्या भाषणांनी आणि प्रसारमाध्यमांना त्यांनी दिलेल्या मुलाखतींनी पाडला जातो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत असाच प्रभाव नरेंद्र मोदी यांच्या 'अच्छे दिन'च्या घोषणांनी पाडला होता. त्या भूलथापांवरच भाजपला देशाची सत्ता आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकात अनेक राज्यं जिंकता आली होती. दरम्यानच्या ५ वर्षांत 'आज बाळासाहेब ठाकरे असते, तर काय केले असते? काय बोलले असते...?' असे प्रश्न पडण्यासारखे अनेक प्रसंग शिवसेनालाच नव्हे, तर मोदीभक्तीत फसलेल्या भाजपनिष्ठांना आणि देशाला भोगावे लागलेत. त्याची 'उत्तरक्रिया' राज ठाकरेंच्या १० भाषणांच्या आणि मुलाखतींच्या मालेने २०१९ मध्ये मोठ्या ताकदीने केली होती. या निवडणुकीत 'मनसे'चा एकही उमेदवार उभा नव्हता; पण राज ठाकरेंच्या लाखांच्या सभांनी भाषणांनी थापाड्या-बाताड्यांच्या सत्तेचा अंत करता येतो; तो केला पाहिजे, ही उमेद महाराष्ट्रासह देशभरातल्या मतदारांत जागवली होती. लोकशाहीतल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विराट आविष्कार घडवला होता. यासाठी ते मोदी सरकारचा खोटेपणा, मनमानीपणा पुराव्यांसह दाखवत असताना अखेरीस, 'ही निवडणूक यापुढे लोकशाही राहाणार की हुकूमशाही येणार, या प्रश्नाचे उत्तर तुमचे मत देणार...' असल्याचा सावधतेचा इशारा लोकांना देत होते. संभाव्य हुकूमशाहीसाठी अॅडॉल्फ हिटलरचा दाखला देत होते. लोकशाहीच्याच माध्यमातून हुकूमशाही आणणाऱ्या आणि ज्यूंचा वंशद्वेष करत त्यांचा अमानुष छळ कत्तल करणाऱ्या अॅडॉल्फ हिटलर याचा कार्यकाल पहिले महायुद्ध २८ जुलै १९१४ ते ११ नोव्हें. १९१८ ते दुसरे महायुद्ध १९३९ ते २ सप्टेंबर १९४५ असा आहे. पहिले महायुद्ध दोस्त राष्ट्र किंवा ट्रिपल आँताँत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियन साम्राज्य, फ्रेंच प्रजासत्ताक ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र विरुद्ध जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी देशांच्या राजवटी या दोन गटात झाले. २८ जून १९१४ रोजी 'जहाल युगोस्लाव्ह राष्ट्रवादी' गॅव्हिलो प्रिन्सिप याने सारायेव्हो इथं ऑस्ट्रिया-हंगेरीच्या सिंहासनाचा वारसदार असलेल्या 'आर्चड्यूक' फ्रांझ फर्डिनांड्यो याची हत्या केली आणि पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली. पुढे या महायुद्धात जगातले सर्व आर्थिक महासत्ता ओढल्या गेल्या. या महायुद्धाची अखेर जर्मन, रशियन, ऑस्ट्रो-हंगेरीयन आणि ऑट्टोमन साम्राज्यं नष्ट होऊन झाली. यातून अनेक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली. त्यांनी आपल्या सीमारेषा निश्चित केल्या. नवीन शासन यंत्रणा निर्माण केल्या. त्यांना मान्यता मिळण्यासाठी तह, ताबा, उत्तराधिकाऱ्याचे नूतनीकरण याच्या प्रक्रिया सुरू झाल्या. त्यात अपमानित करण्यात आलेल्या अटी-शर्तीतूनच दुसऱ्या महायुद्धाची बीजं पेरली गेली. पहिल्या महायुद्धात जर्मनीने फ्रान्समधील व्हर्साय इथं शरणागती पत्करल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर दबाव टाकण्यासाठी अटी लादल्या. पराभूत जर्मनीला युद्ध लादल्याची शिक्षा म्हणून दोस्त राष्ट्रांना ६५० कोटी पौंडची रक्कम द्यावी; जर्मनीचे लष्कर १ लाख सैनिकांपेक्षा अधिक असू नये; नाविक दल - नेव्ही उभारू नये; जर्मनीच्या ताब्यातील सार प्रांत १५ वर्षांसाठी फ्रान्सला द्यावा; हाइन नदीलगतच्या ५० किलोमीटर परिसरात जर्मनीने लष्कर ठेवू नये, अशा अपमानित करणाऱ्या अटी जर्मनीला मान्य कराव्या लागल्या. त्यानंतर पहिले महायुद्ध समाप्तीचा ऐतिहासिक 'व्हर्सायचा तह' ११ नोव्हें. १९१८ ला झाला. या पहिल्या महायुद्धात अॅडॉल्फ हिटलर शिपाईगडी म्हणून सामील झाला होता. तो मूळचा जर्मनीच्या सीमेजवळील ऑस्ट्रियातील गावातला. जन्मः २० एप्रिल १८८९ मधला. वडिलांबरोबर तोही जर्मनीत स्थायिक झाला. त्याच्या पूर्वजांची ओळख गुंतागुंतीची आहे. त्यात अनेक वंश-प्रांताची सरमिसळ आहे. हिटलर अभ्यासात हुशार होता. उत्तम चित्रकार होता. पण त्याला 'आर्ट स्कूल' मध्ये प्रवेश मिळाला नाही. पोटापाण्यासाठी त्याने रस्त्यावरचा बर्फ साफ करण्याची; रंगरंगोटीची कामं केली. लष्कर भरतीत तो नापास झाला. पण पहिले महायुद्ध सुरू होताच सामाजिक संस्था-संघटनांतर्फे सैनिक भरती होऊ लागली. त्या माध्यमातून तो सैनिक झाला. युद्ध संपल्यावर त्याला पाद्री - फादर-ख्रिस्ती धर्मोपदेशक व्हायचे होते. पण जर्मनींना अपमानित करणाऱ्या व्हायच्या तहाची सल त्याच्या उरात रुतली होती. कारण या तहामुळे जर्मनी स्वबळावर उभी न राहाता अमेरिकेच्या भांडवलावर जगू लागली होती. जर्मनीतील अनेक शासकीय उद्योग भांडवलदारांच्या ताब्यात गेले. गरीब, मध्यमवर्ग, छोटे दुकानदार, कमी पगारवाले नोकरदार आर्थिक ओढाताणीने मेटाकुटीला आले. या पार्श्वभूमीवर हिटलरने लष्कराचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करण्याचा १९१९ मध्ये निर्णय घेतला. 'जर्मन वर्कर्स पार्टी'त तो सामील झाला. अवघ्या सहा महिन्यांत त्याने वक्तृत्वाच्या बळावर पक्ष कार्यकर्त्यांना जिंकले आणि पार्टीचा 'नॅशनल सोशॅलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी' असा नामविस्तार करून तो पक्षप्रमुखही झाला. या पक्षाची 'नाझी' अशी ओळख आहे. या संघटनेच्या माध्यमातून हिटलरने व्हर्साय तहाविरोधात असलेली जर्मनांची लोकभावना व्यक्त करायला आणि जर्मन लोकांत ज्यूविरोधी द्वेषभावना वाढवायला सुरुवात केली. जर्मनीचा महायुद्धात पराभव होताच जर्मनीचा राजा कैसर विलियम सहकुटुंब देश सोडून गेला. त्यानंतर दोस्त राष्ट्रांनी आपल्या इशाऱ्यानुसार चालणारं सिव्हिलियन सरकार स्थापन केलं. सद्दाम हुसेनला ठार केल्यावर अमेरिकेने इराकमध्ये रिपब्लिकन सरकार स्थापन केलं, तसाच हा प्रकार होता. जर्मन लष्करप्रमुखाऐवजी या रिपब्लिकन सरकारनेच व्हर्साय तहावर मान्यतेची स्वाक्षरी केली होती. त्यामुळे राष्ट्रप्रेम जागवत सरकारविरोधात लोकभावना संघटित करीत स्वतःची आणि पक्षाची ताकद वाढवत जाणे, हिटलरला सोपे गेले. या बळावर त्याने १९२३ मध्ये सरकार उलथवण्याचा प्रयत्न केला. तो असफल झाला. परिणामी, हिटलर देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलबंद झाला. तुरुंगातल्या वास्तव्यात त्याने आपलं आयुष्य आणि राजकीय लक्ष्य सांगणारं पुस्तक लिहिलं. जर्मन भाषेत लिहिलेल्या या पुस्तकाचा 'माय स्ट्रगल' नावाने इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाला. या पुस्तकाने हिटलर अधिक लोकप्रिय झाला. त्याची जेलमधून सुटका झाली, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने समर्थक जमले. त्याने हिटलरची आणि त्याच्या नाझी पक्षाची ताकद पूर्वीपेक्षा अधिक वाढली. पण त्यापेक्षा अधिक १९२९ मध्ये अमेरिकेचा शेअरबाजार कोसळल्यावर वाढली. या घटनेनंतर अमेरिकेने आपली अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी जर्मनीकडे दिलेला पैसा मागण्याचा तगादा लावला. तो पैसा देण्याच्या प्रयत्नात जर्मनीची आर्थिक स्थिती पूर्णपणे बिघडली. या संधीचा फायदा उठवत हिटलरने रिपब्लिक सरकारला धारेवर धरून, ते जर्मन जनतेच्या नजरेत नालायक ठरवण्यात यश मिळवलं. जसे नरेंद्र मोदींनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात आधीच्या मनमोहन सिंग सरकारला नालायक ठरवलं तसं ! यानंतर केंद्र सत्तेसाठीच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्या निवडणुकीत जर्मनीच्या सत्ताधारी पक्षासह कम्युनिस्ट पार्टी आणि हिटलरची नाझी पार्टी हे तीन मुख्य पक्ष म्हणून रिंगणात होते. पण जर्मनीच्या जनतेने यापैकी कुणाही एकाला सत्तेसाठीचं पूर्ण बहुमत दिलं नाही. अशा परिस्थितीत हिटलरने आपल्या भाषणकलेच्या जोरावर जर्मनीचं लोकमत आपल्याच बाजूने असल्याचं चित्र उभं केलं. त्यासाठी मोठमोठ्या रॅलीजचं आयोजन केलं. परिणामी, जर्मनीचे प्रेसिडेंट - राष्ट्रपती पॉल वॉन हिन्डेनबर्ग यांना जानेवारी १९३३मध्ये हिटलरला जर्मनीचा चान्सलर - प्रधानमंत्री बनवावं लागलं. कारण तोपर्यंत 'जर्मनीने गमावलेला सन्मान मीच पुन्हा मिळवून देऊ शकतो....' असा विश्वास समस्त जर्मनींच्या मनात रुजवण्यात हिटलर यशस्वी झाला होता. मात्र सत्ता मिळाल्यानंतर मोदी कसे बदलले, ते राज ठाकरे सांगतात; तसा माणूसच बदलावा तसा हिटलर बदलला.
*संघ दक्ष हिटलरकडे लक्ष*
हिटलर जर्मनीचा चान्सलर होताच, त्याच्या पुढे-मागे भांडवलदार हात जोडून उभे राहू लागले. 'एक राष्ट्र, एक ध्वज, एक पक्ष, एक नेता...!' ही नाझी पक्षाची घोषणा होती. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी हिटलरने जर्मनीतील लोकशाही संपवण्याचे भव्य स्वप्न रंगवले होते. त्यासाठी त्याला जर्मनीचं संविधान बदलून अध्यक्षीय पद्धतीची हुकूमशाही - फॅसिस्ट राज्य व्यवस्था आणायची होती. १९३४ मध्ये हिटलरला चान्सलर बनवणाऱ्या प्रेसिडेंट पॉल वॉन यांचं निधन झालं आणि ती संधी साधून हिटलरने संविधान बदलण्याचा डाव टाकला. पण त्याला विरोधी पक्ष असलेल्या कम्युनिस्टांचा विरोध होता. त्यामुळे संविधान बदलासाठी आवश्यक असलेलं बहुमत त्याला मिळणार नव्हतं. तो अडला, पण थांबला नाही. त्याने बुद्धी शक्तीने मार्ग काढला. २७ फेब्रुवारी १९३३ रोजी त्याने जर्मनीच्या राजकीय व्यवहार खात्याच्या इमारतीला आग लावली आणि त्याचा ठपका कम्युनिस्टांवर ठेवून त्यांना तुरुंगात टाकलं. ४,००० कम्युनिस्ट जेलबंद होताच; हिटलरने निवडणुका जाहीर केल्या. त्यात विरोधकच नसल्याने हिटलरच्या नाझी पक्षाच्या खासदारांची संख्या १०० ने वाढून २९९ झाली. अशाचप्रकारे नोटाबंदीचा डाव खेळून भाजपची सत्ता ताकद वाढवण्यात आणि व्यापक करण्यात आली. असो. हिटलरच्या हातात पूर्णपणे जर्मनीची सत्ता येताच, त्याने जनतेच्या मनात प्रथम भीती, असुरक्षिततेची भावना निर्माण केली. मग तोच त्यांचा पालनकर्ता, तारणकर्ता झाला. देशभक्तीचे धडे देत, नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्याचे म्हणजेच 'अच्छे दिन आनेवाले हैl' स्वप्न दाखवू लागला. 'तुम्ही पूर्वीच्या सरकारमुळे दुःखी आहात,' हे त्यांना पुनःपुन्हा सांगू लागला. जसे नरेंद्र मोदी गेली काही वर्ष पंडित नेहरू आणि इंदिरा गांदी यांच्या सरकारच्या नावाने खडे फोडत होते, तसाच हा मामला होता. दरम्यान, हिटलरच्या नाझी पक्षाच्या ऑल जर्मन स्टुडंटस् युनियनने सर्व विद्यापीठातली विरोधी विचारांची पुस्तकं जाळली. मोदी सरकारच्या काळात अशी जाळपोळ झाली नाही. पण पुण्याची फिल्म अकादमी, हैद्राबाद विद्यापीठ, दिल्लीची जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी - जेएनयू वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त करण्यात आली. अभ्यासक्रमात, क्रमिक पुस्तकात, 'विश्वकोश' सारख्या उपक्रमांच्या नोंदीत सोयीस्कर बदल करण्यात आलेत. हिटलरने एनएसडीएपी ही सशस्त्र संघटना उभारली होती. तिच्या कवायती, शस्त्रे, बॅण्ड लष्करासारखीच होती. सेवानिवृत्त पायलट हर्मन गोरिंग आणि लष्कर कॅप्टन अर्नेस्ट रोहोम हे या संघटनेचे प्रमुख होते. या संघटनेचं टोपणनाव 'ब्राऊन शर्ट' म्हणजे 'खाकी शर्ट' होते. या संघटनेला लष्कराचा दर्जा मिळावा, यासाठी हिटलर प्रयत्नशील होता. त्यामागे विरोधकांचे सरळसोट कायदेशीर हत्याकांड घडवून आणण्याचा हेतू होता. या संघटनेची तुलना रा.स्व. संघाशी करता येणार नाही. तथापि, संघाचं हिटलरच्या संघटनात्मक कामाकडे लक्ष आहे. तो त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. म्हणून 'संघ स्वयंसेवकांना १५ दिवसाचं प्रशिक्षण दिल्यास ते जवानांचं काम करू शकतील...!' असं वादग्रस्त विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी करून, हिटलरची बरोबरी साधली होती. संघ परिवाराच्या संघटनांच्या कार्यक्रमात मोदीजी भावुक होऊन बोलतात; तसाच हिटलर एनएसडीएपीच्या शिबिरात बोलायचा. सदस्यांना, प्रशिक्षणार्थीना 'शुद्ध रक्ताच्या जर्मन देशासाठी सर्वस्वाचा त्याग करा...!' असं आवाहन करायचा. आपली राजकीय ताकद वाढविण्यासाठी हिटलरने प्रसारमाध्यमांतील जाहिरातींवर, पोस्टर, भिंतीपत्रकावर प्रचंड पैसा खर्च केला. सत्तेच्या या देखाव्याला भुलून, घाबरून विरोधी पक्षातील काही नेत्यांनी सत्तेसाठी, पैशासाठी, सुरक्षेसाठी हिटलरबरोबर तडजोड केली. सत्ताधारी हिटलर सर्वसत्ताधीश झाला. त्याने एकेक करत स्वतंत्रपणे काम करणाऱ्या सरकारी व्यवस्थांवर ताबा मिळवला. गेस्टोपो ही जर्मन सिक्रेट पोलीस गुप्तहेर संघटना त्याने ताब्यात घेतली. १९३९ पासून हिटलरने जर्मन आणि जर्मनीने जिंकलेल्या युरोप भागातील ज्यूंना, सिक्रेट पोलिसांच्या माध्यमातून छळछावणीत धाडायला सुरुवात केली. तिथे ज्यूंचा ताबा नाझींच्या एसएस म्हणजे सिक्रेट सर्व्हिस गार्डकडे सोपवला जाई. याच काळात हिटलरने खास राजकीय खटले चालवण्यासाठी कोर्ट स्थापन केलं होतं. त्यात हजारोंना मृत्युदंडाची सजा सुनावण्यात आली. या मनमानी न्यायदानात कसलाही अडथळा येऊ नये, यासाठी समाजवादी आणि ज्यू सरकारी वकील, न्यायाधीशांना पदमुक्त करण्यात आले होते. वंशवादावर आधारित न्याय व्यवस्था आणि नवे कायदे हिटलरने सुरू केले. या व्यवस्थेला त्याने पीपल्स कोर्ट असे गोंडस नाव दिले होते. जर्मनीवर पूर्णपणे हुकूमत मिळवल्यानंतर हिटलरने व्हर्राय तहाच्या अटी मोडीत काढण्यास आणि जर्मनीच्या भोवतालच्या छोट्या राष्ट्रांना आपले अंकीत बनवण्यास सुरुवात केली. त्याच्या विस्तारवादाची पहिली शिकार त्याची जन्मभूमी असलेला देश ऑस्ट्रिया ठरला. त्यानंतर त्याने चेकोस्लाविया, पोलंड, नॉर्वे, डेन्मार्क, फ्रान्स आणि रशिया जिंकण्याचा क्रम लावला होता. यातील पोलंडवर १ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीने हल्ला केला. त्यानंतर हिटलरच्या नाझी पक्षाने केलेल्या मैत्री-करारानुसार, सोव्हिएत संघाने पूर्वेकडून पोलंडवर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून ग्रेट ब्रिटन - युनायटेड किंग्डम आणि फ्रान्सने जर्मनीवर हल्ला केला. त्यानंतर एकेक राष्ट्र त्यात सामील झाल्याने त्याला दुसऱ्या महायुद्धाचे स्वरूप आले. यात जवळपास ७० देशाचे सैनिक सामील झाले होते. जर्मनीच्या बाजूला जपान आणि इटाली हे दोनच देश मोठे होते. तर त्यांच्या विरोधात ग्रेट ब्रिटनच्या बरोबर अमेरिका, रशिया, चीन, भारत हे मोठे देश उतरले होते. १९३९ ते ४५ असे सहा वर्षं चाललेलं हे महायुद्ध हिटलरच्या हुकूमशाही बरोबरच त्याच्या नाझी पक्षाला संपवूनच संपलं. पण यात दोन्ही बाजूचे मिळून २ कोटी २० लाखापेक्षा अधिक सैनिकांचे आणि ४ कोटीपेक्षा अधिक नागरिकांचे बळी गेले. मालमत्तेचे तर अगणित नुकसान झाले, हा महाविनाश हिटलरच्या शुद्ध राष्ट्रवादाच्या अतिरेकीपणामुळे घडला. या अतिरेकीपणातल्या शिस्तीचे, राष्ट्रप्रेमाचे कौतुक करणारे बरेच लोक आहेत. त्यात बाळासाहेब ठाकरे आहेत; आणि राज ठाकरेही आहेत. नाझी पक्षाच्या स्वस्तिक ध्वज चिन्हामुळे बऱ्याच हिंदुत्ववाद्यांना हिटलर आपला 'आर्य' वाटतो. तथापि, हिटलरचं भारताबद्दल आणि हिंदूधर्माविषयीचं मत चांगलं नव्हतं. ते गैरसमज आणि चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे सुभाषचंद्र बोस यांनी हिटलरला एका भेटीत सुनावलं होतं. प्रधानमंत्री मोदी यांनी ज्याप्रकारे मंत्रिमंडळाला गुंडाळून ठेवून आपणच सर्वसत्ताधारी आहोत, असं चित्र उभं केलं, ज्याप्रकारे स्वतंत्रपणे चालणाऱ्या सरकारी यंत्रणा आपल्या ताब्यात घेतल्या, मोडीत काढल्या; स्वतःच्या जाहिरातींवर, विदेशवाऱ्यांवर सरकारी पैसा खर्च केला; जवानांच्या बलिदानाला दुर्लक्षित करून मतांसाठी लष्कराच्या कर्तबगारीला वापरण्याचा प्रयत्न केला, ते पाहिल्यास त्यांची पावलं हिटलर सारखीच पडत असल्याचे वाटणे साहजिकच आहे. या लोकशाहीविरोधी बदचालीला कठोर विरोधही झालाय. तरीही अनंत काळ नुकसान, यातना सोसलेल्या भारतीय जनतेने मोदी पक्षाला सत्ता यश दिले, तर मोदीजींना हिटलरी सत्तावर्तन करण्याचा हक्क आपसूक लाभतो. तथापि, हिटलरबरोबर मुसोलिनी - इटाली) आणि टोजो - जपान हेही हुकूमशहा होते. यातील दोघांनी आत्महत्या केल्या; तर मुसोलिनीला लोकांनी जाहीर चौकात फाशी दिली.
*देशी-विदेशी गोबेल्स*
राज ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक भाषणात 'मोदी आणि शहा या दोन व्यक्ती या निवडणुकीत भारताच्या राजकीय क्षितिजावरून कायमसाठी हटवल्या गेल्या पाहिजेत; यासाठी त्यांना पुन्हा सत्ताशक्ती देणाऱ्या कोणत्याही म्हणजे भाजप आणि शिवसेना पक्षास मतं देऊ नका...!' असं आवाहन लोकांना केलंय. नरेंद्र मोदी हे जनसंघ वा भाजपचे कार्यकर्ते वा पदाधिकारी नव्हते. ते रा.स्व. संघाचे 'पूर्ण वेळ प्रचारक' होते. ज्या प्रचारकाला राजकारणात रुची असते; त्याला त्याच्या कुवतीनुसार भाजपच्या शहर, जिल्हा वा प्रदेश कार्यकारिणीवर पिंडीवरच्या नागोबासारखे बसवले जाते. मोदींचाही गुजरातच्या राजकारणात प्रवेश झाला आणि केशुभाई पटेल-वाघेला यांच्या सत्तासाठमारीत आमदार नसताना त्यांची थेट गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. अशाच प्रकारे नितीन गडकरीही १९९५-९९ या शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मंत्री झाले होते. मोदींच्या या राजकीय उदयानंतर झालेल्या प्रत्येक वादग्रस्त घटनेत मोदींबरोबरच अमित शहा यांचं नाव चर्चेत येऊ लागलं. मोदी प्रधानमंत्री झाले, तसे अमित शहा भाजपचे 'राष्ट्रीय अध्यक्ष' झाले. हिटलरबरोबरच गोबेल्स हे नाव येतंच; तशी ही मोदी-शहा यांची जोडी आहे. मोदी सरकारमध्ये केंद्रीय सत्तेचा अधिक अनुभव असलेले सुषमा स्वराज, अरुण जेटली हे मंत्री होते. पण सरकारचा त्यांच्यापेक्षा अधिक धोरणात्मक निर्णय वा माहिती; कोणताही संविधानिक अधिकार नसताना अमित शहा यांनी जाहीर केला हाोता. 'स्वीस बँकेत असलेला भारतीयांचा ब्लॅकमनी देशात आणून प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील, हा जुमला होता...!' हे अमित शहा यांनीच निर्लज्जपणे सांगितलं आणि एकाही दहशतवाद्याच्या मुडद्याचा फोटो न दाखवता; 'ऑपरेशन बालाकोट' मध्ये २५० दहशतवादी मारल्याचंही त्यांनीच जाहीर केलं. खोट्या गोष्टी पुनःपुन्हा नव्या उत्साहाने सांगण्याला गोबेल्स-नीती म्हणतात. पॉल जोसेफ गोबेल्स याचा जन्म २९ ऑक्टो. १८८७ ला झाला. हा हिटलरचा प्रचारप्रमुख होता. त्याचे वडील कापड गिरणीत फोरमन होते. तो हिटलरच्या नाझी संघटनेतला सर्वात उच्च शिक्षित होता. इतिहास, वाङ्मय, तत्त्वज्ञान या विषयांचा तो अभ्यासक होता. पायातील व्यंगामुळे त्याची महत्त्वाकांक्षा अडखळली होती. ती कसर त्याने आपल्या पाताळयंत्री कारनाम्यांनी भरून काढली. कट्टर समर्थक असल्याने तो हिटलरचा खास विश्वासातला माणूस झाला. 'एखादी गोष्ट वारंवार सांगितली की, ती लोकांना सत्य वाटू लागते. यासाठी ती गोष्ट कमी शब्दांत असायला हवी आणि त्यातील काही मुद्दे ठळक असायला हवेत...!' हे हिटलरच्या प्रचाराबाबतचं मुख्य सूत्र होतं. ते प्रत्यक्षात आणणारा सूत्रधार जोसेफ गोबेल्स हा होता. यातूनच तो प्रचारतंत्र जनक म्हणूनही ओळखला जाऊ लागला. गोबेल्सने प्रोपगंडा आणि सेन्सॉरशिप ही दोन माध्यमं वापरून लोकांचं ब्रेनवॉश केलं. अलीकडच्या काळात, आपल्या इथे जशा श्रीराम सेना, हिंद जन जागृती, सनातन, बजरंग दल, गोरक्षासारख्या संघटनांचा वापर करण्यात आला; तशी हिटलरला विरोध करणाऱ्यांना रोखण्या-संपवण्यासाठी 'शूट्सस्टाफल' Schutzstaffel-SS ही सेना आघाडीवर होती. ती गोबेल्सच्या प्रचारतंत्राने क्रिया-प्रतिक्रिया करायची. या SSच्या माध्यमातूनच ६० लाख ज्यूंची छळछावण्यांतून कत्तल करण्यात आली. या गोबेल्स प्रचारतंत्रामुळे हिटलर सत्तेवर आला आणि १९३३ ते ४५ अशी १२ वर्ष सत्ता टिकवू शकला. १९३४ मध्ये हिटलर जर्मनीचा प्रेसिडेंट झाला आणि त्याने गोबेल्सला Enlightenment and Propaganda खात्याचा मंत्री केलं. 'सरकारी प्रचार हा अदृश्य; पण सर्वत्र असावा,' असं धोरण गोबेल्सने प्रचारमंत्री म्हणून अंमलात आणलं. त्यासाठी प्रसारमाध्यमं, साहित्य आणि कलानिर्मिती यावर निर्बंध घातले. हलकेफुलके मनोरंजनाचे कार्यक्रम अथवा नाझी विचाराचा प्रचार करणारे साहित्य, चित्रपट यांनाच परवानगी दिली जायची. 'चला, हवा येऊ द्या'सारखे- थुकरट वाडीतले टीव्ही शो, विज्ञानयुगात चेटकिणीभोवती फिरणारी 'अलबत्या-गलबत्या' सारखी जोरात चालणारी मोठ्या प्रेक्षकांच्या गर्दीची बालनाट्य किंवा राज ठाकरे यांनी सांगितलेले पॅडमॅन, सुईधागा, टॉयलेट यासारखे सरकारी योजनांचा प्रसार करणारे चित्रपट; हादेखील 'गोबेल्स' नीतीचा गावठी अवतार आहे. त्यात मराठा मोर्चा, बहुजन मोर्चा, दलित आक्रोश मोर्चा याची पेरणी करणाऱ्या सैराट चित्रपटाचाही समावेश करता येईल.
*वंशाचा चाळा भक्तांचा गळा*
गोबेल्स प्रचारमंत्री होताच त्याने 'आर्यन वंश हा सर्वात शुद्ध आहे आणि ज्यू हे देशद्रोही आहेत...!' या संदेशाचा मारा लोकांवर केला. ज्यू पत्रकारांवर बंदी घालण्यात आली. परिणामी, १९३५ मध्ये जर्मनीतील १,६०० नियतकालिकं बंद पडली आणि १९३९ पर्यंत सुरू असलेल्या पैकी ६९ टक्के नियतकालिकं नाझीवाद्यांच्या मालकीची झाली. या बदलाच्या मुळाशी असलेल्या वंशवादाची जागा मोदी सरकारच्या विचारवादाने घेतली. त्यानुसार बदल झाले. हिटलरच्या काळातच जर्मनीत रेडिओ लोकप्रिय होऊ लागला होता. त्याचा वापर करता येईल, हे गोबेल्सने ओळखले आणि प्रत्येक जर्मन माणसाला विकत घेता येईल, इतक्या अल्पदरात रेडिओ उपलब्ध करून देण्यात आले. त्यावरून हिटलर आणि गोबेल्स यांचीच भाषणं अधिकाधिक वाजत. ती लोकांच्या कानी सतत पडावी, यासाठी रस्त्यावर, पार्कात, रेस्टॉरंटमध्ये, सर्व सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर लावून त्यावरून रेडिओ ऐकवला जात असे. हिटलरच्या भव्य रॅलीज व्हायच्या. त्याचीही कॉमेंट्री रेडिओवरून सुरू असे. अशाच प्रकारे मोदीजींच्या सततच्या विदेश वाऱ्या आणि विदेशी राष्ट्रप्रमुख, मंत्र्यांच्या गुजरातेतल्या रोड शोचे रिपोर्ट टीव्हीवर साजरे करण्यात आले. हिटलरच्या १२ वर्षांच्या सत्ताकाळात नाझी विचारधारेला विरोध करणाऱ्या २,५०० साहित्यिकांवर बंदी घालण्यात आली; तर ज्यू धर्माविषयी आणि शांततावादी, समाजवादी, साम्यवादी विचारांचं समर्थन करणारी २०,००० पुस्तकं जाळण्यात आली. ज्यू संगीतकार आणि त्यांच्या जॅझ म्युझिक्चर संपूर्ण बंदी होती. मोदी सरकारच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश या विचारवंत, लेखकांच्या हत्येच्या निषेधार्थ ज्येष्ठ साहित्यिक, कलाकारांनी केलेली 'पुरस्कार वापसी' आणि सहा महिन्यांपूर्वी यवतमाळ येथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचे 'निमंत्रण रद्द' केल्यानंतर झालेली 'निमंत्रण वापसी' हे गोबेल्स नीतीला दिलेलं प्रत्युत्तर होतं. आदर्श साहित्य कसं असावं, याचं उदाहरण देण्यासाठी गोबेल्सने 'मायकल' नावाची कादंबरी लिहिली होती. बदलत्या काळानुसार, १० वर्ष प्रधानमंत्रीपद सांभाळलेल्या मनमोहन सिंग यांची थट्टा उडविणारा 'अॅन अॅक्सिडेंटल प्रायमिनिस्टर' हा चित्रपट आला; आणि मोदींचं गुणगान करणारा चित्रपट तयार झाला. सततच्या ज्यूविरोधी प्रचाराचा जर्मन नागरिकांवर असा परिणाम झाला, की त्यांना ज्यूविरोधात कोणतीही कृती करणं गैर वाटेनासं झालं. तेच मोदी सरकारच्या काळात गोमांसच्या निमित्ताने दलित आणि मुस्लिमांवर जीवघेणं संकट बनून कोसळलं. नाझी चळवळ सुरू होण्यापूर्वी जर्मन नागरिक आणि ज्यू यांचे सलोख्याचे संबंध होते. हिटलर सत्तेवर आल्यावर जर्मन नागरिक ज्यूंकडे संशयाने पाहू लागले. काहींनी ज्यूंशी संबंध ठेवले तर आपण अडचणीत येऊ, या भयाने ज्यूंशी असलेले संबंध तोडले. हा अतिरंजित वाटणारा इतिहास काही मोदीभक्तांनी सत्यात उतरवून दाखवला आहे. या कामगिरीबद्दल अमित शहा आणि त्यांच्यासारख्या वाढवलेल्या देशी गोबेल्सना मोदींनी काय दिलं, ते अजून उघड झालेलं नाही. परंतु प्रचारमंत्री म्हणून गोबेल्सने केलेल्या कामगिरीबद्दल हिटलरने त्याला अनेक सन्मानाची पदं दिली. दुसऱ्या महायुद्ध काळात १९४४ मध्ये गोबेल्सला युद्धमंत्री केलं. या पदाची हौस अमित शहा यांनी 'ऑपरेशन बालाकोट' मध्ये ठार झालेल्या दहशतवादींचा वादग्रस्त आकडा जाहीर करून भागवून घेतली. रशियाच्या फौजा जर्मनीत घुसताच हिटलरने आत्महत्या ३० एप्रिल १९४५ करण्याचा निर्णय घेतला. पण त्यापूर्वी त्याने गोबेल्सला जर्मनीचा चान्सलर - प्रमुख म्हणून घोषित केलं. गोबेल्स एकच दिवस जर्मनीचा राष्ट्रप्रमुख होता. १ मे १९४५ रोजी तो आत्महत्या करून मोकळा झाला. जाताना मागे तो गोबेल्स-नीती हा शब्द ठेवून गेला. एखादा राजकीय नेता स्वार्थासाठी खोटं रेटून बोलून लोकांत भ्रम निर्माण करतो, तेव्हा त्याच्या वागण्याचा उल्लेख गोबेल्स नीती असा केला जातो. मोदी-शहा यांना कठोर शब्दांत विरोध करताना राज ठाकरे हुकूमशाहीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी हिटलरचं चरित्र वाचा, असं सभांतून सांगत होते. हिटलरबरोबर गोबेल्स येणारच. या गोबेल्सच्या तंत्रानुसार, सोशल मीडियातून धिंगाणा घालणाऱ्या ट्रोल्सरना राज ठाकरे 'लावारिस कार्टी' म्हणतात. म्हणजे त्यांना जन्माला घालणाऱ्या गावठी गोबेल्सनी निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच आत्महत्या करायची का ?
*लोकांच्या भीती आणि आशेचा फायदा*
कदाचित २० व्या शतकातील सर्वात कुप्रसिद्ध व्यक्तिमत्व, अ‍ॅडॉल्फ हिटलर हा राष्ट्रीय समाजवादी जर्मन कामगार पक्ष, नाझी पक्षाचा प्रमुख होता आणि १९३० च्या दशकाच्या सुरुवातीपासून ते १९४५ मध्ये आत्महत्या होईपर्यंत तो जर्मनीचा हुकूमशहा बनला. १९३३ मध्ये जर्मन फ्युहरर नेता किंवा मार्गदर्शक ही पदवी धारण केल्यानंतर लगेचच  हिटलरने जोसेफ गोबेल्स यांनी काळजीपूर्वक आयोजित केलेल्या प्रचार मोहिमांद्वारे आपली शक्ती मजबूत करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या महायुद्धातील पराभवामुळे अपमानित झालेल्या आणि आर्थिक मंदीतून त्रस्त झालेल्या जर्मन लोकांच्या भीती आणि आशेचा फायदा घेऊन गोबेल्स आणि हिटलरने जर्मनीच्या भविष्याबद्दल राष्ट्रवादी, विस्तारवादी, वर्णद्वेषी दृष्टिकोनाला चालना दिली. त्यांच्या मोहिमेने अनेक जर्मन लोकांना नाझी राजवटीत सामील करून घेतले आणि अनेकांना हे पटवून दिले की विरोध निरर्थक आहे. नाझींनी सत्ता मिळवल्यानंतर, त्यांनी भाषण आणि सभा स्वातंत्र्य रद्द केले आणि यहूदी-विरोधी वातावरण निर्माण केले ज्यामुळे यहूदी, समलैंगिक आणि इतर अल्पसंख्याकांवर भयंकर अत्याचार झाले ज्याचा परिणाम होलोकॉस्टमध्ये झाला.
*रेडिओची ताकद*
हिटलरने १९३३ मध्ये गोबेल्सना रीच चेंबर ऑफ कल्चरची स्थापना करण्यासाठी नियुक्त केले. चेंबरचे फक्त सदस्यच सांस्कृतिक व्यवसायात काम करू शकत होते आणि गोबेल्सने खात्री केली की यहूदी, मार्क्सवादी आणि नाझीवादाला विरोध करणारे इतर सदस्य बनू नयेत. नाझी संस्कृती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी गोबेल्सने मान्यताप्राप्त कला आणि संगीताचा प्रचार केला. रेडिओच्या तुलनेने नवीन माध्यमाचा फायदा घेत, त्याने 'पीपल्स रिसीव्हर्स' नावाच्या स्वस्त रेडिओ सेटची विक्री आयोजित केली आणि हिटलरची भाषणे आणि इतर प्रचार कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी सार्वजनिक लाऊडस्पीकरची एक प्रणाली स्थापित केली.
दर सप्टेंबरमध्ये, नाझींनी न्युरेमबर्ग रॅलीआयोजित केली, जी पक्ष निष्ठा आणि शक्तीचे प्रदर्शन होते. १९३८ पर्यंत दहा लाखांहून अधिक लोक नाझीवादाच्या आठवडाभराच्या उत्सवासाठी जमले होते. लेनी रिफेनस्टाहल यांनी १९३४ च्या रॅलीचे चित्रीकरण तिच्या 'ट्रायम्फ ऑफ द विल' या प्रचार चित्रपटासाठी केले. सर्वात उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे पक्ष नेत्यांची बाहेरील संध्याकाळची रॅली. १९३५ मध्ये हिटलरचे वास्तुविशारद अल्बर्ट स्पीअर यांनी १५० सर्चलाइट्स मैदानाभोवती ठेवण्याची व्यवस्था केली, सरळ वर निर्देशित केले, ज्याला ब्रिटिश राजदूत सर नेव्हिल हेंडरसन यांनी 'प्रकाशाचे कॅथेड्रल' म्हटले. १९४२ मध्ये हिटलरने असे निरीक्षण केले, 'डॉ. गोबेल्स यांना बर्लिनमधील परिस्थिती ज्या दोन गोष्टींशिवाय नियंत्रित करता आली नसती अशा दोन गोष्टींची देणगी होती. मौखिक सुविधा आणि बुद्धिमत्ता....!' हिटलरकडे त्याच्या सहकाऱ्याचे कौतुक करण्याचे चांगले कारण होते, कारण गोबेल्सनेच फुहरर मिथक तयार केली होती, ज्यू, नफाखोर आणि मार्क्सवाद्यांपासून जर्मनीचा तारणहार म्हणून हिटलरची छद्म-धार्मिक उपासना आयोजित केली होती. ३० एप्रिल १९४५ रोजी, पराभवाच्या उंबरठ्यावर असताना, हिटलरने त्याच्या बंकरमध्ये आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी गोबेल्सनेही तेच केले, शेवटपर्यंत त्याच्या नेत्याशी एकनिष्ठ राहून.
निवडणुकीचा ज्वर सार्‍या देशभर भरून उरला आहे. जळी स्थळी, काष्टी पाषाणी एकच सवाल नरेंद्र मोदी २०१४ प्रमाणे सत्ता राखणार की गमावणार? बहुमत मिळत नाही हे पाहून सत्ताधारी तोडा फोडा आणि राज्य करा ही नीती वापरून सत्ता काबीज करणार का? तर दुसर्‍या बाजूला काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार की काँग्रेससह सर्व पक्षांचे मिळून मिलीजुली सरकार स्थापन होणार ? उत्तर फार कठीण आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे की आता २०१४ सारखी मोदी लाट नाही की त्यात भाजपचा टिळा लावलेले दगड धोंडे निवडून यायला… पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने आणि वास्तव यातला फरक लोकांच्या समोर आला आहे. मोदींच्या भीतीची पर्वा न करता उभी असलेली काही प्रसार माध्यमे आणि त्याच्या जोडीला असलेला सोशल मीडिया यांनी सत्ताधार्‍यांच्या पाच वर्षांच्या जुमलेबाजीची पोलखोल केली आहे. सत्य आणि असत्य यातला फरक जनेतेसमोर ठेवला आहे. आणि आपल्या काळजावर हात ठेवून आणि लोकशाहीचे स्मरण करून पहिल्या दोन टप्प्यात जनतेने मतदान केले असेल, अशी आशा आहे. आता आणखी दोन टप्पे बाकी आहेत आणि एक सवाल आहे : मोदी आणि हिटलर, शहा आणि गोबेल्स यात साम्य कसे?

गेले एक दोन महिने मोदी आणि शहा यांच्या प्रचारावर बारीक लक्ष द्या- काय दिसते? एकच गोष्ट दोघेही वारंवार सांगत आहेत आणि ती आहे काँग्रेस घराण्याचा भ्रष्टाचारी कारभार. आता हे लोकांना माहीत नाही का? काँग्रेस घोटाळेबाज आहेत ते. म्हणून तर लोकांनी पाच वर्षांपूर्वी भाजपच्या हातात बहुमताने देशाची सूत्रे दिली. १९७७ ला इंदिरा गांधींच्या आणीबाणीविरोधात जनतेने काँग्रेसला झाडूने साफ केले तसेच हाताला बाजूला सारून आशेचे कमळ फुलवले होते. पण, आज मागे वळून बघताना चित्र काय दिसते? रोजगार नाहीत, कधी नव्हती इतके कुशल आणि अकुशल लोक हाताला कामाविना बेकार आहेत. जीएसटी विषय चांगला असूनही घिसाडघाईने राबवण्याच्या निर्णयामुळे हजारो छोटे लघु उद्योग बंद पडले. संगणक क्षेत्रातील देशातील नामवंत उद्योजक अझीज प्रेमजी यांच्या विद्यापीठाच्या सर्व्हेनुसार ५० लाख लोकांना आपले रोजगार गमवावे लागले. नोटाबंदीच्या एका रात्रीत घेतलेल्या निर्णयामुळे लाखो लोक काही चूक नसताना रस्त्यावर आले. शेकडो लोकांना आपले जीव गमवावे लागले. काळा पैसा संपवण्याच्या नादात येथील जनता संपली, त्याचे उत्तर आजपर्यंत मिळालेले नाही आणि नोटाबंदीमुळे आज देश काळा पैसामुक्त झाला का, तर तसे ही चित्र नाही. श्रीमंतांना काही फरक पडलेला नाही, उलट गरीब माणूस संपला. शेतकरी देशोधडीला लागला. ज्याला हे सहन झाले नाही, त्याने हातात विषाचा प्याला घेऊन आणि मोदी-शहा यांच्या नावाने उर बडवत हे जीवन संपवले… ‘आपलं महानगर’ने बातमीचा पाठलाग करताना एकट्या महाराष्ट्राचा हिशोब मांडताना राज्यात सर्वाधिक १४ हजार पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे भीषण वास्तव मांडले आणि आज हेच वास्तव विरोधी पक्ष जनतेसमोर नेत आहे.

देशातला काळा पैसा संपवण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय आणि बाहेरचा काळा पैसा आणून देशातील प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करण्याची घोषणा मोदींनी केली होती. आज काय चित्र आहे. कोणाच्या खात्यावर किती पैसे आले. खोटे बोलण्याला काही मर्यादा आहेत की नाही आणि आज वर तोंड करून शहा महाशय सांगतात की मोदी तसे म्हणालेच नव्हते. लोकांची पोटे खपाटीला गेली असतील, पण अजून मेंदू काम करतोय… लोक विसरलेली नाहीत. तीच गोष्ट मुद्रा कर्ज योजनेची लाखांच्या वर कर्ज देऊन बेरोजगारी संपवायची होती. किती लोकांना कर्ज मिळाली. ३०-३२ हजारपेक्षा हाती कर्ज आले नाही. गरीब माणूस साधे चहा आणि भजीचे दुकान उघडू शकत नाही. लघु उद्योग तर दूर राहिले. उज्ज्वला योजनेने घरोघरी गॅस येतील आणि आया बहिणींच्या डोळ्यातील अश्रू थांबतील, असे चित्र रंगवले. आज काय वास्तव आहे की लाकडाच्या मोळ्या उचलत पाऊल थकून गेलंय आणि डोक्यावरचे ओझे जड तर झालेच, पण डोळ्याच्या खाचा झाल्यात… कवी आरती प्रभू म्हणतात तसे : दोन डोळे, दोन काचा आणि दोन खाचा, येथे प्रश्न येतो कुठे आसवांचा! मोदी आणि शहा यांच्या खोट्या आश्वासनांचा पाढा येथे वाचता येईल, पण या लेखाचा तो उद्देश नाही. लोकांना भाजपची असत्याची डोंगराएवढी गोष्ट आता समजून आली आहे. आपण फक्त एका काळ्या इतिहासाशी मोदी आणि शहा यांच्या कारभाराचे साम्य काय दिसते, यावर एक नजर टाकणार आहोत.

एखादी गोष्ट वारंवार सांगितली तर ती लोकांना सत्य वाटू लागते. त्यामुळे आपल्या मुद्याचा सतत प्रचार करावा आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा लोकांमध्ये प्रचार करत असतो, तेव्हा ती गोष्ट सोपी असायला हवी. फक्त काही ठळक मुद्दे असायला हवेत. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ती गोष्ट सातत्याने पुन्हा पुन्हा सांगायला हवी. हे जर्मनीचा हुकुमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरचं प्रचाराबाबतचे सूत्र होते, जे प्रत्यक्षात उतरवणारा सूत्रधार होता जोसेफ गोबेल्स. गोबेल्सची ओळख हिटलरचा एक विश्वासू सहकारी फक्त एवढीच नाही, तर तो एका प्रचारतंत्राचा जनक म्हणून गोबेल्सकडे पाहिले जाते. असे म्हटले जाते की याच ‘गोबेल्सनीती’मुळेच हिटलर सत्तेवर आला आणि सत्ता टिकवू शकला. आता गेल्या पाच वर्षांतील मोदी-शहा यांच्या कारभारावर एक नजर टाका. काय साम्य दिसते?आपल्या ‘माइन कॅम्फ’ या आत्मचरित्रात हिटलरनं राष्ट्र निर्मितीसाठी प्रॉपगेंडा किंवा प्रचाराचे काय महत्त्व आहे, हे सांगितले आहे. १९३४ साली तो जर्मनीचा हुकूमशहा बनला आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत तो त्या पदावर राहिला. त्याच्यावर अनेक संकटे आली, पण जर्मन लोकांचा त्याच्यावरील विश्वास कायम राहिला. जनतेच्या पाठिंब्याच्या बळावरच तो त्या पदावर कायम होता. ज्यूंवर होणारे अत्याचार, छळछावण्या आणि एकंदरच त्यांच्याविरुद्धचा हिटलरचा द्वेष उघड होता. मग हिटलरचे लष्कर त्यांच्यावर इतके अत्याचार करत असताना इतर जर्मन लोकांनी त्याची साथ का दिली किंवा त्याला विरोध का केला नाही? याचे कारण होते हिटलरने केलेला रीतसर प्रचार.

हिटलर-गोबेल्स यांच्या प्रचार तंत्राचा वापर आणि गेल्या पाच वर्षांचा मोदी आणि शहा यांच्या कारभारात काय साम्य दिसते : प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे येथील स्वायत्त संस्थांवर आपली पकड ठेवायची आणि सत्य बाहेर येऊ द्यायचे नाही. मुख्य म्हणजे लोकशाहीत ज्या विचार स्वातंत्र्याला अनन्यसाधारण महत्व आहे, त्याचा गळा आवळायचा. रिझर्व्ह बँक असो, नीती आयोग असो, न्याय व्यवस्था असो, विद्यापीठ यंत्रणा असो की फिल्म इन्स्टिट्यूट असो या सर्वांमध्ये भारताच्या इतिहासात पहिल्यांदा हस्तक्षेप करण्यासाठी पावले उचलली गेली. मोदी-शहा यांना असे का करावेसे वाटले. कारण त्यांना आपला अजेंडा राबवायचा होता. देशाच्या घटनेने स्वायत्त संस्था बनवून जे काही अधिकार बहाल केले होते, त्याच्यावर घाला घातला गेला… सत्ताधार्‍यांना इतकी कशाची घाई लागली होती. यातून एकच स्पष्ट आहे की त्यांना सर्व अधिकार आपल्या हाती ठेवून देशात अघोषित हुकूमशाही राबवायची आहे. इतके करून आपल्याला भारतातील लोकांचा पाठिंबा आहे हे मोदी आणि शहा यांनी सातत्याने लोकांना आपल्या हाती असलेल्या माध्यमातून दाखवण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे. तेच हिटलर आणि गोबेल्स यांनी केले होते. लोकांचा नाझी पक्षाला पाठिंबा आहे, हे दर्शवण्यासाठी रोड शोज आणि मोठे इव्हेंट आयोजित केले जायचे. त्या वेळी नेत्यांची भाषणे व्हायची. देशात सर्वकाही कसे चांगले आहे, अशा प्रकारच्या भाषणांची उजळणी या ठिकाणी केली जायची. हिटलरच्या वाढदिवशीदेखील मोठे कार्यक्रम आयोजित केले जायचे. १९३६ मध्ये ऑलिंपिकचे आयोजन करण्यात आले होते. जर्मन सरकार कसे यशस्वी आहे, हे दाखवण्याची आयती संधीच या कार्यक्रमातून गोबेल्सच्या हाती आली होती. त्याने तिचा पुरेपूर वापर केला आणि आर्यन वंश कसा शक्तिशाली आहे, हे देखील दाखवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला गेला. कला आणि कलाकार दोन्हीवर सरकारचे नियंत्रण हवे, असे या प्रचार मंत्रालयाला वाटायचे. त्यामुळे आर्ट गॅलरींमधून 6,500 चित्रं काढण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याऐवजी आर्यन वंशाच्या वीर योद्ध्यांची, सैनिकांची चित्रं तयार करण्याला प्रोत्साहन दिलं जाऊ लागलं. जर्मन सैनिक तसंच जर्मन लष्कर किती शक्तिशाली आहे, हे दाखवणार्‍या कलाकारांना विशेष प्रोत्साहन दिले जायचे.

हिटलरला स्थापत्यकलेत रस होता. त्याला वाटायचं की आपण अशा वास्तूंची निर्मिती करावी, ज्यांतून जर्मन साम्राज्याची शक्ती, समृद्धी दिसून येईल. अल्बर्ट स्पिअर या आर्किटेक्टकडून नुरेमबर्ग येथे मैदान बनवून घेण्यात आलं होतं. इथे हिटलरच्या भव्य रॅलीज व्हायच्या. प्रचारात वस्तुस्थिती सांगण्यापेक्षा भावनाप्रधान भाषेचा वापर केला जायचा. एखाद्या प्रश्नाचं अतिशय मोघम आणि सोपं उत्तर सादर केलं जायचं. विरोधक हे नेहमीच कसे चूक आहेत आणि त्यांनी वेळोवेळी कशा चुका केल्या, त्याची आठवण करून दिली जायची त्यामुळे आर्ट गॅलरीतून आपल्याला हवी तशी आणि हवी तितकी चित्रे काढून घेण्यात आली. त्या काळात नाझी विचार सोडून कोणत्याच विचाराला मान्यता नव्हती. अंदाजे २,५०० साहित्यिकांवर बंदी घालण्यात आली होती. नाझी विचारधारेला आव्हान देणारी पुस्तकं जाळून टाकली जात होती. ज्यू धर्माविषयी तसंच शांततावादी, समाजवादी आणि साम्यवादी विचारवंतांनी लिहिलेली पुस्तकं जाळून टाकली जायची. 1933 साली अंदाजे २० हजार पुस्तकं जाळण्यात आली होती. आदर्श साहित्य कसे असावे यासाठी एक पुस्तक उदाहरण म्हणून देण्यात आले होते. ते पुस्तक गोबेल्सने स्वतः लिहिलेलं होतं. ‘मायकल’ नावाची ती कादंबरी होती, आणि त्यासारखंच साहित्य निर्माण करावं, असं तो म्हणायचा. पार्टी प्रॉपगेंडासाठी चित्रपटांचा प्रभावी वापर केला जायचा. जर हलका फुलका मनोरंजन करणारा चित्रपट असेल तर त्याआधी पक्षाने तयार केलेल्या फिल्म्स दाखवल्या जायच्या. किंवा जर्मन लष्कराच्या शौर्याच्या कथा चित्रपटातून दाखवल्या जायच्या.

आपल्याकडे आता काय दिसते : मोदी सरकार विरोधात बोलायचे नाही. मग तो कलाकार असो की प्रसार माध्यमे. त्याच्यावर देशद्रोही नावाचा एक शिक्का मारून बाजूला सारायचे. देशात सरळ दोन गट पाडलेत. एक मोदी-शहा यांच्या कारभाराचे गोडवे गाणारा मोदीभक्त गट आणि दुसर्‍या बाजूला सत्तेला प्रश्न विचारणारा तट. या तटातील ६०० कलाकार मोदी विरोधक ठरवलेत आणि आपण किती महान आहोत हे दाखवण्यासाठी ९०० कलाकार मोदीभक्त असल्याचे दाखवून मोदींची कलाकारांबरोबरची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली… मोदी यांच्या जीवनावरील चित्रपट काढण्यात आला. त्याआधी टॉयलेट असे चित्रपट काढून सरकारी योजनांचा प्रचार प्रसार केला गेला. हे सारे कशासाठी तर लोकांना कळायला की आपण किती महान आहोत. हिटलरसाठी गोबेल्स हेच तर करत होता.

जर्मनीत नाझी पक्ष आणि हिटलरशिवाय कुणीच सक्षम नेतृत्व नाही, हे देखील लोकांना वारंवार सांगितले जात होते. एखाद्या उपक्रमात अपयश आले तर त्याचं खापर ज्यू किंवा कम्युनिस्टांवर फोडलं जायचं. देशातल्या प्रत्येक प्रश्नाचा संबंध ज्यू लोकांशी जोडून त्यांच्यामुळे तो प्रश्न कसा अस्तित्वात आला, याचा प्रचार केला जायचा. स्वस्तिक, ध्वज, गणवेश यांसारख्या राष्ट्रीय प्रतीकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. विरोधी विचारांचा समूळ नाश करण्यासाठी सेन्सॉरचा वापर, भव्य इव्हेंटबाजी, भाषणबाजी आणि सातत्याने नव्या, सोप्या आणि सुटसुटीत घोषणांचा वापर यामुळे गोबेल्सचे प्रचारतंत्र यशस्वी ठरले. हिटलरप्रती असलेल्या श्रद्धेमुळे गोबेल्स हिटलरचा अत्यंत विश्वासू बनला. १९४४ ला दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी त्याला हिटलरनं युद्धमंत्री बनवले. जर्मनी युद्ध हरणार, हे समजल्यानंतरही गोबेल्सने हिटलरची साथ दिली. रशियाच्या फौजा जर्मनीत घुसल्यानंतर हिटलरने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी हिटलरने गोबेल्सला जर्मनीचा चान्सलर घोषित केले आणि नंतर हिटलरने आत्महत्या केली. चान्सलर झाल्यावर जर्मनीने शरणागती पत्करावी, असा आदेश गोबेल्सनेच दिला. एका दिवसासाठी चान्सलर झालेल्या गोबेल्सने १ मे १९४५ रोजी आत्महत्या केली.

गोबेल्सच्या मृत्यूला ७३ वर्षं लोटली, पण ‘गोबेल्सनीती’ हा शब्दप्रयोग नेहमी ऐकायला मिळतो. एखादा राजकीय नेता खोटा प्रचार करताना दिसला तर त्याचे विरोधक म्हणतात की हा नेता गोबेल्सचं प्रचारतंत्र वापरतोय. कारण सोपं आहे आणि सिद्ध झालेलंही – एकच गोष्ट वारंवार सांगितल्याने असत्य देखील सत्य वाटू लागतं, आणि हेच गोबेल्सच्या नीतीचे सार होते. हेच सार घेत 5 वर्षांत भारताचा कारभार चालवला गेला आणि त्याला विकासाचे नाव दिले गेले. आता लोकांनी ठरवायचे आहे की लोकशाही हवी की ठोकशाही…!

हरीश केंची,
९४२२३१०६०९



लडाख आंदोलनामागचे वास्तव

"भारताच्या उत्तरेकडे वसलेला एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे स्वर्गाची अनुभूती म्हणजे लडाख. शांत, प्रसन्न, आल्हाददायक लडाख मात्...